विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 14 August 2019

मराठे पानिपतचे युद्ध हरण्यामागे काय कारणे होती?------------------------------2

मराठे पानिपतचे युद्ध हरण्यामागे काय कारणे होती?------------------------------2


  1. सुभेदार अबुस समदखान, मोमीनखान आणि नजीबचा भाऊ नाजाबतखान ह्यांना मराठ्यांनी कापून काढले.
कुंजपुऱ्यात लक्ष लावून बसलेल्या मराठ्यांना गाफील ठेऊन अब्दाली बाघपत मधून निसटला आणि यमुना ओलांडून दक्षिणेकडे वळला. अब्दालीने यमुना ओलांडल्याचे मराठ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पानिपत जवळ तळ टाकला व बचाव भक्कम करण्यावर जोर दिला. २६ ऑक्टोबर १७६० रोजी अब्दाली पानिपत व सोनपत मधील संबलका येथे पोहोचला. पुढे चालणार्‍या अब्दालीच्या आघाडीच्या सेनेची मराठ्याशी येथे जोरदार चकमक झाली व मराठे पूर्ण चाल करणार इतक्यात अब्दालीची कुमक पोहोचली व मराठ्यांचे जोरदार आक्रमणाचे मनसुबे थंडावले. दोन्ही बाजुनी मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले गेले.
  1. एका चकमकीमध्ये बुंदेलेंच्या तुकडीवर अब्दालीच्या सेनेने हल्ला चढवला. ही तुकडी मुख्य सेनेसाठी रसद घोडदळीची कुमक आणत होते. मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले पण त्याही पेक्षा मोठे नुकसान म्हणजे, रसदेचा पुरवठा अब्दालीने पूर्णपणे तोडून टाकला.
पुढील दोन महिने दोन्ही सेनांमध्ये सातत्याने चकमकी होत राहिल्या व एकमेकांवर कुरघोडी करणे चालू राहिले. अब्दालीला मराठ्याच्या सामर्थ्याचा अंदाज आलेलाच होता व युद्ध फायद्यात नाही हे लक्षात आले होते. मराठ्यांच्या गोटातही उपासमार व बुणग्यांच्या ताणामुळे सदाशिवराव भाऊ तहाचा विचार करत होते. अब्दाली देखील तहाच्या बाजूने होता परंतु नजीबने तो होऊ दिला नाही, नजीबने इस्लामच्या नावावर युद्धाची शक्यता तेवत ठेवली. यामुळे मराठे अजून गोंधळात पडले. आज ना उद्या तह होईल या आशेवर थांबले. दरम्यान धान्यसाठा संपत आलेला होता, मराठ्यांची उपासमार सुरु झाली. यामुळे मराठे आजूबाजूच्या गावांमधून अन्न धान्य उचलून आणत होते. यामुळे मराठ्यांना आजूबाजूच्या गावांमधून अन्न धान्य उचलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांचा मराठ्यांवरील रोष वाढला. याउलट अब्दालीला दक्षिणेकडील मित्र पक्षांकडून रसद पुरवठा होत राहिला.
मराठा सैन्य पानिपतच्या उत्तरेकडे होते, त्यांचे मित्र पक्ष, त्यांचे रसद पुरवठादार, सैन्य कुमक हे सर्व दिल्लीच्या दक्षिणेकडे होते. तर अब्दाली पानिपतच्या दक्षिणेकडे होता. परिस्थिती लक्षात घेता युद्ध किंवा संधी असे दोनच विकल्प होते.
भाऊंनी सरतेशेवटी कोंडी मोडून काढण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रथम तोफांनी अफगाण्यांना भाजून काढायचे व नंतर घोडदळाने आक्रमण करायचे व कोंडी मोडून जिथे रसद पुरवठा निश्चित होता त्या दिल्लीला पोहोचायचे, असे ठरले.
अंतिम लढाई
१४ जानेवारी १७६१ रोजी मराठे युद्धासाठी तयार झाले, लढाईची सुरुवात मराठ्यांकडून लढणाऱ्या इब्राहिम खान गारदीने गाजवली. रणांगणाच्या उजवीकडून इब्राहिम खानने आपल्या कमानी रोहिल्यांवर भिडवल्या. मराठे गारदी, तिरंदाज व भालदार यांनी अफगाण व नजीबच्या रोहिला पठाणांना मोठ्या प्रमाणावर कापून काढले. अब्दालीचे सैन्य मागे हटले, समोर फक्त मराठेच होते. उत्स्फूर्तपणे मराठे अब्दालीकडे मजल करत होते.
अब्दालीच्या तोफा छोट्या अंतरावरच्या असल्याने युद्धाच्या सुरुवातीला काहीच फरक पाडू शकल्या नाहीत. पण त्वेषाने लढणारे मराठी सैन्य दुपारी आपसूक त्या तोफांच्या पल्ल्यात पोहोचले. तरीसुद्धा अब्दाली तोफा वापरू शकत नव्हता कारण तोफांच्या हल्ल्यात त्याचे सैनिक देखील मारले गेले असते. हीच स्थिती इब्राहिम खानाची झाली, त्याच्या लांब पल्ल्याच्या तोफा सहज अब्दालीच्या सैन्याला हरवू शकत होत्या, पण त्यांच्या पल्ल्यात मराठे सुद्धा येत होते.
सदाशिव भाऊंनी रणांगणाच्या मध्यातून अब्दालीच्या अफगाण सैन्यावर हल्ला चढवला, अफगाण मागे हटायला लागले. अफगाणी पळ काढण्याच्या बेतात आहे हे पाहून मराठ्यांच्या घोडदळाला संयम आवरला नाही व आक्रमण केले परंतु उपाशी जनावरांनी ऐन वेळी हाय खाल्ली, कित्येक घोडे रस्त्यातच कोसळले व घोडदळाच्या घावाचा दणका अफगाण सेनेला देता आला नाही.

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...