विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 31 January 2021

#सरदार_शितोळे_वाडा- कसबा पेठ, पुणे भाग-२

 








#सरदार_शितोळे_वाडा-

कसबा पेठ, पुणे
भाग-२
पोस्टसांभार : Vikas Chaudhari|
ऐतिहासिक वाडे व गढी |
नरसिंगराव-शितोळे घराण्याचे संस्थापक आबाजीराव शितोळे हे विजापूरच्या अदिलशहाच्या पदरी होते. त्यांना इ. स. १६०५ मध्ये देशमुखीचे हक्क परत मिळाले. उत्तम सेवाचाकरी करून मालोजीराव शितोळ्यांनी शाहूमहाराजांची मर्जी संपादन केली. त्यांना इ. स. १७१८ मध्ये देशमुखीच्या उत्पन्नातील तिजाईचा हक्क प्राप्त झाला. त्याच मालोजीरावांनी पेशव्यांच्या काळात लढाईमध्ये उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना दख्खनमध्ये बरीच वतने मिळाली. त्याच घराण्यातील सिद्धोजीराव बीन खंडोजीराव यांनीही मर्दुमकी गाजवली. महादजी शिंदे आणि त्यांच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण झाले. महादजींनी उत्तरेत गाजविलेल्या शौर्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडे सिद्धोजीरावांच्या सेवेची मागणी केली, त्यांना आपल्या पदरी ठेवण्याची विनंती केली. अशा त-हेने या दोन्ही कुटुबांचे ग्वाल्हेरमध्ये वास्तव्य झाले. उत्तरेकडील यशानंतर महादजी दक्षिणेत परत आले. श्रीमंत पेशव्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपली मुलगी बाळाबाई हिचा विवाह सिद्धोजीरावांचा मुलगा लाडोजीराव याच्याशी मुक्रर केला. हे लग्न पुण्यातच झाले. दोन्ही घराण्यातील मित्रत्वाचे नाते आणखी दृढ झाले. या लग्नामध्ये कन्यादान म्हणून महादजींनी उज्जयिनी आणि ग्वाल्हेरमधील काही गावे लाडोजीरावांना आंदण दिली;तसेच त्यांना प्रथम दर्जाची सरादारकी व वार्षिक दीडलाख रूपये तनखा देण्यात आला.
लग्नसमारंभानंतर महादजी शिंदे सिद्धोजीराव लाडोजीरावांसह दिल्लीवर स्वारी करण्यास गेले. स्वारी यशस्वी झाली; पण सिद्धोजीराव कामी आले. या घराण्याच्या कुटुंबप्रमुखाला नरसिंगराव हा किताब देण्याची प्रथा होती. सिद्धोजीराव मृत्यूनंतर महादजींनी बादशहा शहाअलमकडे लाडोजीरावांची शिफारस केली. शहाअलमने इ. स. १७८३ मध्ये देशमुखीचे उत्पन्न कायम उपभोगावे असा लेखी आदेश दिला. बादशहाची मर्जी लाडोजीरावांनी आपल्या पराक्रमाने संपादन केली. इ. स. १७८५ मध्ये बादशहाने लाडोजीरावांना सनद देऊन बालेघाट परगणे जाफराबाद बिरारसह परगण्याची सनद दिली. गुलाम कादर आणि इस्माइल बेग यांनी बादशहाची सत्ता उलथविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महादजींनी लाडोजीरावाला सोनपत जिल्ह्यातील १०६ गावांची जहागिरी पानपतसह दिली. त्याची सनद दिली. या सनदी ज्या कागदावर लिहिल्या, तो कागदसोन्याचा वर्ख लावलेला असून,त्यावरील मजकूर पर्शिअन भाषेत लिहिलेला आहे.
लाडोजीरावांना पाच गावे इनाम दिली. इ.स. १७९३ मध्ये लाडोजीराव मृत्यूमुखी पडले. सिद्धोजीराव व लक्ष्मणराव ही त्यांची दोन मुले. सिद्धोजीरावाने सत्ताग्रहण केल्यावर ते दिल्लीच्या बादशहाच्या भेटीस गेले असता, बादशहाने त्यांना 'उमादत्त उल मुल्क राज राजेंद्र सिद्धोजीराव सितोळे राजा देशमुख बहादूर रूस्तूम जंग' हा किताब आणि 'मनसब सहा हजारी आणि पंच हजारी सवार' असा किताब त्यांचे सहा हजार पायदळ, पाच हजार घोडदळ यासह दिला. याचवेळी त्यांना पोंशाख, जरीपटका, साहेब नौबत, पालखी, सोन्याची चवरी, चवरी मोरपंखी, सिक्का व कट्यार इत्यादी गोष्टी देण्यात आल्या. दुसर्या फर्मानामध्ये त्यांच्या पूर्वजांनी मिळविलेल्या सोनपत आणि पानपत जिल्ह्यातील शंभर गावांची जहागीर पुढे चालू ठेवण्यात आली. या घराण्यातील महादजी शितोळे यांनी राक्षसभुवनच्या लढाईत निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर याला मारले. या अतुल पराक्रमाने खूष होऊन श्रीमंत पेशवे यांनी महादजी शितोळे यांना मांजरी गाव व सरदारकी बहाल केली. सिद्धोजीरावांनी खर्डे येथे निजाम व पेशवे यांच्यात झालेल्या लढाईत भाग घेऊन बरेच शौर्य गाजविले.
#माहिती -सौ.मंदा खांडगे

#सरदार_शितोळे_वाडा- (कसबा पेठ, पुणे) भाग-१

 


