विनोद जाधव एक संग्राहक

Friday 30 August 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 28

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 28
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------4

पुढे महाराज अधिक अधिक थकत चालले, व त्यांना उदराची व्यथा होऊन त्यांचे हातपाय सुजले. त्यामुळे त्यांचा अंतकाळ अगदीं समीप आला. बायजाबाई व त्यांचे बंधु महाराजांच्या बिछान्यासन्निध एकसारखे बसले होते. व राजवाड्यांतील सर्व सेवकजन महाराजांच्या प्रकृतीबद्दल चिंतातुर होऊन खिन्नवदन झाले होते. अखेर माघ वद्य ७ शके १७४८ रोजी महाराजांच्या प्रकृतींत चलबिचल फार दिसू लागली. त्या वेळीं महाराजांनी मेजर स्टुअर्ट ह्यांस बोलावून आणण्याबद्दल हिंदुरावांस आज्ञा केली. त्याप्रमाणे हिंदुरावांनीं ताबडतोब घोडेस्वार पाठवून रेसिडेंट साहेबांस पाचारण केले. रेसिडेंट साहेब आल्यानंतर, कांहीं वेळ त्यांची भेट व शेवटचे संभाषण झाले. नंतर रेसिडेंट साहेब कांहीं वेळ महाराजांस विश्रांति देण्याकरितां दुसरीकडे जाऊन बसले. महाराजांच्या प्रियपत्नी बायजाबाई लगेच महाराजांजवळ आल्या. तों महाराजांनी त्यांच्याकडे करुणमुद्रेने पाहून, त्यांचा व त्यांच्या बरोबर आपल्या अखिल प्रजाजनांचा शेवटला निरोप घेतला. महाराजांस देवाज्ञा होतांच राजवाड्यांत जो आकांत झाला, तो वर्णन करणे कठीण आहे. त्याचे १ ह्या दानधर्माचा वृत्तांत शमसूल अखबार' ह्या पत्रांत प्रसिद्ध झाला होता. तो वाचून ‘एशियाटिक जर्नल' मधल्या एका लेखकाने पुढे लिहिल्याप्रमाणे उद्गार काढिले आहेत:- “Here is a Chief, once powerful enough to inspire the British , Government with apprehension, risking his throne and his life. ) by wasting upon idle Brahmans money which is due to his sh dependents !-Page 373. ह्या लेखकास हिंदुचालीरीतीचे ज्ञान नसले पाहिजे असेच ह्मणावे लागते !!

Thursday 29 August 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 34


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 34
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------10

दौलतराव हे सर्व हिंदुलोकांप्रमाणे धर्माच्या बाबतींत परधर्मीयांशी फार सौम्यपणाने वागत असत. ते स्वतः कर्मनिष्ठ होते, परंतु मुसलमान साधूंविषयी व त्यांच्या देवस्थानांविषयी त्यांची पूज्य बुद्धि असे. त्यांनी मुसलमानांच्या पिरांचीं व फकिरांचीं वर्षासने चालविली होती. ग्वाल्हेर येथील शाह मनसूर ह्याच्या स्थानाबद्दल त्यांची पराकाष्ठेची भक्ति असे. ८. ह्याचे कारण, त्या अवलियाने महादजी शिंदे ह्यांस, दिल्लीपर्यंत तुला राज्य दिले आहे” असा वरप्रसाद दिला होता. त्याप्रमाणे पुढे घडून आलें, ह्मणून शिंद्यांच्या घराण्यांत त्या अवलियाविषयीं भक्तिभाव उत्पन्न झाला. तो अद्यापि चालू आहे. दौलतराव हे पुढे पुढे उदास झाले होते असे दिसून येते. त्यांच्याविषयीं एका युरोपियन गृहस्थाने अशी एक गोष्ट लिहिली आहे की, * इ. स. १८०७ सालीं एकदा धूमकेतू निघाला. त्या वेळी दौलतरावांच्या मुत्सद्दयांनीं व ब्राह्मणमंडळींनीं, राजे लोकांस हे अनिष्ट असून, कांहीं फेरफार होणार असे भाकित केले. त्या वेळीं दौलतराव शिंदे यांनी असे उत्तर दिले की, “माझे आतां कांहीं अनिष्ट होण्यासारखे राहिले नसून, माझ्या स्थितीमध्ये झाला, तर कांहीं इष्टच फेरफार होईल !! इ. स. १८०३-४ सालीं जनरल वेलस्ली व लॉर्ड लेक ह्यांनी दौलतराव शिंदे ह्यांचा पराभव करून सुर्जीअंजनगांवच्या तहामध्ये त्यांचे स्वातंत्र्य हरण केले, त्या मानहानीस अनुलक्षून हे उत्तर होते. दौलतराव शिंदे ह्यांचा काळ शास्त्रीय शोध व ज्ञानप्रसार ह्यांचा नसल्यामुळे, पाश्चिमात्य देशांतील कलाकौशल्य व शास्त्रीय सुधारणा ह्यांचे त्या वेळी लोकांस अपूर्व कौतुक व चमत्कार वाटत असे. अर्थात् शास्त्रीय शोधांच्या प्रगतीची लोकांस कल्पना नसल्यामुळे, पाश्चिमात्यवस्तू पाहून त्यांची मति थक्क होऊन जात असे; व ते शास्त्रीय ज्ञानाच्या अभावी असंस्कृत व भोळसर तर्क लढवून आपलें हास्यकारक अज्ञान मात्र व्यक्त करीत असत. त्यामुळे अनेक गमतीचे प्रकार वारंवार घडून येत असत. इ. स. १८१० सालीं, शिंद्याच्या दरबारचे ब्रिटिश रेसिडेंट मेजर मालकम ह्यांनीं, दौलतरावांकरितां एक उत्कृष्ट चार चाकी बगी इंग्लंडाहून तयार करून आणिली; व ती चार करड्या रंगाचे आरवी घोडे व त्यांचे उत्तम प्रकारचे कातडी सामान ह्यांसह त्यांस नजर केली. दौलतरावांनी व त्यांच्या दरबारी मंडळीने अशा प्रकारचा अश्वरथ पूर्वी कधीही पाहिला नव्हता. त्यामुळे त्यांस फार चमत्कार वाटला, व त्यांत कदाचित् दारूगोळा भरून ठेवला असेल असे समजून, त्यांनी त्या गाडीमध्ये प्रथम फकीर लोक बसविले ! अर्थात् मोठ्या प्रेमादरानें नजर केलेल्या बहुमूल्य अश्वरथांत फकीर बसलेले पाहून ब्रिटिश रेसिडेंटास काय वाटले असेल, ते निराळे सांगावयास नकोच. ह्याचप्रमाणे आणखी एक अशीच मजेची गोष्ट घडून आली. एकदां रेसिडेंटानें दौलतराव शिंद्यांकरितां एक भव्य व सुंदर तंबू तयार करवून त्यांस नजर केला. तो पिवळ्या रंगाचा असून त्याच्या अंतर्भगीं कांचेच्या तावदानांच्या प्रशस्त व रमणीय अशा खोल्या केल्या होत्या. ह्या तंबूमध्ये दौलतराव शिंदे ह्यांनी एक मोठा मेजवानीचा समारंभ केला. त्या दिवशीं, कर्मधर्मसंयोगाने, रोषनाई करितांना मशालजीच्या नजरचुकीने त्या तंबूस आग लागली, व तो सर्व जळून गेला. परंतु ही गोष्ट कोणाच्याच लक्ष्यांत न येऊन, जिकडे तिकडे अशी बातमी पसरली की, तंबूच्या कनातींमध्ये कळीच्या तोफा, दारूगोळा, व शस्त्रे ठेविली होती. त्यामुळे तो तंबू पेटून खाक झाला !! तात्पर्य, अशा गोष्टी त्या काळीं फार घडून येत असत, व त्यांच्या योगाने मराठी राज्यांत ज्ञानप्रसार कमी होता हे व्यक्त होत असे.Image may contain: one or more peopleNo photo description available.Image may contain: one or more peopleImage may contain: indoor

