विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 23 May 2021

वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना भाग ४

 वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना


भाग ४
राजाराम महाराज - झुल्फिकार खान
काही जाणकारांच्या मते झुल्फिकार खान जिंजीला आल्यावर थोडे महिन्यांनी राजाराम महाराज व झुल्फिकार खान ह्यांच्यात एक छुपा अलिखित सला होता.जरी काही ब्रिटीश आणि पोर्तुगीज कागदपत्रात ह्याचा उल्लेख आहे , तरी ह्याला इतिहासात कुठे ही वाचा नाही - पण काही घटना लक्षात घेण्यासारख्या आहेत. झुल्फिकार खान व वजीर असद खान हे शाहजादा शाहआलम चे समर्थक असावे असं दिसते - तो औरंगजेबानंतर बादशाह झाला तर त्याच्याकडून आपली वजिरी पक्की करायची असा हेतू असू शकतो. ह्या योजनेत राजाराम महाराजांसारख्या बलाढ्य छत्रपतींची मदत नक्कीच झाली असती. राजाराम महाराजांच्या दृष्टीने वरवर दाखवण्यासाठी वेढा चालू ठेऊन स्वराज्य बळकटीचे काम चालू ठेवण्यासाठी ही योजना चांगली होती. वर दिल्याप्रमाणे संताजी-धनाजी च्या हल्ल्यानंतर मोगली सैन्याला पूर्ण उद्ध्वस्त करण्याचा मोका होता - परंतु तसे न करता त्या वेळी सला करण्यात आला. झुल्फिकार खानाच्या जागी नवा मोगली सरदार येऊन जिंजीला धडकला असता, त्यापेक्षा होते ते स्वराज्यासाठी बरे होते. ह्याच घटने वरून कदाचित राजाराम महाराज- संताजी ह्यांचे भांडण झाले असावे. असा छुपा समजोता दोन्ही बाजूनी होता का नव्हता हे सिद्ध करायला काहीच संदर्भ नाहीत. पण जर ते खरे असले तर आपल्या मुत्सद्देगिरीने आणि खोटे असले तर आपल्या पराक्रमाने राजाराम महाराजांनी औरंगजेबाला ८ वर्ष चांगलीच चपराक दिली ह्यात शंकाच नाही.
शेवटी एवढेच म्हणीन की जिंजीला वेढा घालून राजाराम राजेंना पकडायचे असंख्य प्रयत्न करून शेवटी मोगलांच्या हाती पडली ती शिकस्त आणि फक्त शिकस्तच

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...