#सरदार_शितोळे_वाडा-

(कसबा पेठ, पुणे)
भाग-१
पोस्टसांभार :: Vikas Chaudhari|

ऐतिहासिक वाडे व गढी |

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आधीपासून शितोळे घराणे प्रसिध्द होते. पुणे परगण्याची देशमुखी शितोळ्यांकडे होती. शितोळ्यांचा भव्य वाडा कसब्यात होता. कसबा गणपतीकडून सरळ तांबट आळीकडे जाताना उजव्या हाताला जवळच धडफळ्यांची घरे होती. हे धडफळे पाषाणचे पाटील होते. धर्माधिकारी हे उपाध्याय होते. त्यांचा वाडाही जवळच होता. निरगुडकर हे शितोळ्यांचे कारभारी होते. जवळपासच्या बऱ्याचश्या जमिनी ह्या शितोळे-देशमुखांच्या होत्या. मुख्यतः परगण्याखालील शेतीची सर्व जमीन लागवडीला आणणे, परगणा संपन्न राखणे हे काम देशमुख-देशपांड्यांचे. देशमुख म्हणजे मांडलिक राजाच. राज्य चालवण्यास राजाला जो पैसा व धान्यादी सामग्री पाहिजे, ती देशमुख- देशपांडे वतनदारांकरवी मिळायची. राजकीय मानापेक्षा समाजातील देशमुखीचा मिळणारा मान श्रेष्ठ होता. देशमुखांच्या सल्ल्याने मुजुमदार व सुभेदार यांची निश्चिती होत असे. मोकासदाराप्रमाणे देशमुखांच्या पदरी फौज पायदळ असे. जवळजवळ बाराशे वर्षांपेक्षाही अधिक काळ शितोळ्यांकडे पुण्याची देशमुखी होती.
श्रीमंत बाजीरावांनी शनिवारवाड्यासाठी नदीकाठी जी जागा निवडली ती जागा तसेच काळ्या वावरापर्यंतची जागा शितोळे-देशमुखांची होती. ही सर्व जागा श्रीमंत पेशवे यांनी वस्ती करण्यासाठी घेतली. त्याबद्दल बाणेर व पुनवळ ही गावे शितोळ्यांना बहाल करण्यात आली.
शितोळे शिसोदिया रजपुतांचे वंशज असून, त्यांचे काही पूर्वज दख्खनमध्ये आल्यावर शितोळे म्हणून ओळखले जाऊ लागले. सरदार शितोळे यांना मिळालेल्या सनदा व इतर कागदपत्रांवरून या घराण्याने बाराशे वर्षांपेक्षाही जास्त काळ देशमुखी उपभोगली, असे दिसते. तीनशे वर्षापूर्वी या कुटुंबाचे तीन शाखांमध्ये विभाजन झाले. सातभाई-शितोळे, नाईक -शितोळे आणि नरसिंगराव-शितोळे नरसिंगराव-शितोळे घराण्याचे संस्थापक आबाजीराव शितोळे, हे विजापूरच्या अदिलशहाच्या पदरी होते. त्यांना इ. स. १६०५ मध्ये देशमुखीचे हक्क परत मिळाले. उत्तम सेवाचाकरी करून मालोजीराव शितोळ्यांनी शाहूमहाराजांची मर्जी संपादन केली. त्यांना इ. स. १७१८ मध्ये देशमुखीच्या उत्पन्नातील तिजाईचा हक्क प्राप्त झाला. त्याच मालोजीरावांनी पेशव्यांच्या काळात लढाईमध्ये उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना दख्खनमध्ये बरीच वतने मिळाली. त्याच घराण्यातील सिद्धोजीरावबीन खंडोजीराव यांनीही मर्दुमकी गाजवली. महादजी शिंदे आणि त्यांच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण झाले. महादजींनी उत्तरेत गाजविलेल्या शौर्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडे सिद्धोजीरावांच्या सेवेची मागणी केली, त्यांना आपल्या पदरी ठेवण्याची विनंती केली. अशा प्रकारे या दोन्ही कुटुबांचे ग्वाल्हेरमध्ये वास्तव्य झाले. उत्तरेकडील यशानंतर महादजी दक्षिणेत परत आले. श्रीमंत पेशव्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपली मुलगी बाळाबाई हिचा विवाह सिद्धोजीरावाचा मुलगा लाडोजीराव याच्याशी मुक्रर केला. हे लग्न पुण्यातच झाले. दोन्ही घराण्यातील मित्रत्वाचे नाते आणखी दृढ झाले. या लग्नामध्ये कन्यादान म्हणून महादजींनी उज्जयिनी आणि ग्वाल्हेरमधील काही गावे लाडोजीरावांना आंदण दिली;तसेच त्यांना प्रथम दर्जाची सरादारकी व वार्षिक दीडलाख रूपये तनखा देण्यात आला. (डाॕ.मंदा खांडगे)
#वैभव_पेशवेकालीन_वाड्यांचे-
#सरदार_शितोळे_वाडा-

अदालत राजवाडा

 अदालत राजवाडा

पोस्टसांभार :: Nilesh Zore|
ऐतिहासिक वाडे व गढी |
नुसते नाव जरी ऐकले की आठवतात छत्रपती थोरले शाहू महाराज , आठवतात याच वाड्यात बसून न्यायदान करणारे थोरले छत्रपती प्रतापसिंह महाराज, आठवतात त्या, करारीपणे वावरणाऱ्या पण तिक्याच प्रेमळपणे जनतेला राजवाड्याची द्वारे खुल्या करणाऱ्या रयतेला पुत्रवत प्रेम करणाऱ्या राजमाता छत्रपती सुमित्राराजे भोसले.
छत्रपती थोरले शाहू महाराजांनी जेव्हा किल्ले अजिंक्यतारा राजधानी म्हणून कमीपडू लागल्या नंतर राजधानी शाहूनगर (सातारा शहर) वसवले तेव्हा प्रथम काही वास्तू बांधल्या. सन १७२०/२१ मधील काही पत्रांमध्ये तसे उल्लेख आढळतात. शाहूनगर अर्थात सातारा शहर हे सुनियोजित शहर. शहर वसवताना किल्ले अजिंक्यतारा च्या माचीवर अर्थात अर्ध्या डोंगरावर बालेकिल्ल्या बांधला. मी बालेकिल्ला या साठी म्हणतोय कारण आपण जर अध्यास केला आणि नीट निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की नगरपालिका भागा पासून ते समर्थ मंदिर चौक इथं पर्यंत राजकारभारा निगडित वास्तू किंवा तत्सम इमारती किंवा त्यांच्या खाणाखुणा दिसतात. पण या माचीच्या अगदी मध्यभागी तख्तवाडा( सध्याची गुरुवार बाग), रंगमहाल( सध्याची गुरुवार पेठ मधील कूपर कंपनी) शेजारी विरुबाई आणि फत्तेसिंह वाडा, जुना हत्तीखाना, पागा यांची जागा अशा शाहूकालीन सातारा शहराच्या अनेक खुणा पहावयास मिळतात. एका होळी सणाच्या दिवशी लागलेल्या मोठ्या आगीत आणि काळाच्या ओघात अनेक वास्तू नाहीशा झाल्या पण आजही सातारा शहराच्या स्थापने पासून दिमाखात उभा असलेला हा अदालत राजवाडा सातारा शहराची शान आणि स्वाभिमान आहे. मुळातच अदालत हे नाव छत्रपती थोरले प्रतापसिंह महाराजांच्या काळात पडलेले नाव आहे. या वाड्या वापर पूर्वी खाजगी वापरासाठी केला जात असे. करवीर छत्रपती संभाजीराजे जेव्हा साताऱ्यास छत्रपती शाहूंच्या भेटीस येत तेव्हा याच वास्तूत राहिल्याचे सांगितले जाते. प्रतापसिंह महाराजांच्या काळात या वास्तू मध्ये हुजूर अदालत अर्थात छत्रपतींचे कोर्ट भरत असे. एक आख्यायिका सांगितली जाते की येथे एक घंटा लावलेली असे. ज्या कोणास न्याय हवा असेल ती व्यक्ती येथे येऊन ती घंटा ( आजही अदालत वाद्य मध्ये ही घंटा प्रवेशद्वारा जवळ दिसते) वाजवत असत. हइ वास्तू अत्यंत देखणी आहे. तत्कालीन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. हा वाडा ६७ मीटर लांब आणि ४८ मीटर रुंद आहे. प्रतापसिंह महाराजांच्या पश्चात छत्रपती अप्पासाहेब महाराज यांच्या काळात देखील येथे कोर्ट भरत असे. १८४८ साली संस्थान खालसा झाल्या नंतर देखील (१८७६ पर्यंत) या वास्तू मध्ये ब्रिटिश कोर्ट भरत असे. कालांतराने छत्रपतींचे जवळपास सर्वच राजवाडे ब्रिटिशांनी जप्त केले होते. कालांतराने छत्रपतींकडे हा वाडा आला आणि येथेच छत्रपतींचे निवासस्थान झाले. आजही हा वाडा छत्रपती घराण्याचे निवासस्थान आहे. छत्रपतींचे वंशज आदरणीय छत्रपती शिवाजीराजे महाराज साहेब येथे निवास करतात. शहर स्थापने पासून सध्या च्या काळा पर्यंत कित्येक घटना, आठवणी पाहत ही वास्तू आजही दिमाखात मराठ्यांच्या राजधानी मध्ये उभी आहे
निलेश विजय झोरे

