मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Friday, 24 July 2020
राज्याभिषेक आणि परिणाम..
Saturday, 18 July 2020
## राज्याभिषेक ##
## राज्याभिषेक ##
postsaambhar :डॉ .उदयकुमार जगताप
महाराजांनी सिंहासन शाश्रोक्त प्रकारे तयार केले होते.
तो प्रकार असा.
प्रथम क्षीर, वट व औदुंबर
ह्या वृक्षाच्या लाकडाच्या वेदी करून
ती सुवर्णाच्या तगटानी मढवून रत्नखचित केली होती.
त्या तगटावर वृषभ ,मार्जार, तरस, सिंह ,व्याघ्र ,
यांची चित्रे अनुक्रमे एकावर एक अशी चोहो बाजूस कोरली होती.
याला सोन्याचे आठ स्तंभ असून त्या प्रत्येकावर एक एक सिंह सोन्याचा बसवला होता .
आणि त्यावर चित्र विचित्र वृक्ष, फले ,पुष्पे, वेली , पक्षी व कुर्मादी जलचर यांची चित्रे दाखवली होती.
त्याप्रमाणे नृत्यांगना तंतुवाद्ये हाती घेऊन नाचता आहेत.
अशी चित्रे कोरली होती.
आशा सशास्त्र सिद्ध केलेल्या सिहासनावर प्रथम मृगचर्म घालून त्यावर काही सुवर्ण द्रव्य घातले होते.
मग त्यावर व्याघ्र चर्म घालून त्यावर मृदू काप्रार आसन घातले होते.
व ते मखमालीने मढवले होते.
त्यावर लोडे, तक्के ठेवले होते.
त्यास बादलीजरी वस्त्राची अच्छादने घातली होती.
सिंहासनाच्या मागे प्रभावळ करून त्यास छत्र लावले होते.
हे छत्र जडावाचे असून त्याला मोत्यांच्या झालरी होत्या.
त्यावर मंडप असून त्यास सुवर्णमय वस्त्रांचा चादवा लाविला होता.
व त्यास मुक्ताफळाचे घोस अडकविले होते .
ही अशी सिंहासनाची व्यवस्था करून उत्तम लक्षणाचे गज ,अश्व चांगले सजवून
सुवर्णा अलंकारांनी सुशोभित करून सभामंडपासमोर उभे केले होते .
ह्या सगळ्यांस एकंदर तीन खडी बत्तीस शेर व बत्तीस मासे सोने लागले होते.
सिंहसनारोहण मुहूर्त समीप आला तेंव्हा श्रीविष्णूची सुवर्णमय प्रतिमा तयार केली
होती.
तिची षोडशापचारे पूजा करून
तिची स्वयं हस्तांच्या ठायी स्थापन केली.
व मुहूर्त घटिका भरताचं सर्व ब्रह्मवृंदास नमस्कार करून त्यांचा वेद मंत्रोकच्चाररपूर्वक आशीर्वाद घेतला.
आणि मातूश्रीस नमस्कार करून तिचा प्रेमपूर सर आशीर्वाद घेतला.
व ती विष्णुमूर्ती तशीच हातात धारण करून ते सिंहासनारूढ व्हावयास गेले.
महाराजांनी सिंहासनाच्या सव्य जानू टेकवून नमस्कार करून पाय न लावता पूर्वेकडे मुख करून आरोहण केले.
व सिंहासनाच्या अष्टस्तंभि अष्टप्रधान बद्धाजली उभे राहिले .
ते येणे प्रमाणे
पहिल्याने उजवे बाजूस धर्माध्यक्ष पंडितराव
डावे बाजूस प्रधान (पेशवे) त्याचे मागे उजवे बाजूस सेनापती (सरनोबत)
डावे बाजूस अमात्य (मुजुमदार)
त्याच्या मागे उजव्या बाजूस सुमंत (डबीर)
डावे बाजूस सचिव(सुरनीस) त्याच्या मागे उजवे बाजूस मंत्री (वाकनिस)
डावे बाजूस न्यायाधीश
युवराज संभाजी
महोपाध्याय गागाभट्ट, मुख्य प्रधान मोरो त्र्यम्बक पिंगळे हे सिंहासनाच्या सानिध्य उच्चसनावर बसले .
