विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 25 August 2022

शिवशाहीची काठी


शिवशाहीची काठी
पोस्तसांभार ::सतीश राजगुरे
छ्त्रपती शिवाजी महाराजांनी जमीन महसुलाबद्दल अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या. महाराजांनी स्वराज्यातील महसूल व्यवस्थेला युद्धाइतकेच महत्व दिले होते. त्यासाठी उत्कृष्ट कार्यालये आणि कर्तबगार महसुली अधिकाऱ्यांना योग्य तो मानमरातब दिला गेला.
स्वराज्यामध्ये कोणत्याही जमिनीचा सारा निश्चित करण्यापूर्वी जमिनीची मोजणी करणे आवश्यक होते. त्यामुळे महाराजांनी आपल्या मुलखात असलेल्या जमिनीची मोजणी करून जमिनीची प्रतवारी निश्चित केली. त्यांनी स्वतः जमीन मोजणीची पद्धत सुरू केली होती. तिला 'शिवशाही काठी' असे म्हणत.
महाराजांच्या दूरदर्शी महसूल कर प्रणालीतील पहिला टप्पा 'बिघावणी करणे' हा होता. 'बिघावणी' या शब्दात 'बिघा' हा शब्द आहे. म्हणजे शेतकऱ्याची जमीन किती बिघा किंवा किती एकर आहे, हे ठरविणे होय. हे प्रमाण ठरवण्यासाठी शिवाजी महाराजांनी जे मापक तयार केले होते, त्याचे नाव 'शिवशाही काठी' असे होते.
थोडक्यात लागवडीखालील जमिनीची प्रथम मोजणी आणि मापन करणे म्हणजे बिघावणी होय!
आता ही काठीवजा पट्टी किती लांबीची होती, ते पाहू.
शिवशाही काठीच्या लांबीबाबत सभासद बखरीत म्हटले आहे,
"पांच हात पांच मुठीची काठी, हात चवदा तसूच असावा. हात व मुठी मिळून ब्याऐंशी तसूंची लांबी काठीची. वीस काठ्या औरस चौरस त्याचा बिघा एक. बिघे एकशेवीस यांचा एक चावर. अशी जमीन मोजून, आकारून गांवची गावं चौकशी केली."
पाच हात, पाच मुठी = १ शिवशाही काठी (ही कठीची लांबी होय.)एक हात =१४ तसू + मूठ मिळून ब्याऐंशी तसू = एक काठीआता अशा वीस काठ्या औरस चौरस म्हणजे २० काठी × २० काठी= एक बिघा१२० बिघे= १ चावर
याप्रमाणे जमिनी मोजून संपूर्ण गावे त्यावेळी सचिव (सुरनीस) 'अण्णाजी दत्तो' यांनी मोजून घेतली होती. त्यांनी जमिनीची मोजणी करून पिकाऊ/लागवडी उपयुक्त जमिनींच्या सीमा निश्चित केल्या. तसेच नकाशेही तयार केले. या जमिनी ज्यांच्या ताब्यात असत, अशा लोकांची यादी बनवली जात असे. या यादीला ‘कुळझाडा’ असे म्हणत.
जमिनीची वर्गवारी केल्यानंतर मूल्यमापन होऊन ती जमीन बागायती आहे की, जिराइत आहे याचाही विचार केला जात असे. यावरून एखाद्या गावात अमुक एवढी जमीन आपल्याला पिकवायला उपलब्ध आहे, याची कल्पना त्या भागातील सारा वसुली अधिकाऱ्यास मिळत असे. जमिनीचा सारा भरण्याच्या बाबतीत संपूर्ण गाव सरकारला सामूहिकरीत्या जबाबदार राहात असे. जमिनीचा २/५ भाग सरकारात भरावा लागेल आणि ३/५ भाग रयतेकडे राहील, अशी व्यवस्था होती.
कोकणात शिवशाही काठीला 'पांड' असे म्हणत. आजही महाराष्ट्रात जमिनीच्या सर्वात लहान तुकड्याला 'पांड' म्हणण्याची पद्धत प्रचलित आहे. कोकणातील जमीन ही डोंगर उताराची असल्यामुळे डोंगर, ताली (बॉर्डर), उतार आणि वळणे ह्या गोष्टी विचारात घेऊन छ्त्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टी आणि डोंगराळ भागातील बिगर मैदानी जमीन मोजण्याचे वरील प्रमाण थोडे जास्त धरल्याचे दिसते.
एक बिघा = २०×२० काठ्या ऐवजी २३×२३ काठ्या.
आता ह्या तीन जास्तीच्या काठ्या ह्यासाठी की तालीसाठी वापरली जाणारी जमीन; जी दगडांची भिंतच असते, ती उत्पादक जमीन (Productive land) म्हणून पकडली तर विनाकारण शेतकऱ्यावर कराचा भार पडू नये.
शिवकाळात जमीन मोजण्याचे काम महाराकडे असे. कारण त्यांच्याकडे वतनी जमिनी असत आणि त्याचा शेती आणि त्याची उत्पादकता यांच्याशी खूप जवळचा संबंध असे. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे महार ही जात शिवाजी महाराजांच्या विश्वासास १०० टक्के पात्र जात होती.
मोजणी करताना जर काही कमी-जास्त झाले तर त्याचे दोन्ही बाजूने नुकसान होत असे. म्हणजे उत्पादक जमीन जास्त दाखवली गेली तर शेतकऱ्याला जास्तीच्या कराचा बोजा/भुर्दंड अन् उत्पादक जमीन कमी दाखवली गेली तर सरकारचा तोटा होत असे. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये आणि राज्याच्या महसुलाची हानी होऊ नये, अशा दोन्ही खबरदाऱ्या महाराजांनी घेतल्या होत्या.
याचे दुसरे कारण असे होते की, स्वराज्यातील जमिनीची मोजणी दरवर्षी केली जात नसे. कारण एवढे किचकट आणि वेळकाढू काम दरवर्षी करणे शक्य नव्हते. परंतु एखाद्या शेतकऱ्याने तक्रार केली तर त्याच्या जमिनीची मोजणी पुन्हा केली जावी, अशी व्यवस्था होती.
महाराच्या हातात असलेल्या काठीला 'चलती काठी' असे म्हणत. एक काठी जमीन मोजून झाली की दुसरी काठी टाकताना ही काठी उडी घेत असे. त्यामुळे साहजिकच बिघ्यातील एकंदर क्षेत्रफळ प्रत्यक्षात वाढत असे. या कारणाने प्रत्येक ठिकाणी एकच बिघ्यात सारखीच जमीन असेल, असे म्हणता येणार नाही. जमीन मोजणीच्या या पद्धतीला 'बिघावणी' खेरीज 'चावराणा' किंवा 'चकबंदी' असेही म्हणतात.
संदर्भ:-
१. मराठी विश्वकोश
२. शिवकालीन महाराष्ट्र- डॉ. अ. रा. कुलकर्णी
३. शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र- प्रा. नामदेवराव जाधव

 

Sunday 21 August 2022

विठ्ठल सुंदर परशरामी

 

विठ्ठल सुंदर परशरामी


पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणा.

याचे वडील सुंदर नारायण परशरामी संगमनेरचे ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण. हा मुळात पेशव्यांच्या दरबारी काम करायचा पण एकदा याचा नानासाहेब पेशव्यांनी अपमान केला तेव्हा हा चिडून पेशवाईचा सूड उगवण्याच्या हेतूने निजामाकडे गेला व रामदासपंत नामक व्यक्तीच्या वशिल्याने त्याच्या सेवेत लिन झाला.

१७६२ मध्ये निजामाच्या दरबारी सत्तापालट झाला व विद्यमान निजाम सलाबतजंगाला कैद करून निजामअली गादीवर बसला , तेव्हा त्यानेच विठ्ठल सुंदरला दिवाण बनविले. याला राजाबहादूर प्रतापवंत हा किताबदेखील मिळाला होता.

साताऱ्याच्या छत्रपती रामराजे महाराज व पेशव्यांना बरखास्त करत नागपूरकर जानोजी भोसले यांना छत्रपती करून त्यांच्या नावे कारभार चालावा या हेतूने याने अनेक कारस्थानं केलीत.

यातच श्रीमंत पेशवे माधवराव व त्यांचे चुलते राघोबादादा यांच्यातील बेबनावाचा फायदा घेत याने एकेक करत मराठी कारभारी , दरबारी , सरदार फोडायला सुरुवात केली.

पहिले दिवाकर उर्फ देवाजीपंत चोरघडे (साडेतीन पैकी एक पूर्ण शहाणा) या नागपूरकर भोसल्यांच्या दिवाणाच्या मदतीने याने जानोजी भोसले फितविले , आपल्या व्याही व साताऱ्याच्या मुतालिक गमाजीपंत याच्या मदतीने भवानराव प्रतिनिधीस फोडले , नंतर एकेक करत मोरेश्वर बाबुराव उर्फ मोरोबा फडणवीस , गोपाळराव पटवर्धन , सदाशिव रामचंद्र शेणवी यासारख्या मातब्बर मंडळीच काय तर खुद्द माधवराव पेशव्यांचेच मामा मल्हार भिकाजी रास्तेदेखील याच्या पट्टीत आले.

यांच्याच मदतीने याच्या सांगण्यावरून माधवराव पेशवे दक्षिण मोहिमेत असताना याने मे १७६३ मध्ये निजामास भडकवून त्याच्याकडून पुणे लुटून घेतले व राक्षसभुवनच्या लढाईस तोंड फुटले.

पुढे जानोजीदेखील डोईजड होऊ नये म्हणून याने कोल्हापूरकर भोसल्यांशीपण संधान साधण्याचे प्रयत्न केले व यातच राघोबादादाने मोठा मुलूख देऊन व द्रव्य खर्च करून नागपूरकर जानोजी भोसल्यांना पुन्हा आपल्याकडे वळविले.

यानंतर पेशवे व निजामामध्ये औरंगाबादजवळ राक्षसभुवन येथे युद्ध झाले व याच युद्धात ऑगस्ट १७६३ मध्ये हा शहाणा विठ्ठल सुंदर परशरामी कसब्याच्या देशमुख महादजी शितोळेच्या हातून मारला जाऊन पेशव्यांची निजामावर सरशी झाली.

याची जहागिरी गणेश नावाने ओळखली जायची. नाशिकचे प्रसिद्ध काळाराम मंदिर यानेच बांधले होते.

कुलकर्णी

 कुलकर्णी 

पोस्तसांभार :शुभम सरनाईक 



कुलकर्णी हे मुळात एक वतनदार पद असायचे ज्याचे काम हे गावाचा मुख्य म्हणजे पाटील याचा सहाय्यक म्हणून असे.

