विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 23 February 2020

आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक

आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक 

 

राजकुमार गडकरी, शिर्डी
" rajkumargadkarisai@gmail.com
आपल्या हिंदुस्तानात येऊन राजवट गाजवणार्‍या इंग्रजांविरोधात सर्वप्रथम बंड करून देशव्यापी क्रांतीचे स्वप्न पाहण्यासाठी शेवटपर्यंत झगडणारा महाराष्ट्रातील एक शूर निधड्या छातीचा विर नरवीर उमाजी नाईक स्वातंत्र्य लढ्यातील एक आद्य क्रांतिकारक नरवीर ठरला गेला, त्यांची पुण्यतिथी 3 फेब्रुवारी रोजी असून त्यानिमित्त त्यांचा हा लेख..
आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी समाजात दादोजी खोमणे व माता लक्ष्मीबाई यांच्या उदरी 17 91 रोजी पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील भिवडी गावाच्या हद्दीत वज्रगडाच्या पायथ्याशी जांभुळवाडी येथे झाला, शूरवीर ,स्वाभिमानी, इमानी व धार्मिक मातापित्यांच्या पोटी उमाजी नावाचा एक रत्न जन्माला आला, उमाजी चे वडील दादोजी हे पुरंदर किल्ल्याचे सरदार होते ,आई लक्ष्मीबाई या जेजुरी जवळील पानवडी च्या होत्या ,त्यामुळे या कुटुंबाची जेजुरीचा खंडोबा वर अपार श्रद्धा होती ,उमाजीचे सर्व कुटुंब नातलग व रामोशी समाज छत्रपतींच्या काळापासून पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे जबाबदारी इमानेइतबारे पूर्व पार सांभाळत होता, त्यामुळे त्यांना गडनायक ही पदवी बहाल होऊंन खोमणे ऐवजी नाईकच सर्वजण म्हणत असत, उमाजीला अमृता व कृष्णा ही दोन मोठाली भाऊ व जिजाई ही लहान बहीण होती ,असे सर्व सुरळीत जीवन जगत असताना उमाजीचे वडील दादोजी सन१८०२ मध्ये स्वर्गवासी झाले, त्यावेळी उमाजी फक्त 11 वर्षाचा होता, हुशार, चंचल तसेच शरीराने धडधाकट रागट, उच्च बांध्याचा, करारी असल्याने त्यांनी लवकरच रामोशांची पारंपारिक छान विद्या ,वेशांतर करून गुक्तपणे बातम्या मिळण्याची हेरकला, आत्मसात केली, तसेच जसा उमाजी मोठा होत गेला, तसा त्याने दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा ,तलवार ,भाले ,कुऱ्हाडी ,तीरकमठा,गोफणी चालवयाची कला अवगत केली, उमाजीचे लग्न गंगुबाई बरोबर झाले होते ,उमाजीला महां काला व तुका ही दोन मुले व पार्वती नावाची मुलगी होती कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना अशातच इंग्रजांनी हिंदुस्थानात सत्ता स्थापन करण्यासाठी लढा सुरू केला ,हळूहळू काही मराठी भाग ताब्यात घेतला पुण्याचा मुलुख जिंकला, इंग्रजी सेनापती वेलस्लीने १८०3 मध्ये तेथे दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले, त्याने इंग्रजांचे काम सुरू केले, सर्वप्रथम त्याने इतर किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्यावरील संरक्षणाचे काम क्रांतिकारी रामोशीसमाजा कडून काढून घेतले छत्रपतींनी दिलेली वतने नष्ट केली व आपल्या मर्जीतील माणसे तेथे बसवली, त्यामुळे क्रांतिकारी रामोशी समाज उपाशी मरू लागल्याने चवताळला तसेच नंतर मराठी राज्य गेली, इंग्रजी सत्तेचा पाया भक्कम होत गेला, भयंकर दुष्काळ पडला ,इंग्रज नावाने भारतात आलेल्या महाभयंकर रोगाने देशावर कब्जा मिळवला, ३जून१८१८ इंग्रजांचा देशावर अंमल सुरू झाला, जुलमी कायद्यापुढे मराठी जनता तग धरीना , आया-बहिणींची अब्रू उघड्यावर लुटू लागली अशा परिस्थितीत करारी उमाजी बेभान झाला, आईने लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाच्या सांगितलेल्या गोष्टी आठवल्या व एक दिवस ठाम निश्चय केला, छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या आधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही व माझ्या जनतेला उपाशी मरू देणार नाही असा पण करत विठुजी नाईक, कृष्णानाईक, कुशाबा रामोशी, बाबू सोळकर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली, सर्वप्रथम रामोशी समाजाला बरोबर घेऊन छत्रपतींनी दिलेली वतने नष्ट करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली,
