विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 23 May 2021

पेशवे "थोरले बाजीराव" यांनी अलाहबादचा सुभेदार 'मुहम्मदखान बंगश' याचा दारुण पराभव केला

 २३ मे इ.स.१७२९


पेशवे "थोरले बाजीराव" यांनी अलाहबादचा सुभेदार 'मुहम्मदखान बंगश' याचा दारुण पराभव केला.
खान मोठे सैन्य घेऊन 'बुंदेलखंडावर' चालून आला तेव्हा राजा "छत्रसाल" याने "थोरल्या बाजीरावांची" मदत मागितली. पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात, 'जो गति ग्राह गजेंद्रकि सौ भई हे आज..... बाजी जात बुंदेलकी राखो बाजी लाज'. आपल्या २५,००० घोडदळासकट बाजीराव त्याच्या मदतीस धावून आले, सर्वप्रथम खानची संपुर्ण रसद तोडून त्याला मुघल बादशहाकडून कुठलीच मदत मिळु दिली नाही. जयपुरकडून खानाचा मुलगा "कैमखान" बापाच्या मदतीस धावून आला पण "थोरल्या बाजीरावांनी" त्याचा पराभव केला. आता 'बंगशखानने' पुर्णपणे शरणागती पत्करली व "राजा छत्रसाल" वर पुन्हा आक्रमण करणार नाही असे कबुल करुन आपली सुटका करुन घेण्यात यशस्वी झाला. "राजा छत्रसालने" बाजीरावांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांना काल्पि, झांशी, सागर, सिरोंज, हरदेनगर यांचा वार्षिक महसुल " ३३ लक्ष " बहाल केला.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...