३० जानेवारी १७१५ सरखेल कान्होजींचा दरारा...🚩


 ३० जानेवारी १७१५ सरखेल कान्होजींचा दरारा...🚩

कान्होजी आंग्रे आणि शाहू राजे (पहिले) यांच्यामध्ये १६ नोव्हेंबर १७१३ रोजी तह झाला सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली...
मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला असे समाधान शाहू छत्रपतींना झाले...
१७१३ मध्ये कान्होजींना जो प्रदेश दिला गेला त्यात सिद्दीचा काही प्रदेश दिला गेला होता यामुळे कान्होजी आणि जंजिरेकर सिद्दी यांचे युद्ध झाले सिद्दीचे परिपत्य करण्यासाठी कान्होजींना इ.स १७१३ ते १७१५ पर्यंत खूप परिश्रम करावे लागले अखेर ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात...,
१).“मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले...”
२).“तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले...”
या तहाने आपली सत्ता कमी झाली हे शल्य जंजीरेकराचे मनात सलत राहिले आणि त्याने कान्होजींचा पराभव करण्यासाठी मुंबईकर इंग्रजांची मदत घेण्याचा उपक्रम केला इंग्रजांनी मदत केली देखील परंतु कान्होजीं पुढे त्या दोघांचे काही चालले नाही...

