विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 28 March 2024

वसई वीर शिंदे घराण्यातील भाऊबंद🔥🔥

 


वसई वीर शिंदे घराण्यातील भाऊबंद🔥🔥
वसईच्या मोहिमेत सरदार राणोजीराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे घराण्यातील अनेक वीरांनी सहभाग घेतला यातील सरदार कर्णाजीराव शिंदे ( सेनासप्तहजारी कुडाळ कर) सरदार गुणाजी राव शिंदे(श्रीगोंदा कर वारीकर बहुतेक) सरदार संभाजीराव शिंदे सरदारकुसाजीराव शिंदे(श्री गोंदीकर बहुतेक वारीकर) सरदार होनाजीराव शिंदे संभाजीराव शिंदे या शिंदे बंधूंनी मोठा पराक्रम गाजवला याबद्दल अस्सल नोंदी उपलब्ध आहेत यातील कुसाजीराव व गुणाजीराव हे दोन्हीही बंधू श्रीगोंदा येथील सरदार राणोजी बाबांच्या भाऊबंद आहेत पुढे सरदार जयाजीराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या इतिहासात विविध मोहीम तून दोन्ही भाऊ पराक्रम करताना दिसतात. याबद्दल नोंद व उपलब्ध पत्र हे वसई मोहीम मधील संदर्भ आढळतात तसेच राणोजी राव शिंदे नंतर जयाजीराव शिंदे च्या हुजुरात दोन्ही भाऊ गुणाजीराव व कुसाजीराव शिंदे दिसून येतात
पे. स.
प. या
वसईवरील दुसरा हल्ला ( २८ जून १७३७).
वसईवरील पहिला हल्छा फसल्यानतर शकराजीपंत, गंगाजी नाईक, मोराजी शिंदे, यशवंतराव बाळाजीराव, कर्णाजी शिंदे वगैरे लोकांनीं सुमारें एक महिन्यानें भर आषाढाच्या मुमळ धारेंत फिरून एकदां वसई वर डोकें फोडण्याचे ठरविले. त्याप्रमाणें २८ जून रोजीं ४००० मराठे शिड्या सामान तयार करून अचानक बहाद्दरपुऱ्याहून कोटास गेले व उत्तरेच्या बाजूस घोणसाळियाच्या व आरमाझिमच्या मध्ये त्यांनीं तटास शिड्या लावण्याचा प्रयत्न केला. परंतु शिड्या चिखलांत रुतल्या. चांगल्या लागेनात. आणि त्यांतच शत्रु सावध होऊन त्यानें वरून अमा कांहीं आगीचा जबरदस्त मार केला कीं शेवटीं त्याखालीं कचकरून मराठयांना पळून जावें लागलें. ही धुमाळी प्रहर अधर्धा प्रहरच झाली पण तेवढयांत मराठ्यांचे फार माणूस दुखावलें व ठार पडले. त्यांत गुणाजीराव शिंदे, खंडोजी बागराव, दादाजी नाईक भंडारी व इतर पुष्कळ नामांकित लोक खपले लढाईनंतर शत्रूमच मराठ्यांचे ३३ मुडदे सांपडले; यावरून खुद्द मराठयांनीं काढून नेलेले मुडदे किती तरी असतील ! शत्रुपक्षाचे माणूम मात्र त्यावेळीं एकहि दगावलें नाहीं असें पोर्तुगीज इतिहासकार म्हणतात
_______________
सदर पत्रातून फलटणचे नाईक निंबाळकर व शिंदे बंधू यांनी सरकारतील तनखा मिळावी म्हणून सरदार जयाजीराव शिंदे यांनी पेशव्यांच्या कामवीसदार रामाजीपंत यांनी पत्र लिहिले आहे तसेच आपण दिलेले पत्र असून
ले. ११७ ।
(श. १६७५ चैत्र व. १० (ताा २८-४-१७५३
॥ श्री ॥ पै। छ २५ जमादिलाखर प्रहर दिवस.
राजश्री रामाजीपंत भाऊ गोसावी यांसि
श्री.
छ अखंडित लक्ष्‌मी अलंकृत राजमान्य स्ना जयाजी शिंदे दंडवत विनंती उपरि येथील स्वकीय कुशल जाणोन कुशल लेखन करणें, विशेष. राजश्री कुसाजी शिंदे* शिलेदार हुजुरात यांचे भाऊ गुणाजी शिंदे व राजश्री वणगोजी निवाळकर व आनंदराव निंबाळकर शिलेदार निशा तुकोजी शिंदे व बंदुभाई व मोहदीन ऐसे समागमें आले आहेत. यांचे हिशेब करून द्यावे लागतात. तर सदई असाम्यांचे हिशेब दफ्तरचे लेहून पाठवावे म्हणजे समजार्वास करून वाटे लावून देऊं. आम्ही आजच दोन प्रहरां श्रीगोंदेंयास आलों. कळले पाहिजे. छ २३ जमादिलाखर बहुत काय लिहिणें हे विनंती.
ज्योतन्चिरणी तत्पर राणुजी सुत जयाजी शिंदे निरंतर
मोर्तब सूद
---------------------
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे

मराठेशाहीतील हत्ती पुराण

 


