बाण + दल = बांदल
लढवय्या कधीही प्रसिद्धीपराङमुख असतो ह्याचं जाज्वल्य उदाहरण म्हणजे बांदल सेना..
अंधारात असलेली ही बांदलांची कहाणी ऐकेल तो नमन करेल ह्यात तिळमात्र शंका नाही..
लाखांचा पोशिंदा जगवणार्या ह्या इतिहासकर्त्या जमातीला अंधारात ठेवुन इतिहासकारांनी काय साधलं माहित नाही पण सुर्य झाकल्याने लपतो काय ? किंवा खळाळता झरा कोणत्या शिळेनं वहायचा थांबतो काय ? तद्वतच ही पराक्रमाची रक्तरंजित कहाणी न सांगितल्यानं लपुन राहणारच नाही.
★ बांदल सेना ★
● "भूपा हिर्दसो भ्धुतः प्रभुत भिजन प्रियाः ॥
मज्जैत्र यत्राः कुवर्णाः प्रोल्लो सन्ति पदे पदे ॥"
अर्थ- "हिरडस मावळामधे लोकप्रिय असणारे राजेबांदल माझी विजय यात्रा यशस्वी करत,प्रत्येक पावलाला माझ्या सैन्याचा उत्साह वाढवीत आहेत."
बांदलांच वरिल वर्णन दस्तुरखुद्द शंभुछत्रपतींनी केलंय...
● "जैसे अंगद हनुमंत श्रीरामाला तैसे 'जेधे' 'बांदल' शिवाजीला"
असं बांदलांचं वर्णन जेधे शकावलीत आलेलं आहे...
या नावाचा संधी विग्रह बाण+दल= बांदल असा केला जातो.. म्हणजे तिरकामठ्याने(धनुष्यबाण) लढणारी सेना.
- कृष्णाजी बांदल हिरडस मावळाचे म्हणजे आळंद ते उंबर्डे या क्षेत्राचे स्वतंत्र वतनदार..
- सन 1625 मधे बांदलांनी निजामाचा वजिर मलिक अंबरास हरवुन केंजळगड जिंकला..
- 1636 मधे दादोजी कोंडदेव(आदिलशाही,विजापुर सल्तनत) याने कृष्णाजीं बांदल यांजवर हल्ला केला व पराभुत झाला...
- पराभवानंतर दादोजीने कृष्णाजींना मसलतीस बोलावुन कपटाने कैद केले व खुन केला..
- कृष्णाजींच्या मृत्युनंतर पत्नी दिपाऊ व पुत्र बाजी बांदल आपल्या बांदल सेनेसमावेत स्वराज्यास सामिल झाले..
- बांदल सेनेने स्वराज्यासाठी पुढील लढायांत योगदान दिल्याचे संदर्भ मिळतात...
- पैकी प्रतापगड युद्धात कान्होजीराव जेध्यांसमावेत बांदल सेनेने महत्पराक्रम गाजविला यानंतर शिवरायांनी रुस्तम-ए-जम्याला हरवुन राजापुर व विशाळगड हस्तगत केला विशाळगडाच्या संरक्षणासाठी महाराजांनी बांदल सेनेला तैनात केले..
- तसंच पन्हाळगडच्या पायथ्याला पडलेल्या सिद्धीच्या फौजेला गुंगारा देऊन विशाळगडाकडे जाताना वाटेत गजापुरच्या खिंडीत अवघ्या तिनशे बांदल मावळ्यांनी सिद्दी मसुदच्या फौजेला रोखुन धरुन लढता लढता विरमरण पत्करले...
- यानंतर छत्रपतींनी राजगडदरबारी तलवारीच्या पहिल्या पानाचा मान रायजी नाईक बांदल यांना बहाल केला..
- बांदल हे जन्मजात योद्धे होत, बांदलांच्या सेनेनं गजापुरच्या खिंडीत गाजवलेला पराक्रम अद्वितीयच आहे पण आम्ही कथा कादंबर्या वाचुन खिंड फक्त बाजीप्रभुंनीच लढवली असा समज करुन बसलो आहोत. बाजीप्रभूंच्या पराक्रमाला वंदनच आहे पण याच लढाईत शंभुसिंह जाधव आणि तिनशे बांदलदेखिल प्राणपणानं लढले होते,ज्या प्रमाणात बाजीप्रभुंचा उल्लेख होतो त्या प्रमाणात आजही बांदल सेनेचा किंवा शंभुसिंह जाधवरावांचा साधा उल्लेख होत नाही ही मोठी खंतच...
- दक्षिण दिग्विजय मोहीमेत रायजी नाईक बांदल छत्रपतिंसमावेत होते,मोगली सेनेने शिरुर-शिक्रापुर येथे केलेल्या लुटीमुळे रायजींनी विडा उचलुन मोगली फौजेवर हल्ला केला...
- या शिक्रापुरच्या घनघोर रणसंग्रामात रायजी विरगतीला प्राप्त झाले...
- रायजीचे पुत्र सुभानजी यांना छत्रपतींनी मानाची तलवार बहाल केली...
तर अशी बांदल या नावाची ज्ञात गाथा _/\_
" एका विशिष्ट वर्गाच्या योद्ध्यांचीच दखल आजवरच्या 'पक्षपाती' इतिहासकारांनी घेतली आहे त्यामुळे बांदल सेनेचा पराक्रम आजवर अंधारातच आहे...
पण खरा इतिहास हा ढगांनी झाकोळलेल्या सुर्यासम असतो जास्त काळ लपुन राहत नाही..."
असो
- छत्रपतिंशी एकनिष्ठ असणार्या बांदल देशमुख घराण्यातील विरांच्या समाध्या पिसावरे ता.भोर,पुणे या गावी असुन इतिहासप्रेमींनी थोडी वाट वाकडी करुन आवर्जुन भेट देण्यासारख्याच आहेत...
- या शुर परंतु अपरिचीत योद्ध्यांना वंदन _/\_
बांदलांनी शंभुराजांच्या काळातदेखील स्वराज्याशी इमान ठेवले होते
संदर्भ-
1- स्वराज्याचे शुर सेनानी:दामोदर मगदुम
2- जेधे शकावली:अ.रा.कुलकर्णी
3- शिवभारत:संपादक स.म.दिवेकर
4- बांदल तकरीर:संपादक ग.ह.खरे,ना.के.जोशीँ


No comments:
Post a Comment