विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 4 February 2026

"अंगद-हनुमंत जैसे रामाला, जेधे-बांदल तैसे शिवाजीला"

 





"अंगद-हनुमंत जैसे रामाला, जेधे-बांदल तैसे शिवाजीला"

लेखन :वैभव बांदल देशमुख (Vaibhav Bandal)
आताचा भोर, वेल्हे, वाई तालुके जे आधीचे हिरडस मावळ खोरे, बांदल देशमुख इथले देशमुख होते छत्रपती शिवाजी महाराजांचे लाल महालात बालपण जात असताना राजमाता जिजाऊ या पुण्याचा कारभार पाहत होत्या, तेव्हा दादोजी कोंडदेव यांनी बारा मावळचे बारा देशमुख एक करण्यास मांडलीक होण्यास आदेश दिले तेव्हा हिरडस मावळच्या कृष्णाजीराजे नाईक-बांदल देशमुखांनी त्यास विरोध केला पुढे दादोजी कोंडदेव यांनी कृष्णाजी नाईक- बांदल यास सल्लामसलतीस बोलावून कपटाने मारले,आणि बांदल देशमुख ही जिजाऊ माँसाहेब याच्या परगण्यातील मांडलिक झाले .
आता मूळ प्रश्नाकडे येऊयात प्रतापगडावरील अफजलखान वधावेळी बांदल देशमुख,जेधे देशमुख महाराजांसोबत होते जनीचा टेंभा हा बांदलांनीच राखला होता आजही प्रतापगडी बांदल राहतात ते अगदी तेव्हापासूनच जावळी परगण्यात स्थायिक झालेले आहेत,अफजल खानाचा वध करून कृष्णामाय चा घाट पवित्र झाला अन महाराजांनी पन्हाळगडी स्वारी केली, आदिलशाहीस लागलेला जोराचा दणका होता हा , आदिलशाह च्या बेगमने सिद्दीस पन्हाळगडी धाडले , गडावरून बाहेर पडण्यासाठी महाराज प्रयत्न करू लागले, नेताजी पालकर बाहेरून वेढा फोडण्याचे प्रयत्न कुचकामी ठरले यात महाराजांनी नामी युक्ती लडवली आणि शिवा काशीद यांनी ती जबाबदारी स्वीकारून स्वतः महाराजांच्या वेशात वीरगती पत्करली, बाजीप्रभू देशपांडे हे बांदल देशमुख यांचे दिवाण होते, बाजी बांदल रायाजी बांदल सोबत ६०० बांदलांच्या तुकडीसोबत महाराज पन्हाळगडावरून निघाले यात बाजी बांदल रायाजी बांदल आघाडीवर होते.
गजापूरच्या घोडखिंडीत सिद्धीस जागीच थोपवण्या बाजी,रायाजी ,बाजीप्रभू फुलाजीप्रभू,शंभुसिह जाधव, पार्टे यांनी महाराजास विशाळगडाकडे कूच करण्या सांगितले ३०० बांदल सेनेसोबत महाराज विशाळगडाच्या दिशेने दौडू लागले , आणि खिंडीत लढणारे ३०० बांदलांनी बाजीप्रभू देशपांडे सहित पराक्रमाची शर्थ केली बांदलांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली.
विरगतीस प्राप्त झालेल्या बांदल देशमुखांच्या पिसावरे या गावी जाऊन महाराजांनी भेट दिली सोन्याची कडी दिली, त्यासोबत स्वराज्याच्या मनाच्या पहिल्या तलवारीचा मान बांदल देशमुखांना दिला.
शाहिस्तेखानाची बोटे छाटली त्या प्रसंगातही कोयजी बांदल महाराजांसोबत होते,महाराजांच्या निकटवर्तीय असणारे जेधे-बांदल देशमुख ही मराठा घराणी,काही इतिहासकारांनी जाणीवपूर्वक लपवली गेली,फक्त बाजीप्रभू देशपांडे याचाच इतिहास पिढीला शिकवला गेला, आमच्या तकरीरी काही इतिहासकारांनी गोड गोड बोलून नेल्या त्या माघारी दिल्याचं नाहीत.
बांदलांच्या तीन पिढ्यांनी स्वराज्यावरून जीव ओवाळले त्याच घराण्याचा एवढा मोठा इतिहास २ ओळीत लिहला आणि जगासमोर आणला याचीच खंत वरील छायाचित्रात बांदल तकरीरी आणि बाजीप्रभू देशपांडे याचा उल्लेख असलेले पत्र आहे

No comments:

Post a Comment

संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

  संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१ कारखेलच्या जंगलात भूमिगत असलेल्या संताजीच्या पाळतीवर नागोजी माने होता. ज्याने आपल्या कुळाचे क्षास्त्रतेज दा...