मराठेशाहीतील हत्ती पुराण 
भाग एक🚩
🚩लेखन :संतोष झिपरे
अफजल खान स्वारी मराठ्यांना हत्ती 95 सापडेल
साल्हेर च्या घनघर लढाईत हुसेन खान मायनी पठाणच्या विरोधात सेनापती हंबीरराव मोहिते यांनी 12 हत्ती हस्तगत केले
चंदीच्या लढाईत शेरखानविरुद्धच्या लढाईत छत्रपती शिवरायांनी 12 हत्ती हस्तगत केले
छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात रायगड किल्ल्याला वेढा घालून बसलेल्या झुल्फिकार खानावर संताजी घोरपड यांनी हल्ला करून पाच हस्तगत केली
1724 श्रीनिवास पंतप्रधनिधी यांनी मिरज मिरजकर दिलेरखानाच्या पराभव करून त्याच्याकडून 12 हत्ती हस्तगत केले
1729 ला थोरल्या बाजीराव पेशव्याने माळवातील बुरानपुर येथील मुघल सरदार बंगश पराभव केला त्यात 12 हत्ती हस्तगत केली. याच लढाईची चिमाजी अप्पा धन्य 18 हत्ती हस्तगत केले
डंभईच्या लढाईत पेशव्यांनी 17 हत्ती हस्तगत केले
1737 बाजीराव बाजीराव पेशव्याने निजामास भोपाळ मध्ये कोंडीस पकडले त्यास कुमक करण्यासाठी म्हणून नासिरजंग निघाला व बुरानपुर च्या वाटेत चिमाजी आप्पांनी हल्ला केला त्या लढाईत नामाजी शिंदेंचा नातू ना श्रीगोंदा सोबत होता त्यावेळी त्याच्याकडून तीन हत्तीची मजा पण असते
1751 मलटणच्या लढाईत निजाम व मराठीत युद्ध होऊन चार हत्ती हस्तगत झाले
1759 स*** कडप्पाचे लढाईत मराठ्यांनी अब्दुल मजीद खान याचे नऊ हत्ती हस्तगत केले
१७ 59 च्या उदगीरच्या लढाईत पेशवा भाऊसाहेबांनी सात हत्ती हस्तगत केले
1765 राक्षस भुवन च्या मराठ्यांनी 22 हत्ती हस्तगत केले
1781 82 12 बाराभाईच्या लढाईत चंद्राराव पवार कासोपंत दातार यांनी बाराभाईंच्या वतीने लढाई केली यावेळी पेशव्यांचे सरदार गणेशपंत बेहेर यांनी दोन हत्ती हस्तगत केले
1790 मिर्झा इस्माईल बेग यांचा शी सरदार महादजी शिंदे पाटील बाबा यांच्याशी लढाई झाली त्यात मराठ्यांचे विजयी झाला व शिंदेने 15 हत्ती हस्तगत केले तर काशीराव होळकर यांनी ३ शिवाजी विठ्ठल ३ हत्ती हस्तगत केले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे
____________
दयाबहादुराच्या स्वारीच्या वेळीं चिमाजी आप्पाना मोठीच लूट मिळाली होती. त्यात हत्तीहि पुष्कळ होते. त्यापैकी एक 'गजराज' नावाचा होता. तो पवाराकडे वाटणात गेला, तो कसैहि करून स्वतःकडे मिळवावा असे बाजीरावसाहेबानी चिमाजीआप्पास लिहिले "हत्ती कोणास न देणे" गजरज "हत्ती पवारापासून तजबिजेने बसावयास अगर निशाणास म्हणून अगत्य मागून घेणे आम्ही लिहिनेसे कलो न देणे ! मोबदला पाहिजे तरी त्यास येकादा मेलभून देणें" (पे. द. भा. ९, प न ५३)
१७२४ साली सरदार कंठाजी कदम व त्याचा सरदार भाऊ रघोजी कदम याना पेशव्याकडे अनुकूल करून घेण्याचे प्रयत्न सुभेदार पिलाजी जाधवामार्फत लावले त्या वेळीं कदमाच्या सहाय्याची पेशब्यास फारच निकड होती. 'सरजामाची बोली जे तुम्ही मान्य केली असेल तेणेप्रमाणे चालवू परतु या सभ्यात पाचसातशे ज फौज येतील तेवच्यानिशी यावे परतु सरदार कंठाजी कदम आलियाने 'सर्व सरजाम देण्यास बाजीराव तयार झाला, तरी एक विशिष्ट हत्ती होता तो द्यावयास मात्र तयार होना. त्याबाबत ब्ररीच घासाघीस झाली बाजीरावाच्या मनात परस्पर निजामाकडूनच एखाद्या उत्तम हत्ती सरदार कंठाजी कदमास द्यावा असे होतें! पण समजूत होईना, तेव्हा अखेर बाजीरावाने हताश होऊन लिहिलें कीं, "राजश्री कठाजी कदम येतील त्यास हत्ती नबावापासूनच देऊ म्हणजे हत्ती दिले म्हणून दिलासा होतो व लौकि कहि होतो पण है तुमचे चित्तास येत नसेल रघोजीस तोच हत्ती पाहिजे असला तर अपाय काय। जे तुम्ही बोलिले तें खरें न करार्वे तरी काय !" राक्षसभुवनाच्या लढार्थीत राघोबाचा हत्ती निजामाने गर्दी करून बळ- वून नेला, त्या वेळीं तो सोडवून आणण्यासाठी एकदा म्हणतील तें बक्षीस माधवरावाने कबूल केले. त्या वेळीं शितोळ्याने राघोबादादाचा हत्ती परत वळवून आणतों, पण त्यासाठी 'बसता' हत्ती दिला पाहिजे, अशी अट घातली ! 'बसता' हत्ती म्हणजे पेशव्याच्या खास स्वारीचा हत्ती ! अखेर शितोळ्याने पराक्रमाची शर्थ करून राघोबाचा हत्ती परत आणला व माधवरावानेहि त्यास आपल्या स्वारीचा 'रामबाण' हत्ती
