विनोद जाधव एक संग्राहक

Friday 30 April 2021

सूर्यवंशी मराठा घराणे बर्गे (उपनाव निकम) भाग २

 


सूर्यवंशी मराठा घराणे बर्गे (उपनाव निकम)
भाग २
( निकुंभ हे राजे रघुवंशी असल्याचे दावा करतात व ते अयोध्येहुन राजस्थानला आले. धूंदू नावाच्या राक्षसला मारुन धुंधर उर्फ़ जयपुर वसवनारे ते राजस्थानच्या पहिल्या आर्य लोकांपैकी आहेत. मराठा निकम हे निकुंभ राजे वंशज असल्याने त्यांचे खानदेश वर तसेच राजस्थान येथील भागावर स्वामित्व होते. पुढे राजस्थान येथील राज्य त्यांनी गमावले. खानदेश वर मात्र निकुंभानी अनेक शतके राज्य केले ८ व्या शतकापासून ते अगदी आजपर्यंत बरेचसे लोक तेथे आहेत. अल्लशक्ति , वैरदेव, कृष्ण आदि महत्त्वाचे राजे या घराण्यातून झाले.) [१], [२]
==प्रसिद्ध मराठा सरदार बर्गे मंडळीची नावे
सरदार आनंदराव बर्गे
सरदार क्षेत्रोजीराव बर्गे
सरदार तुलाजी उर्फ़ तुळाजीराव बर्गे
सरदार खंडोजीराव बर्गे
सरदार सेखोजीराव बर्गे
सरदार राणोजीराव बर्गे
सरदार सखाराम बर्गे
सरदार बालोजीराव बर्गे
सरदार हैबतराव बर्गे
सरदार येसाजीराव बर्गे
सरदार सिदोजीराव बर्गे
सरदार साबाजीराव बर्गे
सरदार जानोजीराव बर्गे
ही वरील उल्लेखि नावे केवळ उंच शिखरांची आहेत आणि खरे पहु गेले असता यापेक्षा अनेक बर्गे सरदार व त्यांचे घराणे कर्तबगार असूनही त्यांच्याविषयी फारच कमी लिहिले, ऐकले व बोलले गेले. मराठा सरदार बर्गे यांचा इतिहास कागदोपत्री बंदिस्त आहे. तो समजल्यास मराठेशाही इतिहासात मौलिक भर पडेल.
ऐतिहासिक बर्गे घराणे व त्यांचा संक्षिप्त इतिहास :
बर्गे हे बहमनी आमदनी पासून मशहूर असे पराक्रमी घराणे होय. यांनी दख्खनची सुल्तानशाही ज्यात आदिलशाही, निज़ामशाही राजवटीत शौर्य गाजवून वैभव, इनाम वतने व लौकिक मिळवला. बर्गे यांचे कोरेगाव हे प्रान्त वाईतील महत्त्वाचे ठिकाण होते. संमत कोरेगाव, तालुका कोरेगाव, तसेच प्रांत कोरेगाव अशा आशयाचे संदर्भ सापडतात. विविध राजवटीत कोरेगाव तसेच चिंचनेरचे वंश परंपरागत पाटिलकि हक्क, अनेक दुर्मिळ किताब, मान मरातब, जहागिरी, सरंजामी हक्क त्यांना होते. सुल्तानशाही, शिवशाही, मराठा स्वातंत्र्य युद्ध , शाहू काळ, पेशवाई , संस्थानी राजवटी अशा अनेक कालखंड पराक्रमा ने गाजवणारया प्रमुख मराठा घराण्यात त्यांचे मानाचे स्थान आहे. बर्गे घराण्याने अनेक युद्धांत मराठा साम्राज्याची सेवा केली त्यात प्रामुख्याने मराठा स्वातंत्र्य युद्ध, जंजिरा मोहीम, पानिपत, खर्डा इत्यादी महत्त्वाच्या घटना होत. अनेक पोवाड्यात बर्गे वीरांचे गुणगान आढळते. एकंदर इतिहासावरून बर्गे घराण्याला पाटील, सरदार, इनामदार, जहागीरदार, सरंजाम वतनदार, खासबरदार अशा दुर्मिळ पदव्यांनी गौरवलेले दिसते तसेच सरदार बर्गे घराण्यातील शुरवीर पुरूषानी हिंदवी स्वराज्य रक्षणार्थ जी शस्त्रे धारन (वापरले) ती शस्त्रे आजही बर्गे वंशजाकडे आहेत फार दुर्मीळ ठेवा जपुन ठेवले आहे. तो दुसर्या दिवशी पाहायला मिळतो.

सूर्यवंशी मराठा घराणे बर्गे (उपनाव निकम) भाग १

 


सूर्यवंशी मराठा घराणे बर्गे (उपनाव निकम)
भाग १
मराठा बर्गे, उपनाव निकम हे एक सूर्यवंशी मराठा घराणे आहे. निकम ही मराठा कुळी निकुंभ राजवंशाची शाखा आहे. त्यांचे मूळ जयपुर परिसर राजस्थान येथील आहे.
उत्पत्ति :
बहमनी कालखंडात शिलेदारांना अथवा बारगीर वीर पुरुषांना बर्गे व नाइकवडी म्हणत. त्यापासून बर्गे म्हणजे लढाऊ वीर आशा अर्थाने निकमांना ही उपाधि मिळाली असावी. परंतु, बर्गे आडनाव कसे पडले याविषयी एक आख्यायिका आहे ती अशी कि निकम कुळातील योद्ध्यानी अनेकांचा एकाच वेळी प्रतिकार करू शकणारे वा हल्ला थोपवू शकणारे शस्त्र वापरले. ते शस्त्र म्हणजे बर्गे / बरगे म्हणूनच असे शस्त्र वापरणारे ते बर्गे. बर्गे यांच्या मूळ पुरुषाला पाच मुले होती. त्यापैकी तीन मुले कोरेगावला ( जिल्हा सातारा ) व दोन मुले पैकी एक चिंचनेरला व एक महादेव डोंगराला ( जिल्हा सातारा ) स्थायिक झाल्याने त्यांचा वंश वृक्ष फोफावला
बर्गे कुळाचार:
नाव : बर्गे
कुली : निकम
जात : ९६ कुळी क्षत्रिय मराठा
मूळ गादी : आभरण ( अभानेर - हे अलवर, जयपुर या जवळ राजस्थान )सैधंति, कर्नाटक.
वंश : सूर्यवंश
राजाचे नाव / पदवी : प्रभाकरवर्मा
गोत्र : पराशर / मानव्य
वेद : यजुर्वेद
अश्व / वारू : पिवळा
निशाण : ध्वजस्तंभी हनुमान
मंत्र : सुर्य गायत्री मंत्र
कुल देवता : जोगेश्वरी (अंबाजोगाई )/मुळ तुळजाभवानी
देवक : उंबर, वेळु, सोन्याची रुद्राक्ष माळ किंवा कांद्याची माळ, कलंब

छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्र प्रेम -

 


छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्र प्रेम -
पोस्टसांभार : ©नरेशराव_जाधवराव
शिवरायांच्या राज दरबारातील कवी श्री.परमानंद नेवासकर यांनी आपल्या ग्रंथात नोंद केलेय. त्यात ते शिवजी महाराजांचा देश म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख करतात.
“कर्नाटकाहून महाराष्ट्रात येण्यास शिवराय उत्सुक आहेत. स्वदेशाची जबाबदारी मिळताच त्यांना राजाचे तेज आलेय. जसजसे शिवरायांना यश मिळू लागले, तसतसे त्यांच्या अधिकाराखालील महाराष्ट्र देशातील रयत समृद्ध झाली. “महाराष्ट्र” हे नाव मार्गी लागले.”
शिवभारतातील दहाव्या अध्यायात ते म्हणतात, शहाजीराजांनी बालशिवबांचे कर्नाटकात प्रशिक्षण पुर्ण करुन वयाच्या १२व्या वर्षी म्हणजे इ.स.१६४२ साली पुण्याकडे रवानगी केली याचे सविस्तर वर्णन आढळते ते पुढीलप्रमाणे -
अथ तस्मिन्नाधिपत्ये पिञादत्ते प्रतापिना ।
प्रयातुकामः स्वं राष्ट्रं शिवराजो व्यराजत ।।२४।।
अर्थ =
शहाजीराजेंनी (पुण्याचे) अधिपत्य दिले असता स्वदेशी परत जाऊ इच्छिणारे ते शिवराय राजा शोभु लागले.
ततः कतिपयैरेष दिनैर्दिनक्रुतदन्वयः ।
अयाद्देशं महाराष्ट्रं तस्मात् कर्णाटमंडलात् ।।२८।।
सशक्तिञितयोपेतः समेतस्सैन्यसंचयैः ।
शिवस्स्वया श्रिया सार्धँ पुण्याहं पुरमासदत् ।।२९।।
चक्रप्रियकरः सद्यः समुल्लासितमंडलम् ।
नवोदयास्सुदमुं लोकबंधुं लोको व्यलोकत ।।३०।।
अर्थ =
मग काही दिवसानी तो सुर्यवंशोत्पन्न शिवाजी राजा कर्नाटक प्रांताहुन महाराष्ट्र देशास निघाला. प्रभाव,उत्साह व मंत्र या तीन शक्ती, सेनासमुह आणि स्वतःची राजलक्ष्मी यांनी युक्त असा तो शिवाजीराजा पुणे नगरास पोहोचला. राष्ट्राचे हित करणारा आणि तात्काळ (प्रुथ्वीस प्रकाशित करणारा) राष्ट्रास उल्हसित करणाऱ्या सुर्यास, लोकमित्रास लोकांनी पाहिले.
ततोनुकुलप्रक्रुतिः कुर्वन् प्रक्रुतिरंजनम् ।
अवर्धत क्रमेणैष विक्रमी यशसा सह ।।३१।।
महाराष्ट्रो जनपदस्तदानीं तत्समाश्रयात् ।
अन्वर्थतामन्वभवत् सम्रुद्धजनतान्वितः ।।३२।।
श्रयंतः प्रश्रयोपेतं गुरवस्तं गुणैस्मह ।
अनन्यनिष्ठमनसः समगच्छन् क्रुतार्थताम् ।।३३।।
अर्थ =
पुढे अनुकुल मंत्र्यांच्या सहाय्याने रयतेला आनंद देत असता तो पराक्रमी शिवाजीराजा हळु हळु वाढू लागला, त्याबरोबरच त्यांचे यशही वाढु लागले. तेव्हा त्यांच्या अधिकाराखालील महाराष्ट्र देशातील जनता सम्रुद्ध झाली आणी "महाराष्ट्र" हे नाव अन्वर्थ झाले. त्या विनयशील व गुणवान शिवरायांच्या पदरी असलेले गुरु क्रुतार्थ झाले म्हणजे त्यानी शिकविलेल्या सर्व विद्या व कला यामध्ये तो निपुण झाला.

