विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 27 July 2024

!!! झाशीची राणी !! भाग - १९.


 !!! झाशीची राणी !!
भाग - १९.
राणीसाहेबांच्या बोलण्याने प्रत्येक दरबारी भारावुन गेला.शेतकर्यांचा सारा माफ केल्याने त्यांनी आनंदाने पेरण्या केल्या.तात्या टोपेकडुन हेर बातम्या कळवित होते.तोच गंगाधर राजेचे लांबचे चुलतभाऊ सदाशिवरावांनी १६ जुनला अभिषेक करवुन "झाशीके गौरव महाराज सदाशिवराव नारायण" हा किताब घेतला.राणीसाहेबांनी त्वरीत कार्यवाही करुन त्यांना किल्ल्यात बंदी केले.या यशानंतर महत्वाच्या व्यक्तींना मोठमोठे पदे देऊन त्यांचा गौरव केला. महिलांचे सैन्यदल वाढवल.आपल्या सारंगी घोडीच्या पाठीवर स्वार होऊन राणीसाहेब झाशीच्या गल्ली सडकावरुन सैनिकांना,कर्मचार्यांना सूचना,मार्गदर्शन करीत फिरत याचा त्यांना सार्थ अभिमान वाटे.शिपयांना चांगले खायला घालुन स्वतः गुळ लाह्या खाणार्या या वत्सल, कर्तुत्वानवान राणीसाठी सख्या,दरबारी, प्रजा,कर्मचारी,शेतकरी,व्यापारी हे सारेच जीवाला जीव देण्यास सज्ज होते.
ओरच्छा आणि दतियातील राज्या च्या मनांत राणींविषयी दरवर्षी ६०००रु. कर,लगान द्यावा लागतो म्हणुन अढी,राग होता त्यामुळे त्यांच्याशी कधीही युध्दास तोंड लागु शकणार होते.राणींनी युध्दाची जय्यत तयारी केली.सारी झाशी तन मन धनाने राणीसाहेबांच्या पाठी ठामपणे उभी होती.त्या स्वतः सैनिकांच्या घरी जाऊन अन्नपाण्याची सोय,शस्राची चौकशी करत आधार देत होत्या.गणपती मंदिरात भोजणासाठी मुक्तदार ठेवण्यात आले.बाणापुरच्या राजाने इंग्रजांशी असहकार पुकारल्यामुळे व आधीच राजाची आणि राणीसाहेबांची बहिण भाऊपणाची आणक्रीया असल्यामुळे, आपली बायका मुले,राणीवसा झाशीत आणुन ठेवुन स्वतःला युध्दात झोकुन दिले.पण इंग्रजांच्या आधुनिक शस्रापुढे टिकाव लागला नाही.बाणापुर इंग्रजांच्या ताब्यात गेले.पराभूत राजे झाशीस येऊन म्हणाले,राणीसाहेब!आमच्या प्रयत्नाला यश नाही आले.
बंधो!आपण इथे राहुन किल्ल्या च्या संरक्षणाकडे जातीने लक्ष द्यावे.हे ही आपलेच राज्य आहे.ओरच्छाहुन धमकीचे पत्र आले आहे.
राणीसाहेब! झाशीहुन,शिंदे सरकारच्या ग्वाल्हेरला जाणारी डाक आमच्या छापेमारांनी पकडली.त्यातील प्रत्येक कागद पाहत असतां,झाशीहुन बेनाम फितूरीचे झाशीराज्य घेण्याबद्दलचे मजकुराचे पत्र मिळाले,तेच सांगायला मुद्दाम इथे आलोय!राणीसाहेबांनी एवढ्या रात्री ताबडतोब सभा बोलावली. एका ताटात बाण आणि बेलभंडार ठेवले होते.सभेमधे बाणापुरच्या राजाने पत्र वाचन करतांच सर्वांच्या मुखातुन आश्चर्यो द्गार निघाले.आपल्याच सरदारांना शपथ द्यावी लागते केवढे दुर्देव?सर्वांनी बेलभंडार हाती घेऊन झाशीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली.बाणेपुरचे राजे त्याच रात्री परिवारास घेऊन वेत्रावतीकडे निघुन गेले.ओरच्छाकडुन आक्रमण होणारची वार्ता रोज वेगाने येत होती.
जुनमधे राणींचं राज्य सुरु झालं, त्याच महिन्याअखेरीस सागरसिंग डाकु खिसनीच्या जंगलात आल्याची खबर मिळाली.त्याच्या सोबतच्या हत्यारी जमाव ठीकठीकाणी दरोडे,लुटालुट,रक्त पात करत असल्यामुळे बरुआसागरची जनता त्रस्त झाली.राणींच्या नजरबाजां नी सागरसिंग किसलीच्या जंगलात लपुन असल्याची खबर आणल्यावर जंगल व डोंगराला राणीने वेढा घातला.वेढा घातले ला पाहुन तो पळुन जाऊ लागल्याबरोबर राणींनी स्रीसैनिकांसह पाठलाग करुन त्याचेवर वार केल्याने तो घोड्यावरुन कोसळताच त्याला बरुआसागरला आणुन कैद केले.राणींचा पराक्रम पाहुन प्रभावित होऊन तो शरण आला व आपल्या सैन्यासह राणींच्या सैन्यात सामिल झाला.राणींच्या पराक्रमाने प्रजा उल्हासीत झाली.
श्रावणी पोर्णिमेला येणार्या भुजरियाच्या मेळाव्याच्या तयारीला प्रजा व्यस्त झाली.सर्व शहर सजुं लागले.मंदिर सजले.नांगर आणि चामर असलेला राणी साहेबांचा झेंडा किल्ल्यावर फडकत होता आणि त्याचवेळी ओरच्छाचा नत्थे खाॅं ससैन्य झाशीकडे निघाल्याची वार्ता मिळाली.राणींनी सर्वांना एकत्रीत करुन, भेदभाव विसरुन नत्थेखाॅंला चोख उत्तर देण्याचे आव्हान केले.
सप्टेंबरमधे नत्थेखांने झाशीला वेढा दिला.झाशीच्या परकोटाचे दरवाजे सख्त बंद असल्यामुळे ओरच्छासैनिकांचे नगरांत घुसण्याचे प्रयत्न वाया गेले. परकोटावरुन झाशीचे सैनिक नत्थेखाॅं च्या सैनिकांवर उकळते पाणी,तेल,पेटते गवत,दगडधोंडे फेकल्याने सैनिक जखमी होऊन पडुं लागले.एका फटक्यात झाशी घेऊ ही नत्थेखांची घमेंड पार उतरली.साधे परकोटाचे दारही उघडुं शकला नाही.झाशी सैनिकांनी छापामार करुन त्या सैनिकांना हैराण केले.ओरच्छा सैनिकांचे मनोबल ढासळले.त्याचवेळी स्रीसैन्यासह राणी मैदानात ऊतरल्या. घनसाम लढाई झाली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.


!!! झाशीची राणी !!! भाग - १८.


 !!! झाशीची राणी !!!
भाग - १८.
सकाळी विष्णुभट जाताच दुपारी राणीसाहेबानी विश्वासु अनुचर व सेना नायक असे मोजक्याच लोकांची बैठक बोलावली.राणीसाहेब बोलण्यास सुरुवात करीत म्हणाल्या,माझ्या शूर निष्ठावान जिवलगांनो!आतां प्राण पणाला लावायची वेळ आली आहे. सगळीकडे स्वातंत्र्यसंग्राम उठाव सुरु झाला.प्रथम इंग्रजांच्या तैनातीत असलेल्या आपल्या देशी सैनिकांना आपलेसे करा.राणीसाहेब! कॅप्टन स्कीनच्या अधिन असलेलं आपलं ८८१ देशी सैन्य उठावाच्या तयारीत आहेत. आम्ही पण इंग्रजांना अनुकुल असल्याचा बहाणा चालु ठेवत अस्रशस्राना धार लावत आहोत.हरहर महादेव..जय भवानीच्या गर्जनेत दरबार संपला.इंग्रजांचा स्टारफोर्ट ह्या लहान किल्ल्यावर असलेला दारुगोळा गनिमी काव्याने हल्ला चढवुन ताब्यात घेतल्या वर कॅप्टन डनलाॅपला मोठाच धक्का बसला.तोवर इंग्रजांचे दोन बंगले जळुन खाक केले.मुख्याधीकारी बक्षी अलीने तुरुंगातील सर्व कैदी सोडुन दिले. कार्यालयातील दस्तएवज जाळले.राणीं चा जयघोष करीत हजारो सैनिकांनी किल्ल्यास वेढा घातला.आजपर्यंतचा अपमान,अवहेलना,उपेक्षा राणींवरचे अनेक अन्याय या सुडाने पेटलेले सैनिक कोणालाच आवरेनासे झाले.कांही इंग्रज अधिकारी राणींकडे येत असतां त्यांनाही तुडवले.दिल्लीवरचं इंग्रजी सरकार संपलं मेरठची छावणी जाळली.इंग्रजांना बाहेरुन कोणतीही मदत मिळत नव्हती. त्यांना मदत करणारा यमसदनी जात होता.७जुनला आत्मसमर्पनार्थ कॅप्टन स्कीनने किल्ल्यावर पांढरे निशाण फडकावले.राणीसाहेबांनी झोकनबागेत आश्रयास त्यांना पाठवले असतां काले खाॅंच्या नेतृत्वाखाली ६४ बायकामुले व कॅप्टन स्कीनला कापुन काढले. ६५ प्रेते झोकनबागेत पडले.बेफान सैनिकांनी प्रजेला लुटु,छळु नये म्हणुन एक लाखाचे दागिने राणींनी त्यांना दिले.सैनिक दिल्ली कडे राणींचा जयजयकार करत निघाले.
शासनव्यवस्था सांभाळण्यासाठी सर्वानुमते राणीसाहेबांना विनंती करण्यात आली.सर्वांची विनंती मान्य करुन राणीसाहेब म्हणाल्या,आम्हाला फक्त एकच खंत इंगज बायकामुलांना मारण्याची.ही परिस्थिती अशीच ठेवण्या साठी गनिमीकाव्याने वागणे भाग आहे. युध्दाचा सरंजाम व किल्ल्यावर तोफा सिध्द ठेवा.आपण पुर्ववत किल्ल्यावर रहावयास जाऊ त्यासाठी वास्तुशुध्दी करुन,महालक्ष्मी मंदिर,गणपती मंदिरांत अभिषेक पुजा,चौघडा,सनई, पुर्ववत सुरु करा.त्याप्रमाणे कमिशनर इरिस्कीनला पत्र जाऊ द्या.झोकनबागेतील शवांचे दफन करण्याची आज्ञा देऊन सभा संपवली.
झाशीवर राणी लक्ष्मीबाईंचे राज्य सुरु झाले.शासनाचे बागदोर आतां राणीं च्या हाती होते."मेरी झाॅंशी नही दूंगी" अशी गर्जना करत हाती आलेलं राज्य वज्रकठोर होऊन प्राणपणाने सांभाळाय चे होतं.ओरच्छा आणि दतिया राणींवर दात खाऊन असल्यामुळे किल्ला, परकोटांची दुरुस्ती करुन किल्ल्याच्या बुरुजांवर तोफा उभ्या केल्या.नव्या तोफा गोळा बारुद,शस्रे,अस्रे यांचे कारखाने धडाधड चालु झाले.सर्व जाती धर्माच्या लोकांना भेदभाव न ठेवतां सेनेत भरती करण्यांत आले.महिलांचं दल वाढविण्या त आलं.लक्ष्मीबाईच्या दूरदृष्टीचा उदोउदो होत होता.दरम्यान सागरचे कमिशनर इरिस्कीनचे घोषणापत्र आले,जोपर्यत ब्रिटिश अधिकारी व सैन्य झाशीत पोहचत नाही तोपर्यंत राणी लक्ष्मीबाई ब्रिटिश सरकारच्या नांवाने शासन सांभाळतील,सर्व वस्तुचे,मालगुजारीचे अधिकार देण्यांत आले.अशी दवंडी नगरात पिटण्यात आली.आणि त्याच वेळी मोजक्या अधिकार्यांसह गुप्त बैठक चालु होती.राणीसाहेब बोलु लागल्या..
आतां इथे ब्रिटिश कधीच पोहचणार नाही ही काळजी घेऊन अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. फितूरांपासुन सावध राहा.नजरबाज आपले डोळे,त्यांना भरपुर बिदागी द्या. सैन्य मजबुत करा.वसुलीमधे सुट द्या. इंग्रज कधीही उठाव करुं शकतो हे पुरते लक्षात असु द्या.तात्या टोपे,नानासाहेब, रावसाहेब स्वराज्यासाठी लढत आहे. त्यांनी मेरठ,दिल्ली हस्तगत केली.इटावा मैनपुरी,नसीराबाद इथल्या देशी सैन्यांनी इंग्रजांशी असहकार पुकारला.नाना साहेबांनी इंग्रजांचे पाठीराखे असल्याचा अस्सल बहाना केल्याने,परकोट व नबाब गंज इथे असलेल्या खजिण्याच्या रक्षणार्थ व्हिलरने नानासाहेबांना आमंत्रित केले आणि नानासाहेबांनी इंग्रजांना भूलवत खजिन्यावर व दारु गोळ्यावर आपले चौकी पहारे बसविलेत असाच गनिमी कावा आपल्यालाही अनुसरायचे आहे.सावध रहा.बैठक संपली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!! झाशीची राणी !! भाग - १७.