नाईक बावणे गढी - तांदुळजा

 Saurabh Madhuri Harihar Kulkarni




















नाईक बावणे गढी - तांदुळजा
लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील तांदुळजा या गावी जगजीवनराव नाईक बावणे यांची भव्य गढी आहे. साधारण २५० वर्षापूर्वी याचे बांधकाम झाले आहे. तांदुळजा हे गाव आंबेजोगाईपासून २५ कि.मी अंतरावर आहे. गढीचे भव्य प्रवेशद्वार त्याचे बुरूज आपले मन मोहून टाकतात. गढीत आत प्रवेश करतानाच आपल्याला गढीतून सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी केलेली दगडी पाईपलाईनची व्यवस्था पहायला मिळते. आतमध्ये नाईक बावणेंच्या वंशजांची घरे पहायला मिळतात. खूप खोल अशी आडवजा विहीर पहाता येते. साधारण १००-१५० फूट पूर्ण बांधलेला आड आहे तो. बुरूजावरून मारा करता येईल अशाप्रकारे जंग्या केलेल्या आहेत. गढीच्या बाहेर आण्णासाहेब नाईक बावणे यांचा वाडा आहे. आण्णासाहेब हे इ.स. १९४८ च्या मराठवाडा मुक्तीसंग्रामात सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यांच्या वाड्यात ब्रिटिशकालीन दुर्मिळ दुर्बीण, लहान ब्राँझची तोफ आहे तिचा बार दसराला करण्याची परंपरा आहे. अजून विवध वस्तू पहायला मिळतात. जुनी छायाचित्रे होती त्याचा संग्रह पहायला मिळतो. खूपच चांगली माणुसकी असलेले घराणे आहे.
नाईक बावणे हे क्षत्रिय मराठे कुलापैकी एक महत्त्वाचे कुल आहे. हे घराणे मुळचे उत्तरेचे तेथे मोगलांची चाकरी करत असताना दक्षिणेत येऊन प्रथम मौजे पांगरी परगणे जालना उर्फ जालनापूर येथे येऊन स्थायिक झाले. तेथून साताऱ्यास जाऊन श्री शाहूछत्रपतींचा आश्रय स्विकारला. नंतर छत्रपती शाहूंनी प्रसन्न होऊन आंबेजोगाई परगण्यातील गिरवली व तांदुळजा ही दोन गावे मोकासा म्हणून इनाम दिली. उपलब्ध माहितीप्रमाणे उत्तरेतून दक्षिणेत आल्यानंतर मालोजी व त्यांचा पुत्र जानोजी हे मुळ पुरुष असावे. या घराण्यात जानोजी नाईक बावणेचा नातू व्यंकटराव बावणे हे जसे शूर व तलवारबहाद्दर होते त्याचप्रमाणे ते मोठे सुविद्य पंडित व कवि होते. व्यंकटराव बावणे याने 'प्रद्युम्नोत्तर अथवा आनंदविधान' या नावाचे मराठीत एक चांगले काव्य लिहले आहे. व्यंकटराव बावणे आपले पूर्वज दक्षिणेत इनामाच्या गावी येऊन स्थाईक झाल्यानंतरचा कालवृत्तांत सांगताना म्हणतात की मोगलांची सेवा करताना आमच्या शौर्याची व तलवारबहाद्दरीची कीर्ती श्री शाहूछत्रपती महाराजांच्या कानी गेली व आमच्या वडीलांचे वडील जानोजीराव यांना छत्रपतींनी सन्मानानें व प्रेमाने बोलावून इनाम गांव वगैरे दिली व स्वतः जवळ चाकरीस बोलावून घेतले.
श्लोक-
- श्रीशाहू नृपतीस माहित असे जाणोनि बोलाविले | सन्मानेनि कृपा करोनी बरवी स्वस्थान ग्रामे दिल्हे || जानोजी मम ताततात वसले सांबांब मध्यांतरी |तद्वंशी निज जन्म हऊनि नसे साफल्य केले तरी ||
बावणे हे आडनाव कसे पडले तर ५२ दिवसांत ५२ किल्ले जिंकले म्हणून बावणे झाले. त्याचा श्लोक
बावन किल्ले बावनी दिनी साहेजहान | तब ते नाम प्रसिद्धी मे आयो सिंध सुजाण || निजमूख औरंगजेब साह बोले नायकराव | फेर कृपा करके दिये बक्षिस पांचहि गांव |
ऐतिहासिक मराठे आणि निझामाचा उदगीरचा तह येथेच तांदुळजाला झाला होता. राक्षसभुवन आणि खर्डाची लढाईमध्ये नाईक बावणेंच्या अश्वदलातील सरदार होते. इ.स १७९५ च्या खर्डाच्या लढाईत व्यंकटराव बावणे आणि निझामाचा वजीर मशीर उल्मुल्क यांचा सामना झाला होता.मग तांदुळजा गढीत तह झाला व ८२ लाखाचा मुलूख देण्याचे कबूल करून लढाई थांबली पण त्यांने तह पाळला नाही. ११ मार्च १७९५ ला लढाई झाली आणि निझामाचा पराभव झाला. तहात निझामाने परांडा किल्ला ते दौलताबाद किल्ला तापी नदीपर्यंतचा मुलूख दिला. तहात "मराठी बोलणार्यांचा वाडा" म्हणून "मराठवाडा" असे नाव पडले.
इ.स. १७४९ मध्ये छत्रपती शाहूंच्या मृत्यूनंतर नाईक बावणे अक्कलकोटकर भोसलेंसोबत राहू लागले. फत्तेसिंह भोसलेंच्या टीपूवरील स्वारीत नाईक बावणेंचे अश्वदळ होते.
अजिंठ्यासारखी जगमान्य चित्रकला या मराठवाड्यात जन्माला आली. हा कलेचा वारसा मराठवाड्याच्या मातीने पुढे अनेक शतके जपून ठेवला. निरनिराळ्या मंदीरांची, किल्ल्यांची, शिल्पांची आणि चित्रांची निर्मिती वेळोवेळी येथील कलाकारांने केली. मराठवाड्याचा हा भाग अनेक ऐतिहासिक अवशेषाबाबत समृद्ध आहे. सदरचा चित्रसंग्रह सरदार नाईक बावणे ,तांदुळजा यांच्या खाजगीतला आहे. सुविद्य वंशज श्री. जानोजीराव नाईक-बावणे यांनी हा संपूर्ण संग्रह मराठवाडा विद्यापीठाच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयास सानुग्रह देऊ केला. त्यांच्या या औदार्यपूर्ण देणागीमुळेच हा बहुमोल चित्रसंग्रह डाॕ. सतीश देशमुख यांनी यावर पी.एच.डी. करुन दखनी, मराठा, मुगल, राजपूत इ. शैलींची २९ चित्रे ह्या संग्रहात प्रकाशित केली.
इ. स.१९४८ स्वातंत्र्यसंग्रामात तांदुळजा, सारसा व देवळा या गावच्या लोकांवर रझाकारांनी अत्याचार सुरु केला. तेव्हा तांदुळजाच्या सरदार नाईक बावणे यांच्या गढीतून लोकांनी रझाकारांशी अनेक वेळा मुकाबला दिला. याच लोकांनी, बन्सीलाल मारवाडी व त्याच्या मुलाचा खून करुन त्यांच्या घरातील सोने नाणे घेऊन जाणाऱ्या ४० रजाकारी पठाणांना मांजरा नदीत तांदुळजा, नायगांव, सारसा व देवळा या गावकऱ्यांनी अतिशय योजनापुर्वक मांजरा नदीतच जलसमाधी दिली.
Team- पुढची मोहिम

Saturday 30 January 2021

सुभेदार थोरले मल्हारराव होळकर

 उत्तरेत सुभेदार मल्हारराव होळकर [ KingMaker Of The North ] ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठा घोडदळ आणि शत्रूवर दबदबा निर्माण करून रणांगणात शत्रूचे केलेले हाल एका पत्रात सापडते -

मराठा सरदारांनी उत्तरेत वेळोवेळी मोहिमा काढून आपले घोडदळ पूर्ण विचारपूर्वक नीतीने वापरले कारण मराठ्यांचा मुख्य कणा उत्तरेत घोडदळ हा होता. मधोसिंग आणि राजसिंग घोडचढा ह्यांच्या विरुद्ध सुभेदार मल्हारराव होळकर ह्यांचे युद्ध झाले. ह्या युद्धाची नोंदणी ३ मे, १७४७ दरम्यान चिंतो कृष्णा ह्यांनी केली.
" राजश्री मल्हारजी राव होळकर आम्हास घेऊन निघाले. दरकूच मांगरोळ प्रांत हाडोती येथे गाठ झाली. जमादीलैवली चार घटका मागील दिवसापासून रात्र पावेतो गोळागोळीचे युद्ध झाले. उपरांत रात्री झाली तसेच घेरा घालून कंबरा बांधून घोडेवर चार प्रहार रात्री उभेच राहिलो. कछव्याची तमाम फौज बुडविली लुटून फस्त केली. तमाम हिंदुस्तान नक्ष बसला. सरकार पागेस शेसवाशे घोडे उंट आली.
( ह्यावरून मराठा फौजा किती हाल सहन करून शत्रूला धुळीस मिळवले हे कळून येतं.)

