महादजी शिंदे आणि दिल्लीचे राजकारण..!
दिल्लीच्या राजकारणात महादजी शिंदे यांचे खूप मोठे स्थान होते. इंग्रजांना रोखण्यासाठी आणि दिल्लीचा कारभार नीट चालवण्यासाठी त्यांचे तिथे असणे सर्वांना गरजेचे वाटत होते.
जून १७८२ मध्ये पेशव्यांचे वकील पुरुषोत्तम महादेव हिंगणे यांनी एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी महादजी शिंदे यांच्या दिल्लीत येण्याने काय आणि किती फायदा होईल, हे स्पष्ट केले आहे.
"या प्रसंगीं राजश्री पाटीलबावांचें येणें बहुतच उपयोगी... या प्रसंगीं येथे येणें जाल्यास विपुल द्रव्य हातीं लागेल, व विना लढाई कार्य व्हावे, हा प्रसंग येथील आहे."
या पत्रावरून आपल्याला समजते की, प्रत्यक्ष युद्ध न करताच केवळ महादजी शिंदे यांच्या दिल्लीत येण्यानेच मोठी कामे होतील आणि आर्थिक फायदे मिळवता येतील, असा मोठा विश्वास मराठ्यांच्या वकिलांना होता.
संदर्भ : दिल्ली येथील मराठ्यांचीं राजकारणें (भाग १), संपादक – दत्तात्रय बळवंत पारसनीस, लेखांक ६४ (जून १७८२).

No comments:
Post a Comment