आणि इतर दरबारातील लोक आमंत्रित महाजन आपापल्या दर्जाप्रमाणे आपल्या नेमलेल्या जागी उभे राहिले.
सिंहासन रोहण झाल्यावर नौबती ,चौघडे वगैरे मंगल वाद्यांचा एकाच गजर होऊन राहिला.
नृत्यागायनादी सुरू झाली.
सर्वांनी एकच जयघोष केला.
त्या नादाने चारही दिशा दणाणून गेल्या.
एकंदर ब्राम्हवृंदाने आशीर्वादवाचनाचा दीर्घ स्वराने उच्चार केला.
महोपाध्याय गागाभट्ट पुढे सरसावून सोन्या मोत्यांच्या झालरी लावलेले
छत्र स्वहस्ते उचलून महाराजांच्या मस्तकावर धरून दीर्घ स्वराने म्हणाला.
" शिवछत्रपती सदा विजयी होवो "
तोफांची सरबत्ती सुरू झाली.
स्वराज्यातील प्रत्येक किल्ल्यास अशी सूचना होती, की एका किल्ल्यावरच्या
तोफा दुसऱ्या किल्ल्यावर ऐकू जाताच तेथे त्या सुरू कराव्यात .
या प्रमाणे राज्यातीस एकंदर किल्ल्यावर तोफांची सरबत्ती सुरू झाली.
सिंहासनावर रूढ झाल्यावर महाराजांनी पूर्वीचा शुभ्र पेहराव उतरवून लाल वस्त्रे परिधान केली.
चौकडे ,कठ्या, माळा, शिरपेच, तुरा, झगा, पोच्या असे अलंकार परिधान केले.
धनुष्यबाण ,तलवार यांचे पूजन मंत्रविधीपूर्वक करून ती शस्त्रे हातात घेतली.
त्या समई त्याजवर लोकांनी सोन्यारुप्याच्या पुष्पांची वृष्टी केली .
ब्राम्हणांच्या सोळा सुवासिनीनी त्याला आरत्या केल्या.
त्यास वस्त्रे विभूषणे दिली.
ऋषी ,आचार्य ,ब्राम्हण यांची पूजा करून त्यांना मुबलक दक्षिणा दिल्या .
गागाभट्ट यास एक लक्ष रुपये दक्षिणाव व वस्त्रालंकार यांनी गौरवले .
महाराजांची सुवर्णतुला केली.
सप्त धातू तोलले,तलम ताग, रेशीम, कर्पूर, लवण, जायफळ वगैरे मसाले,धृत
शर्करा ,नाना प्रकारची फळे ,तांबूल ,इतरखाद्य पदार्थ निरनिराळे तोलले.
आणि ह्या सगळ्या वस्तू ब्राम्हणास वाटून दिल्या.
सर्व अधिकाऱ्यांना वस्त्रे देऊन
त्यांच्या नजर मुजरे घेऊन
महाराज चांगला सुलक्षण असलेला घोडा
सोन्याचे जडावाचे समान घालून सज्ज करून आणला होता.
त्यावर बसून राजगणात आले.
व येथे सोन्याची अंबारी, मोत्याचे अलंकार, जरीबाब गाशे व झालर अशी सुशोभित करूनएक हत्ती उभा केला होता.
त्यावर आरूढ झाले.
ह्या हत्तीच्या मस्तकी सेनापती एक हातात मोरचेल व एका हातात अंकुश घेऊन बसला .
पाठीमागे खवासीत मुख्य प्रधान मोरचेल घेऊन बसला.
वरकड प्रधान मुतालिक दुसऱ्या हत्तीवर बसले
आणि स्वारी देवदर्शनास निघाली . सर्व रस्ते झाडून साफ केलेले.
