#भाग_आठवा :-
#रक्तरंजित_रणसंग्राम :-
रात्रीचा दुसरा प्रहर, काळोखी रात्र, घनदाट
वनराई, मिट्ट अंधार, रातकिड्यांची किरकिर अन सोबत
पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. वाटा निसरड्या
झालेल्या होत्या. नाईकांच्या हेरांनी आधीच निश्चित
केलेल्या वाटेवरून मार्गक्रमण चालू होते. ठीक ठिकाणी
आधीच हेर पेरून ठेवलेले होते. शिवाय, ठरवलेल्या ।
वाटेवर थांबलेले मावळे हातात मशाली घेऊन उभे होते.
जसे बाजी अन त्यांचे सोबती येताना दिसतील तेव्हाच
मशाली पेटवायचे अन सगळे त्या वाटेवरून गेले की
लगेच विझवून टाकायचे. त्यामुळे गडाखाली असलेल्या
शत्रूच्या पाहरेकऱ्यांना कशाची चाहूल लागायला नको.
हेरांनी आणलेल्या खबरीनुसार सिद्दी मसूद हा खिंडीच्या बाजूने छावणी मध्ये तळ ठोकून होता, त्याच बाजूने हल्ला करायचं नक्की झालं होतं. तो दिवस होता पळण्याचा अन
आज होता पळवण्याचा. त्या दिवशी बाजी मसुदला
पाठीवर घेऊन पळत होते, आज मात्र छातीवर घेणार
होते. छावणी मधे ठीक ठिकाणी पडलेल्या डेऱ्यांच्या
आजूबाजूला ठेवलेल्या मशालींच्या ज्वाळा आता
दृष्टिपथात येऊ लागल्या होत्या.
इशारा होताच मावळ्यांनी एकाच वेळी जोरजोरात
कर्णे फुकायला सुरुवात केली. त्यातच 'हर हर महादेव'
अन 'जय भवानी' चा जयघोषही घुमू लागला. अचानक
कर्त्यांच्या अन अन आरोळ्यांच्या आवाजाने शत्रू सैन्य
भयभीत झालं. अन त्याच वेळी मावळ्यांनी हल्लाबोल
केला. समोर येणारे पांढऱ्या कपड्यांतील मावळे म्हणजे
जंगली भुतचं भासत होती. मावळ्यांचा आवेश एवढा
जबरदस्त होत कि, तिथं पडलेला तळ पूर्णपणे उध्वस्त
झाला.
"शैतान आये..शैतान आये..." ।
"मरहट्टे आये.. मरहट्टे आये .."
"भागो... भागो...", म्हणत आदिलशाही सैन्य वाट
फुटे तिकडं सैरावैरा धावू लागलं. काही तर मागच्या
मागे जंगलात पळत सुटले. बाजी अन काही निवडक
मावळे सिद्दी मसूदच्या डेऱ्याकडे सरकत होते. तोपर्यंत
सगळीकडे बोभाटा झाला होता. सिद्दी मसूद झोपेतून
कसाबसा जागा झाला.
"या अल्ला ... चैन से सोने भी नहीं देते ये मरहट्टे ।"
अन हुजऱ्यावर ओरडला, "जाओ.... बाकी सैनिकोंको
आगा कर दो । और वो दळवी और सुर्वे सरदारोंको भी
जल्दी से जगाव । जा ssss व ।"
डेऱ्या बाहेर घोडा तयार होता. घाई घाईत मसूद बाहेर
पडला. हळू हळू आदिलशाही सैन्य जमा होऊ लागलं.
कर्णे फुकायला सुरुवात केली. त्यातच 'हर हर महादेव'
अन 'जय भवानी' चा जयघोषही घुमू लागला. अचानक
कर्त्यांच्या अन अन आरोळ्यांच्या आवाजाने शत्रू सैन्य
भयभीत झालं. अन त्याच वेळी मावळ्यांनी हल्लाबोल
केला. समोर येणारे पांढऱ्या कपड्यांतील मावळे म्हणजे
जंगली भुतचं भासत होती. मावळ्यांचा आवेश एवढा
जबरदस्त होत कि, तिथं पडलेला तळ पूर्णपणे उध्वस्त
झाला.
"शैतान आये..शैतान आये..." ।
"मरहट्टे आये.. मरहट्टे आये .."