कुल म्हणजे दाक्षिणात्य भाषांमध्ये शेती आणि करण म्हणजे त्याचा हिशोब ठेवणारा अधिकारी. म्हणजे थोडक्यात गावातील सर्व शेती, जमिनी, कर यांचा हिशोब बघून, गोळा करण्यासाठी या कुलकर्णी पदाची गरज असत. यांच्या नोंदी ठेवायला म्हणून यांच्या हाताखाली मोहरीर हा अधिकारी असायचा. यासाठी त्यांना गावात काही अधिकार असत जसे

  • धनगरांंकडून वार्षिक २ चवाळी
  • चांभारांंकडून १ जोडा
  • मोमिनांंकडून १ मुंडासें
  • कोष्ट्यांंकडून १ पासोडी
  • साळ्यांंकडून १ धोतरजोडा
  • ढवणांंकडून रुमाल
  • तेल्यांंकडून दर आठवड्यास दर घाण्यास तेल ९ टाक
  • खाटाकांंकडून १ रुका (पै)
  • तांबोळ्यांंकडून २५ पानें
  • हलवायांंकडून २ पैसे
  • बकालाकडून १ सुपारी
  • माळ्यांंकडून मालाप्रमाणें गूळ दर बैलास सव्वाशेर, दर पाटीस पावशेर केळीं दर बैलास पांच.

याशिवाय पुढील हक्क असत ते

  • कतबा अगर तक्रारीचे अर्ज लिहिल्यानंतर वादी तथा प्रतिवादी यांच्याकडून दोनदोन आणे.
  • गांवांत लग्न किंवा पाट झाल्यास धान्य आणि शिधा १० रुपयांपर्यंत.
  • कागदाबद्दल वार्षिक १२ रुपये याप्रमाणें या हक्कांच्या रकमेची रोख किंमत ४२५ रुपये येत.

शिवाय मुशाहिरा असे ज्याप्रमाणे गावांतील प्रत्येक शेतकर्‍यापासून धान्याच्या दरखंडीस दीड रुपये प्रमाणें रक्कम मोहतर्फा (कारागीर) लोकांकडून.

कुलकर्ण्यांंस एकंदरींत मुशाहिरा, हक्कलाजिमा मिळून वार्षिक सहाशे रुपयांपर्यंतची प्राप्‍ति व्हायची.

कुलकर्णी हे आडनाव फक्त ब्राह्मण जातीतच येते. पण हे पद असल्याने यावर ब्राह्मणांव्यतिरिक्त पूर्वी सफाईदार लेखणी चालविण्यात पटाईत असलेल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू लोकांची देखील नेमणूक होऊ लागली. म्हणून त्यांच्यात जे लोकं या पदावर असत ते स्वतःस कुळकर्णी असे आडनाव लावत.

लिंगायत लोकांमध्ये देखील वाणी आणि पंचमशाली जातीत हे आडनाव असते ही माहिती श्री सूरज शशिकांत डबिरे अशी माहिती यांनी दिली.

स्थलपरत्वे या पदास गुजरात, बागलाण, खान्देशात पांड्या तर दक्षिणेकडे पटवारी असेही म्हणत.

स्त्रोत: भारतीय संस्कृती कोष

चित्रस्रोत: गुगल

देशमुख

देशमुख 

पोस्तसांभार :शुभम सरनाईक 

देशमुख हे पद होते.

देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी, मोहरीर, चौगुले, देसाई इत्यादी पदं ही वतनदारी पदांमध्ये मोडली जात ज्यांना देशक म्हणत. वतनदार म्हणजे पिढीजात एखादे काम करणारा ज्याला थेट सामान्य जनतेकडून कर वगैरे गोळा करून त्याच्या अधिकार क्षेत्रात राजाकडून प्रतिनिधी म्हणून संरक्षण वगैरे वेगवेगळ्या सुविधा पुरवाव्या लागायच्या. त्याला जनतेकडून गोळा केलेल्या करातूनच विशिष्ट टक्क्यात आपला वाटा किंवा वेतन/मोबदला मिळायचा.

पूर्वी छोटी छोटी गावं म्हणजेच त्याकाळातील मौजे मिळून एक परगणा असायचा. थोडक्यात आजच्या काळातील तालुका म्हणू शकू ज्यात ४०-२०० पर्यंत मौजे असायचे. अश्या परगण्याचा प्रमुख म्हणून देशमुख्य असे पद मुसलमानी रियासतीच्या पूर्वी निर्माण झाले. याच शब्दापासून देशमुख हा शब्द आला. देशमुख हा राजाकडून प्रतिनिधी म्हणून परगण्याचा जमाबंदीचा हिशेब ठेवीत, वसुलीवर देखरेख करत. त्याला मुलकी, दिवाणी, फौजदारी अधिकार असत. तसेच त्या परगण्यात तो गढी वगैरे बांधून थोडेफार सैन्य बाळगून परगण्यातील जनतेला संरक्षण देत. याच्यासाठी त्याला त्याने गोळा केलेल्या करातील २-५% इतका वाटा मिळायचा ज्यास रुसूम म्हणत. तसेच परगण्यातील लोकांकडून विशिष्ट वस्तू जसे तोरण, घट, जोडा, पासोडी, तूप, तेल, वगैरे बलुत्याप्रमाणेंच (जास्त प्रमाणांत) मिळत.

आता पेशवा म्हणजे मुख्यप्रधान. पूर्वी राजदरबारात प्रत्येक कामासाठी वेगळा व्यक्ती नेमला असायचा जसे कर, महसूल/मजमु वगैरे साठी मुजुमदार, परराष्ट्र सम्बन्ध ठेवायला डबीर वगैरे तसेच या सर्वांवर लक्ष ठेवायला पेशवा असायचा. पेशवा हा फारसी शब्द असून त्याच्या जागी भारतीय मुसलमानी रियासती वजीर हे नाव वापरत. पुढे शिवशाहीत याला पर्याय म्हणून मुख्यप्रधान हा शब्द योजला होता पण तो फक्त या पदांवरील लोकांच्या मुद्रांपर्यंतच सीमित राहिला. हे पद पूर्वी पिढीजात नव्हते परंतु पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांनी ते छत्रपती शाहू महाराजांकडून वंशपरंपरागत भट घराण्यास मिळवून घेतले.


माहिती स्रोत: गावगाडा

चित्रस्रोत: गुगल

चौधरी

 

चौधरी

पोस्तसांभार :शुभम सरनाईक 

हे एक ऐतिहासिक पद होते जे पुढे आडनाव झाले. जॉन प्लॅट्स यांनी या शब्दाची व्युत्पत्ती चक्रधारी-चक्कधारी-चवधरी-चौधरी अशी मांडली तर हिंदीशब्दसागर, गावगाडा ग्रंथांंमध्ये याची उत्पत्ती चतुर्धारी या संस्कृत शब्दापासून झाली असून याचा अर्थ चार चौधे धरणारा, सावरून धरणारा, चोहोकडून धरून आणणारा, गोळा करणारा असा सांगितला आहे.

महाराष्ट्रात पूर्वी बारा कारू/बलुतेदारांवर चौधरी नामक अधिकारी किंवा हक्कदार असत. बाजारभावात चढउतार होऊ न देता जनतेस अथवा शासनास, सैन्यास धान्याचा पुरवठा करून देणे हे याचे मुख्य कार्य असत. सरकारच्या हुकुमावरून चौधरी या भावांचे चढउतार नियोजित करत आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत. धान्याच्या साठ्याची, तसेच त्याच्या गावांतून निर्यात आणि आयातीची सर्व माहिती जमा करून संग्रही ठेवण्यास आणि शासनास पुरविण्यास चौधरी लोकं कटिबद्ध असायचे.

उत्तर भारतात बादशाही काळामध्ये हे पद चांगलेच दृढ झाले. पूर्व भारतातदेखील हे पद मुघळकाळातच प्रबळ झाले असावे. पुढे इंग्रजांनी या पदाचे महत्त्व वाढवत त्यांच्या सन्मानपात्र लोकांच्या नेमणुका या पदावर केलेल्या दिसतात. आजही राजस्थानच्या ढुंढार, उत्तरप्रदेश (विशेषतः पश्चिम भाग) आणि हरियाणा या जाटबाहुल प्रदेशात चौधरींना विशेष महत्त्व असल्याचे जाणवते, या भागात ग्रामीण पातळीवर निवाडे वगैरे करण्याची कामं पूर्वापार ही मंडळी ग्रामप्रमुख म्हणून करायची.

बहमनी काळात कुतुबशाहीने चौधरी पद तिच्या राज्यात सुरू केले. कुतुबशाही शासकांने तेलुगू भाषिक कम्मा जातीच्या लोकांची या पदांवर नियुक्ती केली जी पुढे निजामानेही सुरू ठेवली आणि अश्याप्रकारे दक्षिण भारतात या पदाचा अंमल सुरू झाला. आज तेलुगू भाषिक लोकांमध्ये चौधरी हे नाव कम्मा ज्ञातीचे पर्यायी नाव म्हणून सर्रास वापरले जाते.

माहिती स्रोत:

  • पंडित महादेवशास्त्री जोशी संकलित भारतीय संस्कृतीकोश
  • श्रीधर वेंकटेश केतकर संकलित महाराष्ट्रीय ज्ञानकोश
  • त्रिंबक नारायण अत्रे लिखित गावगाडा

चित्र स्रोत:

पुरंदरचे किल्लेदार सरनाईक घराणे

 


