विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 19 December 2019

#पुण्यश्लोक_बाळाबाईसाहेब_लाडोजीराव_शितोळे #अलिजाबहाद्दुर_महादजी_शिंदे_यांची_थोर_कन्या


#पुण्यश्लोक_बाळाबाईसाहेब_लाडोजीराव_शितोळे
#अलिजाबहाद्दुर_महादजी_शिंदे_यांची_थोर_कन्या
आपल्या भारत भुमीवर अनेक महान स्त्रीयांनी जन्म घेतला आहे पण आपल्या सामाजिक दडपणाखाली अनेक स्त्रिया महान कर्तुत्व असून ही अंधारातच राहिल्या यात उमाबाईसाहेब दाभाडे, ग्वाल्हेरच्या बायजाबाई शिंदे, धारच्या मैनाबाई पवार, किबे घराण्यातील राखमाबाई किबे, होळकर कन्या भिमाबाई होळकर, तंजावर कन्या विजयामुक्तंबा, बडोदा महाराणी जमनाबाई गायकवाड, कोल्हापूर राणी जिजाबाई, व सईबाई उर्फ दिवाणसाहेब भोसले इत्यादी दुर्लक्षित कर्तुत्ववान स्त्रिया होऊन गेल्या आहेत
अशाच दुर्लक्षित कर्तुत्ववान स्त्रियांच्या यादीत बाळाबाईसाहेब शितोळे हे एक अग्रगण्य नाव आहे बाळाबाई शितोळे या अलिजाबहाद्दुर महादजी शिंदेंच्या कन्या असून त्यांचा विवाह शिंदेंचे सरदार लाडोजीराव शितोळे यांच्यासोबत झाला होता यांचे पती लाडोजीराव शितोळे व दोन मुले सिध्दोजीराव शितोळे, लक्ष्मणराव शितोळे यांच्या मृत्यूनंतर शितोळे जहागीरीचा सगळा कारभार बाळाबाईसाहेब शितोळे यांच्यावर येऊन पडला त्यांनी अत्यंत चोखपणे जहागीरी सांभाळली शिवाय रामचंद्र शितोळे हा दत्तक मुलगा गादीवर बसवून स्वतः कारभार चालवला ग्वाल्हेर घराण्याच्या कन्या असलेल्या बाळाबाई यांनी आपला भाऊ दौलतराव शिंदे यांची बायको व सर्जेराव घाटगे यांची कन्या बायजाबाई शिंदे यांचा विरोध मोडून काढण्यासाठी सर्व सरदार एकत्र करून जनकोजी शिंदे यांना दत्तक घेउन ग्वाल्हेर गादीवर बसवले यामुळे सर्वत्र बाळाबाईसाहेब शितोळे यांचा दरारा निर्माण झाला व सर्वसामान्य जनतेला बाळाबाईसाहेब शितोळे यांच्याविषयी आपुलकी वाटू लागली
बाळाबाईसाहेब शितोळे या मोठ्या धार्मिक व श्रध्दाळू होत्या त्यांनी बरीच लोकोपयोगी कामे केली बाळाबाईसाहेब यांनी यात्रेकरूंसाठी मथुरा व वृंदावन येथे पक्का रस्ता तयार केला, जहागीरीत जागोजागी पुल बांधले, विहीरी व तलाव बांधले, पुष्कर, उज्जैन, काशी येथे मंदीरे उभारली, बनारस काशी येथे गंगानदीवर गायघाट व शिवमंदिर उभारले, काशीमध्ये भला मोठा वाडा उभारून अन्नछत्र चालू केले बाळाबाईसाहेब शितोळे यांच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेर येथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले होते ग्वाल्हेरची जनता बाळाबाईसाहेब यांच्यावर फार प्रेम करत होती त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना देवीचा दर्जा दिला होता समाधी स्थळावर वर्षातून एकदा त्यांची यात्रा ही भरवली जात होती .
With thanks
Zunjar Babar

Monday 16 December 2019

महाराणी येसुबाई यांचे पुत्र "छत्रपती शाहु महाराज" ( पहिले )

ऐन उमेदिची म्हणजे 1690 ते 1707 अशी 17 वर्ष मुघलांच्या कैदेत घालवणारा राजा कसा असेल , सतत धर्मातरांचे संकट , धमकी , मानसिक अत्याचार , असे खुप त्रास मानसिक भिती घेऊन शत्रुच्या छावणीत लहाणाचा मोठा झालेला वडीलांची क्रुर हत्या करणार्या दुश्मणांच्या ताब्यात वाढलेल्या राजाकडुन कोण आणि काय अपेक्षा करावी
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य वाढवण्याचे काम जर कोणी केल असल तर ते म्हणजे , छत्रपती संभाजी महाराज आणि
आता विषय राहतो "छत्रपती शाहु महाराज" इतके दिवस कुठ होते , महाराणी येसुबाई कोठे होत्या ??
1689 साली छत्रपती संभाजी राजे यांची क्रुर हत्या झाल्यानंतर महाराणी येसुबाई यांनी राजाराम महाराज यांचे मंचकरोहण करून स्वराज्यांचे 3 रे छत्रपती म्हणून जाहिर केले , संपुर्ण राज परिवार मुघली कैदेत सापडू नये म्हणून दबाव तंत्र वापरून छत्रपती राजाराम महाराज यांना व त्यांच्या दोन पत्नी, मातब्बर सरदार ,विश्वासु माणस सोबत देऊन पन्हाळ गड व तेथुन जिजींला जाऊन राज्यकारभार पहावा व होईल तशी आम्हाला बाहेरून मदत करावी असे सांगून रवानगी केली , व स्वतः बाल शाहुनां सोबत ठेवून रायगड लढू लागल्या . साधारण एक वर्ष रायगड लढत होता , दाणापाणी संपले बाहेर छत्रपती राजाराम महाराज जिंजींच्या वेढ्यात गुंतले होते मदत मिळण्याची सगळीच आशा संपली होती ,, शेवटी औरंगजेब पुढे काही अटी ठेवून रायगडाचे दरवाजे खुले करून बाल शाहुंना व अत्यंत विश्वासु लोक सोबत घेऊन औरगंजेबच्या छावणीत दाखल झाल्या , 1707 साली औरंगजेबच्या मृत्यु नंतर मराठ्यांच्यामधे राजसत्ते साठी भांडणे लावून मराठे संपवायचे या हेतूने औरंगजेबच्या राजपुत्राने "छत्रपती शाहुंना "17 वर्षे च्या कैदेतून , तुम्ही आमचा मांडलिंक राहताल आणि तुमची मातोश्री महाराणी येसुबाई आमच्याकडे ओलिस राहतील या अटिंवर मुक्तक्ता केली ,
अगदी जो परिणाम हवा होता तोच झाला मराठ्यांच्या गादिचा खरा वारस कोण यावरून संभ्रम झाला यातुनच शाहु महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यात लढाई झाली यात छत्रपती शाहुंनी निर्णायक विजय मिळवत छत्रपती च्या घराण्याचे 5 वे छत्रपती म्हणून माँ साहेब जिजाऊ जयंती दिवशी अजिंक्यतारा किल्लेवर राज्यभिषेक सोहळा झाला . यावेळी छत्रपती शाहुनी स्वतः महाराणी ताराबाई यांना कोल्हापुर ची गादि म्हणजेच राज्य निर्माण करुन देऊन त्याची राजधानी पन्हाळा गडावर स्थापन केली .
1707 साला पासुन मराठ्यांची चौफेर घोडदौड चालु झाली . छत्रपती शाहु महाराज यांना "अजातशत्रु "
संबोधले जायचे , तसेच शिवाजी महाराज असेही दुहेरी नाव होते. छत्रपती शिवाजी महाराज हे जर सुरवात होते तर छत्रपती शाहु महाराज हे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे , पराक्रमाचे , स्वराज्य स्वप्नाचे, युद्ध चालीरिती चे , गणिमी कावाचे , राज्यकारभाराचे , न्यायाचे , स्त्री सन्मानाचे परमोच्च बिंदु होते . छत्रपती शाहु महाराज यांच्या पदरी 800 पेक्षा जास्त सरदार होते , यात सर्वात पुढे होते ते म्हणजे सरदार मानाजी पायगुडे , सरदार खंडेराव दाभाडे व यांच्या सोबत असायचे ते म्हणजे पहिले बाजीराव पेशवे . महाराणी येसुबाई यांना दिल्लीतुन कैदेतून मुक्त करण्यासाठी शाहु महाराज सतत प्रयत्न करत होते पण दोन वेळा यात अपयश आले पण 3र्या प्रयत्नात छत्रपती शाहुंनी जी राजनिती , दबावतंत्र गणिमी कावा वापरला त्याने मुघलशाहीची पाळमुळे उखडली गेली व तिथुन पुढे दिल्लीच्या गादिवर कोणी बसायचे कोणी नाही त्याने कोणते निर्णय घ्यायचे हे सुद्धा छत्रपती शाहु महाराज हे सातारा मधे बसुन ठरवत . छत्रपती शाहु महाराज यांना संपुर्ण हिंदुस्तान मधे युद्धाला आव्हाण देईल , दगाफटका करल अशी कोणतीही ताकद , किंवा कोणतीही शाही नव्हती अगदि इंग्रज ही नव्हते , इंग्रजांच्या एका पत्रात उल्लेख आहे छत्रपती शाहुशी युद्ध करणे म्हणजे संपुर्ण हिदुस्तान शी युद्ध करणे
महाराणी येसुबाई यांचे पुत्र "छत्रपती शाहु महाराज" ( पहिले ) यांनी . छत्रपती संभाजी राजे यांना राज्यकारभार कमी पण संघर्ष आणि स्वराज्य संरक्षण जास्त कराव लागल , छत्रपती राजाराम महाराज यांची तर याहुन ही अत्यंत बिकट वाटचाल होती , 1700 साली सिंहगडावर देह ठेवल्यावर तर स्वराज्याचे काय होईल किंवा आस्तित्व राहिल की नाही याची तर संपुर्ण आशाच मावळली होती , पण या वेळी 25 वर्षे वयाच्या राजाराम महाराज यांच्या पत्नी छत्रपती ताराबाई यांनी 4 वर्षांचे शिवाजी राजे व्दीतीय यांना गादिवर बसवून सलग 7 वर्ष औरंगजेब याच्याशी अत्यंत्य कुशाग्र बुद्धीने , चातुर्याने , गणिमी काव्याने युद्ध करून औरंगजेबच्या सर्व आशा आकांक्षा स्वप्न मातीत मिळवले . एवढेच नव्हेतर औरंगजेबाच्या राज्यात घुसुन असे युद्ध केले की औरंगजेबला मिळणारी रसद , मदत तोडली आणि या महाराष्ट्राच्या मातीत मिसळुन टाकले ,
क्रमशाः
सदरील लेख " श्री अजयदादा जाधवराव " यांच्या प्रेरणेतून लिहला आहे (सरदार जाधवराव यांचे वशंज )
आम्ही छत्रपती शाहु भक्त 🚩🚩🚩
राहुल दोरगे पाटिल

मराठा स्वराज्याच्या विस्ताराचे जनक छत्रपती शाहु महाराज


#मराठा स्वराज्याच्या विस्ताराचे जनक छत्रपती शाहु महाराज यांची आज २७० वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने आमचे मार्गदर्शक श्री राजेनरेश जाधवराव यांच्या वॉल वरून साभार ★