"भागो... भागो...", म्हणत आदिलशाही सैन्य वाट
फुटे तिकडं सैरावैरा धावू लागलं. काही तर मागच्या
मागे जंगलात पळत सुटले. बाजी अन काही निवडक
मावळे सिद्दी मसूदच्या डेऱ्याकडे सरकत होते. तोपर्यंत
सगळीकडे बोभाटा झाला होता. सिद्दी मसूद झोपेतून
कसाबसा जागा झाला.
"या अल्ला ... चैन से सोने भी नहीं देते ये मरहट्टे ।"
अन हुजऱ्यावर ओरडला, "जाओ.... बाकी सैनिकोंको
आगा कर दो । और वो दळवी और सुर्वे सरदारोंको भी
जल्दी से जगाव । जा ssss व ।"
डेऱ्या बाहेर घोडा तयार होता. घाई घाईत मसूद बाहेर
पडला. हळू हळू आदिलशाही सैन्य जमा होऊ लागलं.
सिद्दी मसूदचा डेरा जवळ येऊ लागला होता.
बाजींनी दोन्ही हातात तलवार पेलली होती. समोर जर
चुकून एखादा गनीम आलाच तर बाजींच्या ताकतवर
वाराने जागीच कापला जात होता. तोच डेऱ्याच्या
बाहेर सिद्दी मसूद घोड्यावर चढताना बाजींच्या नजरेस
पडला.
बाजींनी "हर हर महादेव" म्हणत त्याच्या दिशेने धाव
घेतली. मावळेही बाजींच्या साथीनं पळत होते. एवढ्या
वेळात शत्रूच्या पलीकडच्या छावणीत असलेल्या
सैनिकांना खबर पोहोचली होती. सैन्य गोळा होऊ
लागलं होतं. काही क्षणांत बाजींनी मसूदला गाठलं.
"आ ही गये ये मरहट्टे । जलद से जल्द सैनिक भेजो
जाओ।" मसूद आजूबाजूला जमलेल्या सैन्यावर ओरडू
लागला.
"आरं... बगताय काय? हाणा.. मारा ...", बाजींनी
आरोळी ठोकली.
मसूद बरोबरच्या तुकडीची अन बाजींच्या पथकाची
गाठ पडली. हाणा मारी चालू झाली. मसूद घोड्यावरून
तलवार फिरवत होता. तर बाजींसमोर येणारा सपासप
कापला जात होता. ज्यांनी ज्यांनी खिंडीत बाजींचा रुद्रावतार पहिला होता ते तर "शैतान आया.. शैतान
आया.. " म्हणत, दूर पळू लागले. . आता सिद्दी मसूद
अन बाजी समोर समोर होते. मसूदचा घोडा कधीच
गारद झाला होता. एका हातात ढाल अन दुसऱ्या हाती
तलवार घेऊन मसूद बाजींसमोर उभा ठाकला होता.
पहिला वार बाजींनी केला. वार एवढा जबरदस्त होता
कि, मसूद एक दोन पावलं मागेच सरकला.
"काफर कि *** | जैसे तेरे भाई तो जहन्नुम ने भेजा था
। वैसे, तू भी जायेगा।"
"आरं जा रं कुत्रीच्या... आज तर तुला जित्ताच
सोडत न्हाय. यमच दावतु तुला.."
खण खण आवाज घुमू लागले. मसुदही बाजींच्या
वाराला प्रत्युत्तर देत होता. बाजींचा दुसरा वार ढालीवर
झेलत होता. पण बाजींसमोर मसूदच्या निभाव लागेना.
बाजींच्या एका एका वारसरशी मसूद मागे मागे हटत
होता. पलीकडे "दीन दीन" म्हणत मसूदचे पलीकडच्या
छावणीतले सैन्य जमा होऊ लागलं होत. मसूद हसत
हसत बाजींचे वार झेलत होता. तोच एका ताकतवर
वाराने मसूदची तलवार खाली पडली. अन दुसरा वार
मसूदच्या छाताडावरच झाला. .
"या अल्ला ssss", म्हणत सिद्दी मसूद मागे कोसळला.
मागच्या मागे मसूदला त्याच्या सैन्याने पकडलं अन
दूर घेऊन जाऊ लागले. तोच शे दोनशे शत्रू सैन्य
मावळ्यांच्या सामोरं आलं. तुंबळ लढाई चालू झाली.