पुरंदरचे किल्लेदार सरनाईक घराणे
पोस्तसांभार :शुभम सरनाईक
बहमनी साम्राज्याची दक्षिण भारतात तुघलकांची सत्ता झुगारून स्थापना झाली. पुढे सोळाव्या शतकात बहमनी राजवटीचे विघटनही झाले आणि अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही, इलिचपूरची इमादशाही अशी ५ राज्ये होऊन त्यांच्यात राज्य विस्तारासाठी संघर्ष सुरू झाला.
त्यावेळी पुण्याजवळचा प्रदेश काही काळासाठी बरीदशहाकडे आला होता पण त्याला तेथील स्थानीय लोकांपासून तो टिकवून ठेवता येत नव्हता. जो जायचा तो मार खाऊनच परतायचा अशी गत झाली होती. शेवटी बरीदशहाने बिदरच्या देशपांड्यांना ह्या प्रदेशातील किल्ले श्री पुरंदरची जबाबदारी दिली. या बिदरकर देशपांडे घराण्याचे आडनाव चंद्रस असे होते (हे इतिहासास ज्ञात या कुळाचे सर्वात जुने आडनाव). हे चंद्रस तिघे बंधू, त्यातील १ भाऊ मकरंदपंत चंद्रस पुरंदरावर गेला तथा त्याने गड जिंकून परिस्थिती सांभाळली. त्यामुळे त्यास त्या किल्ल्याची सरनाईकी/किल्लेदारी मिळाली. काही काळातच बरीदशाही बुडाली तसा हा प्रदेश निजामशाहीकडे आणि तीही बुडाल्यावर आदिलशाहीकडे गेला पण सरनाईकी याच घराण्यात चालू राहिली.
आदिलशाहीत पुरंदर किल्ला समाविष्ट झाला त्यावेळी तेथील किल्लेदार हे मकरंदपंत चंद्रस-सरनाईक यांचे पणतू महादजी नीळकंठ सरनाईक होते. महादजीपंतांचा गडावर तर गडाखाली त्यांचेच मित्र शहाजीराजे भोसले यांचा अंमल होता. श्री शिवछत्रपतींनी आयुष्यात पहिले रणांगण गाजवले (फत्तेखानाविरुद्ध इसवीसन १६४९ मध्ये, पुरंदरची लढाई) ते याच पुरंदरावर आणि तेही महादजीपंतांच्या अखत्यारीत.
महादजीपंत गेले आणि त्यांच्या पश्चात त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव नीळकंठ महादजी सरनाईक (इतिहासात यांना निळोजी नीळकंठराव म्हणून ओळखतात कारण निळोजींचे आजोबा नीळकंठराव कर्तृत्ववान असल्याने त्यांचेच नाव घराण्यास उपनाव म्हणून वापरत) किल्लेदारी चालवू लागले. निळोजींचे सख्खे बंधू शंकराजी आणि सावत्र बंधू त्र्यंबक, विसाजी यांना मात्र निळोजी कोणत्याही कामात वाटा देत नव्हते ज्यामुळे या तिघा भावांसमोर उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झाला. हे बंधू सहसा बाहेरील जगास आपापसातील कलह दाखवत नसत पण आतून या भावांची एकमेकांबद्दल मतं अतिशय गढूळ झालेली होती.
१६६० च्या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य यज्ञास गती मिळालेली होती आणि ते मावळ प्रांतातील एकेक गड घेत शुक्लपक्षीय चंद्रकलेगत स्वराज्याचा विस्तार करून भूमीवर सुराज्य स्थापन करत निघाले होते. आणि याच उद्देशाने त्यांनी एक पत्र लिहून पुरंदर आणि सोबतच सरनाईक बंधूंना आपल्या या महत्कार्यात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केला होता.
शिवाजी महाराज निळोजींना या पत्रात म्हणतात
दादो कोंडदेऊ आम्हाजवळ ठेऊन दिले होते. ते मृत्यु पावले. आता आम्ही निराश्रीत जालो. तुमचे व आमचे वडिलांचा बहुत घरोबा, स्नेह यास्तव आश्रयेखाली माचीस येऊन राहिलो तुम्ही सांगाल तैसी वर्तणूक करित जावू.
या पत्रात वरवर जरी महाराज "तुम्ही सांगाल तैसी वर्तणूक करित जावू " असे म्हणत असले तरीही त्यांचा गर्भित हेतू हा वेगळा होता. हा अंतस्थ हेतू ओळखणे सरनाईकांना जमले नाही आणि म्हणून उत्तर देताना निळोजींनी महाराजांना कळवले की
उत्तम आहे, घर आणि किल्ला तुमचा आहे. दुसरा विचार नाही आपण यावे.
आता महाराजांचे इप्सित पूर्ण होणार हे स्पष्ट दिसत असल्याने महाराज आपला कुटुंबकबिला घेऊन गडाच्या पायथ्याशी आले. तिथे निळोजींनी आपले बंधू शंकराजी यांना राज्यांच्या दिमतीला पाठवले. काही दिवसांनी एकदा शंकराजींने राजांची मर्जी संपादून आपले मनोगत महाराजांना सांगितले की
आमचे बंधू आम्हास वाटा देत नाहीत व काही कामकाज सांगत नाहीत. आता मी साहेबांजवळ आहे. माझा वाटा मला देववून वतनाचा तिजाई वाटा मिळावा.
आता सकळराजकार्यधुरंधर छत्रपती महाराजांना गड घेण्याची जणू एक गुरुकिल्लीच मिळाली होती. पावसाळा संपल्यावर दिवाळीच्या दिवसात महाराजांना एक संधी मिळाली जीची ते वाटच बघत होते. निळोजींनी दिवाळीसाठी बंधू शंकराजींंस गडावर बोलावले पण शंकराजी म्हणाले
आम्हास एकट्यास येता येत नाही राजांचा प्यार आम्हावर बहुत आहे व शहाजीराजे व आपला घरोबा बहुत होता त्याचे पुत्रास स्त्रीस टाकून कैसे यावे. यास्तव आलो नाही. आमचा मार्ग न पाहवा आम्ही येत नाही.
असे म्हटल्यावर मात्र निळोजींनी शंकराजींना प्रत्युत्तर दिले की
खरी गोष्ट आहे एकट्यास येता न येणे त्यास बोलावून जिजाऊ व शिवाजीराजे व दहा वीस लोकं मानकरी यांस आमंत्रणे सांगून घेऊन यावे आम्ही साहित्य करतो.
म्हणजे आता जणू पुरंदर किल्लाच महाराजांचा भाग्योदय करायला बोलावणे देत होता की या राजे आणि मलाही आपल्या राष्ट्रकार्यात, धर्मकार्यात सामावून घ्या. पण महाराजही आपल्या लोकांना सोडून दिवाळी साजरी करायला गडावर येण्यास तयार नव्हते, शेवटी जन्मदारभ्य रयतेचे राजे ते ! अखेर सर्व भावांने मिळून ठरवले आणि सांगितले
समस्त लोकांसुद्धा चलावे.
दुसऱ्या दिवशी राजे आपली सर्व मंडळी घेऊन पुरंदरावर पोहोचले, दिवाळीचे सर्व दिवस सुखासमाधानाने दोन्ही कुटुंबांनी एकत्र घालवले. नंतर एकेदिवशी रात्री शंकराजीपंत आणि त्र्यंबकपंत बंधू महाराजांकडे आले आणि निळोजींविरुद्ध महाराजांकडून सहाय्य करायला माणसं घेऊन गेले.
उभयबंधुंंनी विद्यमान किल्लेदार नीळकंठ महादजी सरनाईक (निळोजी नीळकंठराव) यांना कैद केले आणि आपल्याला किल्लेदारी मिळेल अश्या आशयाने राजांकडे पोहोचले पण महाराज एक द्रष्टे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी या दोघा बंधूंनाही त्यांच्या कलुषित अंतःकरण आणि विचारांमुळे अटक केली आणि तीन दिवसांनी सोडून स्वराज्याच्या सेवेत शिलेदार, सुभेदार, वकील वगैरे अश्या नाना पदांवर रुजू केले.
संदर्भ: शिवचरित्र साहित्य खंड ३, लेख ३९९

Thursday 18 August 2022

इतिहासातील प्रतिशिवाजी, हिंदवी स्वराज्याचे १ ले घोडदळ प्रमुख…सरसेनापती नेताजीराव पालकर

 