बक्षीस दिला। टिपूवरील मोहिमेत पेशव्याचे सेनापति हरिपत फडके व निजाम याची ओके ठिकाणी समारसमाने भेट झाली, त्या वेळीं पेशब्या- तर्फे निज मास अक इत्ती नजर करण्यात आला पण त्या वेळीं 'इणवत गज' हाच इत्ती पाहिजे असा इट्ट निजामाने कसा धरला होता तो प्रसग वाचनीय आहे.
हत्ती है' अशी दुर्लम चीज असल्यामुळे ती गमावणें, शत्रूने लुटून
नेणे किंवा अकस्मात् अपघाताने मरणे या गोष्टी अनिष्टसूचक अपशकुना-
सारख्या समजल्या जात. अफझलखानाचे अदाहरण याबाबत प्रसिद्धच
आहे. तो मुहूर्ताने विजापुराबाहेर डेरेदाखल झाला आणि त्याच वेळीं
त्याचा निशाणाचा फत्तेलष्कर हत्ती वारला ! हा मोठाच अप-
शकून सुरुवातीसच घडला. अज्ञानदास शाहिरानेहि त्याचा असा उल्लेख पोवाडा मधून
केला आहे.
"खान कटकबद केला । कोटाबाहेर डेरा दिला। मोठा अप
शकून झाला । फत्त्यालस्करा हत्ती मेला। खचर गेली बाच्छायाला। बिनीचा
हत्ती पाठविला ! ।।”
थोरल्या शाहूमहाराजाचा "मदारी नावाचा नामााकत
हत्ती अपघाताने मेला तेव्हा शाहूमहाजाना धसकाच बसला व ही आपल्या
अतकाळाची नोटीसच असे ते समजले
. "मदारी बहुत चागला होता
सर्वकाळ मस्ती राहावी परतु कडवे होभू नये, माणूस किंवा जनावर मारू
नये, जैसे दौलतींतील केवळ रत्नच होतें. तो हत्ती रात्रीस सुटून बाहेर
जाऊन शनवारात विहीर होती त्यात माहूत व लोक मागे (लागले)
असता पडला आणि निवर्तला. त्यामुळे महाराज बहुत खिन्न जाले आणि
बोलिले जे याभुपरी आमचा काळविपर्यास होल. अडुसष्ट होऊन
सत्तरींचा सुमार जाला, पोर्टी पुत्र नाही, श्रीपतराव प्रतिनिधि आणि
मदारी हत्ती आपल्या राज्याचीं रत्नै गेलीं ! बाजीराव वगैरे सरकारकून
गेले !! असा विचार करून खिन्न होऊन वैराग्य येथून सातारा सोडून
बनवासवाडीस जाऊन राहिले!" (चिटणीस, पृ. १२३ व १२५).
शिंद्याजवळ" जन्हेरगज नावाचा
एक नामाकित इत्ती होता, दत्ताजी
शिंदे ज्या लढार्जीत ठार पडला त्या लढाईत शिंद्याची दाणादाण
झाले व सर्वं बुनगे खजाना रोहिले दुराण्यानी लुटून नेले. "
तळावर बुनगे व हत्ती भरी होते त्याजवर येथून मिठी वसली. ते समर्थी
हत्तीवरील माहूत अश्रू आले होते. त्यानी क्षणभर फोर्जेत रणदल करूनमारामार केली. तो माहूत गोळी लागून खाली येताच हत्ती मोकळे झाले ते त्याजकडे सहजच हस्तगत जाले. त्यात एक बडेमहात याने "जव्हेरगज "म्हणोन "बरा नामी हत्ती जलद व मर्द होता तो दोन कोसपर्यंत काढलाहोता पण अखेर तोहि शत्रूने वळवून नेलाच. लक्ष्मीनारायणाने पाचखाशानिशी दोन को सपर्यंत "जव्हेरगज निघाला होता तेथपर्यंत पाठलागकेला. तो तैयेदि दुराणीची मिठी बसली. मराठे हत्ती सोडून चालले.बडे माहूत याने पुष्कळ लोकाना सांगन पाहिले की 'यारहो, तुम्ही दम खा हा वेळपर्यंत थ
पर्यंत हसी आणला. आता निमावूनन्या परतु 'मराठे मनुष्य पळू लागल्यावर कोणाची और नाहीशी होते ।राने सावळे सकटने तरी तेवढ्याने शादास बाघले असता शाहिघेवून बारा कोस जातील तेथे हत्ती जिन्नस काय ? शेवटी बडेखाम्हणाला, "तुम्ही दम खात नाही तर आता माझा तरी तमाशा पहा.असे म्हणोन माघारा फौजेत लटोन दुराणीची फौज होती त्यात हत्तीचालवून क्षणभर भारामारी केली पण अखेर त्यानी भाले लावून बडे माहूत
पाडाव करून नेला !" हाच हत्ती पुढे पानिपतच्या लढाईनंतर झालेल्या लढाईत शिंद्याची हत्ती परत लुटीत मिळाला " त्या दिवशी शिंदेयाचा आनंद कोठवर वर्णावा?" असे बखरकाराने अभिमानाने लिहून ठेवले आहे ।
लढायात शत्रूनेच आपले हत्ती छुटून नेले, तर ती नाज
निलाजाचीगोष्ट, परतु अरवी अशी खोट बसू नये म्हणून शक् ती दक्षता घेण्यातये. एकदा कर्नाटक मोहीम ात तिकडील कडक हवा बाधूनच पेशव्याचे १५॥ १६ हती मेले । त्याचा पत्रक सदाशिव पुरदरे लिहिती,"कि हवा फारच जहाल, लष्करचे हत्ती १५॥ १६ मेले. हत्ती मेले,घोडे मरतात, महागाई मोठी, असा प्रकार आहे" (राजवाडेसड १४, पत्र न. ७५)
हची हा अफाट ताकदीचा प्राणी असला, तरी सतत चालीला किंवा मोठ्या मजलीना तो जात नाही, .