छत्रपती शाहु महाराज यांच्यावर इतिहासात लेखन तसेही फार थोडके आहे. त्यात मराठी रियासतकार हे एक. त्यानी जे लेखन केले त्यापैकी येथे इ सन १७०७-१७१९ याच कालावधीतील लेखनाबद्दल आपण माहिती पाहु. बाकी कालावधीत पुढील भागात.
१) इ सन १६८९ साली बालशाहुराजे व येसुबाईसाहेब याना मोगल कैद झाली. ही कैद पुढे १७ वर्षाची होती.या कैदेत शाहु महाराजाना असंख्य संकटाना तोंड द्यावे लागले,त्यापैकी धर्मांतराचा प्रयत्न हे एक महत्वपुर्ण संकट. या सर्व संकटातुन सहिसलामत बाहेर काढले ते मातुश्री येसुबाईसाहेब व मराठा सरदारानीच.. या १७ वर्षाच्या कैदेत शाहु महाराजानी काय केले? हा प्रश्न बर्याचजणाना भेडसावतो...परंतु जेव्हा आपण कैदेतुन सुटुन आल्यानंतरची सलग ४२ वर्षची कारकिर्द अभ्यासली तर शाहु महाराजानी कैदेत काय केले? यावर चांगलाच प्रकाश पडतो, कैदेत शाहु महाराजानी छत्रपती शिवराय महाराज,संभाजी महाराज यानी मराठा स्वराज्यात राबवलेली बाब अभ्यासलेली दिसुन येते,तसेच त्यासोबतच त्यानी औरंगजेबाची प्रशासनव्यवस्था देखिल अभ्यासलेली दिसुन येते. हे शाहु महाराज सुटुन आल्यानंतर लगेच जो अमंल बसवला व ज्या पद्धतीने अमंल बसवला यावरुनच सिद्ध होते. परंतु रियासतकारानी ही बाब मांडलेली दिसत नाही. कारण शाहु महाराज यानी सुटुन आल्यानंतर लगेच छत्रपती शिवराय महाराज यानी चालु केलेली व जबरदस्तीने शत्रुशाहीकडुन वसुल केलेली चौथ व सरदेशमुखी कर शाहु महाराजानी कुलबाबे (हा वंशपरंपरागत अधिकार) या नावाखाली चालु केलेला दिसुन येतो.तो माझाच अधिकार या आवेशात चालवला असेच दिसुन येते. म्हणजे छत्रपती शिवराय महाराज यांच्या कार्यपद्धतीचा प्रभाव येथे दिसुन येतो. शाहु महाराज येथेच न थांबता चौथ व सरदेशमुखी वसुलीसोबतच त्या बदल्यात त्या प्रांताची संरक्षणाची जबाबदारी देखिल उचलली ती देखिल रितसर व प्रत्यक्षात आपले सरदार त्या प्रदेशात पेरुनच.....यासंबंधी खाफीखान म्हणतो,"शाहुने मोघलप्रांतात प्रत्येक १०० मैलावर चौथ,सरदेशमुखी व संरक्षणाच्या नावाखाली एक गढी बांधुन त्यावर एक चौथ वसुली करणारा,एक सरदेशमुखी वसुली करणारा व एक रहदारी कर वसुल करणारा अधिकारी ससैन्य ठेऊन आम्ही या प्रांताचे सरक्षण करतोत,अशी पद्धत अवलंबीलेली दिसुन येते. हे काम शाहु महाराजानी इ सन १७११ लाच केलेले दिसुन येते. म्हणजे संरक्षणच्या नावाखाली मोगल प्रांतात प्रत्यक्ष मराठा स्वराज्याचा विस्तारच !!!! विशेष याच काळात शाहु महाराजांचे करवीर गादीशी देखिल वाद चालु होते.
रियासतकारानी याबाबतीत शाहु महाराज याना मोगलाचे मांडलिक राजा असे नामाभिधान दिले. मान्य आहे छत्रपती शाहु महाराज यानी मोगलांशी चौथ,सरदेशमुखी व संरक्षणाचा करार केला, परंतु तो करार शाहु महाराजानी कशा पद्धतीने राबवला याचा अभ्यास केलेला दिसुन येत नाही.बहुतेक साधनांचा अभाव हे एक कारण यात असु शकते !!! ही त्रुटी मराठी रियासत मध्ये दिसुन येते. बरे असो.
आणखी एक महत्वाचा संदर्भ शाहु महाराजांच्या बाबतीत सापडतो,तो म्हणजे इ सन १७०८ मध्येच शाहु महाराजानी दक्षिणेतील छत्रपती शिवराय महाराजानी जे स्वराज्य विस्तारले होते तेथे अमंल बसवण्यासाठी शंकराजी महाडीक याना नेमुन रुजु होण्यास आदेश दिला व कर्नाटकातील तमाम पाळेगाराना आज्ञापत्र पाठवली. म्हणजे शाहु महाराजानी हे आदेश इ सन १७०८ मध्येच दिलेले आहेत...यावरुनच मराठा स्वराज्याच्या विस्ताराची सुरुवातच शाहु महाराजानी आल्यापासुनच आरंभलेली दिसुन येते. यात आणखी एक महत्वपुर्ण पुरावा मिळतो तो म्हणजे,संताजीराव जाधवराव हे सरसेनापती असतानाचे मोडी कागदपत्र अनुवादीत केलेले आहेत आणी त्यात शाहु महाराजानी आपल्या सरदाराना संपुर्ण महाराष्ट्रात इनाम,मोकासे व सरंजाम दिल्यासंबंधीच्या स्पष्ट नोंदीच सापडतात.......संताजीराव जाधवराव(धनाजीराव पुत्र) यांचा सेनापती पदाचा कार्यकाळ हा इ सन १७११ सालचा आहे. म्हणजे यावरुन हेच सिद्ध होते की ,छत्रपती शाहु महाराज यानी मराठा स्वराज्याचा विस्ताराचा परिपाट इ सन १७०८ पासुनच चालु केलेला आहे.....म्हणजे रियासतकारानी हा विस्तार प्रारंभ इ सन १७१९ पासुन सुरु झाला यास छेद बसतो.
२) रियासतकारानी आणखी एक बाब रियासतीत मांडलेली आहे ती म्हणजे,धनाजीराव जाधवराव यांची निष्ठा डळमळीत होती व ते फक्त वतनासाठी शाहु महाराजाना तगादा लावत असत.
हे प्रकरण आपण अभ्यासले असता,असे लक्षात येईल की,सरसेनापती धनाजी राव जाधवराव यांच्याच महत्वपुर्ण निर्णयामुळे खेड युद्धात इ सन १७०८ लाच शाहु महाराजाना स्थैर्य प्राप्त झाले होते.तेथुन ते सैन्य घेऊन सातारा काबीज करुन १२ जानेवारी १७०८ रोजी लगेच राज्याभिषेक करवुन घेतला....म्हणजे धनाजीरावांच्या एका निर्णयामुळे शाहु महाराजांचे पारडे जड झाले आणी स्थिरता देखिल मिळाली...ही इतिहासातील कलाटणी देणारी घटना असुन याचे श्रेय रियासतकारानी धनाजीरावाना दिलेले दिसत नाही. तसेच ते फक्त वतनाच्या मागे होते, असे रियासतकार म्हणतात,ज्या धनाजीरावांच्या हातात एकेकाळी मुलकी,सनदी व लष्करी सेवा असताना देखिल स्वतःसाठी फक्त पाच गावे मागवुन घेतले व बाकी वतन चक्क विकत घेतले....असा व्यक्ती या वतनास तगादा लावुन शाहु महाराजांना वीट आणला असे रियासतकारानी जे वक्तव्य केले ते धनाजीराव यांची जी पाच छत्रपतींच्या अधिकाराखाली या मातीस योगदान दिले ते पाहुन साफ चुकिचेच आहे. रियासतकारानी हे वक्तव्य कोणत्या भावनेतुन व का केले ? हे वाचकच ठरवतील.
3) रियासतकारानी आणखी बाब रियासतीत नमुद केलेली आढळते,छत्रपती शाहु महाराज यांची सलग ४२ वर्षाची दैदिप्यमान कारकिर्द तीन पेशव्यात विभागुन सांगितली आणी त्यास जे कारण सांगितले ते म्हणजे,शाहु महाराजांची कारकिर्द खुपच प्रदिर्घ आहे म्हणुन विभागुन मांडत आहे........मांडा विभागुन परंतु छत्रपती शाहु महाराजांचे महत्वपुर्ण कार्यास डावलुन मांडले,हे साफ चुकिचे व छत्रपतींच्या कार्यास दगा देणे म्हणता येईल.बरे असो. या कारकिर्दीत समस्त आदेश,नियोजन,मोहिमांचे नियोजन,सरंजाम,इनाम
,मोकासे,सरदाराना रणनिती आखुन देणे, सरदाराना व प्रधानास देखिल मोहिमेवरील सर्व अपडेट दररोज मागवुन घेऊन त्याना त्यानुसार सुचना देणारे छत्रपती शाहु महाराज हेच खरे मराठा स्वराज्याच्या विस्ताराचे जनक व यानीच विस्ताराचे दारे मराठा सरदाराना इ सन १७०८ पासुन उघडुन दिले आसताना त्यांचे श्रेय नाकारणे रियासतकाराना शोभले नाही.....याचे कारण त्यांच्यावेळी अपुर्ण साहित्य असे म्हणु शकतो ? ते वाचकच ठरवतील.
निर्विवाद पेशव्यांचे कार्य शाहु महाराजांच्या कार्यकाळात इतर शिंदे,होळकर,नागपुरकर भोसले, दाभाडे,गायकवाड,कदमबांडे,घोरपडे,महाडीक,शिर्के आदी सरदारांच्या बरोबरीने किंबहुना उत्तरेत थोडे सरस असु शकते....परंतु शाहु महाराजानी उत्तरेत बाजीरावांसोबतच शिंदे, होळकर,पवार आदी सरादार,दक्षिणेस महाडीक,घोरपडे,फत्तेस़िह भोसले आदी सरदार,पुर्वेस नागपुरकर राजेभोसले आणी पश्चिमेस दाभाडे,कदमब़ाडे,व गायकवाड या सरदाराना नेमणुका देऊन मराठा स्वराज्याचा विस्तार खुद्द करवुन घेतलेला दिसुन येतो......तो रियासतकारानी मान्य न करता शाहु महाराजाना यातुन डावललेले दिसुन येते.
५) रियासतकारानी पुणे व गुजराथेतील जो मोगलांचा अमंल सेनापती खंडेराव दाभाडे व सुलतानजी निंबाळकर,पिलाजीराव जाधवराव यानी दुर केला तो डावलुन बाळाजींच्या नावे करवुन दिलेला दिसुन येतो..... परंतु पुण्यातुन मोगल सरदार रंभाजी निंबाळकर यास हाकलुन देण्याचे महत्वपुर्ण कार्यच खंडेराव दाभाडे व सुलतानजी निंबळाकर व पिलाजीराव जाधवराव यानी केलेले आहे,तसेच गुजराथ मध्ये तर याच खंडेराव व सुलतानजी यानी हुसैन बंधुंची पाचावर धारण करुन शरण आणले आणी गुजराथ कायमचा मराठा स्वराज्यास इ सन १७१५ लाच जोडलेला आहे.आणी याच मोहिमेमुळे सय्यद बंधुना शाहु महाराजांशी करार करण्यास भाग पाडले.
६) सर्वात महत्वाचे म्हणजे इ सन १७१८चा करार हा शाहु महाराज व सय्यदबंधु यांच्यात झालेला आसताना तो बाळाजी विश्वनाथ यानी सरसेनापती खंडेराव यांच्या नेत्रुत्वाखाली दिल्लीत जाऊन सही करुन आणला म्हणुन रियासतकारानी शाहु महाराजांचे श्रेय नाकारुन ते बाळाजीस देतात.....हे साफ चुकिचे आहे...करार केला खुद्द छत्रपती शाहु महाराजांनी ,सर्व तजवीज लावली शाहु महाराजांनी,कलमे ठरवली शाहु महाराजांनी,सरसेनापती प्रधान व मराठा सरदार सय्यद सोबत दिले शाहु महाराजांनी आणी मग तेथुन सातारा येथे कागद आणण्याचे काम करणार्या बाळाजीना श्रेय कसे काय दिले? विशेष सदरील मोहिम सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या अधिकाराखाली आसताना तिचे श्रेय मग दुसर्याना का दिले गेले?
७) रियासतकारानी आणखी एक महत्वाची चुक केलेली दिसुन येते. इ सन १७११ अगोदर बाळाजी विश्वनाथ बद्दल ठोस अशी संदर्भ नसताना त्याना प्रत्येक श्रेय देण्याचा प्रयत्न दिसुन येतो......ठोस पुरावे ज्याचे आहेत ते मान्यच आहे....परंतु ज्याचे ठोस पुरावे नाहीत ते मान्य कसे होईल ? परंतु रियासतकारानी हे कशाच्या आधारावर मांडले हे त्यानाच माहिती !!!!
अशा हजारो नोंदी रियासतीत रियासतकारानी चुकिच्या मांडल्या आहेत.....परंतु सदरील पोस्टमध्ये इ सन १७०७-१७१९ मधील मोजकेच मुददे चर्चेला घेतले आहेत.यावरुन हेच सिद्ध होते की मराठी रियासत यात बर्याच त्रुटी आहेत.याचे कारण रियासतकाराना तत्काळातील अपुरे संदर्भ असु शकतील किंवा छत्रपतींचा आकस असु शकतो ......असेच वाटते !!! परंतु या कालखंडावर म्हणजे छत्रपती शाहु महाराज यांच्या सलग ४२ वर्षाच्या कारकिर्दीवर पुनर्लेखन निष्पक्षपणे झाले पाहिजे आसेच प्रामाणीक मत !!!!!!
८) रियासतकारानी आणखी एक बाब चुकिची मांडली आहे,शाहु महाराज सुटुन आलेले आसताना सुलतानपुर परगण्यात तापी नदिच्या किनारी कोकरमंडा येथे अंबुजी कदमबांडे हे मराठा सरदार सामील झाले हे सत्य आहे........परंतु रियासतकारानी तेथे अंबु पांडे असे नाव लिहिले आहे जे साफ चुकिचे आहे.विशेष त्यांच्याच मराठा सरदारांच्या वंशावळी या पुस्तकात रियसतकारानीच कदमबांडे यांचा संदर्भ दिलेला असताना येथे चुकिचा उल्लेख केलेला आढळतो.
९) तसेच छत्रपती शाहु महाराजाना सुरुवातीच्या काळात स्थिरता मिळवुन देण्यात रायभानजीराजे भोसले,रुस्तुमराव जाधवराव,ज्योत्याजी केसरकर,परसोजी भोसले,पिलाजीराव जाधवराव,धनाजीराव जाधवराव साबाजी भोसले,खंडो बल्लाळ,अंबोजी कदमबांडे,सुजानसिंह रावळ,शेख मिरा,सवाई जयसिंह,हैबतराव निंबाळकर,सुलतानजी निंबाळकर,खंडेराव दाभाडे,बाळाजी विश्वनाथ,नेमाजी शिंदे, आदी मराठा सरदारांचा समावेश आसताना रियासतकार मात्र थोडक्याच सरदारांचा उल्लेख करताना दिसत आहेत जे साफ चुकिचे आहे.
मराठा स्वराज्याच्या विस्ताराचे जनक छत्रपती शाहु महाराज याना मानाचा मुजरा !!!
(सदरील पोस्ट अभ्यासात्मक द्रुष्टीने घ्यावी ,जातीवाचक किंवा धर्मवाचक दृष्टीने घेऊ नये ही नम्र विनंती )
#मराठा_स्वराज्याचे_विस्ताराचे_जनक_छत्रपती_शाहु_महारा#
#शाहु_पर्व#

#Rajenaresh_Jadhavrao

शिवकन्या राणुआक्का यांचा ३०० वर्षांपूर्वीचा वाडा

शिवकन्या राणुआक्का यांचा ३०० वर्षांपूर्वीचा वाडा 🙂
"शिवकन्या राणुआक्का यांचा भुईंज येथील 300 वर्षापूर्वीचा वाडा "राणुआक्का या शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या द्वितीय कन्या. राणुआक्का म्हणजे प्रेम, त्याग ,समर्पण, ह्यांचा अखंडपणे वाहणारा झराच जणु .राणु आक्कांचा जन्म इ.स.1651 मधे राजगडावर झाला.इ.स.1660 मधे जिजाऊ माँसाहेब व शिवाजी महाराज यांनी राणुआक्का यांचा विवाह सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर एक वर्षांनी राजगडावर लावून दिला.राणुआक्का यांचा विवाह शिंदखेडचे लखुजी जाधवराव यांचे पुत्र दत्ताजी,दत्ताजी यांचे पुत्र ठाकुरजी व ठाकुरजी यांचे पुत्र अचलोजी जाधवराव यांच्याशी झाला होता. जाधवरावांच्या घरी राणुआक्का देऊन जिजाऊ माँसाहेबांनी आपले माहेर, तर शिवाजी महाराजांनी आपले आजोळ नव्या नात्याने जवळ केले.राणुआक्कांचे आपले छोटे बंधु शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम होते. शंभूराजेंना आईची ऊणीव राणुआक्कानी कधीच भासु दिली नाही. आपल्या बंधुच्यामागे कायम त्या ढाली सारख्या ऊभ्या रहात. अशाया राणुआक्का पुणे सातारा महामार्गावर भुईंज या गावी सिंदखेडकर लखुजी जाधवरावांचे वंशजांमध्ये दिल्या होत्या. . निजामशाहाने लखुजी जाधवरावांच्या मुला नातवासहीत त्यांची हत्या केली ,त्या नंतर सर्व जाधवराव महाराष्ट्रात विखुरले गेले. यांची प्रमुख घरे भुईंज, माळेगाव, वाघोली , येथे स्थायिक झाली.
या प्रमुख घरापैकी भुईंज हे घर .येथेच राणुआक्का यांचे वास्तव्य होते.आजही भुईंज येथील वाडा इतिहासाच्या पाऊलखुणां जपत मोठ्या दिमाखात उभा आहे.राणुआक्का यांचे वंशज महेंद्रसिंह ऊर्फ भैय्या साहेब जाधवराव तेथे वास्तव्यास आहेत .
" शिवकन्या राणुआक्का यांना
मानाचा मुजरा, "
🚩🙏🏻🚩

#कर्जबाजारी_औरंगजेब_आणि_त्याला_भिकेला_लावणारे_मराठे.