सुभेदार थोरले मल्हारराव होळकर जयते
( खूब लढे मरहट्टे )

वडगावची लढाई मराठे व इंग्रज यांच्यामध्ये


 वडगावची  लढाई मराठे व इंग्रज यांच्यामध्ये

पुण्यापासून साधारणपणे ४० किमी दूर असलेल्या वडगाव या ठिकाणी झाली. याला पहिले मराठा-इंग्रज युद्ध म्हणूनसुद्धा ओळखले जाते. मराठे व इंग्रज यांच्यात एकूण तीन लढाया झाल्या. भारताच्या इतिहासात या तीनही लढाया अतिशय महत्त्वाच्या आहेत. या लढायांत मराठ्यांचे नेतृत्व तुकोजीराव होळकर व महादजी शिंदे यांनी केले. मराठ्यांनी या लढायांत शिस्त आधुनिक डावपेच यांचे प्रदर्शन करून इंग्रजांना परास्त केले व अखेरीस जेरीला आलेल्या इंग्रज फौजेचा वडगाव येथे पराभव केला. इंग्रजांना या पराभवामुळे मराठ्यांशी तह करावा लागला. परंतु इंग्रज गव्हर्नर यांनी हा तह नामंजूर करत युद्ध चालू ठेवले.
माधवराव पेशवे यांच्या २७ व्या वर्षी क्षयरोगाने १७७२ ला झालेल्या अकाली निधनानंतर त्यांचे लहान भाऊ नारायणराव यांना पेशवेपदी बसवले गेले. पण माधवराव पेशवे यांच्या काळापासूनच त्यांचे काका रघुनाथराव ह्यांचे पेशवेपदासाठी प्रयत्न चालू होते. आपल्या हयातीतच माधवराव पेशवे यांनी रघुनाथरावांना शनिवारवाड्यात बदामी महालात कैदेत ठेवले होते. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूने रघुनाथरावांची सत्तालालसा वाढली व नारायणराव पेशव्यांच्या विरोधात त्यांनी बंड करण्याचे ठरवले. शनिवार वाड्याचे सुरक्षारक्षक गारद्यांना फितवून त्यांनी नारायणराव पेशव्यांना कैद करायचा कट आखला. पण रघुनाथरावाच्या पत्नी आनंदीबाई यांनी गारद्यांना पाठवलेल्या चिठ्ठीतला मजकूर “नारायण रावांस धरावे” ऐवजी ” नारायण रावांस मारावे” असा केला. मराठीतील ध चा मा करणे ही म्हण याच प्रसंगावरुन पडली.
नारायणरावांच्या हत्येनंतर रघुनाथरावा पेशवेपद मिळाले. पण बऱ्याच जणांना ते रुचले नाही. नाना फडणवीसांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विरोध केला. नारायणराव पेशव्यांच्या पत्नी गंगाबाई या नारायणरावांच्या खूनावेळी गर्भार होत्या. त्यांना पुरंदर किल्ल्यावर हलवले गेले. यथावकाश त्यांना ही मुलगाच झाला. त्याचे नामकरण सवाई माधवराव असे केले गेले.
छत्रपतींनीसुद्धा त्यांनाच पेशवे पदासाठी मान्यता दिली. त्यातच रामशास्त्री न्यायमूर्तींनी रघुनाथरावांना खुनासाठी दोषी धरत देहान्त प्रायश्चिताची शिक्षा दिली. ती रघुनाथराव मान्य करणे शक्यच नव्हते. त्यांनी इंग्रजांशी संधान साधून पुणे सरकारच्या विरोधात युद्ध पुकारले.
पेशवेपदावरचा आपला हक्क सोडण्यास रघुनाथराव तयार नव्हते. मुळात नारायणरावांच्या खुनाच्या आरोपाचा ससेमिरा चुकवण्यासाठी निजामावर मोहिमेची आखणी केली. रघुनाथराव हे परमप्रतापी असल्याने (१७५० च्या दशकात त्यांनीच अटकेपार सैन्य नेत मराठ्यांचा वरचष्मा उत्तर भारतात पुन्हा स्थापन केला होता.) कोणी उघड विरोध केला नाही. पण मुळात निजामाला न दुखावता त्यांनी मोहीम अर्थहीन ठेवली. त्याचाच फायदा घेत बरेच जण साथ सोडून गेले. नाना फडणीस, सखाराम बापू, हरिपंत खुबीने पुण्यास परत आले. पण सवाई माधवरावांच्या जन्मानंतर त्यांना पेशवे घोषित करून कारभार पाहू लागले.
याकाळात रघुनाथराव जास्त सैन्य न उरल्याने सरळ पुण्यावर चालून न येता, त्यांनी शिंदे , होळकरांसोबत बोलणी केली. पण रघुनाथरावांच्या दबावामुळे शिंदे , होळकरांनी त्यांनी सरळ नकार न देता झुलवत ठेवले. अखेर त्यांनी इंग्रजांकडून मदत मिळवण्यासाठी पुण्यातील वकील माष्टीनशी बोलणी केली. पण रघुनाथरावांच्या पैशांच्या मागणीवरून आणि इंग्रजांच्या मुलुखाच्या आणि महसुलाच्या मागण्यांवरून करार पूर्ण होण्यात अडचणी येत होत्या. अखेर रघुनाथरावांनी गुजराथेतून आपल्या मित्रफौजेसोबत नर्मदा ओलांडून मराठ्यांवर चढाई केली. पण हरिपंत तात्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी त्यांचा पराभव केला. कसेबसे तुटपुंज्या सैन्यासह रघुनाथराव सुरतेच्या इंग्रजांकडे पोहोचले. अखेर धर्मबंधन झुगारून त्यांनी समुद्र प्रवास करत मुंबई गाठली. वसई व सालशेत बेटे व गुजराथेतून सुरत ,भडोचचा महसुल इंग्रजांना द्यायचे मान्य करून, बदल्यात इंग्रजांकडून आगाऊ पैसे सैन्य खर्चासाठी घेत करार झाला.
