विनोद जाधव एक संग्राहक

Friday 27 September 2019

पानिपत आणि मकरसंक्रांत १४ जानेवारी, १७६१!

पानिपत आणि मकरसंक्रांत १४ जानेवारी, १७६१!
दीड लाख, मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या. उभा मराठा कापला गेला. लौकिकार्थाने काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली. पानिपत होणे हा वाक्प्रचारही रुजला.
युद्ध!

युद्ध म्हटले कि त्याची परिणती विजय किंवा पराभव. पानिपत हा मराठ्यांचा सर्वात मोठा पराभव होता का? मराठ्यांचे सैन्य उभे कापले गेले, म्हणून गारद्यांचा विजय आणि मराठ्यांचा पराभव झाला का?
या युद्धानंतर काय झाले?
खैबरखिंडीतून झालेले ते शेवटचे आक्रमण. तीन पिढ्या मराठ्यांच्या गेल्या, पण कणा मोडला तो गनिमांचा! शतकानुशतकांची परंपरा एका तडाख्यात थांबली. अब्दालीचे कंबरडे मोडले आणि नशिबही. घरी जाऊन तो मेला. पुन्हा अल्लाह हु अकबर च्या आरोळ्या खिंडीपलीकडून आल्या नाहीत. अर्यावार्ताला पुन्हा त्या सुलतानी आक्रमणाला तोंड द्यावे लागले नाही. हेच तर साधायचे होते या युद्धातून!
साधले!
पराभव कुठे झाला!
पानिपत हि मराठ्यांनी देशासाठी दिलेली सवोत्तम आहुती होती. आहुती म्हणजे देशप्रेम.
पुन्हा मराठ्यांकडे कोणी देशप्रेमाचे दाखले मागू नयेत!
मराठे एकाकी लढले!
बचेंगे तो औरभी लढेंगे म्हणणारे दत्ताजीचे मराठे भुकेल्या पोटी आणि तहानलेल्या ओठी एकाकी लढले. राजपूत, जाट कोणी-कोणी म्हणून कोणी आले नाही! एकवेळ अब्दाली चालेल पण मरहटे नकोत!
एक होऊन लढले नाहीत सगळे,
मराठी एकाकी पडला,
पण अडला, नडला आणि थेट भिडला!
पानिपत म्हणजे जाज्वल्य अभिमान! सर्वोच्च कार्यक्षमता!
ज्यांच्या मातीत देशप्रेम उगवते म्हणतात त्या पंजाब सिंधच्या मातीत सर्वोच्च देशप्रेमाचा कधीच न मिटणारा ठसा महाराष्ट्राने उमटवलाय, त्याचे नाव पानिपत!
मराठा का एकाकी पडला?
आपल्याविषयी विश्वास निर्माण कराया का कमी पडला?
का परक्यांपेक्षा तो आपल्यांना अधिक परका वाटला?
आज या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे!
महाराष्ट्राला या देशाचे नेतृत्व करायचे असेल, तर अवघ्या देशाचा विश्वास आपण मिळवला पाहिजे. सर्व देशात आदराचे स्थान मिळवले पाहिजे!
पानिपत म्हणजे दुसर्यांवर विजय, आणि आपल्याकडून पराभव!
आपल्याच लोकांमध्ये बेबनाव, आपल्या लोकांमध्ये अविश्वास आणि त्याचा बसलेला खूप मोठा फटका!
या अर्थी पानिपत एक शिकवण!
आणि एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल…
आम्ही यास लढाई म्हणत नाही,
हे युद्ध!
महाभारतासारखेच
महत्वाचे!
मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची गाथा,
आपला अभिमान आपले देशप्रेम आपला त्याग,
ज्यावर प्रत्येक मराठ्याला गर्व वाटावा,
आपण न थकता तो सांगावा, देशाला, जगाला!
कारण पानिपत म्हणजे माझ्या राष्ट्राचा हुंकार!
एक पर्व संपले!
आक्रमणाचे, नाचक्कीचे, बलात्कारांचे…
इतिहास अभ्यासकांच्या भाषेत,
मध्ययुग संपले आणि
आधुनिक इतिहासास प्रारंभ झाला,
तो दिवस...
१४ जानेवारी १७६१!
पानिपत!
- अनामिक

अज्ञात राहिलेले छञपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू युवराज संभाजी महाराज शहाजीराजे भोसले.