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 33


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 33
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------9

दौलतराव शिंदे ह्यांच्या कालामध्ये ज्ञानप्रसार कमी असल्यामुळे ग्रंथवाचनाची अभिरुचि बेताचीच असे. त्यामुळे मनाचे रंजन करण्याची साधने व मार्ग हीं वर्तमानकालाप्रमाणे नसून, गाणेबजावणे व नाचरंग ह्यांवर त्या वेळी फार बहार असे. दौलतराव शिंदे हे संगीताचे६१ फार शोकी असून, त्यांच्या जवळ गानकलासंपन्न गुणिजन फार अंसत. त्यांच्यापुढे गवयी व कलावंतिणी ह्यांची हजिरी लागली नाही असा एकही दिवस जात नसे. ते ह्या कलेतील पूर्ण रसज्ञ असून, ध्रुपदांचे मोठे भोक्ते होते, अशी ख्याति असे. त्यांना उद्यानविहाराचाही फार नाद असे. ग्वाल्हेरच्या सभोंवतीं त्यांनी अनेक बागबगीचे केले असून नेहमी तेथे वनभोजने व वनक्रीडा चालत असत. दौलतराव शिंदे ह्यांस दोन बायका होत्या. परंतु त्या दोघींमध्ये त्यांची बायजाबाईवर फार प्रीति असे. त्यामुळे बायजाबाईसाहेब नेहमी त्यांच्या सन्निध असत. त्या स्वतः चतुर व कुशाग्रबुद्धि असल्यामुळे दौलतराव शिंदे ह्यांच्यावर त्यांचे फार वजन असे. दौलतराव शिंदे हे हरहमेषा राजकीय अथवा घरगुती गोष्टींमध्ये त्यांची सल्लामसलत घेत असत. बायजाबाई ह्यांचे दौलतरावांवर विशेष वजन होते ह्याचे कारण एका इंग्रज गृहस्थाने असे दिले आहे की, “ बायजाबाई ह्या राठोर रजपुतांच्या उच्च कुलांतील असल्यामुळे व दौलतराव हे कमी प्रतीच्या मराठ्यांच्या कुलांतील असल्यामुळे, केवळ कुलभेदामुळे ।। त्यांना एवढे वर्चस्व प्राप्त झाले. परंतु हे कारण सयुक्तिक नाहीं. ३८ , कां कीं, केवळ कुलाच्या उच्चतेमुळे बायजाबाईचे दौलतरावांसारख्या ८ पाणीदार व ऐश्वर्यसंपन्न पतीवर वर्चस्व बसलें नसून, त्यांच्या अंगचे विशिष्ट गुणच त्याला कारण झाले होते. दौलतराव शिंदे ह्यांचे स्वतःच्या दरबारांतील मुत्सद्यांशीं व परराज्यांतील वकिलांशीं जें वर्तन असे, ते फार प्रतिष्ठेचे व सभ्यपणाचे असे. मोठमोठ्या राजकारस्थानांच्या गोष्टींबद्दल देखील जो वादविवाद व जी संभाषणे व्हावयाची, ती ह्या दरबारच्या आदबीमुळे, दिवाणाच्या«Her descent was from the Rahtore Rajpoots, which alone gave he great power over him, as he was of lower caste.” मार्फत होत असत. तात्पर्य, प्रत्येक गोष्टींत त्यांचे सौजन्य दिसून येत असे. इंग्रजी रेसिडेंटाचा ते फार सत्कार ठेवीत असत; व त्यांस क्वचित् प्रसंगी मेजवान्या देत असत. ।Image may contain: one or more people

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 32


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 32
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------8

महाराज दौलतराव निवर्तल्यानंतर त्यांचा उत्तरविधि राजकीय थाटाने झाला. महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांस आपल्या प्रियपतीचे चिरकालिक वियोगदुःख सहन करण्याचा भयंकर प्रसंग प्राप्त झाला. परंतु त्यांनीं, धीर न सोडतां, मोठ्या शांतपणाने ते सहन करून, आपल्या यजमानांच्या आज्ञेप्रमाणे संस्थानची राज्यसूत्रे लवकरच आपल्या हाती घेतली. | बायजाबाईसाहेबांनी महाराज दौलतराव शिंदे ह्यांच्या दहनस्थानावर एक सुरेख छत्री बांधून त्यांचे ग्वाल्हेर येथे चिरस्मारक करून ठेविले आहे. ह्या छत्रीच्या खर्चाकरितां त्यांनी सालीना दहा हजार रुपयांची नेमणूक करून दिली आहे. ती अद्यापि चालत असून त्या छत्रीचा प्रतिवार्षिक उत्सव मोठ्या थाटाने होत असतो. दौलतराव शिंदे शरीराने धट्टेकट्टे असून त्यांची उंची ५-५॥ फूट होती. त्यांचा वर्ण काळा असून, चेहरा वाटोळा व नाक किंचित् चपटें होते. तथापि एकंदर चेहरा दिसण्यांत भव्य आणि परोपकारशील असा दिसे. त्यांची वर्तणूक फार आदबीची असून त्यांस आदरसत्कार फार प्रिय असे. त्यांचा पोषाख व एकंदर चालचलणूक पाहून, पुष्कळ५० युरोपियन लोक, त्यांची इंग्लंडच्या आठव्या हेन्री राजाशी तुलना करीत असत. त्यांचे पागोटें लहान व पिळदार असून, ते सध्यांच्या ग्वाल्हेर दुरबारच्या चालीप्रमाणे कलते घालण्याचा त्यांचा परिपाठ असे. त्यांचा पोषाख फार साधा असे. एक तलम झिरझिरीत पांढरा आंगरखा व गुडघ्यापर्यंत लांब असा रेशमी तंग चोळणा हीं फक्त त्यांच्या पोषाखाचीं दोन वस्त्रे असत. त्यांच्या गळ्यामध्ये बकुळाएवढ्या पाणीदार मोत्यांचे व तेजस्वी पाचांचे फार मूल्यवान् कंठे असत. दौलतरावांस मोत्यांचा फार शोक असून, नेहमीं उत्तम मोत्ये पाहिली की, त्यांचा संग्रह केल्यावांचून ते राहत नसत. त्यांच्या मोत्यांच्या आवडीवरून त्यांस लष्करांतील लोक मोतीवाले महाराज” असे विनोदानें ह्मणत असत. | हे शिकार करण्यामध्ये फार निष्णात असून, त्यांचा काल बहुतेक घोड्याच्या पाठीवर वाघांची शिकार करण्यांत जात असे. नेम मार ण्यांत त्यांचा हातखंडा असे. नदीच्या कांठीं तासांचेतास बसून मासे 17 धरण्याचाही त्यांना नाद असे. घोड्यावर बसण्यांत व भाला मारण्यांत हे पटाईत होते. हे दोन गुण त्यांच्या सहवासाने बायजाबाई ह्यांच्या अंगीं पूर्णत्वेकरून वसत होते. ते जातीने आळशी स्वभावाचे असून सदां ऐषआरामांत राहण्याची त्यांना संवय असे. अगदी बालवयामध्ये त्यांच्या हातून कांहीं क्रूरपणाच्या व कडक गोष्टी घडल्या; परंतु पुढे केव्हाही तशा गोष्टी करण्यास ते सहसा प्रवृत्त होत नसत. ते स्वधर्मनिष्ठ असून पाटीलबावांप्रमाणेच मोठे कृष्णभक्त होते. सकाळसंध्याकाळी देवपूजा वगैरे करण्याचा त्यांचा नित्य नियम असे.Image may contain: one or more peopleImage may contain: 1 person