 


!!! झाशीची राणी !!
भाग - १७.
शहरातील घनिक... बीमावाले, मगन गांधी,मोती खत्री व शाम चौधरी यांनी जामीननामा लिहुन दिल्याने झाशी च्या राणीच्या सन्मानचं रक्षण झालं.पण ह्रदयात बोचलेल्या काट्याचा सल ह्रदया त खुपुन इंग्रजांविषयाचा तिरस्कार प्रजेत वाढत चालला.राणींवरच्या अन्यायाला तर सीमाच नव्हती.दत्तक अमान्य, किल्ला जप्त,एखाद्या भिकार्यास द्यावी तशी पांच हजाराची मामुली निर्वाह निवृत्ती देऊन राणी व तिच्या आरित परीवाराची घोर उपेक्षा केली.केशवपना साठी जात असलेल्या राणीला बंदी, महालक्ष्मीच्या पुजेसाठी असलेले महाल जप्त,गंगाधर राजेंचे कर्ज राणीच्याच तनख्यातुन,दामोदरच्य्या नांवे असलेले पैसे काढण्यास जामीन पत्र,गोहत्या..या सर्वांसाठी राणीसाहेबांनी वेळोवेळी पत्र व्यवहारही केला,पण इंग्रजांनी साधी दखल न घेता पिसाटासारखे अन्याय करीत,राज्ये,गांवे हडप करीत सुटले. अनेक राज्ये,संस्थाने ब्रिटिश अमलां खाली आले.नवनवीन अस्रेशस्रे,कठोरता दहशत,शिक्षेचे अघोरी प्रकार,शिकार या मुळे प्रजा संतापाच्या आगीत तीळतीळ जळत होती.या अपमानकारक स्थितीचा बदला कधी व कसा घ्यायचा?राणींसाठी सर्वस्वाचा,प्राणांचाही त्याग करण्यात लोकं आतुर होते.पण प्रजेचे हित लक्षात घेतां जे कांही पाऊल उचलायचे ते विचाराने व सबुरीने करायचे होते.
संपुर्ण भारतालाच आग लागली. मुसलमानांनी ज्या सुभेदाराकरवी लढण्यास नकार दिला त्या सुभेदारालाच फासावर लटकवले व चाळीस लोकांना बरखास्त केले.लाहोर राजमार्गावर २५ लोकांना फाशी दिले.छोटासाही विरोध चिरडुन टाकत होते ब्रिटिश.ग्वाल्हेरमधे इंग्रज फौजेत असणार्या देशी शिपायांचा आठ महिण्याचा तनखा न झाल्याची तक्रार करतांच गोळीबार केला त्यांत १६ लोकांचा मृत्यु झाला.गावोगावी फौजा घुसुन गांवकर्यांकडुन कोंबड्या,दुध, धान्य लुटुन नेत,जबरदस्तीने मिशनरी ख्रिश्चन धर्माची दीक्षा देत,शेतच्या शेतं उध्वस्त करुन तेथे बराकी बांधल्या जात. मेरठमधील एका सैन्याने शिस्त मोडली म्हणुन प्रथम चाबकाने फोडुन नंतर त्याला मृत्युदंड दिला.कानपुरच्या बाजारांत घोडागाडीखाली बालक आला तर चालकावर कार्यवाही म्हणुन खाली डोके वर पाय असं बांधल्यामुळे नाका तोंडातुन रक्त येऊन त्याचा मृत्यु झाला. साधी रागीट नजर जरी टाकली तरी फासी होत असे.हमालांवर लाठीमार.. अश्या अनेक घटना..रक्ताने भिजलेल्या जमीनीतुन कोणतं पीक येणार?अन्याय, अत्याचार व उत्पाताने पिडित,अर्धमेली झालेली भारतमाता आपल्या लेकरांना साद घालत होती.
राणीसाहेब या वार्तांनी पेटुन उठत. १८५७ साल उजाडले.नानासाहेब तात्या टोपेंशी गुप्त खलबते सुरु होती.गुप्तपणे वेगवेगळ्या क्लुप्त्या योजुन,गावोगावी, खेडोपाडी देशासाठी उठाव करण्याचा, लढण्याचा गुप्त संदेश पाठवल्या गेले. एकाचवेळी सगळीकडुन लढाई व्हावी अशी योजना आखण्यांत आली.
तेवढ्यात पेशवे बाजीरांवाकडे धर्म कार्य करणारे रामभटांचे पुतणे विष्णुभट देशाटन करुन सैनिकांतील असंतोषाच्या बातम्या माहित असल्याने मोरोपंत त्यांना घेऊन राणीसाहेबांच्या भेटीस आले.त्या म्हणाल्या कांहीही आडपडदा न ठेवता सत्य कथन करा.विष्णुभट सांगु लागले, विलायतेतुन ज्या बंदुका काडतुस आल्या त्याला गायीची व डुकराची चरबी लावले ली ती काडतुसे दातांनी तोडावि लागते ही वार्ता वायुवेगाने सर्वत्र पसरल्यामुळे हिंदु व मुसलमान अक्षरशः पिसाळलेत. सगळीकडे क्रांतीची भाषा,छावणीतील गोर्यांना कापुन काढावं,आग लावावी, दबल्या आवाजात सर्वीकडे अशीच चर्चा, डाकटपाल लुटुन शिपाई मारले,तारांचे खांब पाडले.ग्वाल्हेरला बायजाबाई शिंदेनीही बहुत सैन्य जमा केले.सारा हिंदुस्थान खवळला.कानपुरात फलटणी जमा झाली,तिथे लढाई झाली.शिंदे कडील लोकांजवळ विषारी गोळे,ते फुटले की तात्काळ डोळे फुटतात व नंतर माणुस मरतो,अश्या फलटणी घेऊन तात्या टोपे गुलसराईला आले.तीन लाखा ची मागीतलेली खंडणी नाकारतांच तात्या टोपेने डंका वाजवला.बंदुकांचे आवाज घुमले.गुलसराईवाल्याचे शिपाई भयभित होऊन पळु लागले.गुलताई बाल्या केशवास बांधुन आणले.
स्वतः नानासाहेब पेशवे, बाळासाहेब,रावसाहेब तोफेस बत्ती देत होते.कानपुर हस्तगत झाले.सारे ब्रम्हवर्तास आल्यापासुन नानासाहेबांकडे गुप्त बैठका सुरु झाल्यात.नबाबांशी इंग्रजांचे कितीही सख्य असले तरी इंग्रज कधीहि उलटु शकतो,या विचाराने तेही भयग्रस्त झाले.इंदौर,ग्वाल्हेर,जोधपुर, जयपुर,कच्छभुज,हैदराबाद,कोल्हापुर, सातारा, इथुनही उठाव होणार अशी आवई उठली.इंग्रजांनी जबर कर बसवल्यामुळे लोकं मेतकुटीस आले. सर्वत्र असंतोष घुसमटत आहे.अशी माहिती विष्णुभटाने दिली.त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्यांत आली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

*!!!झाशीची राणी भाग-१५!!!*


 *!!!झाशीची राणी भाग-१५!!!*
गव्हर्नरचे आज्ञापत्र ऐकुन राणी साहेबांचा चेहरा धगधगत होता.डोळ्यात अंगार पेटला होता.संतापाने त्या म्हणाल्या,एलिस हे काय केलेस?तुम्ही ब्रिटिश स्वतःस काय समजता?आमचच खाऊन आम्हालाच देशोधडीला लावतां? गोड बोलुन गळ्यावर सुरी चालवता?अनेक महाल घशात घालुनही समाधान होत नाही?एकएक कलम म्हणजे अन्यायाची परिसीमाच!अहो एलिस ! तुमच्याच तर साक्षीने दत्तकविधान झाले होते ना?आमचे राज्य बेवारस झाले असे कसे म्हणुं शकतां?सलामाईची भाषा करुन उलटलात एलिस आपण!दरबारी लोक संतापाने उभे राहिले.एलिसभोवती इंग्रजी सशस्र सैनिक उभी होती.कापर्या आवाजात शेवटचे कलम वाचु लागला... आठवे कलम...या सर्व कारणांनी राणी साहेबांचा दत्तकनामा अस्विकार झाला. झाशी राज्य ब्रिटिश भारतात सामिल केले गेले.कॅप्टन एलिस झाशीचे शासक म्हणुन नियुक्त झाले. यापुढे झाशीचे राज्य आणि जनता ब्रिटिशांच्या अधिन आहे.
ऐलिसने हे वेदनामय वाचन कसे बसे पुर्ण करुन दुःखाने म्हणाला,राणी साहेब!क्षमा करा!दरबार सुन्न झाला.तोच पडद्याआडुन गगनभेदी आवाजांत राणी साहेब गर्जल्या...मै मेरी झाँशी नही दूंगी! माझी झाशी कालत्रयी देणार नाही... कदापी नाही...कदापी नाही....
महाराणीच्या गर्जनेने सगळा दरबार थरकला.एलिसला ब्रिटिश सैन्याने संरक्षणात बाहेर काढले.मोरोपंतांच्या हाती जाहीरनामा फडफडत होता.त्या चवताळुन बाहेर येऊन जाहीरनाम्याचे तुकडे तुकडे केले.दामोदरला छातीशी कवटाळुन ओरडल्या...हा या राज्याचा वारस आहे.बघतेच कोण अन् कसं नामंजूर करते.अरे एलिस,नामर्द माणसा आतां तुमच्याबरोबर संघर्ष चालु झाला. संध्याकाळी दरबार भरवण्याची आज्ञा देऊन आपल्या कक्षाकडे निघाल्या.तानु मावशी व इतरजण त्यांच्या मागुन.... त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि राणींच्या डोळ्यात होता फक्त अंगार.. ठिणग्या...संताप...
प्रजेवर जणुं वज्राघात झाला.ठीक ठीकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला. सगळीकडे दहशतीचे वातावरण!शहरभर दवंडी पिटुन झाशी ब्रिटिश साम्राजात विलिन झाल्याची घोषणा करण्यांत आली.राणींचा जयजयकार करीत किल्ल्याकडे निघालेल्या प्रजेवर चाबुक ओढल्या गेले.त्यांना कैद करण्याचा सपाटा लावला.तहसील कचेरीत जाहिर नाम्याच्या प्रति पाठवण्यांत आल्या. जहागिरीवर जप्ती आणण्याचे काम आतां एलिसपुढे होते.वसुलीचा आकडा काढणे,जहागिरदारांच्या याद्या करणे ही महत्वाची कामे एलिसला उरकावयाची होती.या कामाला त्याने सुरुवातही केली. परंतु,राणीसाहेबांविषयी त्याला खुप आदर होता,त्यांना त्रास होऊ नये या भावनेपोटी राणीसाहेबांचा तनखा,दागिने जडजवाहीर,कर्जाचा हिशोब या बद्दलचा विचार अत्यंत सहानुभुतिपुर्वक व्हावा अशा आशयाच्या सुचना त्याने गव्हर्नर कडे पाठविल्या.त्यांना भरपूर तनखा, सन्मानाची वागणुक मिळावी यासाठी एलिस प्रयत्नशील होता.
त्यानंतरचे दिवस म्हणजे रोज मरणा ला सामोरे जाण्याइतके दुःखद होते. किल्ल्यावर ब्रिटिशांची गस्त बघणे जड जात होते.राजे गंगाधरांच्या नाट्यशाळे तील सर्व चिजवस्तु एका खोलीत बंदिस्त झालेले त्यांना बघवत नव्हते.तानुमावशी! हेच जर दैवात आहे हे जर आधी माहित असतं तर आम्ही स्वामींना दुखवलं नसतं मनूबाई!त्यावेळी योग्य तेच केलय!आतां त्या दुःखापेक्षा इतर दुःखे.....
मावशी आमच्याच सैनिकांना आम्हाला बोलावतां येणार नाही.त्यांची शस्रास्र,गणवेश जमा करण्याचा हुकुम मिळाल्यावर काल आम्हास भेटण्यास आल्यावर,त्यांना धीर देत म्हटले,हे वाईट दिवसही जातील.आम्ही स्वस्थ बसणार नाही.पण सध्या चढाई करणे म्हणजे जाणुनबुजुन आगीत उडी टाकण्यासारखे होईल.वेळ आली की,आपल्या तलवारी चे पाणी दाखवु,क्षोम करु नये.नगारा चामराचं चिन्ह असणारा ध्वज ऊतरवुन तिथे युनियन जॅक लावला गेला तेव्हा आमचा जीव किती कासावीस झाला असेल?आम्ही हाक देऊ तेव्हा मात्र नक्की या.यावर सर्वजन एका आवाजात म्हणाले,आपणासाठीच जगणार,हे प्राण आपल्यासाठीच गहाण आहे.इंग्रजांना कापण्यासाठी हात फुरफुरत आहेत. कोणत्याही क्षणी बोलवा...
बिठूरची मंडळी त्यांच्या विवंचनेत, त्यांचाही आठ लाखाचा निर्वाह भत्ता नामंजुर झाला.गेल्या चार वर्षाचे ३२ लाख देतो म्हणुन तोंडाला पाणं पुसलीत. सगळी कागद घेऊन विलायतेला गेलेला अजिमुल्ला हात हलवत परत आला,पण रशियाशी झालेल्या युध्दात फ्रांस व इंग्रज पराभूत झाल्याची वार्ता मात्र घेऊन आला,म्हणजे इंग्रजसुध्दा पराभूत होऊ शकतात ही वार्ताच प्ररणादायक होती.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

*!!!झाशीची राणी भाग-१४!!!*

 