इतिहासातील प्रतिशिवाजी, हिंदवी स्वराज्याचे १ ले घोडदळ प्रमुख…सरसेनापती नेताजीराव पालकर
पोस्तसांभार ::डॉ विवेक दलवे पाटील
हिंदवी स्वराज्याचे २ रे सरसेनापती इतिहासातील प्रतिशिवाजी सरनौबत श्री नेतोजीराव पालकर हे शेवटपर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ होते.💯 हे याठिकाणी लक्षात घ्यावे.🙏 त्यांचा जन्म १६२० साली रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे झाला. १६३५ साली ते शहाजीराजे यांच्या सेवेत रुजू झाले होते. कारण त्यांच्या आधी त्यांचे काका बळवंतराव पालकर हे पराक्रमी सरदार शहाजी राजांच्या सेवेत होते. जसे हंबीरराव मोहिते यांचे वडील संभाजी मोहिते हे सुध्दा शहाजीराजांच्या सेवेत होते. १६४० साली स्वराज्याचा संकल्प शहाजीराजांनी केला. त्यावेळेला त्यांच्यासोबत माणकोजी दहातोंडे, यशवंतराव उर्फ बाजी पासलकर, कान्होजी नाईक जेधे , बळवंतराव पालकर व नेतोजीराव पालकर देखील होते. तसेच १६४१-१६४२ या २ वर्षांच्या काळात नेताजींनी आदिलशाही फौजेला फार पिटाळून लावलं होतं. पण १६४३ साली शहाजीराजांची रवानगी आदिलशहाने बंगळूर प्रांतात केली. तेव्हा त्यांच्या सोबत कान्होजी जेधे व बळवंतराव पालकर देखील गेले होते. १६४३ ला स्वराज्याची सूत्रे छत्रपती शिवरायांनी हातात घेतली. १६४५ साली स्वराज्य स्थापनेची शपथ घेताना नेताजी पालकर उपस्थित होते. पुढे १६४६ साली बाजी पासलकर यांच्यासोबत नेताजीराव खांद्याला खांदा लावून लढले. व तोरणा स्वराज्यात आणला.
१६४९ साली शिवरायांची कृष्णाजी बांदल यांच्या विरुद्ध हिरडस मावळात लढाई झाली. तेव्हा नेतोजी पालकर यांनी विशेष शौर्य गाजवले.
१६५० साली राजगड घेताना छत्रपती शिवरायांसोबत नेतोजीराव पालकर आघाडीवर राहून लढत होते. राजगड स्वराज्यात आल्यावर महाराजांनी खूश होऊन नेतोजींना स्वराज्याचे १ ले घोडदळ प्रमुख पद म्हणजे सरनौबत बनवले.
१६५२ साली घोडदळ प्रमुख सरनौबत नेताजीराव पालकर यांनी आदिलशाहाच्या ताब्यातील लिंगाण्याचा सुळका ताब्यात घेतला. हा सुळका चढणे म्हणजे साक्षात मृत्यूला आलिंगण देण्यासारखे होते.
म्हणून १६५२ ला संपूर्ण स्वराज्याचे सरसेनापती पद देखील नेतोजींना दिले. व "इतिहासातील प्रतिशिवाजी" असा किताब देऊन गौरव केला.
१६५४ ला नेताजींना पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार देखील बनवले. १६५६ साली जावळीमध्ये महाराजांसोबत चंद्रराव मोरेच्या फौजेचा धुव्वा उडवून दिला. जावळी प्रांत स्वराज्यात दाखल केला. १६५९ साली अफजलखानाच्या भेटीला जाण्याआधी नेतोजी पालकर शिवरायांना म्हणाले. " राजे तुमच्या जागी आम्ही तुमचं वेषांतर करून खानाच्या भेटीस जातो." मात्र राजे म्हणाले, "आमचं जर काही बर वाईट झालं तर खचून न जाता शंभूबाळास गादीवर बसवून स्वराज्याचा सरसेनापती व प्रतिशिवाजी या नात्याने आपण हे हिंदवी स्वराज्य पुढे चालविणे." असे राजे नेताजीरावांना म्हणाले होते. खानाचा वध केल्यावर सरसेनापती नेताजी पालकर यांनी त्याच्या फौजेला झोडपून काढलं होतं. अफझलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर याची सरसेनापती नेतोजीराव पालकर यांनी खांडोळी करून टाकली. तर अंकुशखानाचा सुद्धा वध केला. खानाचा पुत्र फाजलखान याचा पराभव केला. तो नेताजींच्या कचाट्यातून पळून गेला.खानाच्या फौजेला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पुढे १६६० साली महाराज पन्हाळगडी अडकले असता नेतोजीनी विजापूरचा मुलुख काबीज केला.चक्क विजापूरलाच वेढा दिला. व आदिलशहाला धर्मसंकटात टाकलं. त्यामुळे राजे ६ महिने पन्हाळगडी सुखरुप राहिले. पण जिजाऊंची प्रतीक्षा भंग पावली. त्या स्वतः राजियास सोडविण्यास निघाले असता नाईलाजाने नेताजींनी विजापूरचा वेढा उठवावा लागला. व त्यांनी राजगड गाठला. मासाहेब यांना थांबवून पन्हाळ्याची मोहिम स्वतः हाती घेतली. व नेतोजींनी पन्हाळ्यावर झडप घातली. सिद्दी मसूद आणि फाजलखान यांच्या फौजेला कडवी झुंज दिली. संख्याबलामुळे व युद्ध मोकळ्या मैदानात असल्यामुळे नेताजींना गनिमी कावा साधता आला नाही. व लढाईतून काढता पाय घ्यावा लागला.
१६६१ साली कार्तलाबखान याची सह्याद्री घाटमाथ्याची वाट नेताजींनी अडवून धरली आणि उंबरखिंडीत महाराजांसोबत मोठा पराक्रम गाजवला. त्याचा पराभव केला.
१६६२ साली सरसेनापती नेतोजीराव पालकर यांनी परांड्याला वेढा दिला. मोगली फौजेचा दारूण पराभव केला. लगेच नळदुर्ग, भगवानगड, धारूर, देवगिरी, दौलताबाद, अजिंठा, वेरूळ असे एका मागून एक गड जिंकून घेतले. व उस्मानाबाद, बीड, जालना, संभाजीनगर ४ प्रांत हिंदवी स्वराज्यात दाखल केले. अर्धा मराठवाडा विभाग सरसेनापती नेताजीराव पालकर यांनी स्वराज्यात जोडला.
१६६३ साली लाल महालात छापा टाकताना नेतोजी पालकर यांनी मोठे शौर्य गाजवले. गनिमांची खूप लांडगेतोड केली. शाईस्तेखानाचा सेनानायक नेतोजींच्या हातून मारला गेला. पुढे १६६४, सुरत लुटीत नेतोजी राजांसोबत होते. सुरतेत इनायतखानाच्या फौजेचा नेताजींनी धुव्वा उडवून टाकला. राजे सुरत लुटत असता समयी खंबात जवळील बंदर सरनोबत नेताजी पालकर यांनी जाळून बेचिराख केले. तिथले मोगली, पोर्तुगीज खलाशी नेताजींच्या धाकाने समुद्रात उड्या टाकून जीव देऊ लागले.
१६६४ साली छत्रपती शिवरायांनी व सरसेनापती नेताजीराव पालकर यांनी मिळून वेंगुर्ला येथे खवासखानाचा दारूण पराभव केला. व वेंगुर्ल्याचा किल्ला जिंकून घेतला.
पुढे १६६५ ला आदिलशहाकडून फलटण प्रांत व वसंतगड जिंकून घेतला. १६६५ ला मिर्झाराजे जयसिंह व दिलेरखान यांच्या फौजेला घिरट्या घालून नेतोजी त्रास देत होते. त्यांना कंटाळून अखेर मिर्झाराजे जयसिंह यांनी आपला पुण्यातला तळ उठवला व पुरंदरला मुक्काम ठोकला. वज्रगड पडला. लगेच पुरंदर पडला. मुरारबाजी देशपांडे देखील धारातीर्थी पडले. पुरंदरच्या परिसरातील रयतेचा छळ सुरू झाला. म्हणून नाईलाजास्तव राजांनी पुरंदरचा तह केला.
तहाची बोलणी करताना मिर्झाच्या छावणीत महाराजांनी सरसेनापती नेताजीराव पालकर यांना सोबत नेले होते.
२३ किल्ले व ४ लाख होनांचा प्रदेश मिर्झाला द्यावा लागला. तहात नको त्या अटी राजांना मान्य कराव्या लागल्या. त्यात २३ किल्ले येई पर्यंत शंभुराजे यांना ओलीस ठेवले गेले. त्यांच्या सोबत अंगरक्षक म्हणून नेतोजी पालकर यांना शिवरायांनी मिर्झाच्या छावणीत पाठवले. तह झाला व शंभुराजे यांची सुटका झाली. पुढे छत्रपती शिवराय आणि सरसेनापती नेताजी पालकर यांना तहात ठरल्यानुसार मिर्झाच्या बाजूने लढावे लागले. शिवराय, नेतोजी,मिर्झाराजे व दिलेरखान विजापूरवर चालून गेले. मात्र आधी महाराज आणि सरनौबत यांच्यात गुप्त चर्चा झाली होती. त्यात राजे नेतोजी यांना बोलले,
" विजापूरस्थळी मिर्झा व दिलेरचा मुद्दामून पराभव करणे.. आम्ही पन्हाळा घेतो म्हणोनी निघतो..आपण विजापूरहून पन्हाळा कूच करणे…परंतु समयास न पावणे ही खबरदारी घेणे..! "जेणे करुन पन्हाळा फत्ते झाला नाही पाहिजे..!
कारण मावळे आपले लढवावे नि पन्हाळ्यावर निशाण यवनांचे फडकावावे.. हा कसला स्वराज्य धर्म..!