#कर्जबाजारी_औरंगजेब_आणि_त्याला_भिकेला_लावणारे_मराठे.
मुघल सल्तनतीला अक्षरशः भिकारी करून सोडले ते मराठ्यांनी.
औरंगजेबाच्या बाप-जाद्यांनी कमवलेली सगळी धन दौलत औरंगजेबाने दक्खनला येऊन खर्च केली.
अत्यंत हट्टी स्वभाव माणसाला दिवाळखोर बनवतो ह्याच हे उत्तम उदाहरण आहे.
फ्रेंच इतिहासकार मनुची औरंगजेबाच्या दरबारात काही काळ नोकरीला होता.
हा दक्षिणेत आल्यावर शिवाजी महाराजांना भेटलाही होता.
हा मनुची म्हणतो कि “दक्खनला आल्यापासून औरंगजेबाच्या मोहिमेत दर साल एक लाख माणसे व तीन लाख जनावरे मरत असत.”
ह्या मनुचीच्या बोलण्यात अतिशयोक्ती आहे असे क्षणभर जरी समजले तरीही लढाईत मेलेले, मराठ्यांनी छापा घालून मारलेले, पुरात वाहून गेलेले, चिखलाने, उपासमारीने, रोगराईने, अपघाताने, हाल अपेष्टांनी, आणि उपासतापासाने मेलेले मोगल सैनिक आणि बाजारबुणगे यांची मरायची संख्या स्मितीत करणारे अशीच आहे.
आता माणसांची हि स्थिती तर जनावरांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. धोधो कोसळणाऱ्या पावसाने आणि त्यामुळे अचानक आलेल्या पुरात अशी असंख्य जनावरे वाहून जात असत, त्यात बुडून मरत असत.
माणूस आणि जनावरे यांच्या प्रमाणेच मुघलांचे असंख्य सामान व सरंजाम पावसाने भिजून निकामी होत असे. त्यात भर म्हणजे मराठे अचानक धाडी घालून हा सरंजाम, खजिना, हत्ती, घोडे, उंट जे जे हाताला लागेल ते ते लुटून नेत असत.
मराठ्यांच्या हाताला काही लागू नये म्हणून मुघल ह्यातील बराचश्या गोष्टी जाळूनही टाकत असत. मराठे मुघलांच्या फौजेतून तोफा, दारुगोळा, बंदुका, दमदम्याला लागणारी लाकडे, ( दमदमा म्हणजे लाकडी मनोरा ) ही लाकडे तोडणारे बेलदार, गवंडी, ह्यांनाही लुटून आपल्याबरोबर नेत असत.
मराठ्यांच्या आणि निसर्गाच्या अव-कृपेने मुघलांच्या फौजेत इतका दुष्काळ पडे कि एक शिपाई, एक तंबू, एक उंट, एक बैल, एक घोडा, एक हत्ती, एक तलवार, आणि एक बंदूक बक्कळ पैसे मोजल्याशिवाय विकत मिळतच नसे. मराठ्यांच्या सततच्या छाप्यांमुळे औरंगजेबाच्या छावणीत नेहमीच दुष्काळ असे. रुपयाला दोन शेर तीन शेर असे धान्य मिळत असे.
(रुपयाची किंमत तेंव्हा फारच मोठी होती. आजच्या सारखं नाही. )
खाफीखान म्हणतो कि , "शहाजहान बादशहाने साठविलेला सगळा खजिना औरंगजेब बादशहाने रिकामा केला."
खाफीखानाच्या ह्या शब्दांत फार मोठा अर्थ आहे. मोगल सल्तनतीचे सुवर्ण युग जे होते ते ह्या शहाजहाँच्याच काळात होते.
शहाजहानचा खजिना किती होता?
शहाजहानच्या राज्यातील २२ सुभ्यांचा वसूल दर साल ३६ कोटी रुपये इतका होता.
८६ लाख रुपयांची रत्ने रत्न शाळेतून निवडून काढून आणि एक कोटी रुपये खर्च करून त्याने मयूरसिंहासन बनविले होते.
३० करोड २ लाख रुपये खर्च करून ताजमहाल बनविला होता.
हे ३० करोड २ लाख म्हणजे आजच्या काळातले ६८०० कोटी रुपये.
असे अजूनही इतर हौस मौजेचे खर्च करूनही शहाजहानने मरताना २४ कोटी रुपये शिल्लक ठेवले होते.
शिवाय सोन्या चांदीची नाणी, दागदागिने आणि हिने-मानके तर निराळीच. ह्यांचा तर हिशोबच नाही इतकी ती अगणित संख्येने होती.
शहाजहानच्या मंत्र जपायच्या दोन माळांची किंमतच २० लाख रुपये इतकी होती.
बापाच्या मृत्यू नंतर हा सगळा खजिना औरंगजेबाला मिळाला.
शहाजहान बादशहाच्या मृत्यूनंतर औरंगजेब जेंव्हा बादशहा झाला तेंव्हा त्याने १४ गाड्यांवर हा सगळा प्रचंड खजिना लादून आग्र्याहून दिल्लीला आणला होता.
हा सर्व पिढीजात चालत आलेला खजिना औरंगजेबाने मराठ्यांच्या स्वारीत ओतला.
फ्रेंच इतिहासकार मनुची तर पुढे असेही म्हणतो कि, " येव्हढ्याने भागले नाही म्हणून औरंगजेबाने अकबर, जहांगीर, व नूरजहाँ यांनी साठविलेले प्रचंड खजिने बाहेर काढले व तेही वापरले. अखेर तर आपल्या घरातील चांदीची भांडीही औरंगजेबाने वितळविली."
ह्यावरून असे दिसते कि मराठ्यांवरील मोहिमांवर औरंगजेब किती आतोनात खर्च करत असे. ह्यामुळेच औरंगजेबाला पैसे हे पुरतच नसत.
पन्हाळ्याच्या स्वारीत औरंगजेबाच्या फौजेतील 'नॉरीसला' म्हणून जो युरोपियन गोलंदाज ( तोफ चालविणारा) होता त्याला तर १४ महिन्यांपासूनचा पगार मिळालेला नव्हता.
विशाळगडाच्या स्वारीत मुघल सैनिकांचा १५-१६ महिन्यांचा पगार थकला होता.
हा सैनिकांचा पगार चुकविण्यासाठी औरंगजेबाने सक्तीने फौजेतील सावकारांकडून पाच लाखांचे कर्ज काढण्याचा जेंव्हा विचार केला तेंव्हा सर्व सावकारांनी मिळून औरंगजेबाला विरोध केला आणि त्याची छावणी सोडून जाण्याची धमकीच दिली.
त्यातल्या त्यात बंगालचा सुभेदार मुर्शिद कुलीखान दरसाल १४ लाख रुपये वसूल औरंगजेबाला नियमितपणे पाठवीत असे. त्यामुळे औरंगजेबाला कसेबसे खायला तरी मिळत असे.
काही अभ्यासकांच्या मते औरंगजेबाने २० वर्षांत मराठ्यांच्या मोहीमे विरोधात कमीत कमी ४० कोटी रुपये (म्हणजे साधारण १२ ते १४ हजार कोटी रुपये )
२० लाख माणसे, आणि तितकीच गुरे ढोरे खर्ची घातली.
मराठ्यांच्या विषयी असलेला परकोटीचा द्वेष आणि अत्यंत हट्टी स्वभाव ह्या मुळे औरंगजेबाचे महाराष्ट्रातील राहिलेले दिवस अत्यंत कष्टमय आणि गरिबीत गेले.
मराठ्यांच्या विरोधातील दक्खनच्या ह्या औरंगजेबाच्या मोहिमेत फक्त एकच सैनिक होता आणि फक्त एकच सेनापती. आणि तो म्हणजे खुद्द औरंगजेब.
औरंगजेब सोडला तर बाकी कुणालाही या वीस वर्ष चाललेल्या मराठ्यांच्या विरोधात चाललेल्या मोहिमेत काडीचाही अर्थ वाटत नव्हता.
दिवस रात्र मराठ्यांच्या विरोधात मोहिमा करून मुघलांचे सैन्य पार दमून गेले होते. प्रचंड हाल सोसून मुघलांचे ठाणे असलेल्या बहादूरगडासारख्या (श्रीगोंद्याजवळील) ठिकाणी फौजेने मुक्कामाला येऊन जरा कुठे श्वास टाकावा; तोच पुढे फौजेला दुसऱ्या किल्याकडे निघण्याचा हुकूम व्हायचा.
ह्या विषयी खाफीखानाची वाक्य फार बोलकी आहेत. तो म्हणतो, " औरंगजेबाकडून मोहिमेवर निघण्याचा हुकूम ऐकूनच लष्कराच्या हृदयात धडकी भरत असे. लष्कराच्या कष्टी हृदयावर दुःखाचा डोंगर कोसळत असे."
खाफीखान जे काही बोलला ते काही खोटे नाही.
अक्षरशः थकलेल्या बैलाला पेरणी टोचून उठवावे, तसा औरंगजेब आपल्या लष्कराला चालवीत असे.
भीमसेन सक्सेनाने ह्याचे फारच हृदयद्रावक वर्णन केलेले आहे. तो म्हणतो, " औरंगजेब बादशहा गादीवर बसल्यापासून तो ( म्हणजे भीमसेन सक्सेना) एखाद्या शहरात राहिला आहे असे कधीच झाले नाही. सारख्या मोहिमा चालूच असतात. ह्या मोहिमांमुळे कित्येक सैनिकांना, सरदारांना एकाकी जीवन कंठावे लागते. त्यामुळे ते बेजार होतात.
सैनिकांनी - सरदारांनी आता त्यांची बायका-मुले आणी नोकर चाकरच लष्करात बोलावून घेतली आहेत आणि लष्करातच त्यांनी आपला संसार थाटला आहे. तेथेच त्यांना मुले बाळे झाली. लष्करातच ती लहानाची मोठी झाली आणि लष्करातच म्हातारीही झाली, आणि लष्करातच मरणही पावली. दगड मातीच्या घरांची तोंडे काही त्यांच्या दृष्टीस पडली नाहीत. त्यांना हेच वाटे कि जगात सर्वात उत्तम निवासस्थान म्हणजे लष्करातील आपला तंबू आहे."
औरंगजेबाच्या फौजेत मिळणारी सर्व सुखे, खाणेपिणे, दारू, बायका, नाचगाणी, कुटुंब-कबिला, नोकर चाकर, असा सारा काही ऐषोआराम तेंव्हा जगजाहीर होता. आता इतके सुख जर फौजेत राहून मिळत असेल तर मग मराठ्यांच्या विरोधात लढायला कोण जाईल?
दर साल उत्तर हिंदुस्थानातून ताज्या दमाची नवीन फौज भरती करण्याचा शिरस्ता औरंगजेबाच्या फौजेत असला तरीही लोक स्वखुशीने फौजेत भरती होत नसत. जोरजबरदस्ती केल्याशिवाय, खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचा धमकी दिल्या शिवाय लोक फौजेत भरतीच होत नसत.
‘मुहम्मद मुराद’ सारखे स्वखुशीने फौजेत भरती होणारे लोक फारच दुर्मिळ होते.
गुजराथ मधील ‘गोध्रा’ ह्या भागाचा फौजदार असताना ह्या मुहम्मद मुरादने स्वतः औरंगजेबाकडे येण्याची तयारी दाखविली आणि त्याला पत्र लिहिले कि, "ह्या वेळी हजरत पातशहा दख्खन मध्ये जिहादची लढाई करत आहेत. काफरांचे किल्ले ( म्हणजे मराठ्यांचे) जिंकून घेण्यासाठी तुम्ही मेहनत घेत असताना इकडे आम्ही सुखचैनीत जगावे हे आम्हाला आवडत नाही. मला आपल्याजवळ नेमण्यात आले तर मी तुम्हाला काफरांचा ( म्हणजे मराठ्यांचा) सर्वनाश करून दाखवील."
अशी स्व-खुशीने भरती होणारी पत्रे औरंगजेबाला मिळाली कि औरंगजेबाचे आनंदाश्रूच निघत असत.
मुहम्मद मुरादचे हे पत्र पाहून औरंगजेबाला मोठे कौतूक वाटले. औरंगजेबाने ताबडतोब मुहम्मद मुरादला पत्र पाठवून 'सहा महिन्यांचा प्रत्येक स्वाराला ६० रुपये असा पगार ठरवून हजार स्वार बरोबर आणण्याचा आदेशच दिला.'
पण सगळेच असे नव्हते. गुजराथचाच सुभेदार ‘शुजाअतखाना’ सारखे रडतराव कामचुकार लोक औरंगजेबाच्या फौजेत अनेक होते.
( इथून पुढे महत्वाचे: कारण ह्यात औरंगजेबाची महत्वकांक्षा आणि प्रचंड धर्मवेड दिसून येते. )
पन्हाळा किल्याकडे जात असताना औरंगजेब सैन्याची जमवा जमाव करण्यासाठी मुद्दाम मिरजेला थांबला होता.
हिंदुस्थानातील प्रत्येक प्रांताच्या सुभेदाराने ताबडतोब प्रत्येकी हजार स्वार इकडे पाठवून द्यावेत असा हुकूम औरंगजेबाने काढला.
ह्या हुकुमाप्रमाणे गुजराथचा सुभेदार ‘शुजाअतखानाने’ आपला दत्तक पुत्र ‘नजरअली खान’ याच्याबरोबर हजार स्वार पाठवावेत असे त्यालाही कळविण्यात आले.
ह्या ‘शुजाअतखानाने’ औरंगजेबाच्या पत्राला केराची टोपली दाखवत उलट औरंगजेबालाच असे लिहिले कि, " आमचे अहमदाबादचे लोक तुमच्या जिहादच्या मोहिमेवर येण्यास तयार नाहीत.
मराठ्यांना ते फारच घाबरतात.
पण तुमच्या काफरांच्या विरुद्ध सुरु असलेल्या लढाईला मदत म्हणून माझ्याकडून २ लाख रुपये तुम्हास पाठवीत आहे."
शुजाअतखानाच्या ह्या चुकारतट्टू स्वभावाचा औरंगजेबाला अतिशय संताप आला.
आणि त्याने अत्यंत कडक शब्दात पत्र लिहिले कि, " तुला मी शहाणा समजत होतो. तुझ्या बुद्धिमत्तेचे कौतुक करत होतो. तुझ्यावर मोठे उपकार करून मी तुला लहानश्या हुद्द्यावरून थेट सुभेदाराच्या हुद्द्यावर बसविले. या वेळी मी जिहाद करत आहे. ( जिहाद म्हणजे धर्मयुद्ध.)
दुष्ट काफरांचा नायनाट करण्याकरिता मी अखंड परिश्रम घेत आहे. धर्माचा अभिमान असलेल्या प्रत्येक मुसलमानाने ह्या वेळी जिहादच्या युद्धात गुंतलेल्या ह्या इस्लामच्या बादशहाला मदत केली पाहिजे.
सरकारी खजिन्यातून पैसे खर्च करून १ हजार स्वार पाठवा म्हणून मी हुकूम केला होता. पण या कामात तू टाळाटाळ केलीस. निरनिराळी करणे दाखविलीस.
आमच्या रागाची काळजी केली नाही.
ह्यात तुझे फुटके नशीब, दुसरे काय... तुला एक हजार सुद्धा स्वार पाठविता आले नाही म्हणून अल्प रक्कम आम्हास पाठवतो काय?
तुझी ही रक्कम म्हणजे सूर्याला धूळ दाखविण्यासारखे किंवा समुद्रात एक पाण्याचा थेंब टाकण्यासारखे आहे.
आमचे हिंदुस्थानचे साम्राज्य म्हणजे अथांग समुद्र आहे. प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक महिन्यात कोट्यवधी रुपये दाखल होतात आणि खर्चही होतात.
मी तुला निष्ठावंत सेवक समजत होतो. तू हे पत्र मिळाल्याबरोबर ताबडतोब तुझ्या दत्तक मुलाबारवर तुझी फौज घेऊन येणे."
औरंगजेब हे पत्र पाठवूनच थांबला नाही तर त्याने ताबडतोब आपला अत्यंत कडक आणि क्रूर स्वभावाच्या गुर्जबदाराला ह्या शुजाअतखान आणि नजरअलीखान यांना गचंडी पकडूनच घेऊन येण्यास सांगून पाठविले.
हे म्हणजे रडतरावाला बळबळ घोड्यावर बसवून आणण्यासारखे होते.
मराठ्यांचा दराराच इतका होता कि शुजाअतखानाला कळून चुकले कि आता आपण काही परत जिवंत येत नाही.