स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे श्रीमंत पेशवा बाजीराव बल्लाळ भट.

 

स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे
श्रीमंत पेशवा बाजीराव बल्लाळ भट.
 स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे
श्रीमंत पेशवा बाजीराव बल्लाळ भट.

थोरले बाजीराव बल्लाळ भट यांचा जन्म दिनांक १८ ऑगस्ट सन १७०० रोजी झाला.

थोरले बाजीराव त्यांचे वडील पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या बरोबर राहिल्याने छत्रपती शाहू महाराज, धनाजी जाधव, चंद्रसेन जाधव, निजाम, सरखेल कान्होजी आंग्रे, दमाजी थोरात, सय्यद अली, पिलाजी जाधव आदी मंडळी व संबंधित प्रकरणातील राजकारण, मुत्सद्देगीरी, व्यूहात्मक रचना, तह, लष्करी मोहिमेतील खाचाखोचा, सेनाउभारणी, महसूली व्यवस्था, अंतर्गत राजकारणाने ढासळलेल्या दिल्लीच्या ताकदीचा तकलादूपणा या सर्व बाबींचा थोरले बाजीराव यांचा प्रत्यक्षात जवळून अभ्यास झाला होता.
वयाच्या बाराव्या वर्षांपासून ते मोहिमेवर जाऊ लागले. सन १७१३ सालातील पांडवगड येथील युध्दात थोरले बाजीराव यांनी प्रत्यक्ष युध्दात भाग घेऊन अनुभव घेतला.
पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या दिल्ली मोहिमेपूर्वी थोरले बाजीराव यांना छत्रपती शाहूमहाराज यांच्याकडून दिनांक ६ ऑक्टोबर सन १७१८ रोजी सरदारकी देण्यात आली.

पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या निधनानंतर पेशवा पद रिक्त झाले.
सन १७१३ च्या दरम्यान जे पेशवेपद घेण्यास कोणी उत्सुक नव्हते. त्यावेळेस येथील लोकांस पेशवेपदापेक्षा प्रतिनिधीपद जास्त महत्त्वपूर्ण वाटत होते. बाळाजी विश्वनाथ यांनी अवघ्या सात वर्षांत स्वकर्तृत्वाने पेशवेपदाची उंची इतकी वाढवली की येथे पेशवेपदासाठी स्पर्धा निर्माण झाली. यावरूनच बाळाजी विश्वनाथ यांचे कार्य लक्षात येईल.

अशा परिस्थितीत बाळाजी विश्वनाथ यांचे कार्य लक्षात घेऊन छत्रपती शाहूमहाराज यांनी दरबारी विरोध डावलून थोरले बाजीराव यांना पेशवा पदावर दिनांक १७ एप्रिल सन १७२० नियुक्त केले.

पेशवेपद मिळाल्यानंतर लगेचच पेशवा बाजीराव खानदेशात हुसेन अली सय्यद याच्या मदतीसाठी सरलष्कर हैबतराव निंबाळकर यांच्यासह
मोहिमेवर रवाना झाले. खानदेशातील बंड मोडून काढले. मोहिमेतील या यशाने मराठ्यांच्या फौजांचा आत्मविश्वास दुणावला. याचा फायदा पुढील निजाम मोहिमेत झाला.

निजामाने मराठ्यांच्या प्रदेशात घुसखोरी करून कुरापती काढायला लागला. अखेर मराठे व निजाम यांच्यात औरंगाबाद (म्हणजेच दख्खन मधील मोगली सुभेदाराचे ठाणे) यांच्यात दिनांक १५ डिसेंबर सन १७२० रोजी युद्ध झाले. या युद्धात मराठ्यांनी निजामाचा दारूण पराभव करून निजामास दाती तृण धरावयास लावले. दिनांक ४ जानेवारी सन १७२१ रोजी निजामाने चिखलठाण येथे श्रीमंत पेशवा बाजीराव यांची भेट झाली. निजामाने श्रीमंत पेशवा बाजीराव यांच्या सर्व अटी मान्य करून स्वराज्याचा जिंकलेला सर्व प्रदेश परत केला.

मोगली सेनापती दाऊदखान पन्नी हा माळव्यात दंगा करायला लागला. सोरटी सोमनाथ येथील श्री महादेवाचे पवित्र स्थानास उपद्रव देण्यापर्यंत त्याची मजल गेली. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी सन १७२१ च्या जून महिन्यात माळव्यात मोगली सेनापती दाऊदखान पन्नी याचा जबरदस्त पराभव केला. दाऊदखान पन्नी रणांगणावरून पळून गेला. या दैदीप्यमान विजयाने श्रीमंत पेशवा बाजीराव यांचा माळव्यात प्रवेश झाला.

सन १७२१ च्या अखेरीस गोवेकर पोर्तुगीज यांच्याकडे राऊंची नजर वळली. या मोहिमेसाठी राऊंनी सरखेल कान्होजी आंग्रे यांची आरमारी मदत मागीतली. पोर्तुगीजांसमोर नवेच गंभीर संकट उभे ठाकले. निजाम, दाऊदखान पन्नी यांना धुळ चारणारा पेशवा आणि समुद्राचे अनभिषिक्त सम्राट सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समोर आपला अजिबात टिकाव लागणार नाही हे ओळखून पोर्तुगीजांनी वरसोली (अलिबाग तालुक्यातील एक गाव) येथे युद्ध न करताच दिनांक ९ जानेवारी सन १७२२ रोजी तह केला.

दरम्यान दिल्ली दरबारात परत राजकारण रंगू लागले. दिनांक १३ फेब्रुवारी सन १७२२ रोजी निजामाला दिल्ली दरबारात वजीर नेमण्यात आले. या कालावधीत श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी बागलाण, खानदेश, नाशीक गोंडवन, वऱ्हाड आणि माळवा येथे तीन स्वाऱ्या करून चौथाई व सरदेशमुखी च्या वसूलासाठी गुजरातेत पिलाजी गायकवाड, कंठाजी कदम, माळव्यात उदाजी पवार यांची नियुक्ती केली. उदाजी पवार यांनी माळव्यात धार येथे मराठी ठाणे निर्माण केले.

दिनांक १३ फेब्रुवारी सन १७२३ रोजी श्रीमंत पेशवा बाजीराव यांची निजामाशी माळव्यात बोलशा येथे दुसरी भेट झाली. मोगली सुभेदार दयाबहादूर मराठ्यांना चौथाई, सरदेशमुखी वसूल करण्यास विरोध करू लागला. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी त्याच्याकडे वकीलही पाठवीला.
परंतु सन १७२३ च्या अखेरीस मोगली सुभेदार दयाबहादूर याने मराठ्यांना युध्दासाठी आव्हान दिले. वायुवेगाने मराठी फौजा उज्जैन च्या परिसरात दाखल झाल्या. श्रीमंत पेशवा बाजीराव यांची आणि दयाबहादूर यांचा सामना झाला. अखेर श्रीमंत पेशवा बाजीराव यांच्यासमोर शाही सुभेदार दयाबहादूर याने गुडघे टेकले. अटी मान्य केल्या. महसूल चुकता केला.

याच दरम्यान माळव्यातील भोपाळ येथे श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी दोस्त मुहम्मद याचा दिनांक १६ एप्रिल सन १७२३ पराभव केला.

श्रीमंत पेशवा बाजीराव यांची निजामाशी दिनांक १८ मे सन १७२४ रोजी नालछा येथे भेट झाली. निजामाने मराठ्यांचे दख्खन मधील चौथाई व सरदेशमुखीचे सर्व हक्क मान्य केले. मराठ्यांच्या सैन्याचा खर्च देण्याची कबुलायत केली. या बदल्यात पातशाही सुभेदार मुबारिजखान याच्या विरोधात निजामास मदत करण्याचे श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी आश्वासन दिले. चारच महिन्यांनी म्हणजे सन १७२४ च्या सप्टेंबर महिन्यात श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी
पातशाही सुभेदार मुबारिजखान याचा सपशेल पराभव केला. या युध्दातील पराक्रम पाहून निजामाने श्रीमंत पेशवा बाजीराव यांना "शहामतपनाह" हा किताब दिनांक २४ सप्टेंबर सन १७२४ रोजी दिला.

या युद्धानंतर निजाम श्रीमंत पेशवा बाजीराव यांना पत्र लिहिताना बाजीराव यांचा "रब्बुलनी" { मराठ्यांचे नवे आराध्य दैवत } असा उल्लेख करीत असे.

सन १७२५ च्या उत्तरार्धात श्रीमंत पेशवा बाजीराव यांची नजर कर्नाटकावर रोखली गेली. सन १७२५ नोव्हेंबर महिन्यात श्रीमंत पेशवा बाजीराव कर्नाटक स्वारीवर निघाले. छत्रपती शाहू महाराज यांचे मांडलिकत्व पत्करावे म्हणून बाजीरावांचे दूत, वकील ठिकठिकाणच्या संस्थानिक, राजे आदींकडे रवाना झाले. प्रथम काहींनी खळखळ केली नंतर मात्र म्हैसूर, गुत्ती, लक्ष्मेश्वर, श्रीरंगपट्टण, चित्रदुर्ग, बिदनुर, कनकगीरी, गदग, सुरापुर, अर्काट अशा दक्षिणेतल्या सर्व संस्थानिकांना श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी छत्रपती शाहूमहाराजांचे मांडलिक बनवले. कर्नाटक व श्रीरंगपट्टण या दोन मोहीमा सन १७२७ सप्टेंबर पर्यंत उरकल्यावर पुढील मोहीम म्हणजे पून्हा एकदा निजाम!