बाजींसोबत फक्त पन्नास साठ मावळा होता. बाजी
आज पुन्हा एकदा गरगर तलवार फिरवत होते. जखमी
मसूदला घोड्यावर टाकून दुसऱ्या छावणीकडे नेण्यात
आलं.
बाजी तलवारी फिरवतच होते. सामोरा येणारा गनीम जखमी होऊन पडत होता.
'आज पळणे नाही. जीव गेला तरी बेहत्तर पण मागे हटने
नाही.'
तोच एक मावळा बाजींच्या जवळ येऊन म्हणाला,
"बाजी, गनीम लय हाय. आणि समोरून आणखी
येत्यात. चला बाजी.. चला.."
पण बाजी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आज
पुन्हा एकदा रुद्र संचारला होता अंगात. लढता लढता
बाजी शत्रूच्या गराड्यात जाऊन पोहोचले. त्यांच्यात
अन मावळ्यांच्यात अंतर पडू लागलं. शत्रूची संख्या
वाढू लागली. बरेचसे मावळे धारातीर्थी पडले होते. उरलेले पंचवीस तीस कसे बसे अंतःकरणाच्या प्राण पणाला लावून लढत होते. बाजी माघार घ्यायला तयार नव्हते. एव्हाना आता बाजींना माघारी परतणं अशक्य झालं होतं. आजूबाजूला सारा आदिलशाही सेनासागर जमला होता. फिरवून फिरवून तरी किती वेळ तलवार फिरवणार? बाजींच्या हालचाली मंद होऊ लागल्या. कुणी संधीचा फायदा घ्यायचं, अन सपकन
बाजींच्या पाठीत वार करायचं. जखमी झालेलं अन
दमलेलं शरीरं पेलणं आता बाजींना शक्य होईना.
तलवारीच्या वारासह बाजी भेलकांडू लागले. संधी
मिळताच बाजींवर वार होत होते.
बाजींनी दोन्ही हातात तलवार पेलली होती. समोर जर
चुकून एखादा गनीम आलाच तर बाजींच्या ताकतवर
वाराने जागीच कापला जात होता. तोच डेऱ्याच्या
बाहेर सिद्दी मसूद घोड्यावर चढताना बाजींच्या नजरेस
पडला.
बाजींनी "हर हर महादेव" म्हणत त्याच्या दिशेने धाव
घेतली. मावळेही बाजींच्या साथीनं पळत होते. एवढ्या
वेळात शत्रूच्या पलीकडच्या छावणीत असलेल्या
सैनिकांना खबर पोहोचली होती. सैन्य गोळा होऊ
लागलं होतं. काही क्षणांत बाजींनी मसूदला गाठलं.
"आ ही गये ये मरहट्टे । जलद से जल्द सैनिक भेजो
जाओ।" मसूद आजूबाजूला जमलेल्या सैन्यावर ओरडू
लागला.
"आरं... बगताय काय? हाणा.. मारा ...", बाजींनी
आरोळी ठोकली.
मसूद बरोबरच्या तुकडीची अन बाजींच्या पथकाची
गाठ पडली. हाणा मारी चालू झाली. मसूद घोड्यावरून
तलवार फिरवत होता. तर बाजींसमोर येणारा सपासप
कापला जात होता. ज्यांनी ज्यांनी खिंडीत बाजींचा रुद्रावतार पहिला होता ते तर "शैतान आया.. शैतान
आया.. " म्हणत, दूर पळू लागले. . आता सिद्दी मसूद
अन बाजी समोर समोर होते. मसूदचा घोडा कधीच
गारद झाला होता. एका हातात ढाल अन दुसऱ्या हाती
तलवार घेऊन मसूद बाजींसमोर उभा ठाकला होता.
पहिला वार बाजींनी केला. वार एवढा जबरदस्त होता
कि, मसूद एक दोन पावलं मागेच सरकला.
"काफर कि *** | जैसे तेरे भाई तो जहन्नुम ने भेजा था
। वैसे, तू भी जायेगा।"
"आरं जा रं कुत्रीच्या... आज तर तुला जित्ताच
सोडत न्हाय. यमच दावतु तुला.."
खण खण आवाज घुमू लागले. मसुदही बाजींच्या
वाराला प्रत्युत्तर देत होता. बाजींचा दुसरा वार ढालीवर
झेलत होता. पण बाजींसमोर मसूदच्या निभाव लागेना.