इंग्रजांना त्रास देण्यामुळे उमाजीला सन 18 18 मध्ये इंग्रजांनी पकडून वर्षभर तुरुंगात डांबले होते, पण तुरुंगातही उमाजीने लिहिणे वाचणे शिकले व हा वेळ सत्कारणी लावला ,उमाजी सुटल्यानंतर त्याने इंग्रजांविरोधात परत कारवायासुरु केल्या, व आणखी वाढवल्या ,उमाजी हा देशासाठी लढत असल्याने देशवासीय उमाजीला सहकार्य करू लागले, इंग्रज त्यामुळे मेटाकुटिला आले,हळू हळू उमाजीने आपले प्रस्थ वाढवले, त्यामुळे उमाजीला परत पकडण्यासाठी कॅप्टन मॉकटोस या इंग्रज अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली त्याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास नेमुन उमाजीला पकडण्यासाठी आदेश दिला, परंतु यामध्ये मामलेदाराच्या इंग्रज सैन्याबरोबर उमाजीचे मावळे यांच्यात पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात लढाई झाली ,परंतु उमाजीचे मावळ्यांनी गनिमी काव्याने यामध्येमामलेदाराला पराभव दाखवला, उमाजीचा यावेळी जय झाला, तसेच उमाजीचा पाठलाग करणाऱ्या कॅप्टन बॉईड व त्यांच्या फलटणीला मांढरदेवी गडावरून उमाजीने व त्यांच्या मावळ्याने गोफणी चालून माघारी फिरवले होते ,असे अनेक इंग्रज अधिकाऱ्यांना व सैनिकांना उमाजीच्या सैनिकानी जेरीस आणले होते ,उमाजी ने 16 फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्ते विरोधात एक जाहीरनामा प्रसिद्ध करून इंग्रजांचा नाश करावा, इंग्रजी नोकरी सोडाव्या, देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन इंग्रजांचा विरोधात अराजकता माजवावी इंग्रजांचे खजिने लुटावे ,इंग्रजांना शेतसारा, कोणतीही पट्टी देऊ नये ,इंग्रजांची राजवट लवकरच नष्ट होणार असून त्यांना कोणीही मदत करू नये, केल्यास त्यास आमचे सरकार शासन करेन, असे उमाजीने जाहीरनाम्यात सांगून एक प्रकारे स्वराज्याचा पुरस्कारच केला होता व तेव्हापासून उमाजी हा जनतेचा राजा बनला, या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले, त्यांनी आता उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला ,मोठमोठे सावकार, वतनदार व उमाजीच्या सैन्यातील काही लोकांना अमिष दाखवत फितूर केले, या फितूरानी उमाजीला अमिषापोटी १५ डिसेंबर १८३१ रोजी इंग्रजांनी उमाजीला भोर तालुक्यातील उतरोली या गावी एका झोपडीत बेसावध अवस्थेत रात्री पकडले, उमाजी वर देशद्रोहाचा इंग्रजांनी खटला भरला, त्यांना पुण्याच्या मामलेदार कचेरीत एका बंद खोलीत ठेवले होते नरवीर उमाजीस इंग्रजांचे फिरते कोर्ट न्यायाधीश जेम्स टेलर यांनी गुन्हे सिद्ध करून फाशीची शिक्षा सुनावली व 3 फेब्रुवारी१८३२ ला पुण्याच्या खडक माळ आळी येथे मामलेदर काचेरी च्या कोठडीत वयाच्या 41 व्या वर्षी फासावर लटकवण्यात आले ,देशासाठी सर्वप्रथम लढणारा, इंग्रजांविरोधात प्रथम बंड करणारा उमाजी नाईक देशासाठी हुतात्मा झाला, स्वातंत्र्य चळवळीच्या माळेतील एक क्रांतीचा मणी निखळला गेला, अशा या उमाजीचे प्रेत इंग्रजांनी इतरांना दहशत बसावी म्हणून पुणे मामलेदार कचेरीच्या बाहेर एका पिंपळाच्या वृक्षाला तीन दिवस लटकावून ठेवले होते, मात्र नंतर धाडशी उमाजीच्या पत्नीने ते नेवून आपल्या जमिनीत मातृभूमीच्या उदरात घातले,तेथे समाधी आहे, उमाजी बरोबर इंग्रजांनी उमाजीचे साथीदार कुशाबा नाईक बाबू सोळकर यांना ही फाशी देण्यात आली होती म्हणून 3 फेब्रुवारी हा दिवस इतिहासाच्या दृष्टीने शौर्याचा असून सर्व समाज ,उमाजी प्रेमी ,देश वासीय या थोर हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करत आहे.