*!!!झाशीची राणी भाग-१४!!!*
झाशीचे प्रधानमंत्री राधारामचंद्र चौकशी करायला एलिसकडे येऊन म्हणाले,राणीसाहेब अस्वस्थ असुन अन्न पाणीही त्यांना जात नाही.सतत आपल्या निर्णयाची वाट बघत आहेत.प्रधानसाहेब मीही मान्यतापत्राची आतुरतेने वाट बघत आहो.मला जेवढे शक्य तेवढे प्रयत्न केले आहे व करत आहे.भारतीय राज्यांचा दत्तक अधिकार इस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टरर्सनी नऊ नंबरच्या डिस्पॅचच्या १६ व १७ परिच्छेदानुसार उघडपणे स्विकृत केला आहे.आभार मानुन व नमस्कार करुन प्रधानमंत्री किल्ल्याकडे रवाना झाले.अन् त्याचवेळी गव्हर्नर डलहौसीचे पत्र हाती पडले.पत्र वाचता वाचता एलिसचा चेहरा काळवंडला.झाशीवर अन्याय होत होता व एलिस कांहीच करुं शकत नव्हते याचेच त्यांना जास्त दुःख,खेद वाटत होते
पत्रात स्पष्ट लिहिले होते की,टेहरी, ओरछा जसे स्वतंत्र राज्य आहेत तसे झाशी राज्य कधीही नव्हते.रामचंद्रांनी कांही वर्षे राज्य केले,परंतु त्याच्या विधवा पत्नीने घेतलेला दत्तक राजनैतिक कारणास्तव अवैध ठरवला होता.आतांही न्यायसंग उत्तराधिकारी नसल्यामुळे झाशी राज्य ब्रिटिश साम्राजात सामील करुन घेऊन तसा अमंल बसवावा.ब्रिटिश अधिकृत जिल्ह्यांच्या मध्यभागी झाशी असल्या मुळे तिथुन बुंदेलखंडावर राज्य करणे शासनव्यवस्था अधिक उन्नत व सुनियंत्रित करणे शक्य होईल.राणी साहेबांस उचित वार्षिक तनखा दिल्या जाईल.या पत्रासोबतच मालकन साहेबांनी एलिसला घोषपत्राद्वारे सुचना दिल्या.झाशीच्या सैनिकांना दोन महिन्या चे वेतन देऊन सेवामुक्त करावे. कर्मचार्यांना शक्यतोवर त्याच कामावर राहु द्यावे.झाशीमधे तीन व कडेरामधे दोन कंपनी सैन्य ठेवावे.झाशीत सिंधिया काँटिजेंटची सहावी संपुर्ण तुकडी ठेवावी.सीपरीचे कॅप्टन हॅन्सी ५०० सैनिक,दोन तोफा व घोडदळाची तुकडी घेऊन येतील.झाशीच्या संरक्षणार्थ हेन्सिचे सैन्य,इन्फेंट्रीची पुर्ण तुकडी,अश्व दल,तोफा राहतील.राणीसाहेबांच्या निर्वाहभत्याचा निर्णय योग्यवेळी कळवला जाईल.झाशीचा दत्तकनामा अस्विकार करण्यांत येत आहे.झाशीचे राज्य ब्रिटिश भारतात सामील केले आहे.
मेजर एलिस हे झाशीचे शासक म्हणुन नियुक्त केले.झाशीची जनता आतां ब्रिटिशांच्या अधिन आहे.आणि शासक म्हणुन कॅप्टन एलिस...
ऐलिस हे पत्र वाचुन अतोनात दुःखी झाला.झाशीचे राज्य बळकावणे हा राणी वर उघड उघड अन्याय होता.त्याला मिळालेले अधिकारच त्याला टोचत होते. पण तोही हुकुमाचा ताबेदार!हा खलिता दरबारात पोहचविण्याचे कडु काम त्याच्यामाथी आले होते.कर्तव्य तर पार पाडणे भाग होते.झाशीच्या संघर्ष पर्वास सुरुवात होणार होती.तसा निरोप एलिसने किल्ल्यावर पाठवला.
दुसरा दिवस उजाडला.काय होणार दरबारात?काय आहे झाशीच्या नशीबी?सगळेजण अस्वस्थ होते.मनुबाई मोरोपंतांना म्हणाल्या, पिताजी!आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढु पण माझी झाशी कदापी देणार नाही.आम्हास पुढील प्रांत बरा दिसत नाही.नजरबाजां च्या वार्ता बर्या नाहीत.इंग्रजांची रक्त पिपासा घाव घालुन नष्ट करण्याच्या योजना तयार कराव्या लागतील.राणींना संताप आवरत नव्हता.सारा दरबार सजवुन सुसज्य,सुंगधमय करण्यांत आला.राणी लक्ष्मीबाईंनीसुध्दा माफक श्रृंगार करुन पांढरी शुभ्र साडी पांढर्या कपाळावर पांढरा चंदनी टिळा त्यांच्या वैधव्याची दुःखद आठवण देत होती. दामोदरास जवळ घेऊन राणीसाहेब पडद्याआड बसल्या.
दरबार भरला.सेवकवर्ग अस्वस्थ पणे कामं करीत होते.उत्सुकता,हुरहुरतेने सगळेजणं कॅप्टन एलिसची वाट बघत होते.आणि जड अंतःकरणाने,जिन्याच्या पायर्या चढतांना एलिसचे हातपाय गळुन गेले.गव्हर्नरचे आज्ञापत्र वाचून दाखवण्याचे कडु कार्य त्याला अतिशय जड वाटत होते.झाशीचे मिळालेल्या विशेष अधिकाराचा त्याला बिलकुलच आनंद वाटत नव्हता.आज आपल्या कडुन फार मोठा अन्याय होणार याच भावाने ग्रस्त मटकन आपल्या आसनावर बसला.सर्वांनी आपापले आसन ग्रहण केल्यावर दरबार सुरु झाला.
एलिस गव्हर्नरचा खलिता वाचत होता.आणि सारा दरबार थक्क होऊन ऐकत होते.एकएक कलम म्हणजे जणुं शब्दांचे बाँब गोळेच होते.राणीसाहेबांच्या लक्षात आले की,आपण मेहनत घेऊन १५-२० दिवस अभ्यासपुर्ण माहिती गोळा करुन दत्तकमान्यतेसाठी दिलेले पुराव्यासाठी दिलेली माहिती व्यर्थ गेली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

पेशवाईतील सरसेनापती श्रीमंत उमाबाई खंडेराव दाभाडे.

 



पेशवाईतील सरसेनापती
श्रीमंत उमाबाई खंडेराव दाभाडे.
भारताचा इतिहास अनेक लढवय्या रणरागिणींनी उजळून निघालेला आहे. यात झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, ताराराणी भोसले अशी अनेक नावे घेता येतील. यात एक वेगळे नाव म्हणजे पेशवाईतील सरसेनापती श्रीमंत उमाबाई खंडेराव दाभाडे. पेशवाईतील हा वेगळा पैलू अनेकदा नजरेआड झालेला दिसतो. मात्र पेशवाईतील हे एक वास्तव एक नव्या रणरागिणीची वेगळी ओळख करून देते. उमाबाईंचा आणि नाशिकचा संबंध काय हे पाहण्यासाठी सरदार दाभाड्यांची कारर्कीद जाणून घेणे गरजेचे आहे. छत्रपतींच्या गादीची धुरा सांभाळणाऱ्या पेशवाईने इतिहासाला एक वेगळाच आयाम दिला. तसेच पेशवाईला शौर्याचा रंग देण्यात त्यावेळच्या पराक्रमी सरदारांचे महत्त्वही तेवढेच आहे. छत्रपतींसाठी अन्‌ पेशव्यांच्या आदेशावर जीव ओवाळून टाकणा-या अनेक सरदारांच्या पराक्रमाने मराठेशाहीचा इतिहास उजळून निघाला आहे. यात महाराष्ट्रातील सतराव्या शतकातील एक प्रसिद्ध मराठा घराणे म्हणजे पुण्यातील तळेगावचे दाभाडे घराणे. या घराण्याचा मूळ पुरूष बजाजी व त्यांचा मुलगा येसाजी हे शिवाजी महाराजांचा पदरी होते. छत्रपतींनंतर संभाजी राजांनीही त्यांना रायगडाची धुरा दिली. संभाजीनंतर ते राजारामांच्या सेवेत दाखल झाले. येसाजींना खंडेराव आणि शिवाजी ही दोन मुले होती. तर खंडेरावांना त्रिंबकराव व यशवंतराव ही दोन मुले होती. खंडेराव पराक्रमी निघाले. त्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. शाहू महाराजांनी खंडेरावांना सेनाखासखेल अन्‌ नंतर १७१७ मध्ये सेनापतीपदी नेमले. खंडेराव दाभाडेंनी उत्तर सरहद्दीवर राहून खानदेश, वऱ्हाड व गुजरात या तीनही प्रांतावर आपली पकड घट्ट केली. खंडेरावाच्या मृत्यूनंतर शाहूने त्रिंबकरावास सेनापतिपद दिले. अंतर्गत वादातून झालेल्या डभईच्या लढाईत बाजीराव पेशव्यांकडून त्रिंबकराव मारले गेले अन्‌ येथूनच खंडेरावांची पत्नी अन्‌ त्रिंबकरावांची आई उमाबाईंचा पेशव्यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. शाहूंनी बाजीरावांसह तळेगावात जाऊन उमाबाईंची समजूत काढून त्रिंबकरावाचा भाऊ यशवंतरावांना सरसेनापतिपदाची वस्त्रे दिली. यशवंतराव अल्पवयीन असल्याने सरसेनापतिपदाचा कारभार उमाबाई पाहू लागल्या अन्‌ त्या पेशवाईतील पहिल्या महिला सरसेनापती झाल्या. उमाबाई या अभोण्याच्या ठोके घराण्यातील कन्यारत्न. त्यांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा शोधत अभोण्यात पोहचलो अन्‌ थक्क करणारे वास्तव डोळ्यापुढे तरळले.
नाशिकहून सप्तश्रृंगीगडाकडे जाणाऱ्या रस्त्याने नांदुरी गाव आले की, तेथून अभोणा गावाकडे जाणारा रस्ता लागतो. या फाट्यावर उजव्या हाताला एका झाडाखाली आदिवासींची चिरे अन्‌ एका भग्न गणेशमूर्तीसह अनेक देवतांचे भग्न अवशेष ठेवलेले दिसतात. ते पाहून पाच किलोमीटवर असलेल्या अभोण्याकडे जाताना मध्येच मोहनदरी फाटा लागतो. फाट्यावर आदिवासींचे लाकडी चिरे पहायला मिळतात. ते पाहून आपण एका ऐतिहासिक मराठा सरदाराच्या गावात जात आहोत याची उजळणी मनात सुरू होते. गिरणा नदीच्या काठावर वसलेले अभोणा ही एक प्रसिद्ध बाजारपेठ असल्याने पहिल्यापासूनच हे वर्दळीच ठिकाण. आता एखाद्या विकसित शहरासारखं रुप घेऊ लागलं आहे. पण गिरणापात्रात मधोमध असलेली एक प्राचीन वास्तू या विकासापासून आपल्याला लांब घेऊन जाते अन्‌ अभोण्याच्या इतिहासात हरवून टाकते. ठोके-देशमुख या अभोण्यातील सरदार घराण्याची शान गिरणाच्या पुरामुळे उद्धवस्त झालेल्या वास्तूतून पहायला मिळते. हत्ती, घोडे बांधण्याची व्यवस्था, देवांच्या देवळ्याचा एक चौथरा आज येथे शिल्लक आहे. त्यात विविध देवांच्या मूर्तीही मनमोहक आहेत. पूर्वी निवांत अन् एकांतात पहुडण्यासाठी ही जागा खास बनवली गेली असणार तीही नदीपात्राच्या मधोमध. या वास्तूच्या फक्त शिल्लक असलेल्या चौथऱ्याला न्याहाळताना समोरच्या टेकडीवरील गढीकडे लक्ष जातं. गढी आता जमीनदोस्त झाली आहे पण गढीचा बुलंद दरवाजा मात्र अजूनही इतिहास उभा करतो. नक्षीकाम, विविध शिल्पे अन्‌ हरवलेल्या इतिहासाला कवटाळून बसलेला हा दरवाजा अभोण्याची शान जपताना दिसतो. या वास्तूकडे जाण्यासाठी घाणीच्या साम्राज्यामुळे थोडी कसरत करावी लागते. पण हा दरवाजा पाहताना गढी (महाल) किती मोठी असेल याची प्रचिती येते. गढीच्या भिंतीचा आकार बरेच काही सांगतो. हा अभोण्याचा ऐतिहासिक वारसा असल्याने ही वास्तू कायमस्वरूपी जपण्याची गरज मनाशी भिडते. पेशवेदप्तरातील ठोके घराण्याच्या कागपत्रांवरून या घराण्याचे पेठ संस्थानचे लक्षधीर राजे, बाजी आटोळे, सिन्नरचे देशमुख, कुंवर बहाद्दर, मुदोनकर भावसिंग ठोके यांच्याशी आप्त संबंध असल्याचे दिसते. अभोण्याचे देवराव व हरिसिंग ठोके हे दोन सरदार तळेगाव दाभाडेच्या खंडेराव दाभाडेंचे विश्वासू होते. यातून साधारण १७०४ मध्ये अभोण्याच्या देवराव ठोकेंची मुलगी उमाबाई छत्रपती शाहूंचे सरसेनापती खंडेराव दाभाडेंच्या घरात सून म्हणून गेली. उमाबाईंच्या माहेरीही सरदारकीचे वातावरण असल्याने लढवय्या बाणा त्यांच्यात होताच. शस्त्र चालविण्यात आणि घोडस्वारीत त्या अव्वल होत्या. खंडेरावांच्या निधनानंतर उमाबाईंचा मुलगा त्रिंबकरावांकडे सरसेनापतिपद शाहूंनी सोपविले. मात्र गुजरातच्या सुभ्यावरून त्रिंबकराव व बाजीराव पेशवे यांच्यात संघर्ष निर्माण झाला. यावर मात करण्यासाठी बाजीराव पेशव्यांनी उमाबाईंच्या माहेरकडचे दलपतराव ठोके, भावसिंगराव ठोके, बजाजी आटोळे, कवडे व सिन्नरचे देशमुख, कुंवर बहादुर यांच्यासह ठोकेंच्या सर्व जवळच्या मंडळींना फोडून आपल्या पक्षात सामील केले. २५ नोव्हेंबर १७३० रोजी भावसिंग ठोके याला बाजीरावांनी सरंजाम व कुंवर बहादुर याला वस्त्रेही दिली. निझामाची चाकरी सोडून बाजीरावांच्या पदरी आलेल्या भावसिंग ठोकेने बागलाण परिसरात धुमाकूळ घालायला सुरूवात केली होती.वैतागलेल्या निझामाने पेशव्यांना पत्र लिहीत भावसिंग ठोके यांना मराठ्यांच्या चाकरीत ठेवू नये, अशी विनंती केली. त्यावर निझामाची मर्जी राखावी म्हणून शाहूंनी पेशव्यांना भावसिंग ठोके यास चाकरीत ठेवू नये, अशी आज्ञा केली होती. मात्र तसे घडले नाही. डभईच्या युद्धात १ एप्रिल १७३१ मध्ये पेशव्यांच्या पदरी गेलेल्या भावसिंगराव ठोकेने सेनापती त्रिंबकरावांवर बारगिरास सांगून गोळी झाडली. यामुळे त्रिंबकरावांचा मृत्यू झाला, असे संदर्भ सेनापती दाभाडे दफ्तर, डॉ. एस. ए. बाहेकर व पुष्पा दाभाडे यांच्या उमाबाईंवरील पुस्तकात मिळतात. त्रिंबकरांवांच्या मृत्यूमुळे उमाबाई दुखावल्या गेल्या. या प्रकरणात बाजीराव पेशव्यांना माफी द्यावी म्हणून शाहू स्वत: त्यांना घेऊन तळेगावास गेले. छत्रपती स्वत: आल्याने उमाबाईंना पेशव्यांना माफ करावे लागले. त्यानंतर शाहूंनी त्रिंबकरावांचा लहान भाऊ यशवंतरावांना सरसेनापतिपद तर धाकटा बाबुरावाकडे सेनाखासखेल ही पदे दिली. मात्र ते अल्पवयीन असल्याने सरसेनापती व सेनाखासखेल या दोन्ही पदांचा कारभार उमाबाईंच्या हाती आला. पती आणि मुलाच्या मृत्यूचे दु:ख उमाबाईंनी काळजात एकवटले आणि रणभूमीवर उतरल्या.
गुजरातचा बहुतेक भाग जरी मराठ्यांच्या ताब्यात असला तरी दिल्लीच्या बादशहाने आपली दहशत कायम ठेवली होती. दाभाडेंची पकड गुजरातवरून कमी झाल्याचे पाहून मारवाडचे राजा अभयसिंग याने दिल्ली बादशहाच्या मदतीने आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याने बडोदा हस्तगत करून डभईला वेढा घातला. पिलाजी गायकवाड उमाबाईंचा उजवा हात होता. हे ओळखून अभयसिंगने पिलाजींचा खून घडविला. उमाबाईंचा बाणेदारपणा त्यांच्या लष्करी नेतृत्वात होता. हेच दाखवित पिलाजींच्या हत्येनंतर उमाबाईंनी अभयसिंगवर स्वारी केली. उमाबाईंच्या भीतीने हार पत्करून अभयसिंग गुजरातमधून पळाला. मात्र अहमदाबादमधील मोगलाचे ठाणे अजूनही कायम होते. १७३२ मध्ये उमाबाईंनी गुजरातवर दुसरी स्वारी केली. यावेळी मोगलांचा जोरावरखान बाबी नावाच्या सरदाराने ‘एक विधवा माझ्याशी काय लढणार, तुझा निभाव लागणार नाही,’ अशा आशयाचे पत्र उमाबाईंना पाठवले. याचे उत्तर रणांगणात हत्तीवर बसलेल्या पांढऱ्याशुभ्र वेशातील सरसेनापती उमाबाईंनी युद्धांत अलौकिक शौर्य गाजवून दिले. उमाबाईंचे रौद्ररूप पाहून जोरावरखान अहमदाबादच्या तटात लपला. मराठा सैन्यांनी मुगल पठाणांचे मृतदेह एकावर एक खच करून तटावर जाण्याचा मार्ग तयार केला, अशी इतिहासात नोंद मिळते. एका महिला सरसेनापतीने केलेल्या या कामगिरीवर छत्रपती शाहू खूश झाले होते. त्यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले. सोन्याचे तोडे मिळविण्याचा मान उमाबाईनंतर त्यांचा मुलगा यशवंतरावांनी सुरतेच्या लढाईत मिळविला. पेशव्यांवरील उमाबाईंची नाराजी पुढेही नानासाहेब पेशव्यांमुळे कायम राहिली. शाहू महाराजांच्या निधनानंतर दाभाड्यांचा मुख्य आधार कोसळला. उमाबाई ताराबाईंबरोबर गेल्या. जात उमाबाई, ताराबाई, आणि दमाजी गायकवाड यांनी पेशव्यांच्या विरूद्ध उठाव केला. तेव्हा १६ मे १७५१ रोजी पेशव्यांनी दाभाड्यांची सर्व मंडळी पुण्यात होळकरांच्या वाड्यात नजरकैदैत ठेवली; परंतु उमाबाईंनी पेशव्यांशी समझोता घडवून आणला व ते प्रकरण संपले. मात्र दरम्यान, उमाबाईंनी पेशव्यांविरूद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसते. पेशवाईतील राजकारणाच्या रंगात उमाबाईंची पकडही यादरम्यान पहायला मिळते. उमाबाईंची तब्येत नंतरच्या काळात खालावली. २८ नोव्हेंबर १७५३ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. ‘या ऐतिहासिक घटनांमध्ये सरसेनापती हा बहुमान मिळालेल्या उमाबाई खंडेराव दाभाडेंचे कार्य मोठे आहे.’ असे दाभाडे घराण्याचे वंशज सरदार सत्यशील दाभाडे सांगतात.
अभोण्याच्या ठोके घराण्यातील ३ मुली सरदार दाभाडे घराण्यात दिल्या होत्या. यात सेनापती दाभाडेंचा तीन नंबरचा मुलगा सेनाखासखेल सवाई बाबुराव दाभाडे यांची एक पत्नी ही हरिसिंग ठोके यांची बहीण अभोणकर ठोके घराण्यातील होती. तर सेनापती यशवंतराव (दुसरा दत्तक) याची पत्नी लक्ष्मीबाई ही हरिसिंग ठोकेंची मुलगी होती. हा इतिहास अभोण्याच्या गढीवरून अनुभवताना अन् बालपणी उमाबाई या गढीत तलवारीशी खेळतायेत असा प्रसंग डोळ्यासमोरून तरळताना अंग शहारून जातं. ठोके यांचे वंशज गावातील पेठ गल्लीत राहतात. त्यांच्याकडील सोन्याची मूठ असलेली तलवार हातात घेतल्यावर उमाबाईंनीही ही तलवार हातात घेऊन शौर्य घडविले असेल, असे वाटायला लागतं. ठोकेंच्या घरातील देव्हारा आणि देव्हाऱ्यातील व्यालावर बसलेली महिषासूरमर्दिनीची सप्तशृंगीची मूर्ती आवर्जून पाहण्यासारखी आहे. उमाबाईंची सप्तश्रृंगीवरील श्रद्धा त्यांच्या दानातून दिसते. त्यांनी सप्तश्रृंगी मंदिराच्या पायऱ्या बांधल्याची नोंद मिळते. ठोकेंचे ऐश्वर्य आता इतिहासापुरते शिल्लक राहिलेले दिसते. मात्र ठोके घराण्यातील व्यक्त‌िंच्या डोळ्यातील चमक अन् त्यांना मिळाला मान अजूनही कायम आहे. गावात होळीचा कार्यक्रम प्रथम वाड्यातून होलीका पूजनानंतरच सुरू होतो, अशी परंपरा आहे. ठोकेंच्या घरातील देवीच्या मूर्तीची दसऱ्याला दरवर्षी मिरवणूक निघते. हा सोहळा पाहण्यासारखा असतो, असे सरदार ठोके घराण्याचे वंशज जलालसिंग ठोके सांगतात.
अभोणा पाहताना जुन्या बांधणीची घरे जशी भुरळ घालतात तसेच गावातील मंदिरेही आपले वेगळेपण दाखविताना दिसतात. आनंदी देवी मंदिर, खंडेरायाची ठेकडी, मारूतीची दोन मंदिरे, महादेव मंदिर, शनीमंदिर, राममंदिर, गणपती या मंदिरांबरोबरच गोपालकृष्ण मंदिर गावाची शोभा वाढविताना दिसतो. याचबरोबर गढी जवळील समाध्याही पाहण्यासारख्या आहेत. गढीच्या मागील बाजूला नदी काठावरील महादेव मंदिर निसर्गसौंदर्याने सजलेलं आहे. हे मंदिर प्राचीन असल्याचे पुजारी गोविंद चवरे सांगतात. तेथून थोडं पुढं गेलं की, गढीलगत गोपालकृष्ण मंदिरही सुंदर आहे. येथील काष्टशिल्प नजरेत भरत तर मंदिरातील शांती तेथून पाय काढू देत नाही. मंदिरात गेल्यावर कृष्णांची काळापाषाणातील सुंदर मूर्ती पाहताना मोहाडीच्या श्रीकृष्णाची आठवण होते. या दोन्ही मूर्ती एकाच कलाकाराने साकारल्याचे प्रकाश देशमुख सांगतात. देव्हाऱ्यातील शिवाचा अर्धनारीनटेश्वराचा तांब्याचा मुखवटा नजरेत भरतो. गावात खंडेरायाची यात्रा भरते. तसेच श्रावणात गोपाळकृष्णाचा सात दिवस सप्ताह भरतो. पूर्वी यात्रेत बोहाडे सादर व्हायचे; मात्र आता ही परंपरा पंधरा वर्षांपासून बंद आहे. सरदार पेठ गल्लीतील जहागिरदार देशमुख मूळचे वायकुळे. ते काशी, राजस्थान, गुजरात करीत हतगडच्या लढाई दरम्यान कनाशीत व तेथून अभोण्यात स्थायिक झाले. त्यांना १८ गावांची वतनदारी मिळाली होती, असे प्रकाश देशमुख व प्रणव देशमुख सांगतात. गावात आदिवासी समाजही मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पेठ गल्लीत जैनांचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराला अनेकांनी सहकार्य केल्याचे कन्हूभाई पुजारी सांगतात. गावात दोन बारवाही आहेत. मात्र त्यांची अवस्था वाईट आहे. त्यांचा गावाला पाण्यासाठी वापर होऊ शकतो.
सोन्याची मूठ असलेली तलवार, सप्तश्रृंगीची अनोखी मूर्ती, ठोके, देशमुख घराण्याचा इतिहास अन् उमाबाईंनी दाभाडे घराण्यात उज्ज्वल केलेले अभोण्याचे नाव हा खरा अभोण्याचा वारसा आहे. गढीने देह ठेवला असला तरी इतिहास पुन्हा शौर्य गाजवायला सज्ज असल्याचं अभोणा भटकताना वाटतं. त्यामुळेच अभोण्याची सफर एकदा करायलाच हवी.