🔥🔥 छत्रपती शिवाजी महाराजांची वसतिस्थाने🔥🔥

 

🔥🔥 छत्रपती
शिवाजी महाराजांची वसतिस्थाने🔥
🔥लेखन :संतोष झिपरे

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीच्या किल्ल्यावर झाला व माहुलीच्या वेढ्यानंतर मोगलांशी तह झाला तेव्हा शिवनेरीचा किल्ला राजश्री शहाजीराजे भोसलेने मोगलाच्या ताब्यात दिला आणि यावेळी किंवा या वेळेपर्यंत शहाजीराजेच्या कुंटुंबातील मडळी शिवनेरीला राहत होती असा उल्लेख पादशाहानाम्यात आहे यावरून राजमाता व बाल शिवबा शिवाजी याचे राहणे या सहा वर्षांत शिवनेरीच्या किल्ल्यांत होते-द. प. आ
_____________
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा २०२४
_______________
यानतर शहाजीराजेच्या ताब्यांतून शिवनेरीचा किल्ला गेला व शहाजी विजापूरकराचा नोकर बनला ; तेव्हा त्यांना पुणे प्रांताचा मोकासा मिळाला व त्यापैकी कर्यान मावळाचा पोट मोकासा शिवाजीच्या नावाने करण्यात आला(खंड १८, पृ. ४४) शिवाय मावळचा काही भाग जहागिरीदाखल मिळाला :त्यात खेडे बारे शहाजीराजेच्या ताब्यात आले. यामुळे राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी यांना कसबे खेडे बारे येथे शहाजीराजेच्या मसलतातून ठेवण्यांत आले तेव्हा ते बापूजी मुदगल नन्हेकर याच्या वाड्यात रहात होते(पुरंदरे दे. भा. ३ पू. १३०) पुढे यांच्याकरितां तेथे स्वतंत्र वाडा बांधण्याचे
ठरले; तेव्हां कसब्यांतील कांही वाण्यांची व कुळांची घरें ऊठवावी लागली व याकुळांना वसाहतीला जागा द्यावयाची होती म्हणून कसब्याच्या शिवारांत कांही अंतरावर नवी पेठ वसविण्यात आली; व त्या पेठचे नाव 'शिवापूर' असे ठेवण्यांतआले. बाल शिवाजीच्या नांवे ही जी शिवारपूरची पेठ वसविण्यांत आली तो हीच...
तेथे राहाणाऱ्यांना बारा वर्षे पर्यंत अनेक प्रकारच्या सवलती दिल्या होत्या. यामुळे तेथे वस्ति वाढ झाली.
अशा प्रकारे राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी यांची वास्तव्य स. १६३७ पासून
काहीं दिवस कसबे खेड येथे झाली असता सरलष्कर शहाजीराजेच्या कर्नाटकच्या स्वारीत गुतला होता, त्या परिसरात तेथे बंगळूरचा किल्ला जहागिर मिळाला व नंतर तो १६३९ मध्ये देशी आला व तेव्हा परत तो बगळूरास गेला, नतर राजमाता जिजाऊ साहेब व बाल शिवाजी ही मंडळी त्याच्याबरोबर गेली होती (शि. भा. अ ९ श्लो. ६०)यानंतर बाल शिवाजीच्या बाराव्या वर्षी म्हणजे अि. स. १६४१ मध्ये पुण्याकडील भागाची जहागीर बालशिवाजी महाराजांच्याच्या नावे करण्यात आली व तो आईसह बगंळूराहून महाराष्ट्र देशी आला. तेव्हा त्याचे राहणे कसबे खेड येथे होते व या नतर शिवाजीच्या साठी त्याचा वाडे पुण्यात बांधण्यास सुरवात झाली तो म्हणजे लाल महाल(पे. द. भा. २२ ले. २९२). नतर स. १६४४ मध्ये शहाजी महाराष्ट्र देशी आला होता पुढील काळात त्याच्यावर
विजापूर दरबारची गैरमर्जी झाली; (प. सं. ले २४९८); परतु त्याच्यावरील आरोप खोटा ठरून आदिलशाही कडून फर्जंद हे किताब देऊन सरलष्कर शहाजीराजेची रवानगी पुनः कर्नाटकात झाली. पुढे शिवापूर वसविल्यापासून१०व्या वर्षी म्हणजे . स १६४६ मध्ये शहाजीराजेच्या वतीने खेडेबारे तर्फेवर बाल शिवाजी महाराजांच्या नावानें दिलेले हुकूम सापडतात यावेळी शहाजीराजे कर्नाटकात स्वारीवर गुतला असल्या कारणानें पूर्ण व खेडे बारे येथील व्यवस्था लावण्याचे काम राजमाता जिजाऊ व बाल शिवाजीकड होते; व या सुमारास त्याने कोंडाण्याचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला पुढे शहाजीराजेची कैदेतून सुटका करण्यासाठी शिवाजीराजेला कोंडाणा व त्याबरोबर खेडेबारे व शिरवळ येथील ठाणी देखीलविजापूरकरांच्या ताब्यांत द्यावी लागली (पुरं. द भा. ३, पृ. १३१) तेव्हांपासूनशिवाजी राजे यांची वस्ति खंड कसब्यांतून हालून पुण्यास गेली.
_____________
राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य:- संतोष झिपरे
_______________
. स. १६४९ ते १६५३ पर्यंत चार पांच वर्षे शहाजीराजे व थोरले संभाजीराजे देशी पुर्ण ते विजापूर भागांत होते. अर्थात मोहीम वर होते अर्थात् तेव्हां

🔥🔥 छत्रपती
शिवाजी महाराजांची वसतिस्थाने🔥🔥
पुणे, सुपा व इंदापूर जहागिरी व्यवस्था शिवाजीराजे हा आपले वडील शहाजीच्या तर्फे चा व्यवस्थापक हे नातें . स. १६५५पर्यंत टिकले. त्यानतर राजश्री शिवाजी महाराजांच्या स्वतंत्र हालचाली सुरू झाल्या. त्यासुमारास महाराजांचे ठाणे पुण्याहून पुरंदर किल्ल्यावर नेण्यांत आले. स. १६५४ च्या ऑगस्ट नतर घडली य;परंतु नंतर म्हणजे कोणत्या महिन्यांत हे सांगण्यास साधन नाही. पुढे . स.१६५७ मध्ये महाराजांनी खेडे बारें व कोंडाणा किल्ला या भागांत पुनः अंमल बसविला व राजगड, तोरणा येथे किल्ले बांधण्यास सुरवात केली, आणि संभाजीचा जन्म स १६५७ च्या १४ में महिन्यांत पूरंदर येथे झाला, यावरून तोपर्यंत त्या किल्लयावर महाराजाचे राहणें असावे असा तर्क करता येतो. पुढे . स. १६५७ पासून शिवाजीराजे राजगडास राहूं लागले.
राजगड येथे त्यांचे ठाणे पुष्कळ वर्षे टिकलें. कारण रायगडावर घरें व तळी बांधण्यास स. १६७१-७२ मध्ये सुरवात झाली त्याअर्थी त्यानतर 'मराठे राज्याचे ठाणे रायगडावर गेले व तो किल्ला राजधानीचे शहर बनला. अर्थात इ. स. १६७२ ते १६८० पर्यंत महाराजाची फक्त शेवटचीआठ वर्षे रायगडास गेली. अशा रीतीने शिवाजी महाराजांच्या वसतिस्थानांचा अनुक्रम ठोकळ मानानें सागता येतो तो असा
इ. स. १६३०-६:-
शिवनेरी
इ. स. १६३७-४९ :-कसबे खेड
इ. स. १६४०-४१:- बंगळूर
इ. स. १६४२-४९:-
कस खेड
इ. स.
१६४९-१६५५:- पुणे
इ. स. १६५६-१६५७:- पुरंदर
इ. स. १६५८-७१:-
राजगड,
इ. स. १६७२-८०:-
रायगड,
वसतिस्थानांच्या अनुक्रमाच्या दृष्टीने सांगितलेले हे कालखंड शिवचरित्रातील घडामोडीच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे टप्पे आहेत. पण या लेखाचा तो विषय नसल्यामुळे येथे त्यांचे वर्णन करण्याचे कारण नाही. तसेच दक्षिण दिग्विजय च्या छत्रपती शिवाजी महाराज एक दीड वर्ष कर्नाटक व, आंध्र प्रदेश व तामिळनाडू राज्यातील भागात होते पण तो लष्करी मोहीम होते म्हणून सदर रायगडावर म्हणून लेखात उल्लेख केला आहे