शेवटी हा शुजाअतखान पंढरपूरजवळील ब्रम्हपुरीस औरंगजेबाच्या छावणीच्या ठिकाणी आला. तिथं येऊन त्याने औरंगजेबाचा वजीर आसदखानाला सपाटून लाच खाऊ घातली. उद्देश असा कि ‘आसदखानाने औरंगजेब बाद्शहापाशी जोरदार शिफारस करून मला ब्रम्हपुरीसच राहण्याची परवानगी मिळवून द्यावी.’
पण ऐकेल तो औरंगजेब कसला.
औरंगजेबाने आता शुजाअतखान त्याचा दत्तक पुत्र नजरअलीखान आणि त्यांची शिफारस करणारा वजीर आसदखान ह्यांना ब्रम्हपुरीच्या रंग महालातून, दारूच्या पेल्यांतून, बायकांच्या गराड्यातून दरादरा फरफटत ओढीतच बाहेर काढले आणि खेळणा किल्याच्या आपल्या मोहिमेत आपल्याबरोबर चालविले.
खेळणा किल्याच्या प्रवासात असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसात उडालेल्या तंबूचे लाकडी मोठे दांडकेच वजीर आसदखानाच्या टाळक्यावर जोरदार आदळले आणि जागीच त्याचा मृत्य झाला.
जिथे वजीर आसदखाना सारख्या बड्या धेंडांची ही स्थिती तिथे हा शुजाअतखान आणि त्याचा दत्तक पुत्र नजरअलीखान किस झाड कि पत्ती....
हा सगळं औरंगजेबाच्या धाकाचा आणि भीतीचा मामला होता. फणा काढून टवकारत पाहणाऱ्या नागापुढे उभे असलेल्या माणसाप्रमाणे औरंगजेबापुढे सारे लोक थरथर कापत असत.
दूर काबूलला असलेला औरंगजेबाचा मुलगा मुअज्जमच्या पोटात बापाच्या नुसत्या पत्रानेच पोटात गोळा उठत असे.
आता इथून पुढे फार गमतीशीर आहे. वाचा..
पण असा दरारा, असा कसलेला जिद्दीचा सेनापती, असे हुकमात वागणारे सैन्य, असा हा पाण्यासारखा ओतलेला पैसा, मराठ्यांचे एका मागून एक किल्ले जिंकून घेण्याचा लावलेला असा सपाटा...
ह्या सगळ्या गोष्टींचा मर्द मराठ्यांच्या आक्रमकपणाला पायबंद घालण्याच्या दृष्टीने काहीही उपयोग झाला नाही.
उलट मराठे अजूनच आक्रमक झाले.
औरंगजेब हताशपने पन्नास-पन्नास हजार फौज घेऊन सहा-सहा महिने एकाच किल्याला वेढा देऊन बसू लागला.
ह्या अश्या भानगडीत औरंगजेबाचे तर्बीयत खान, हमीदुद्दीन खान, फतेउल्लाह खान, बहरामखान असे कित्येक नामांकित सरदार अडकून पडू लागले.
उरले सुरले सरदार मराठ्यांच्या मागे धावू लागले. पण धावणार तरी किती?....हाताला लागतील ते मराठे कसले?... अलिमर्दानखान, रुस्तुमखान खुदाबंदखान, हसनलिखान असे कित्येक सरदार मराठ्यांचा पाठलाग दिवसरात्र करीतच असत.
पण मराठे त्यांना खिजगनतीलाही मोजतही नसत.
असा हा प्रकार सहा वर्ष सतत चालला.
मराठ्यांनी उत्तरेतील ‘उज्जयनी’ पासून थेट दक्षिणेतील ‘मछलीपट्टन’ पर्यंतच्या प्रदेशात नुसता धुराळा उठवून दिला. मराठे ऐकेनातच.
'कुठं कुठं आवरू ह्या काफिर मराठ्यांना???' असे ओरडत औरंगजेब नुसता हताशपणे हे सगळे पाहतच राहिला.
१६९९ च्या ऑकटोबर महिन्यात औरंगजेब वसंतगडाला वेढा घालून बसला असता संताजी घोरपडेंचा मुलगा राणोजी घोरपडे आणि भाऊ बहिर्जी उर्फ हिंदुराव यांनी कर्नाटकात धामधूम उडवून देऊन हुबळीच जिंकून घेतली.
इकडे उत्तरेत नेमाजी शिंदे, कृष्णराव सावंत ह्या सरदारांनी नर्मदा पार करून थेट मावळ्यातच प्रवेश केला. आणि प्रचंड धामधूम मांडली.
अत्यंत महत्वाचे: मराठ्यांनी नर्मदा ओलांडली हे मोघल साम्राज्याच्या दृष्टीने भविष्यात येणाऱ्या अरिष्टाचे पूर्व लक्षण होते.
भीमसेन सक्सेना म्हणतो कि, " हिंदुस्थानातील आजवर झालेल्या सगळ्या मुसलमान सुलतानांच्या काळापासून आजपर्यंत मराठे कधीच नर्मदापार झाले नव्हते." औरंगजेब मराठ्यांच्या किल्ल्यात शिरला म्हणून मराठे आता औरंगजेबाच्या घरातच घुसले. ह्या मराठ्यांनी औरंगजेबाला बेघर केले आणि नर्मदेच्या पार हाकलून दिले."
औरंगजेबाने पन्हाळा किल्याला वेढा दिला तेंव्हा राणोजी घोरपडे ह्यांनी गुलबर्ग्याकडे धामधूम सुरु केली.
त्याच्यावर औरंगजेबाने ‘फिरोजजंग’ नावाच्या सरदाराला पाठविले. पण ‘फिरोजजंग’ गुलबर्ग्याकडे जाऊन पोहचण्याचा आधीच हा राणोजी घोरपडे आपल्या २० हजार फौजेसहित पुन्हा पन्हाळ्याच्या परिसरात येऊन औरंगजेबाच्या छावणीतच शिरून मोगलांची कत्तल करू लागला आणी त्याची छावणी लुटू लागला.
पण हे काहीच नव्हते.
खरा तडाखा औरंगजेबाला पुढच्या वर्षी बसला.
त्या वर्षी १७०२ मध्ये औरंगजेबाने खेळण्याला वेढा घातला.
भीमसेन सक्सेना म्हणतो कि, " जसा बादशहाने खेळण्याला वेढा घातला तसा मराठ्यांचा जोर सर्वत्र तुफान वाढला. मराठ्यांनी ठीक ठिकाणच्या सर्व वाटा बंद करून टाकल्या आणि मुघलांची ते लूटमार करू लागले. ह्यात मराठ्यांना अगणित संपत्ती मिळाली."
"मी तर असे ऐकले आहे कि औरंगजेब बादशहाला उत्तम आरोग्य लाभावे म्हणून हे मराठे दर आठवड्याला त्यांच्या देवाकडे प्रार्थना करून प्रसाद आणि लाडू वाटतात. मराठ्यांना असे वाटते कि जितका हा ‘म्हातारा’ जिवंत राहील तितके आपल्याला यश आणि त्याची संपत्ती मिळेल आणी मराठ्यांचं स्वराज्य हे साम्राज्यात रूपांतरित होईल.."
खेळण्याला औरंगजेब वेढा घालून बसला असताना मराठ्यांनी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुरावरच हल्ला चढविला.
मराठ्यांनी हे सगळे शहर उध्वस्त केले आणि तेथील सुभेदार ‘बेदरबख्तला’ आणि सुभेदार ‘अलिमर्दानखानाला’ कैद केले.
ह्या दोघांकडून मराठ्यांनी अक्षरशः फक्त त्यांच्या अंगावरचे कपडे सोडून असेल नसेल ते सर्व खंडणीच्या रूपात घेऊनच त्यांची सुटका केली.
त्या नंतर मराठे तिथून गोवळकॊंड्याकडे गेले आणि तिथल्या सुभेदाराला धमकावून त्याच्यापासूनही सपाटून खंडणी घेतली.
डिसेंबर १७०२ ला औरंगजेब जसा सिंहगड जिंकायला निघाला तसे ३० हजार मराठे गुजराथवर चालून गेले.
खानदेश मार्गे तापीच्या खोऱ्यातून कूच करून मराठे थेट सुरतेजवळच येऊन धडकले. मराठे परत सुरतेवर चालून आलेत ह्या नुसत्या बातमीनेच सुरतेची लोक सगळं जिथं आहे तिथंच सोडून जीव वाचवून पळतच सुटले..
(मराठ्यांचा मागचा अनुभव. मराठ्यांनी दिलेल्या ढुंगनावरच्या फटक्यांचे ओळ आजून उतरलेले नव्हते. )
तिथून खंडणी गोळा करून मराठ्यांनी ह्या निमित्ते संपूर्ण गुजराथेत आपले पाऊल ठेवले.
औरंगजेब केवळ निमूटपणे हे पाहतच होता. कोणाला ह्या काफर मराठ्यांवर पाठवावे? कोणीही जायला तयार होतच नसत. काय करणार...
परसोजी भोसले त्याच प्रमाणे पवारांच्या घराण्यातील काळोजी आणि संभाजी व त्यांचे चुलते केरोजी व रायाजी पवार ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वऱ्हाडात प्रवेश केला.
५० हजार घोडदळाची जंगी फौज घेऊन हे मराठे वऱ्हाडात घुसले होते.
वऱ्हाडची सुभेदारी ‘गाजीउद्दीन फिरोजजंग’ याच्याकडे होती.
त्याचा सरदार ‘रुस्तुमखान विजापुरी’ हा मराठ्यांवर एलिचपूर येथे चालून आला. मराठ्यांनी ह्या लढाईत त्याची २ हजार माणसे कापून काढली. सुभेदारी गाजीउद्दीन फिरोजजंगचा जावई ठार केला आणि सरदार ‘रुस्तुमखान विजापुरी’ ह्याला कैद केले.
सर-सेनापती संताजी घोरपडे ह्यांनी बरोबर १३ वर्षांपूर्वी असेच ह्या सरदार ‘रुस्तुमखान विजापुरी’ ह्याला कैद केले होते.
मागच्या सिलसिल्याप्रमाणे मराठ्यांनी ह्या वेळीही त्याच्याकडून भर भक्कम खंडणी घेऊन त्याची मुक्तता केली.
वऱ्हाडातून मराठे आता माळव्यात घुसले.
माळव्यात शिरल्यावर मराठ्यांनी आपल्या ५० हजार फौजेचे दोन भाग केले.
एक फौज उज्जयनीवर चालून गेली. आणि दुसऱ्या फौजेने सिरोंजला वेढा दिला.
मराठ्यांच्या फौज नरवर ते सिरोंज ह्या मार्गावरील कालाबाग पर्यंत पसरल्या होत्या.
शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन स्वतःचे स्वराज्य स्थापलेल्या माळव्यातील छत्रसाल बुंदेल्याशी हातमिळवणी करून मराठ्यांनी औरंगजेबाचा मलिदा असलेला सगळा माळवा प्रांतच स्वतःच्या घशात घातला आणि औरंगजेबाचे उत्तरेतून दक्षिणेकडील जाणारे सगळे रस्तेच बंद करून टाकले.
माळव्यावर ह्या वेळी मामा शाहिस्तेखानाचा मुलगा ‘अबूनसर खान’ हा सुभेदार होता.
छत्रपती शिवाजी राजाचे हे ‘मराठे’ काय प्रकरण आहे याचा त्याला बापाच्या तोडलेल्या बोटांच्या प्रकरणामुळे चांगलाच अनुभव होता.
वऱ्हाडातील सरदार ‘रुस्तुमखान विजापुरी’ ह्याला पराभूत करून मराठे आता आपल्याकडे येत आहेत हे पाहून भीतीने त्याची गाळणच उडाली.
हा पठ्या जिवाच्या भीतीने उज्जयिनी शहरातील एका घरामध्ये चक्क लपूनच बसला.
सार शहर पालथं घातलं तरी मराठ्यांना तो काही सापडेना.
ह्या उज्जयनीजवळच मांडवगडचा किल्लेदार ‘नवाजीश खान’ म्हणून होता त्याने ताबडतोब मराठ्यांशी लढायची तयारी सुरु केली.
त्याने तातडीने ह्या शाहिस्तेखानाचा मुलगा ‘अबूनसर खान’ सुभेदार याच्याकडे अतिरिक्त फौजेची मदत मागितली.
तेंव्हा ह्या पळपुट्या सुभेदार साहेबांनी ५० हजार मराठ्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी म्हणून त्याच्याकडे थोडीथोडकी नव्हे तर ६० स्वारांची प्रचंड कुमक पाठवून किल्लेदार ‘नवाजीश खानाचे’ हात बळकट केले.
आपल्या सुभेदाराची हे सहकार्य पाहून किल्लेदार नवाजीश खानाची घाबरगुंडीच उडाली आणि तो सगळं आहे तिथं मराठ्यांसाठी सोडून जीव वाचवून ‘धार’ ला पळून गेला.
धनधान्याने समृद्ध माळवा आणी गुजराथचा संपूर्ण प्रदेश मराठ्यांच्या हाती सापडला.
इकडे महाराष्ट्रात औरंगजेब ऊन वारा आणी धोधो कोसळणाऱ्या पावसात हाल अपेष्टा सोसून एकदा ह्या किल्ल्याला वेढा तर, दुसऱ्यांदा त्या किल्ल्याला वेढा देतच बसला. काहीही हाताला लागले नाही त्याच्या..
औरंगजेब दुसऱ्या किल्याकडे गेला कि मागे मराठे परत पहिला किल्ला जिंकून घेत. हा सिलसिला असाच चालू होता.
माळवा मराठ्यांकडे गेलेला पाहून औरंगजेब मोठा चिंताक्रांत झाला.
आता ही मराठा भुते आग्ऱ्यावरच जाऊन कोसळतील कि काय? अशी त्याला भीती वाटली.
त्याने तातडीने मराठ्यांना माळव्यातून हुसकून काढावे म्हणून थोड्याच दिवसांपूर्वी मराठ्यांकडून मार खाल्लेल्या वऱ्हाडचा सुभेदार ‘गाजीउद्दीन फिरोजजंग’ याला आज्ञा केली.
हा ‘फिरोजजंग’ मराठ्यांच्या मागावर जात ‘सिरोंज’ ला पोहचला. पण त्याने तिथं मराठ्यांशी युद्धच केले नाही.
उलट ‘आपण मराठ्यांना हरविले. मराठे आपल्याला बघूनच पळून गेले’ अशी खोटीच बातमी औरंगजेबाला पाठविली.
कोल्हापुरात असलेल्या औरंगजेबाने आनंदून जाऊन फिरोजजंगच्या ह्या कर्तृत्वात खुश होऊन त्याला ' सिपाह सालार' अशी पदवी देऊन त्याचा गौरव केला.
पण लवकरच खरी वस्तूथिती काय आहे हे औरंगजेबाला कळली..
मराठ्यांनीच ह्या फिरोजजंगला परत चांगले चोपून काढले आणी फिरोजजंग जीव वाचवून पळाला.. ही खरी बातमी जेंव्हा औरंगजेबाला काळजी तेंव्हा तर त्याने डोक्यावर हातच मारून घेतला.
अत्यंत संतापून लालेलाल झालेल्या औरंगजेबाने चिडून जाऊन
फिरोजजंगला दिलेली ' सिपाह सालार' पदवी काढून घेतली. फिरोजजंगला ज्या बढत्या दिल्या होत्या त्याही औरंगजेबाने जप्त केल्या.
मामा शाहिस्तेखानाचा मुलगा ‘अबूनसर खान’ ह्याने उज्जयनीत मराठ्यांना घाबरून जाऊन आपले तोंड काळे केले म्हणून त्याची तिथून उचलबांगडी केली आणि त्याच्या जागेवर ‘नवाजीशीखान’ ह्याला बसविले.
ह्या सगळ्या माळव्यातील धामधुमीत मराठ्यांची दुसरी फौज हैदराबादहून पुढे जाऊन मछली पट्टणला जाऊन पोहचली. ह्या फौजेत १२ हजार घोडदळ आणि १० हजार पायदळ होते.
ह्या सगळ्या प्रदेशात मराठ्यांनी सक्तीने चौथाई वसूल केली. जून महिन्यात गोवळकोंडा लुटले आणि घाबरून किल्ल्यात लपून बसलेल्या सुभेदाराकडून भलीमोठी रक्कम मराठ्यांनी वसूल केली.
ह्यावेळी औरंगजेबाची स्वारी शिवाजीराजांच्या तोरणा किल्ल्याचे खनपटीला बसली होती. ढगात हरवलेल्या तोरण्याच्या उंच-उंच बुरुजाकडे एकटक नजर लावून.
औरंगजेब मराठेशाही बुडवायला दक्षिणेत आला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श पुढे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांनी नेटाने चालविला....
🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩

सरसेनापती हंबीरराव मोहिते

सरसेनापती हंबीरराव मोहिते (छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती - नेमणूक : इ.स. १६७४) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सैन्यप्रमुख होते.
हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने "बाजी" हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते. या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्कारात सामील झाले. संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील पराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा अदिलशाही फर्मानामध्ये पहावयास मिळतात.
स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते. तेे पुढे कर्नाटकला गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवरायशी लावून दिला व छत्रपती घराण्यांशी पुन्हा नाते निर्माण केले. पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह शिवाजीपुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपतीचे अगदी जवळचे घराणे झाले.
यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंसाजी ऊर्फ हंबीरराव मोहिते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले. बहलोलखानाशी लढताना सरसेनापती प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली.
महाराजांच्या द्वितीय पत्‍नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्‍नी होत्या.
ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेंव्हा हंबीररावांनी अदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लवण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकानंतर मोगल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हंबीररावांना दिला. ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश, बागलाण, गुजरात, बर्‍हाणपूर, वर्‍हाड, माहूड, वरकड प्रर्यंत प्रदेशात धुमाकूळ घातला. यानंतर (सन १६७६) सरसेनापती हंबीररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील अदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणच्या येलबुर्गा येथे मोठा पाडाव करून त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली. सरसेनापती हंबीररावांच्या तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे. ही तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात आहे. तिच्यावर सहा चरे पाडलेले आहेत.
हुसेनखानाला कैद करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हंबीरराव मोहिते हे शिवरायांना गोवळकोंड्यात भागानगर येथे येऊन मिळाले. यानंतर महाराजांना आपले बंधू व्यंकोजीराजेंबरोबर सामोपचाराने चांगले संबंध निर्माण करावयाचे होते. मात्र व्यंकोजींची भेट यशस्वी झाली नाही. पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहीम आटोपती घेतली आणि ते महाराष्ट्रात आले. हंबीरराव मात्र नंतर सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात आले.त्यानंतर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला. त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवरायांचे निधन झाले. यावेळी हंबीरराव कर्‍हाड परिसरात छावणी टाकून होते.
शिवरायांच्या मृत्यूनंतर युवराज संभाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता राजाराम महाराजांचे मंचकारोहण केल्याची बातमी कळताच युवराज संभाजी राजांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजु होण्याचे आदेश सोडले. हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांनाही मिळाले होते. हंबीररावांनी संभाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.
छत्रपती संभाजी राजेंच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बुर्‍हाणपूरचा विजयात त्यांनी मिळवलेली प्रचंड लूट महत्त्वाची आहे. या विजयाने मोगलांची नाचक्की झाली. त्यानंतर मोगल सरदार शहाबुद्दीनखान उर्फ़ गाजीउद्दीखान बहादुर याच्यावरील हंबीररावांची स्वारी महत्त्वाची आहे. खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता, त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला. या वेढ्यात हंबीरराव जखमी झाले होते. यानंतर पुढे संभाजी राजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीचखान व पन्हाळा परिसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्‍न केला. त्यानंतर कल्याण जवळ रहुल्लाखान व बहाद्दुररखानाचा पराभव केला. सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हंबीररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. यानंतरच्या कालखंडात खुद्द छत्रपती संभाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता. सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ. या युद्धात मोगल सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परंतु हंबीररावांना तोफेचा गोळा लागून ते धारातीर्थी पडले...
पराक्रमाच्या परंपरेला मानाचा मुजरा !!!