कोल्हापूरकर संभाजी महाराजांना हाताशी धरून निजामाने कारस्थाने रचण्यास सुरवात केली. निजामाने दक्षिणेतील स्वतःच्या राज्याचा विस्तार करण्याच्या दृष्टीकोनातून स्वराज्यात बंडाळ्या उभ्या करण्याचा खेळ आरंभला. निजामाने थेट पुण्यावर चाल केली. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी दिनांक १६ सप्टेंबर सन १७२७ रोजी निजामा विरूध्द मोहीम सुरू केली. निजाम पुण्यावर आहे पाहून बाजीराव निजामाची राजधानी हैदराबादेवरच चालून निघाले. अखेर
दिनांक २५ फेब्रुवारी सन १७२८ रोजी औरंगाबाद जवळ पालखेड येथे श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी निजामास पुरता जेरीस आणून मानहानीकारक पराभव केला. निजाम मराठी फौजांना पूर्ण शरण आला. दिनांक ६ मार्च सन १७२८ रोजी श्रीमंत पेशवा बाजीराव आणि निजाम यांच्यात मुंगी - शेगाव येथे १३ कलमी तह झाला. हीच ती पालखेडची इतिहास प्रसिद्ध मोहिम.

दरम्यान गुजरातचा शाही मोगली सुभेदार सरबुंदलखानाकडे चौथाई व सरदेशमुखीची मागणी केली. ही मागणी मान्य करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उपलब्ध नव्हता. त्याने पेशव्यांच्या वकिलामार्फत छत्रपती शाहूमहाराजांच्या नावाने चौथाई आणि सरदेशमुखी निमुट लिहून दिली.

या मोहिमेनंतर दिनांक ५ नोव्हेंबर सन १७२८ रोजी पून्हा एकदा निजामाचा वऱ्हाड प्रांताचा सुभेदार ऐवजखान याचा मराठ्यांनी पराभव केला.

महाराज छत्रसाल यांच्या बुंदेलखंड राज्य आणि बडा मोगली मनसबदार मुहम्मद बंगश यांच्यात सन १७२० पासून संघर्ष सुरू होता. बंगशाने महाराज छत्रसाल यांच्या सैन्याचा पाडाव केला. मदत मिळण्याबाबत महाराज छत्रसाल यांनी श्रीमंत पेशवा बाजीराव यांना गढामंडला येथे दुर्गादास राठोड यांच्यामार्फत "ऐतिहासिक गजेंद्रमोक्ष" खलीता पाठविला. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी ताबडतोब महोबा या गावाकडे पोहोचले तेथे महाराजा छत्रसाल त्यांचे पुत्र हिरदेसाह आणि जगतराय यांची श्रीमंत पेशवा बाजीराव यांच्याशी भेट झाली. जैतपूर किल्यात महम्मद बंगशाचे ठाणे होते. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी व्यूहात्मक रचना करून मार्च अखेरीस मराठ्यांच्या फौजेने महम्मद बंगशाचा पूर्ण पराभव केला. या मोहिमेतील यशानंतर महम्मद बंगश याला श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी सोडून दिले. महाराजा छत्रसाल यांनी श्रीमंत पेशवा बाजीराव यांना मुलगा मानून राज्याचा तीसरा हिस्सा देण्याचे कबूल केले. प्रत्यक्षात मात्र हिस्सा देण्यास खुप चालढकल केली.

निजाम दाभाडे प्रकरणाचा निपटारा करण्यास श्रीमंत पेशवा बाजीरावसन १७३१ च्या मार्च महिन्यात गुजरातेत उतरले. दाभाडे हे सेनापती होते मात्र प्रत्यक्षात निजाम आणि त्यांच्यात सख्य निर्माण होऊन त्याने स्वराज्याची हानी होणार होती. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी सेनापती दाभाडे यांना आपापसातील युद्ध टाळण्यासाठी वारंवार पत्र पाठवली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर झालेल्या युध्दात त्र्यंबकराव दाभाडे यांना रणांगणावर अपघाताने बंदूकीची गोळी लागली आणि ते वीरगतीस प्राप्त झाले. दाभाड्यांचा पूर्ण पराभव झाला. यानंतर श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी निजामास सुरतेनजीक दमण जवळ पूर्णपणे नमवले. निजामाचा पराभव झाल्यानंतर दिनांक २७ डिसेंबर सन १७३२ रोजी रोहेरामेश्र्वर येथे भेट झाली.

सन १७३३ साली पेशव्यांनी जंजीरेकर सिद्दी हबशावरील लष्करी मोहीम सुरू केली. या मोहिमेत कोकणातील बराच भाग स्वराज्यात आला. परंतु इतर राजकीय निकडीमुळे ही मोहिम वर्षअखेरीस आवरावी लागली. याच मोहिमेदरम्यान प्रतिनिधींनी कट रचून दिनांक ८ जून सन १७३३रोजी "दुर्गदुर्गेश्वर रायगड" हस्तगत करून स्वराज्यात आणला.

सन १७३५ च्या फेब्रुवारीत पुन्हा जंजीरेकर हबशाकडील मोहीम राबविण्यात आली.

दिनांक ३ ऑक्टोबर सन १७३५ रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीमंत पेशवा बाजीराव उत्तरेकडील लष्करी नव्हे तर राजकीय मोहिमेवर निघाले. उत्तरेकडील राऊंचा दबदबा प्रचंड वाढला होता हे मातोश्री श्रीमंत राधाबाईसाहेब यांच्या काशीयात्रेने सिद्धच झाले होते. खुद्द बंगशानेही त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली होती. राजपूत राजे यांच्या कडून चौथाई चे करार , हिंदू राजांची एकजूट अशा अनेक महत्त्वपूर्ण मुत्सद्दी योजना अंमलात आणून राऊ सन १७३६ च्या मे महिन्यात परत पुण्यास आले.

दरम्यान दिल्लीतील राजकारणाने पून्हा उचल खाल्ली. माळवा गुजरात आदींची सरदेशमुखी आणि चौथाई देण्यास दिल्लीच्या बादशहाने नकार दिला. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी पून्हा उत्तर हिंदुस्थानात मोहिम उघडली. सन १७३६ च्या अखेरीस मोहिमेस प्रारंभ झाल्यावर अतिशय जलदिने भोपाळ गाठले. त्यानंतर भेलसा, अटेर, भदावर एकामागोमाग एक काबीज करत आग्र्याच्या रोखाने निघाले. दिनांक २९ मार्च सन १७३७ रोजी दिल्ली परिसरातील कुशबंदी येथे मराठी फौज पोहोचताच दिल्लीत दाणादाण उडाली. दिल्लीच्या सुस्तावलेल्या मस्तवाल मोगली डोळ्यात झणझणीत मराठी अंजन श्रीमंत पेशवा बाजीराव यांच्या या अभूतपूर्व मोहिमेने घातले. बादशहाची पळता भुई थोडी झाली. हा दरारा निर्माण करून श्रीमंत पेशवा बाजीराव दिनांक ६ जुलै सन १७३७ रोजी परत पुण्यात येऊन पोहोचले.

या सर्व प्रकारानंतर मोगल दरबारचा आधार निजाम श्रीमंत पेशवा बाजीराव यांचे पारिपत्य करण्यास भल्यामोठ्या तोफखाना, द्रव्य, फौजेसह दिल्लीहून दक्षिणेकडे निघाला. खबर मिळताच श्रीमंत पेशवा बाजीरावही सन १७३७ च्या ऑक्टोबर अखेरीस उत्तर मोहिमेवर निघाले. मराठ्यांच्या फौजांनी भोपाळ येथे निजामाच्या फौजेला दिनांक १५ डिसेंबर १७३७ ते ७ जानेवारी १७३८ असा तीन आठवडे वेढा दिला. अखेरीस घनघोर युद्ध होऊन नेहमीप्रमाणे निजाम शरण आला. श्रीमंत पेशवा बाजीराव या मोहिमेनंतर सन १७३८ च्या जुलै दरम्यान पुण्यात परतले.

सन १७३९ च्या जानेवारीत इराणचा नादीरशहा दिल्लीवर चालून निघाला आहे व तो लाहोर पर्यंत पोहोचला आहे ही खबर श्रीमंत पेशवा बाजीराव यांना मिळाली. दिनांक ७ फेब्रुवारी सन १७३९ रोजी श्रीमंत पेशवा बाजीराव उत्तरेच्या रोखाने निघाले. धरणगाव येथे नादिरशहाने दिल्लीत अंमल जारी केल्याची खबर मिळाली.
छत्रपती शाहू महाराज यांनी श्रीमंत पेशवा बाजीराव यांस आज्ञा केली की "तुम्ही ताबडतोब मजल दरमजल करतबादशहाचे कुमकेस जावे. आमचे वचन औरंगजेब पादशहापाशी गुंतले आहे की, परचक्र तर आम्ही कुमक करावी." ही आज्ञा मिळताच श्रीमंत पेशवा बाजीराव दिल्ली रोखाने निघाले परंतु ते दिल्लीत पोहोचण्या आधीच नादिरशहा दिनांक ५ मे १७३९ रोजी इराणकडे रवाना झाला. अखेर नव्या बादशहाला आहेर देऊन त्याच्याकडून पूर्वी प्रमाणे फर्माने पावल्यावर श्रीमंत पेशवा बाजीराव दिनांक २९ जुलै सन १७३९ रोजी पुण्यात परतले.

निजामपुत्र नासीरजंग हा स्वतःस फार मोठा सेनानी समजत असे. श्रीमंत पेशवा बाजीराव यांना आपण सहज पराभूत करू शकतो असा फाजील आत्मविश्वास त्यास निर्माण झाला. त्याने मराठ्यांच्या मुलखात कुरबुरी सुरू केल्या. निजाम दिल्लीत संधान बांधून नवे राजकारण करीत असल्याची खबर राऊंना मिळाली. सन १७४० च्या सुरवातीलाच श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी निजामाची राजधानी हैदराबादेवरच चालून जाण्याची योजना आखली. परंतु प्रत्यक्षात निजामपुत्र नासीरजंग याची औरंगाबाद गोदावरी येथे गाठ पडली. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी नेहमीप्रमाणेच निजामाचा पराभव केला. दिनांक २७ फेब्रुवारी सन १७४० रोजी श्रीमंत पेशवा बाजीराव आणि निजामपुत्रनासीरजंग यांच्यात तह झाला. दिनांक ३ मार्च रोजी अखेरची भेट झाली. खरगोण व हंडीया हे निजामाचे प्रांत स्वराज्यात दाखल झाले.

दिनांक ३० मार्च सन १७४० रोजी श्रीमंत पेशवा बाजीराव खरगोण प्रांताची व्यवस्था लावण्यास गेले.