कर्नाटकांतील मोहीम

 कर्नाटकांतील मोहीम

लेखन :संतोष झिपरे



दक्षिणियांची पातशाही दक्षिणीयांचे हाती राहे
!!छत्रपती शिवाजी महाराज व कुतुबशहा भेट!!
कुतुबशहाच्या प्रदेशात गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्व सैन्यासह अशी सक्त ताकीद देऊन ठेविली होती
की, 'कुतुबाशाही राज्याच्या सरहद्दीत पाय ठेवालवर त्या प्रातातील नये जे जेथ मुकाम होईल तेथे दाणावरण, लकूडफाटे
बगेरे लागणारा सगळा माल खरेदीने विकत घ्यावा रयतेच्या एका काडी-
सहि स्पर्श करु नये ही हुकूम कोणी लुटाफार केल्यास त्याला कडक
शिक्षा होईल' ह्या हुकुमाकडे दुर्लक्षित करून कोणी कुतुबशहाच्या रयनेस त्रास
दिला असता त्याच्ण हातानी वाटे किवा सबद हात तोडावा, व गुन्हा फारच
मोठा असल्यास त्याचा शिरच्छद करावा असे करू लागत्यामुळे सर्व सैन्यास
धाक लागून कुतुबशहाच्या रयतेम यक्तिचित्हि उपसर्ग लागेनासे झाले ही
इकीगत कुतुबशहाच्या कानी जाऊन त्यास मोठे समाधान वाटलें
_______________
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
______________
छत्रपती शिवाजी महाराजाची स्वारी भागानगर जवळ आल्याचे कळले तेव्हा त्याना सामोरे जाण्यासाठी कुतुबशहा तान्हाशहा यांनी आपले वजीर मादण्णा व भाऊ आकण्णा यास व इतर मातबर अमीर उमरावस मोठ्या लवाजम्यानिशीं नगराबाहेर कित्येक मैलपर्यंत सामोरें पाठविले त्यानीं महाराजास वाजतगाजत नगरापाशीं आणिलें. तेथे त्याच्या सगळ्या सैन्यानें तळ दिला दुसरे दिवशीं छत्रपती शिवाजी महाराज व कुतुबशहाची मुलाखत
घण्याचे ठरले' ह्या भेटीस जाण्याच्या वेळी महाराजानीं आपल्या निवडक
लोकास मोठे उंची पोषाख दिले त्याना मोत्याचे तुरे, सोन्याची कड़ीं, नवीं झगझगीत चिलखते वगैरे लष्करी जामानिमा देऊन त्यास मोठ्या पिढीजाद उमरावाप्रमाणें सजविले त्याचे हत्तीघोडेहि बहुमोल अलंकारादिकानी रागा- रिले ह्याप्रमाणे एकाद्या बादशहास शोभेशी मोठ्या थाटाची स्वारी तयार कन्न महाराजानी पन्नास हजार सैन्यानिशी नगरप्रवेश केला तिकडे कुतुबशहानेहि सर्व नगर गुगारावयाम लावून गुढ्या , तोरणे व पताका जिकडेतिकडे उभारायास व वाद्ये वाजवावयास सागितले नगरातील एकदर लोकाना छत्रपती शिवाजी महाराजास व त्याच्या एकाहून एक शूर, बलाढ्य व पराक्रमी सरदारास पाहण्याची अत्यत उंत्कटा वाटून सर्व रस्ते लोकाच्या गर्दीन अगदी भरून गेले ज्यान। उत्तरेकडील व दक्षिणेतील पातशहातीस हतवीर्य केले, ज्यानीं अदिल- शहाच्या दरबारास विलाप करावयास लाविले, ज्यानी दिल्ली दरबारच्या अमीर- उमरावास व खुद्द मोगल बादशहास घाबरवून सोडलें, ते महा प्रतापी वीर छत्रपती शिवाजी महाराज डोळनी पाहून नागरिकाच्या हृदयात धाक व कौतुक ह्या वृत्ति उद्भवणे स्वाभाविक होते सगळ्याचे डोळे अथात् छत्रपती शिवाजी महाराजाकडे लागले होते त्याच्या सभोवती त्याचे मंत्री व सरदार होते ते दृष्टीस पडले ह्मणजे प्रेक्षकजन " शिवछत्रपतीचा सदा विजय असो ! " असे शब्द दीर्घ स्वराने उच्चारीत रस्त्यातील घराच्या गच्यावरून वगैरे प्रजा सोन्या रुप्याच्या पुष्पाची वृष्टि होऊं लागली मधून मधून सुवासिनी बाया पुढे येऊन त्यास आरत्या ओवाळीत व पुरुष मंडळी येऊन त्यास पुष्पहारानी मडित करीत छत्रपती शिवाजी महाराज ह्या सत्काराने परम संतोष पावून आपल्या दोन्ही हाताने सोन्या रुप्याची नाणी मुठीनीं रस्त्याच्या दोन्ही बाजूंस उधळीत चालले जागो जाग सुवासिनी बायास व गृहस्थास ते वस्त्राभरणें नजर करीत गेले. हिंदू प्रजा छत्रपती शिवाजी महाराजांनी मुजरा करण्यासाठी नतमस्तक होऊ लागले महाराजानी त्या दिवशी नगरातील एकदर गोरगरीब व फकीर यास मुबलक खैरात केलीकेली. छत्रपती शिवाजी महाराज व कुतुबशहाची
ही मुलाखत होण्याची जागा दादमहालावर ठरून तेथे बादशहानें बैठकीची वगैरे सुदर व्यवस्था करविली होती ह्या महालाजवळ महाराजाची स्वारी पोचल्यावर आपला सगळा लवाजमा खालीं जय्यत उभा ठेवून महाराज स्वत कांहीं
कारभा-यानिशी कुतुबशहाच्या महालात गेले. बादशहा माडी उतरून खालीं येऊं______________
तळटीप:-१ जेध्याच्या शकावलींत ह्या भेटीची तारीख सन १६७७ चा मार्च महिना अशी दिली आहे
______________
लागला, त्यास त्यानी अर्से सागून पाठविलें कीं, आपण महालाखालीं येण्याची तसदी घेऊं नये वर गेल्यावर उभयतानी एकमेकास क्षेमालिगन दिलें व ते एकासनी बसले वजीर मादण्णा व आकण्णा हे जवळ बसले इतर सारे अमीर उमराव उभेच राहिले महाराजाबरोबर आलेले कारभारी हंवीरराव सरनोबत, रघुनाथ- पत, निराजीपंत, दत्तोपत वाकनीस व बाळाजी आवजी चिटणीसे एवढ्यास मात्र बसावयास सागितले कुतुबशहाच्या जनानखान्यातल्या बायाना महाराजास पाहण्याची उत्कंठा लागली असल्या कारणाने दरबाराच्या सभोवतालील खिडक्यास जाळ्या लावून त्यातून त्या त्याजकडे मोठ्या कौतुकाने टकमक पाहत होत्या नंतर काहीं वेळ बादशहाचे व महाराजाचे मोठ्या स्नेहभावाचे भाषण झालें बादशहाने महाराजाबरोबर आलेल्या एकदर सरदाराच्या भेटी घेतल्या व त्याचा यथोचित सन्मान केला त्याच्या सैन्याची शिस्त व वस्त्रालकार पाहून बादशहा फार खुष झाला मग त्यास व त्याच्या सगळ्या लवाजम्यास विडे व अत्तरगुलाब दिले महाराजास व त्याच्या मुख्य कारभायास व सरदारास बहुमोल जवाहीर, शिरपाव, हत्ती व घोडे बहुमानपुरस्मर नजर केले ह्या वेळी बादशहाने आपल्या हाताने महाराजाच्या अगास अत्तर लाविले व विडे दिले, आणि महाराज जावयास निघाले तेव्हा त्यास पोचवीत माडीवरून जिन्याच्या तळापर्यत तो खखाली आला ह्याप्रमाणे सुमारे प्रहरभर दादमहालात राहून बादशहाचा अतिप्रेमाचा आदरोपचार अनुभवून महाराज आपल्या लोकासह परत आपल्या मुक्कामासाठी तयार केलेल्या वाड्यात गेले वाटेने जाताना त्यानी पुन रस्त्यातील गोरगरिबास द्रव्यदान केले
ह्याप्रमाणें छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशहाच्या आदरातिथ्याने पूर्ण सतोष पावून दादमहालातून परत गेल्यावर त्या शहाचें चित्त अमळ स्वस्थ झाले. अफझुल खानासारख्या बलाढ्य सरदारास ज्याने एकट्याने गारद केला, शास्ताखानाची कडे- कोट बंदोबस्ताने आपल्या जनानखान्यात निजला असता ज्याने त्याच्यावर झडप घातली, औरगजेबासारख्या अतिप्रबळ बादशहाच्या भर दरबारात सभोवतालीं मोठे खंदे योद्धे नागव्या तरवारी घेऊन उभे राहिले असता ज्याने त्या बादशहाचा धिक्कार करण्यास मागेपुढे पाहिलें नाहीं, ज्याने सुरतेसारखी मातबर शहरे बिनहरकत लुटून फस्त केलीं, तो महावीर त्या निर्भय व ऐटीत
______________
तळटीप:-- सभासद महाराजाबरोबर दादमहालात गेलेल्या कारभा-यापैकी सोमजी नाईक, बसनागार व जनार्दनपत याची नार्वे आणखी देतो
_______________
कर्नाटकांतील मोहीम
आरामात आजन्म निमग्न असलेल्या शहाच्या मुलाखतीस आला असता त्याच्या मनाला केवढा धाक वाटला असावा हे काहीं येथे सागावयास नको. तरी ह्या भेटीच्या अतीं त्याची अशी खात्री झाली की,छत्रपती शिवाजीमहाराज खऱ्या दिलाच्या मनुष्याशी खरेपणाने वागणारे असून आपल्याशी स्नेहसंबंध जोडावा अशी त्याची वास्तविक इच्छा आहे महाराजाचा जो वकील त्याच्या दरबारी होता त्याने आपणास फसविलें नाहीं व्ह्याबद्दल त्याने त्याला चागलें पारि- तोषिक दिलें
लेख व माहिती संकलित अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य