शंभुपत्नी, महाराणी येसुबाईंच्या नामकरणाचा वास्तव इतिहास नक्की वाचा..!

शंभुपत्नी, महाराणी येसुबाईंच्या नामकरणाचा वास्तव इतिहास नक्की वाचा..! 

 

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
प्राचीन काळासह शिवकाळातही पुरुषप्रधान संस्कृती म्हणजेच पुरूष सत्ता परंपरा असल्याने पूर्वीच्या काळी वंशावळी दर्शिवताना महिलांचा जास्त करुन उल्लेख आढळत नसला तरी, देखील महिलांना आदर- सन्मान दिला जात होता.त्यात अनेक रणरागिनी महिलांची यादी पहायला मिळते, त्याप्रमाणे स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत पिलाजीराजे शिर्के यांच्या जीवानातील एका घटनेवरुन एक ऐतिहासिक बाबीचा उलगडा होतो की, पिलाजीराजेंनी आपल्या कन्येचे नाव स्वताःच्या आईच्या नावाची म्हणजेच पिलाजीराजेंच्या मातोश्रींच्या "जिऊसाहेब शिर्के" यांच्या आठवणीच्या स्मरणार्थ आपल्या लेकिचे नामकरण “जिऊ” असे केले होते. म्हणूनच महाराणी येसुबाईंचे माहेर कडील नाव “जिऊबाई” असे परिचित झाले होते. परंतु जिऊंचा शंभुराजांशी विवाह झाल्यानंतर राजमाता जिजाऊ साहेब (अज्जस सासु ) यांचे जिऊबाई आशीर्वाद घेत असतानाच राजमाता जिजाऊंनी आपल्या नात सुनेचे नाव बदलत, शंभुराजांची पत्नी अर्थात नातसुनेचा लक्ष्मी रुपात स्वराज्यरूपी घरात मंगलमय प्रवेश झाला या सकारात्मक दृष्टीने रयतेच्या स्वराज्याला आता कायम सुख शांती व यश लाभणार या श्रद्धेतुन जिऊचे "येसु" असे नामकरण केले होते. नाव बदलण्यामागे राजमाता जिजाऊंचा आणखी एक स्पष्ट उद्देशही होता तो म्हणजे स्वताःचे असलेले "जिजाऊ" हे नाव आणि नातसुनेचे असलेले "जिऊ" हे नाव या दोन नावातील असलेला सारखेपणा किंवा साधर्म्य ओळखत राजमातांनी वेळेचा विलंब न लावता लग्नानंतर लगेच नातसुनेचे यशवती या अर्थाने “येसूबाई” असे नामकरण केले होते, ही एक महत्वाची ऐतिहासिक बाब म्हणावी लागेल, असा रंजक इतिहास महाराणी येसूबाई यांच्या नामकरणाचा आहे..ही घटना शिव-शंभुभक्तांना, इतिहासप्रेमींना समजावी या उद्देशाने हा छोटासा लेख..
*शंभुपत्नी महाराणी येसुबाईंवर माहेरकडील शिर्के घराण्यातील वंशज म्हणून एक काव्य करावेसे वाटते.*
शिर्के घराण्याची लेक ती,
शोभे सुन भोसल्यांची..
पिलाजीराजेंची कन्या ती,
अर्धांगिनी शंभुराजांची..
गणोजीराजेंची बहिण ती,
सावली जणू सईबाईची..
नाव-लौकिक हो वाढवती,
धाडसी लेक स्वराज्याची..
शाहूमहाराजांची माता ती,
राजारामांच्या वात्सल्याची..
स्वराज्य राखिले एकहाती, 
छत्रपतींच्या हो विश्वासाची..
रयतेशीच हो जोडली नाती,
स्वप्ने साकारली जिजाऊंची..
होत्या सखी राज्ञी जयती,
प्रेरणा कायम शंभुभक्तांची.. 
लक्ष्मीकांत शिर्के लिहिती,
गाथा महाराणी येसुबाईची..
लेखक :- लक्ष्मीकांत गणपतराव शिर्के
( शिर्के घराणे वंशज )
मार्गदर्शक, शंभुसेना संघटना
मौजे पेडगाव,
किल्ले बहादुरगड (धर्मवीरगड)

