औरंगजेबाचे कुटुंबाची माहिती
भाग १
गुजरात ला शाहजहान जेंव्हा गुजरात चा सुभेदार होता, ४ नोव्हेंबर ला १६१८ ला दाहोद (गोधरा शेजारचे ) हा " अब्दुल मुजफ्फर मोइनुद्दिन मोहम्मद औरंगझेब आलमगीर पातशाह "जन्माला आला ’ जरी त्याचे आयुष्य फकीरासारखे व्यतीत करत होता तरीसुद्धा त्याने आपल्या कुटुंबावर बऱ्यापैकी अन्याय केल.मुघल रीतीने औरंगझेबनं सख्ख्या भावांना दारा शुकोह ,मुराद आणि शुजाला ठार केलं होतंच.
औरंगेझाला आपल्या जिवंत पणि ६ अपत्य आणि तीन बायका चा मृत्यू पहावा लागला ( झेबुनिसा (१७०२), झूब्दात ऊन निस(१७०७), मोहम्मद सुलतान(१६७६), बद्र ऊन निस्सं (१६७०),* शाहजादा अकबर (१७०६), मेहेर ऊन निस्सं (१७०६) दिलरसबानू बेगम (१६५७ ), राहमतउन्नीस उर्फ नवाब बाई (१६९१) औरंगाबादी महाल (१६८८)
औरंगजेब ला एकूण ४ बायका,आणि त्यांच्यापासून झालेली १० मुले-मुली अशे कुटुंब होते
त्याच्या चार बायका अशा
१ ) दिलरसबानू बेगम-शाहनवाजखान याची हि मुलगी.या खानाचा पणजोबा पर्शियन बादशाह चा मुलगा होता. १६३७ ला आग्रा येथे दोघांचा विवाह झाला.मोहम्मद अकबर याची धाकटा युवराज हि आई.हिला तिच्या पर्शियन रक्ताचा अतिशय अभिमान वाटत असे.असे म्हणतात,कि औरंगझेबाला हिच्या मृत्युपर्यंत तिचा दरारा वाटत होता.औरंगाबाद येथे ८ ऑक्टोबर १६५७ ला तिचा मृत्यू झा१६६० ला दिलरस बानू मरण पावली आणि औरंगझेब ने औरंगाबाद मध्ये तिच्या नावाने बीबी का मकबरा बनवला


No comments:
Post a Comment