दिनांक २८ एप्रिल सन १७४० रोजी नर्मदातीरावरील रावेरखेडी येथे भटकुलोत्पन्न श्रीमंत पेशवा बाजीराव नावाचे २० वर्ष हिंदुस्थानात अखंड घोंघावत असलेले, मराठ्यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे वादळ एकाकीपणे कायमचे शांत झाले.

श्रीमंत बाजीराव बल्लाळ भट यांच्या तारखेनुसार पुण्यतिथि निमित्त अपराजित सेनानी राऊंच्याचरणी समस्त भट परिवाराकडून विनम्र आदरांजली.

संदर्भ -
पेशवे दप्तर
पेशवे बखर
पुरंदरे दफ्तर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने - राजवाडे
खंड
रोजनिशीतील उतारे
शाहू बखर
आंगरे यांची हकीकत
ब्रम्हेंद्र-चरित्र
साधन परिचय
पेशवेकालीन महाराष्ट्र
मराठी रियासत
अप्रकाशित कागदपत्र
पेशवे घराण्याचा इतिहास

Thursday 29 April 2021

महाभारताचा महाराष्ट्र किवा द्वापार युगाचा महाराष्ट्र ( विदर्भ महाजनपद आणि पांचाळ महाजनपद )

 



महाभारताचा महाराष्ट्र किवा द्वापार युगाचा महाराष्ट्र

( विदर्भ महाजनपद आणि पांचाळ महाजनपद )
----------------------------------------------------
पोस्टसांभार :मराठा युग
महाराष्ट्राचे नाव घेतले की आपल्या देवाचे पहिले नाव समोर येते, म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा इतिहास जिथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या नंतरचा इतिहास सांगितला जातो पण महाराष्ट्र कसा होता छत्रपती शिवाजी महाराज जर फार कमी लोकांना याची माहिती असेल तर आज महाभारताचा महाराष्ट्र कळेल, म्हणजे थेट द्वापार युगाचा महाराष्ट्र कसा होता ते आज साडेपाच हजारच्या आधी कळेल.
तर आजकाल आपण पाहतो की आपल्या भारतात राज्य हे वेगवेगळ्या राज्यांनी विभागलेल्या भाषेवरून ठरविले जाते. पण पूर्वी असे नव्हते म्हणून महाभारत काळापासून ते पूर्व सहाव्या शतकापर्यंत म्हणजे सुमारे 2600 वर्षांपूर्वीपर्यंत अशा भाषेनुसार राज्ये नव्हती त्याकाळी संपूर्ण भारत एक होता , या संपूर्ण भारतात 16 महाजनापाड्या (महाजनपद ) झाल्या. कारण त्याकाळी सर्वांची भाषा एकच होती, प्रत्येकाची भाषा संस्कृत होती. या 16 राज्यातील जिल्हे त्या राज्याचा राजा म्हणून ओळखले जात होते.
तर या 16 महाजनापाड्यांत दोन प्रकार आहेत. एक म्हणजे महाभारत काळातील महाजनापद आणि दुसरे महाभारत युद्धानंतर सर्व राज्ये पाडली. म्हणूनच महाभारत युद्धानंतर राज्ये आणि त्यानंतर महाभारत कालावधीनंतर राज्ये पुन्हा स्थगित झाली. भौगोलिक स्थिती काही नावे आणि काही ठिकाणे वेगळी आहेत.
तर पहिल्या महाभारताच्या काळात महाराष्ट्र कोणत्या महाभारताचा भाग होता याची माहिती मिळते.
तर महाभारत काळात महाराष्ट्राचा मोठा भाग म्हणजे #विदर्भ, हा होता विदर्भ महाजनपद, आजही त्याला विदर्भ म्हणतात.
विदर्भ या शब्दाचा अर्थ वीर आणि बाजूला इस्का डिमेटिया होऊन विदर्भ झाला, बाजूला राज्य दर्भ झाले आणि वीर वीर वीरभांचे राज्य झाले आणि विदर्भाचे मूळ महाराष्ट्र झाला.
भगवान श्रीकृष्णाची पहिली पत्नी श्री रुक्मणी माता या विदर्भाचा राजा होती #भीष्मक ती विदर्भाची राजा होती आणि तिची मुलगी श्री रुक्मिणी मातेच्या आईचे नाव #शुद्धमती आणि रुक्मणी मातेचे भाऊ राजकुमार रुक्मी आणि विदर्भ राज्य होते तर महाराष्ट्राचे उत्तराधिकारी येथे होते, मग ही एका जिल्ह्याची माहिती आहे.
आणि दुसरा होता महाजनापाडा आजच्या महाराष्ट्राचा भाग म्हणजेच आजच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नावाचे शहर पहिले पांचाळ नगरी भगवान श्रीकृष्ण जी यांची बहीण आणि पांडवांची पत्नी #द्रौपदी ही तीच अवस्था आहे. या राज्याची राजकुमारी राजा होती. #द्रुपदा.
आजच्या महाराष्ट्र भूमीत आलेले हे दोन महाभारत कार्निव्हल महाजनापाडा विदर्भ आणि पांचाळ. राज्यात पुन्हा स्थापन झालेल्या महाभारत युद्धा नंतर महाराष्ट्रातील कोणत्या महाजनापाडाला येतो ते आता जाणून घेऊया.
तर ही आहे महाभारत काळापासून ते सहाव्या शतकापर्यंतच्या महाजनापाड्यांची यादी
१)अंग २)अवंती ३)अश्मक ४)कांबोज ५)काशी ६)कुरू ७)कोसल ८)चेदी ९)पांचाल १०)मगध ११)मत्स्य १२)मल्ल १३)वत्स १४)वृज्जी १५)शूरसेन १६)गांधार.
त्यातील #अश्मक महाजनापाडा आजच्या महाराष्ट्रात यायचा. दक्षिणेत असलेला हा एकमेव महाजनापाडा होता, राजधानीची स्थापना, म्हणजेच आजच्या #पैठण मधील ईश्वकु घराण्याचा राजा होता.
जय श्रीराम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंदूराष्ट्र🕉️🚩⚔️

वाकाटक वंश ( हिंदी इतिहास ) भाग ३


 वाकाटक वंश

( हिंदी इतिहास )
भाग ३
प्रवरसेन द्वितीय के बाद नरेन्द्र सेन ने 440 ई. से 460 ई. तक शासन किया।
पृथ्वीसेन द्वितीय वाकाटक वंश की मुख्य शाखा का अन्तिम शासक हुआ। उसे 'वाकाटक वंश के खोये हुए भाग्य का निर्माता' कहा जाता है। पृथ्वीसेन द्वितीय ने अपनी राजधानी पद्मपुर में बनायी। इस वंश के लेख यह बतलाते हैं कि द्वितीय प्रवरसेन से द्वितीय पृथ्वीषेण तक किसी प्रकार का रण अभियान न हो सका।
वाकाटकों की वत्सगुल्मा (या अमुख्य) शाखा का संस्थापक सर्वसेन था जो प्रवरसेन प्रथम का पुत्र था। सर्वसेन ने वत्सगुल्मा को अपनी राजधानी बनाकर "धर्ममहाराज" की उपाधि धारण की थी। सर्वसेन को प्राकृत ग्रंथ 'हरिविजय' एवं 'गाथासप्तशती' के कुछ अंशों का लेखक माना जाता है। सर्वसेन के उत्तराधिकारी विंध्यसेन द्वितीय ने "विंध्यशक्ति" एवं "धर्ममहाराज" की उपाधि धारण की थी।
पाँचवी सदी के अन्त में राजसत्ता वेणीमशाखा (सर्वसेन के वंशज) के शासक हरिषेण के हाथ में गई, जिसे अजन्ता लेख में कुन्तल, अवन्ति, लाट, कोशल, कलिंग तथा आंध्र देशों का विजेता कहा गया है (इंडियन कल्चर, भाग ७, पृष्ठ ३७२)। हरिषेण के शासनकाल में वाकाटक साम्राज्य अपने चरमोत्कर्ष पर था किन्तु उसके उत्तराधिकारियों की निर्बलता के कारण कलचुरि वंश ने वाकाटक वंश का अन्त कर दिया।
अजन्ता गुफाओं में शैल को काटकर निर्मित बौद्ध बिहार एवं चैत्य वाकाटक साम्राज्य के वत्सगुल्म शाखा के राजाओं के संरक्षण में बने थे।
अभिलेखों के अध्ययन से ज्ञात होता है कि दक्षिण भारत में वाकाटक राज्य वैभवशाली, सबल तथा गौरवपूर्ण रहा है। सांस्कृतिक उत्थान में भी इस वंश ने हाथ बटाया था। प्राकृत काव्यों में "सेतुबन्ध" तथा "हरिविजय काव्य" क्रमशः प्रवरसेन द्वितीय और सर्वसेन की रचना माने जाते हैं। सेतुबन्ध को 'रावणवहो' भी कहा जाता है। वैसे प्राकृत काव्य तथा सुभाषित को "वैदर्भी शैली" का नाम दिया गया है। वाकाटकनरेश वैदिक धर्म के अनुयायी थे, इसीलिए अनेक यज्ञों का विवरण लेखों में मिलता है। कला के क्षेत्र में भी इसका कार्य प्रशंसनीय रहा है। अजंता की चित्रकला को वाकाटक काल में अधिक प्रोत्साहन मिला, जो संसार में अद्वितीय भित्तिचित्र माना गया है। नाचना का मंदिर भी इसी युग में निर्मित हुआ और उसी वास्तुकला का अनुकरण कर उदयगिरि, देवगढ़ एवं अजंता में गुहानिर्माण हुआ था। समस्त विषयों के अनुशीलन से पता चलता है कि वाकाटक नरेशों ने राज्य की अपेक्षा सांस्कृतिक उत्थान में विशेष अनुराग प्रदर्शित किया। यही इस वंश की विशेषता है।
वाकाटक वंश के अधिकांश शासक शैव धर्म के अनुयायी थे किन्तु रुद्रसेन द्वितीय वैष्णव धर्म का अनुयायी था।
अजन्ता गुफाओं में शैल को काटकर निर्मित बौद्ध बिहार एवं चैत्य वाकाटक साम्राज्य के वत्सगुल्म शाखा के राजाओं के संरक्षण में बने थे।