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 31

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 31
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------7
महाराजांच्या अंत्यविधीचा देखावा फारच हृदयद्रावक व शोककारक होता. महाराजांचे शव पालखीमध्ये घालून त्यावर उंची पोषाख व रत्नांचे व मोत्यांचे अलंकार घातले होते. त्यांचे तोंड मोकळे ठेवले असून जीवंत मनुष्याप्रमाणे त्यांस बसविले होते. त्यांच्या ह्या शेवटच्या स्वारीचा समारंभ दरबारी थाटाप्रमाणे असून, त्यांच्या पालखीबरोबर हत्ती, घोडे, डंका निशाणे वगैरे सर्व चालले होते. लष्करांतील प्रत्येक माणूस त्यांच्या प्रेताबरोबर होता. तात्पर्य, त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यास फारच गर्दी झाली होती. सर्व प्रजाजन महाराजांच्या मृत्यूमुळे अत्यंत४८ शोकाकुल होऊन गेले होते; व त्यांच्या नेत्रांतून एकसारख्या अश्रुधारा चालल्या होत्या. त्यावरून महाराजांविषयी त्यांची किती प्रीति होती ह्याची साक्ष पटत होती. दौलतराव शिंदे हे चांगल्या राजास लागणाच्या सर्व गुणांनी जरी परिपूर्ण नव्हते, तथापि ते दुष्ट किंवा क्रूरकर्म करणाच्या राजमालिकेंत गणले जाणारे नव्हते. त्यांच्या ठिकाणीं शहाणपण किवा समजूत ह्यांची उणीव नव्हती. ह्मणूनच महाराष्ट्रसाम्राज्यरूपी नौकेचा भंग झाला असतांना त्यांचे संस्थान सुरक्षित राहिले. ते फार शूर व रसिक होते. अनेक भाषणप्रसंगी ते ज्या उपमा आणि जे दृष्टांत देत असत, ते फार मार्मिक व आनंदप्रद असत. त्यांचा स्वभाव । अतिशय सौम्य व शांत होता. तारुण्यावस्थेत त्यांचे दुर्गुण व प्रमाद \J कितीही असले (आणि त्याबद्दलचा सर्व दोष महाराजांपेक्षा त्यांच्या कुटिल मंत्रिमंडळाकडे अधिक येतो असे मला वाटते. ), तथापि त्यांच्या पुढील कारकीर्दीत, त्यांच्या हातून नीतीचा मोठासा भंग होण्यासारखी एकही गोष्ट घडली नाहीं. दुर्लक्ष्य व आळस हे त्यांचे दोन मोठे दुर्गुण होते. ते त्यांस राजपदाची कर्तव्यकर्मे उत्तम रीतीने बजावण्यास सदैव आड येत असत. एकंदरीत, हिंदुस्थानांतील एवढी मोठी विस्तृत सत्ता त्यांचे हातीं अवघे चौदा वर्षांचे अल्प वय असतां आली; व त्यांचे सर्व बालपण, त्या काळच्या मराठी लष्कराचे लक्षण होऊन राहिलेल्या ‘विश्वासघात' व 'लुटालूट' ह्यांच्या देखाव्यांत गेले; ह्या दोन गोष्टी लक्ष्यात घेतल्या, ह्मणजे त्यांच्या कारकीदाँत घडलेल्या पुष्कळ चुका व दोष हे क्षम्य होते, असे मानण्यास हरकत नाहीं. ह्या पत्रांतील कांहीं भाग नेहमीच्या सरकारी पत्रव्यवहाराच्या मर्यादेपेक्षा अधिक लिहिला गेला आहे; तथापि ह्या प्रसंगाचे महत्त्वच तसे आहे असे समजून, त्याबद्दल क्षमा होईल अशी आशा आहे. ज्या संस्थानिकाचा व माझा पुष्कळ दिवसांचा परिचय आहे, व ज्याचे वर्तन अलीकडे मज४९ बरोबर अगदी स्नेहभावाचे होते, त्याच्या मृत्यूचे वृत्त लिहितांना माझी हृदयवृत्ति द्रवून जाणे साहजिक आहे. तसे न झाले तर मला खरोखर पाषाणहृदयीच व्हावे लागेल. त्याचप्रमाणे, मृत्युसमयीं त्याने ब्रिटिश सरकारच्या न्यायीपणाबद्दल व औदार्याबद्दल जो अमर्याद विश्वास दाखविला, ती त्याच्या मृत्यूबरोबर घडलेली एक महत्त्वाचीच हृदयद्रावक गोष्ट समजली पाहिजे.” ह्या खलित्यावरून मेजर स्टुअर्ट हे सुस्वभावी गृहस्थ असून, एतद्देशीय संस्थानिकांविषयीं त्यांच्या मनांत किती आदर बुद्धि वसत होती, हे चांगले दिसून येते. असो.संबंधित इमेज