म्हणजे यावरून कळते की पन्हाळा जिंकणे राजांना कठीण नव्हते परंतु आपण पराक्रम गाजवून जिंकलेला पन्हाळा हा मिर्झाराजेला देऊन टाकावा लागणार होता. कारण राजे व नेताजी या समयास स्वराज्याकडून लढत नव्हते. तर तहात ठरल्याप्रमाणे मिर्झाचे मनसबदार म्हणून त्यांना लढावे लागले होते. त्यामुळे पन्हाळा आपल्या शिवरायांनी व मावळ्यांनी जिंकला तरी तो स्वराज्यात न येता मोगलांना द्यावा लागणार होता..! त्यामुळे पन्हाळ्यावर स्वतः पराभूत होण्याचा मनसुबा शिवरायांनी आखला. नेतोजींनी विजापूरमध्ये सर्जाखान याच्याविरुध्द मुद्दाम कच खाल्ली.(शिवरायांच्या पूर्व योजनेनुसार) व मिर्झा आणि दिलेरखान यांचा विजापूरमध्ये दारूण पराभव केला. व पन्हाळ्यावर वेळेवर पोहोचले नाहीत. (हे देखील पूर्व नियोजित होते.) आणि आपले १००० मावळे कामी आले. पन्हाळ्यावर महाराजांचा पराभव झाला.(ठरल्याप्रमाणे)
तेव्हा त्यांच्याकडे २००० मावळे होते. व पन्हाळ्याचा किल्लेदार हा आदिलशाही सरदार बेशकखान हा होता. आणि त्याची शिबंदी ही ८००० एवढी होती. मग यावरून तुम्ही एक विचार करा. २००० मावळे असताना व पुढे शत्रूचे ८००० सैन्य असताना महाराजांना अजून कुमक का बर लागेल..? १६६१ ची उंबरखिडीची लढाई आठवा.. त्यात आपले फक्त १००० मावळे होते व २०००० एवढी शिबंदी कार्तलाबखानाची होती. तरी देखील महाराजांनी त्याचा पराभव केला.१६६३ चा लाल महालाचा छापा आठवा…फक्त १००० मावळे असून देखील महाराज ७५००० च्या मोगली छावणीत शिरले.
पण पन्हाळा मोहीम फत्ते केली असती तर पन्हाळा स्वराज्यात येणारच नव्हता.. हे या ठिकाणी लक्षात घ्या.. कारण तो मिर्झाराजे याला द्यावा लागणार होता. कारण त्यावेळेस महाराज पुरंदरच्या तहानुसार मोगलांच्या बाजूने लढत होते.
महाराज आपले १००० मावळे का मुद्दाम धारातीर्थी करतील…बरोबर आहे…महाराजांना आपले १००० मावळे धारातीर्थी करायचेच नव्हते. फक्त अटीतटीची लढाई न करता हलक्या हाताने लढायचे म्हणजे थोडी कापाकापी करायची आणि पन्हाळ्याच्या किल्लेदाराला हुलकावणी देऊन पळून जायचे व आपला पराभव झाला असे मिर्झाराजे जयसिंह याला सांगायचे..! असा मनसुबा होता. तो महाराजांनी पूर्ण केला.. मात्र किल्लेदार बेसावध असेल असा शिवरायांचा अंदाज होता. व या अंदाजाने त्यांनी पन्हाळ्यावर छापा टाकला. पण तो सावध होता.. आणि एकदम शत्रूने आपल्यावर हल्ला चढवला त्यामुळे सगळेच गडबडून गेले. शत्रूने एकदम चढविलेल्या हल्ल्यामुळे महाराज आणि मावळे यांना पन्हाळ्यावरून चुटकी सरशी पळून जाता आले नाही. पलायन करण्यास त्यांना वेळ लागला आणि लढाई मोकळ्या मैदानात झाल्यामुळे आपले १००० मावळे हे कामी आले.
राजगडी आल्यावर राजियांनी नेतोजींना बोल लावले."समयास कैसे पावला नाहीत."व स्वराज्यातून हकालपट्टी केली.(हा एक राजकीय डाव)
कारण पुरंदरचा तह झाला. त्या नंतर महाराज अटी शर्थीमध्ये गुरफटले होते. त्यात मिर्झा आणि दिलेरखान यांच्याविरुध्द आक्रमण करायचे नाही. अशी एक अट होती. ती देखील मान्य केली होती. म्हणून नेताजींना स्वतः शिवरायांनी आदिलशहाला जाऊन मिळण्यास सांगितले. व तिकडून तुम्ही प्रत्यक्ष मिर्झाराजे जयसिंह व दिलेरखान यांना धरणी माय ठाव करून सोडा. आपला शत्रू एकच मिर्झा व दिलेरखान असे आदेश नेताजींना शिवरायांनी दिले. कारण महाराष्ट्रातून या मिर्झाची हकालपट्टी शिवरायांना करायची होती. नेताजींनी १६६६ च्या सुमारास मोगलांना दिवसा चांदण्या दाखवल्या. मिर्झा फार त्रस्त झाला. तेव्हा राजे आग्रा भेटीस गेले. वाटेतच राजांनी खलीता पाठवून मिर्झाला मिळण्याचे आदेश नेताजींना दिले. तो खूप दिवस नेताजींच्या मागे लागला होता. शेवटी राजाज्ञेनुसार नेतोजी मिर्झाला जाऊन मिळाले. महाराज आग्र्याहून सुटले. आता प्रतिशिवाजी सुटू नये म्हणून औरंग्याने १९ ऑगस्ट १६६६ रोजी त्यांच्या अटकेचे फर्मान काढले. व १६६७ च्या सुमारास नेतोजी पालकर यांना दिलेरखान याने धारूर येथे कैद केले. पुढे त्यांना आग्र्याला हलवले. धर्मांतराचे ओझे त्यांच्यावर बादशहाने घातले. त्यांनी शेवट पर्यंत नकार दिला.मग त्यांचा अतोनात छळ सुरू केला.त्यातच कोंडाजी पालकर यांचं निधन झालं.तरीही नेतोजी नमले नाहीत. पण ही खबर बहिर्जी नाईक यांनी महाराजांना दिली. तेव्हा शिवरायांनी नेतोजी पालकरांना पत्राद्वारे कळविले की,
" काकाश्री देह राखणे.. शरीर वाचवणे.. धर्मांतराचे दिव्य पत्करणे.. संधी मिळताच पलायन करावे…बजाजी नाईक निंबाळकराप्रमाने तुम्हास देखील पुनश्च स्वधर्मात घेऊ."
आणि मग महाराजांच्या आदेशानुसार नेताजींनी प्राणाहुन प्रिय असा स्वधर्म देखील सोडला. त्यांनी शिवरायांच्या राजाज्ञेचे पालन केले.
१६६७ साली नेताजींचे जबरदस्ती धर्मांतर केले. व "महम्मद कुली खान" असे बादशहाने नाव ठेवले. आणि काबूल कंधारच्या मोहिमेवर रवाना केले. तिथून पळून जाण्याचा २ दा नेताजीरावांनी प्रयत्न केला पण दोन्ही वेळेस त्यांना अपयश आले. पुढे ९ वर्षे त्यांना स्वराज्यापासून दूर राहावे लागले.
महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. स्वराज्य विस्तार हा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. औरंग्याचे सगळे सरदार शिवरायांसमोर अपयशी ठरत होते. तेव्हा १६७६ साली त्याने महम्मद कुली खान म्हणजेच नेताजींना महाराष्ट्राच्या मोहिमेवर पाठविले. सोबत दिलेरखान यालासुद्धा पाठवले.
मे १६७६ मध्ये नेतोजी पालकर महाराष्ट्रात आले. आणि तेव्हा नेताजी दिलेरखानाच्या छावणीतून पळून रायगडावर गेले. छत्रपती शिवरायांनी नेताजींना पहिल्या नजरेत ओळखले. सरनौबत…असा हंबरडा शिवरायांनी फोडला.
१९ जून १६७६ रोजी नेताजीराव पालकर , त्यांचे पुत्र नरसोबा पालकर व नातू जानोजी पालकर यांना महाराजांनी पुनश्च हिंदू धर्मात घेतले. व जानोजी पालकर यांचा विवाह शिवरायांनी त्यांची कन्या कमळाबाई हिच्याशी लावून दिला.
याशिवाय छत्रपती शिवरायांनी १६७६ साली पुन्हा एकदा संपूर्ण स्वराज्याचे सरसेनापती पद देखील नेताजीरावांना द्यायचं ठरवलं होतं. तसा प्रस्ताव राजांनी दरबारात देखील मांडला. या प्रस्तावाला चालू सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी देखील पाठींबा दिला. हंबीरराव म्हणाले,
"महाराज,काकाश्री आमच्या पेक्षा २० वर्षाने मोठे…आम्ही सरकारांना आमच्या वडीलांप्रमाणे मानतो…तो त्यांचा मान आहे.. मी त्यांच्या फौजेतला साधा शिपाई गडी होतो.. त्यांच्या पराक्रमासमोर माझा पराक्रम हा कवडीमोल आहे..आता ते परत आलेत.. थोरले सरनौबत असताना मी सरसेनापती असणे योग्य नाही.. तो तुमची प्रतिमा असणाऱ्या इतिहासातील प्रतिशिवाजी म्हणजे आमच्या काकासाहेबांचा.. थोरल्या सरनौबतांचा मान आहे."
फार मोठे मन होते हंबीरराव मोहिते यांचे..! हंबीरराव मोहिते यांचं नेताजीराव पालकर यांच्यावर असणारे पितृप्रेम पाहून नेतोजी थक्क झाले. ते महाराजांना म्हणाले,
"महाराज, आपण कृपया हंबीरराव मोहिते यांचे सरसेनापती पद काढू नये..अहो ते आमच्या फौजेतले शिपाई गडी असले तरी आमच्या माघारी त्यांनी आमच्या सारखाच पराक्रम गाजवलाय.. सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा बदला हंबीरराव यांनी घेतला.. व त्यांच्या ह्या पराक्रमामुळे त्यांना हे सरसेनापती पद मिळालय..! शिवाय ते उमदे तरूण आहेत सध्या आम्ही साठीच्या घरात गेलो.. स्वराज्याला त्यांच्या सारखा तरूण रक्ताचा सरसेनापती हवा.. की जो जास्त काळ स्वराज्यात अस्तित्वात असेल..!