!!गाढवे- गाढवे देशमुख घराणे!!

 !!गाढवे- गाढवे देशमुख घराणे!!
भाग-१

लेखन :संतोष झिपरे



१) सरदार मलोजी ऊर्फ मालोजी गाढवे-हे यास मौजे पाडली, मौजे. बोरगाव येथे छत्रपती कडून शेते सनदी होते
२) सरदार मळोजीराव गाढवे- इनाम
३) सरदार यशवंतराव गाढवे- यास चिटणीस पत्रातून उल्लेख सापडतो.
४) सरदार पुजांजीराव गाढवे -यांचे पत्रातून उल्लेख आढळतो.
५) सरदार पदाजीराव गाढवे-हे शिरवळ येथील गाढवे घराण्यातील होते.
६) सरदार पुजांजीराव गाढवे-हे शिल्लेदार पथकातील सरदार होते. तसेच यास छत्रपती कडून इनाम होते.
७) माणकोजीराव कुसाजीराव गाढवे देशमुख. - खंडाळा येथील देशमुखी कारभार करताना दिसतात.
८) सरदार सुलतानजीराव गाढवे- हे यास लष्करी मोकासा होते
९) सरदार धुलोजीराव गाढवे -काही पत्रातून उल्लेख आढळतो पण गाव कोणत आणखी सापडले नाही
१०)सरदार नाईकजीराव गाढवे -बद्दल माहिती विविध पत्रातून उल्लेख आढळतो
११) सरदार सखोजीराव गाढवे -यास इनाम दारावर होते,यांच्या बद्दल उल्लेख शिंदे घराण्यातील कागदपत्रे तून येत. जाखणगाव येथील हे घराणे......
१२) सरदार तुकोजीराव गाढवे-पत्रातून उल्लेख आढळतो. हो १७६१ पानिपतच्या युद्धात वीरमरण आले.
१३) सरदार संताजीराव गाढवे-छत्रपती घराण्यातील खाजगी कडील इनाम मध्ये उल्लेख येत
१४) सरदार कृष्णाजी गाढवे- हे सरंजामदार व इनाम पत्रातून उल्लेख आढळतो यास बोरगावकर गाढवे म्हणून ओळखले जाते
१५) सरदार लिंगोजी राव गाढवे-यास इनाम कागदपत्रे तून उल्लेख येत तसेच शिंदे सरदार सोबत उत्तर दिग्विजय हे सरदार राणोजीराव शिंदे सोबत होते यावेळी शिंदे व गाढवे नातेसंबंधांची उल्लेख आढळते
१६) सरदार केदार जी गाढवे- यास मोकासा होते येत प्रमुखांनी पुढील गावात उल्लेख सापडतात, मौजे पिपंलवडी, मौजे देवजली-देवळली, मौजे कोढिये
१७) सरदार पदाजीराव फिरंगोजी राव गाढवे-हे छत्रपती च्या कडून लष्करी कारवाई करताना दिसतात.
बहुतांश लष्करी खर्चाच्या हिशोबात उल्लेख सापडतो.
१८) सरदार जानोजीराव गाढवे- हे छत्रपती विशेषतः लष्करी कारवाई मध्ये सहभागी दिसतात या गाढवे घराण्यातील आणखीन तीन सरदार झाले आहेत.
_______________
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
लेख व माहिती संकलित संतोष झिपरे 9049760888
_________________
१९) निंबाजीराव व जिवाजी राव गाढवे हे बोरगाव येथे शेते सनदी छत्रपती कडून मिळाले.
२०) सरदार नागोजीराव गाढवे हे मौजे करनवडी येथील गाव इनाम दिले आहे .
२१) सरलष्कर सोबत हे दोन्ही भाऊ छत्रपती च्या सेवेत होते याबद्दल उल्लेख सातारा कर छत्रपती च्या लष्करी तील सरदार होते.
२२) सरदार देवजी गाढवे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते. बहुतेक यांचे काही भाऊबंद तंजावर येथे पण असावेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळात जी मातब्बर मंडळी व घराणे त्यांच्यासोबत होती ती सर्व सरलष्कर शहाजीराजांच्या विश्वास तील दिमंतातील होती
२३)बहिराप्पा गाढवे-
१३८] श्रीशंकर. २७ आगष्ट १७५६.