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 30

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 30
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------6
‘ह्यानंतर पुढे जो शोककारक देखावा दृष्टीस पडला, त्याचे बरोबर वर्णन माझ्याने देववत नाहीं. स्त्रियांचे आक्रंदन व पुरुषांचे शोकस्वर ह्यांच्या योगाने राजवाड्यांत जिकडे तिकडे जो आक्रोश व जो गोंधळ उडाला, तो वर्णन करणे अशक्य आहे !
२० तारखेच्या खलित्यांतील शेवटच्या कलमांत कळविल्याप्रमाणे, मी महाराजांच्या प्रेताची पुढील तयारी होई तोंपर्यंत, राजवाड्यांत राहण्याचा निश्चय केला, व त्याप्रमाणे हिंदुराव व तेथे हजर असलेले दरबारचे प्रमुख लोक ह्यांनीही मला विनंति केली. राजवाड्यामध्ये जिकडे तिकडे दुःखाचा देखावा दृष्टीस पडत होता; तथापि त्यांतल्या समाधानाची गोष्ट एवढीच कीं, सती जाण्याची तयारी कोठे आढळून आली नाही. ज्या वेळी एखादी स्त्री आपल्या प्राणपतीबरोबर सती जाण्याचा विचार करित्ये, त्या वेळी तिच्या दुःखास एक प्रकारचे गंभीर |आणि उदात्त स्वरूप येत असते. मग ती त्या वेळीं नेत्रांतून दुःखाश्रू ढाळीत नाहीं, किंवा मोठ्यामोठ्याने धाय मोकलून रडत नाहीं. मग । ती आपला तोंडावरचा पदर एकीकडे सारून सर्व लोकांपुढे येते व आपला निश्चय व्यक्त करते. अशा प्रकारचे चिन्ह मला बिलकूल दिसत | नव्हतं. ह्मणून, जेव्हां बायजाबाई महाराजांबरोबर सहगमन करणार अशी बातमी माझ्या कानावर आली, तेव्हा त्यांचा प्रतिबंध करण्यास फार कठीण जाणार नाही अशी मला खात्री वाटत होती. ह्या कारणा- ४७ स्तव मला बाईसाहेबांजवळ नेण्यांत आले. त्या वेळी त्यांची व माझी भेट फक्त एका पातळ पडद्याच्या अंतराने झाली. । “त्या प्रसंगी मी जे काय भाषण केले, ते येथे सविस्तर देण्याची आवश्यकता नाहीं. ह्या भाषणाचे शेवटीं, महाराजांनी मला मरतेवेळीं जें सांगितले आहे, त्याप्रमाणे सर्व राज्याचा अधिकार मीं धारण केला आहे, व आतां तुह्मीं आपल्या निवासस्थानी जावे अशी माझी इच्छा आहे, असे मी सांगितले. परंतु त्याप्रमाणे घडले नाही. शेवटीं बायजाबाई ह्यांस राजवाड्यांतील सर्व स्त्रियांना हातीं धरून अंतःपुरांत न्यावे लागले. ‘पुढे कांहीं वेळाने रेसिडेंट ह्या नात्याने मजकडे एक सात कलमांचा खलिता पाठविण्यांत आला. हे महाराजांचे शेवटचे मृत्युपत्र ह्मणून आले होते. परंतु त्यावर महाराजांची सही नव्हती. ह्यांतील मुख्य मुद्यांचा आशयः–महाराजांचा हेतु दत्तकपुत्र घ्यावा; हिंदुराव ह्यांनी सर्व राज्याचे व्यवस्थापक(Superintendent ) व्हावे; औरस पुत्र झाल्यास तो गादीचा अधिकारी व्हावा; व न झाल्यास दत्तक पुत्राने, महाराज व बायजाबाई हे जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत त्यांच्या आज्ञेत चालावे; इत्यादि होता. आणि शेवटीं, ह्या सर्व गोष्टी सिद्धीस नेण्यास ब्रिटिश सरकाराने साहाय्य करावे, अशी विनंति केली होती. |संबंधित इमेज

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 29

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 29
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------5

मेजर स्टुअर्ट ह्यांनी हिंदुस्थान सरकारास पाठविलेल्या आपल्या खलित्यांत सविस्तर रीतीने केले आहे. ते प्रत्यक्ष अनुभवाने लिहिले असून करुणरसाने ओतप्रोत भरले आहे. तेच येथे सादर करितोंः
काल सकाळी ९ वाजण्याचे सुमारास, महाराजांच्या राजवाड्यांतून एक घोडेस्वार रसिडेन्सीमध्ये मोठ्या त्वरेने भरधांव घोडा फेकीत आला. त्याने हिंदुरावांचा असा निरोप कळविला कीं, * महाराज साहेबांनीं आपणांस भेटण्याची उत्कट इच्छा व्यक्त केली आहे. ह्याकरितां, आपण एक क्षणाचाही विलंब न लावितां, ताबडतोब राजवाड्यांत यावे. हा निरोप ऐकतांच, महाराजांचा अंतकाल अगदी समीप येऊन ठेपला असे वाटून, मी लगेच घोड्यावर बसलों; आणि क्याप्टन डाईक ह्यांस फक्त बरोबर घेऊन तत्काल राजवाड्यांत गेलों. राजवाड्यांत जातांच चिंताक्रांत झालेला हजारों लोकांचा समुदाय माझे. दृष्टीस पडला. राजवाड्यांत प्रवेश करितांच निरनिराळ्या दालनांमध्ये सरदार, मानकरी व इतर सभ्यलोक जमा झालेले दृष्टीस पडले. हिंदुरावांची व माझी भेट होतांच, महाराजसाहेबांची प्रकृति कशी काय आहे असा मीं प्रश्न केला. हिंदुरावांनीं (* महाराज फार अत्यावस्थ आहेत; आपण लवकर भेटावे. ” असे उत्तर दिले. माझे व हिंदुरावांचे हे भाषण होत आहे, तोंच महाराजांच्या अंतःपुरांत, मी आल्याची वर्दी पोहोंचून, महाराजांनी मला आंत येण्याबद्दल पाचारण केले. तेव्हां मी लगेच महाराज ज्या खोलीमध्ये होते तेथे गेलों. मजबरोबर हिंदुराव, रावजी खाजगीवाले, आत्माराम पंडित व आणखी एक दोन गृहस्थ होते. क्याप्टन डाईक हेही मजबरोबर आंत आले. महाराज पलंगावर लोडाला टेकून बसले होते, किंवा पडले होते, ह्मटले तरी चालेल. त्यांच्या सभोंवतीं पुष्कळ दासी व नौकर लोक होते. त्यांच्या पलीकडे पडद्यांमध्ये बायजाबाई, रखमाबाई आणि बाळाबाई ह्या होत्या. महारा४९ जांच्या चेह-यामध्ये फार फरक झालेला पाहून मला एकदम वाईट वाटले. त्यांचे हात व शरीराचा वरील भाग अगदी कृश झाला होता. पोट व पाय फार सुजले होते. मी त्यांच्याजवळ गेलों व त्यांचा हात मी आपले हातात घेतला. आणि ते काय शब्द उच्चारतात ते ऐकण्याकरितां मी त्यांच्या तोंडाजवळ आपले डोके नेले. त्यांच्याने प्रथमतः कांहीं बोलवेना; ह्मणून ते स्तब्ध राहिले होते. शेवटीं, कांहीं वेळाने त्यांनी स्पष्ट व मोठ्याने, तेथील सर्व लोकांस व पडद्यांमध्ये देखील ऐकू जाईल अशा रीतीनें, ६ जो तुम मुनासीब, सो करो ?? ( तुह्मांस जे योग्य वाटेल ते. तुह्मी करा ) हे शब्द उच्चारिले. ते ऐकून मी महाराजांस उत्तर दिलें कीं, ८ महाराजांच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट केली जाईल. नंतर मीं त्यांचे थोडे सांत्वन केलें; व परमेश्वराच्या कृपेने अद्यापही महाराजांच्या प्रकृतीस आराम पडेल, अशी आशा दर्शविली. ह्या वेळीं महाराजांस फार गहिंवर आला, व त्यांनीं आपके देखनेसे, और आपके मोहबतसे– एवढे हृदयद्रावक शब्द उच्चारिले. परंतु पुढे त्यांच्याने ते वाक्य पुरें करवलें नाहीं. पुढे पुष्कळ वेळ ते स्तब्ध राहिले. शेवटीं मीं ६ महाराज साहेबांस आणखी कांहीं मला कळविण्याची इच्छा आहे की काय ??? असे विचारले. त्या वेळी त्यांनी पुनः“बहुत तेरासा कहना है” (आपल्याला पुष्कळ सांगावयाचे आहे ) असे शब्द उच्चारिले. परंतु पुढे पुष्कळ वेळ त्यांच्याने कांहीं बोलवेना. तेव्हां मीं असा विचार केला की, दुसन्या खोलीमध्ये आपण कांहीं वेळ जावें, व महाराजांस थोडीशी हुषारी वाटली व बोलण्याची थोडी शक्ति आली ह्मणजे पुनः त्यांच्या जवळ यावें. ते तेथील मंडळीस पसंत पडले. मी उठलों न उठलों तोंच, बायजाबाईनीं पडद्यांतून “डा० प्यांटन ह्यांस बोलावून आणवावें अशी सुचना केली. तेव्हां मी, महाराजसाहेबांची तशी इच्छा आहे४६
की काय, ह्मणून पुनः प्रश्न केला. त्यास महाराजांनीं 'होय' ह्मणून अस्पष्ट खुणेनें उत्तर दिले.
महाराजांनी ह्या प्रसंगीं जें जें भाषण केले, ते मी अक्षरशः कळवीत आहे. ह्याचे कारण, ते त्यांचे अगदी शेवटचे शब्द होत. मी दुस-या माडीवर जाऊन एक तास झाला नाहीं, तोंच राजवाड्यांतील स्त्रियांचा रुदनखर ऐकू आला; व त्याने महाराजांचा अंत झाला असे कळविलें!दौलतराव शिंदे साठी इमेज परिणाम