आम्हास पद वगैरे काही नको.. राजे.. आजवर तुम्ही जे दिले ते अतुलनीय आहे..! एवढे मोठे संकट येऊनही आम्हाला तुम्ही स्वराज्यात नाही तर हिंदु धर्मात देखील घेतले.. वेळ प्रसंगी धर्मपीठाच्या विरोधात गेलात.. स्वराज्यातील मंत्र्यांचा विरोध पत्करलात..! बस राजे बस.. एका नेताजीरावासाठी एवढं करावं.. तेही हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींनी..! महाराज,आमचं महत्व, आमचा पराक्रम आज देखील तुमच्या, सरसेनापतींच्या व आमच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या स्वराज्यातील सर्व शिलेदार, सहकाऱ्यांच्या मनात ठासून भरलाय.. अजून काय पाहिजे एका पामराला..!
धन्य ते नेतोजीराव..थोरले सरनौबत..!
१६७६ साली महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेला निघाले. तेव्हा त्यांच्या सोबत जुने निष्ठावंत सहकारी होते. त्यात नेताजी पालकर हे देखील सहभागी होते.
१६७८ साली महाराज आणि सहकारी दक्षिण दिग्विजय करून महाराष्ट्रात आले. तेव्हा शिवरायांनी नेताजींना चिपळूण येथे मोहिमेवर पाठविले.
१६८० पर्यंत नेतोजी चिपळूण मध्ये मोहिमेवर होते. तेव्हा पोर्तुगीजांना त्यांनी सलो की पळो करून सोडले.
१६८० ला येसाजी कंक यांच्या सोबत रायगडचा वेढा नेताजीरावांनी फोडून काढला. फितुर रायगडाचा किल्लेदार राहुजी सोमनाथ याला नेताजींनी कैद केले.
तेव्हा नेताजींनी स्वराज्यातील काही जुन्या सरदारांना एकत्र करून त्यांचा एक गट तयार केला. त्याचे प्रमुख नेतोजीराव होते. व त्यांनी त्यांच्या गटाचा पाठिंबा हा शंभुराजे यांना दिला.
नंतर पुढे देखील नेताजींचा उल्लेख आढळतो तो कुठे ते पाहुया.
१६ जानेवारी १६८१ रोजी शंभुराजे यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. तेव्हा नेतोजी उपस्थित होते. तिथे त्यांचा योग्य तो मान सन्मान झाला. कारण त्या समयास त्यांचे वय ६१ वर्षे इतके होते. त्यांच्या एवढा ज्येष्ठ, निष्ठावंत व जुना शिलेदार स्वराज्यात दुसरा कोणताच नव्हता. त्यामुळे स्वराज्यात नेताजीरावांचा दबदबा कायम होता.
नंतर औरंग्याचा पुत्र शहजादा अकबर हा त्याच्या बापा विरुद्ध बंड पुकारून स्वराज्यात शंभुराजे यांच्या आश्रयास आला. शंभुराजे यांनी त्यांचं स्वागत केले. व नेताजींना त्याचा मान पान करण्यासाठी त्याच्या छावणीत पाठवले. कारण नेताजींना त्या अकबराच्या धर्मातील रीती रिवाज माहीत होता.
तेव्हा ती जबाबदारी शंभुराजे यांनी काढून घेतली. व हिरोजी फर्जंद यास वकील म्हणून त्याच्या छावणीत पाठवले.
आणि नेताजींना बागलाणचे किल्लेदार केले. नेताजींनी बागलाण प्रांतात अनेक मोगली सरदारांचा दारूण पराभव केला.
या पराक्रमामुळे खूश होऊन शंभुराजे यांनी १६८२ साली नेताजींना नांदेड मधील हदगाव तालुक्यातील तामसा येथील जहागिरी दिली. व नांदेडचे सुभेदार म्हणून नेमले.
तेव्हा देखील नेताजींनी मोठा पराक्रम गाजवला. त्यांनी रयबागण या स्त्री सेनानीच्या फौजेचा धुव्वा उडवला. व गोवळकोंड्याकडून येणारी परकीय आक्रमणाची वादळे महाराष्ट्राच्या सीमेवरच रोखली.
या पुढे देखील नेताजींचा उल्लेख आढळतो.. पण तो कुठे हे पाहुया. १६७८ साली शिवरायांनी नेताजींना इंदापूर व वाई प्रांताची देखील जहागिरी दिली होती. परंतु नेतोजी तिथे न थांबता शिवरायांच्या आदेशानुसार चिपळूण मोहिमेवर रवाना झाले. व वाई आणि इंदापूर प्रांताची जहागिरी ही त्यांनी त्यांचे पुत्र नरसोबा पालकर व कर्णसिंह पालकर यांच्याकडे सोपवली. त्यांनी १६७८-१६८२ पुढे ४ वर्षे सांभाळली देखील होती.
पुढे याच समयास १६८२ साली नेतोजी पालकर यांचे वय ६२ वर्षे इतके होते. वाढते वय पाहून त्यांना जास्त दगदग होऊ नये म्हणून शंभुराजे यांनी नेतोजींना नांदेड मधून माघारी बोलावले. व
इंदापूर प्रांताची जहागिरी ही त्यांनी नेतोजी पालकर यांच्याकडे सोपवली. आणि नांदेडचे सुभेदार म्हणून त्यांचे पुत्र नरसोबा पालकर यांना नांदेडमध्ये पाठवले.
१६८३ पासून १६८९ पर्यंत ६ वर्षे नेताजीरावांनी इंदापूर परागणा सांभाळला.
११ मार्च १६८९ रोजी शंभूराजे यांची हत्या करण्यात आली. तेव्हा नेतोजी पालकर इंदापूर परगणा सांभाळत होते. आणि स्वराज्य हे फार मोठ्या संकटात सापडले.
याच ठिकाणी काही इतिहासकार नेताजीराव हे शंभुराजे यांच्या मृत्यूनंतर मोगलांना मिळाले असा दावा करतात. मात्र "हे पूर्णपणे खोटे कथन आहे" हे या ठिकाणी श्रोत्यांनी लक्षात घ्यावे.
आणि शिवचरित्र खंड-३ चा संदर्भ हे इतिहासकार देतात.. मात्र आपण शिवचरित्र खंड-३ हे नीट वाचावे त्यात असे सांगितले की," महाराजांनी इंदापूर मधील मशिद वतने बंद केली व १६९० ला ती पुन्हा चालू झाली. या ठिकाणी
( "कोणी चालू केली हे स्पष्टपणे सांगितलेले नाही.") एवढंच की नेतोजी पालकर तेव्हा इंदापूर परगणा सांभाळत होते. या वरून नेतोजीराव पुन्हा मोगलांना मिळाले असे खोटे कथन केले जाते. कारण नेताजींचे वय तेव्हा ७० च्या घरात होते.
१६८९ साली शंभुराजे यांची हत्या करण्यात आली. व औरंग्याच्या छावण्या ह्या वढू,तुळापूर तसेच इंदापूर पर्यंत पसरल्या होत्या. सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवराव यांनी सोन्याचे कळस कापून आणण्याआधी नेतोजीराव औरंग्याच्या फौजेला घिरट्या घालून त्रास देत होते.
आणि यापुढेही जाऊन विचार केला तर नेताजीरावांचा मृत्यू हा १६९० ला झाला. मात्र त्या समयास नेतोजी "तामसा" या ठिकाणी होते. म्हणजेच नांदेड मध्ये होते. थोडक्यात १६९० ला त्यांनी इंदापूर प्रांताची जहागिरी ही नरसोबा पालकर यांच्याकडे दिली होती. व ही मशिदीच्या वतनाची घटना ही नेतोजी पालकर यांच्या मृत्यूनंतर १६९० लाच घडली होती. इतिहासाने नरसोबा पालकर यांना या घटनेबाबत जबाबदार धरावे.
आणि तामसा येथे असतानाच १६९० साली सरसेनापती नेताजीराव पालकर यांचं वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं. इतिहासातील प्रतिशिवाजी हे काळाच्या पडद्याआड गेले.
नेतोजीराव पालकर हे दीर्घकाळ स्वराज्यसेवा करणारे १ ले शिलेदार होते. म्हणजे जवळ जवळ १६४० पासून १६९० पर्यंत ५० वर्षे नेताजींनी स्वराज्याची सेवा केली होती.
काहींच्या मते १६८२ ला त्यांचा मृत्यू झाला असही मत आहे. हे देखील खरे असू शकते कारण १६८२ ला शंभुराजे यांना त्यांना तामसा येथील जहागिरी दिली होती. व त्यांचा मृत्यू इथेच झाला हे सत्य आहे.
किंवा १६९० ला झाला असे म्हणावे तरी तामसा येथेच त्यांचे निधन झाले ही सत्य घटना आहे. कारण त्यांची समाधी तामसा या ठिकाणीच आहे. आणि इंदापूर प्रकरण १६९० लाच घडले.पण तेव्हा नेतोजी तामसा येथे होते. इंदापूरची जहागिरी त्यांनी आधीच सोडलेली होती
किंवा १६८२ नंतर ते तामसा येथेच वास्तव्य करत असावेत ही शक्यता नाकारता येत नाही. व जरी हयातीत घडली असली तरी नेतोजी पालकर यांचा या घटनेशी संबंध लागत नाही. कारण त्यांनी आधीच इंदापूरची जहागिरी सोडली होती. त्यांच्या पश्चात नरसोबा पालकर यांनी ही घटना केली असावी. हे याठिकाणी सिद्ध होते.
अशा श्री शिवछत्रपतींच्या प्रतिमेला म्हणजेच इतिहासातील प्रतिशिवाजी, हिंदवी स्वराज्याचे १ ले घोडदळ प्रमुख…हिंदवी स्वराज्याचे २ रे सरसेनापती.. पुरंदरचे किल्लेदार.. शंभुराजे यांचे अंगरक्षक…बागलानचे किल्लेदार…नांदेडचे सुभेदार अशा वेगवेगळ्या पदावर राहून मोठा पराक्रम गाजवणारे सरसेनापती नेताजीराव पालकर यांना त्रिवार मानाचा मुजरा.