Friday 26 July 2024

*!!!झाशीची राणी भाग-१३!!!*


 *!!!झाशीची राणी भाग-१३!!!*
कलकत्त्याच्या नजरबाजाने खबर आणली की,तीन दिवसांपासुन डलहौसीसाहेब तीन सहकार्यांसोबत कागदपत्रत्रे तपासुन निष्कर्ष काढला की, झाशी आम्ही सांभाळत आहोत व पुढेही आम्हीच सांभाळु असा त्यांच्या चर्चेचा सूर...एकाएकी दत्तक घेण्यामागे काय योजना असावी?बालक अल्पवयीन असल्यामुळे राज्याचा उत्तराधिकारी होऊ शकत नाही आणि राणी स्री असल्यामुळे राज्यकारभार चालवण्यास असमर्थ.. तेव्हा प्रजाजनांचे हित लक्षात घेतां,झाशी राज्य ब्रिटिशांच्या अधिन असनेच हितकारक ठरेल,राणीसाहेब सुखात राहतील एवढे वेतन दिल्या जाईल.
वार्ता ऐकुन राणीसाहेबांच्या डोळ्यातुन फुल्लिंग उडत होते.इंग्रज आम्हास समजतात काय खुळे की दुबळे इथे घराघरांत शस्रसज्ज माणसं आहेत. यांनी मोठी फौज ठेवुन आमचे महाल ताब्यात घेत सुटले.इतके दिवस एलिस साहेबांनी साखरपेरणी करुन वेळ निभावत नेली.आतां आमचाही पीळ बघा म्हणावं!दत्तक नामंजुर केला तर तलवारीस तलवार भिडेल.राणीसाहेबांचा आवेश पाहुन सारे दरबारी थक्क झाले. ही राणी साधी नाही तर कडकडणारी विद्युल्लता,साक्षात कालीमाताच!केवळ २२ वर्षाची...सर्वांनी मनोमन शपथ घेतली,आपण सर्व शक्तीनिशी राणीला साथ देऊ...
राणीसाहेबांनी सर्वांना आव्हान केले,आपण सारे शूर,कर्तबगार मर्द आहात,आपल्या शौर्याची,निष्ठेची,आपले श्रध्दास्थान असलेल्या बेलदुर्वाची सर्वानी आण घ्यावी.तोच उत्स्फुर्तपणे गर्जना झाली राणी साहेबांचा विजय असो...हर हर महादेव....हर हर महादेव...आतां खलित्याची वाट बघणे इतकेच हाती होते राणींनी भरोश्याच्या माणसांची शिबंदी ठेवली.स्री पुरुष सर्वच शस्र बाळगु लागली.सतर्क लोकांची ये..जा..दुःखाला निग्रहाने दूर लोटुन राणीसाहेब स्तंभा सारख्या खंबीरपणे ताठ उभ्या राहिल्या.
मार्च महिना उजाडला.किल्ल्यावर सर्वीकडे अस्वस्थता..सणावारात कुणालाच रस नव्हता.मोरोपंत, तानु मावशी,दरबारी मंडळी सगळे किल्ल्या च्या संरक्षणार्थ योजना करण्यांत मग्न होते.नजरबाजांच्या रोज नवनवीन वार्ता येतच होत्या.
एलिससाहेबांची सहानुभुती राणी कडे असल्यामुळे व त्यांना राणींच्या कर्तुत्वाची,मुत्सद्दीपणाचा अभिमान असल्याने,दत्तकास मंजुरी मिळण्याच्या दृष्टीने सारा पत्रव्यवहार,राणीच्या बाजुचे मैत्रीचे पुरावे डलहौसीला पाठवले,परंतु ज्यांना स्वच्छ,निर्मळ,पवित्र मैत्री स्री पुरुषात असु शकते ही जाणीवच नसल्या ने एलिसच्या झाशीप्रेमाने इंग्रज आश्चर्यात पडले.अशाच एका दुष्ट लेखकाने "The Rane" उर्फ राणी या नावाची कादंबरी लिहुन गंगाधर,लक्ष्मी आणि एलिसलाच शेक्सपिअर करुन या तीन पात्रांची विकृत कथा रंगवली होती. त्यात लक्ष्मीबाईंना स्वैरिणी,हिंसक चारित्र्यहिन दाखवण्याचा असभ्य प्रयत्न केला होता.झाशीच्य्या राणीबद्दल ब्रिटिशांमधे दूषित दृष्टीचा प्रसार व एलिस बद्दल डलहौसी व इतर अधिकार्यांच्या मनांत संशय उत्पन्न करण्याच्याच हेतूने हा हीन प्रयोग केला गेला.परंतु सुदैवाने व राणींच्या उज्वल, उदात्त आणि पवित्र तेजाने ही भाकड कथा कोठेही लोकप्रिय,प्रसिध्द झाली नाही.राणीसाहेबांना या कांदबरीचा प्रचंड धक्का बसला पण त्यातुनच त्या खंबीर पणे सावरल्या.
नजरबाज भयंकर पेटुन उठले होते,ते म्हणाले,राणीसाहेब!आपण फक्त आज्ञा द्या.या लेखकाची जीभ हासडुन त्याची होळी करतो.त्यांना समजावत म्हणाल्या,या कादंबरी विषयी ऐकुन आम्ही सुन्न झालोत.स्री हा नेहमीच चर्चेचा विषय,त्यातही ज्या स्रीला अघटीतपणे कांही विपरित कार्य करावे लागले तर तीच्या दुर्देवाला अंतच नसतो. तिच्या चारित्र्यावर गलिच्छ शितोंडे उडवुन चारीत्र्य बाजारी मांडुन लिलाव करावा,कुलटेचा शिक्का मारावा ही तर जनरीत.कुळकिर्ती,कुळरीत,धर्मकर्तव्ये जपत व याचबरोबर प्रजाकर्तव्य,देशकार्य आमच्या माथी आल्याने या भाकडकथेने खचुन जाऊन अस्वस्थ होण्याचे कांहीही कारण नाही.त्याची होळी केल्याने दुषित रोपे पाणी न घालतां मरु द्यावी.जाळली तर दुषित धूर आपल्याला बाधतो.तो लेखक व त्याची ती चोपडी आपोआपच, परंतु त्या मनोमनी अत्यंत व्यथित झाल्या.एलिसच्या सद्भावनेला असं विकृत रुप दिल्याने व इतरांना कळल्यास सर्वत्र आगडोंब उसळुन, दत्तकास मान्यता न द्यायला निमित्यच होईल म्हणुन,मनाला समजावत त्या शांत बसल्या.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