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 27


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 27
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------3

जुना काळ व जुना इतिहास ज्या गोष्टी शिकवीत आहे, त्या गोष्टींची हिंदुस्थानच्या सुधारलेल्या वर्तमान स्थितींत उणीव असावी, ही मात्र खेदाची व आश्चर्याची गोष्ट होय. ह्यावरून, दौलतराव शिंद्यांच्या वेळचा धामधुमीचा काळ अधिक बरा असे ह्मणावे लागते. असो. दौलतराव शिंदे ह्यांच्या आजारीपणांत रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांनी संस्थानाच्या भावी व्यवस्थेबद्दल पुनः एकदा प्रश्न विचारला. त्या वेळी महाराजांनी असे उत्तर दिले की, “जर राजाची बायको शहाणी व समजूतदार असेल, तर त्याच्या पश्चात् त्याचा कारभार करण्यास तीच पात्र होय. त्या वेळीं रोसडेंट साहेबांनी पुनः विचारलें कीं, परंतु 2 "His boast was (and a most singular one it is, when we remember the low esteem in which women are held in all eastern countries ), that he never undertook an affair of importance without consulting her.” आपणांस दोन बायका आहेत, त्याचा विचार काय ?” महाराजांनी उत्तर दिले “होय. शिरस्त्याप्रमाणे माझ्या वडील पत्नीने माझ्या पश्चात् राज्याचा कारभार चालवावा हे खरे आहे. परंतु राज्यभार हातीं घेणाच्या बायकोच्या अंगीं शहाणपण, जगाचे ज्ञान, व्यवहारांतला अनुभव हे गुण असावे लागतात. ह्या सर्वांची तिच्या ठिकाणीं वानवा आहे. त्यामुळे ती राज्य करण्याचे काम अगदी अपात्र आहे. तिने फक्त राजवाड्यांत बसावे आणि दुवक्तां जेवावे. ह्यापेक्षां तिच्या अंगीं अधिक कांहीं नाहीं. अशा प्रकारें दौलतराव शिंदे ह्यांनी रेसिडेंट साहेबांशीं संभाषण करून आपल्या दोन्ही राण्यांविषयीं आपलें मत कळविले. त्यावरून मेजर स्टुअर्ट ह्यांची बायजाबाईंच्या योग्यतेबद्दल खात्री झाली; व आपल्या पश्चात् बायजाबाईनीं राज्यकारभार चालवावा अशी महाराजांची अंतःकरणपूर्वक इच्छा आहे, असे त्यांच्या निदर्शनास आले. मे० स्टुअर्ट ह्यांनी महाराजांजवळ आणखीही दोन चारवेळां ह्या प्रश्नाची वाटाघाट केली. परंतु ज्या ज्या वेळी हा प्रश्न निघाला, त्या त्या वेळीं महाराजांनीं, बायजाबाई शहाण्या व चतुर आहेत असे दर्शवून, “ह्या प्रश्नाचा ब्रिटिशसरकाराने वाटेल तो निकाल करावा; त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.” असेच सांगितले. . दौलतराव शिंदे ह्यांची प्रकृति दिवसेंदिवस फार बिघडत चालली. पौष महिन्यांत महाराजांनीं मेजर स्टुअर्ट व आग्रा येथील आपले युरोपियन मित्र ह्यांस संक्रांतीचा शेवटचा तिळगूळ पाठविला. बायजाबाईनीं संक्रांतीप्रीत्यर्थ बहुत दाने व देकार केला. ता० १३ जानेवारी रोजी त्यांनी हिंदुरावांस सांगून, काशीचे गंगापुत्र व मथुरेचे चोबे मिळून दोन हजार लोक बोलाविले. व प्रत्येकास एक शेर मिठाई, एक रुपया दक्षणा व लोटाभर तांदूळ देऊन सर्वांस संतुष्ट केले.त्याचप्रमाणे ब्राह्मणभोजने वगैरे घालून हिंदुचालीप्रमाणे सर्व दानधर्म, प्रायश्चित्ते व८2. गोप्रदाने केली. ह्या दानधर्माची कीर्ति त्या प्रांतीं बहुत झाली. ह्या-3 प्रमाणे बायजाबाईनी व हिंदुरावांनी महाराजांच्या जेवढ्या इच्छा होत्या - तेवढ्या सर्व उत्तमप्रकारे सिद्धीस नेल्या.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 26


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 26
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------2

दौलतराव शिंदे ह्यांस रखमाबाई व बायजाबाई ह्या दोन बायका होत्या. पैकीं वडील रखमाबाई ह्या फार साध्याभोळ्या व निरुपद्रवी अशा असून, राज्यशकट चालविण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगीं मुळींच नव्हते. बायजाबाई ह्या शहाण्या, राजकारणी, धूर्त, प्रसंगावधानी, आणि दृढनिश्चयी अशा होत्या; व त्यांनी आपल्या पतीस राज्यकारभार चाल विण्याचे कामीं पुष्कळ वर्षे साहाय्य केले होते. त्यामुळे महाराजांस सर्व । राज्यकारभार बायजाबाईचे स्वाधीन करावा अशी इच्छा वाटणे साहजिक आहे. परंतु तसे केल्याने, कदाचित् दरबारांतल्या कित्येक कारस्थानी व कुटिल लोकांस, हिंदुशास्त्राप्रमाणे रखमाबाईचा पक्ष घेऊन, तंटेबखेडे करण्यास संधि सांपडेल, व त्याचा परिणाम संस्थानास विनाकारण भोगावा लागेल, ह्मणून त्यांनी ह्या प्रश्नाचा निकाल स्पष्ट रीतीनें कांहींच केला नाहीं. बायजाबाईवर त्यांची अत्यंत प्रीति होती; व राज्य चालविण्यास लागणारे सामर्थ्य व इतर गुण त्यांच्या अंगीं वसत होते; ह्याचा त्यांनी अनुभवही घेतला होता. एवढेच नव्हे, तर स्त्रिया ह्मणजे १ भिल्ल साहेबांनी आपल्या इतिहासांतही ह्याचा उल्लेख केला आहेः The real cause of his reluctance, however, was his attachment to Baiza Bai, who had long exercised an imperious influence over his mind, and to whom he wished to bequeath the substantial authority of the state, although the opposition of the principal persons of his court, and probably some misgivings of the result, deterred him from declaring her his successor."-Mit's Histor of India, Vol. IX; Page 146. ४१ -- राजकारणास अयोग्य, त्यांची योग्यता फक्त गोषांत बसण्यापुरती, असला अनुदार विचार बायजाबाईच्या संगतीमुळे त्यांच्या अंतःकरणांतून पार नाहींसा झाला होता. डा० होप नामक शिंद्यांच्या दरबा- 3।। रांतल्या एका भिषग्वर्यांनी असे लिहिले आहे कीं, ‘‘दौलतराव शिंद्यांचा . असा अभिमान होता की, आपण कोणतीही महत्त्वाची गोष्ट आपल्या **** पत्नीच्या संमतीवांचून केली नाही. आणि पूर्वेकडील देशांतील पुरुष आपल्या स्त्रियांस किती कमी दर्जाने वागवितात हे लक्ष्यांत घेतलें, ह्मणजे हा अभिमान फारच अलौकिक होता, असे झटले पाहिजे.” अर्थात् डा० होपसारख्या परदेशीय गृहस्थांस दौलवराव शिंद्यांच्या ज्या अभिमानाचे फार आश्चर्य वाटले, त्या अभिमानाने पुष्कळ संस्थानिकांच्या अंतःकरणांत प्रवेश केला असता, तर बायजाबाईसारख्या किती तरी राजकारणी व चतुर स्त्रिया हिंदुस्थानांत चमकू लागल्या असत्यादौलतराव शिंदे साठी इमेज परिणाम