क्रूरकर्मा अहमदशहा अब्दाली

क्रूरकर्मा अहमदशहा अब्दाली.
महत्वाचे: मराठ्यांच्या शौर्याच्या महानतेला सीमा नाही. अखंड हिंदुस्थानात असे कोणीही नाही ज्यांचे कर्तृत्व आणि शौर्य मराठ्यांच्या तोडीचे आहे.
मराठ्यांनी जितक्या शत्रूंशी मुकाबला केला तितका ह्या हिंदुस्थानात कोणीही केला नाही.
तुमचे शौर्य तुमच्या शत्रु पेक्षा जास्त तेजोमय कधी दिसून येते?
जेंव्हा तुम्हाला तुमच्या शत्रूची नीट ओळख असते तेंव्हा.
आपल्याला अहमदशहा अब्दालीची किती माहिती आहे?
मराठ्यांचा पानिपतातील शत्रू असलेल्या अहमदशहा अब्दालीची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
अब्दाली केवळ शत्रुपक्षातील म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे ऐतिहासिक सत्य लपविण्यासारखे आहे.
पानिपतातातील दीड लाख लोकांच्या हत्येस जबाबदार असलेल्या क्रूरकर्मा अब्दालीची हि संक्षिप्त माहिती आहे.
लेख सुरु:
हिंदुस्थानच्या इतिहासात मुख्यतः दोन व्यक्तींना क्रूरकर्मा म्हणून ओळखले जाते.
पहिला औरंगजेब आणी दुसरा अहमदशहा अब्दाली.
औरंगजेबाला छळणारे कोणी जन्माला आलेले नव्हते त्यामुळे औरंगजेबाने संपूर्ण हिंदुस्थानला अतोनात छळले.
सौभाग्य न सब दिन सोता है,
देख, आगे क्या होता है।
औरंगजेबाच्या दुर्दैवाने आणी हिंदुस्थानच्या सौभाग्याने मराठ्यांच्या शौर्याचा उदय झाला आणी लवकरच अखंड हिंदुस्थानातून फक्त मराठ्यांनी ह्या औरंगजेबाला छळायला सुरवात केली. इतके छळले कि मुघल सल्तनतीचा सगळा खजिना रिकामा करून औरंगजेबाला रिकामे हात हलवत महाराष्ट्र मातीतच मरावे लागले.
महत्वाचे:
औरंगजेब काय.. आणी अहमदशहा अब्दाली काय..
मराठ्यांशी जे जे म्हणून लढले त्या त्या सगळ्यांना मराठ्यांनी एक तर यमसदनी तरी धाडले आहे किंवा पूर्ण कंगाल तरी केलेले आहे. विशेषतः वर्तमानातही ह्यात फरक पडलेला नाही. जे मराठ्यांच्या विरोधात गेले त्यांना मराठ्यांनी हाती भिकेचे पात्र घ्यायला लावलेले आहे.
मराठ्यांच्या ह्या यशाचे गुप्त रहस्य मला माहित आहे. पण ते सांगणे इथे अपेक्षित नाही. रहस्य हे रहस्यच असले पाहिजे.
असो.
पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या वेळी आणि अब्दालीच्या हिंदुस्थानवरील पाचव्या स्वारीच्या वेळी खास करून मराठ्यांचा आणी अहमदशहा अब्दालीचा एकमेकांशी संबंध आला.
अहमदशहा अब्दालीला समजून घेण्याआधी आपल्याला अफगाणिस्तानची काही माहिती समजून घेणे आवश्यक आहे.
भारत देशात जश्या वेग-वेगळ्या जाती-जमाती आहेत तश्याच अफगाणिस्तानमध्येही आहेत.
अफगाणिस्तानमध्ये साधारण १५ मुख्य जमाती आहेत. पश्तुन, सर्बानी-पश्तुन दुर्रानी, ताजिक, हजारा, उझबेक, आयमक, तुर्कमेन, बलोच, पाशाही, नुरिस्तानी, गुज्जर, अरब, ब्राहुई आणी पामिरी.
ह्याशिवाय अजूनही काही छोट्या जमाती आहेत.
सन १७२४ मध्ये अहमदशहा अब्दाली उर्फ अहमदखान अब्दालीचा जन्म अफगाणिस्थानातल्या 'हेरात' ह्या ठिकाणी सद्दोसाई जातीमध्ये झाला. काही ठिकाणी ह्याला अब्दाली कबिला असेही म्हणतात.
अब्दालीच्या बापाचे नाव सम्मौनखानआणि आईचे नाव झर्रघुना अलकोझी असे होते.
अब्दालीचा बाप सम्मौनखान हा अब्दाली टोळीचा वंश परंपरेने मुख्य होता. लहान असताना कबिलाई लढायांत अचानक अहमदशहा अब्दाली हा 'बिलझाईस' या शत्रु टोळीच्या हाती सापडला.
या शत्रु टोळीच्या लोकांनी अहमदशहा अब्दालीला कंदाहार येथे कैदेत ठेवले. अब्दालीचा भाऊ झुल्फिकार ह्यालाही बरेच दिवस असेच कैदेत ठेवले होते. अब्दालीच्या बापालाही कैद झाली होती.
पर्शियाच्या (इराणच्या) नादिरशहाने कबिलाई जमातींमध्ये विभागलेल्या अफगाणिस्तानवर हल्ले केले आणि संपूर्ण अफगाणिस्तान जिंकून घेतले.
पुढे इराणच्या नादिरशहाने अहमदशहा अब्दालीची १७३८ त सुटका केली. सुरवातीस नादीरशहाने त्याच्या अंगरक्षक टोळीचा मुख्य म्हणून अब्दालीची नियुक्ती केली आणी एका घोडदळाचाअब्दालीला प्रमुख केले.
अब्दाली हा इराणच्या नादीरशहाच्याच तालमीत तयार झाला होता.
अब्दाली फार शूर आणि महत्वाकांक्षी आहे आणि अब्दाली पुढे जाऊन नक्की सुलतान बनेल असे इराणच्या नादीरशहास नेहमी वाटत असे.
नादीरशहाने आपला खंजर काढून अब्दालीच्या कानाखाली एक घाव करून अब्दालीस सांगितले होते कि, "माझ्या मृत्यूनंतर तू अफगाणिस्थानचा शासक बनणार आहेस. मी हे तुला बोललो हे तू विसरू नये म्हणून मी तुझ्या कानाखाली माझ्या खंजरने घाव केलेला आहे."
पुढे नादीरशहाची हीच भविष्यवाणी खरी झाली.
नादिरशहाच्या खुनानंतर म्हणजे सन १७४७ मध्ये अहमदशहा अब्दाली स्वतंत्र झाला व त्याने नादिरशहाची तीन लक्ष रुपयांची ठेव आणि नादिरशहाच्या ताब्यातील अफगाणिस्तानातील कंदाहार काबिज केले.
अफगाणिस्तानवर होत असलेले पर्शियन साम्राज्याचे म्हणजे आजच्या इराणचे सततचे हल्ले आणी इतर आक्रमणांचा धोका पाहून कधी नव्हे ते एकमेकांतील वैर विसरून १७४७ साली अफगाणी कबिले-जमाती कंदहार येथे एकत्र आल्या.
कंदहार येथे पंचायत बोलावून सर्वानुमते एक नेता निवडावे असे ठरले. सर्व जमातींच्या संमतीने पश्तुन जमातींतील केवळ २५ वर्ष वयाच्या अहमदशहा अब्दालीला अफगाणिस्तानचा नेता निवडण्यात आले.
अहमदशहा अब्दालीला अजून एका नावाने ओळखतात आणी ते म्हणजे अहमदशहा अब्दाली दुर्रानी.
दुर्रानी हे अब्दालीने त्याच्या पश्तुन जमातीचे नवीन ठेवलेले नाव.
पश्तुन जमातींमध्येही शिनवारी, अल्कोझाई, बरकाझाई, सदोझाई असे ६० मुख्य समूह असून साधारण ४०० उप-समूह आहेत. पश्तुन अफगाणिस्तानातील हि मोठी जमात आहे.
(खरं तर हि सगळी नावे मी टाईप करणार होतो. पण नाही केली. )
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
जितक्या जाती तितकी भांडणे.
अब्दालीला जसे अफगाणिस्तानच्या कबिलाई जमातींचा मुख्य नेता घोषित केले गेले तसे अब्दालीने सगळ्यात पहिल्यांदा ह्या सर्व पश्तुन जमातींना एक करून 'दुर्रानी' असे नवीन नाव ठेवले.
अब्दालीने ह्या सर्वांना एक करून दुर्रानी असे नवीन नाव ठेवल्याने आपसूकच पश्तुन जमातींमधील एकमेकांतील जातीय तेढ नष्ट झाली आणी सगळे पश्तुन दुर्रानी म्हणून ओळखले जाऊ लागले.
महत्वाचे: केवळ २५ वर्ष वयाच्या पोरावर देशाची जबाबदारी टाकणे कितपत योग्य?
अब्दालीच्या स्वभावात काही गुण असे होते कि त्यामुळे सगळे अब्दालीस संमोहित झाले.
सगळ्यात पहिला गुण म्हणजे अब्दालीचे आपुलकीचे बोलणे. कोणासही न दुखविता अब्दाली मधाचे बोट तोंडात न घालता अक्खा पिंपच समोरच्या व्यक्तीच्या तोंडात कोंबत असे.
अब्दाली शब्दाला जागणारा होता. त्यामुळे इतर कबिल्यांचे नेते त्यावर विश्वास ठेवत.
फक्त सदगुण असून उपयोग नाही. राज्यकर्त्यास काही कारणास्तव एखाद्यास कडक शासन करता आलेच पाहिजे. तरच शिस्त राहते. पण ह्या शिस्तीत दुर्गुण असता कामा नये.
अब्दालीच्या स्वभावात शिस्तीच्या पलीकडे असणारा क्रूरतेचा दुर्गुण लपलेला होता. वेळप्रसंगी अब्दालीचा हा क्रूरतेचा दुर्गुण दिसून येत असे.
अब्दालीत संघटन कौशल्य गुण फार चांगला होता. अत्यंत शुल्लक कारणास्तव प्रचंड जनसंहार करणाऱ्या अफगाणी कबिल्यांवर संघटनात्मक वचक ठेवणे सोपे नाही. हे अब्दालीने करून दाखविले. आणी ह्याचेच फळ म्हणजे आजचा अफगाणिस्तान.
जेंव्हा अब्दालीला अफगाणिस्तानचा शासक म्हणून निवडले गेले तेंव्हा
राज्याभिषेकाच्या वेळी 'साबीर शहा' नावाच्या एका अवलियाने अब्दालीला 'दुर-ए-दुर्रान' हि पदवी बहाल केली.
'दुर-ए-दुर्रान' ह्याचा अर्थ होतो मोत्यांमधील सर्वात उत्तम मोती.
अब्दालीला हा शब्द फारच आवडला आणी तेंव्हापासून अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या कबिल्याला दुर्रानी या नावाने ओळखले जाऊ लागले.
कबिल्यांमध्ये विभागलेल्या अफगाणिस्तानची एकसंध अफगाण राष्ट्र म्हणून नवीन ओळख अब्दालीने करून दिली.
पूर्वेकडील अटकपासून पश्चिमकडील इराणपर्यंत आणी उत्तरेकडील मध्य आशियाच्या अमू दरिया नदीच्या किनाऱ्यापासून दक्षिणेकडील हिंद महासागरापर्यंत अब्दालीचे दुर्रानी साम्राज्य पसरलेल होते. साधारण १५ लाख चौरस किलोमीटर इतकं मोठं हे साम्राज्य पसरलेले होते.
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
अब्दालीच्या हिंदुस्थानवरील स्वाऱ्यांची संक्षिप्त माहिती
अब्दालीची पहिली स्वारी.
सन १७४८ मध्ये अब्दालीने हिंदुस्थानावर पहिली स्वारी केली. यावेळी अब्दाली हा सरहिंदपर्यंत आला होता. परंतु सरहिंद येथे त्याची व दिल्लीच्या फौजेची गाठ पडून दिल्लीचा युवराज अहमद याकडून अब्दालीचा पराजय झाला.
(लाहोर ओलांडले कि पंजाबमधील पहिले लुधियाना लागते. लुधियानाच्या पुढे हे सरहिंद आहे. ज्याला आज आपण फतेहगड असेही म्हणतो. लुधियानापासून ६२ किलोमीटर अंतरावर हे सरहिंद आहे. )
अब्दालीची दुसरी स्वारी.
यानंतर सन १७४८ च्याच हिवाळ्यात अब्दालीने दुसरी स्वारी केली. मुख्यतः पंजाब प्रांतावर अब्दालीने हि स्वारी केली होती.
अब्दालीची तिसरी स्वारी.
यावेळी अबदालीचा मुक्काम रावी नदीच्या पलीकडील तीरावर असून लाहोरचा सुभा मुघलांचा सुभेदार मीरमन्नुअली कडे होता. ह्याच लढाईला लाहोरची लढाई असेही म्हणतात.
पुढे लवकरच दोन्ही सैन्ये समोरासमोर येऊन त्यांची लढाई झाली. ह्या लढाईत मुघलांचा सुभेदार मीरमन्नु मागे सरकला आणी मीरमन्नुने लाहोरचा आश्रय घेतला.
अबदालीने मुघल सुभेदार मीरमन्नुची रसद बंद केली. तेंव्हा मीरमन्नूच्या फौजेची उपासमार सुरू झाली. शेवटी तारीख १२ एप्रिल १७५२ रोजी मीरमन्नूनें आपल्या सैन्यासह अब्दालीवर चाल केली. अब्दालीशी त्याने भयंकर लढाई केली. लढाई ऐन रंगात आली व मीरमन्नूचा जय होईल असे अब्दालीसही वाटू लागले इतक्यांत मीरमन्नूचा सेनापति कौरामल्ल हा हत्तीवर बसून लढत असता त्याच्या हत्तीचा एक पाय खळग्यांत गेला व ते जनावर एकदम खाली बसले.
इतक्यांत अब्दालीच्या फौजेतील एकाने कौरामल्लाचे डोके कापून नेले.
सेनापतीची ही अवस्था होतांच सैन्यांत एकदम हाहाकार उडाला व जो तो जीव बचावासाठी पळू लागला, व याप्रमाणे मीरमन्नूचा पराजय झाला.
अब्दालीची चौथी स्वारी.
यानंतर इ. स. १७५५-५६ मध्ये अहमदशहा अब्दालीने हिंदुस्थानवर चौथी स्वारी केली. यावेळी मोगल बादशहाचा वजीर मीर शहाबुद्दीन याने मुलतान व काबूल प्रांत परत घेऊन तेथे आपला सुभेदार नेमल्याचे अब्दालीस कळल्याने त्याने हिंदुस्थानात स्वारी केली व हे प्रांत पुन्हां १७५५ साली हस्तगत केले.
यानंतर अब्दालीने दिल्ली व मथुरा ही शहरे लुटली.
तेथील लोकांची कत्तल करून स्रिया भ्रष्ट केल्या. अगदी लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांची अब्दालीने क्रूर कत्तल केली. रक्ताचे पाट वाहिले. चिखल मांस एक झाले. मथुरेतील हिंदूंच्या छाटलेल्या मुंडक्यांच्या राशींचे डोंगरच अब्दालीने उभे केले. तीन दिवस अब्दाली मथुरेत तळ ठोकून होता. महिलांवरील बलात्काराला तर सीमाच राहिली नाही.
येथे त्याच्या छावणीत साथीचे रोग पसरले. साथीचा उद्भव झाल्यामुळे अब्दालीस परत फिरावे लागले.
इ. स. १७५६ च्या आरंभी अहमदशहा अब्दाली काबूल शहरी जाऊन पोहचला. दिल्लीहून निघण्यापूर्वी त्याने आपला मुलगा तैमूरशहा दुर्रानी याकडे लाहोर मुलतान आदिकरून सर्व पंजाब प्रांताच्या सुभेदारीचे काम सांगून त्यास तिकडे रवाना केले होते.
अत्यंत महत्वाचे: अजूनपर्यंत अब्दालीचा मराठ्यांशी संबंध आलेला नव्हता.
अब्दालीची पाचवी स्वारी.
इ. स. १७५८ साली मराठ्यांनी अहमदशहा अब्दालीच्या सरहिंदच्या सुभेदाराचा पूर्ण पराजय करून थेट अटक पर्यंत धडक मारली आणि मराठ्यांनी अटक जिंकून घेतले.
शांत झोपलेल्या अब्दालीच्या कानामागे अचानक बंदुकीचा बार उडवावा तसे मराठ्यांनी अटक जिंकून घेतल्यावर एकदम अब्दालीच्या बाबतीत झाले.
पुढे मराठ्यांनी लाहोर व मुलतान या प्रांतांवर 'अदीनाबेग' यास आपल्या वतीने सुभेदार नेमले.
इथून अब्दाली आणी मराठ्यांचा सबंध सुरु झाला.
शूर मराठा अफगाणिस्तानच्या दारातच येऊन उभे राहिले आहेत हे चाणाक्ष अब्दालीच्या लक्षात आले आणि आता जर आपण वेळ दवडला तर मराठे अफगाणिस्तानलाही घशात घालतील ह्याची त्रीव्र जाणीव अब्दालीस झाली.
मराठ्यांनी जिंकलेले हे प्रांत परत घेण्याकरिता अहमदशहा अब्दालीने हिंदुस्थानांत पांचव्यादा स्वारी केली. १७५९ अखेर किंवा १७६० च्या आरंभी.
वायव्य सरहद्दीवरील अटक आणि परिसरातील मराठ्यांच्या फौजेवर अब्दालीने अचानक हल्ला केला. मराठ्यांची संख्या कमी असल्याने मराठ्यांनी तात्पुरती माघार घेतली.
अब्दाली यमुना नदी ओलांडून अलीकडे आला. नजीबउद्दौला रोहिल्याने त्याला हिंदुस्थानात स्वारी करण्याकरिता आमंत्रण दिलेच होते व दुसऱ्या मुघल आलमगीर बादशहाचाही अब्दालीशी काही पत्रव्यवहार झाला होता.
अहमदशहा अब्दाली हिंदुस्थानात येताच नजीब उद्दौला त्यास जाऊन मिळाला व नंतर सुजाउद्दौल्यासही त्याने आपल्याकडे वळवून घेतले.
उत्तर हिंदुस्तानांतील इतर मुसुलमान सरदारहि पुढे अब्दालीस येऊन मिळाले. या सर्वांच्या मदतीने अब्दालीने पानिपतच्या युद्धांत मराठ्यांचा सामना केला.
अब्दालीस, सुजा व नजीब यांनी मराठयांवर एकदम चढाई करण्यास आग्रह केला.
अत्यंत महत्वाचे: पण अब्दालीने अन्नाच्या टंचाईने मराठे पूर्ण अशक्त बनल्यावरच चढाई करण्याचे ठरविले.
पुष्कळ दिवस उपवास काढून मराठे कंटाळले व अखेर भाऊसाहेबांनीं १४ जानेवारी १७६१ रोजी पहाटे अब्दालीवर सर्व सैन्यानिशी चाल केली.
प्रथम तोफांची सरबत्ती होऊन मग हातघाईची लढाई सुरू झाली. दुपारपर्यंत मराठ्यांकडील इब्राहिमखानाच्या अर्ध्या पलटणी मारल्या गेल्या, पण मराठ्यांकडील इब्राहिमखानाने समारेच्या अब्दालीच्या फौजेतील ८ हजार रोहिल्यांस कापून आपल्या बाजूला लढाई जिंकली.
भाऊसाहेब, विश्वासराव व पवार हे मध्ये होते. त्यांनी अब्दालीच्या करमण्यांतील वजीराची फळी फोडली. तेंव्हा अब्दालीने (हा मागें राहून युद्धाचें निरीक्षण करीत होता) दहा हजार स्वार वजीराच्या मदतीस धाडले.
अब्दालीच्या डाव्या (नजीब व सुजा यांच्या) बगलेने समोर होळकर व समशेर-बहाद्दरावर हल्ले केले. परंतु त्यांनी ते परतविले. मराठयांची सर्व फौज जिवावर उदार होऊन लढली.
आतांपर्यंत मराठयांचाच जय होता.
सूर्याचे दक्षिणायन सुरु असल्यामुळे सूर्याचा प्रकाश दुपारनंतर सरळ मराठ्यांच्या चेहऱ्यावर पडू लागला. आधीच सहा दिवसांच्या भुकेने मराठे अत्यंत अशक्त झाले होते आणि त्यात डोळ्यावर प्रखर सूर्यप्रकाश पडू लागल्याने मराठ्यांच्या डोळ्यावर अंधाऱ्या येऊ लागल्या.
तरीही मराठे आपल्या तलवारी फिरवतच होते.
इतक्यांत सायंकाळच्या सुमारास दुर्दैवाने विश्वासरावांना गोळी लागली व ते ठार झाले. ते पाहून मल्हारजीस बायकामुलांनां परत नेण्याचें काम सांगून भाऊसाहेब हत्तीवरून उतरून घोडयावर बसून गर्दीत शिरले. घनघोर पानिपतचे रण झाले. मराठा अब्दालीच्या फौजेशी प्राणपणाने आणि शूरपणाने लढले.
अब्दालीने एकदम हल्ले करून मराठयांचा नाश केला. जनकोजी शिंदे, समशेरबहाद्दर व इब्राहिमखान हे जखमी होऊन हाती लागल्यावर गिलच्यांनी त्यांचा खून केला. यशवंतराव पवार व भाऊसाहेब हे रणांगणांत पडले.
मराठयांपैकी फक्त १/४ लोक परत आले.
अब्दाली पानिपतची लढाई लढला त्यावेळी अब्दालीचे वय ३८ वर्ष होते.
सदाशिवभाऊ ३२ वर्षांचा होता आणि शिंदे मंडळींचे वय तर फक्त १६ ते १७ च्या आसपास होते. केवळ १५-१६ वर्षांची मुलेसुद्धा पानिपतच्या लढाईला गेलेली होती. मल्हाररराव होळकर आणि काही जेष्ठ वयाची मंडळी होती.
मराठे आणि अब्दाली यांच्यातील ह्या पानिपतच्या लढाईनंतर अब्दालीने दिल्लीचे तख्त शहाअलम बादशहास देऊन सुजाउद्दौला यास त्याचा वजीर केले व नजीब उद्दौल्यास त्याच्या अमीर उल्-उमराच्या हुद्यावर पुन्हा बसवून अब्दाली अफगाणिस्थानास १७६१ साली स्वदेशी कायमचा परत गेला.
अब्दालीने मुघल सुभेदार मीरमन्नू बरोबर केलेल्या तिसऱ्या लढाईत आणि मराठ्यांच्या बरोबरीला पाचव्या लढाईत बरेच साम्य आहे. पण इथे महत्वाचा फरक आहे.
मीरमन्नू अब्दालीला शरण गेला आणि मराठे शरण न जाता प्राणपणाने लढले.
अब्दालीची सहावी स्वारी.
अफगाणिस्थान आणि हिंदुस्थानच्या सरहद्दीवरील कबिलाई फौजा सरहद्दीच्या फायदा घेऊन अब्दालीच्या सुभेदारांस हुसकावून लावत.
शिवाय अफगाणिस्तानच्या सीमेवरील पंजाब प्रांतातील शीखांनीही अब्दाली विरुद्ध आघाडी उघडली. शिखांनी लाहोरचा अफगाण गव्हर्नर ख्वाजा आबिद ह्याची हत्या केली.
त्यामुळे सन १७६२ मध्ये अब्दालीने सहाव्यांदा पंजाब सरहद्दीवर स्वारी केली.
अब्दालीची सातवी स्वारी.
पुढे सन १७६४ मध्ये परत अब्दालीने शिखांवर सातवी स्वारी केली. पण ह्या स्वारीत अब्दालीचा दारुण पराभव झाला.
ह्या मधल्या काळात मराठ्यांचे उत्तर भारतात अत्यंत वेगाने साम्राज्य विस्तारत होते. उत्तरेतील एकामागून एक प्रदेश मराठे जिंकून घेत होते.
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
पूर्वेपासून थेट अफगाण सीमेपर्यंत परत मराठ्यांचे घोडेस्वार जेंव्हा विजयी भगवे झेंडे हातात घेऊन धावू लागले तेंव्हा मात्र अब्दालीने सर्व आशा सोडली.
पानिपतातील मराठयांचा पराक्रम अब्दालीने रणांत उभा राहून पाहिलेला होता.
मराठ्यांच्या धामधुमीमुळे थोड्याच दिवसांत अखंड हिंदुस्थानवर मराठ्यांचा भगवा ध्वज फडकणार हे सत्य अब्दालीपासून सर्व उत्तर भारतातील राजे राजवाड्यांना कळून चुकलेले होते.
मराठ्यांनी हे 'सत्य' कर्तृत्वाने सत्य करून दाखविले.
उत्तर भारतातील ज्या राजे-रजवाड्यांनी गद्दारी करून अब्दालीला साथ दिली ते आता त्यांचे शेवटचे दिवस मोजू लागले होते.
मराठयांचा धाक किती असावा?
केवळ मराठे जयपुरवर चालून येत आहेत हे ऐकूनच घाबरून जाऊन जयपूरच्या राजाने विषारी नाग डसवून घेऊन आत्महत्या केलेली आहे.
पानिपत नंतरच्या मराठ्यांच्या उत्तरेतील विजयी घोड-दौडीवर मी भविष्यात लिहिणार आहे.
मराठ्यांच्या धाकामुळे अब्दाली परत कधीही हिंदुस्थानात आला नाही.
अब्दालीचे मराठ्यांच्या बरोबरील या पानिपतच्या मोहिमेत इतके नुकसान झाले की त्यानंतर तो ११ वर्षे जगला असतानाही त्याने पुन्हा हिंदुस्थानास फारसा त्रास दिला नाही.
अब्दाली १६ आक्टोबर १७७२ रोजी काळपुळीच्या संसर्गजन्य विकाराने (Anthrax) अफगाणिस्थानातील मरुफ येथे मेला. कंदहार येथे अब्दालीचे थडगे आहे.
(बॅसिलस अँथ्रॅसिस या सूक्ष्मजंतूच्या संसर्गामुळे होणाऱ्या रोगाला संसर्गजन्य काळपुळी (Anthrax) असे म्हणतात. मेंढी, शेळी, डुक्कर,घोडा, गाय वगैरे पाळीव जनावरांचा हा रोग आहे; परंतु रोगी जनावरांशी संपर्क येणाऱ्या मनुष्यांसही हा रोग होऊ शकतो.)
लेख आवडल्यास लाईक करून शेअर करा आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना इन्व्हाईट करा.
समाप्त.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

