विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 23 May 2021

चालुक्य घराणे भाग ५

 चालुक्य घराणे :

पोस्त सांभार :मराठी विश्वकोश


भाग ५
बादामीचे चालुक्य : ---४
द्वितीय विक्रमादित्य ह्याचा पुत्र द्वितीय कीर्तिवर्मा ७४४-४५ च्या सुमारास गादीवर आला. त्यानेही युवराज असताना पल्लवांचा पराभव केला होता. बादामीच्या चालुक्य वंशातील हा शेवटचा राजा होय. ७५४ च्या पूर्वी राष्ट्रकूट नृपती दन्तिदुर्ग याने याचा पराभव करून याचा बराचसा प्रदेश बळकावला. तथापि यानंतर काही वर्षे कीर्तिवर्मा आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यात राज्य करीत असावा. कारण त्याचे ७५४ व ७५७ चे ताम्रपट उपलब्ध आहेत, पण नंतर दन्तिदुर्गाचा चुलता आणि उत्तराधिकारी प्रथम कृष्ण याने त्याचा समूळ उच्छेद करून चालुक्यांची सत्ता नामशेष केली. आंध्र व गुजरात या प्रांतांवर त्यांनी नेमलेले नातेवाईक प्रबळ होऊन त्यांनी आपली सत्ता स्थापली. शेवटचा राजा तितकासा पराक्रमी नसल्यामुळे उदयोन्मुख राष्ट्रकूटांपुढे त्याला हार खावी लागली आणि त्यांच्या साम्राज्याचा अस्त झाला. तथापि तो वंश नष्ट झाला नाही. द्वितीय विक्रमादित्याचा भाऊ पहिला भीम याचा वंश : पहिला भीम, तिसरा कीर्तिवर्मन, पहिला तैलप, तिसराविक्रमादित्य, दुसरा भीम, पहिला अय्यण, चौथा विक्रमादित्य व दुसरा तैल हे राजपुरुष राष्ट्रकूट मध्यंतरात होऊन गेले आणि दुसऱ्या तैलपाने चालुक्य वंशाची पुन्हा स्थापना केली.
बादामीच्या चालुक्यांची वंशावळ
जयसिंह
|
रणराग
|
प्रथम पुलकेशी (सु. ५३५ ते ५६३)
|
|
|
प्रथम कीर्तिवर्मा (५६६-६७ ते ५९७-९८)
मंगलेश (५९७ ते ६१०-११)
|
|
द्वितीय पुलकेशी (६१०-११ ते ६४२)
कृष्ज विष्णुवर्धन
|
|
प्रथम विक्रमादित्य (६५५ ते ६८५)
धराश्रय जयसिंह
|
|
विनयादित्य (६८१ ते ६९६)
श्रयाश्रय शीलादित्य
|
विजयादित्य (६९६ ते ७३३)
|
द्वितीय विक्रमादित्य
(७३३–३४४ ते ७४–४५)
|
द्वितीय कीर्तिवर्मा (७४४-४५ ते ७५७)

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...