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 25


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 25
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांची कारकीर्द.--------------------------------10

पेंढारी लोकांचे बंड मोडल्यापासून मध्य हिंदुस्थानांत बरीच शांतता झाली. तेणेकरून शिंद्यांचे उत्पन्न २० लक्ष रुपये अधिक वाढले व इतर रीतीनेही पुष्कळ फायदे झाले. इ. स. १८१८ पासून दौलतराव शिंदे हे इंग्रजसरकाराशीं अत्यंत स्नेहभावाने वागून त्यांचे विश्वासू दोस्त बनले. त्यामुळे इंग्रजसरकारही त्यांचा उत्तम प्रकारचा मानमरातब ठेवीत असे. तात्पर्य, इ. स. १८१८ सालीं सर जॉन मालकम ह्यांनीं मध्यहिंदुस्थानामध्ये कंपनी सरकारची सार्वभौम सत्ता संस्थापित केल्यापासून इ. स. १८२७ सालापर्यंत, ह्मणजे दौलतराव शिंदे ह्यांच्या मृत्यूपर्यंत, ग्वाल्हेर दरबारामध्ये ह्मणण्यासारख्या विशेष गोष्टी किंवा राजकीय चळवळी कांहीं घडून आल्या नाहींत.
- दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------1
। म हाराज दौलतराव शिंदे ह्यांची प्रकृति इ. स. १८२६ च्या आक्टोबर महिन्यापासून बिघडत चालली, व ग्वाल्हेरच्या उत्तम
  • उत्तम राजवैद्यांचे औषधोपचार चालू झाले. महाराजांची प्रियपत्नी बायजाबाई ह्यांस महाराजांच्या प्रकृतीबद्दल फार काळजी उत्पन्न झाली. महाराजांविषयी त्यांचा फार प्रेमभाव असल्यामुळे त्या महाराजांच्या शुश्रूषेत अगदीं तत्पर असत. महाराज आजारी असल्याचे वर्तमान ग्वाल्हेरचे रोसडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांस व त्यांचे असिस्टंट क्याप्टन फ्लेमिंग ह्यांस कळल्यामुळे ते उभयतां महाराजांच्या समाचाराकरितां वारंवार राजवाड्यांत येत असत. महाराजांचा व मेजर स्टुअर्ट ह्यांचा चांगल्या प्रकारचा स्नेहसंबंध असून ते परस्परांशी मोकळ्या मनाने वागत असत. त्यांनी महाराज दौलतराव शिंदे आजारी असल्याचे वर्तमान रीतीप्रमाणे गव्हरनर जनरल साहेबांस कळविले. महाराज दौलतराव हे हिंदुस्थानांतील एका स्वतंत्र व बलाढ्य संस्थानाचे अधिपति असून, ते ब्रिटिश सरकाराशीं फार दोस्तीने वागत असल्यामुळे, त्यांच्याबद्दल हिंदुस्थान सरकारही फार मर्यादेने व प्रेमभावाने वागत असे. महाराज आजारी असून त्यांची प्रकृति दिवसेंदिवस क्षीण होत चालली हे पाहून, मेजर स्टुअर्ट ह्यांनीं, महाराजांस दत्तक पुत्र घेऊन गादीच्या वारसाची योग्य व्यवस्था
४० करावी, अशी वारंवार विनांत केली. परंतु त्यांना दत्तक पुत्र घेण्याची गोष्ट पसंत पडेना. ते वारंवार ह्मणत की, “माझी पत्नी जर राज्यकारभार चालविण्यास समर्थ आहे, तर मला स्वतःस दत्तक घेण्याची काय अवश्यकता आहे ??? अर्थात् महाराजांचे हे उत्तर ऐकले ह्मणजे त्यांच्यापुढे एक अक्षरही काढण्याची कोणाची प्राज्ञा नसे.दौलतराव शिंदे साठी इमेज परिणाम

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 24


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 24
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांची कारकीर्द.--------------------------------9