Thursday 12 December 2019

राजराजेंद्र_शितोळे_देशमुख_घराणे

शेखर शिंदे सरकार


#
राजराजेंद्र_शितोळे_देशमुख_घराणे
#शिंदे_घराण्याचे_जावई_लाडोजी_शितोळे
#व_नातू_दुसरे_सिध्दोजीराव_लाडोजी_शितोळे
आदिलशाही काळात पुणे परगण्यात २९० गावे होती यातील २५५ गावांची देशमुखी शितोळे घराण्याकडे होती उरलेल्या ३५ गावांची देशमुखी पायगुडे घराणे यांना मिळाली होती या घराण्याचे मुळ पुरुष दसमोजी नाईक शितोळे हे बहामनी राज्यात नोकरी करत होते यांचा मुलगा अडमोजी नाईक शितोळे हा आदिलशाही दरबारात सरदार होता यांना आदिलशाहीतून "राजराजेंद्र" असा किताब मिळाला होता अफजलखान वधानंतर याचा मुलगा मालोजी नाईक शितोळे हा आपल्या सैन्यासह स्वराज्यासाठी झटत होता
यानंतरच्या अडमोजी शितोळे, मालोजी शितोळे, अडमोजी शितोळे, खंडोजी शितोळे यांनी स्वराज्याची इमानेइतबारे सेवा केली खंडोजी शितोळे यांचा मुलगा सिध्दोजीराव शितोळे हा मोठा शूर होता त्याची आणि अलिजाबहाद्दुर महादजी शिंदेंची घनिष्ट मैत्री होती महादजी शिंदेंच्या खांद्याला खांदा लावून सिध्दोजीराव शितोळे यांनी पराक्रम गाजवला होता
यांचा मुलगा लाडोजीराव शितोळे हा ही मोठा पराक्रमी होता त्याने महादजी शिंदेंच्या आदेशावरून दिल्लीवर स्वारी करून बंडखोर वजीराचा पराभव केला बादशहाने त्याला दिल्लीचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नेमले होते अशा पराक्रमी वीर लाडोजीराव शितोळे यांना महादजी शिंदेंनी आपली मुलगी बाळाबाई यांना देऊन बरीच जहागीरी बक्षिस म्हणून दिली शिवाय दरबारात प्रथम दर्जाचे सरदार म्हणून मान दिला
शितोळे घराण्याचा मध्यप्रदेश राज्यातील पोहरी येथे भला मोठा राजवाडा होता तिथच त्यांचे कायमचे वास्तव्य झाले या लाडोजीराव शितोळे यांचा मुलगा व बाळाबाईसाहेब शिंदे यांचा मुलगा दुसरा सिध्दोजीराव शितोळे यांना दिल्ली दरबारातून "उमात-उल-मुल्क" असा किताब दिला शिवाय त्यांचे आजोबा अलिजाबहाद्दुर महादजी शिंदेंच्या उपस्थित दरबार भरवून मानाची वस्त्रे, जरीपटका, कंठा, शिरपेच, जरीदार पालखी, शिक्का, कट्यार व पानिपत येथील १०६ गावची जहागीरी बहाल केली 🙏🙏🙏🙏🙏🙏
संदर्भ_ पुणे प्रांताचे राजा देशमुख शितोळे घ. इतिहास
©Zunjar babar

Tuesday 10 December 2019

कदम इंद्रोजी


कदम इंद्रोजी - कदम घराण्यांतील एक शाखेंत कंठाजी कदमाच्याच काळांत इंद्रोजी कदम या नांवाचा एक प्रख्यात मराठा सरदार होऊन गेला. हा सातारा जिल्ह्यांतील साप गांवचा राहणारा असून, आपल्या पराक्रमाच्या जोरावर फार योग्यतेस चढला होता. शाहू महाराज दक्षिणेंत येऊन त्यांनीं सातारा येथील छत्रपतींच्या गादीवर आरोहण केलें त्यावेळीं इंद्रोजी कदम याचें प्राबल्य महाराष्ट्रामध्यें इतकें होतें कीं त्याचें नांव केवळ कर्दन काळासारखें वाटत होतें. त्याच्या शौर्यप्रभावाप्रमाणें त्याचें वैभव व थाटहि फार मोठा होता. त्याच्या जवळ ७०० निवडक सैन्य असून घोडेस्वारहि बरेच होते. तो आपल्या शौर्यप्रभावाच्या योगानें इतका गर्विष्ठ व प्रमत्त झाला होता कीं, त्यास आपल्यापुढें सर्व जग तुच्छ दिसत असे. एवढेंच नव्हे तर त्यानें आपल्या पागेंतील खाशा घोड्यांस रुप्याचे नाल लावून, असा हुकूम सोडला होता कीं, हे रुप्याचे नाल पागेंतील लोकांनीं न घेतां, शत्रूच्या हद्दींत पडूं द्यावे व ते परक्या लोकांनीं पाहून आपल्या वैभवाचें कौतुक करावें. एके वेळीं शाहू महाराजांच्या कानांवर इंद्रोजी कदम याच्या गर्विष्ठपणाची हकीकत सादर झाली. तेव्हां त्यानीं मुद्दाम त्यास निमंत्रण करून सातार्‍यास बोलाविलें. इंद्रोजी कदम मोठ्या थाटानें आपल्या सैन्यानिशीं सातारा येथें आला व आदितवार पेठेंतील माळावर तळ देऊन राहिला. त्यानें शाहू महाराजांस असा निरोप पाठविला कीं, ''तुमचे पेशवे मुख्य प्रधान तुम्हांस भेटावयास आले म्हणजे लष्करच्या नौबदी व नगारे बंद करितात, त्याप्रमाणें मी करणार नाहीं. मी माझ्या सर्व इतमामानिशीं डंकेनौबदी वाजवीत तुमच्या भेटीस येईन.'' शाहूमहाराजांनीं त्याप्रमाणें त्यास परवानगी दिली व त्याची रंगमहाल राजवाड्यांतील मुख्य दरबारांत भेट घेण्याची योजना केली. इंद्रोजी कदम यास आपल्या वैभवाचें प्रदर्शन करण्याची फार हौस असल्यामुळें, तो आपल्या सर्व सैन्यास कडीतोडे घालून व आपण स्वतः नाना प्रकारचे रत्‍नालंकार परिधान करून शाहूमहाराजांचे भेटीसाठीं नगारे व नौबदी वाजवीत राजवाड्यांत आला. शाहूमहाराजांस त्याचा हा डामडौलपणा पाहून फार तिरसकार वाटला. परंतु त्यांनीं तो व्यक्त न करतां, मुद्दाम त्याचा गर्वपरिहार करण्याच्या उद्देशानें आपलें स्वतःचें जडजवाहीर व रत्‍नालंकार आपल्या खंड्या कुत्र्याच्या अंगावर घातले आणि आपण अगदीं साधा सफेत पोषाख घालून दरबारास आले. इकडे इंद्रोजी कदम मोठ्या थाटानें व दिमाखानें आपल्या रत्‍नालंकारांचें प्रदर्शन करीत शाहूमहाराजांच्या भेटीस आला. त्याची अशी कल्पना होती कीं, शाहूमहाराजांच्या दरबारांतील अष्टप्रधान व उमराव हे माझें बहुमूल्य जवाहीर पाहून दिपून जातील आणि खुद्द शाहूमहाराज माझें वैभव पाहून खालीं मान घालतील. परंतु दरबारांत प्रवेश करितांच सर्व सरदार लोक व खुद्द शाहूमहाराज यांचा साधेपणा व शुभ्र पोषाख पाहून त्यास फार आश्चर्य वाटलें, व खंड्या कुत्र्याखेरीज दुसर्‍या कोणाच्याहि अंगावर अलंकार नसलेले पाहून तो मनांत फार ओशाळला व लज्जित झाला. आणि शाहूमहाराज छत्रपति हे केवळ अवतारी पुरुष आहेत, त्यांचा मी विनाकारण अपमान करण्याची पापबुद्धि मनांत धरिली, असा पश्चात्ताप पावून त्यानें शाहूमहाराजांच्या पायांवर डोई ठेविली आणि त्यांची क्षमा मागितली. शाहूमहाराजांनीं क्षमा करून त्याचा योग्य आदरसत्कार केला. इंद्रोजी कदम यानें शाहूमहाराज यांस सोन्याच्या मोहरांचें सिंहासन करून त्यांजवर बसविलें व आपल्या जवळचें जडजवाहीर त्यांस अर्पण केलें. महाराजांनीं त्यास व त्याच्या पदरच्या लोकांस मोठी मेजवानी देऊन पोषाख बक्षीस दिले. तेव्हांपासून इंद्रोजी कदम याचें नांव सातारच्या दरबारांत फार प्रसिद्धीस आलें. शाहूमहाराज मनुष्याची परीक्षा करण्यांत कसे चतुर असत व दुसर्‍या कोणाचाहि गर्व कसा युक्तीनें परिहार करीत ह्याची ह्या आख्यायिकेवरून साक्ष पटते. इ.स. १७३७ (मार्च) मध्ये बाजीराव साहेबांनीं झील तलाव (दिल्ली) येथें दिल्लीकर मोगलांचा जो पराभव केला, त्या लढाईंत ''इंद्रोजी कदम यांसी बोटास गोळी लागोन दोन बोटें उडोन गेलीं.'' या वेळीं इंद्रोजी हा राणोजी शिंदे यांच्या हाताखाली सरदार होता. पुढें रामराजे यांनां बार्शी पानगांवहून आणविण्याकरितां जी पेशव्यांची विश्वासाची मंडळी गेली होती. तीत इंद्रोजीहि होता (जानेवारी १७५०) (इ.सं. ५.७; म.रि.म.वि.).

सांगलीचा इतिहास इ. स. १००० ते इ. स. १८००

इतिहास इ. स. १००० ते इ. स. १८००


सांगलीचा इतिहास इ. स. १००० ते इ. स. १८००
१०२४ गोंक या शिलाहार राजाच्या ताब्यात ' मिरिच' (मिरज) व ' करहाटक' (कराड) व दक्षिण कोंकण हा प्रांत होता. यातच सांगलीचा भूभाग समाविष्ट होता.
१२०५ शिलाहार राजा गंगादित्य याने मिरज भागांत इसकुडी येथे तलाव बांधला. कोल्हापूर, मिरज, शेडबाळ व तेरदाळ येथे याबाबतचे शिलालेख आहेत.
१२५० - १३१८
देवगिरीच्या यादव राजानी या भागावर राज्य केले त्यावेळी ' मिरिच' प्रांतात तीन हजार गांवे होती.
१३१९ - १३४७
दिल्लीच्या खिलजी व तुघलकानी या भागावर राज्य केले.
१३४८ - १४८९
बहामनी सुलतानानी या भागावर राज्य केले.
१४९० - १६५९
विजापूरच्या अदिलशहाने या भागावर राज्य केले. यावेळी मिरज प्रांत रायबाग महालात होता.
१६५९ छत्रपती शिवाजी महाराजांचा सेनापती नेताजी पालकर याने हा भाग जिंकून घेतला. परत अदिलशहाने हा भाग जिंकून घेतला.
१६७२
पन्हाळयापासून मिरजे पर्यंतचा सर्व भाग शिवाजी महाराजांनी जिंकला. या नंतर मुसलमान सरदार विजापुरास निघून गेले. तेव्हापासून या भागाची सरदारकी मिरजेचे सरदार कदम यांच्याकडे होती.
१७३० बाजीराव बल्लाळ पेशवे यांनी मिरजेचे सरदार इंद्रोजी कदम यांच्या पागेची फडणीशी गोविंद हरी पटवर्धन यांना दिली.
१७३६ सरदार इंद्रोजी कदम हे दिल्लीवरील मोहिमेत कामास आले. ते निपुत्रिक होते. पुणं मुक्कामी त्याची मोठी पागा होती. आजही या पागेला `हुजूर पागा' असे नांव आहे.
१७४१ सरदार इंद्रोजी कदम यांच्या पागेची सरदारकी गोविंद हरी पटवर्धन यांना देण्यात आली.
१७६१ माधवराव पेशवे यांनी गोविंद हरी पटवर्धन यांना फौजेच्या खर्चाकरिता मिरजेचा किल्ला व आसपासची कांही ठाणी दिली.
१७६४ गोविंद हरी पटवर्धन व त्यांचे पुतणे परशुराम रामचंद्र व निळकंठ त्रिंबक यांचे नांवे आठ हजार स्वार ठेवण्याकरिता २५ लक्ष मुलुखाचा बहडा करुन दिला.
१७६८
गोविंद हरी यांनी आपल्या वडिलंच्या स्मारकाकरिता सांगलीची सहाशे बिघे जमीन स्वतंत्र काढून हरीपूर हे गांव वसविले व ते गांव शंभर ब्राह्मणांना अग्न्हार दिले. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी हे गांव बसविण्यास मंजुरी दिली. यानंतर हरीपूर हे क्षेत्र झाले. या टुमदार गावाची त्यावेळची लोकसंख्या दोन हजार होती व सांगलीची लोकसंख्या मात्र एक हजार होती. यावेळी हरीपूर हे सांगलीपेक्षा मोठे होते.
१७७१ मिरज मुक्कामी गोविंद हरी पुत्रशोकाने निधन पावले.
१७७३ वामनराव गोविंद पटवर्धन यांच्या नांवे मिरज प्रांताचा बेहडा झाला.
१७७६
वामनराव गोविंद पटवर्धन खानदेशात स्वारीवर असताना वरणगांव मुक्कामी निधन पावले. यांना पुत्र संतान नव्हते. म्हणून पांडुरंग गाविंद पटवर्धन यांना जहागिरीचा अधिकार मिळाला.
१७७७ हैदरवर स्वारी करण्यास गेले असता पराभव पावले. हैदरने त्यांना अटक केली. अटकेतच ते नवज्वर होऊन निधन पावले.
१७७९ हरिहर पांडुरंग पटवर्धन यांना सरदारकीची वस्त्रे मिळाली.
१७८२ हरिहर पांडुरंग यांचा ज्वराने मृत्यू झाला. ते निपुत्रिक होते.
१७८३
हरिहर पांडुरंग यांचे बंधु चिंतामणराव आप्पासाहेब यांना मिरजेच्या सरदारकीची वस्त्रे मिळाली तेव्हा त्याचे वय आठ वर्षाचे होते. म्हणून त्याचे चुलते गंगाधरपंत काम पहात होते.
१७८६ नाना फडणीस मिरजेस आले होते.
१७९५
निजाम व पेशवे यांच्या खडर्याच्या लढाईत पटवर्धन यानी शौर्य गाजविले म्हणून चिंतामणराव आप्पासाहेब यांचे नावे २५ हजार ५२१ रुपयांचा नवा सरंजाम बेहडा पेशव्यांनी करुन दिला.
१७९९
दुसरे बाजीराव पेशवे यांनी मिरज जहागिरीच्या वाटण्या करण्यास परवानगी