स्वराज्यनिष्ठावंत श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के यांच्या घराण्याविषयक थोडक्यात महत्वाची माहिती

स्वराज्यनिष्ठावंत श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के यांच्या घराण्याविषयक थोडक्यात महत्वाची माहिती
                               |
                               |
                   #वाघोजी #राजेशिर्के 
                               |
#रामोजी उर्फ़ #गणोजी राजेशिर्के (एक अपत्य)
        #कान्होजी राजेशिर्के (पाच अपत्य- त्यातील एक पिलाजीराव)
    #पिलाजीराव राजशिर्केे (पाच अपत्य)
1)वाघोजीराव  2)संभाजीराव 3) देवजीराजे
4)गणोजीराव राजेशिर्के-5)जिऊबाई उर्फ येसुबाई (शिवरायांचे जावई)    (संभाजीराजांच्या पत्नी)
           ___________
1 फेब्रुवारी 1689 साली छत्रपती संभाजीराजांच्या अटकेनंतर विविध प्रकारे गमिनीकावे व ऐतिहासिक घडामोडी घडल्यानंतर शिर्के घराण्यांची आडनावे बदलली त्यानुसार राजेशिर्के + शिर्के + रिकामे + पडवळ + थिटे + शिवले + कुंभारकर + पापळ सह अन्य इतर ही असंख्य नवीन आडनावे बदलली गेली त्यानंतर कोकण , शिरकाण प्रदेश, संगमेश्वर, पेडगाव, बहादुरगड, श्रीगोंदा, तुळापुर, वढु बुद्रुक, सह इतर भागात आणि अखंड महाराष्ट्रसह इतर राज्यात देशात विदेशात शिर्के मंडळी विखुरली गेल्याने विविध भागात विस्तारली गेली आहेत..!
*वरील ऐतिहासिक आडनावांच्या अनेक घरांपैकी काही प्रमुख मोजकी प्रत्यक्षदर्शी शिर्के घराणी खालील प्रमाणे आढळतात.*
👉संपूर्ण कोकण, शिरकाण प्रदेश, संगमेश्वर, शृंगारपुर सह इतर भागात लाखो राजेशिर्के घराणे आताही आहेत/ पूर्वीही होती त्यातीलच राजधानी सातारा येथील माजी उपनगराध्यक्ष मा. सुहासजी राजेशिर्के, पुणे येथील अमितजी राजेशिर्के , मुंबईचे निशांतजी राजेशिर्के, सातारचे सुरेशजी शिर्के सह अन्य शिर्के मंडळी आहेत.
वाई जवळील पसरणीचे प्रसिद्ध उद्योगपती कै.'बी.जी.शिर्के' यांचे पूर्वी 'रिकामे' असे आड़नाव होते परंतु स्वतः बी.जी. शिर्के यांनी आपले आडनाव बदलून घेत पुन्हा शिर्के करुन घेतल्याने हे घराणेही वंशज आहेत त्यांची एक आठवण नेहमी स्मरणात राहील ती म्हणजे "शिवप्रताप दिना" निमित्त त्यांनी अनेक वेळा किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवरायांच्या मूर्तिवर स्व-मालकीच्या हेलीकॉप्टर मधून पुष्पवृष्टि केली होती.
छत्रपती संभाजीराजांना संगमेश्वर येथे कैद केल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका- श्रीगोंदा येथील मौजे पेड़गाव गावातील बहादुरगडावर (नविन नाव धर्मवीरगड ) आणले असता, रस्ताने छत्रपती शंभुराजांना वाचविण्यासाठी( शोधण्याकामी) मागावर असणारे राजेशिर्के मंडळी बहादुरगड परिसरात आले होते त्यांचेच वंशज म्हणजे शंभुसेना सामाजिक संघटनेचे प्रमुख मा. दिपकजी गणपतराव शिर्के व इतिहास अभ्यासक लक्ष्मीकांत गणपतराव शिर्के सह त्यांचे खुप मोठे शिर्के घराणे आजही बहादुरगड तटबंदी लगत राहत असल्याने हे शिर्के घराणे शंभुराजांना वाचविण्यासाठी बहादुरगडाच्या (धर्मवीरगड) तटबंदी पर्यंत आले होते हा भक्कम पुरावा असून त्यातील काही शिर्के थेट गडामध्ये प्रवेश करत असताना पाखल्याच्या वेशांतरात प्रवेशद्वारातच पकडले गेल्याने त्यांच्या कत्तलीही झाल्याची इतिहासात नोंद आहे. तसेच काही शिर्के मंडळी गुप्तपणे संभाजीराजांपर्यंत गडावर पोहचत, महाराणी येसुबाईंनी दिलेली महत्त्वाची माहिती देत, शंभुराजांनीही काही गुप्तहेरा मार्फत निरोप- बातमी व लिखित महत्वाचे खलीदे दिल्याची इतिहासात नोंद आढळते.त्याच शिर्के घराण्याचे वंशज आजही बहादुरगड परिसरात जीवन जगताना दिसत आहे.