बाजींच्या एका एका वारसरशी मसूद मागे मागे हटत
होता. पलीकडे "दीन दीन" म्हणत मसूदचे पलीकडच्या
छावणीतले सैन्य जमा होऊ लागलं होत. मसूद हसत
हसत बाजींचे वार झेलत होता. तोच एका ताकतवर
वाराने मसूदची तलवार खाली पडली. अन दुसरा वार
मसूदच्या छाताडावरच झाला. .
"या अल्ला ssss", म्हणत सिद्दी मसूद मागे कोसळला.
मागच्या मागे मसूदला त्याच्या सैन्याने पकडलं अन
दूर घेऊन जाऊ लागले. तोच शे दोनशे शत्रू सैन्य
मावळ्यांच्या सामोरं आलं. तुंबळ लढाई चालू झाली.
बाजींसोबत फक्त पन्नास साठ मावळा होता. बाजी
आज पुन्हा एकदा गरगर तलवार फिरवत होते. जखमी
मसूदला घोड्यावर टाकून दुसऱ्या छावणीकडे नेण्यात
आलं.
बाजी तलवारी फिरवतच होते. सामोरा येणारा गनीम जखमी होऊन पडत होता.
'आज पळणे नाही. जीव गेला तरी बेहत्तर पण मागे हटने
नाही.'
तोच एक मावळा बाजींच्या जवळ येऊन म्हणाला,
"बाजी, गनीम लय हाय. आणि समोरून आणखी
येत्यात. चला बाजी.. चला.."
पण बाजी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आज
पुन्हा एकदा रुद्र संचारला होता अंगात. लढता लढता
बाजी शत्रूच्या गराड्यात जाऊन पोहोचले. त्यांच्यात
अन मावळ्यांच्यात अंतर पडू लागलं. शत्रूची संख्या
वाढू लागली. बरेचसे मावळे धारातीर्थी पडले होते. उरलेले पंचवीस तीस कसे बसे अंतःकरणाच्या प्राण पणाला लावून लढत होते. बाजी माघार घ्यायला तयार नव्हते. एव्हाना आता बाजींना माघारी परतणं अशक्य झालं होतं. आजूबाजूला सारा आदिलशाही सेनासागर जमला होता. फिरवून फिरवून तरी किती वेळ तलवार फिरवणार? बाजींच्या हालचाली मंद होऊ लागल्या. कुणी संधीचा फायदा घ्यायचं, अन सपकन
बाजींच्या पाठीत वार करायचं. जखमी झालेलं अन
दमलेलं शरीरं पेलणं आता बाजींना शक्य होईना.
तलवारीच्या वारासह बाजी भेलकांडू लागले. संधी
मिळताच बाजींवर वार होत होते.
"मारो.. काटो... काफर कि ***.. " गोंधळ चालू होता.
महादरवाजाकडे तोंड करत बाजींनी गुडघे टेकले.
"राज...
"राज...
माफ करा या बाजीला...
पर जातु आता...
आमची येळ भरली राजं...
दादा बी वाट बगत आसलं आता...
आमच्या हातानं एवढीच स्वराज्याची सेवा झाली...
पर तुमी हाय ना राजं...
सांभाळा स्वराज्य..."
महादरवाजाच्या बुरुजाकडे बघत बाजी म्हणाले,
"राजं... ह्यो बाजीचा शेवटचा मुजरा.'
"राजं... ह्यो बाजीचा शेवटचा मुजरा.'
तलवार खाली पडली. डोळे मिटले, अश्रू चिखलात मिसळून गेले. उजवा हात कपाळाला टेकला. राजांना मुजरा झाला. तोच समोरून एक गनीम ओरडत तलवार उगारत बाजींवर धावला. दुसऱ्या क्षणी बाजींची डाव्या हातातली तलवार सपकन घुमली. समोरच्या हशमाचं मुंडकं उंच उडालं. एवढा वेळ आजूबाजूला चाललेला गोंधळ अचानक थांबला.
तलवार पडली... श्वास थंडावला... देह कोसळला...
बाजीप्रभू देशपांडे नावाचं वादळ आखेर शांत झालं.
बाजीं रक्ताच्या थारोळ्यात पडले. अन् बाजीचा श्वास थंडावला... आखेरच्या श्वास सुटला... माती उचं उडाली... उडालेली माती गजापूरची खिंड पावन करीत विलीन झाली.