*!!!झाशीची राणी भाग-१२!!!*


 *!!!झाशीची राणी भाग-१२!!!*
राणीसाहेबांच्या समाचारास बिठुर हुन नानासाहेब,रावसाहेब पेशवे,तात्या टोपे सारे बंधु आलेत.२२ वर्षाची विधवा बहिण पाहुन त्यांना अतोनात दुःख झाले. पण रडायलाही वेळ नव्हता. लक्ष्मीबाईस सावध करुन धीर धरुन म्हणाले,मनूबाई!
ब्रिटिशांनी किल्ल्यावर फौजेची वाढ,राज कोषावर मोहोर ठोकली.त्यांना केवळ राजसत्ताच नाही तर धर्मावरही आक्रमण करुन अवघा भारत त्यांनी ख्रिस्तीमय करायचा आहे.
मनूबाई!राजेलोक तसे तेजबुध्दी, पण,ब्रिटिशांच्या मायाजालात गुंतल्याने त्यांची मती निर्बुध्द होते.यांना ब्रिटिशांची बदनेकी कळु नये इतके भ्रष्ट झालेत का तात्या...आपसांत भांडणे लावुन स्वतःचा स्वार्थ साधण्यात हे लोक तरबेज!नबाब अली वर नजर ठेवुन सावध राहावे मनूबाई!नाना, स्वाभीमानी जनता हेच आमचं पाठबळ! इथल्या प्रजेला व स्रीयां ना शस्रसज्ज केले.सैन्याच्या आणि शस्रास्राच्या जोरावर संस्थानिक विकत घेतले.अनेक नजरबाजांच्या नेमणुका केल्या.येणार्या वार्ता बर्या नाहीत. अशा परिस्थीतीत आम्हाला सल्ला देण्यासाठी व आपत्तीतुन मार्ग काढण्यासाठी आपण सर्व बंधु सतत इथे येत राहावे.
राणींसाहेबांच्या डोळ्यातुन अश्रू ऐवजी धगधगते अग्निकुंड बघुन नानादी सार्यांना समाधान वाटले.मनूबाईने सतर्क,जागृत रहावे म्हणुन ते म्हणाले, ब्रिटिश तुझं राज्य घशात घालायला टपुन बसलेत.दत्तकास मंजुरी मिळेलसे वाटत नाही.घरभेद्यांपासुन सावध रहा.तिन्ही बंधुना निरोप देतांना राणींना फारच जड गेले.नजरबाजांकडुन रोज बातम्या येत होत्या.ब्रिगेडियर पारसन कडुन चार पलटणी ग्वाल्हेरला पाठवल्या जात आहे कडेरच्या किल्ल्यावरही पहारे वाढवले. डेरिनो,लो,आणि हॉलीके या तिन्ही गव्हर्नरकडे दत्तकाविरुध्द मत नोंदवले गेले.बिठुरचे पेशवे,कर्नातकचे नबाब, तंजावरचे राजे,यांच्या मृत्युनंतर त्यांची वार्षिकप्राप्ती बंद करुन वारसहक्क नाकारले.अश्या डलहौसीकडुन न्याय मिळणे अशक्यच!
शिवरामभाऊंचे काका सदाशिवपंत यांचे पणतू कृष्णराव आणि गंगाधररावचे जातभाईचे पुत्र सदाशिवराव यांनीही झाशीवर अधिकार सांगुन तसे पत्र एलिसला पाठवले.एलिसनाच फक्त राणी चेच दत्तक मान्य होते बाकी सारे विरोधात.कॅप्टन ठामपणे राणीच्या पाठी उभे असल्यामुळे कृष्णराव व सदाशिवचे दावे अमान्य केले पण डलहौसीला सामाज्यपिपासा अनावर असल्याने त्याने दत्तक अमान्य केले.या सर्व बाबींनी राणी भयभीत झाल्यात पण,क्षणभरच!
राणींनी एकीकडे शहरात तालिम खाने,शस्रनिर्मिती,सैनिक प्रशिक्षण सुरु होते तर दुसरीकडे वेगवेगळे कागदोपत्री पुरावे गोळा करुन भारताचे गव्हर्नर डलहौसीस विसृत विनंतीवजा पुराव्या सहित पत्र पाठवले.पत्रात लिहिले १८४३ साली माझे पती गंगाधररावांना ऋणग्रस्त
राज्याचे अधिकार प्राप्त झाल्याच्या बदल्यात ब्रिटिश फौजेचा खर्च २५५८९१ रुपये आणि दुलिया,तालगंज सारखे कांही जिल्हे ब्रिटीश सरकारला देण्यात आले.कर्नल श् लिमने(Shlim)जुन्या अटींचा स्विकार केला.इंग्रज शासनकर्त्यां नी आमच्या घराण्याशी चिरस्थायी मैत्री आहे.मेजर एलिस व कॅप्टन मार्टिन यांच्या साक्षीने चि.दामोदरास विधिपूर्वक दत्तक घेतले आहे.बुंदेलखंडातील उदाहरणे समोर ठेवुन या दत्तकविधानास व दामोदरास झाशीराज्याचे उत्तराधिकारी म्हणुन मान्यता द्यावी.
बुंदेलखंडातील निपुत्रीक राजांच्या मृत्युनंतर त्यांच्या दत्तकपुत्रास मान्यता दिलेली आहे,इथे तर माझे पती गंगाधर राजेंनी जिवंतपणी मेजर ऐलिस व कॅप्टन मार्टिनच्या साक्षिने विधिपुर्वक दत्तविधान करुन पुत्रास दत्तक घेतले आहे.तरी या दत्तकास मान्यता देऊन आपले मैत्री दृढ करावे असा विनंती अर्ज रवाना केला.
संतापाने व अगतिकतेने खदखदत होत्या.सुंदर,मुंदर,शामा,झलकारी,काशी ह्या सार्या त्यांच्या सतत अवतीभवती असत.आमचेच राज्य हिसकावुन धनी होऊन बसलेत ही माकडं!आमच्या डेर्या चे फक्त दांडे राहीलेत.आम्ही कांही फक्त बांगड्या भरुनच बसलो नाही तर इथेही सेना सज्ज आहेत.आम्ही मरणाला भीत नाही.महाराजांना शब्द दिलाय,शपथ घेतली,मरेन तर झाशीसाठी,जगेन तर झाशीसाठीच!तुम्हीसगळ्या तयार आहात ना?सगळ्या एकसुरात उत्तरल्या आमचं ऊर्वरित आयुष्य व अवघं जिवन मरण फक्त आपल्या पायाशीच!आमच्या ही तलवारीचं तेजाळलं पाणी दाखवुटच!
क्रमशः
संकलन व©® मिनाक्षी देशमुख.

!!! झाशीची राणी !!! भाग - १०.

 


!!! झाशीची राणी !!!
भाग - १०.
राणीसाहेब गर्भवती असल्याच्या आनंदवार्तेने सर्वजन,विशेषतः राजेंना अतिशय आनंद झाला.खरं म्हणजे जगनन्नाथपुरीला जायचे होते पण....या पुढची यात्रा पालखीतुन झाला.काशीला पोहोचल्यावर चैत्रगौरीचा समारंभ थाटात पार पडला.या समारंभातच ही आनंद वार्ता सर्वांना सांगण्यात आली.डोहाळे फार कडक,पहिले चार महिने फारच जड गेले तरी त्या अधुनमधुन राजांना कान पिचक्या देतच असे.राजे त्यांची सर्वतो परी काळजी घेत होते.राणीसाहेब!ईश्वर आपले मनोरथ पुर्ण करतील.आतां ४-५ महिने सर्व विचार,कामे बाजुला सारुन फक्त येणार्या बाळावर लक्ष केंद्रीत करा.
मार्गशीर्ष एकादशीला राणी लक्ष्मी बाईंनी पुत्ररत्नास,झाशीच्या भावी राजास जन्म दिला.राजेंच्या आनंदाला तर पारावारच उरला नाही.बारशाचा मोठा थाट,घरोघरी गुढ्या तोरणे,सडा, रांगोळ्या,हत्तीवरुन पेढ्यांच्या थाळ्या, सुवासिंनींच्या ओट्या भरणे,भजन किर्तन,कलावंतीणींचे नृत्य आनंदाला सगळीकडे ऊत आला.
आणि या आनंदावर विरजण पडले.२-२॥ वर्षाच्या दामोदरास ताप येऊ लागला.राणीच्या डोळ्यांना धारा... सर्व इलाज,उपचार,देवधर्म अनुष्ठाने वाया गेले.मायबापाच्या मांडीवर चिमण्या दामोदरने प्राण सोडले.
राजे गंगाधरराव मोडुन पडले.म्हणाले तानुबाई!पहिला पुत्र व पत्नी रमाबाई दोघेही देवाघरी गेल्यावर जीवन रिक्त वाटत होते पण लक्ष्मीबाईच्या आगमनाने मन टवटवीत,प्रफुल्लीत झाले होते.त्यांना पुत्र झाल्याने आम्हाला स्वर्गीय आनंद झाला होता.पण दैवाला आमचे सुख पहावले नाही.आमच्यातील सहनशक्ती संपली.नाही सहन होत म्हणुन हमसु हमसु रडु लागले.आणि राणीसाहेब? त्यांचा विलाप तर बघवत नव्हता.पण पुढचं सारं करणं भाग होतं.राजे लडखडतव उठले अन् भोवळ येऊन धाडकण पडले.शुध्द हरपली..राणी साहेबांचा हंबरडा सर्वांचीच ह्रदये चिरीत गेली.
गेल्या ६-७ महिन्यापासुन किल्ल्यात नुसती स्मशानशांतता होती.राजे अगदी कोलमडुन गेले.मनाच्या विषन्नतेने कंबर दुखी,पाठदुखी आटोक्यात येत नव्हती. त्यात त्यांच्या मोठ्या बंधुंनी ठेवलेल्या कंचनीचा पुत्र,म्हणजे पुतण्या अलिबहादुर कपटकारस्थाने करुन छळत होता.त्यामुळे त्याचे महाल जप्त केले. शांती हरवुन बसलेल्या राजेंना राणी साहेब हरप्रकारे समजावत पण, संताप, चीड,राग,आततायी वर्तन...यामुळे अलिकडे दोघांतील संवाद भांडणाणेच संपत असत.राजे कांहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.प्रकृती खालावतच होती.
अशातच घोडे विकणारा सौदागार घोडे घेऊन आला.राणीसाहेब अश्वपरीक्षे साठी येताच सौदागाराने कुर्निसात करुन दोन घोडे समोर केले.राणींनी दोन घोडे मंडलाकार फिरवुन आणले व तिसर्या घोड्यावर रपेट करुन आल्यावर आसनस्थ झाल्या.सौदागारा!घोडा कुशीत दुखावला आहे ही गोष्ट निदान आमच्याकडे येतांना तरी लपवायला नको होती.हे घोडे आम्ही व्यापारउद्दीम किंवा गाडीला जुंपण्यासाठी नव्हते घेत तर आम्हाला पाठीवर घेऊन जाण्यासाठी हवे त एवढंही भान असु नये?राणींनी केलेली अचुक,अप्रतिम अश्वपरीक्षा पाहुन प्रथम तो आवाक झाला,पण त्याच्याकडुन झालेली चुक लक्षात येताच तो पायी कोसळुन,क्षमा मागुन परत असं घडणार नाही हे कबुल केले.त्याकाळी अश्वपरीक्षेत तीनच लोक तज्ञ होते.नाना साहेब,शिदे व स्वतः मनुबाई.
अश्व विकत घेतल्याचे कळताच, राजेसाहेब चिडुन म्हणाले,हवेत कशाला घोडे?कुठला युवराज बसणार?आमची मनःस्थिती काय अन् करतां काय?महाराज!पुत्रवियोग आम्हालाही झालाय, पण राज्य चालवणार्यांनी रडत बसुन चलायचे नाही.चालवा राज्य...चालवा...
‌ वादावादी झाली की,त्या तानु मावशी जवळ येऊन मन मोकळं करत. मग त्या लक्ष्मीबाईची समजुत घालत. मनूताई शांत व्हा.महालक्ष्मीला शरण जा. तीच तारणहारी आहे.अहिल्यादेवींचा आदर्श समोर ठेवा.त्यांच्या समोर किती प्रकारची संकटे,घरांतील,राजकारणातील समाजकारणातील,धार्मिक,आर्थिक,पण सार्यांशी समर्थपणे झुंज देत शर्थीने, पुरुषार्थाने सामना केलाच ना?मावशी! त्यांच्याइतके धैर्य आमच्याकडे कुठे? विदिर्ण झालेले महाराज बघवत नाही. एखादा बालक दत्तक घ्यावा का?एक दिवस ज्वरक्लांत महाराजा जवळ बसल्या असतांना दत्तकाचा विषय काढीत म्हणाल्या,आपले मुळ पुरुष रघुनाथ रावांच्या धाकटे पुत्र खंडेरावांचा पुत्र आनंदा बद्दल...राणीसाहेब उत्तम विचार....झाशीच्या वारसाच्या चिंतेने ह्रदय भुंग्याप्रमाणे पोखरत आहे. ब्रिटिशांचा अमलफैल जोरात.... तलवारी गंजुन गेल्यात.दिल्लीचा राजा वृध्द!ग्वाल्हेरचा राजा अज्ञान, हैदर तर इंग्रजभक्त....वारस नसला तर झाशी ताब्यात घ्यायला आयतेच निमित्य इंग्रजांना मिळेल.त्या दत्तकाच्या तजविजीस लागल्या

.
‌ क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

*🌹!!! झाशीची राणी !!! 🌹* *भाग - ९.*

 


