विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label #शाहूंचा_सेवक_मायाजी_फडतरे. Show all posts
Showing posts with label #शाहूंचा_सेवक_मायाजी_फडतरे. Show all posts

Friday, 12 August 2022

मायाजी_फडतरे.

 

#छत्रपती_थोरले_शाहूराजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजे यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच मराठा साम्राज्यात रूपांतर करत अखंड 42 वर्ष हिंदुस्थानाभर सत्ता प्रस्तावित करणारे अजातशत्रू,हिंदपती.छत्रपती संभाजी राजांच्या हत्येनंतर 17 वर्ष शाहू राजे औरंगजेबाच्या नजर कैदेत होते,येसूराणी आणि शाहू यांनी खुप हालअपेष्टा कैदेत सोसल्या,आलमगीर च्या मृत्यू नंतर त्याच्या मुलाने शाहू राजांना सोडलं आणि मराठा मुलखात यादवी माजवून मराठे आपापसात लढवले.शेवटी शाहू राजांनी कर्तृत्व आणि बुद्धीच्या बळावर आपलं राज्य स्थापन करत पाहता पाहता दिल्लीवर स्वारी करत तिथल्या दिल्लीपती ची क्रूर हत्या घडवून आपल्या वडिलांच्या छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूचा बदला घेतला.कैदेतली आपली माणसं सोडवली आणि दिल्लीला संरक्षण देत मुघलांच्या हिरव्या परचेम सोबत लाल किल्ल्यावर भगवा फडकवला तो आजवर तिथं अभिमानाने तिरंग्याच्या रुपात फडकतोय.आपल्या 42 वर्षाच्या कारकिर्दीत शाहू राजांनी आपल्या सरदारांना प्रोत्साहन देऊन राज्यकर्ते घडवले असा किंग मेकर राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा नातू थोरले शाहू राजे.
शाहू राजांच्या दरबारात हजारो सरदार,लाखो सैन्य,शेकडो पराक्रमी योद्धे होते सोबतच राजकारण आणि राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी लागणाऱ्या बुद्धिमत्तेनी,चातुर्याने आणि मुद्सदीपणाने परिपूर्ण अश्या काही महान असामी होत्या त्यातील एक हुशार असामी म्हणजे #

मायाजी_फडतरे
.
शाहू राजांना प्राणी,पक्षी,शिकारी कुत्री पाळायचा छंद होता,त्यांनी राजवाड्यामाग एक माळावर कोंबड्या पाळल्या होत्या त्या कोंबड्या सांभाळण्यासाठी एक माणूस नेमला होता त्याला ते कोंबडे नावाने हाक मरायचे.कोंबड्याच्या माळावर एक बोका माजला होता,हा बोका रोज 2-3कोंबड्या फस्त करून सरकारच नुकसान करायचा.हुजरे कोंबडे यांनी बोक्याची तक्रार शाहू राजांना सांगितली.शिकारी मंडळी बोलावून मोठ्या कष्टाने बोका पकडला आणि एका पिंजऱ्यात कैद करून ठेवला.पकडलेल्या बोक्याला लांब कुठंतरी रानात सोडायची जबाबदारी शाहूंनी दरबारात हजर असलेल्या #मायाजी फडतरे यांना सांगितली.मायजींनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
#मायाजी_फडतरे यांनी त्या पिंजऱ्याला पालखी सारख सजवून काही लोकांना कामावर ठेवून ती पालखी घेऊन ते बोका लांब सोडायला घेऊन चालले.जो गाव रस्त्यात येईल त्या गावच्या पाटलाच्या,कुळकर्णी, देशमुख यांच्या वाड्याबाहेर थांबून त्यांना सांगायचे.
"शाहू राजांचा हा प्रिय बोका त्यांनी तुमच्या गावात सोडायला सांगितलाय, जेव्हा शाहू राजांना याची आठवण येईल तेव्हा तुम्ही बोका दरबारात हजर करायचा असा आदेश आहे"
पाटील, देशमुख मंडळी मात्र घाबरली होती शाहू राजे जितके प्रेमळ तितकेच रागीट होते,उध्या ह्या बोक्यापायी गावावर काय संकट आलं तर शाहू राजे क्रोधीत होतील आणि गावावर अवकळा पसरेल त्या पेक्षा पाटील,देशमुख गावातून दीडशे दोनशे रुपये गोळा करून आणायचे बोक्याच्या खर्चसाठी द्यायचे मायजींच्या हातात द्यायचे आणि सांगायचे आमच्या गावात नको पुढच्या गावात सोडा,अस प्रत्येक गावात होऊ लागले.मायाजी आणि कामगारांना यात खूप मनोरंजन होऊ लागलं शिवाय सरकार दरबारात पैसा गोळा होऊ लागला.सरतेशेवटी मायजींनी दूर रानात बोका सोडून दिला.सगळ्या कामगारांना पगार देऊन उरलेली भली मोठी रक्कम घेऊन मायाजी दरबारी आले.शाहुराजांना घडला प्रसंग सांगितला.शाहू राजे खुश झाले शाहूंनी ती रक्कम #मायाजी_फडतरे यांना त्यांच्या प्रामाणिक पणा आणि बुद्धीचा गौरव करत बक्षीस म्हणून दिली.एका साधारण बिनकामी बोक्याच भांडवल करत हजारो रुपये उभे करणारा मायाजी सारखा कारभारी दरबारात असावा म्हणू त्यांनी त्यांची नेमणूक मोठ्या महत्वाच्या पदावर केली आणि त्यांचा योग्य सन्माम केला.
शाहू राजांच्या या अशा गुणांमुळे आणि पदरी असलेल्या अशा हुशार लोकांमुळे 42 वर्ष शाहूंचा कारभार व्यवस्थित चालला.काळाच्या ओघात इतिहासातील अशे हिरे आणि त्याचा पराक्रम मात्र तसाच कागदोपत्री खितपत पडला.थोरले शाहू महाराज आणि त्यांचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर यायला हवा त्यासाठी इतिहास आपणच वाचला पाहिजे,वाचवला पाहिजे.
लेखन-#मंगेश_गावडे पाटील
(संदर्भ-शेडगावकर भोसले यांची बखर)

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...