बाजींच्या रक्तान विशाळगडाचा पायथा पावन झाला.
बाजीं रक्ताच्या थारोळ्यात पडले. अन् बाजीचा श्वास थंडावला... आखेरच्या श्वास सुटला... माती उचं उडाली... उडालेली माती गजापूरची खिंड पावन करीत विलीन झाली.
बाजींच्या रक्तान विशाळगडाचा पायथा पावन झाला.
बाजी गेला! फक्त मातीत नाही मेला तर माती साठी मेला...
- समाप्त -
पुढे...
बाजी फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत विधीगत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच,
पन्हाळगडावर बाजीप्रभूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे...
बाजी फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत विधीगत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच,
पन्हाळगडावर बाजीप्रभूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे...
स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप, सुरक्षित राहायला हवेत यासाठी स्वत: मृत्यूला सामोरे जायची तयारी असलेल्या शिवा काशिद, बाजी आणि फुलाजी देशपांडेंसारख्या सरदारांमुळे स्वराज्याचा पाया रचला जात होता. परंतु ही हिर्यांसारखी अमूल्य माणसे सोडून गेलेली पाहताना महाराजांना काय वाटत असेल हे सांगणे कठीणच.
‘रणचंडीचे जणू पुजारी, पावनखिंडीचे गाजी।
विशालशैली दिसती दोघे, बाजी आणि फुलाजी।।’
विशालशैली दिसती दोघे, बाजी आणि फुलाजी।।’
महत्वपूर्ण :-
बाजीप्रभुंचा जन्म ३०, ऑगस्ट १६१५ रोजी सिंध, ता. भोर, जि.पुणे येथे झाला. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते.
शिवाजीराजांना विरोध करणाऱ्या बांदलांचे देशमुख रायाजी वयाने लहान होते. अन् बाजी त्याचे "सरनोबत" होते. परंतु, बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू
व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. दोन्ही हातांनी दोन समशेरी व दांडपट्टे चालविण्यात ते तरबेज होते. शिवरायांच्या सैन्यात हा अमोल सेनानी होता. शिवरायांवर त्यांची अलोट भक्ती होती.
पन्हाळागड ते खेळणागड मोहिमे मध्ये बाजी सह
रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि सुमारे ६०० बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते त्याचे नेतृत्व बाजीप्रभू करत होते.
बाजी व फुलाजी हे दोघे 'बंधू' होते.
सतत २१ तास ६४ किलोमीटर चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने विशाळगड घाटला.
एकूण सात प्रहारांमध्ये राजे विशाळगडाला पोहचले.
एक प्रहर म्हणजे ३ किलो मीटर
ही घटना दिनांक १२ जुलै, १६६० रोजी घडली.
मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि
बाजीं फुलाजीसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने गजापूरखिंड पावन झाली
ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात
गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाळ
म्हणून उभे राहिले.
बाजीप्रभुंचा जन्म ३०, ऑगस्ट १६१५ रोजी सिंध, ता. भोर, जि.पुणे येथे झाला. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते.
शिवाजीराजांना विरोध करणाऱ्या बांदलांचे देशमुख रायाजी वयाने लहान होते. अन् बाजी त्याचे "सरनोबत" होते. परंतु, बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू
व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. दोन्ही हातांनी दोन समशेरी व दांडपट्टे चालविण्यात ते तरबेज होते. शिवरायांच्या सैन्यात हा अमोल सेनानी होता. शिवरायांवर त्यांची अलोट भक्ती होती.
पन्हाळागड ते खेळणागड मोहिमे मध्ये बाजी सह
रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि सुमारे ६०० बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते त्याचे नेतृत्व बाजीप्रभू करत होते.
बाजी व फुलाजी हे दोघे 'बंधू' होते.
सतत २१ तास ६४ किलोमीटर चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने विशाळगड घाटला.
एकूण सात प्रहारांमध्ये राजे विशाळगडाला पोहचले.
एक प्रहर म्हणजे ३ किलो मीटर
ही घटना दिनांक १२ जुलै, १६६० रोजी घडली.
मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि
बाजीं फुलाजीसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने गजापूरखिंड पावन झाली
ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात
गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाळ
म्हणून उभे राहिले.
