नाना फडणवीस आणि गंगाबाई पेशवा यांचे संबंध नव्हते. हे सर्व नाना फडणवीस चे शत्रू मुख्यतः इंग्रजांनी कोलकत्याच्या ऑफिस मधून उठावलेल्या वावड्या आहेत.
नारायणराव पेशवा चां खून झाल्यावर त्याची पत्नी गंगाबाई हिला राघोबा व आनंदीबाई यांच्या भीतीमुळें बारभाईंनीं पुरंदर किल्ल्यावर बंदोबस्तांत ठेविलें होतें. आनंदीबाई ला माहित होते की गंगाबाई गरोदर आहे.
बारभाई ची सर्व आशा गंगाबाई याना मुलगा होते या वर होती.त्यांना जर मुलगी झाली असते तर सर्वावर पाणी फिरले असते. राघोबा दादा याना पेशवा बनवावे लागले असते.
त्यावेळी नाना फडणवीस ह्यांचा उच्चार गंगाबाई यांचा मातोश्री असा करत.
मात्र नशिबाचा कौल लागला गंगाबाई ना मुलगा झाला . नारायण यांच्या मुलाला सवाई माधवराव नाव ठेवले. अजूनही माधवरावांची मोहिनी त्यावेळी मराठा सम्रजायारून जात नव्हती हेच उमजते.त्यांना पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून त्यांनी जेजुरीच्या खंडोबाला नवस पण बोलला होता .
पुरंदर मध्ये सवाई माधवरावा च जन्म झाला (१४ एप्रिल), व नंतर ४० दिवसांनीं त्याला पेशवाईचीं वस्त्रें मिळालीं.
यात काही लोकांचा आरोप होता की नाना फडणवीस आणि सवाई माधवराव यांचा चेहरा खूप मिळतं जुळता असल्यामुळे हा त्याचाच मुलगा आहे. पण हे थोडे अतार्किक वाटते. कारण नारायणराव यांचा खून झाले तेंव्हा गंगाबाई दोन महिन्यांची गरोदर होती. मुळात गंगाबाई यांचे नारायण राव व्यांचशी 1763 मध्ये झाले. त्यांचे वय 1774 ला 15 ते 16 वर्ष असण्याची शक्यता. त्यात घरात पार्वतीबाई , आनंदीबाई यांच्या सारखा मोठ्या स्त्रियांचा वावर त्यामुळे असे संबंध अशक्यच. त्यामुळे पेशव्यांच्या जिवंतपणी हे होन केवळ अशक्य. उलट हे कारस्थान म्हणजे अफवा उठवण्याचे काम नानाच्या हितशत्रू नी केले. त्यावेळी नाना फडणवीस यांचे अनेक शत्रू होते . त्यात मराठा साम्राज्याचे पण होते आणि बाहेरचे तर अनेक होते. त्यांनी ही वावडी उठवण्याची शक्यता दाट.
खूप जणांचा आरोप होतो की नाना फडणवीस हे कामुक होते. त्यांची आठ लग्ने झालेली. आणि दोन अंगवस्त्रे पण होती असा आरोप होतो. त्यावेळी आयुष्यमान त्यातल्या त्यात स्त्रियांचे कमी होते. बाळंतपणात अनेक स्त्रियांचा मृत्यू व्हायचा. नाना फडणवीस यांनी आठ लग्न केले ते पुत्र प्राप्तीच्या हेतूने. त्यांची लालीतागौरी या घाशीराम कोतवाल च्या मुलींशी ,वाखरे सावकार ची मुलगी अश्या अनेक स्त्रिया बरोबर नाव जोडले असले तरी गंगाबाई बरोबर नाव जोडणे जरा अतिशयोक्ती वाटते.
दुसरा आरोप होतो. नाना नी निरनिराळ्या जातीच्या समान मुदतीच्या गरोदर स्रिया गंगाबाई बरोबर प्रसुत कालावधीत पुरंदरास जातील असे केले होते. या अनेक गरोदर स्त्रियांच्या घोळक्यात रावजीभाई दिवेकर नावाच्या दैवज्ञ सोनाराची बायको होती. योगायोगाने त्या दोघींचा प्रसुत कालावधी बरोबर जुळला. दिवेकराच्या बायकोला मुलगा तर गंगाबाई पेशवे हिला मुलगी झाली. आणि नाना फडणवीसाचे अपत्य अदलाबदलीचे राजकारण दाते नावाच्या बाईने पुरंदरात पार पाडले. एक सोनाराचा पुत्र पेशव्यांच्या राजगादीचा एका क्षणात मालक झाला. आणि श्रीमंत पेशव्यांच्या पोटी जन्माला आलेली मुलगी एका सामान्य सोनाराची गरीब मुलगी झाली. गंगाबाई पेशवे यांना झालेली दुर्गाबाई नावाची मुलगी दिवेकर सोनाराच्या घरी वाढली. एका गरीब सोनाराबरोबर तिचे लग्नही लागले. परंतु थोड्याच दिवसात तिला अपत्याविना मरण आले. पण ती सोनाराची मुलगी नसून नारायणराव पेशव्यांची मुलगी आहे हे नानास पक्के माहित असल्याने व आपण राजकारण करून केलेल्या फसवणूकीच्या पापातून मुक्त होण्यासाठी नानाने नारायण पेठेत तिच्या नावे दुर्गावतीचे देऊळ बांधले. त्याच्या खर्चाची सोय पर्वती देवस्थानातून केली.मात्र या आरोपाला काही पुरावा नाही.ह्या पण अफवा असू शकतात किंवा इतिहासाला माहित खरे काय ते
नंतर राघोबानें पेशव्यांशीं भांडण सुरू केलें, ते पण इंग्रजांना हातात घेऊन. पण त्या सर्व संकटांचा सामना नानानीं केला .माधवराव तीन वर्षांच असतां गंगाबाई वारली. .यापुढें त्याचें सर्व सदाशिवरावभाऊची बायको पार्वतीबाई हिंने केलें. १७८३ च्या फेब्रुवारींत त्याचें लग्न थत्ते यांच्या मुलीशी होऊन तिचें नांव रमाबाई ठेवण्यांत आलें. १७९४ सालीं पहिली पत्नी वारल्यामुळें पेशव्याचें दुसरें लग्न गोखले यांच्या मुलीशीं झालें, तिचें नांव यशोदाबाई ठेवण्यांत आलें. याच सुमारास शनवार वाडयांतील काही भाग जळाला. राघोबाचा मुलगा दुसरा बाजीराव जुन्नर येथें बंदीत होता. त्यानें पेशव्याशीं गुप्त पत्रव्यवहार सुरू केला. हें नाना फडणवीसास समजतांच त्यानें पेशव्याचा राग केला. या व इतर प्रकरणांत पेशव्याचें नानांशीं जमत नाहीसें झालें. त्याचा परिणाम मनावर होऊन सवाई माधवराव आजारी पडले. १५ आक्टोबर १७९५ रोजीं झटका येऊन त्या भरांत शनवारवाडयांतील गणपतीच्या दिवाणखान्याच्या पूर्वेकडील खिडकीतून त्यानें खाल उडी टाकली, ती हौदांतील कारंज्यावर पडून दोन दिवसांनीं पेशव्यांचा जीव गेला. असे म्हणतात की नाना फडणवीस आणि सवाई माधवराव यांचे पटत नसल्यामुळे सवाई माधवराव मानसिक दृष्ट्या कमकुवत झाले आणि आत्महत्या केली.
संदर्भ -
पेशवे घराण्याचा इतिहास : ओक
No comments:
Post a Comment