त्यावेळी भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे तीन विभाग होते. मुंबई , कलकत्ता, मद्रास. यातले कलकत्ता, मद्रास भाग सत्ता काबीज करण्यात यशस्वी ठरले होते. तुलनेने मुंबई विभाग उत्पन्नात मागेच होता. त्यामुळे मुंबई विभाग दडपणात आणि मराठी साम्राज्याच्या राजकारणाच्या हस्तक्षेपाच्या संधी शोधत होता. मराठी साम्राज्याच्या नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतरच्या परिस्थितीचा फायदा उचलत त्यांनी सालशेत, साष्टी पूर्वीच ताब्यात घेतले. रघुनाथरावांनी आयती संधी दिली. याचकाळात इंग्लंडमध्ये कंपनीच्या विभागात मध्यवर्ती निर्णय अधिकार कलकत्याच्या प्रमुखाकडे दिले. मुंबई विभागाने तरीही तांत्रिक बाबींचा फायदा उचलत रघुनाथरावांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
नाना फडणीसांनी याविरुद्ध कलकत्याच्या कंपनीला तक्रार केली. कलकत्त्याने सुरतेच्या कराराला नामंजूर करत आपला स्वतःचा वकील आप्टन पुणे दरबारी/पुरंदर वर पाठवला. नाना फडणीसांनी त्याचे खास जंगी स्वागत करून पुरंदरचा तह (१ मार्च १७७६) केला. यानुसार रघुनाथराव आणि पेशव्यांच्या खुनाचा आरोप असलेले रघुनाथराव यांना पुणे दरबारी हवाली करायचे होते. तर मुंबई विभागाने बळकावलेले काही भागही परत करायचे होते. मराठ्यांनी सालशेत अन वसई वरचा दावा बाजूला ठेवला.
पण मुंबई विभागाने साहजिकच हा करार मानायला नकार देत रघुनाथराव व पेशव्यांच्या खुनाचा आरोप असलेल्यांना हवाली केले नाही आणि प्रदेश परत देण्यासही टाळाटाळ केली. कलकत्ता कंपनीनेही प्रतिसादात टाळाटाळ केली. अखेर नाना फडणीसानी कलकत्ताला जरब म्हणून फ्रेंचाना सुरतेत जागा दिली आणि त्यांचे पुण्यात जंगी स्वागत केले. यावर कलकत्ता कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. उलट, उत्तर भारतातून आपले सैन्य मदतीसाठी पाठवले. यात अयोध्येच्या नबाबाकडून मिळालेली कंदाहारी फौजही होती.
पावसाळा संपल्यानंतर इंगजांनी मुंबईहून साधारण ४००० सैनिकांची फौज घेत प्रयाण केले. रघुनाथरावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. इंगजांच्या सैन्यात ६०० युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते. रघुनाथरावांना व इंगजांना वाटत होते की शिंदे, होळकर हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येऊन मिळतील. इंग्रजांनी पनवेल मार्गे, कर्जत-खंडाळा-पुणे असा मार्ग आखला होता.
मराठा सैन्याचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी केले, होळकरही मराठा सैन्यासोबतच राहिले. त्यामुळे रघुनाथरावांचे बेत फसले. यावेळी मराठ्यांच्या सैन्य हालचाली वाखाणण्यासारख्या होत्या. कार्ले, खंडाळा या भागात इंग्रज पोहोचेपर्यंत मराठ्यांनी त्यांना गनिमी काव्याने सतावण्याचे काम केले. इंग्रज फौजेवर सतत गनिमी हल्ले करत त्यांची रसद मिळण्याचे मार्ग कापले. इंग्रज फौज जसजशी पुढे सरकत होती, तसतशी मराठ्यांनी वाटेतली सर्व गावे ओस केली, शेते पिके कापून जाळून टाकली, शिवाय पाणवठे विष टाकून त्यातील पाणी पिण्यायोग्य ठेवले नाहीत, अशावेळी अन्नासाठी इंग्रज फौजेला आशा ठेवत पुढे पुढे चालत राहावे लागले. रात्रीचे वेळीसुद्धा छोटे हल्ले करत त्रास देणे सुरू ठेवले, तरीही चिकाटीने इंग्रज फौज खंडाळ्याला आली. खंडाळ्याला आल्या वर मात्र इंग्रज फौजेला त्रास न देता मराठ्यांनी घाट चढू दिला, हेतु हाच होता की परतीचा मार्ग कापला जावा.
यादरम्यान उत्तर भारतातून येणाऱ्या फौजेचा प्रवासही मराठ्यांनी त्रास देत लांबवला. नागपूरच्या भोसलेंना तशा सूचना दिल्या होत्या. त्यापुढे रोहिल्यांनाही तशाच सूचना होत्या. यामुळे उत्तर भारतातून आवश्यक रसदी इंग्रजांना मिळाल्याच नाहीत.
३१ डिसेंबरला इंग्रज फौजेने खंडाळ्याला मुक्काम केला. ४ जानेवारीला फौजा कार्ल्यात आल्या. इंग्रजांनी नंतर रंगवलेला तथाकथित शूर जेम्स स्टुअर्ट मुख्य लढाईच्या १० दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजेकडून मारला गेला. मराठयांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी तळेगावाकडे वळली (९ जानेवारी १७७९), पण मराठयांनी तळेगावसुद्धा रिकामे करून जाळले होते, आणि पाणवठेसुद्धा विषारी होते. अखेर इंग्रजांनी न लढताच माघार घेतली. ११ जानेवारी १९७९ला त्या आपले जड साहित्य तसेच टाकत उलट वळले, पण मराठी फौजेने माग सोडला नाही अखेर इंग्रजांनी वडगावचा आश्रय घेतला. १३ जानेवारीला रात्री मराठ्यांनी वडगांववर हल्ला चढवला तो १४ च्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवेपर्यंत तो चालूच ठेवला. अखेर १६ जानेवारी १७७९ला नाना फडणिसांनी व महादजी शिंदेनी इंग्रजांची संपूर्ण शरणागती मान्य करत तह लादला. तहानुसार इंग्रजांनी १७७३पासून जिंकलेला सर्व मुलुख परत करायचा होता तसेच मराठ्यांना युद्धखर्चही द्यायचा होता.
☀🔥⛳|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी....||⛳🔥☀

