शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र –
- बहमनी राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रामध्ये विजापूर(आदिलशाही), अहमदनगरची (निझामशाही), गोवळकोडयांची (कुतुबशाही), बिदरची (बिदरशाही) आणि वर्हाडची (इमानशाही) ही पाच स्वतंत्र राज्ये उदयास आली. हे राजे सत्तासंघर्षांकरिता आपआपसात लढाया करीत असे.
- या कामाकरिता हे राजे लोक मराठ्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेत असे. यामुळे महाराष्ट्रात अनेक पराक्रमी घराने उदयास आली.
- त्यात सिंधखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले पराक्रमी घराने होते. या सर्वामध्ये भोसले घराण्याचा विशेष दबदबा होता.
- कोणताही मराठा सरदार सुलतानकडे गेला की, सुलतान त्यास चाकरीत ठेवत असे व त्यास सरदारकी व जहागिरी देत असे.
- हे सरदार जहागिरीवर खुश असे आणि स्वत:ला राज्यासारखे समजत असे.
- शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वी भोसले घराण्यात खालील व्यक्ति प्रसिद्धीस आल्या.
- बाबाजीराजे भोसले – बाबाजी भोसले हे भोसले घराण्याचा मूळ पुरुष मनाला जातो. त्यांच्याकडे वेरूळ गावची पाटिलकी होती. त्यांना मालोजीराजे व विठोजीराजे असे दोन मुले होती.
- मालोजीराजे भोसले – मालोजीराजे भोसले घराण्यातील पहिला पराक्रमी पुरुष मनाला जातो. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. त्यांना शहाजीराजे व शरीफजी असे दोन मुले होती. शहाजीराजे पाच वर्षाचे असतांना इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे मारले गेले.
- शहाजीराजे भोसले – भोसले घराण्यातील सर्वात पराक्रमी व्यक्ति म्हणून शहाजीराजे ओळखले जातात. निजामाने मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांच्या नावे करून दिली. सन 1664 मध्ये शिकारीच्या प्रसंगी शहाजीराजेंचे निधन झाले.
No comments:
Post a Comment