वाकाटक वंश ( हिंदी इतिहास ) भाग २


 वाकाटक वंश

( हिंदी इतिहास )
भाग २
वाकाटक वंश के तीसरे शासक महाराज रुद्रसेन प्रथम का इतिहास अत्यन्त विवादास्पद माना जाता है। प्रारम्भ में वह आपत्तियों तथा निर्बलता के कारण अपनी स्थिति को सबल न बना सका। कुछ विद्वान्‌ यह मानते हैं कि उसके पितृव्य साम्राज्य को विभाजित कर शासन करना चाहते थे, किन्तु पितृव्य सर्वसेन के अतिरिक्त किसी का वृत्तांत प्राप्य नहीं है। वाकाटक राज्य के दक्षिण-पश्चिम भाग में सर्वसेन ने अपना प्रभुत्व स्थापित कर लिया था जहाँ (बरार तथा आंध्र प्रदेश का उत्तरी-पश्चिमी भूभाग) उसके वंशज पाँचवी सदी तक राज्य करते रहे। इस प्रसंग में यह मान लेना सही होगा कि उसके नाना भारशिव महाराज भवनाग ने रुद्रसेन प्रथम की विषम परिस्थिति में सहायता की, जिसके फलस्वरूप रुद्रसेन अपनी सत्ता को दृढ़ कर सका। (चंपक ताम्रपत्र का. इ., इ. भा. ३, पृ. २२६) इस वाकाटक राजा के विनाश के संबंध में कुछ लोगों की असत्य धारण बनी हुई है कि गुप्तवंश के उत्थान से रुद्रसेन प्रथम नष्ट हो गया। गुप्त सम्राट् समुद्रगुप्त ने कौशांबी के युद्ध में वाकाटक नरेश रुद्रसेन प्रथम को मार डाला (अ. भ. ओ. रि. इ., भा. ४, पृ. ३०-४०), अथवा उत्तरी भारत की दिग्विजय में उसे श्रीहत कर दिया। इस कथन की प्रामाणिकता समुद्रगुप्त की प्रयागप्रशस्ति में उल्लिखित पराजित नरेश रुद्रदेव से सिद्ध करते हैं। प्रशस्ति के विश्लेषण से यह समीकरण कदापि युक्तियुक्त नहीं है कि रुद्रदेव तथा वाकाटक महाराज प्रथम रुद्रसेन एक ही व्यक्ति थे। वाकाटकनरेश से समुद्रगुप्त का कहीं सामना न हो सका। अतएव पराजित या श्रीहत होने का प्रश्न ही नहीं उठता। इसके विपरीत यह कहना उचित होगा कि गुप्त सम्राट् ने वाकाटक वंश से मैत्री कर ली।
वाकाटक अभिलेखों के आधार पर यह विचार व्यक्त करना सत्य है कि इस वंश की श्री कई पीढ़ियों तक अक्षुण्ण बनी रही। कोष, सेना तथा प्रतिष्ठा की अभिवृद्धि पिछले सौ वर्षों से होती रही (मानकोष दण्ड साधनसंतान पुत्र पौत्रिण : ए. इ., भा. ३, पृ. २६१) इसके पुत्र पृथ्वीषेण प्रथम ने कुंतल पर विजय कर दक्षिण भारत में वाकाटक वंश को शक्तिशाली बनाया। उसके महत्वपूर्ण स्थान के कारण ही गुप्त सम्राट् द्वितीय चंद्रगुप्त को (ई. स. ३८० के समीप) अपनी पुत्री प्रभावती का विवाह युवराज रुद्रसेन से करना पड़ा था। इस वैवाहिक संबंध के कारण गुप्त प्रभाव दक्षिण भारत में अत्यधिक हो गया। फलतः द्वितीय रुद्रसेन ने सिंहासनारूढ़ होने पर अपने श्वसुर का कठियावाड़ विजय के अभियान में साथ दिया था।
द्वितीय रुद्रसेन की अकाल मृत्यु के कारण उसकी पत्नी प्रभावती अल्पवयस्क पुत्रों की संरक्षिका के रूप में शासन करने लगी। वाकाटक शासन का शुभचिन्तक बनकर द्वितीय चंद्रगुप्त ने सक्रिय सहयोग भी दिया। पाटलिपुत्र से सहकारी कर्मचारी नियुक्त किए गए। यही कारण था कि प्रभावती गुप्ता के पूनाताम्रपत्र में गुप्तवंशावली ही उल्लिखित हुई है। कालान्तर में युवराज दामोदरसेन द्वितीय 'प्रवरसेन' के नाम से सिंहासन पर बैठा। उसने 460 ई. से 480 ई. तक शासन किया। प्रवरपुर की स्थापना दामोदर सेन द्वारा की गई थी। 'सेतुबन्ध' नामक ग्रंथ की रचना दामोदर सेन ने की थी, इसे 'रावणवहो' भी कहा जाता है। वह वैष्णव धर्म का अनुयायी था। उसने उसने प्रवरपुर को अपनी राजधानी बनाया तथा सौहार्द सम्बन्धों को दृष्टिगत रखते हुए कुतलों से वैवाहिक सम्बन्ध स्थापित किये।
प्रवरसेन द्वितीय के बाद नरेन्द्र सेन ने 440 ई. से 460 ई. तक शासन किया।
मानसर में प्रवरसेन द्वितीय द्वारा निर्मित प्रवरेश्वर शिव मन्दिर के भग्नावशेष

वाकाटक वंश ( हिंदी इतिहास ) भाग १

 


वाकाटक वंश

( हिंदी इतिहास )
भाग १
वाकाटक शब्द का प्रयोग प्राचीन भारत के एक राजवंश के लिए किया जाता है जिसने तीसरी सदी के मध्य से छठी सदी तक शासन किया था। उस वंश को इस नाम से क्यों संबंधित किया गया, इस प्रश्न का सही उत्तर देना कठिन है। शायद वकाट नाम का मध्यभारत में कोई स्थान रहा हो, जहाँ पर शासन करनेवाला वंश वाकाटक कहलाया। अतएव प्रथम राजा को अजंता लेख में "वाकाटक वंशकेतुः" कहा गया है। इस राजवंश का शासन मध्यप्रदेश के अधिक भूभाग तथा प्राचीन बरार (आंध्र प्रदेश) पर विस्तृत था, जिसके सर्वप्रथम शासक विन्ध्यशक्ति का नाम वायुपुराण तथा अजंतालेख मे मिलता है।
सम्भवतः विंध्य पर्वतीय भाग पर शासन करने के कारण प्रथम राजा 'विंध्यशक्ति' की पदवी से विभूषित किया गया। इस नरेश का प्रामाणिक इतिवृत्त उपस्थित करना कठिन है, क्योंकि विंध्यशक्ति का कोई अभिलेख या सिक्का अभी तक उपलब्ध नहीं हो सका। तीसरी सदी के मध्य में सातवाहन राज्य की अवनति हो जाने से विंध्यशक्ति को अवसर मिल गया तो भी उसका यश स्थायी न रह सका। उसके पुत्र प्रथम प्रवरसेन ने वंश की प्रतिष्ठा को अमर बना दिया। अभिलेखों के अध्ययन से पता चलता है कि प्रथम प्रवरसेन ने दक्षिण में राज्यविस्तार के उपलक्ष में चार अश्वमेध किए और सम्राट् की पदवी धारण की।
प्रवरसेन के समकालीन शक्तिशाली नरेश के अभाव में वाकाटक राज्य आंध्रप्रदेश तथा मध्यभारत में विस्तृत हो गया। बघेलखंड के अधीनस्थ शासक व्याघ्रराज का उल्लेख समुद्रगुप्त के स्तंभलेख में भी आया है। संभवत: प्रवरसेन ने चौथी सदी के प्रथम चरण में पूर्वदक्षिण भारत, मालवा, गुजरात, काठियावाड़ पर अधिकार कर लिया था परंतु इसकी पुष्टि के लिए सबल प्रमाण नहीं मिलते। यह तो निश्चित है कि प्रवरसेन का प्रभाव दक्षिण में तक फैल गया था। परंतु कितने भाग पर वह सीधा शासन करता रहा, यह स्पष्ट नहीं है। यह कहना सर्वथा उचित होगा कि वाकाटक राज्य को साम्राज्य के रूप में परिणत करना उसी का कार्य था। प्रथम प्रवरसेन ने वैदिक यज्ञों से इसकी पुष्टि की है। चौथी सदी के मध्य में उसका पौत्र प्रथम रुद्रसेन राज्य का उत्तराधिकारी हुआ, क्योंकि प्रवरसेन का ज्येष्ठ पुत्र गोतमीपुत्र पहले ही मर चुका था।
नन्दिवर्धन दुर्ग के भग्नावशेष

क्षत्रिया_मराठा_वाकाटक_साम्राज्य (मराठी )

 #महाराष्ट्र_का_प्राचीन_इतिहास

-----------------------------------------------

#









क्षत्रिया_मराठा_वाकाटक_साम्राज्य

------------------------------------------------

पोस्टसांभार  :मराठा युग  

महाराष्ट्रावर राज्य करणारे पहिले क्षत्रिय मराठा राजवंश हे सातवाहन होते, परंतु या सातवाहन घराण्याच्या सामर्थ्यानंतर सातवाहन राजवटीनंतर सातवाहनांची शक्ती कमी झाली, त्यानंतर महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतात हळूहळू उदयास आलेल्या क्षत्रिय मराठा वाकाटक घराण्याचे साम्राज्य कमी झाले. त्याने आपली शक्ती वाढविणे सुरू केले आणि त्याने सभोवतालची सर्व प्रांत जिंकली आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशात आपले साम्राज्य पसरवले.

वाकाटक राज्याचा संस्थापक म्हणजे राजा # विंध्याशक्ती.

राजा विंध्याशक्तीने वाकाटक साम्राज्याचा पाया घातला. वाकाटक साम्राज्याचा कार्यकाळ एडी 250 ते एडी 500 पर्यंतचा होता. म्हणजेच, 250 वर्षांपर्यंत वाकाटक राजांनी महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशांवर राज्य केले. वाकाटक साम्राज्याची राजधानी होती # नंदीवर्धन ज्याला आज # नागपूर म्हणतात. आजच्या महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक गाव वाकाटक साम्राज्याची मुख्य राजधानी होती. नंतर वाकाटक राजा प्रवीर्सेन मी नंदीवर्धन येथून राजधानी # वत्सगल्म येथे बदलली वत्सगुल्मला आज # वशिम म्हटले जाते. वाशिम हा महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे.