दौलतराव शिंदे ह्यांचे पदरीं सैन्य पुष्कळ असून जानबत्तीस, सवाई शिकंदर, पेरन वगैरे फ्रेंच सेनापति होते. त्याचप्रमाणे बापू शिंदे, देवबा काळे, जगु बापू, अंबाजी इंगळे वगैरे नामांकित मराठे सरदार होते. सर्जेराव घाटगे हे इंग्रजांच्या विरुद्ध असल्यामुळे १८०५ सालच्या तहाप्रमाणे त्यांस दरबारांतील मंत्रिमंडळांतून कमी_/- केले होते. परंतु पुनः त्यांनी दौलतरावांची मर्जी संपादन करून शिंद्यांच्या दरबारांत वर्चस्व प्राप्त करून घेतले होते. त्यांच्या अंगीं धारिष्ट व शिपाईगिरी हे दोन चांगले गुण होते. परंतु त्यांच्या इतर दुर्गुणांमुळे ते सर्वांस अप्रिय झाले होते. त्यांनी दौलतरावांच्या दरबारांत अरेरावी CALLIN 12. ३७ पणाचे वर्तन केल्यामुळे त्यांचा आनंदराव नामक सरदाराने व मानाजी फाकडे ह्यांच्या मुलाने ता. २७ जुलै इ. स. १८०९ सालीं वध केला. शिंद्यांचे सैन्य अतिशय असून प्रांताचे उत्पन्न व्यवस्थित रीतीने येत नसल्यामुळे त्याचा खर्च निभेनासा झाला. त्यामुळे दौलतरावांस आपला पुष्कळ प्रांत सैन्याच्या खर्चाकरितां कर्जदारांकडे गहाण ठेवावा लागला. एवढेच नव्हे, तर इंग्रजसरकाराकडून मिळणारे पेनशन व जहागिरीचे उत्पन्न सावकारांस लावून द्यावे लागले. त्यामुळे लष्करी अंमलदार शिरजोर झाले, व त्यांनी मन मानेल त्याप्रमाणे मनस्वी वर्तणूक केली. त्यामुळे राज्यांतील शिस्त व बंदोबस्त कमी झाला. पुढे इ. स. १८१७ सालीं पेंढारी लोकांची व इंग्रजांची लढाई झाली. त्या वेळीं मेजर मालकम ह्यांनीं, पुनः दौलतरावांबरोबर ता. ५ नोवेंबर १८१७ रोजी नवा तह करून, शिंद्यांचे सैन्य इंग्रज अधिका-यांच्या देखरेखीखाली ठेविलें; व रजपूत संस्थानिकांवरचे शिंद्यांचे स्वामित्व काढून घेतले. हा तह झाल्यानंतर होळकरांचा दंगा व बाजीराव पेशव्यांची धामधूम झाली. त्या प्रसंगी शिंद्यांच्या दरबारांतल्या कांहीं लोकांनी थोडी गडबड केली; परंतु खुद्द दौलतराव ह्यांनी इंग्रजसरकाराशीं बिघाड केला नाही. त्यामुळे बाजीराव पेशवे ह्यांचा त्यांजवर रोष झाला, व त्यांनी त्यांस रागाने असे पत्र पाठविले, कीं, “तुमचे तीर्थरूपांनी स्वामिसेवा एकनिष्ठपणे करून, दिल्लीची वजिरी संपादन केली व ते जगविख्यात होऊन गेले. त्यांचे चिरंजीव तुह्मी असून, कंपनीसरकाराशी स्नेह करून, आह्मांशीं कृतघ्न झाला. हे करणे तुह्मांस उचित नाहीं. ह्यापेक्षां तुह्मीं बांगड्या भरल्या असत्या, तर बरे झाले असते. आह्मांवर तूर्त प्रसंग गुदरला आहेच. आतां तुमचे ऐश्वर्य कायम राहणे कठीण दिसते ! ' बाजीरावांचे हे पत्र वाचून दौलतराव शिंदे ह्यांनीं विस्मय प्रदर्शित केला. परंतु त्यांनी त्या पत्राने प्रोत्साहित३८ होऊन इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचललें नाहीं. एकंदरीत त्यांनी ह्या वेळी जें वर्तन केले, तेच त्यांचे राज्य सुरक्षित राहण्यास कारण झाले.संबंधित इमेज

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 23

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 23
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांची कारकीर्द.--------------------------------8
दौलतराव शिंदे ह्यांचा व इंग्रजांचा जो रणसंग्राम झाला; त्यामध्ये बायजाबाई साहेबांनी प्रत्यक्ष रणभूमीवर किती कामगिरी बजाविली, हे समजण्यास मार्ग नाहीं. तथापि वेलस्ली साहेबांच्या सैन्याबरोबर टक्कर देऊन, त्यांनी आपले शौर्य व्यक्त केले असावें . असे मानण्यास जागा आहे. ह्या त्यांच्या तेजस्वितेचा परिणाम ह्मणून ह्मणा, किंवा दौलतराव शिंद्यांच्या प्रिय पत्नी ह्मणून ह्मणा, इंग्रज मुत्सद्यांनी वर निर्दिष्ट केलेल्या तहामध्ये पुढील कलम दाखल केले होतेः ‘कलम ९: उभयतां सरकारांनीं चंबल नदीची हद्द ठरविली; तेणेंकरून कंपनी सरकारास फायदा झाला; व महाराज अलिज्याबहादर त्या वेळी जनरल वेलस्ली ह्यांनी पुढीलप्रमाणे आपले मत मेजर माल कम ह्यांस कळविले होतेः I would sacrifice Gwalior or every frontier of India ten times over, in order to preserve our credit for scrupulous good faith, and the advantages and honour we gained by the late War and the peace; and we must not fritter them away in rouments drawn from overstrained principles of the laws of nations, which are not understood in this country. What brought me through many difficulties in the war, and the negotiations of peace? The British good faith, and nothing else.” Malcolms fe by Kaile Vol. I Page 269. ३६ दौलतराव यांची कंपनी सरकाराशी दोस्ती झाली. हे सर्व प्रकार मनांत आणून, कंपनीसरकार सालीना च्यार लक्ष रुपये खुद्द अलिज्याबहादुर दौलतराव ह्यांस पेनशन देण्याचे कबूल करीत आहेत. ही रक्कम रेसिडेंट मार्फत तिमाही हप्तेबंदीने महाराज अलिज्याबहादरांस आदा होत जाईल. ह्याशिवाय, महाराज अलिज्याबहादुर दौलतराव ह्यांच्या राणी बायजाबाईसाहेब ह्यांस, बाळाबाईप्रमाणे कंपनीसरकार आपले हिंदुस्थानांतील राज्यांत दोन लक्ष रुपयांची जहागीर व महाराजांची कन्या चिमणाबाई हिजला एक लक्षाची जहागीर एकूण तीन ( लक्षांची जहागीर देण्याचे कबूल करीत आहेत.” ह्या कलमाप्रमाणे बायजाबाईसाहेब व त्यांची कन्या चिमाबाईसाहेब ह्यांस कंपनीसरकारांतून स्वतंत्र जहागीर देण्यात आली. त्यावरून बायजाबाईसाहेब ह्यांचे माहात्म्य इंग्रज मुत्सद्दयांस पूर्ण विदित झाले असावे असे स्पष्ट दिसून येते. हा तह झाल्यानंतर दौलतराव शिंदे ह्यांनी उघडपणाने इंग्रजांच्या विरुद्ध कधींही शस्त्र उचलले नाही. त्यांनी १८०५ नंतर उत्तर हिंदुस्थानांत ग्वाल्हेर येथे आपल्या सैन्याचा तळ दिला होता. तेथेच इ. स. १८१० सालीं “लष्कर' गांव वसलें. हीच पुढे शिंद्यांची राजधानी झाली.No photo description available.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 22

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 22
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांची कारकीर्द.--------------------------------7

इंग्रजांचा रेसिडंट शिंद्यांच्या दरबारीं प्रविष्ट झाला; व इंग्रजांची कांहीं फौज शिंद्यांच्या मदतीकरितां त्यांच्या सरहद्दीवर येऊन दाखल झाली. सुर्जीअंजनगांवचा तह झाल्यानंतर पुनः इंग्रजांचा व शिंद्यांचा कांहीं दिवस बिघाड झाला. दौलतरावांनी यशवंतराव होळकर व रघुजी भोंसले ह्यांस सामील होऊन पुनः इंग्रजांविरुद्ध लढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो निष्फल होऊन अखेर त्यांस मेजर मालकम ह्यांच्या बरोबर ता. २२ नोव्हेंबर इ. स. १८०५ रोजी तह करणे प्राप्त झाले. ह्या तहामध्ये विशेषेकरून पूर्वीच्या तहांतील अटी मान्य करून क्वचित् फेरफार केले होते. पूर्वीच्या तहांत ग्वाल्हेर व गोहद प्रांत दौलतराव शिंद्यांस न देता, त्याबद्दल १५ लक्ष रुपयांची नेमणूक देण्याचा ठराव होता; परंतु ह्या तहनाम्याने ते प्रांत शिंद्यांच्या आग्रहास्तव त्यांस परत दिले. ह्या प्रांताबद्दल इंग्रज मुत्सद्दयांचा पुष्कळ वादविवाद होऊन, अखेर इंग्रजांचा नावलौकिक रक्षण करण्याकरिता ते त्यांस परत द्यावे असे ठरले. १ ह्या वेळचे सर जॉन मालकम, जनरल वेलस्ली वगैरे मुत्सद्दी इंग्रजांच्या नांवाबद्दल कशी काळजी बाळगीत असत, हे ह्यावरून शिकण्यासारखे आहे. ग्वाल्हेर व गोहद प्रांत शिंद्यांस देण्याबद्दल ज्या वेळीं भवति न भवति झाली, ३९ ह्या तहामध्ये मालकम साहेबांनी आणखी एक महत्त्वाचे कलम घातले होते. ते बायजाबाई संबंधाचे होय. बायजाबाई ह्यांचे दौलतराव शिंद्यांशी लग्न झाल्यानंतर, त्या नेहमी त्यांच्या लष्कराबरोबर त्यांचे सन्निध ५.८22--- असत; व त्यांच्या सर्व राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश असे. त्या त्यांच्या 25 स्वारीशिकारीबरोबर स्वतः जात असत. घोड्यावर बसणे, बंदूक मारणे, भाला फेकणे वगैरे शिपाईगिरीच्या गोष्टींमध्ये त्या तरबेज असत. त्यामुळे त्यांचे नांव इंग्रज सेनापति जनरल वेलस्ली व मेजर मालकम ह्यांस पूर्ण माहित झाले होते.संबंधित इमेज

