विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 23 May 2021

चालुक्य घराणे भाग ८

 चालुक्य घराणे :

पोस्त सांभार :मराठी विश्वकोश



भाग ८
कल्याण (णी)चे चालुक्य :-------३
षष्ठ विक्रमादित्याच्या मागून त्याचा पुत्र तृतीय सोमेश्वर गादीवर आला. याच्या कारकीर्दीत होयसळ विष्णुवर्धनाने राज्यावर स्वारी केली होती पण त्याने ती परतवून लावली. त्याने स्वत: आंध्र व तमिळ प्रदेशावर स्वाऱ्या केल्या पण त्यापासून त्याला काही फलप्राप्ती झाली नाही.
त्यानंतर जगदेकमल्ल ११३८ मध्ये गादीवर आला. त्याने होयसळ व कदंब मांडलिकांची बंडे मोडून काढली. त्याने माळव्यावर स्वारी करून तेथे बल्लाळनामक अधिपतीची स्थापना केली पण लवकरच चालुक्य नृपती कुमारपाल याने त्याला पदच्युत केले.
जगदेकमल्लानंतर त्याचा भाऊ तृतीय तैल गादीवर आला. चालुक्य कुमारपाल व द्वितीय कुलोत्तुंग चोल यांनी दोन्हीकडून याच्या प्रदेशावर स्वारी केली. ती तो परतवून लावतो तो त्याचा मांडलिक काकतीय प्रोल याने बंड केले. तैलाने त्याच्यावर स्वारी केली पण तो स्वत:च पकडला गेला. पुढे त्याची सुटका झाली पण या घटनेने त्याची प्रतिष्ठा कमी होऊन त्याचे मांडलिक चोहीकडून त्याच्यावर उठले. त्यातील एक कलचुरी बिज्जल याने कल्याण राजधानी काबीज करून चालुक्य साम्राज्याचा शेवट केला. पुढे तृतीय तैलाचा पुत्र चतुर्थ सोमेश्वर याने बिज्जलाच्या वंशजांकडून ११८१ मध्ये काही प्रदेश जिंकून घेतला पण त्याला आपले राज्य फार काळ टिकवता आले नाही. ११८९ च्या पूर्वी यादव नृपती सिंधण याने त्याला पदच्युत करून त्याचे राज्य खालसा केले. नंतर सोमेश्वर गोव्याच्या मांडलिकाच्या आश्रयास गेला. पण ११९८ नंतर त्याच्याविषयी काहीही माहिती मिळत नाही.
वंशावळ

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...