वाकाटक राजा # प्रसारण_प्रथम यांनी वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला आणि स्वत: ला महाराजा व सम्राट ही पदवी मानली. प्रवरसेन मी त्यांच्या कार्यकाळात 6 अश्वमेध यज्ञ आणि 1 वाजपेयी यज्ञ केले.

वाकाटक किंग प्रथम पृथ्वीसेन्सने दक्षिणेचा # कुंतल प्रांत जिंकला आणि वाकाटकच्या राज्याचा विस्तार केला, कुंतलला सध्याचा # कोल्हापूर म्हणतात, जो आज महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे. वाकाटक राजा # द्वितीय_ रुद्रसेनचा संबंध उत्तर भारतातील सर्वात मोठा साम्राज्य असलेल्या गुप्त साम्राज्याच्या राजा चंद्रगुप्त प्रथमच्या कन्या # प्रभावती_देवीशी झाला होता. आणि या वैवाहिक संबंधामुळे वाकाटक साम्राज्याची ताकद बरीच वाढली. दक्षिणेतील दिग्विजय, ज्याचा उल्लेख नंतर गुप्त राजांनी केला होता, दक्षिणेकडील राज्याचा उल्लेख आहे ज्यामध्ये वाकाटक राज्याचा उल्लेख नाही, गुप्त राजांनी दक्षिणेच्या वाकाटक राजांशिवाय सर्व राज्य जिंकले.

दुसर्‍या रुद्रसेनचा प्रभाव प्रभावती गुप्ताबरोबरच्या लग्नानंतर केवळ 5 वर्षानंतर झाला. मग प्रभावती गुप्ता यांनी 13 वर्ष वाकाटक साम्राज्याचे संपूर्ण काम ताब्यात घेतले. आणि दुसरे चंद्रगुप्त यांनी यात प्रभावती देवीला मदत केली.

वाकाटक राजा हरीशेनच्या वेळी त्यांच्याकडे वराहदेव नावाचा मंत्री होता.त्याने जगप्रसिद्ध वेरूळ-अजंठाच्या लेण्यांमध्ये अनेक भित्तीचित्र आणि शिल्पकला बनविली.

वाकाटक राजा # दक्षिण_प्रवर्सेन यांनी #Setubandha नावाचा मजकूर महाराष्ट्री प्राकृत भाषेत लिहिला. ही प्राकृत महाराष्ट्रीय भाषा नंतर मराठी भाषेत रूपांतरित झाली. प्रख्यात संस्कृत कवी # कालिदास हे दुसरे प्रवार्सेनाच्या दरबारात होते. म्हणूनच त्यांनी # मेघदूत नावाची कविता लिहिली.

वाकाटक राजांनी जगातील प्रसिद्ध वेरूळ-अजंठाची संपूर्ण लेनिया (गुहा) बांधली. लेनिओ (लेणी) मध्ये अजंताकडे वकाटकांची वंशावळ आहे, जिथे त्यांना वाकाटक वंसकेतु म्हटले जाते, ते पुढे वंशावळ देतात.

●विन्ध्यशक्ति

●प्रवरसेन प्रथम

●प्रवरपुर-नन्दिवर्धन शाखा

●रुद्रसेन प्रथम

●पृथ्वीसेन प्रथम 

●रुद्रसेन द्वितीय

●प्रभावतीगुप्ता

●दिवाकरसेन

●दामोदरसेन (प्रवरसेन द्वितीय)

●नरेन्द्रसेन

●पृथ्वीसेण द्वितीय 

●वत्सगुल्म शाखा

●सर्वसेन तृतीय

●विन्ध्यसेन (विन्ध्यशक्ति द्वितीय)

●प्रवरसेन द्वितीय

●देवसेन 

●हरिसेण

तर येथे क्षत्रिय मराठा वाकाटक घराण्याची वंशावळ आहे जी वेरुळ-अजिंठाचे लेनिओ (लेणी) देण्यात आली आहे. पहिल्या राजा विंध्याशक्तीकडून शेवटचा शासक हरीसेन याला देण्यात आला आहे.

काही इतिहासकारांनी वाकाटक राजांना ब्राह्मण म्हणून घोषित केले, परंतु याचा कोणताही समकालीन पुरावा नाही, सनातन वैदिक आर्य हिंदू धर्मानुसार राजा केवळ क्षत्रिय आहे.

वाकाटक साम्राज्याच्या काळात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला. वाकाटक राजांनी संस्कृत आणि प्राकृत महाराष्ट्री कवींना आश्रय दिला व जागृत केले. वाकाटक काळातील कविता आणि वांगमय निर्मितिमध्ये महाराष्ट्री वैदर्भी आणि वाचोमी पध्दतीला महत्त्व प्राप्त झाले.

वाकाटक साम्राज्याच्या राजांनीही शिल्पकला चालना दिली. जी आपण आज वेरुल अजंठाच्या लेनिल (गुहेत) मध्ये पहात आहोत.

!! !! जय भवानी !! 🚩

!! !! जय शिवराय !! 🚩

!! !! हर हर महादेव !! 🚩

वाकाटक घराणे :





 वाकाटक घराणे :