सातारा, कोल्हापुर, तंजावर येथील राजगादीचे वंशज छत्रपती भोसले घराण्याचे अनेक नातेवाईक व सगे-सोयरे मंडळी हे आजही शिर्के घराण्यातील आहेत.
   ज्या शिर्के मंडळींचे आडनाव 'थिटे' असे पडले त्यापैकी एक प्रमुख वंशज घराणे म्हणजे माजी खासदार, माजी मंत्री.कै. बापूसाहेब थिटे यांचे होय.
    वाई जवळील पसरणीचे भूमिपत्र व प्रसिद्ध वृत्तपत्र "पवनेच्या प्रवाह" चे  संपादक व इतिहास अभ्यासक, लेखक मा.शिवाजीराव अमृतराव शिर्के, पैठण येथील रामकृष्ण मच्छिंद्र शिर्के, नागपुर सह अनेक जिल्ह्यातही शिर्के घराणी 1869 नंतरच विस्तारली आहेत.
  अ.नगर जिल्हा, श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बहादुरगडापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर संपूर्ण गावच शिर्के घराण्याची वसलेली दिसत आहेत ( 1689 च्या काळातील शिर्के सैनिकांच्या छावण्या होत्या.)
कोकणातील संगमेश्वर ते पेडगांवचा किल्ले बहादुरगड या मार्गावरील अनेक गावात ठिकठिकाणी शिर्के घराणी रहीवाशी झालेले आढळतात. ( शंभुराजांबाबत गुप्त माहिती वेगात मिळविण्याकामी ही मंडळी त्यामार्गात आलेली होती अनं तशीच कायमची स्थायिक झाली. )
  ज्या शिर्के मंडळींचे आडनाव 'पडवळ' असे पडले आहे त्यातील अनेक शिर्के लोक पानशेत धरणा लगत मौजे शिरकोली, तालुका- वेल्हे, जिल्हा पुणे येथेही राहतात त्यातील एक घर 'शिरकाई देवीच्या मंदिरात पुजारी' म्हणून काम पाहतात तर काही पडवळ शिरकाई देवी ट्रस्ट मधे पदाधिकारी म्हणुन कार्यरत आहेत.
  डेरवण येथील शिवसृष्टी चे व्यवस्थापक आबासाहेब शिर्के सह इतर अन्य मराठा संघटनेचे मंडळी ही शिर्केचे वंशज आहेत.
ज्या शिर्के मंडळींचे आडनाव कुंभारकर असे पडले ते लोक तालुका- पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, सासवड, वनपुरी या भागात राहत असून त्यांचे अडनाव जातीवाचक असले तरी त्यांची ज़ात मराठाच आहे हे विशेष होय, त्यापैकी अनेक कुंभारकर मंडळींनी आपले आडनाव बदलून पूर्ववत शिर्के केली आहेत तर काही मंडळी आजही कुंभारकर आडनाव आभिमानाने लावत आहेत त्यापैकीच एक नाव वनपुरीचे राहुल कुंभारकर सह इतरही अन्य भरपूर घरे आहेत ती मंडळीही अडनाव बदलण्याच्या तयारीत आहेत.
  तसेच तुळापूर, वढु बुद्रुक येथील अनेक शिर्के मंडळींचे आडनाव 'वेचले' आणि 'शिवले' अशी झाली असून हा इतिहास अनेक लोकानां माहित आहे याचेही पुरावे प्रत्यक्ष पाहायला मिळतात.
   1689 च्या घटनेनंतर कोकणातील समस्त शिर्के घराणे वैयक्तिक कामानिमित्त,जीवन जगण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रासह, बाहेरील राज्यात- बडोदे व देश-विदेशात स्थलांतरित झालेले दिसतात.
  तसेच 2 फेब्रुवारी 1689 पूर्वी शिर्के आडनाव हे फक्त मराठा घराण्यातच असताना 1689 नंतर मात्र शिर्के हे आडनाव अनेक जातीत आढळले जाते त्या घराण्यांचा ही तर्कशास्त्रानुसार आभ्यास करावा लागेल. ( त्याप्रसंगी अनेक शिर्के लोकांनी गामिनी कावा करत थेट जातीवर्णीय व्यावसायिक वेशांतर करुन मोघलांच्या छावणीत नाभिक, गुरव, पुजारी, पालखीचे भोई, पखाल्या, कुंभार,आदि अनेक वेशांतरे घेतली असावीत. ( ऐतिहासिक तर्कशास्त्रनुसार )