बुऱ्हाणपुरची_लूट

 




बुऱ्हाणपुरची_लूट

३० जानेवारी १६८१
स्वतःच्या राज्यभिषेकानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी दस्तुरखुद्द संभाजीराजांनी स्वतः आघाडीवर जाऊन मुघलांचे ऐश्वर्यसंपन्न असे ठाणे बुऱ्हाणपूर लुटले.
तिथले सतराच्या सतरा पुरे लुटून उध्वस्त केले.
त्या मग्रूर काकरखानला तुडव तुडव तुडवले.
बुर्हाणपूर हे मोगल साम्राज्यात असणारे संपन्न ठिकाणांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी मराठ्यांचा खजिना भरण्यासाठी सुरतेची लूट करून औरंगेजबाने निर्माण केलेले सुरत शहर बदसुरत केले, त्याचप्रमाणे छत्रपती शंभुराजांनी बुर्हाणपूर जवळजवळ तीन दिवस लुटले.
पण तत्पूर्वी संभाजीराजांनी आपण सुरत शहर पुन्हा लुटनार अशी आवई आपल्या हेरांमार्फत मुघलांच्या गोटात पसरवली.
पण त्यांनी चाल केली मुघली सत्तेतील अत्यंत संपन्न असे शहर असणाऱ्या बुऱ्हाणपूर वरती.
आता संभाजीराजे सुरत लुटनार अशी आवई तर पसरलीच होती.
त्यात औरंगजेबचा दुधभाऊ खानजहाँ बहादूरखान कोकलताश हैबतजंग हा ९ जून १६८० पूर्वीच त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी औरंगाबादला जवळपास ३००० ची फौज जी बुऱ्हाणपूरच्या रक्षणासाठी होती ती फौज घेऊन गेला होता.
संभाजीराजांची योजना होती पायदळाची एक तुकडी अन स्वार मुघलांना हुलकावणी देण्यासाठी सुरतेकडे जाणार दुसरी बुऱ्हाणपूर तर तिसरी तुकडी बहादूरखानाला हुलकावणी देत गुंतवून ठेवणार.
खाफिखान लिहतो.
"संभाजीचा सेनापती हंबीरराव कोकणात लष्करासहित होता.
त्यास वर्तमान मिळाले की खानदेशात कोणी रक्षक नाही.
त्यावरून त्याने लष्कराच्या लहानमोठ्या टोळ्या करून उत्तरेकडे जाऊन ते सर्व लोक बुऱ्हाणपुरावर एका जागी मिळवले अन ते शहर लुटले, द्रव्य मिळवले.
परत येताना त्याने बुऱ्हाणपुरापासून नाशिकपर्यंत मुलुख लुटून जाळून टाकला.
त्यामुळे बुऱ्हाणपूरचा नायब त्यावेळी काकरखान होता. अन त्याच्याजवळ साधारणपणे पाच हजाराची फौज होती.
त्यात खानाच्या हेरगारांना सुरतेच्या जंगलात काही मराठे दिसले.
त्यामुळे शंभूराजे खरेच सुरत लुटनार अशी खानाची खात्री पटली अन तो घाबरला.
शिवरायांनी दोनदा सुरत लुटली अन आता संभाजीराजांनी सुरत लुटली तर औरंगजेब आपल्याला सोडणार नाही जा विचार करून खानाने आपल्याजवळील चार हजारांचे सैन्य अन बचमीयत सुरतेच्या रक्षणासाठी पाठवली.
ती फौज निम्म्यात पोचते तोवर मुघली हेर धावत आले-
"हुजूर गजब होगया, मराठे बुऱ्हाणपुर लुटणे आये है."
आता मात्र काकरखान पुरता हादरला.
त्याचा विश्वासच बसेना.
पंधरा दिवसांपूर्वी संभाजीराजांचा राज्यभिषेक झालाय.
अन रायगडावरून बुऱ्हाणपुरावर यायला कमीतकमी ६ दिवस तरी लागतात,
ते पण दिवसरात्र घोडी दामटली तर.
त्यामुळे मराठे बुऱ्हाणपुरावर येतील असा विचार स्वप्नातसुद्धा खानाने केला नव्हता.
पण मराठे ५ दिवसरात्र घौडदौड करून तिथं पोचले.
तिथले व्यापारी, जौहरी वगैरे खानाकडे जाऊन त्यांना वाचवण्यासाठी विनवण्या करू लागले.
खानाने तिथले लोक गोळा करून जवळपास दीड दोन हजार लोक जमवले व रात्रीच बेसावध असणाऱ्या मराठ्यांवर हल्ला करून त्यांना पराभूत करायचे अशी योजना आखली.
जसा खान सैन्य घेऊन बाहेर पडला तसे जवळपास जंगलात दडून बसलेले मराठे खानाच्या फौजेवर तुटून पडले.
हर हर महादेव ची किलकरी त्या भयाण शांततेत गर्जत होती, तलवारीचे सपासप आवाज येत होते.
छत्रपती संभाजीराजे स्वतः या तुकडीचे नेतृत्व करत होते.
मराठेशाहीचे सरसेनापती सरलष्कर हंबीरराव मोहिते तिथेच जवळपास होते.
त्यांना हेरांकरवी खबर मिळाली की काकरखान रात्रीचा मराठ्यांवर चालून गेलाय अन शंभूराजे आघाडीवर आहेत.
हे कळताच हंबीरराव तडक निघाले.
हंबीरराव सगळे सैन्य घेऊन आले अन बुऱ्हाणपुराला वेढा दिला.
मराठ्यांनी पहिलाच तडाखा बहादूरखानाच्या नावाने वसलेल्या बहादूरपुऱ्याला दिला. तिथे लाखो होनांची लूट मिळाली.
हा हल्ला इतका अचानक होता की कोणालाच हलायला सुद्धा सवड मिळाली नाही.
अन तीन दिवस मराठ्यांनी बुऱ्हाणपूर लुटले.
खोऱ्याने मराठे बुऱ्हाणपूर लुटत होते.
प्रचंड जडजवाहीर, सोने, चांदी, जिझिया कराने जमवलेली संपत्ती तसेच घोडी इत्यादी वस्तू मराठ्यांनी लुटून नेल्या.
ही लूट सुरतेपेक्षा तीनपट मोठी होती.
पण बुऱ्हाणपूर लुटताना मराठ्यानी कुठेही लहान लेकरांना अन महिलांना धक्का पोचवला नाही.
परस्त्रीकडे चुकीच्या नजरेने पाहायचे नाही हा शिरस्ता मराठे सदैव पाळत असत.
तिकडे ही खबर बहादूरखानाला औरंगाबादला मिळाली अन तो तडक निघाला.
इकडे मराठ्यांनी फौजेच्या ४ तुकड्या केल्या अन ४ दिशांनी ते साल्हेरच्या दिशेने रवाना झाले.
चोपड्याच्या मार्गे खानाला गुंगारा देत एक कोटीहून अधिक होनांची लूट मराठ्यांनी यशस्वीपणे साल्हेरच्या किल्ल्यावर सुरक्षितपणे पोचवली.
ही लूट एवढी प्रचंड होती की, मराठ्यांनी केवळ मौल्यवान वस्तू, सोने, जडजवाहीर आणि चांदीच्या वस्तू एवढेच लुटले. बुर्हाणपुरात मोगलांची काय फजिती झाली, याचे प्रत्यंतर औरंगजेबपुत्र अकबर याच्या पत्रावरून दिसते. औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात अकबर म्हणतो की, "बुर्हाणपूर म्हणजे विश्वरूपी सुंदरीच्या गालावरील तीळ आहे; पण तो आज उद्ध्वस्त झाला. यावरून आपणास छत्रपती संभाजीराजांचा पराक्रम दिसतो. म्हणूनच इंग्लंडचा दरबार त्यांचा उल्लेख वॉरलाईक प्रिन्स असा करतात."
स्वतःच्या राज्यभिषेकानंतर अवघ्या पंधरा दिवसात एवढ्या मोठ्या मोहिमेचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या माझ्या शंभुराजांना अन मराठ्यांच्या पराक्रमाला माझा मानाचा मुजरा.
🚩❤️🙏
- सोनू बालगुडे पाटील

राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत डबीर

 

राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत डबीर

२५ जानेवारी १६६५...
शिवाजी महाराजांचे राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन...
सोनोपंत डबीर म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न.. मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली होती...
सोनोपंत डबीर यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना सुनावलेले खड़े बोल....,
जेव्हा शाहजीराजे आदिलशाहकड़े बंदी होते त्यांच्या सुटकेसाठी आदिलशाहने सिंहगड किल्ला परत मागितला होता तेव्हा छत्रपती शिवाजी राजे आपल्या पित्यावर रुष्ट झाले होते अणि तेव्हा सोनोपंत डबीर यांनी त्यांचा रुसवा काढताना...,
“पराक्रमी राजलाच पृथ्वी वश होते राजे एक सिंहगड गेला म्हणुन तुम्ही पित्यावर रागावता, त्यापेक्षा एक गडाच्या बदल्यात आदिलशाहने शाहजीराजंसारख्या सिंहाला मुक्त केले आहे राजे आता तुम्ही पृथ्वीवर राज्य करा....”
राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत डबीर ह्यांस विनम्र अभिवादन.

परंडा किल्ला...

 



उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा आणि नळदुर्ग मध्ययुगातील जिल्ह्याची ठिकाणे असून पैकी परंड्याला तर काही दिवसांकरिता अहमदनगरच्या निजामशहाची राजधानी होती. त्यानुसार परंड्याला प्राचिन इतिहास असून पोथी-पुराणातील उल्लेखानुसार या परिसरातील राक्षसानुसार त्या-त्या गावाला नावे पडली आहेत प्रचंडसुरामुळे परंडा, भौमासुरामुळे भूम, कंदासुरामुळे कंडारी या सर्वांचा नाश करणा-या सुवर्णासुरामुळे सोनारी. काही ठिकाणीपरंड्याचा उल्लेख हा प्रत्यंडक, परमधामपूर, प्रकांडपूर व पलिखंड आढळतो त्यानुसार पलांडा, परिंडा ते परंडा असे नामांतर झाले असावे. धारवाड जिल्ह्यातील होन्नती गावातील इ.स. ११२४ च्या शिलालेखात पलिखंड नावाचा उल्लेख असून येथे सिंघनदेवाची सत्ता असल्याचे म्हटले आहे...
देवगिरीच्या यादवांकडून बदामीच्या चालुक्याकडे परंडा गेल्यानंतर गावाला परगण्याचा दर्जा मिळाला. चालुक्यांनी सुरुवातीला छोटीशी किल्लेवजा गढी बांधली होती. पुढे बहामनी सुलतानाकडे परंडा आल्यानंतर दिवाण महंमद ख्वाजा गवान याने इ.स. १४७० च्या आसपास परंड्याचा किल्ला बांधलेला आहे. भुईकोट प्रकारातील परंडा किल्ला हा दक्षिणेतील सत्ताधा-यांसाठी केंद्रस्थानी असून परंडा हे विजापूर, हैदराबाद, सह्याद्री परिसरात जाण्यासाठी मध्य भागी होते मुनिमखान औरंगाबादीच्या एका पत्रानुसार मोगल काळात परंडा जिल्ह्यात १९ तालुके व ६२१ गावांचा समावेश होता तर परंड्याची महसूल वसुली २० लाखांवर होती...
१६८१ नंतर १७०७ म्हणजे मृत्यूपर्यंत औरंगजेब दक्षिणेतच राहिल्यामुळे उत्तरेकडील जमा होणा-या महसुलाचा पैसा विजापूर, सोलापूर, हैदराबाद, कोल्हापूर परिसरात जाताना तो परंड्याहून व्यवस्था लावल्याशिवाय जात नव्हता असेच एकदा परंड्याहून निघालेला खजिना सेनापती धनाजी जाधवांने २५ जानेवारी १७०० मध्ये परंड्याजवळील उंदरगाव या ठिकाणी लुटून फस्त केला होता. अशारीतीने धनाजींने वारंवार परंडा परिसरात धुमाकूळ घातल्याची नोंद सापडते एवढेच नाही तर शिवरायांचे कनिष्ठ चिरंजीव छत्रपती राजारामांनीही परंडा किल्ल्याच्या परिसरात धुमाकूळ घातल्याने मराठ्यांच्या छत्रपतींचे पाय परंड्याला लागले म्हणायला हरकत नाही...
इ.स १६७८ साली मोगलांचा सेनापती दिलेरखान आणि दारूगोळ्याचा एक अधिकारी व ‘तारिखे दिल्कुशा’ ग्रंथाचा लेखक भीमसेन सक्सेना यांचा मुक्काम बरेच दिवस परंडा किल्ल्यात होता विशेष म्हणजे यावेळी त्यांनी किल्ल्या शेजारील तलावाचा गाळ काढून त्याची स्वच्छता केली होती मध्ययुगातील मोठा सेनापती व तत्कालीन काळातील अंबानी शोभणारा मीरजुम्ला, औरंगजेबाचा सेनापती बहरामंदखान, शिवरायांचा वकील काझी हैदर यांचाही मुक्काम किल्ल्यात राहिला आहे इंग्लंडच्या राजाचा वकील थॉमस तसेच बादशहाच्या तोफखान्याचा प्रमुख व नामांकित डॉ निकोलस मनुची यांचाही या किल्ल्याने पाहुणचार केलेला आहे...
➖➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : अनंतह टुरिझयम...♥️

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...