पोस्टसांभार :मराठी विश्वकोश
महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली, त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २००च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभखंडावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे. हा वाकाटक गृहपती (गृहस्थ) जवळच्या प्रदेशातून (बहुधा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानच्या दक्षिण भागातून) यात्रेकरिता तेथे गेला असावा.
अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात या घराण्यातील पहिला राजपुरुष विंध्यशक्ती याला ‘द्विज’ म्हटले आहे, त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते असे दिसते. त्याच्या विष्णुवृद्ध गोत्राचा निर्देश वाकाटकांच्या अनेक ताम्रपटांत येतो. विंध्यशक्ती आरंभी सातवाहनांचा मांडलिक असावा पण सन २५०च्या सुमारास योग्य संधी साधून त्याने आपले स्वतंत्र राज्य स्थापले असे दिसते. हा आणि त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन यांचा नामनिर्देश पुराणात आला आहे.
प्रवरसेन हा महापराक्रमी निघाला. त्याने अनेक देश जिंकून चारी दिशांत आपले राज्य पसरविले. त्याने अनेक सोमयाक, वाजपेय आणि चार अश्वमेध करून सम्राट ही पदवी धारण केली. ऐतिहासिक काळात दक्षिण किंवा उत्तर भारतात ही पदवी दुसऱ्या कोणी राजाने धारण केलेली माहीत नाही.
पहिल्या प्रवरसेनाने साठ वर्षे (कार. २७० ते ३३०) राज्य केले. त्याला चार पुत्र होते. ते चारही राजे झाले, असे पुराणात म्हटले आहे. तेव्हा प्रवरसेनानंतर त्याच्या विस्तृत साम्राज्याचे चार भाग झालेले दिसतात. ज्येष्ठ पातीची राजधानी प्रारंभी नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ नंदीवर्धन येथे आणि नंतर वर्धा जिल्ह्यातील प्रवरपुर (सध्याचे पवनार) येथे होती. हिच्या अंमलाखाली उत्तर विदर्भ होता. दुसरी शाखा वत्सगुल्म (अकोला जिल्ह्यातील वाशिम) येथे राज्य करीत होती. तिचा अंमल दक्षिणेस गोदावरीपर्यंत पसरला होता. दुसऱ्या दोन शाखांपैकी एक छत्तीसगढात आणि दुसरी दक्षिण महाराष्ट्रात (सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात) राज्य करीत असावी. या शाखा १००-१२५ वर्षांत तेथे दुसऱ्या वंशांचे राज्य झाल्यामुळे नष्ट झाल्या असाव्यात. त्यांचे लेख अद्यापि सापडले नाहीत. नंदिवर्धन शाखेत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. त्या शाखेतील पहिला पृथिवीषेण हा गुप्तनृपती दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा समकालीन होता. माळवा-काठेवाड या देशांवर राज्य करणाऱ्या शकक्षत्रपांचा उच्छेद करताना चंद्रगुप्ताने त्याचे साहाय्य घेतले असावे. पुढे हे राजकीय सख्य दृढ करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावती-गुप्ता वाकाटक राजकुमार दुसरा रुद्रसेन याला दिली. विवाहानंतर थोड्याच वर्षांनी हा रुद्रसेन कालवश झाला. तेव्हा आपल्या अल्पवयस्क दिवाकरसेन नामक मुलाच्या नावाने प्रभावती-गुप्ता राज्यकारभार पाहू लागले. तिला राज्यकारभारात मदत करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपले काही अधिकारी व मुत्सद्दी विदर्भात पाठविले होते. त्यामध्ये कविकुलगुरू कालीदास होता. तो नंदीवर्धन राजधानीपासून केवळ पाच किलोमीटरवर असलेल्या रामगिरीवर (सध्याच्या रामटेकवर) अनेक वेळा गेला असावा. तेथे त्याला आपल्या नितांतसुंदर मेघदूत काव्याची कल्पना सुचून त्याने ते काव्य विदर्भातच पुरे केले असे दिसते. दिवाकरसेनानंतर गादीवर आलेल्या दामोदरसेन ऊर्फ प्रवरसेन यांस सेतुबंधनामक प्राकृत काव्य रचण्यात कालिदासाने मदत केली, अशी प्राचीन आख्यायिका आहे.
द्वितीय प्रवरसेनाचा पुत्र नरेंद्रसेन (कार. ४५० ते ४७०) याच्या काळी वाकाटकांनी आपली सत्ता उत्तरेस माळव्यावर पसरविली. त्याच्या काळात बस्तर जिल्ह्यात राज्य करणाऱ्या नलनृपती भवदत्तवर्म्याने विदर्भावर आक्रमण करून नागपूरपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्यावेळी वाकाटकांनी आपली राजधानी भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर येथे नेली. नरेंद्रसेनाचा पुत्र द्वितीय पृथिवीषेण याने नलांना विदर्भातून पिटाळून लावलेआणि आपली सत्ता मध्यभारतात पूर्वीच्या नागोद संस्थानापर्यंत पसरवली. तेथे त्याच्या मांडलिकाचे दोन लेख सापडले आहेत. द्वितीय पृथिवीषेणाच्या सु. इ.स. ४९० मध्ये झालेल्या निधनानंतर या ज्येष्ठ पातीचे राज्य वत्सगुल्म शाखेच्या राज्यात समाविष्ट झाले.
वत्सगुल्म शाखेचा मूळ पुरुष सर्वसेन हा पहिल्या प्रवरसेनाचा पुत्र होता. त्याने हरिविजयनामक काव्य आणि काही सुभाषिते प्राकृतात रचली. या शाखेचा शेवटचा राजा हरिषेण (कार. ४७५-५००) हा अत्यंत बलाढ्य होता. त्याने आपला अंमल उत्तरेस माळव्यापासून दक्षिणेस कुंतल देशापर्यंत आणि पश्चिमेस कोकणापासून पूर्वेस आंध्र देशापर्यंत बसविला. याच्यानंतर याचा मुलगा नादान निघाल्यामुळे वनवासीच्या कदंबांनी विदर्भावर स्वारी केली. त्या लढाईत विदर्भाच्या मांडलिकांच्या फितुरीमुळे हरिषेणाचा मुलगा मारला गेला असे दिसते. याप्रमाणे इ. स. ५२५ च्या सुमारास वाकाटक वंशाचा अस्त झाला.
सांस्कृतिक प्रगती : वाकाटकांचा काळ त्यांनी धर्म, विद्या व कला-कौशल्य यांस दिलेल्या उदार आश्रयाबद्दल प्रसिद्ध आहे. बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते पण प्रभावती – गुप्तेच्या प्रभावामुळे तिचा पती द्वितीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला. वाकाटकांनी अनेक मंदिरे बांधली व त्यांना शिल्पादिकांनी विभूषित केले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. त्यांच्या काळात राजधानीजवळच्या रामगिरी (रामटेक-नागपूर) येथील देवालयांना फार महत्त्व प्राप्त झाले होते. प्रभावती-गुप्तेचे दोन ताम्रपट तेथून दिले होते. त्यांतील एकात रामगिरिस्वामीच्या (भगवान रामचंद्राच्या) पादुकांचा उल्लेख आहे. तसाच उल्लेख कालीदासाने तेथे रचलेल्या मेघदूतात आला आहे. दुसऱ्या प्रवरसेनांनी आपल्या नावे प्रवरपुर (पवनार-वर्धा) नावाचे नगर स्थापून तेथे राजधानी नेल्यावर आपल्या रामोपासक प्रभावती-गुप्ता मातेकरिता त्याठिकाणी भगवान रामचंद्राचे उत्तुंग देवालय बांधले होते. त्याचे अवशेष तेथे सापडले आहे. वाकाटकांनी अनेक विद्वान ब्राम्हणांना ग्रामदाने दिली होती. त्या संदर्भात एकट्या द्वितीय प्रवरसेनाचेच दहा-बारा ताम्रपट सापडले आहेत. वत्सगुल्मच्या हरिषेण राजाच्या वराहदेवनामक मंत्र्याने अजिंठ्याचे क्रमांक सोळाचे लेणे कोरवून घेऊन त्याला सुंदर चित्रांनी विभूषित केले होते. खानदेशातील त्याच्या एका मांडलिकाने सतरा व एकोणीस क्रमांकांची लेणी कोरविली होती.
अजिंठ्याच्या क्रमांक सोळा, सतरा, व एकोणीस या गुहात स्थापत्य, शिल्प व चित्रकला यांचे वैशिष्ट्यपूर्ण नमुने असून गुहा क्रमांकसोळा या लेण्यातील अवशिष्ट लेखात, हे लेणे वाकाटक नृपती हरिषेण याचा मंत्री वराहदेव याने आपल्या मातापित्यांच्या पुण्योपचयाकरिता खोदविले आणि शिल्पचित्रांनी सुशोभित करून ते बौद्ध भिक्षुंना दान केले, असा मजकूर आहे. या लेखात वत्सगुल्मच्या वाकाटकांची पूर्ण वंशावळ आली आहे. या लेण्यातील सर्व भित्तींवर गौतम बुद्धाच्या जन्मातील अनेक प्रसंगांची चित्रे काढली होती. त्यांतील काही कालौघात खराब झाली असली, तरी अनेक सुस्थितीत आहेत.
या लेण्यातील प्रलंबपाद आसनातील बुद्धाची भव्य मूर्ती, मकरवाहन, गंगेची मूर्ती, गंधर्व-अप्सरांची मिथुन शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण असून गौतम बुद्धाच्या चरित्रातील घटनांना अनुलक्षून क्रमाने ती काढली आहेत. चित्रांतील गौतमाची ज्ञानप्राप्ती, अवकाशगामी अप्सरा,नंदाचा धर्मप्रवेश इ. चित्रे लक्षणीय असून त्यांची स्तुती अनेक कलाकोविदांनी मुक्त कंठाने केली आहे. बुद्धाचा मावसभाऊ नंद याने भिक्षू होण्याचे ठरविल्यावर त्याचा सेवक त्याचा मुकुट घेऊन त्याची पत्नी सुंदरी हिच्याकडे येतो. तेव्हा सुंदरी हताश होऊन मरणोन्मुख होते. या ग्लानी येऊन मूर्च्छित झालेल्या सुंदरीचे चित्र कला इतिहासातील एक अप्रतिम कलाकृती आहे. याशिवाय येथे हस्तिजातक, महाउग्मगजातकादी कथांतील प्रसंग चित्रित केलेले आहेत. स्त्रियांच्या गळ्यांतील अलंकार, बोटांतील अंगठ्या, हातांतील बांगड्या आणि केशरचनेचे विविध प्रकार ह्यांतून तत्कालीन दागिन्यांचे नमुने आणि सौंदर्यप्रसाधनांची साधने दृग्गोचर होतात.
लेणे क्रमांक सतरा हे ॠषिक राजाने आपल्या भावाच्या स्मरणार्थ खोदले असावे, असे एक मत आहे. हे लेणे प्रामुख्याने बौद्ध भिक्षुंच्या निवासासाठी खोदलेला विहार असून हरिषेणाच्या एका मांडलिकाने ते दान केल्याची माहिती या लेण्यातील लेख सांगतो. या लेण्यात मुख्यत्वे बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या जातककथांतील सुंदर चित्रे आहेत. त्यात मानवी सद्गुणांच्या कथांवर अधिकतर भर दिला असून ओवरीच्या छतांवर पुष्पालंकाररचना चितारलेल्या आहेत. ओवरीच्या मागील बाजूस भिंतीवर विश्वंतर जातकातील कथा चित्रित केली आहे. या ठिकाणी विश्वंतर भिक्षा देत असून ती स्वीकारण्यासाठी अनेक याचकांनी गर्दी केली आहे, असे दाखवून चित्रकाराने त्याचे व त्याच्या पत्नीचे वनवासगमन, आकाशातून उडत येणारा इंद्र व त्याच्या अप्सरा यांची अत्यंत मनोवेधक चित्रे चितारलेली आहेत. पडवीच्या प्रवेशद्वाराजवळ छद्दंत जातककथेतील चित्रे असून त्यांत कोचावरील राणी, तिच्या दास-दासी, जवळचे प्रशांत सरोवर, सहा दातांचा हत्ती, व त्याच्या पाठीवरील लांडगा इ. चित्रे आहेत. या लेण्यात महाकपी, हंस, विश्वंतर, सुत्तसोम इ. जातककथांतील प्रसंग चित्रित केले आहेत. बुद्धाचे महाबोधी प्राप्तीनंतरचे चित्र त्यांतील शांत, तेजस्वी भावांमुळे उठून दिसते, तर बुद्धाचे स्वागत करणारी पत्नीयशोधरा व मुलगा राहुल हे चित्र त्यांतील करूणरसांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.