*🌹!!! झाशीची राणी !!! 🌹*


*भाग - ९.*

महाराजांना त्यांच्या विकृतव्यसना पासुन मुक्त करण्याचे आश्वासन दिल्या वर दुसर्या दिवशी त्यांनी भेट दिलेल्या पालखीतुन महालक्ष्मीच्या दर्शनाला जाण्याचे निश्चित करुन महाराज निघुन गेलेत.दुसर्या दिवशी महाराणी पालखी तुन व महाराज त्यांच्या लाडक्या सिध्दबक्ष हत्ती ठुमकत पुढे चालला होता यथासांग पुजा झाली. बरेच दिवसांनी राणींचे मन प्रथमच सहानुभुतीने भरुन गेले.पती दर्शनाने त्या मुग्ध झाल्या.पुजे च्या वेळी काशीयात्रेचा संकल्प सोडला.
दुसर्या दिवशी पासुन काशीयात्रे ची तयारी सुरु झाली.ही सारी पाहुन गांगरुन गेलेल्या मनुला मावशी म्हणाल्या देशाटन म्हणजे महापर्वणी,अनेक प्रजाजन भेटतात,त्यांची दुःख,वेदना जाणुन त्या निवारण्याचा प्रयत्न करावा लागतो,त्यांच्याशी बोलावं,मिसळाव लागते.त्यांची मनं सांभाळावी लागतात. मनू तुच या दौलतीस वाढवा घालुन प्रजेस सांभाळशील.एक दिवस हिच झाशी तुझ्या जयजयकाराने दिपुन जाईल.मावशीच्या अंतरंगात चित्र साकारुं लागले....धावत्या अबलख घोड्यावर स्वार झालेली झाशीची राणी, शुभ्रवेश,गळ्यात मौक्तीक माला,अंगी चिलखत,हातात ढाल तलवार असलेला उगवलेला उंच दिमाखदार हात,तेजस्वी डोळे,स्वाभिमानी चेहरा...
माघ महिन्यांत यात्रेकरुंचा थोरला कबिलाचे प्रस्थान झाले.सुवासिनींनी राजाराणीस ओवाळले,पुष्पवर्षाव झाला नी राजाराणीचे दोन सुंदर अलंकृत अश्व वेशीबाहेर पडले.आपली राणी पालखीत न बसतां घोड्यावर बसते याचाच सर्वांच्या चेहर्यावर अभिमान होता.एकच भाव होता,झाशी चा वारस राणीचे उदरी यावा....
यात्रेचा काफीला ठीकठीकाणी मुक्काम करुन तिथल्या प्रजाजनांच्या समस्या,व्यथा त्यांची राणी समजुन घेते, सामान्य मानसागत् त्यांच्यात मिसळते हे पाहुन प्रजाजन स्तंभीत झाली.कुठे नाच गाणे,कुठे नाटके,कुठे कथा,कुठे पोवाडे, गीत करत मजेत काफीला पुढे जात होता.चित्रकुट मुक्कामावर तर तानु मावशीने रामाच्या कथा रंगुन सांगीतल्या.अवघं वातावरणच जणुं राममय झालंय!हसत खेळत यात्रा प्रयाग कडे निघाली.पुर्वजांची श्राध्दे होत होती. पुर्वीचा इतिहास,पुर्वजांच्या कथा ज्या तानुमावशीच्या मुखोद्गत होत्या.सखुबाई चे बंड, तीने पोटच्याच मुलाला मारण्या साठी कसे कारस्थान रचले होते,स्वतःचा मुलगा रामचंद्राचा मृत्यु व्हावा म्हणुन तलावात फाळ वर करुन भाले रोवुन कसे ठेवले होते,पण रामचंद्रांनी कंपनी सरकारला कालपी क्षेत्राचा बंडावा मोडण्यासाठी सत्तर हजार,चारशे घोडे स्वार,दोन तोफा,हजारो पैदल सैनिक देऊन मदत केली होती ती जाण ठेवुन कंपनीसरकारच्या वफादारांना सखुबाई च्या कटाचा सुगावा लागल्याने त्यांनी वेळीच कळवल्यामुळे त्यावेळी रामचंद्र वाचले,पण अचानक २८ वर्षांच्या रामचंद्राचा मृत्यु झाला.रघुनाथराव, शिवरामभाऊ वगैर्यांच्या आठवणी सांगत यात्रा प्रयागला पोहचली.
गंगेवरील घाट,स्थाने,देवदर्शन, त्रिवेणी संगमात वेणीदान,घाटावर अनेकांकडुन होणारे पितृतर्पण!मोरोपंतां नी सुध्दा राणीसाहेबांच्या आईचे तर्पण केल्याचे पाहुन त्या गलबलुन गेल्या.त्या नंतर यात्रा काशीकडे निघाली.काशीच्या कमिशनरांना कळविल्यामुळे राजांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. ब्रिटिश सेना वेशीपाशी राजांना सामोरी आली.राजाराणीचा जयजयकार होत त्यांना सभास्थानी आणण्यांत आले. सर्वांनी उभे राहुन अभिवादन केले.पण एक व्यक्ती बेदारकपणे बसलेला पाहुन राजांनी त्याला बखोटीस धरुन उभे केल्यावर तो चिडुन म्हणाला,आम्ही काशीचे धनिक सावकार अन् आमचा एवढा अपमान?आम्ही कंपनी सरकारचे नोकर..एखाद्या मांडलिक राजासाठी... फार बोललात!हा सन्मान व्यक्तीचा नसतो तर राज्याच्या मातीचा,देशप्रितीचा असतो.त्याने माफी मागीतल्यावर दिलज माई होऊन प्रकरण मिटले.राणीसाहेबांना बरे वाटले. राजांच्या देवदर्शनाची सर्व व्यवस्था चोख ठेवल्या गेली.अहिल्याबाई होळकरांनी स्थापन केलेली ब्रम्हपुरी पाहुन राणीसाहेब थक्क झाल्या.सर्व यात्रीक घाटावर मनसोक्त फिरत होते. गंगेतुन वाहणारी घाण बघुन राणीसाहेबां ना भडभडुन उलटी झाली.प्रकृती एकदम बिघडली.तानुमावशीला आलेली वेगळी शंका,वैद्याच्या नाडीपरीक्षणाने खरी ठरली.झाशीचा वारस येण्याची आनंद वार्ता राजांना कळल्यावर ते आनदाने भारवुन गेले.

क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

*🌹!!! झाशीची राणी !!! 🌹* *भाग - ८.*


 *🌹!!! झाशीची राणी !!! 🌹*
*भाग - ८.*

सखुबाईने किल्लेदारास भरपुर लाच देऊन किल्ला ताब्यात घेतला. माणसं विकत घेतली.त्यांनी रोजमुर्याचे भरपुर पैसे मागावे म्हणुन चिथावणी दिली.नंग्या तलवारी घेऊन माणसं किल्ल्यात फिरुं लागली.राजे गंगाधररावा च्या सुरक्षिततेची काळजी उत्पन्न झाली. ही उलट्या काळजाची बाई कांहीही करुं शकणारी,वारंवार इच्छाभंग झालेली नागीन चवताळुन उठली.अखेर गंगाधरां नी सायमन फ्रेजला अवघी वार्ता कळवली.फ्रेजने किल्ल्याभोवती वेढा घालुन ४८ तासाच्या आंत शरण न आल्यास कैद करण्याचा इशारा दिल्यावर बंडखोर,मळइखोर बाई शरण आली. अश्या धोकादायक स्रीला तिथे ठेवणे शक्य नसल्याने दातिया राज्याच्या मदोरा किल्ल्यात ठेवले.आणि झाशी राज्य निर्वेध झाले.तानुमावशी बोलायची थांबल्यावर मनूला त्या दुर्देवी दिवसाची आठवण झाली.स्वामींना स्रीवेशात बघीतल्यावर ब्रम्हांड आठवले होते. हातात तलवार घेऊन वार्याच्या वेगाने अबलख घोडा पळवणारा,इंग्रजांशी दोन हात करणार्या स्वाभिमानी पुरुषाची प्रतिमा मनांत कोरली होती.मावशी!मला शारिरीक सुखाची अभिलाषा कधीच नव्हती ग!पण....आतां सुधारलेत ना राजे?
नाही मावशी!आपल्याच पतीवर नजरबाज नेमावे लागावे यापरते दूर्देव कोणते असेल?सुंदरच्या पतीला शपथ देऊन त्यांच्या सर्व हालचालींचा वृत्तांत तो रोज देतो.आज स्वामींनी भेट दिलेल्या पालखीतुन व राजे घोड्यावरुन महालक्ष्मीच्या दर्शनाला जाण्याचा बेत होता,पण बेत रद्द झाल्याची वर्दी आली. चौकशीअंती कळले की,महाराज अस्पर्श बसल्याचा आज तिसरा दिवस आहे!इतकी मर्दानगी,दिलेरी पण सारे व्यर्थ...
उद्या महास्नानाची तयारी सुरु आहे.छीः! हे असले विभित्स!मावशीने पोकळ सांत्वन करण्याचा प्रयत्न केला...सुंदर च्या नर्याने महास्नानाच्या तयारीचे समग्र वर्णन केल्यावर जायला सांगीतले.संतापा ने खदखदत सोहळा सुरु झाल्यावर राणी साहेब तिथे पोहचल्या.त्या आलेल्या पाहुन महाराजांसह सारे स्तब्ध घाबरत उभे राहिले.महारांजे वस्र लाल झालेले पाहुन राणीसाहेब दिःगमुढ झाल्या. महाराजांना खरच तसं काही....कलशात काय आहे असं जरबेने विचारल्यावर सेवक थरथरत कसंबसं उत्तरला...कुंकुम जल!क्षणांत त्यांना सारा उलगडा झाला. पवित्र कुंकु या अपवित्र कामासाठी?कुंकुम जलाने स्नान? असले नाटक?सेवकांच्या समोर बोलताही येत नव्हते. त्या महाराजांच्या समीप जाऊन अगदी हलक्या आवाजात म्हणाल्या,हे सर्व पाहुन आमच्या अंगी ज्वर भरलाय!धन्य झालो आम्ही....दिलेल्या शपथा,शब्द,तो करारीपणा,वचक कुठे गेले? आम्हाला सर्वांसमोर अपमानित करुन जाऊ नका. आमचा न्हाहण्याचा सोहळा पुर्ण करण्या ची आज्ञा द्या.संताप आवरत सेवकांना आज्ञा देऊन खदखदत त्या तडक महाली परतल्या.समोर मावशी दिसल्याबरोबर त्यांचा बांध सुटुन त्याना मिठी घालत मटकन् खालीच बसल्या.
दोन प्रहरांनी तजेलदार मर्दानी वेशातील राजेसाहेब त्यांच्यासमोर आल्याबरोबर त्या थक्कच झाल्या. हे मर्दानी रुप खरे की ते रुप? स्वामी आम्ही खचुन गेलो,पार कोसळुन पडलोय! महाराज! आपण दिलेला शब्द, शपथ मोडली.नियतशाबुती,शपथ,वचने जर पाळल्या गेल्या नाही तर,नात्याचे फक्त कलेवर उरतात. राणीसाहेब! आपण आमचा आब राखला,अब्रु जपली, आम्ही आभारी आहोत याचा आम्ही नक्की सन्मान करु.
आपला मनातील खदखदणारा संताप मनातच गिळुन अत्यंत संयमाने त्या म्हणाल्या, महाराज! जसा स्रीवेश वर्ज्य केला तसाच हाही प्रकार...जन माणसांत चर्चा,हसु,बदनक्षा होतो.अशा गोष्टी कर्नोपकर्णी होतात.महाराज! सामान्यांनी कोणत्याही केलेल्या चुका क्षम्य असतात,पण राजकर्त्यानेच असं विकृत...महाराज! आमचा रोष न धरावा आपल्या अश्या विकृत वागण्याने वचक, दरारा,मर्दानगी कलंकित होते.पुनरावृत्ती होऊ नये ही काळजी घेणे आमचा पतिव्रताधर्म!उतरल्या चेहर्याने महाराज निघुन गेले.
दुसर्या दिवशी अपराधी भावाने महाराजांनी राणीकक्षेत प्रवेश करुन म्हणाले,आम्हाला कळतय की,हे योग्य नाही,पण अस्पर्श बसण्याची उर्मीच येते. वैद्यकीय इलाज झाले.वैद्य म्हणतात ही व्यसनविकृती....मनाला आम्ही खुप आवरायचा प्रयत्न करतो पण मनाविरुध्द मन हे विकृती घडवुन आणतय!खुप प्रयत्न चालु आहे पण यश येत नाही, आम्हीही शर्मिंदा आहोत,आम्हालाही अपार कष्ट,शीण येतो.राणीसाहेब! आपण थोर मनाच्या,प्रगल्भ बुध्दीच्या, दूरंदेशी,न्यायदृष्टी आहात.पंडीत जसा बालकाहस्ते अक्षरे गिरवुन घेतात तैसी दृष्टी आम्हावर ठेवा,मदत करा.लक्ष्मीबाई चे मन सहानुभुतीने भरुन आले.महाराज व्यसनरुग्न आहेत तर?वैद्याच्या सहाय्याने यातुन मार्ग काढण्याचे त्यांनी मनोमन ठरवले.