छत्रपती संभाजीमहाराजांच्या सुटकेसाठी शिर्के घराण्याचा शेवटपर्यंत अलौकिक धाडसी प्रयत्न

छत्रपती संभाजीमहाराजांच्या सुटकेसाठी शिर्के घराण्याचा शेवटपर्यंत अलौकिक धाडसी प्रयत्न 

 

ऐतिहासिक शिर्के घराण्यांचा आडनाव बदलाचा वास्तव इतिहास
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
👉स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के व छत्रपती संभाजी महाराज यांच्या गोड, प्रेमळ व कणखर नात्यातील कलंकित दोषाचे निवारण झाले असून त्यासंदर्भात आणखी बरीच काही वस्तुस्थिती सह, परिस्थितिजन्य म्हणजेच प्रत्यक्षदर्शी जिवंत पुराव्यानुसार महत्वाची पूरक माहिती शेकडो वर्षापुर्वीपासून उपलब्ध असताना काही समाजकंटक लेखकांनी ध.. चा.. मा..आणि पराचा.. कावळा.. करुन आवर्जून शिर्के घराण्यांचा कर्तुत्वान वास्तव इतिहास समाजासमोर न आणता बुद्धिभ्रष्ट लेखकांनी छत्रपतींच्या जवळच्या नातेवाईकांनाच आवर्जून कलंकित करण्याचा प्रयत्न केला होता परंतु खालील प्रत्यक्षदर्शी वास्तव माहितीमुळे संबंधितांचे  कपट- कल्पित मनसूबे पर्दाफाश झाले आहेत.
       कोकणातील संगमेश्वर येथे अचानक घनघोर युद्ध सुरु झाले  असताना त्याप्रसंगी छत्रपती संभाजीराजांसह अनेक राजेशिर्के मंडळी व सैन्यांनी तीव्र लढा दिला होता परंतु दुर्दैवाने त्यावेळी छत्रपती शंभुराजेंसह शिर्के लोकांना व विविध अड़नावांच्या लोकांना अटक झाल्यानंतर सर्वांनांच औरंगजेबाचा सरदार मुक़र्रबखान नेमके कुठे घेऊन जातो यांची खबर- बातमी म्हणजेच कानोसा मिळविण्याकामी कुलमुखत्यार महाराणी येसुबाईसाहेबांनी माहेरच्या जवळील मंडळींना म्हणजेच आपले सख्खे भाऊ गणोजीराव शिर्के इतर बंधूंसह पित्यास स्वराज्यनिष्ठावंत पिलाजीराव शिर्के यांना सांगितल्यानुसार, शंभुराजांना घेऊन गेलेल्या मार्गाचा-माग काढत जाऊन वेळप्रसंगी मोघलांच्या विरोधात तीव्र प्रतिकार करण्यास सांगितले होते अगदी त्याप्रमाणेच गणोजीराजेंसह त्यांचे इतर तिन्ही बंधु म्हणजेच पिलाजीराव यांचे शूरवीर मुले वाघोजीराव,
गणोजीराव, संभाजीराव, देवजीराजे ही चारही मुले व इतरही असंख्य राजेशिर्के मंडळी व इतर हजारो सैन्य घेऊन आपल्या जावयास/मेहुण्यास मदत करण्यास गेले असताना त्यावेळेच्या बिकट परिस्तिथिनुसार गणोजीराजे शिर्के यांनी प्राचीन गामिनी कावा वापरत मोघलांच्या छावणीत ठीक-ठिकाणी अनेकांना वेशांतर करुन तसेच थेट प्रवेश करत मोठे नियोजन केले होते परंतु त्यात विविधप्रकारे विघ्ने, अडचणी आल्या होत्या, त्यातील काही अडचणी व त्यातून काढलेले गामिनी कावा मार्ग खालील प्रमाणे सांगता येतील.