गुहा क्रमांक एकोणीस ही येथील चार चैत्यलेण्यांपैकी एक चैत्य असून तेथे प्रामुख्याने कोरीवकाम आढळते. या गंधकुटीतील स्तूपात दोन स्तंभांवरील कमानींत बुद्धाची उभी मूर्ती खोदली आहे. या चैत्यात दोन लहान मंदिरे असून उजव्या गर्भगृहात वर्तुळाकार स्तंभ असेल, तरी त्यांची स्तंभशीर्षे चौकोनी आहेत. मंदिराच्या मागील भिंतीवर प्रलंबपाद आसनातील एक बुद्धाची मूर्ती आहे. चैत्यगवाक्षाच्या दोन्ही बाजूंस यक्षमूर्ती खोदल्या असून भिंतींवर बुद्ध प्रतिमा रंगविल्या आहेत. येथे अनेक मिथुन मूर्तीही आहेत. क्रमांक सतराप्रमाणेच येथे बुद्ध, यशोधरा व राहुल यांची चित्रे आहेत. त्याच्या उजवीकडे भिक्षा मागणारा बुद्ध, नागराज, त्याची राणी इत्यादींच्या मूर्ती खोदलेल्या आहेत. स्तूपाचा आकार अर्धअंडाकृती आहे. यातील सर्व कोरीवकाम दगडात आहे. तज्ञांच्या मते हे लेणे भारतातील बौद्ध कलेचा सर्वागपूर्ण असा अत्युत्कृष्ट आविष्कार आहे.
अजिंठ्याच्या पश्चिमेस सु. सोळा किमी. वर जंजाल गावाजवळ घटोत्कच या नावाने प्रसिद्ध असलेली तीन विहार-लेणी होती. त्यांपैकी दोन अवशिष्ट आहेत. हरिषेणाचा मंत्री वराहदेव याने ती खोदून घेतली, असे तेथील लेखात म्हटले आहे. मोठ्या लेण्यात व्हरांड्याच्या उत्तरेला एक खंडित लेख आहे. त्याचा खालचा भाग अस्पष्ट झाला असून वरील भागात वराहदेवाची सुरुवातीपासूनची वंशावळ दिली आहे. मोठ्या लेण्याच्या द्वारशाखेवर शिल्पांकन आहे. तीत उभ्या बुद्धमूर्ती, मिथुने कोरलेली असून छावणीच्या उंचीवर दोन्ही बाजूस एक-एक देवता आहे. आतील मंडपात चैत्य मंदिर आहे. अर्धस्तंभांवर बुद्धाची मूर्ती आणि ‘ये धर्मा हेतुप्रभवः’ असा श्लोक आहे. मंडपाच्या मागील भिंतीत सिंहासनाधिष्ठित धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील बुद्धाची भव्य मूर्ती असून उजवीकडे वज्रपाणी आणि डावीकडे पद्मपाणी यांच्या चामरधारी मूर्ती आहेत पण त्यांच्या हातात हातात कमळे दिसत नाही.
वरील लेण्यांव्यतिरिक्त वाकाटकांनी काही मंदिरे बांधली. त्यांपैकी रामटेक येथील श्रीरामचंद्राचे, प्रवरसेनाने बांधलेले प्रवरेश्वराचे, अश्वत्थखेटकातील विष्णूचे आणि दुसऱ्या प्रवरसेनाने बांधलेले श्रीरामचंद्राचे उत्तुंग मंदिर ही प्रसिद्ध आहेत. ही बहुतेक सर्व मंदिरे अभिलेखशेष झाली आहेत मात्र त्यांचे भग्न अवशेष आढळतात. या अवशेषांत रामटेक येथील वराह दरवाज्याच्या ईशान्येस एक भग्न अवस्थेत मंदिर आहे. तेथे फक्त जीर्ण लहान मंडप असून त्याचे छत सपाट आहे. त्याला सहा स्तंभ असून चारांवर पद्मबंधक खोदलेले आहेत. त्याच्या शेजारी चतुर्भुज त्रिविक्रमाची सुंदर मूर्ती भग्नावस्थेत आहे. तिच्या शिरावर किरीटमुकूट असून सभोवती तेजोवलय दाखविले आहे. कानात कुंडले आणि गळ्यात पदकासहीत मुक्ताहार आहे. वैजयंतीमाला दोन्ही पायांवर लोंबती दाखवली असून अधोवस्त्र रशनेने बांधले आहे. त्रिविक्रमाची उभी राहण्याची ढब आणि त्याच्या मुद्रेवरील निश्चय यांतून या संकल्पनेची व्याप्ती स्पष्ट होते.
प्रवरपुर (पवनार) येथील भग्नावशेष विनोबाजींच्या आश्रमाच्या आवारात एका झोपडीत (भरतभेट) ठेवले असून त्यांमध्ये रामजन्म, वनवासगमन, भरतभेट, सुग्रीव-वालियुद्ध, वालिवध असे रामायणातील कथाप्रसंग विशद करणारे काही शिल्पपट्ट आहे. यांशिवाय येथे एक अतिशय गतिमान अंधकासुर वध मूर्तीचा शिल्पपट्ट आहे. भरतभेट या शिल्पपट्टात राम-सीता, लक्ष्मण, भरत यांच्या लक्षणीय मूर्ती असून त्यांच्या चेहऱ्यांवरील भाव प्रसंगानुरूप दर्शविले आहेत. रामाची मुद्रा गंभीर असून लक्ष्मणाने मात्र उदासीन होऊन तोंड फिरविले आहे. वालिवध या दुसऱ्या शिल्पपट्टात रामाच्या बाणाने घायाळ झालेला वाली रक्तस्त्रावाने व्याकुळ झाला आहे. राम प्रत्यालीढ आसनात उभा आहे. त्याच्या मुद्रेवर तिरस्कारयुक्त अभिमान दिसतो.
यांव्यतिरिक्त वाकाटकांची अन्य मंदिरे वा अवशेष आज अस्तित्वात नाहीत परंतु त्यांच्या मांडलिकांच्या प्रदेशातील एक-दोन मंदिरे अद्यापि विद्यमान आहेत. पहिले कंकाळी देवीचे मंदिर जबलपूर जिल्ह्यात बाहूरिबंदजवळ तिगवा या गावी आहे. हा प्रदेश वाकाटकांचे मांडलिक पांडववंशी राजे यांच्या राज्यात मोडत असावा. हे राजे इ. स. पाचव्या शतकात प्रबळ होते, असे बहमनी ताम्रपटावरून दिसते. पांडववंशी भरतबल आपल्या ताम्रपटात वाकाटक नृपती नरेंद्रसेनाची प्रच्छन्न स्तुती करताना दिसतो. त्यांवरून वाकाटकांचे स्वामित्व त्यांनी मान्य केले होते, असे अनुमान करता येते. त्यामुळेच हे मंदिर वाकाटककालीन स्थापत्य शैलीचा नमुना समजण्यास हरकत नाही, असे मत वा. वि. मिराशी मांडतात. कंकाली देवीचे मंदिर वाकाटक-गुप्तशैलीप्रमाणे सपाट छपराचे व चौरस असून त्यातील गर्भगृह अडीच मीटर लांबी-रुंदीचे चौरसच आहे. द्वारशाखा पाकळ्यांमध्ये कोरलेल्या सिताफळांच्या आकृत्यांनी सुशोभित केली आहे. गणेशपट्टीच्या दोन्ही बाजू वाढवून तिच्या खाली डावीकडे गंगा व उजवीकडे यमुना या नदीदेवतांचे सुंदर शिल्पपट्ट बसविले आहेत. गंगा-यमुनांच्या मूर्ती हे गुप्तकालीन मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. गंगादेवी एका मकरावर त्रिभंगात उभी आहे. तिच्या डाव्या बाजूस एक स्त्री व उजव्या बाजूस चामरधारी सेवक उभा आहे. मूर्तीच्या वरील भागात सीताफळाच्या झाडाची कमान आहे. गंगा उजव्या हाताने सीताफळ तोडीत आहे. गंगेने बहुविध अलंकार धारण केलेले असून तिच्या केशपाशात मुक्तायुक्त ललाटीका, कानात वर्तुळाकार कुंडले, गळ्यात मुक्ताफलकहार, बाहूंवर केयूर, मणिबंधात वलये, कमरेला रशना व पायात नूपुर आहेत. शिवाय गळ्यातील वैजयंतीमाला गुडघ्यापर्यंत लोंबकळत आहे. तिची त्रिभंग अवस्था आणि मुखावरील प्रसन्नता यांमुळे हे शिल्प लक्षणीय ठरले आहे. यमुनेची मूर्तीही अशाच प्रकारची आहे. यमुना कुर्मावर त्रिभंगात आम्रवृक्षाखाली उभी असून डाव्या हातानी तिने वृक्षाची फांदी धरली आहे.
दुसरे मंदिर विंध्यप्रदेशात नाचना कुठारा या गावी आहे. येथे वाकाटक नृपती दुसरा पृथिवीषेण याचा मांडलिक उच्चकल्पवंशी व्याघ्रदेव याचा शिलालेख मिळाला. त्यावरून तो भाग वाकाटकांच्या आधिपत्याखाली होता, असे अनुमान वा. वि मिराशी काढतात. साहजिकच येथील पार्वतीचे मंदिर वाकाटककालीन असावे. त्याप्रमाणे हेही मंदिर सपाट छपराचे असून गर्भगृहद्वाराच्या चौकटीच्या आतील पट्टीवर नक्षीकाम असून बाहेरील शिल्पपट्टात दंपतिशिल्पे आहेत. द्वाराच्या दोन्ही बाजूंस तिगव्याप्रमाणेच गंगा-यमुनांच्या मूर्ती आहेत. प्रदक्षिणापथाच्या भिंतींवर बाहेरच्या बाजूंस सिंह, अस्वल, हरिणे, मोर,माकडे इ. पशु-पक्षी आणि यक्षगण, सुरसुंदरी इत्यादींच्या मुर्ती खोदल्या आहेत. एका ठिकाणी गोवर्धन पर्वत-उद्धाराचा शिल्पपट्ट दिसतो. मागील भिंतींवर नाग-नागी आणि नाग बालक यांच्या मूर्ती आहेत.तिगवा व नाचना कुठारा येथील मंदिरे ही प्रामुख्याने उत्तरेकडील वाकाटक-गुप्तकालीन वास्तुशैलीतील वाकाटक साम्राज्याबाहेरील मंदिरे आहेत मात्र बाकाटकांच्या कलेचे वस्तुनिष्ठ दर्शन अजिंठ्याच्या गुहा क्र. सोळा, सतरा व एकोणीस तसेच विदर्भातील अवशिष्ट भग्न अवशेषांतुन घडते.
संस्कृत व प्राकृत वाङ्मयाला वाकाटकांच्या काळी अतिशय बहर आला होता. तत्कालीन संस्कृत काव्यांवरून वैदर्भीनामक विशिष्ट रीती किंवा शैली प्रसिद्धीस आली. दंडी, वामन वगैरे आलंकारिकांनी तिची सर्वगुणयुक्त अशी प्रशंसा केली आहे. तिच्या गुणांमुळे कालिदासादी अन्य देशीय कवींनीही त्याच शैलीत आपली काव्ये रचली. कालिदासाचे मेघदूत हे सुधामधुर काव्य या काळात विदर्भात रचले गेले. स्वतः वाकाटक नृपतींनी प्राकृतात उत्कृष्ट काव्यरचना केली. दुसऱ्या प्रवरसेनाचे सेतुबंध हे काव्य माहाराष्ट्री प्राकृतात रचलेले अद्यापी उपलब्ध आहे. त्यात सेतुबंधापासून रावणवधापर्यंतचे रामचरित पंधरा आश्वासांत (सर्गांत) वर्णिले आहे. या काव्याची बाणभट्ट, दंडी, आनंदवर्धन इत्यादिकांनी अत्यंत स्तुती केली आहे. या काव्याच्या रचनेत महाराजाधिराज विक्रमादित्याच्या आज्ञेने कालिदासाने प्रवरसेनास मदत केली, अशी आख्यायिका एका प्राचीन टीकाकाराने उल्लेखिली आहे. ती अंतस्थ पुराव्यावरून खरी वाटते. वत्सगुल्म शाखेचा संस्थापक सर्वसेन याने हरिविजय नामक उत्कृष्ट काव्य माहाराष्ट्री प्राकृतात रचले होते, असे संस्कृत काव्यालंकार ग्रंथातील अनेक उल्लेखांवरून आता ज्ञात झाले आहे. त्यामध्ये कृष्णाच्या पारिजातहरणाचे कथानक घेतले होते. याचीही अनेक आलंकारिकांनी स्तुती केली आहे. याशिवाय प्रवरसेन, सर्वसेन इ. वाकाटक नृपतींनी कित्येक सुंदर प्राकृत सुभाषिते रचली होती. त्यांपैकी काही नंतर गाथासप्तशतीत घालण्यात आली.
पहा : अजिंठा गुप्तकाल प्रभावती-गुप्ता.
संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Classical Age, Bombay, 1970.
2. Yazdani, Gulam, Ed, TheEarly History of the Deccan, London, 1960.
३. मिराशी, वा. वि. वाकाटक नृपति आणि त्यांचा काल, नागपूर, १९५७.
४. सांकलिया, ह. धी. माटे, म. श्री. महाराष्ट्रातील पुरातत्त्व, मुंबई, १९७६.
मिराशी, वा. वि. देशपांडे, सु. र.

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...