क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख


*🌹!!! झाशीची राणी !!!🌹* *भाग - ७.*

 


*🌹!!! झाशीची राणी !!!🌹*

*भाग - ७.*

झाशीचे राज्य गंगाधर महाराजांना कसे प्राप्त झाले याची थोडक्यात माहिती देणे क्रमप्राप्त आहे.तानुमावशींना सारा इतिहास माहित असल्याने त्या लक्ष्मीबाईं ना कथन करुं लागल्या....१५ वर्षापुर्वी याच किल्ल्यावर घडलेलं सखुबाईचं बंड, लक्ष्मीबाईच्या मोठ्या जाऊबाई!तुझे सासरे शिवरामभाऊंना तीन मुलें...मोठा कृष्णराव,त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान रघुनाथराव आणि त्यांच्यापेक्षा तब्बल २५ वर्षांनी लहान तुझे पती गंगाधरराव! गंगाधरराजेंचे जेष्ठ सावत्र बंधु कृष्णरावां ची पत्नी सखुबाई!सखुबाई अत्यंत महत्वाकांक्षी,अधर्मी..गंगाधरराजेंचे आजोबा रघुनाथ हरि फार प्रबुध्द शासक होते.तोफांची घडण,अनुसंधान शाळा, समृध्द ग्रंथालय वगैरेचा विकास त्यांनीच केला.त्यांच्या मृत्युनंतर तुझे सासरे शिवरामभाऊ झाशीचे सुभेदार झाले. झाशीभोवती परकोट त्यांनीच बांधला, पण दूरंदेशी,दूरदृष्टी कमी पडली.स्वतःच ब्रिटीश अधिनता स्विकारली.अस्तिनेत साप पाळला.मनुबाई!अधिनता स्विकारण्याचे बक्षीस म्हणुन शिवरामां च्या वंशाला झाशीचं सिंहासन कायमचं मिळालं.आणि याच राज्यप्राप्तीसाठी त्यांच्या जेष्ठ पुत्रवधु सखुबाईने कुटील कारस्थानं,चिथावणी,पैशांनी फितुरी विकत घेणे अशा कारवाया सुरु केल्यात. घरच्यांच्याच जीवावर उठणार्या घरभेदी स्रीचे कांही चालु न देतां,शिवरामभाऊंनी कृष्णरावांना सुभेदार केले,पण त्यांचा अवघ्या २५ व्या वर्षी मृत्यु झाला. जाणत्या व्यक्तीला सुभेदारी न देता, सखुबाई-कृष्णरावांचा मुलगा रामचंद्रास दिली.तुझे दीर रघुनाथराव व पती गंगाधर रावांना १२ हजाराचा तनखा देऊन गप्प बसविले.आणि एवढे कट कारस्थान करुनही सखुबाईंना कांहीच अधिकार न मिळाल्यामुळे तीचा संताप अनावर झाला.स्वतःचाच मुलगा रामचंद्र तीला शत्रुसमान वाटु लागला.अहिल्याबाईंच्या पोटी कुपुत जन्मुन सुध्दा त्यांनी सांभाळ केला.अश्या सखुईंनी सेवकांना चिथवलं, अशांती,अराजकता माजवली.या सार्याचा ताण सहन न होऊन शिवराम भाऊंनी दोन वर्षातच डोळे मिटले.१८१७ ला दुसर्या बाजीरावांनी तहसंधी करुन, इस्ट इंडिया कंपनीला बुंदेल खंडाचे सर्वाधिकार दिले.कंपनीने अकरा वर्षाच्या रामचंद्रांच्या अधिकारास मान्यता दिली. त्यांच्या वतीने आम्बेदारकर कामकाज पाहु लागले.पुढे दहा वर्षे सखुबाईच्या मनात जाळ उठत राहिला.
राजे रामचंद्र व ब्रिटिशांचे संबंध चांगले होते.कर्नल श् लीमनची अन् त्यांची मैत्री,राजेंचा कर्तबगारपणा, राज्यात नांदत असलेली सुख, शांती, आनंद सखुबाईला बघवत नव्हते.प्रत्यक्ष पुत्रावरच जळत होती.९ डिसेंबर १८३२ ला स्वतः विल्यम बेंटिंग झाशीस येऊन चौरंगी दरबार भरवला.वाजंत्री तुतार्या च्या गजरात रामचंद्र राजांना "महाराजाधिराज फिदुई बादशाही जानुजा इंग्लिस्तान महाराज रामचंद्र बहादूर" हा किताब प्रदान केला आणि दरबारात लावायला ब्रिटिश झेंडाही... किताब सोहळा जलाली नजरेने सखुबाई बघत होत्या.राजांना इच्छेविरुध्द कांही गोष्टी कराव्या लागत होत्या.नंतर भरभराट होऊन खजिना भरु लागला. झाशीत लक्ष्मीची पाऊले उमटु लागली. पण ओरछा,दतियाच्या डोळ्यात हा उत्कर्ष खुपु लागला.त्यांनी रामचंद्रांची तक्रार बेंटीग पर्यत नेली,पण त्याने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यामुळे घुमसान लढाई केली.दुही सांधावी,समेट व्हावा म्हणुन झाशीच्या सुभेदाराचे सारे प्रयत्न व्यर्थ गेले.प्रजा स्वैरभैर होऊन वाटा फुटतील तिकडे पळु लागले.अन्नान दशा झाली.हाती फक्त झाशी व मऊरानी पुर राहिले.रामचंद्रांचे सारे प्रयत्न वाया जाऊन पराभूत झाले.अराजकता माजली.युध्दात तिजोरी रिक्त झाल्याने इंग्रजांचे ऋण काढावे लागले.या सर्वांचा सहाजिकच त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला.मृत्युशयैवर असलेल्या पुत्राचे डोके मांडीवर घ्यायचे सोडुन, सखुबाई सागरला जाऊन मुलीला व तिचा पुत्र कृष्णरावाला घेऊन आली,आणि राजा रामचंद्रांनी भाच्याला दत्तक घेतल्याची आवई उठवली.त्याच वेळी कर्नल (Shliman) श् लीमन झाशीस आले. झाशीच्या सुभेदारीवर चार जणं हक्क सांगणारे!तुझ्या सासर्याची काकु, रघुनाथरावांची यवनकांचनीचा पुत्र अलिबहादुर,सखुबाईचा नातू कृष्णराव आणि तुझे स्वामी गंगगाधरराव!गंगाधरां ना हक्क मान्य झाला आणि सखुबाईने थयथयाट मांडला.

क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

*🙏🌴🌹!!! झाशीची राणी !!!🌹🌴🙏* *भाग - ६*.

 


*🙏🌴🌹!!! झाशीची राणी !!!🌹🌴🙏*

*भाग - ६*.

मिरवणुकीच्या प्रारंभी हाती उंच निशाण उभारुन पांच घोडेस्वार,नंतर वाजंत्री चौघडे,त्यामागे बॅंडपथक,नंतर घोडेपथक आणि आश्चर्यकारक स्रीयांचे २० घोड्यांचं घोडदळ,त्यामागे तुतार्या च्या निनादात सजलेल्या हत्तीवर चांदीच्या अंबारीत महाराज गंगाधरराव आणि महाराणी,त्यामागे मानर्यांचे दोन हत्ती,मागे नर्तकीचा ताफा!झाशीच्या राज रस्त्यावरुन मिरवणुक जात होती.स्रीयां च्या घोडदळावर फुलें उधळली जात होती.राजा राणीच्या जयजयकाराने आकाश दुमदुमुन गेले.झाशीला एक समर्थ राणी मिळाली होती.जनता गवाक्ष सौधावरुन,वाटेच्या दुतर्फा फुले ऊधळत नमस्कार करीत होते.
गंगाधररावांचे मनूशी विवाह झाल्या वर त्यांनी आपल्या ३२ वर्षीय सासर्याचे मोरोपंताचे लग्न चिमाबाईसंगे लावुन दिले.ते दोघेही झाशीच्या महालातच राहत होते.तानुमावशी व मोरोपंत पत्नी चिमाबाईसह आपल्या कन्येचा सुख सोहळा तृप्त मनाने डोळ्यात साठवुन घेत होते.जयजयकार करीत होते.नाना साहेबांनी हत्तीवर घेतले नव्हते म्हणुन रुसलेली बालमनू त्यांना आठवत होती. मिरवणुक सीमाल्लोघंन करुन महालक्ष्मी चे दर्शन झाल्यावर किल्ल्यावर येताच राजाराणींनी तानुमावशी,मोरोपंत व चिमाबाईस आदरवंदना दिली आणि समारंभ संपला.
दसरा झाला.या प्रसंगाची चर्चा सर्वीकडे सुरु होती.राजांमधला आमुलाग्र बदल,बंद झालेल्या नाटकशाळा, सुरु केलेली शस्रागारे, तालिमखाने...आपला राजा समर्थ होतसे पाहुन रयत सुखावली त्याचबरोबर राजाराणी काशी यात्रेला जाणार म्हणुन आनंदीत झाले.
झाशीच्या राजप्रसादाचं काम संपत आलं.झाशीत अनेक कलाकार,चित्रकार, विणकर राजश्रयास आल्याने झाशी गजबजुन गेली.राजांनी राजकारणांत पुर्ण लक्ष घातल्याने लाखो रुपयांचं कर्ज फिटलं,केवळ ३६ हजाराचंच कर्ज बाकी होतं.तंटे मिटत होते.कोषागारात भर पडत होती.छोट्या मोठ्या माणसांपर्यत न्याय पोहचत होता.पत्रव्यवहार नियमित होत होता.गरीबाना,शेतकर्यांना जातीवंत खिल्लारे वाढण्यास,पाटांची डागडुज्जी,ऊत्तम बि-बियानांची लावणी, जागोजागी पाण्याचे नहर,या सर्वासाठी मदत मिळाल्याने झाशीचा उत्कर्ष होऊ लागला.राजास दुवा आणि महाराणीच्या कर्तुत्वाची व शुभ पायगुणांचे कौतुक होऊ लागले.महाराणी तानुमावशीला म्हणाल्या,विकृत व्यसनांचा म्हसारा,बंध तोडणे महाकठीण,पण स्वामींनी सहज शक्य करुन दाखवले.
देवी अहिल्याबाईंनी खंडेराव व मालेरावांना व्यसनांच्या विळख्यातुन बाहेर काढण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण त्यांचे सारे प्रयत्न विफल झाले,पण तुम्ही मात्र असामान्य काम करुन दाखवले.तेवढ्यात राजे येत असल्याची वर्दी आली. त्यांच्या आज्ञेनुसार सर्व मानकरी,मदतनीस व जवळचे सर्व दिवानखाण्यात जमा झाले.सर्व येऊन बसल्यावर थोड्याच वेळात लव्याजम्या सह महाराज प्रवेशुन सुशोभीत आसना वर स्थानापन्न झाले.त्यांच्या शेजारी महारीणीही बसल्या.आजच्या सोहळ्या च्या प्रयोजनार्थ प्रधानमंत्रीनी निवेदनास सुरुवात केली.झाशी व भोवतालचा परीसर सोनारपेठ,विणकरांचे माग,रेशीम व्यापार व अन्य उद्योगधंदे सुरु झाल्या मुळे गजबजुन गेला.देवमूर्तीचे मुकुट, किरीट,कुंडले,अनेक मंदिरांचे जिर्नोध्दार,समृध्द ग्रंथसंपदा वृध्दींगत झाले हे सारे महाराणींच्या प्रेरणेने!विद्वानांना राजाश्रय,कारागीर,विणकर, कोष्टी,मजुर यांच्यासाठी सरकारी घरकुले नवीन दोन पाठशाला,वैद्य संशोधन कार्य महाराणींच्या अथक प्रयत्नाने व दूरंदेशीने होत आहे.त्याप्रित्यर्थ गौरव म्हणुन त्यांच्या सन्मानार्थ खास चांदीची लाल मखमली महीरपी,मोत्यांची माळा, मखमली गादी लोडांनी सजलेली पालखी प्रेमादराने महाराज भेट करीत आहेत. त्यांना पालखीपेक्षा अबलख घोडा जास्त आवडला असतां.तरीसुध्दा या अनमोल भेटीचा स्विकार करुन, महालक्ष्मी दर्शना ला या पालखीतुन जाऊन महाराजांची इच्छा त्यांनी पुर्ण करावी.
टाळ्यांच्या कडकडाटात भरुन आलेल्या मनाने महाराणी उठुन म्हणाल्या,आम्ही तर केवळ भिक्षुकाची कन्या!स्वामींनी आम्हास इथपर्यत आणल.तानुमावशीने माणुस म्हणुन घडवलं.स्वामींची इच्छा आम्ही जरुर पुरी करु! पण,आज फिरंगा चारही बाजुने या भूभागाचे लचके तोडत आहे,कुटील कारस्थान,लाचलुचपत देऊन माणसं फितवत असुन आंतपर्यंत शिरकाव करीत आहे.त्याच्या पारिपात्यास्तव घरांघरांतीन सैनिक निर्मिण व्हावा. प्रत्येकाची पंचेंद्रिय सावध असावे, आपल्या झाशीचा किल्ला अभेद राहावा ही आपणांसर्वांकडुन अपेक्षा करुन महाराजांच्या या अद्वितिय भेट(पालखी) चा स्विकार करते.

क्रमशः

संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.

*🌹!!! झाशीची राणी !!! 🌹* *भाग - ५.*

 


*🌹!!! झाशीची राणी !!! 🌹*

*भाग - ५.*

फितुरी! राणीसाहेब फितुरी,स्वार्थी मतलबी,पैशासाठी कोणत्याही थराला जायला तयार असल्यामुळे राजकारण बिघडत आहे.फिरंग्यांची हाजी हुजरी....
आणि फिरंगी वरवर राज्य नको म्हणत, पण त्याच्यात शिस्त असल्यामुळे आपला मुलुख घशात घालत आहे.वीरांच्या रक्तमोलानं,बलिदानानं मिळवलेलं राज्य आयतच त्यांच्या घशात जात आहे. आपण विश्वासु लोकांची एकजुट करुन बुध्दीचातुर्याने बंडावे,कार्य करुन राज्याचे पाय भक्कम करावे.फिरंग्यास उखडावे.
मोतीबाई,जूहीबाई या गणिकांचा ऊपयोग नजरबाज, हेर म्हणुन करावा.
राजे त्यांचे बोलणे ऐकुन थक्क झाले.त्यांना आपल्या स्रीवेशाची लाज वाटु लागली. स्वामी खुप कटु पण पोटतिडकेने सत्य तेच बोलले.स्वामी!मनी रोष न धरावा.आपला बदनक्षा नाही सहन होत.आपले शौर्य व्यर्थ जातसे पाहुन उरात वेदना ठसठसतात,कळ उठते स्वामी!
महाराणी!हाती तलवार व बेलभंडार घेऊन आपल्याला वचन देतो की,यापुढे स्रीवेश धारण करणार नाही.या पाप क्षालनासाठी काशीयात्रेस जाऊन,त्या निमित्याने देशाटन व मातब्बर आसामीं ची भेट होईल.यापुढील क्षण व कण फक्त राज्यासाठीच! आज आपण झणझणीत अंजन घातलं.मी आपला...
पुरे स्वामी!आपण क्षमा करावी.महाराज निघुन जाताच तानुमावशी धडधडत्या ह्रदयाने बाहेर आल्या कसे निभावले असेल माझ्या मनुने?हीच्या सारख्या शूर लढाऊ मुलीस स्रीवेश धारण करणारा पती मिळाला.दुर्देवाची बाब असली तरी राज्ञीपद मिळाले ही दुर्मिळ संधीच!कच न खाता खुप कर्तव्य करायचेत मनुला...
मनु काय झाले ग?महाराज खुप रागावुन गेले का?मावशी!आमच्या स्पष्ट व परखड बोलण्याने स्रीवेश व विकृतीचा त्याग करण्याची आण घेऊन गेलेत स्वामी! मावशी राजाची मनगटे प्रजेच्या रक्षणासाठी,सुखसुविधेसाठी असतात, गजरे बांधण्यासाठी नाही याची स्पष्ट जाणीव करुन दिली स्वामींना...
महालक्ष्मी नवरात्रोत्साहाची तयारी सुरु झाली.विजयादशमीच्या उत्सवा साठी चौघडे,हत्तीवरचा चांदीचा हौदा, छत्र चामरे,हत्तीचे चांदीचे तोडे,उजळवणे मंदिर रंगवणे,तुतार्या चकचकीत करणे, घोड्याच्या गळ्यातील घुंगरे,माळा, कपाळावरचे बिजोरे,मुकुट सारे शोभीवंत होऊ लागले.महालक्ष्मीसाठी सुंदर सुंदर लुगडी,मूर्तीचे पोषाख,किनखापी वस्रे, सर्व तयारी केल्या गेली.रिवाजाप्रमाणे ब्रिटिश सरकारच्या बॅंडपथकालाही आमंत्रीत केले.नवरात्राचा नऊ व अष्टमीचा निर्जळी उपवास महारीणींनी केला.त्यांचा सुंदर चेहरा अधिकच तेजाळला.गेले ७-८ महिन्यापासुन राजे नाटकशाळेऐवजी तालिम आखाड्यात मेहनत करु लागले.दर महिन्याला न्हाण्याचा सोहळा तर लोकं विसरुनही गेले.गाणे बजावणे थांबले.मोतीबाई,जूही बाई यांच्या फेर्या नबाब,ब्रिटिश अंमलदाराकडे होऊ लागल्या.
लोकं ऊत्सुकतेने दसरा मिरवणुकी ची वाट बघत होते.दसरा रविवारी येत असल्यामुळे इंग्रजांचा प्रार्थना दिवस असल्यामुळे,ब्रिटिश अधिकारी व बॅड पथक शोभायात्रेत सहभागी होण्यास असमर्थ असल्याने दिलगिरी व्यक्त केल्याचे पत्र व नजराणा आल्याचे पाहतांच, महाराज संतापाने पेटुन उठले.धर्म हा राजकर्तव्या आड कधीही येऊ देऊ नये.सिमाल्लोघंनाच्या मिरवणुकीत सामील होणं राज कर्तव्य आहे.प्रधानमंत्री!त्याचा नजराणा परत पाठवुन त्यांना लिहा आपली अनुपस्थिति झाशी राज्याची बेअदबी आहे.आम्ही सहन करणार नाही.बॅंड पथकासह शोभायात्रेत सामील न झाल्यास पुढील गंभीर परिणामास तयार असावे.खलिता व नाकारलेला नजराणा इंग्रजांकडे रवाना झाला.महाराजांनी गमावलेला सन्मान महाराणीच्या सानिध्याने परत आला.महाराणींनी पडदासंस्कृतीला पायबंद घालुन स्रीयांचे लढाऊ पथक तयार केले.स्रीयांमधे आत्मविश्वास निर्माण होऊ लागला.लाल तोंड्या माकडं,ब्रिटिशांची चिड येऊ लागली.राणीसाहेबांबद्दलचा आदर,प्रेम, विश्वास निर्माण होऊन त्यांच्या बरोबर घोडसवारी,शस्रविद्या शिकण्यास त्यांना आनंद वाटु लागला.दसर्याची मिरवणुक वेळेवर निघाली.इंग्रजांचे बॅंडपथक व अधिकारी वर्ग आधीच हजर होते.