जागोजागी सडा रांगोळी घातल्या होत्या.
घरे रंगवून सुशोभीत केली होती.
जिकडे तिकडे ध्वज पताका तोरणे बांधली होती.
नगर देवतांची पूजा व नैवेद्य अर्पण केले.
रस्त्यात सुवासिनींनी आरत्या पुष्यवृष्टी केली .
माड्यांवरून दही, लाह्या पुष्पे दुर्वा यांची वृष्टी केली.
राजद्वारी आल्यावर महाराज रथात बसून राजगणात गेले.
तेथून ते शिबिकेत बसून सभाद्वारीं आले.
तेथे त्यांच्यावरून भरलेला कलश व निबलोण ही उतरून टाकले .
असे करणाऱ्यास वस्त्रालंकार दिले.
वाड्यात आल्यावर त्यांनी कुलदेवतेचे दर्शन घेतले.
मातेस नमस्कार केला.
राण्यांनी ओवाळले .
माघारी येऊन पुन्हा सिहासनावर बसले .
सर्वांच्या नजरा व मुजरे घेऊन सर्वाना पान, गुलाब अत्तर वगैरे देऊन निरोप दिला.
या समारंभास लागलेल्या एकूण खर्चाचा अंदाजे एकंदर एक कोटी बेचाळीस लक्ष होन इतका होता .
महाराजांनी "क्षत्रिय कुलावतंस श्री राजाशिवछत्रपती "
असा किताब धारण केला.
कागदोपत्री आपल्या राज्याभिषेकपासून नवा शक लावू लागले .
राज्याभिषेक शके 1596जेष्ठ शुद्ध त्रयोदशीस झाला .
तारीख 6 जून 1674. सभासद म्हणतो ,"
या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह ,
मऱ्हाटा पादशाह एव्हडा छत्रपती झाला,
ही गोष्ट काही सामान्य झाली नाही."
Sunday, 12 July 2020
शिवराज्याभिषेक सोहळा---------------10
शिवराज्याभिषेक सोहळा---------------9
▶रिटिश वकील हेन्री ओक्सेंडन याने त्यावेळी केलेले वर्णन सुद्धा तितकेच रोचक आहे.
हेन्री लिहतो-
“मी ६ जूनला सकाळी ७-८ वाजता दरबारात गेलो.
राजा एका भव्य सिंहासनावर बसला होता. उत्तमोत्तम वस्त्रालंकार परिधान केलेले सरदार त्याच्यासमोर उभे होते. राजाचा मुलगा संभाजीराजा, पेशवा मोरोपंडित अन मोठा प्रतिष्ठित असा ब्राह्मण सिंहासनाच्या पायथ्याशी बैठकीवर बसले होते. इतर मंडळी अन सैन्याधिकारी मोठ्या आदराने उभे होते. मी काही अंतरावरून मुजरा केला. शिवाजी राजाला देण्यासाठी आम्ही हिऱ्याची अंगठी आणलेली. ती नारायण शेणवी याने वर धरली.
सिंहासनाच्या दोन्ही बाजूला, सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकार-निदर्शक व राजसत्तेची द्योतक चिन्हे मी पाहिली. उजव्या हाताला दोन मोठी, मोठ्या दाताच्या मत्स्याची सुवर्णाची शिरे होती.डाव्या हातास अनेक अश्वपुच्छे व एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर, समपातळीत लोम्बणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती.
राजवाड्याच्या प्रवेशद्वारी आम्ही परत आलो, तो दोन लहान हत्ती दरवाजाच्या दोन्ही बाजूला झुलत होते.दोन देखणे(पांढरे) अश्व शृंगारलेल्या स्थितीत तेथे आणलेले दिसले.
गडाचा मार्ग इतका बिकट की हे प्राणी वर कोठून आणले असावेत याचा तर्कच आम्हास करवेना.”