राणोजीराव शिंदे

राणोजीराव शिंदे
प्राचीन काळी सेंद्रक नावाचे क्षत्रिय घराणे होते,यावरून शिंदे हे नाव पडले, शिंद्यांची कित्येक घराणी बहामनी राज्यांत उदयास आली,साताऱ्या पासून सहा कोसावर कोरेगाव तालुक्यात कण्हेरखेड म्हणून गांव आहे, या गावाची पाटीलकी शिंदे घराण्याकडे होते,गावचे पाटील जनकोजी शिंदे होत,
याच घराण्यातील अंबिकाबाई यांचा विवाह शाहू छत्रपतींशी झाला होता, त्या छत्रपती शाहू महाराज कैदेत असतानाच वारल्या, या घराण्यात पुढे राणोजीराव शिंदे उदयास आले, पायदाला पासून आपली कारकीर्द सुरू करणारे राणोजीराव शिंदे,उदाजी पवार व मल्हारराव होळकर व बाजीराव पेशवे ही सळसळत्या रक्ताची पिढी पुढे नाव रुपास आली,
निजामावरील,वसईच्या मोहिमांत राणोजीराव शिंदे यांची निष्ठा व शौर्य हे गुण पाहून बाजारावाने त्यास माळव्यातील कामगिर्या सोपविल्या,तिकड़े पराक्रम करून शिंदे घराणे उत्तर हिंदुस्तानात मराठा साम्राज्याचा प्रस्थ स्थापन केला ,राणोजीराव हे स्पष्टवक्ता व स्वामिनिष्ठ सेवक होते,
पुण्याजवळच्या अनेक भानगडीत व गावकीच्या कारभारात राणोजींचे प्राधान्य होते , ही गोष्ट पुरंदरे रोजनिशींतील अनेक उल्लेखांवरून व्यक्त होते . सिंद्यांचे घराण्याचा मराठाशाहीच्या पुढील इतिहासाशी निकट संबंध आहे ; इतकेच नव्हे तर पाऊण शतकाचा मराठशाहीचा इतिहास बराचसा या एका घराण्याने बनविलेला आहे असे म्हणण्यास चिंता नाही.
नुसती या घराण्याच्या वंशावळी नजरेखाली घातली तरी राष्ट्रकार्यात जीव देणाऱ्या पुरुषांची एवढी मोठी संख्या पाहून आश्चर्य वाटते.हा प्रकार उत्तरोत्तर व्यक्त होईल,
राणोजीराव शिंदे यांचे सहकारी सरदार मंडळी:-
शंभूराजे शिंदे
केदारजी शिंदे प्रथम
स्वरूपजी शिंदे
ज्योतिबा शिंदे
जयाजीराव शिंदे
जणोजी शिंदे
मानाजीराव पवार
लखोजी मोरे
गोरखोबा भापकर
निंबाजी फाळके
रामाजी जाधव
बाळोबा गायकवाड
राणोजी जांबुळकर
सुभानजी जांभूळकर
रतोजी शिंदे
खंडोजी शिंदे
लिंगोजी गाढवे
संभाजी हांडे
सखो बल्लाळ
संताजी राऊत
निंबाजी राऊत
पिलाजी माने
सिधोजी साठे
दत्ताजी घाटगे
मानाजी कडू
त्रिंबकजी धुमाळ
सखोजी धुमाळ
त्रिंबकजी खंडेराव
नारोराम काटे
शामराव मल्हार
इंदरोजी कदम,इत्यादी..
©संदर्भ:-सरदेसाई-मराठी रियासत खंड,
तवारीख ए शिंदे शाही-प.निलेश करकरे

पानिपत वीर - श्रीमंत महाराज जनकोजी शिंदे आणि दत्ताजी शिंदे


पानिपत वीर - श्रीमंत महाराज जनकोजी शिंदे आणि दत्ताजी शिंदे
पानिपत समर भुमीवर पाय घट्ट रोवुन मराठ्यांचे लष्कर उभे होते, बुराडी घटावरील दत्ताजीरावांच्या बलिदानाचा जनु सुड़च उगवायची वाट बघत असलेले भासत होते, शिंद्याच्या तुकडीचे नेतृत्व महादजी बाबा,तुकोजी बाबा आन १६ वर्षाचा आयन जवानीत आलेला तरुण जनकोजी शिंदे मोठ्या दिमाखात करत होता.. दिल्ली पासून अजमेर बंगाल, उज्जैन धार बड़ोदे बाकनेर घौड दौड़ करुन छतीस महाल मिळवीणार्या ,त्या बदली शिंद्यानी मराठ्यांच्या दौलतीसाठी रक्त वेचल होत त्या राणोजीराव शिंदयाचे नातू जनकोजी होय. जय्यापाराव शिंदयाचे ते पुत्र व त्यांच्या पश्चात दत्ताजीरावांनी तळहताच्या फोड़ा प्रमाणे त्यांना संभाळले होते जनकोजी बाबा वर त्यांची भिस्त असे जनकोजी आपल्या आज्या प्रामानचे पराक्रमी होते महादजी बाबा आन दत्ताबाच्या तालमीत तयार झालेले जनकोजी मत्सुदी व साहसी बनले,त्यांच्या रुपान मराठ्यांचा दौलती साठी शिंद्याची तीसरी पुढी खपत होती., बुराडी घाटाच्या रणसंग्रामा मध्ये दत्ताबा सोबत जनकोजींनी देखील मर्दुमकी गाजवीली होती,दत्ताजींनी देशरक्षण्यासाठी आपले प्राण वेचले बचेंगे तो और भी लढेंगे हा त्याचे वाक्य इतिहासात अजराम झाले.. दत्ताजींच्या हत्येच्या सूडाने उसळलेल्या जनकोजींनी कुंजपूरा येथे क्षत्रुच्या घरात घुसुन कुतुब शाहच्या धड़ा वेगळे मस्तक करून भाल्याला घुंफुन सैन्यात मिरवले,जनकोजी आन महादजी बाबांच्या मनातला सुडग्नि थोड़ा निवाळला असला जरी बुराडी घाट ही पानीपताच्या रण संग्रामची चिंगारी इतुनच पेटली.. १४जानेवारी १७६१ रोजी पानिपत भूमिवर मराठा आणि अफगान सैन्य सोमरा समोर आले,एककड़े सारा देश मकर संक्रातीच्या सनात मग्न होता दूसरी कड़े मराठ्यांनी एक जंग पुकारला होता..युद्धाची रणशिंग फुकली गेली,अब्दालीला मराठ्यांची एवढी दास्ती घेतली होती की म्हणून तो युद्धा भुमीच्या बाहेरुन दुर्बीनीच्या साह्याने तो पाहात होता.. मराठा सैन्यानी आप आपले मोर्चे लावले,जनकोजी आपल्या पतकास चेतवत होता, हर हर महादेव जय भवानीचे जय घोष करून मराठ्यांचे सैन्य अब्दाली वर तूटून पडले,दना दना तलावरी आदळु लागल्या, हर हर महादेवचा जय घोष घुमु लागला,पहिल्याच तडाख्यात मराठ्यांनी अफगानी फळी सपा सप कापून काढली, चौतळलेला जनकोजी क्षत्रु वर वाघा प्रमाने तूटून पडला सकाळच्या प्रहारात मराठे अघाडिवर होते, सूर्य डोक्याव येताच मराठ्यांचे नशीब देखील फिरले उन्हाच्या तिरपीने तीन दिवस उपाशी असलेल सैन्य गरा गर चक्कर येऊन पडू लागले
इतक्यात बायाजी पडल्याची बातमी आली आणि लगेच दत्ताजीराव शिंदे,पिराजीराव जगदाळे आणि यशवंतराव जगदाळे हे पुढे आणि मागून जनकोजी शिंदे निघाले. मागे हटणाऱ्या मराठ्यांना चेतवत दत्ताजी भाला चालवत रोहिल्यांवर चालून गेले ,शेकडो रोहिले मारले गेले .बाकीचे मागे हटले . दुसऱ्या बाजूला जनकोजी सुद्धा पराक्रमाची शर्थ करत असताना त्यांना दंडात गोळी लागून ते कोसळले,जनकोजी सुद्धा पडले अशी बातमी आल्याने शोकाकुल दत्ताजी आपल्या १८-२० साथीदारांनिशी अफगाणी -रोहिल्यांच्या सैन्यात घुसले. दत्ताजींच्या सोबत सरदार पिराजीराव जगदाळे ,यशवंतराव जगदाळे ,सरदार हिंगणे होते. शत्रू फौजांचे बर्कंदाज बंदुकांचा तुफानी मारा करत होते. पुढे घुसलेले हे चौघे कापाकापी करत शत्रुसैन्यात आतपर्यंत आले होते , यशवंतराव जगदाळ्यांना गोळी लागून ते खाली पडले ,मागेच असणाऱ्या पिराजी जगदाळ्यांनी त्यांना घोड्यासह मागे ओढायला सुरुवात केली,मागोमाग मदतीसाठी दत्ताजी आले आणि दोघे मिळून घोडी बाहेर काढायला लागले.
सणकत आलेली एक गोळी दत्ताजींच्या डोक्यात घुसली आणि ते जागेवर कोसळले, अफगाण्यांचा वेढ्यात अडकलेलं पिराजी सुद्धा फार काळ तग धरू शकले नाही आणि मारले गेले. इकडे दत्ताजींना गोळी लागल्याचे वर्तमान नजीबाचा गुरु कुतुबशाह ला कळले, दत्ताजी तळमळत असलेला पाहून कुतुबशाहने दत्ताजीची मान पकडली अन हातातले खंजीर दत्ताजीच्य्या डोळ्यासमोर नाचवत म्हणाला….
“बोलो पाटील…….और लढोगे?”
हे ऐकताच दत्ताजींनी सर्व ताकत एकवटत वाघासारखी डरकाळी फोडली…..
“क्यों नही? बचेंगे तो और भी लढेंगे” ...

रणमर्द शिंद्यांचा सिंहशावक मराठा सरसेनापती रक्ताने दिल्लीला अभिषेक घालणारा दत्ताजी शिंदे

रणमर्द शिंद्यांचा सिंहशावक मराठा सरसेनापती रक्ताने दिल्लीला अभिषेक घालणारा दत्ताजी शिंदे
महाराष्ट्रात अस एक घर उरले नव्हते जिथे कोणी आपले प्राण दिले नसतील. अखंड महाराष्ट्र ज्वालांनी वेढला. दत्ताजी शिंदे आणि मराठयांची कत्तल झाली. महाराष्ट्रावर आणि मराठी सत्तेवर दुःखाचा डोंगर कोसळला. यमुना नदीच्या काठचा बुराडी घाट मराठयांच्या रक्ताने माखुन गेला.
परकिय सत्तेपासून भारत भूमीचे रक्षण करताना मराठी लोकांनी दिलेले बलिदान आज देश विसरुन गेलाय. पानिपत हा तर काही लोकांना विनोदाचा विषय वाटतो. पण लक्षात असू द्या महाराष्ट्रात जेव्हा निर्भयपणे आपले पुर्वज संक्रांत साजरी करत होते तेव्हा लक्ष लक्ष मराठी सेना आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी उत्तरेत अब्दालीशी दोन हात करत होती.
निदान मराठी माणसाने तरी हा दिवस विसरू नये. आजकाल आपण सहज क्षुल्लक कारणास्तव " पनिपत झाले " ही संज्ञा वापरतो. सिनेमा - सिरिअल्स मधून " बचेंगे तो और भी लढेंगे" ही विद्युल्लता "विनोद' म्हणून निर्लज्जपणे वापरत असतो. इतिहासाच्या वास्तवतेचे भान मराठी माणसाने बाळगायलाच हवे..
जयोस्तु मराठा

पानिपत...! मर्द मराठ्यांचा ज्वलंत इतिहास !!




मर्द मराठ्यांचा ज्वलंत इतिहास !!

पानिपत...!
१४ जानेवारी १७६१, या हिंदुस्थानवरचं संकट मराठ्यांनी आपल्या छातीवर झेललं. मराठे गिलच्यांविरुध्द एकाकी झुंझले. अभिमन्यूप्रमाणे झुंझत झुंजत देह ठेवला. उभ्या भारतातून एक हरीचा लाल मराठयांबरोबर पाय रोवून पानिपतात उभा राहिला नाही. मराठ्यांनी पाय गाडून युध्द केलं. रक्त मांसाचा चिखल झाला. मराठ्यांची अख्खी पिढी मारली गेली. महाराष्ट्रातील प्रत्येक घरातला एक जण तरी पानिपतावर कापला गेला. "दो मोती गलत, दस-बीस अश्राफात, रुपयोंकी गिनती नही|"
पण माझ्या दृष्टीने पानिपतावरती झालेला पराभव हा खरा पराभवच नाही मुळी. कारण १८व्या शतकाच्या शेवटि पर्यंत तब्बल 15वर्ष लाल किल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा "भगवा" डौलात फडकत होता हा इतिहास आहे..!
मराठ्यांनी दिल्लीची वजीरीच नव्हे तर सगळी दिल्लीच पुन्हा मांडिखाली दाबली हा खरा इतिहास आहे.
महादजी शिंद्यांनी एकेका रजपुताला सुटा करुन करुन पिदवला हा खरा इतिहास आहे, "गढ मै गढ चित्तोड गड बाकि सब गढियॉ।" म्हणून लैकिक मिळवलेला किल्ला जवळपास आठ महीने लढल्यावर आणि डोळे पांढरे व्हावेत इतका तिखट प्रतिकार झाल्यावर ’महान’ सम्राट अकबराला मिळाला होता,महादजींनी बोल - बोल म्हणता तो १८ दिवसांत जिंकला होता हा खरा इतिहास आहे.
नजिबाचा नातू "गुलाम कादिर" याने "शहा अलम" बादशहाला आंधळे केल्याबद्दल व बादशाहाच्या कुलातील स्त्रीयांना भर दरबारात नग्न केल्याची शिक्षा म्हणून महादजींनी त्याला टाचेकडून मानेकडे जिवंत सोलून ठार मारला होता व नंतर दिल्लीच्या लाहोरी दरवाज्याजवळ ३ दिवस बिन मुंडक्याचा उलटा टांगून ठेवला होता हा खरा इतिहास आहे.
पानिपताला जबाबदार असलेल्या नजीबाची कबर म्हादजींनी सुरुंग लावून उडवून दिली, हरहर महादेव च्या गर्जनात तिच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या हा खरा इतिहास आहे..
पानिपतात मराठ्यांच्या फौजांचा पराभव झाला असे म्हणणाऱ्यांची कीव येते ती एवढ्यासाठीच !
कारण खरा पराभव पानिपतावर नव्हे तर इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालाय, पुस्तकांच्या पानांवरती झालाय.
दुसर्‍या महायुध्दातील डंकर्कच्या पळपुटेपणाला कौतुकाने माना डोलावून "यशस्वी माघार" म्हणणारे मात्र पानिपतावर देह ठेवून राष्ट्र वाचवणारे पराभूत झाले असं म्हणतात तेव्हा संताप येतो.
आज अडिचशे वर्षानी त्याच्याकडे बघताना केवळ "पराभव" म्हणून न बघता "गुरुदक्षिणा" म्हणून बघा. मराठ्यांनी शिवछत्रपतींना दिलेली "गुरुदक्षिणा". राष्ट्रावरचं संकट आपल्या छातीवर घ्यायची संथा त्या महामानवाने मराठ्यांना दिली होती. त्या संथेची गुरुदक्षिणा म्हणजे " पानिपत....!!!
#पानिपत
#बचेंगे तो और भी लढेंगे

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...