श्रीमंत राजश्री बाबूरावजीदादा स्वामींचे सेवेसी :-
पोष्य गोविंद बखले कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील क्षेम स्वामीचे कृपेकरून भादो शुध्द २ पावेतों छत्रपुरीं सुखरूप असो. यानंतर श्रीमंत राजश्री पंत स्वामीकडून पत्रें आलीं, लाखोटे दोन. ते छत्रपुरीहून मुजरत अजुरदार काशिदाची जोडी करून स्वामीकडेस लाखोटे पाठविले आहेत. घेऊन पावलियाचें उत्तर सत्वर पाठविलें पाहिजे. बहुत जलदीनें श्रींमंतीं उत्तर आणविलें आहे. तर कृपा करून उत्तर सत्वर पाठविलें पाहिजे. पेशजी दोनदां मिळोन दोन जोडिया काशिदांच्या पाठविल्या आहेत. पत्रें तों स्वामीस पावलींच असतील. परंतु, उत्तर श्रीमंतास न आलें. अजुरदार पावले न पावले हें कांहींच कळत नाहीं. सविस्तर उठिलें पाहिजे. पुणेयाहून आपण रुपये देविले ते छत्रपुरीं येणेप्रमाणें आह्मी श्रीमंतांचे लिहिल्याप्रमाणें देऊन त्यांची पावलियाची कबजें घेऊन पाठविलीं आहेत.

७००० देणें सातप्पा चव्हाण व दादशेट दि॥ मोरशेट वीरकर, मित्ती श्रावण वदि २
२००० देणें बहिराप्पा गाढवे दि॥ वर्धप्पाशेट वीरकर श्रावण वदि २ संवत् १८१२.
-------
९०००

येणेप्रमाणें नवहजार रुपये उत्तम, पुराणे छत्रपुरी देऊन, कबजें घेऊन आपणाकडे पाठविलीं आहेत. घेऊन पावलियाचें उत्तर पाठविलें पाहिजे. श्रीमंतास लिहावें कीं, छत्रपुरीहून कबजें नवहजारांची पाठविली ते पावलीं ह्मणून जरूर जरूर श्रीमंताचे पत्रीं लिहिलें पाहिजे. वरकड वर्तमान सर्व श्रीमंतांचे पत्रावरून विदित होईल. पत्राचें उत्तर सत्वर पाठवून अजुरदारांची विदा केली पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपालोभ कीजे. हे विनंती.
_______________
२४) माणकोजीराव कुसाजीराव गाढवे देशमुख यांचे उल्लेख छत्रपती सातारा महाराज यांच्या अभयपत्रातून येत हे खंडाळा येथील देशमुखी करताना दिसतात. क्रमंश
तळटीप- आजघडीला उत्तर हिंदुस्तानात असणाऱ्या गाढवे देशमुख घराण्यातील जो सरदार शिंदे घराण्याच्या सोबत होते हे जाखणगाव येथील आहेत . तसेच बोरगाव, मांडवे व पाडली हे जाधवराव घराण्यातील इनाम गाव आहे त पण या जाधवराव घराण्यातील मंडळीच्या सोबत गाढवे सरदार दिसतात कारण हे गाव सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांच्या कडे तसेच पुढे सेनापती चंद्रसेन जाधवराव, सेनापती संताजीराव जाधवराव यांचे वंश व वास्तव्य या तिन्ही गावातील जाधवराव यांचे वाडा होते व आहेत आजपण... तसेच विशेषतः सेनापती धनाजीराव जाधवराव व सेनापती संताजीराव घोरपडे यांच्या सोबत हे मडंळी होते यास पुष्टी मिळते

छत्रपती राजाराम महाराज

 