          संगमेश्वर ते पेडगाव येथील किल्ले बहादुरगड (धर्मवीरगड )
मार्गामध्ये काही राजेशिर्के मंडळी पकडली गेली असल्याने त्यांनी "गामिनी कावा" वापरत आपली आडनावे वेगळी- वेगळी सांगून आपल्या सुटका करुन घेतल्या होत्या म्हणुन त्यासर्व राजेशिर्के घराण्यांचे आजही रिकामे, पडवळ, कुंभारकर, पापळ सह अन्य विविध वेगवेगळी आडनावे पडलेली दिसत आहेत त्या मंडळीचे वंशज आजही गावो-गावी जिवंत आहेत तर काही राजेशिर्के मंडळीनी विविध जातीवर्णीय व्यावसायीकांचे वेशांतर करुन म्हणजेच कोण नाभिक बनून, कोण मंदिरात गुरव अथवा पुजारी होऊन, पालखीचे भोई बनून, काही पाणी देणारे पखाले होऊन, तर कोण कुंभाराचे साहित्य विकणारे बनून इतरही अन्य व्यावसायिकांचे वेशांतर करुन मोघलांच्या छावणीत प्रवेश केला होता. 
 तसेच फक्त कोकणातच दिसणारा शिर्के घराणा आजही कोकणातील शृंगारपूर पासून- संगमेश्वर- पेड़गावचा किल्ला बहादुरगड (धर्मवीरगड)- तुळापुर- वढु-बुद्रुक पर्यंतच्या मार्गावर तसेच किल्ले बहादुरगडाच्या तटबंधी लगत, बहादुरगड परिसरात तसेच  25-30 किलोमीटर अंतरावर म्हणजेच श्रीगोंदा तालुक्यात शिर्के घराण्यांच्या त्याकाळच्या छावण्या आढळतात, ( म्हणजे आजची शिर्के घराण्यांची संपूर्ण गावच अस्तित्वात आहेत. ) पेडगाव मध्येही बहादूरगडा नजीक आजदेखील काही स्थायिक शिर्के घराणे आढळतात आणि हे शिर्के घराणे मोगलांना न डगमागता शिर्के आडनाव कायम ठेऊन बहादुरगडावर नजर ठेऊन होते. त्याप्रसंगी काही शिर्के मंडळींना वेशांतर करुन गडामध्ये प्रवेश करत असताना अनेकांना बलिदानही द्यावे लागल होते. त्यांचे पूर्वज आजही या परिसरात प्रत्यक्ष जीवन जगताना दिसत आहेत तेव्हा पासून शिर्के घराणे अवघ्या महाराष्ट्रातभर विखुरलेले दिसत आहे.
         तर काही राजेशिर्के मंडळींना गामिनी कावा करत असताना पकडल्याने मोघलांनी त्यांचे हात पाय कलम करुन त्यांना अपंग करुन सोडून दिले होते म्हणजे "थिट" करुन सोडून दिले म्हणुन त्यांचे आजही "थिटे" असे अड़नाव पडले आहे.. तसेच तुळापुर येथे छत्रपती संभाजीराजांचा छळ करत शरीराचे तुकड़े करुन मारल्यानंतर...त्याप्रसंगी औरंगजेबासमोर प्रतिकार करणे शक्य झाले नसल्यामुळे हतबल झालेल्या लोकांनी आपल्या राजांचे अवयव गोळा केले होते म्हणून काहींचे "वेचले" असे आडनाव पडले तर काहींनी अवयव शिवून एकत्र जोडले म्हणुन त्यांचे "शिवले" असे आडनाव पडले.. म्हणूनच तुळापुर येथील शंभुराजांच्या "बलिदान स्थळ" परिसरात व वढु- बुद्रुक येथील शंभुराजांचे "समाधी स्थळ" परिसरात आजही आमची आडनावे पूर्वी "शिर्के" असे होते असे अभिमानाने सांगणारी असंख्य मंडळी आढळतात.