Tuesday 27 August 2019

शिवाजी महाराजांची वंशावळ


📷





शुभम् सरनाईक (Shubham Sarnaik), बी.टेक. ATRI clg , Hyderabad
पुढील माहिती ही काही पुराणे , लोककथा तर काही ऐतिहासिक कागदपत्रांवर आधारित असेल जी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशवेलीची माहिती देते
  1. ब्रह्मदेव
  2. मरीची ऋषी
  3. कश्यप ऋषी
  4. विवस्वान / सूर्य
  5. श्राद्धदेव / वैवस्वत मनु
  6. ईक्श्वाकु ( अयोध्येचा राजा )
  7. विकुक्षी / शशाद
  8. पुरंजय / ककुत्स्थ
  9. अनेता / आयोधन / सुयोधन
  10. पृथु
  11. दृषदश्व / विश्वगाश्व
  12. आर्द / आद्र / चांद्र
  13. युवणाश्व
  14. श्रावस्त
  15. वत्सक
  16. बृहदश्व
  17. कुवलाश्व
  18. दृढाश्व
  19. हर्यश्व
  20. निकुंभ
  21. संहताश्व
  22. कृशाश्व
  23. प्रसेनजित
  24. युवणाश्व
  25. मांधाता
  26. पुरुकुत्स
  27. त्रसदस्यु
  28. संभूत
  29. अनरज्य
  30. त्रसदश्व
  31. हर्यश्व
  32. वसुमान
  33. त्रिधन्वा
  34. त्रय्यरूण
  35. त्रिशंकू
  36. हरिश्चंद्र
  37. रोहिताश्व
  38. हरित
  39. चंचू
  40. विजय
  41. भिरुक / करूक / रुरुक
  42. वृक
  43. बाहू
  44. सगर
  45. असमंजा
  46. अंशुमान
  47. दिलीप
  48. भगीरथ
  49. श्रुत
  50. नाभाग
  51. अंबरिष
  52. सिंधुद्वीप
  53. आयुताजित
  54. ऋतुपर्व
  55. सर्वेकाम
  56. सुदास
  57. सौदास / कलमाषपाद
  58. सर्वकर्मा
  59. अश्मक
  60. उरकाम
  61. मूलक
  62. शतरथ
  63. इडविड
  64. वृद्धशर्मा
  65. विश्वसह
  66. दिलीप
  67. रघु
  68. अज
  69. दशरथ
  70. प्रभू श्रीराम चंद्र
  71. लव ( लव ने लवकोट अर्थात आजचे लाहोर स्थापन केले व तेथे राजधानी नेली , त्याच्या वंशजांची नावे अजून माझ्या वाचनात आली नाही परंतु यवन आक्रमणानंतर ते गुजरात मध्ये आले व तेथे आदित्य राजवंश नावाने राज्य करू लागले नंतर त्यांच्या वंशातील ग्रहादित्य / गुहिल ने चित्तोडला गुहिलोत राजवंश स्थापला व रावल म्हणजे राजा ही वंशपरंपरागत पदवी लावली )
  72. ग्रहादित्य
  73. भोज
  74. महेंद्र
  75. नाग
  76. शील
  77. अपराजित
  78. महेंद्र
  79. कालभोज ( इतिहास प्रसिद्ध बाप्पा रावल )
  80. खुम्माण
  81. मत्तक
  82. भर्तृपट्ट
  83. सिंह
  84. खुम्माण
  85. महायक
  86. खुम्माण
  87. भर्तृपट्ट
  88. अल्लत
  89. नरवाहन
  90. शालिवाहन
  91. शक्तीकुमार
  92. अंबाप्रसाद
  93. शुचिवर्मा
  94. नरवर्मा
  95. किर्तीवर्मा
  96. योगराज
  97. वैराट
  98. वंशपाल
  99. वैरीसिंह
  100. विजयसिंह
  101. वैरीसिंह
  102. अरिसिंह
  103. चोड
  104. विक्रमसिंह
  105. रणसिंह ( रणसिंह ला दोन मूले होती ती राहप् व माहप् अश्या नावाची होती पैकी माहप् रावल अर्थात चित्तोड चे तर राहप् शिसोदा चे शासक झाले व त्यांनी राणा ही पदवी लावली व शिसोदिया वंश स्थापला )
  106. राहप्
  107. नरपती
  108. दिनकर
  109. जसकर्ण
  110. नागपाल
  111. कर्णपाल
  112. भुवनसिंह
  113. भीमसिंह
  114. जयसिंह
  115. लक्ष्मणसिंह ( राणा लक्ष्मणसिंह व त्यांचे ७ पुत्र अल्लाउद्दीन खिळजीशी लढत मारले गेले , तसेच चित्तोडचा रावल रत्नसिंह देखील मारला जाऊन त्याचा निर्वंश झाल्याने लक्ष्मणसिंहच्या जिवंत असलेल्या २ पुत्र अजयसिंह व अरिसिंह यांपैकीच एक चित्तोडचा वारस होता , पण अजयसिंहने अरिसिंह चा शूर मुलगा हंमीरसिंह यास राणा केल्याने अजयसिंहचे पुत्र सज्जनसिंह व क्षेमसिंह दक्षिणेत आले )
  116. अजयसिंह
  117. सज्जनसिंह
  118. दिलीपसिंह
  119. सिद्धजी / सिंहजी
  120. भैरवजी / भोसाजी ( यांच्या नावाने भोसले आडनाव पडले )
  121. देवराज
  122. उग्रसेन
  123. शुभकृष्ण ( वेरूळची जहागिरी मिळविली , यांच्या भावाचे करणसिंहचे वंशज स्वतः ला घोरपडे म्हणवतात )
  124. रुपसिंह
  125. भुमिंदजी
  126. धापजी
  127. बरहाटजी
  128. खेलोजी
  129. कर्णसिंह
  130. शंभुजी
  131. बाबाजीराजे
  132. मालोजीराजे ( पुणे , सुपे , चाकण , इंदापुरची जहागिरी मिळविली )
  133. शहाजीराजे
  134. छत्रपती श्री शिवाजी महाराज
। श्री भारत मातार्पणमस्तु ।

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...