सरनोबत नेताजी पालकर

 


सरनोबत नेताजी पालकर
पोस्तसांभार :डॉ विवेक दलवे पाटील
हिंदवी स्वराज्याचे २ रे सरसेनापती नेताजीराव पालकर म्हणजेच इतिहासातील प्रतिशिवाजी हे शेवटपर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ होते हे याठिकाणी लक्षात घ्यावे.🙏 त्यांचा जन्म १६२० साली रायगड जिल्ह्यातील खालापूर या ठिकाणी झाला. त्यांचे काका बळवंतराव पालकर हे पराक्रमी सरदार शहाजी राजांच्या सेवेत सुरुवाती पासून होते. १६३५ साली नेतोजी पालकर देखील शहाजी राजांच्या सेवेत रुजू झाले. १६४० साली शहाजी राजांनी स्वराज्याचा संकल्प केला. तेव्हा त्यांच्या सोबत माणकोजी दहातोंडे, यशवंतराव उर्फ बाजी पासलकर, कान्होजी नाईक जेधे, बळवंतराव पालकर व नेतोजी पालकर देखील होते.१६४१-४२ या काळात नेताजींनी आदिलशाही फौजेला चांगलंच पिटाळून लावलं.१६४३ साली शहाजी राजांची रवानगी आदिलशहाने बंगळूर प्रांतात केली. त्यांच्या सोबत बळवंतराव पालकर देखील गेले होते.१६४३ ला स्वराज्याची सूत्रे छत्रपती शिवरायांनी हातात घेतली.१६४५ साली रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेताना नेताजी पालकर उपस्थित होते. १६४६ साली तोरणा स्वराज्यात आणताना बाजी पासलकर यांच्यासोबत नेताजीराव देखील खांद्याला खांदा लावून लढले होते. व तोरणा स्वराज्यात दाखल झाला.१६५० ला महाराजांसोबत राजगड घेताना फार मोठा पराक्रम केला. म्हणून हिंदवी स्वराज्याचे १ ले घोडदळ प्रमुख पद नेतोजी पालकर यांना शिवरायांनी दिले. १६५२ ला संपूर्ण स्वराज्याचे सरसेनापती पद देखील महाराजांनी नेताजींना दिले. १६५४ ला पुरंदरचे किल्लेदार म्हणून नेताजी पालकर यांची नेमणूक केली.त्यांनी अनेक युद्धे गाजवली. १६५६ ची जावळी मोहिम,१६५९ साली प्रतागडावरील केलेला पराक्रम,१६६० ला विजापूरला वेढा दिला,१६६१ साली उंबरखिंडीत महाराजांसोबत कार्तलाबखानाचा पराभव,१६६३ चा लाल महालातील छापा असेल,१६६४ ची सुरतेची लूट बऱ्याच मोहिमांचे नेतृत्व सरसेनापती नेताजी पालकर यांनी केले होते.
१६६५ ला फलटण प्रांत व वसंतगड जिंकून घेतला.
१६६५ ला पुरंदरचा तह झाला. त्यात छत्रपती शिवराय,नेतोजी,मिर्झाराजे जयसिंह व दिलेरखान हे विजापूरवर चालून गेले असता तेथे विजापूरचा सरदार सर्जखान याच्यासमोर सगळे पराभूत झाले. याच खापर दिलेरखान याने शिवरायांवर फोडलं. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळा घेण्यासाठी महाराज रात्री पन्हाळ्याला गेले. इकडे नेताजींनी कच खाल्ली.(शिवरायांच्या पूर्व योजनेनुसार) आणि मिर्झाराजे जयसिंह व दिलेरखान यांचा विजापूर मध्ये दारूण पराभव केला. नेतोजी विजापूर मधून पन्हाळ्याला मुद्दाम वेळेवर पोहोचले नाहीत. (हे देखील पूर्व नियोजित होते.) म्हणून आपले १००० मावळे कामी आले व शिवरायांचा पन्हाळ्यावर पराभव झाला.(ठरल्याप्रमाणे)
राजगडी आल्यावर महाराजांनी नेताजींना बोल लावले,"समयास कैसे पावला नाहीत." व स्वराज्यातून हकालपट्टी केली. नेताजीराव विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले.(शिवरायांचा राजकीय डाव) आणि दिलेरखान व मिर्झाला धरणी माय ठाव करून सोडले. १६६६ ला महाराज आग्रा भेटीला गेले असता मिर्झा नेतोजी पालकर यांना विनंती करू लागला. की आम्हास येऊन मिळा. राजांनी पत्राद्वारे नेताजींना कळविले की मिर्झाला जाऊन मिळावे. मग सरसेनापती नेताजी पालकर हे मिर्झाराजे यास जाऊन मिळाले. शिवराय आग्र्याहून सुटले म्हणून प्रतिशिवाजी सुटू नये यासाठी औरंग्याने १९ ऑगस्ट १६६६ रोजी नेताजींच्या अटकेचे फर्मान काढले. व १६६७ च्या सुमारास नेतोजी पालकर यांना दिलेरखान याने धारूर येथे कैद केले. त्यांचे काका कोंडाजी पालकर व पुत्र नरसोबा पालकर हे देखील कैद झाले. व सर्वांना आग्र्याला हलवले. तिथे नेताजींचा अतोनात छळ सुरू झाला. त्यातच कोंडाजी पालकर यांचं निधन झालं. तरीही नेतोजी नमले नाहीत. पण ही खबर महाराजांना कळाली तेव्हा त्यांनी नेताजींना पत्र लिहिले,
"काकाश्री, देह राखणे.. शरीर वाचवणे.. धर्मांतराचे दिव्य पत्करणे.. संधी मिळताच पलायन करावे..बजाजी नाईक निंबाळकराप्रमाणे तुम्हाला देखील स्वधर्मात घेऊ..! तुमचा आमचा धर्म एकच..स्वराज्य..!"
हेच पत्र बहिर्जी नाईक यांनी नेताजींना आग्र्यात दिले.आणि प्राणाहून प्रिय असा स्वधर्म नेतोजी पालकर यांना सोडावा लागला. नेताजींनी शिवरायांच्या राजाज्ञेचे पालन केले.
१६६७ साली नेताजी पालकर यांचं धर्मांतर झाले. त्यांचे नाव "महंमद कुली खान" असे बादशहाने केले. व त्यांना काबूल कंधारच्या मोहिमेवर रवाना केले. तिथून पळून येण्याचा २ दा प्रयत्न नेताजींनी केला. पण दोन्ही वेळेस अपयश आले. पुढे ९ वर्षे त्यांना स्वराज्यापासून दूर राहावे लागले.
पुढे शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. स्वराज्य विस्तार हा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. औरंग्याचा प्रत्येक सरदार हा महाराजांसमोर अपयशी ठरत होते. तेव्हा औरंग्याने महमद कुली खान म्हणजेच नेताजींना महाराष्ट्राच्या मोहिमेवर पाठविले. सोबत दिलेरखान याला पाठवले. तेव्हा मे १६७६ साली नेताजी पालकर हे दिलेरखानाच्या छावणीतून पळून रायगडावर आले. रायगडावर येताच नेताजींकडे पाहून महाराजांनी सरनौबत…असा हंबरडा फोडला..! नेताजींना कारभारी मंडळी यांनी स्वराज्यात घेण्यास खूप विरोध केला. मात्र श्री शिवछत्रपती आणि स्वराज्याचे सर्व शिलेदार हे नेताजींच्या बाजूने होते. त्यांना स्वराज्यातच नाही तर जून १६७६ साली पुनश्यः हिंदू धर्मात घेतले.
तसेच त्यांचे पुत्र नरसोबा पालकर व नातू जानोजी पालकर यांना देखील हिंदू करून घेतले. व जानोजी पालकर यांचा विवाह शिवरायांनी त्यांची कन्या कमलाबाई हिच्याशी लावून दिला.
पुढे महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेला जाताना सोबत त्यांचे जुने निष्ठावंत सहकारी होते. तेव्हा नेतोजी पालकर देखील छत्रपती शिवरायांसोबत या मोहिमेत सहभागी झाले होते.
१६७८ ला दक्षिण दिग्विजय करून महाराज व सहकारी पुन्हा महाराष्ट्रात आले. तेव्हा शिवरायांनी नेतोजी पालकर यांना चिपळूण येथील मोहिमेवर पाठविले. १६८० पर्यंत तब्बल ३ वर्षे नेताजीराव चिपळूण मध्ये राहिले. तिथे असताना नेताजींनी किनारपट्टी नजीक पोर्तुगिजांचा दारूण पराभव केला.
३ एप्रिल १६८० साली महाराजांचे रायगडावर निधन झाले. आणि रायगड फितूरांनी घेरला. राजांवर अंत्य संस्कार झाले. शंभुराजे हे तेव्हा पन्हाळ्यावरचं होते. इकडे रायगडावर राजारामराजे यांचे मंचकारोहन पार पडले. आणि अण्णाजी दत्तो व मोरोपंत पिंगळे हे तळबीड या ठिकाणी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भेटीस गेले. तेव्हा हा घटनाक्रम नेतोजी पालकर यांना कळला. मग येसाजी कंक हे नेताजींना चिपळूण मध्ये येऊन मिळाले. व तिथून नेताजीराव व येसाजीराव रायगडाकडे गेले. तिथे येसाजी कंक यांनी सावंत सरदार याचा पराभव केला. तर नेताजींनी रायगडाचा किल्लेदार राहुजी सोमनाथ याचा पराभव करून त्यास जेरबंद केले. आणि रायगडाचा वेढा फोडून काढला. तळबीड मध्ये हंबीररावांनी अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे यांना कैद केले. व पन्हाळ्यावर शंभुराजे यांनी जनार्दन पंत हणमंते यांना कैद केले. व हंबीरराव मोहिते शंभुराजे यांना येऊन पन्हाळ्यावर मिळाले. याच समयास हिरोजी फर्जंद हे पन्हाळ्यावरचा खजिना घेऊन पसार झाले. त्यास जोत्याजी केसरकर याने कैद करून शंभूराजे यांच्यासमोर आणले. सर्व फितुरांना घेऊन शंभूराजे व सरसेनापती हंबीरराव मोहिते रायगडावर आले. तेव्हा नेताजींच खास कौतुक शंभुराजे यांनी केले.
पुढे १६ जानेवारी १६८१ रोजी शंभूराजे यांचा रायगडी राज्याभिषेक सोहळा पार पडला. नेताजी पालकर यांचा देखील मान सन्मान पार पडला. कारण त्या समयास नेताजीरावांचे वय ६१ वर्षे इतके होते. स्वराज्यातील सगळ्यात ज्येष्ठ व जुने आणि एकनिष्ठ शिलेदार म्हणून नेतोजीरावांचा दबदबा कायम होता.
राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर शंभुराजे यांनी नेतोजीरावास बागलाणचे किल्लेदार म्हणून नेमले. १६८१ च्या सुमारास नेताजी बागलाण प्रांतात गेले. तिथे त्यांनी मोगलांना सलो की पळो करून सोडले. या पराक्रमामुळे १६८२ साली शंभुराजे यांनी नेताजींना नांदेड मधील हदगाव तालुक्यातील तामसा येथील जहागिरी दिली. तसेच नांदेडचे सुभेदार म्हणून त्यांची नेमणूक केली. त्या समयास देखील सुभेदार नेतोजीराव पालकर यांनी रायबगान या स्त्री सेनानीच्या फौजेचा धुव्वा उडवला. तसेच गोवळकोंड्यावरून येणारी कुतुबशाही परकीय आक्रमनाची वादळे महाराष्ट्राच्या सीमेवरच रोखली.
आणि तामसा येथे असतानाच सरसेनापती नेताजीराव पालकर यांचं १६८२ साली वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले.