Saturday 22 February 2020

रामजी महादेव, तुबाजीपंत व आंग्रे

२२ फेब्रुवारी इ.स.१६८४
केग्विनने इंग्लडच्या राजाला पत्र केग्विनने २२ फेब्रुवारी १६८४ रोजी पुन्हा इंग्लडच्या राजाला पत्र पाठवून संभाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर ३०००० सैन्य मुंबईपासून तीन मैलांवर असणार्या पलतात ( Paltata पलते )
या बेटावर उतरवून ते बेट व्यापण्याचा प्रयत्न केल्याचे कळवले होते. केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स , राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गर्व्हनर केग्विनला पत्र पाठवून उभयंतामध्ये होणार्या तहाच्या अटींना संमती दर्शवली होती.
२२ फेब्रुवारी इ.स.१७३९
सन १९३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी धारावी मोहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी सन १७३९ मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले. पोर्तुगीजांनी पुन्हा गायमुखावर हल्ला केला तोही मराठ्यांनी परतवून लावला. दिनांक २७ फेब्रुवारी सन १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी शत्रूच्या आरमारावर गायमुख येधून हल्ला करण्यास हुकूम दिला. त्यानुसार
#जय_जिजाऊ..🚩
#जय_शिवराय..🚩
#जय_शंभुराजे..🚩
रामजी महादेव, तुबाजीपंत व आंग्रे यांनी मारा सुरू केला.

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...