(माहिती - वाचकांनी नोंद घ्यावी. ही कथा, निनाद
बेडेकर यांच्या युट्यूब वरील शिवचरित्रातील बाजी प्रभू
देशपांडे यांच्या प्रसंगावर लिहिलेली आहे. काही प्रसंग
काल्पनिक आहेत. अधिक माहितीसाठी त्यांचे युट्युब
वरील व्याख्यान ऐकावे ही नम्र विनंती.)
बेडेकर यांच्या युट्यूब वरील शिवचरित्रातील बाजी प्रभू
देशपांडे यांच्या प्रसंगावर लिहिलेली आहे. काही प्रसंग
काल्पनिक आहेत. अधिक माहितीसाठी त्यांचे युट्युब
वरील व्याख्यान ऐकावे ही नम्र विनंती.)
संदर्भ :-
श्रीमानयोगी, पावनखिंड - रणजित देसाई,
राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
शिवचरित्र - निनाद बेडेकर
(https://youtu.be/_jEj6YYAOJQ)
शिवराय - नामदेवराव जाधव,
शिवरायांच्या स्फूर्तिकथा - शांताराम कर्णिक
ऐतिहासिक कथा शिवरायांच्या - कादंबरी
शिवभारत ग्रंथ
श्रीमानयोगी, पावनखिंड - रणजित देसाई,
राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
शिवचरित्र - निनाद बेडेकर
(https://youtu.be/_jEj6YYAOJQ)
शिवराय - नामदेवराव जाधव,
शिवरायांच्या स्फूर्तिकथा - शांताराम कर्णिक
ऐतिहासिक कथा शिवरायांच्या - कादंबरी
शिवभारत ग्रंथ
कथालेखक :-
- ईश्वर आगम
- ईश्वर आगम
सांभर :-
- नवनाथ येवले
- नवनाथ येवले
आभार :-
महाराष्ट्रातील गड किल्ले आणि इतिहास पेजमुळे इतिहासाची देवाण-घेवाण होण्यास खूप मोलाची कामगिरी होत आहे. हे अग्निकुंड चिरंतर चालू राहो!
महाराष्ट्रातील गड किल्ले आणि इतिहास पेजमुळे इतिहासाची देवाण-घेवाण होण्यास खूप मोलाची कामगिरी होत आहे. हे अग्निकुंड चिरंतर चालू राहो!
|| महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ||
|| एकच आवाज ||
|| जय जिजाऊ जय शिवराय ||
|| जय शंभुराजे ||
धन्यवाद!
🙏🚩
|| एकच आवाज ||
|| जय जिजाऊ जय शिवराय ||
|| जय शंभुराजे ||
धन्यवाद!
🙏🚩
टीप :-
इतिहासात काय घडलं हे सागणारी आपली माणसं आपल्यात नाय फक्त गेले ३५० वर्ष मराठ्यांची गाथा उघड्या डोळ्यांनी पाहणार कोण आहे तर तो उंच उंच सह्याद्री, दर्या-कपारी, गडकोट, खिंडी, झाडे-झुडुपे इ. व बखरीतील काही काव्यपागतीना आणि सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन इतिहास रेखाटला गेला जातो. त्यामुळे प्राचीन भूतकाळ वाचताना संवादकाच्या मत्तावर कधी कोणी ठाम राहू नये, आपण पण इतिहास खोलवर वाचत चला त्यामुळे आपल्याला कितपत कळलं त्यावर आपून सर्वांनी भूतकाळ अभिप्राय करावे! पण लढाई असेल हे, ही फक्त गाथा आहे.पन्हाळगड ते विशाळगड
इतिहासात काय घडलं हे सागणारी आपली माणसं आपल्यात नाय फक्त गेले ३५० वर्ष मराठ्यांची गाथा उघड्या डोळ्यांनी पाहणार कोण आहे तर तो उंच उंच सह्याद्री, दर्या-कपारी, गडकोट, खिंडी, झाडे-झुडुपे इ. व बखरीतील काही काव्यपागतीना आणि सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन इतिहास रेखाटला गेला जातो. त्यामुळे प्राचीन भूतकाळ वाचताना संवादकाच्या मत्तावर कधी कोणी ठाम राहू नये, आपण पण इतिहास खोलवर वाचत चला त्यामुळे आपल्याला कितपत कळलं त्यावर आपून सर्वांनी भूतकाळ अभिप्राय करावे! पण लढाई असेल हे, ही फक्त गाथा आहे.पन्हाळगड ते विशाळगड