पायदळ प्रमुख सरनौबत येसाजीराव कंक

 


पायदळ प्रमुख सरनौबत येसाजीराव कंक
पोस्तसांभार :डॉ विवेक दलवे पाटील
येसाजी कंक यांचा जन्म १६२६ साली पुणे जिल्ह्यातील राजघर या गावी झाला. १६३५ पासून ते छत्रपती शिवरायांच्या सहवासात आहेत. येसाजी कंक हे महाराजांचे जिवलग बालमित्र होते. पुढे १६३५ ते १६४० या काळात येसाजींनी शिवरायांसोबत युद्धकलेचे प्रशिक्षण पूर्ण केले. १६४३ साली हिंदवी स्वराज्याची सूत्रे छत्रपती शिवरायांनी हातात घेतली. तेव्हा येसाजी कंक हे महाराजांसोबत होते. १६४५ साली रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेताना देखील येसाजीराव छत्रपती शिवरायांसोबत उपस्थित होते.
१६४७ साली रांझ्याच्या पाटलाने एका निरागस स्त्री वर हात टाकला. या मुळे महाराज क्रोधित झाले. तेव्हा त्या पाटलाला श्रीमंत येसाजी कंक यांनी कैद करून शिवरायांसमोर उभे केले. व त्या क्षणाला महाराजांनी त्याचा चौरंगा काढला.
१६५० साली येसाजी कंक यांची स्वराज्यनिष्ठा पाहून त्यांना हिंदवी स्वराज्याचे १ ले पायदळ प्रमुख पद बहाल केले. येसाजी कंक पायदलाचे १ ले सरनौबत झाले.
१६५९ साली प्रतापगडच्या युद्धात शिवरायांनी येसाजीरावांना आणि त्यांचे धाकटे बंधू कोंडाजी कंक यांना अंगरक्षक म्हणून सोबत घेतले होते. तेव्हा अफझलखान वधानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी येसाजी कंक यांनी सरसेनापती नेतोजी पालकर यांच्यासोबत मोठा पराक्रम गाजवला. या लढाईत संपूर्ण पायदळ हे येसाजी कंक यांच्या नेतृत्वाखाली लढले. येसाजी कंक यांनी पायदळाच्या ५ तुकड्या पाडल्या. एका तुकडीचे नेतृत्व स्वतः सरनौबत येसाजी कंक यांनी घेतले. दुसऱ्या तुकडीचे नेतृत्व हे कान्होजी-सर्जेराव-श्यामजी या जेधे पिता-पुत्रांकडे दिले. ३ ऱ्या तुकडीचे नेतृत्व हे हैबतराव-प्रतापराव या शिळीमकर बंधूंकडे सुपूर्द केले. व ४ थ्या तुकडीचे नेतृत्व हे रायाजी-कोयाजी-बाजी या बांदल बंधूकडे दिले होते. आणि ५ वी तुकडी ही पासलकर देशमुख यांच्याहाती दिली. प्रत्येकाने चोख कामगिरी बजावली.
१६६१ साली उंबरखिंडीत महाराजांसोबत कार्तलाबखानाविरुद्ध पराक्रम गाजवला. खिंडीत रायबागण या स्त्री सेनानीचा दारूण पराभव केला. जेव्हा पुढची एक स्त्री आहे.. हे कळताच त्यांनी तिला अभय दिले.
१६६२ साली नामदारखान याचा छत्रपती शिवरायांनी मिऱ्याच्या डोंगरावर म्हणजे तळकोकणातील मिरगडावर दारूण पराभव केला. तेव्हा येसाजी कंक हे राजांसोबत होते. येसाजी कंक यांच्या धाकाने नामदार खानाची फौज मिरगडावरून उड्या टाकून जीव देऊ लागली.
१६६३ साली लाल महालात छापा टाकताना शिवरायांनी येसाजी कंक यांना बरोबर घेतले होते. येसाजी कंक यांनी लाल महालात शत्रूंची खूप लांडगेतोड केली.
१६६४ साली सुरत लुटीत येसाजी कंक शिवरायांसोबत सुरतेत गेले होते. तिथे येसाजी कंक यांनी घरंदाज सावकारांचे वाडेच्या वाडे जप्त करून टाकले. मोठी लूट मिळवली.
१६६६ साली महाराज आग्रा भेटीला जाणार होते. तेव्हा त्यांनी अंगरक्षक म्हणून येसाजी कंक यांना सोबत आग्र्याला नेले. पुढे आग्र्याहून सर्वांची सुटका झाली.
१६६८ पासून प्रत्येक मोहिमेत येसाजी हे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या सोबत असायचे.
१६७२ साली साल्हेर किल्ल्याच्या लढाईत येसाजी कंक हे प्रतापराव व सूर्याजी काकडे यांच्या खांद्याला खांदा लावून लढले. व साल्हेरवर भगवा फडकवला.
१६७४ साली छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यात ते उपस्थित होते.
१६७५ साली येसाजी कंक यांनी गोव्यातील फोंडा किल्ला स्वराज्यात आणला. पोर्तुगीज यांचा दारूण पराभव केला. म्हणून छत्रपती शिवरायांनी त्यांना फोंड्याचे किल्लेदार देखील बनवले.
१६७६ साली दक्षिण दिग्विजय मोहिमेला जाताना महाराजांनी येसाजीराव कंक यांना सुद्धा बरोबर घेतले होते. तेव्हा गोवळकोंडा येथे महाराजांच्या इच्छेखातर येसाजी कंक यांनी कुतुबशाहाच्या मदमस्त.. पिसाळलेल्या.. बेधुंद हत्तीचा पराभव करून त्याला यमसदनी पाठवले. महाराष्ट्राच्या हत्तीने गोवळकोंड्यातील हत्तीला रणांगणात लोळवले.
१६८० साली छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर त्यांनी त्यांचा पाठिंबा शंभुराजे यांना दिला. येसाजीराव व नेताजीराव यांनी मिळून रायगडाचा वेढा फोडून काढला. फितुर सावंत सरदार याला येसाजी कंक यांनी जेरबंद केले.
१६८१ साली छत्रपती शंभूराजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात येसाजी बाबा कंक उपस्थित होते. तेव्हा त्यांचा खूप मान सन्मान झाला. तेव्हा येसाजी कंक यांचे वाढते वय व त्यांच्यावर आधीच छत्रपती शिवरायांनी दिलेली फोंडा किल्ल्याची जबाबदारी पाहून शंभूराजे यांनी सरदार पिलाजीराव गोळे यांना स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनौबत पद दिले. जवळ जवळ सलग ३० वर्षे श्रीमंत येसाजी कंक यांनी पायदळाच्या सरनोबत पदावर काम केले होते.
१६८३ साली जवळ जवळ २ महिने किल्लेदार येसाजी कंक यांनी फोंडा किल्ला पोर्तुगीज यांच्याविरुध्द लढवत ठेवला. व शेवटी अजिंक्यच राखला..! फोंड्यावर पोर्तुगिजांचा धक्कादायक पराभव येसाजी कंक यांनी केला. व फोंड्याचे रक्षण केले. या लढाईत त्यांचे पुत्र गडकरी कृष्णाजी कंक मारले गेले. स्वतःचा एकुलता एक पुत्र गमावला तरी त्याचं दुःख करत न बसता येसाजी बाबा शेवटपर्यंत पोर्तुगीजांशी लढतच राहिले.
१६८५ साली गोवा प्रांत हिंदवी स्वराज्यात आणण्यास येसाजी कंक यांनी शंभुराजे यांना फार मोठी मदत केली. येसाजी कंक यांच्या मदतीने शंभुराजे यांनी गोवा, म्हापसा, वालपोय, पणजी एका मागून एक गड जिंकून घेतले. आणि पोर्तुगीजांची भयानक कत्तल केली. गोवा प्रांत हिंदवी स्वराज्यात आणला. त्यानंतर काही दिवसांनी शंभूराजे येसाजी कंक यांच्या भुतोंडे येथील घरी गेले. त्यांचं सांत्वन केले. व त्यांना गोव्याचे सुभेदार बनवले. तर त्यांचे नातू चाहुजी कंक यांना फोंड्याची किल्लेदारी दिली.
१६८७ साली येसाजी कंक यांचे वय ६१ वर्षे इतके झाले. त्यांची दगदग होऊ नये म्हणून शंभुराजे यांनी त्यांची गोव्याची सुभेदारी काढून त्यांची रायगडाच्या तटसरनौबत पदी निवड केली.
१६८९ साली धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचे तुळापूर येथे बलिदान झाले. तेव्हा राजाराम राजे यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. तेव्हा देखील श्रीमंत येसाजीराव कंक रायगडी उपस्थित होते.
मात्र हा काळ फार बिकट होता. झुल्फिकारखान याने रायगडाला भक्कम वेढा घातला. जवळ जवळ ७-८ महिने तटसरनौबत येसाजी बाबा कंक यांनी राजधानी रायगड लढवत ठेवला.
१६९० साली झुल्फिकार खान याने राजाराम राजे यांच्याबद्दल खोटी अफवा गडावर पसरवली. व त्या राजकारणात येसूबाई फसल्या. त्यांनी झुल्फिकारखान यास रायगडाचा ताबा दिला. व शंभुपुत्र शाहूराजेे,जानकीबाई, सकवारबाई यांना घेऊन औरंग्याच्या कैदेत गेल्या.
यानंतर कुठेच येसाजीराव कंक यांचा उल्लेख सापडत नाही. पण १६९० नंतर २६ वर्षे सरनौबत येसाजी कंक हे जीवंत होते. १६९० ला त्यांचे वय ६४ वर्षे इतके झाले होते.
अशी आख्यायिका आहे.. की येसूबाई यांनी १६९० साली येसाजीराव कंक यांना अंगरक्षक म्हणून औरंग्याच्या छावणीत सोबत नेले असावे.. व छावणीतच १७१६ साली निधन झाले. कदाचित म्हणून कुठे उल्लेख आला नाही. मात्र या बाबत कोणतेही पुरावे नाहीत.(तरीही दाट शक्यता)
काहींच्या मते येसाजी बाबा कंक हे १६९० साली रायगड पडल्यावर भुतोंडे या गावी गेले असावेत…पण स्वराज्याचे निष्ठावंत सहकारी येसाजी कंक हे वाईट काळात स्वराज्यासाठी न लढता त्यांच्या गावी मुक्कामी का जातील..?(कमी शक्यता)
मी येसाजी कंक यांचे थेट वंशज सिद्धार्थ राजे कंक यांना या बद्दल विचारले त्यांनी देखील हेच सांगितले की १६९० नंतर येसाजीराव कंक हे कुठे गेले हे फार मोठे रहस्य आहे.. व १६९० नंतर इतिहासात कोणतेच पुरावे सापडत नाहीत. त्यामुळे नंतर २६ वर्षांच्या काळात येसाजी कंक यांच्या बाबतीत काय घडले.. असा तर्क लावणे उचित ठरणार नाही.🙏
कदाचित संताजी धनाजी यांच्या सोबत पराक्रम सुद्धा गाजवला असेल..!🙇🙏
आणि अशा प्रकारे १७१६ साली वयाच्या ९० व्या वर्षी पायदळ प्रमुख सरनौबत श्रीमंत येसाजीराव कंक यांचे वयोमानाने भुतोंडे या गावी निधन झाले.🙏

स्वराज्यासाठी लढली गेलेली पहिली लढाई म्हणजे खळद-बेलसरची लढाई

 


स्वराज्यासाठी लढली गेलेली पहिली लढाई म्हणजे खळद-बेलसरची लढाई
मला याबद्दल सांगता येईन कि, भारतीय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई हि स्वराज्यासाठी लढली गेलेली पहिली लढाई असेल. स्वराज्यासाठी लढली गेलेली पहिली लढाई म्हणजे खळद-बेलसरची लढाई असेलच.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. व
जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली.
तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले.
विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.
आदिलशहाने शहाजी राजांना कपटाने कैद करून शिवाजी राजांवर फतेहखानास पाठविले होते, बंगरुळास थोरले बंधू संभाजीराजांवर पण विजापुरी फौजा चालून गेल्या होत्या, राजकारणाचे धडे ज्यांच्या हाताखाली गिरवले होते ते दादोजी कोंडदेव मृत्यू पावले होते.
अशा या संकटकाळी मनाचे स्थैर्य ढळू न देता शिवाजी राजांनी खळद- बेलसर येथील फतेहखानाच्या छावणीवरच हल्ला करण्याचा बेत आखला.
या तुकडीचे नेतृत्व होते एका साठ वर्षाच्या तडफदार तरुणाकडे ते म्हणजे "बाजी पासलकर".
"फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता."
छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एकारात्रीत गड सर केला तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.
फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले.
बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले.
दोघात तुंबळ युध्द झाले. अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.
मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला.
या लढाईत विजापुरी फौजेशी मावळ्यांनी कडवी झुंज दिली पण विजापुरी फौजेच्या रेट्यापुढे मावळ्यांना माघार घ्यावी लागली. या लढाईत बाजी पासलकरांनी पराक्रमाची शर्थ करून रणदेवतेला आपल्या प्राणाची आहुती दिली.
बाजी पासलकरांचा देह पडताच मराठा स्वारांचा जमाव फुटला. मराठ्यांच्या निशाणाचे पथक मुख्य फौजेपासून अलग पडले. निशाणाच्या तुकडीस यवनांच्या सैन्याचा गराडा पडला, एक एक स्वार कापू जाऊ लागला. निशाणाची होऊ घातलेली दुर्दशा पाहून एक मराठा स्वार विजेच्या चपळाईने त्या गर्दीत आपली तलवार चालवत घुसला.
एकाच झटक्यात पाच सहा शत्रू कापत त्याने निशाणाचा स्वार मोकळा केला आणि आपल्या बरोबर चालविला, एवढ्यात निशाणाच्या स्वारावर शत्रूचा घाव बसून तो घोड्याखाली आला.
हे पाहताच त्या निशाणाच्या स्वारास आपल्या घोड्यावर बसवून निशाणाचा भाला आपल्या खांद्यावर टाकून तो शूर पुरंदरास सुखरूप परत आला. या लढवय्याचे नाव होते बाजी जेधे. हे बाजी जेधे म्हणजे कान्होजी नाईक जेधे यांचे पुत्र आणि बाजी पासलकर यांचा नातू (मुलीचा मुलगा). याच लढाईत आणखीन एका बाजीने पराक्रम गाजविला होता ते म्हणजे बाजी नाईक बांदल, बांदलांच्या जमावाने मोठा पराक्रम गाजवत विजापुरी सैन्याचा मुकाबला केला होता, या लढाईत बांदलांचे सुमारे अडीचशे लोक कामाला आले.
या तिनही वीरांचा यथोचित सत्कार शिवाजी राजांनी पुरंदरची लढाई संपल्यावर केला.
बाजी पासलकरांच्या धाकट्या बंधूंना मोसे खोऱ्याची देशमुखी देऊन “सवाई बाजी” हा किताब दिला.
बाजी जेधे यांना “सर्जेराव” हा किताब देऊन वस्त्रे आणि दोन तेज तुर्की घोडे बक्षीस दिले.
बाजी नाईक बांदल यांना शिवाजी राजांनी मौजे भाणसदरे व पऱ्हर खुर्द या गावचे महसूल इनाम म्हणून दिले.
स्वराज्यासाठी लढल्या गेलेल्या लढायांमध्ये खळद-बेलसरची लढाई हि एकमेव लढाई असेल ज्या लढाई मध्ये एक नाही, दोन नाही तर तीन तीन बाजींनी आपल्या प्राणांची “बाजी” लावून स्वराज्याठाई आपली निष्ठा दाखवून दिली होती.
बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.
अशाप्रकारची माहितीप्रमाणे याबद्दल सांगता येईन.
🚩 हर हर महादेव 🚩
🚩🚩🚩जय भवानी, जय जिजाऊमाता , जय शिवाजी!!!🚩🚩🚩🚩🚩
वाचल्याबद्दल धन्यवाद 🙏.
🇮🇳 जय हिंद 🇮🇳

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...