⛳⛳२४ फेब्रुवारी

छत्रपती राजाराम महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ⛳⛳
💐💐‌एका भयानक संकटात सापडलेल्या प्रत्येक दिवसागणिक सीमा आकासत चालल्या राज्याचे 19 वर्षाचा पोरसवदा छत्रपती एक 82 वर्षाच्या 22 सुभ्याचा स्वामी असलेल्या सम्राट सोबत लढा सुरू करतो स्वकीय परकीय व निसर्गाची आक्रमणे झेलत विश्वासघात सहन करत वेळ प्रसंगी आपल्या वडिलांनी घालून दिलेल्या नियम बदलत रयतेचे स्वराज्य टिकवून ठेवतो. आपल्या राज्य संपवायला आलेल्या बादशहाची राजधानी जिंकण्याच स्वप्न पाहतो व ते स्वप्न आपल्या सरदारांना सुध्दा दाखवतो व त्या साठी त्यांना प्रोत्साहित सुध्दा करतो.बादशहा विरुद्ध 10 ते 11 वर् संघर्ष चालू ठेवतो.असा मोठा लढा देऊन पण तो इतिहासत उपेक्षित राहिला .हाच महान प्रशासक म्हणजे शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज .💐💐
🏹🏹राजाराम महाराजांची आयुष्यतली पहिली लढाई जुन 1689 साली प्रतागडाच्या पायथ्याशी पार गावजवळ काकर खान नावाच्या मोगल सरदाराच्या विरुद्धात लढली . काकर खानाचे बळ जास्त असल्यामुळे त्यांना तिथून माघार घ्यावी लागली.
‌आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभिक काळामध्ये राजाराम महाराजांनी प्रचंड लष्करी डावपेच क संयोजनाच नमुना दाखवत महाराष्ट्र व दक्षिणेत कर्नाटक अश्या 2 फळ्या मोगलांच्या विरुद्धात उभ्या केल्या त्यामुळे बादशहाला त्याची ताकत व लक्ष दोन्ही विचलित करून दक्षिणेत पसरावी लागली व अपोपप महाराष्ट्रावरील आक्रमणाचा जोर कमी झाला.🏹🏹
⚜️⚜️ज्या प्रमाणे शाहजीराजेनी कर्नाटक मध्ये असताना हिंदू नाईकांना आश्रय देत होते त्याप्रमाणे राजाराम महाराजांनी स्थानिक हिंदू नाईकांशी संधान साधून त्याची औरंगजेबाच्या विरुद्धात फळी निर्माण केली. दक्षिणेमध्ये जिजी हे राजधानी बनली असताना व महाराष्ट्रातील जबाबदारी मोरोपंत वर जरी असली तर सुध्दा महाराज महाराष्ट्रातील मोहिमांचे नियोजन व सरदारांना आदेश देत हे त्यांनी 13 एप्रिल 1690 रोजी चांदजीराव पाटणकर याना लिहलेल्या पत्रामध्ये दिसुन येते. याच कालखंडात कृष्णा सावंत यांनी नर्मदा नदी पार करून उतरेत स्वारी केली.
राजाराम महाराजांच्या कालखंडात मराठे प्रबळ असणारे गडकोट आपल्या ताब्यात ठेवत व त्या परिसरातील ठाणी मोगलांच्या ताब्यात असत . फोजेची टाकत ही ठाणी ताब्यात घेण्यासाठी न वापरता मोगल मुलुखात धुमाकूळ घालून पैसा उभारण्याचा काम करत असत.⚜️⚜️
🌞🌞आपल्या सरदारांचे मनोधैर्य वाढवताना मल्हारजी भांडवलकर सेनापंचसहस्त्री यास 22 सप्टेंबर 1689 साली लिहलेल्या पत्रात महाराज लिहात की
" हे स्वामींचे राज्य तुम्हा मराठे लोकांचे आहे. आवघे मिलोन कस्त करिता तेव्हा गणिमाचा काये हिसाब आहे"
यातून राष्ट्रीय ऐक्याची भावना देत हे रयतेचे राज्य आहे व ते आपण सर्वांनी एकतर येवून लढा दिला तर टिकवणे सहज शक्य आहे याची जाणीव ते करुन देतात.
तसेच बाजी सर्जेराव जेधे याना पाठीवलेल्या पत्रात लिहितात
" गनिमाचा हिसाब काय आहे ! तुम्ही लोक जेव्हा मनावरी धरिता तेव्हा गनीम तो काय? गनिमास तुम्ही लोकी केला आहे. ते तुम्हीच लोक या राज्याची पोटतिडकी धरता तेव्हा (आम्ही) अवरंगजेबाचा हिसाब धरीत नाही."
यातून ते वतनाच्या लोभामुळ जेव्हा आपलेच लोक गनिमाला जाऊन मिळतात त्यामुळे गनिमाचे ताकत वाढून तो बलवान होतो अशावेळी जर स्वराज रक्षणासाठी जर सर्वजण एक आले तर शत्रूला परास्त करन हे सहज शक्य आहे .🌞🌞
🌙🌙पुरंदरच्या बेरडानाना अभयपत्र मध्ये म्हणतात
‌"तुम्ही पुरंदरची हवी(हेरगिरी) करून गाद हस्तगत करून देणे. कोन्हेविशी शक न धरणे . स्वामी तुमचे चालवतील आपले दिलासे असो देऊन एकानिस्टने स्वामीकार्य करणे ." ज्याप्रमाणे शिवरायांनी सर्वाना एकत्र करुन स्वराज्य स्थापन केले त्यापरामाणेच सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्या मध्ये रहाणाऱ्या लोकांमध्ये राष्ट्रभवना जागृत करून देत सर्व घटकांना एकत्र करून त्याना अश्वाशीत करून एक मोठा लढा उभा करत होते.🌙🌙
🔱🔱या सर्वांमध्ये महत्वाचं आणि शेजवलकरांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मुखोतगत असावं असं पत्र म्हणजे छत्रपती राजाराम महाराज यांनी हणमंतराव घोरपडे व कृष्णाजी घोरपडे याना लिहिलेलं पत्र या मध्ये शत्रूचा प्रदेश मारल्या नंतर चा सरंजाम सांगितला आहे . रायगड प्रांत,विजापूर ,भागानगर आणि औरणगाबाद घेतल्या नंतर प्रत्येकी 62,500 हणमंतराव घोरपडे याना व त्याचे पुत्र कृष्णाजीराव घोरपडे याना 12,500 चा सरंजाम. सर्वात महत्वाचं व मराठ्यांची मानसिक परिस्थिती किती बुलंद होती हे स्पष्ठ करणार म्हणजे जर दिल्ली काबीज केलींतर 2,50,00 चा सरंजाम हणमंतराव याना व त्यांच्या पुत्रांना 50,000 सरंजाम. यातून दिल्ली काबीज करण्याचं मराठ्यांचा स्वप्न दिसून येते.
छत्रपती राजाराम महाराजांनी सरंजाम पद्धतीला पुन्हा सुरवात केली पण त्यांनी सरंजाम देताना स्वराज्यमध्ये न देतात शत्रूच्या प्रदेशात दिला त्यामुळे शत्रूचा प्रदेश काबीज करण्याची जणू सरदारान मध्ये स्पर्धा सुरू झाली .यामध्ये सेनापती संताजी घोरपडे सेनापती धनाजी जाधव , हिमतबहादूर विठोजी चव्हाण, हबीराव मोहिते .अश्या अनेक मराठा सरदारांनी पराक्रमाची शर्थ केली व स्वराज्य रक्षण करत करत स्वराज्याचा विस्तार सुध्दा केला . या कठीण प्रसंगांमध्ये जेव्हा जिंजीला वेढा पडला होता तेव्हा तंजावरच्या शहाजी महाराज यांनी राजाराम महाराजांना वेळोवेळी मोलाची मदत केली . 🔱🔱
⚔️⚔️‌जिंजीहुन महाराष्ट्रा मध्ये परत आल्यानंतर औरंगजेबा विरुद्ध मोठा लढा उभाकरण्याचा मानस होता पण या शिवपुत्राच्या अकाली मृत्यमुळे मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामस खूप मोठे नुकसान झाले. पण त्यानंतर सुध्दा ताराराणी बाईसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढा देत रहिले व शेवटी अजिंक्य राहिले . He laughs best , who laughs last याप्रमाणे औरंगजेब शेवट पर्यंत विजयी हास्याची प्रतीक्षा करत राहिला पण ते काही त्याच्या चेहऱ्यावर दिसलं नाही. ⚔️⚔️
आशा या पराक्रमी मुत्सद्दी शिवपुत्रास जयंती दिनी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏
मा. श्री. रणजीत दादा जगताप
(अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश अध्यक्ष)
मा. श्री. संतोष झिपरे
अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे छत्रपती राजाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
संतोष झिपरे ९०४९७६०८८८

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...