शिवराज्याभिषेक सोहळा---------------8
शिवराज्याभिषेक सोहळा---------------7
शिवराज्याभिषेक सोहळा---------------6
शिवराज्याभिषेक सोहळा---------------5
शिवराज्याभिषेक सोहळा---------------4
शिवराज्याभिषेक सोहळा---------------3

शिवराज्याभिषेक सोहळा---------------2
▶राज्यभिषेक सोहळा कशासाठी??
खर तर शिवरायांनी १६७४ पर्यंत शत्रूंचे अनेक प्रदेश जिंकून घेतले होते. प्रजेसाठी त्यांचा अंमल होता. शत्रूवर वचक होती, सर्वजण सुखात नांदत होते, कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे पाळली जात होती, मग राज्यभिषेक करवून घेण्याची जरूर ती काय असावी??
आजवर स्वतःसाठी कोणतीच वैयक्तिक गोष्ट न करणाऱ्या माणसाला या राज्यभिषेकाची गरज ती का वाटली असावी?? ज्या माणसाने ना स्वतःसाठी कधी राजवाडा बांधला, ना कधी कोणती वास्तू उभी केली. मग राज्यभिषेक का??
ती एका व्यक्तीची महत्वकांक्षा होती का?? ती चंगळबाजी होती का?? तो पैशांची उधळपट्टी होती का??
तर नाही.
शिवरायांनी १६७४ पर्यंत स्वराज्याचा विस्तार खूप वाढवला होता तरीही तोपर्यंत शिवराय हे तांत्रिक दृष्ट्या मोगली मनसबदार होते. मोगलांची चाकरी बजावणारे मातब्बर मराठा सरदार तसेच विजापुरी बादशहा मोगलांना आदिलशहापेक्षा कमी लेखत. शिवरायांनी आपल्या कर्तबगारीने मनगटाच्या बळावर आपले जे स्थान निर्माण केले होते त्याला एक कायदेशीर स्वरूप देणे गरजेचे होते. राजेशाही स्थापन करण्याची जरूर होती. शिवरायांचा राज्यभिषेक झाला पाहिजे अशी सुप्त इच्छा प्रजेच्या सर्व वर्गात पसरली होती.
राज्यभिषेक एक कर्तव्य होतं. ती एक सार्वभौमत्वाची महापूजा होती. त्या सोहळ्याचा परिणाम वर्तमानातील अन भविष्यातील अनेक पिढ्यांवर होणार होता.
तो कोण्या एका व्यक्तीचा स्तुतीसोहळा नव्हता, ते होते सार्वभौमत्वाचे सामूहिक गौरवगाण.
या अगोदर असलेल्या सर्व हिंदू राज्यांच्या राजधान्यांवर स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारी एक फुंकर या सोहळ्याने पडणार होती.
सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरी नदीच्या पैलतीरापावेतो म्हणजेच असेतु हिमाचल हा संपूर्ण देश स्वतंत्र, सार्वभौम अन बलशाली व्हावा हेच महाराजांनी बोलून दाखवले होते.
या सार्वजनिक भावनांना वाट करून देण्याचे काम थोर ब्राह्मण पंडित, वाराणशीचे विश्वेश्वर, वेदोनारायण गागाभट्ट यांनी केले.
शिवराज्याभिषेक सोहळा---------------1
६ जून १६७४ रोजी झालेला तो शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे अखिल हिंदुस्थानच्या इतिहासातील सगळ्यात मोठा सोहळा.
★ राज्याभिषेक म्हणजे काय??? ★
राज्याभिषेक म्हणजे काय तर आपल्या रयतेला दिलेला ठाम विश्वास म्हणजे राज्याभिषेक.
‘आपला एक त्राता आहे, आपला एक रक्षणकर्ता आहे, आपलं एक तख्त आहे‘ याची गोरगरीब रयतेला चिरंजीव हमी देणारा तो सुवर्णक्षण म्हणजे राज्यभिषेक.
इतिहासातील एक अजरामर असा दिवस.