क्रमशः

संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.

*🌹!!! झाशीची राणी !!!🌹* *भाग - ४.*

 


*🌹!!! झाशीची राणी !!!🌹*

*भाग - ४.*

महालात पाय ठेवताच तिथे नटुन थटुन बसलेल्या स्रीस लक्ष्मीबाईंनी स्वामी कुठे आहेत विचारल्यावर, ८-१० जण असलेल्यांच्या जीभा टाळुला चिकटल्या. त्यांनी संतापुन त्या स्रीस पुन्हा विचारले, पण ती पाठमोरी असल्यामुळे त्यांनी त्या स्रीला खसकन हात धरुन समोर उभे केले आणि क्षणभर सारं विश्वच गरगरतं आहेस वाटलं,स्वप्नातही कल्पना केली नाही असं दृष्य समोर दिसलं.ती स्री दुसरी तिसरी कोणी नसुन स्रीवेश धारण केलेले महाराज गंगाधरराव होते.राणी डोळे फाडुन बघतच राहिल्या.हे आपले स्वामी?ज्यांच्यासाठी आपण रात्र रात्र तळमळतो झुरतो?
स्वामी हा काय प्रकार आहे?इंग्रजां नी आपल्याला बांगड्या भरायला भाग पाडल की आपणच स्रीरुप घेतल? अहो! ही वेळ पुरुषार्थ गाजवायची,हा डोलारा सावरायचा,अशा वागण्याने डेर्याचे दोडे उतरण्यास वेळ नाही लागायचा!हे राज्य नमुदास आणणे आहे...आम्ही नाही सहन करु शकत...जातो आम्ही..गंगाधर ओरडुन म्हणाले,बोलावल कुणी?राज घराण्यात वर्दीशिवाय कुणी येत का?पण तुम्हाला कस कळणार?महाराणी खिन्न होऊन परतल्या.तानुमावशी त्याची समजुत घालत म्हणाल्या,मनुबाई!महाराज रसिक,कलावंत आहेत. नाटकाची त्यांना आवड आहे.
आणि नाटकशाळांचीही!मावशी हे दैवाने काय दिलय?तेवढ्यात राजे गंगाधर येत असल्याची वर्दी आली.लक्ष्मी बाईंच्या मनी घृणा दाटुन आली. मावशी आंत निघुन गेल्या.गंगाधरराव स्रीवेशातच तणफणत आले.राणीसाहेब संतापुन उभ्या राहिल्या.स्वामी या वेशात आपणाशी बोलणे अशक्य!आम्हास नाही सहन होत.आम्ही आपला पुरुषवेश सहन करतोच ना? आपला मल्लखांब, कुस्ती सहन करतो ना?महालात तर आपण आखाडाच उभा केलाय!महालात नाटकशाळा आणण्यापेक्षा अधिक चांगले.आपल्यासारख्या अरसिक पुरुषी स्रीला काव्य,कविता काय कळणार?कुस्ती,घोडदौड...छी...!इंग्रज स्री पुरुष बघा कसा कलेचा आनंद घेतात.नाच गाण्यात गुंतवुनच तर इंग्रजांनी सारा हिंदुस्थान घशात घालण्याचा प्रयत्न चालवला आहे.आपण सुध्दा झाशीचा पांचवा हिस्सा किती सहजपणे देऊन टाकला.नाटके, गाणी ऐकुन सारं कसं परत मिळवणार?त्यासाठी आमचे आखाडेच कामी येतील,नाटकशाळेतील गणिका नाही.आपणास या वेशात बघणे अशक्य... अशक्य...
आम्हाला आवडतं हे सारं...नाटक दिग्दर्शन,अभिनय...रोज आठाचाराचा प्रसंग नको वाटते.आम्ही महिन्यातुन तीन दिवस अस्पर्श बसतो.चौथ्या दिवशी नहाण्याचा सोहळा..पुरे पुरे...या विकृत कथा कानी आल्याच होत्या.अभिनंदन आपलं... इंग्रजांशी लढण्यासाठी फारच उत्तम शस्रे निर्माण केलीत.इंग्रजांनी बांगड्या नाही का दिल्या?बांगड्या घाला स्रीवेश घ्या नी नाचत नाचत इंग्रजफौजेस सामोरे जा...घोड्यांच्या पायात घुंगरं... खामोशsss आमची ही बेअदबी? जबान आवरा...मनमानी बोलण्याचे अधिकार, स्वातंत्र्य आम्ही दिलेले नाही.
ते स्वातंत्र्य आणि अधिकार आम्हास या मंगळसुत्राने दिले.मी आपली अर्धांगी!आपल्यातल्या दडलेल्या लढवय्याला आव्हान करा.नाटकगृहांच्या जागी आखाडे येऊ द्या.फिरंगी अतिशय मातला आहे.चारही बाजुने पाश आवळत आहे.हे छंद बंद करुन दूरंदेशी येऊ द्या.स्वामी!ओरछा,दतिया,आजुबाजु चे सारे स्वार्थाने बरबटलेले.अवतीभवती वणवा घुमसू लागलाय!स्वामी देशाटन करा.चौफेर नजरबाज पाठवा.ऊपद्रव देतात त्यांना अविलंब समज द्या.सध्या सावध राहण्याची निकड असतांना स्वामी हे काय करीत आहात?फौजांना प्रशिक्षित करा.शस्रागारे उघडा.प्रधानमंत्री नेमुन अंतर्गत व्यवस्था बळकट करा. आणि सर्वात आधी स्रीवेशाचा त्याग करा आम्ही बंद डोळ्यांनीच आपल्याशी बोलतोय...बघणे अशक्य आहे.
गंगाधरराजे लुगड्याचा घोळ सावरत उठत म्हणाले,राणीसाहेब आपले बोलणे जरी जहाल असले तरी तथ्य आहे हे आम्हीही जाणतो.इंग्रजांकडे ससज्ज शस्रे असल्यामुळे आपला निभाव लागणे कठीण....कोण म्हणतो?इथले शासक आपण इंग्रज बरे इथे येऊन पाय घट्ट रोवतात आणि आपले पाय उखडतात हे घडतेच कसे?

क्रमशः

संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.

*🌹!!! झाशीची राणी !!!🌹* *भाग - ३.*


 *🌹!!! झाशीची राणी !!!🌹*

*भाग - ३.*

मनुबाई आतां महाराणी लक्ष्मीबाई झाल्यात.आणि तानुमावशीची जबाब दारी वाढली. राजगृहातले रितीरिवाज, पाकगृहाकडे लक्ष पुरवणे,पुजाविधी, अनुष्ठान,पत्री फुलं,कुळधर्म,कुळरिती, पतीच्या आवडीचे पदार्थ यांत जरी त्या गुंतल्या असल्या तरी,दुपारचा वेळ मात्र ग्रंथालयातील पुस्तके वाचण्यासाठी राखुन ठेवला होता.राणीस अजुन ऋतु प्राप्ती न झाल्यामुळे दोघांचे मिलन झाले नव्हते.त्या ग्रंथालयात असतांना महाराज तिथे येऊन "राणीसाहेब"अशी हाक मारल्यावर,लक्ष्मीबाई विनम्रपणे हरकत घेत म्हणाल्या,आम्ही आपली अर्धांगिनी लक्ष्मीच! आम्ही सर्व रितीरिवाज शिकुन आपल्या लायक होण्याचा प्रयत्न करुन आपले कुळ,नाव नमुदास आणण्याचा प्रयत्न करु.ठीक आहे.एकांतात आम्ही लक्ष्मी म्हणु!परंतु जगासमोर मात्र राणीसाहेबच म्हणायला हवय!तुमचा पायगुण महाभाग्याचा,शकुनाचा ठरला. ब्रिटिश सरकारने झाशीची पुर्ण सत्ता आपल्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.
स्वामी आपल्याच देशात आपल्याला या फिरंग्यांनी लज्जात्मक रितीने अधिकारापासुन वंचित केले. आतां झाशीचे अधिकार मिळते म्हणजे, आपण केलेल्या राजव्यवस्थेचा सन्मान आहे.पण त्यांच्या अटी नक्कीच असतील राणीसाहेबा!आपलं वय केवळ १२-१३ वर्षाचं!महाराष्र्टातील एका ज्ञानेश्वरां बद्दल ऐकुन होतो.आपणही...आपले तेजही... स्वामी व्यर्थ संकोचात लोटु नये अटी सांगाव्या..
बुंदेले आणि ठाकुरांचे दमन करण्या स्तव ब्रिटिशांची एक तुकडी इथे राहील. त्यांच्या खर्चासाठी दुलिया,तालगंज, आणि आणखी दोन जिल्हे त्यांना द्यायचे. शिवरामभाऊ पासुन मोस आणि जलौन आधीच त्यांच्या अधिन आहेतच.
म्हणजे प्रत्येक ठीकाणावर फिरंगी आपले पाय रोवुन पाश आवळतात हे तानुमावशीचे म्हणणे खरे आहे तर? उदईक दरबारात होणार्या समारंभात सिंहासनावर आपण आमच्या शेजारी असाल.समारंभाची तयारी सुरु झाली. खांबाखांबावर फुलांपाणांच्या माळांची तोरणे,उंची समया,उंची गालिचे,दरबारा तील झुंबरे लखलखत होते.ललकारी झाली आणि गंगाधर राजे,महाराणी लक्ष्मीबाईसह प्रवेशुन सिंहसनारुढ झाले. कॅप्टन डनलाॅप मोठ्या मिजाशीत आसनावर बसला होता.लक्ष्मीबाईंच्या मनांत कल्होळ उसळला.सत्तापिपासू जळव्या इंग्रजांनी दोन अडीच लाखाचा मुलुख गिळला.आमच्याच गोष्टी आम्हाला दान करतात.मोरोपंत आणि तानुमावशी अत्यंत कौतुकाने सोहळा बघत होते.राणीच्या चेहर्यावर जरी वरवर हास्य विलसत असले तरी,त्यांच्या अंतःकरणात पेटलेला वणवा कुणालाच कळणारा नव्हता.
यानंतर राजे गंगाधरांनी अंतर्गत शासन व्यवस्थेकडे जातीने लक्ष द्यायला सुरुवात केली.कॅप्टन डलहौसीच्या अटी अन्यायकारक व कठीण होत्या,पण स्विकारण्याखेरीज पर्यायच नव्हता. राधारामचंद्राची प्रधानमत्री म्हणुन नेमणुक केली.नरसिंह कोप्रा व नाना भोपटकर यांचीही योग्यपदी नेमणुक करण्यात आली.ओरछाच्या आजुबाजुस मळईखोर लोकं होती,जिथे विद्रोहाची शक्यता होती तिथे राजेंनी सैनिक तैनात केले.
आणखी चार वर्षे लोटली.आतां राणीसाहेब चौफेर लक्ष घालु लागल्या. त्याचबरोबर तारुण्यसुलभ भावनेने स्री पुरुष संबंधाचे अनेक पैलु लक्षात येऊ लागले.ऋतुशांतीचा कार्यक्रम झाल्यावर, पतीविषयीचा आदर,प्रेम,विश्वास या सार्या भावनासहित गंगाधर राजेंच्या महालाकडे निघाल्या असतां त्यांच्याहुन मोठी असलेल्या सुंदरी नावांच्या सखी कडुन जे महाराजांविषयी कळलं ते अतिशय घृणीत होतं.त्यांच्या मनातील प्रेम,समर्पणाची आस,मिलनाची आतुरता मांगल्याची भावना,भेटीची ओढ हे सारं अर्पन करण्याची,रितं करण्याची वेळ आलीच नाही.आणि आली ती फारच क्वचित! गंगाधरांच्या पदरांत इश्वराने मनू रुपी सुंदर गाणं टाकलं पण ते बाजारु गाणे ऐकण्यातच मग्न असत.आणि एके दिवशी त्यांची सोशीकता,सहनशक्ती संपल्याने मनाच्या क्षोमावस्थेत वर्दी न देता गंगाधरांच्या महालात प्रवेशल्या मात्र.....
क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...