परकीय सत्तांचे वरवंटे महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानच्या छाताडावर थयथया नाचत असताना सतराव्या शतकात शिवनेरीवर जन्मलेला तो एक निखारा पुढील काही वर्षात विक्राळ रूप धारण करत जणू त्या परकीय यवनी सत्तांना त्याच्या अविरत तेजाने भस्मसात करतो अन कित्येक वर्षांचे असलेले गुलामगिरीचे जोखड भिरकावून देत अखिल मराठी मातीला जणू स्वाभिमानाचे, सार्वभौमत्व असलेले हक्काचे बत्तीस मण सुवर्ण सिंहासन उभे करत गोरगरीब रयतेला हक्काचे असे तख्त निर्माण करतो.
खरे तर ही घटना म्हणजे अवर्णनीय, अतुलनीय अशीच असावी.
ह्या घटनेची तुलना इतिहासातील किंवा वर्तनामनातील कोणत्याच घटनेशी होऊ शकत नाही ऐसी घटना होती ती.
शिवरायांच्या त्या राज्याभिषेकाच्या लक्षणीय घटनेमुळे परकीय सत्तेच्या दावणीला बांधली गेलेली ती मराठी अस्मिता जणू एकप्रकारे शहारली, थरारली, चवताळून उठली अन मावळ्यांमध्ये जागवल्या गेलेल्या याच अस्मितेच्या बळावर रायगडावर बत्तीस मणाचे सुवर्ण सिंहासन सिद्ध झाले. या या पृथ्वीवरून संपूर्ण म्लेंच्छांचा पाडाव करत अखिल हिंदूंसाठी त्यांच्या हक्काचे सार्वभौम सिंहासन उभे केले.
तस बघायला गेलं तर सतराव्या शतकात मोगल साम्राज्य म्हणजेच भारत सरकार असे समीकरण होते. अन तेच हिंदुस्थानी अन परकीय पण मान्य करत. यादवांच्या देवगिरीच्या साम्राज्यानंतर अखिल हिंदुस्थानात हिंदूंचे हक्काचे असे सिंहासन नव्हतेच. काबुल ते कंदहार पर्यंत पसरलेल्या बलाढ्य साम्राज्याचा सर्वेसर्वा तो कपटी औरंगजेब स्वतःला हिंदुस्थानचा बादशाह म्हणवून घेत असे. भारताच्या कानाकोपऱ्यात म्हणजे दक्षिणेतील केरळ अन युरोपियन लोकांच्या किनाऱ्यावर असलेल्या वसाहती सोडता अखिल हिंदुस्थानात स्वातंत्र्य म्हणता येईल असे एकही राज्य नव्हते.
काही राजपूत राज्ये व गोवळकोंडा अन विजापूर ही स्वतंत्र राज्ये होती पण ती मुघलांचीच मांडलिक म्हणून होती अन यवन होती.
राजपूत राज्ये खालावत चालली होती. जणू तेही मुघलांचे मांडलिकच होते. ना कोणता निर्णय घेण्याची मुभा ना स्वतः काही करण्याचं स्वातंत्र्य.
तसेच हिंदुस्थानातील अनेक हिंदू सरदार, उत्तरेतील राजपूत वगैरे त्यांचीच चाकरी करत त्यांच्याशी रोटी-बेटीचे व्यवहार करत सत्तेची तहान भागवण्यात मशगुल होते.
“पुरे हिंदोस्तान के आलमगिर होना चाहते है हम” अशी त्या औरंगजेबची इच्छा असताना त्याच्याच छाताडावर पाय रोवत महाराजांनी रायगडी बत्तीस मण सोनेरी सिंहासन साकारत त्याच्या कपटी महत्त्वकांक्षेला जबरदस्त हादरे दिले अन गोरगरीब रयतेचे पालनहार म्हणून शिवाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज झाले.
मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!
मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...
.jpg)
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
महत्वकांक्षी महाराणी बाकाबाई ( डोंगरक्वीन ) श्रीमंत महाराणी बाकाबाई भोसले (१७७४-१८५८) या दुसरे राजे रघुजी भोसले यांच्या चौथ्या आणि आवडत्या...