अज्ञात राहिलेले छञपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू युवराज संभाजी महाराज शहाजीराजे भोसले.
शहाजीराजे यांना तीन बायका होत्या 1) जाधवराव कन्या जिजाऊ 2) मोहिते कन्या तुकाबाई 3) नरसाबाई ह्या नाटक शाळा म्हणून समजली जाते.
जिजाऊंना चार मुली व दोन मुले त्यातील चार मुली वारल्या थोरले पुञ युवराज संभाजी राजे दुसरे शिवाजी राजे . 2) तुकाबाईंचे एक पुञ एकोजी 3) नरसाबाईस संताजी असे चार पुञ शहाजीराजे यांना होते एकोजी व संताजी यांचे वंश कर्नाटक तंजावर येथे सध्या आहेत. त्यांनी पुणे जहागिरीवर कधीच अभिलाष दावला नाही.
जिजाऊंचे थोरले पुञ संभाजी महाराज यांचे लग्न विजयराव विश्वासराव कुळातील (पवार) हे शिवनेरीचे किल्लेदार होते. यांच्या मुलीशी शहाजीराजे यांनी संभाजी महाराज यांचे लग्न लावून दिले. जयंतीबाई साहेब व संभाजीराजे शिवरायांच्या जन्मावेळेस शिवनेरीवरच होते. शहाजीराजे यांच्या राजकीय व रणनितीतील धावपळीमुळे जिजाऊंना गरोदरपणात चांगल्या विश्वासू माणसांजवळ ठेवायचे होते. निजामशाही सोडली होती त्यावेळी शिवनेरी निजामाकडे होती त्याचे किल्लेदार विजयराव हे होते त्यांच्या सहाय्याने जिजाऊंना शिवनेरीवर ठेवण्यात आले आणि शहाजीराजे मोहिमेवर गेले. विजयरावांनी खुप मदत केली होती.
विजयरावांची मुलगी जयंतीबाई ह्यांना दोन पुञ होते. संभाजी महाराज यांच्या पुञ 25 नोव्हेंबर 1654 साली उमाजी नावाचा पुञ जन्माला आले. हे उमाजी उत्तर कालीन बखरकारांनी अज्ञातच ठेवले. ते इथे थांबलेच नाही तर संभाजी हे कर्नाटकात वारल्याने त्यांचे लग्नच झाले नव्हते असे बिनबुडाचे आरोप केले होते.
संभाजी महाराज यांना अफजलखानाने काकनगिरीच्या लढाईत मारले बखरकारांनी असे सांगितले जाते पण वस्तू स्थिती तशी नव्हती संभाजी महाराज बेदनूरच्या लढाईत 1663 च्या उत्तर्र्धात मारले गेले होते.
उमाजी लहान असल्याने कर्नाटक कारभार एकोजीस दिला होता. पण बखरकारांनी संभाजी लहान वयात मारला गेल्याने वंशच वाढला नाही पण ते माञ चूकीचे आहे जयंतीबाईंनी उमाजींच्या नावे दान केल्याचे उल्लेख 9 जानेवारी 1667 व 1670 च्या उतुर व अननहल्ली शिलालेखात आहेत.
1683 च्या मजहरावरून उमाजी वलद संभाजी थोरले , शिवाजीचा पुयण्यास विजापुरतर्फे जहागिरी होती. त्याने धामधुम करून ही देशमुखी मिळवली होती. उमाजीराजे पुण्याच्या आसपास एका मोठ्या युद्धात धुमाकुळ घालून वीरमरण आले होते. उमाजीस बहादुरजी नावाचे पुञ ही होते. संभाजिच्या मुलांस एकोजीने फारसे काही न दिल्याचे दिसते. म्हणून शिवाजी महाराज यांनी भावाच्या मुलाची वाटणी मागितली असावी. एकोजीस शिवरायांनी संताजीस व उमाजीस त्यांचा वाटा द्यावयास भाग पाडले असावे. संताजीस शिवरायांनी कर्नाटकातील आपल्या कारभारात ठेवले होते. उमाजी 1677 पुर्वी वारल्याने त्यांच्या कुटूंबास घेऊन सुप्याकडील जहागिरी दिली असावी.
पण बखरकरांनी शिवाजीराजे व एकोजी यांच्या वाटणीचे वेगळेच स्वरूप घडवून आणले होते. सध्या उमाजींचे वंश जिंती करमाळा तालुक्यात आजही आपल्या जहागिरीवर नांदत आहे.
1740 पर्यंत जिंतीतील कारभार उमाजीच्या पत्नी मकाऊ ह्याच पाहत असल्याचे पुरावे मिळतात. जिंती जहागिरीत मकाऊंची समाधी आहे तिथे त्यांना देवीचा मान आहे मकाऊंच्या नावाने वर्षाकाठी जञा निघते यावरून समजते की मकाऊंनी कशाप्रकारे आसपासच्या गावात आपल्या पुर्वजांचे नाव कसे चालवले असेल ते....
पण बखरकरांनी हे थोरले संभाजी महाराज आपणास अज्ञातच ठेवले.
#महाराज_शहाजीराजे
#युवराज_संभाजीराजे
#छञपती_शिवराय
गडप्रेमी बाळासाहेब पवार
9604058030

Friday 13 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 66


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 66
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------11
। दुसरे दिवशी सकाळीं, महाराज जनकोजीराव शिंदे लॉर्ड उइल्यम बेंटिंक ह्यांस भेटण्याकरितां गेले होते. त्यांचा लवाजमा व थाट अगदी अपूर्व होता. ते स्वतः एका शृंगारलेल्या हत्तीवर बसले होते. हत्तीच्या अंगावर भरजरीची झूल व गळ्यामध्ये सुवर्णाच्या माळा आणि गंडस्थळावर निरनिराळे अलंकार घातले होते. त्यामुळे तो प्रचंड प्राणी फार सुशोभित दिसत असून, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्याकरितांच जणू मंद गतीने चालत आहे, असे वाटत होते. महाराणी९.५ बायजाबाईसाहेब ह्यांचे बंधु हिंदुराव घाटगे व जावई आपासाहेब पाटणकर आणि दरबारचे इतर प्रमुख मानकरी व सरदार लोक महाराजांबरोबर मोठ्या थाटाने गजारूढ होऊन गेले होते. त्यांच्या वैभवाने शृंगाराभिरुचि दिपून जाऊन, ती बिचारी तेथून लोपली होती कीं काय, असे वाटत असे. महाराजांची व नामदारसाहेबांची मुलाखत होऊन कांहीं वेळ एकांत भेट झाली. हिंदुराव व आपासाहेब ह्यांचे व महाराजांचे अंतःकरणांतून रहस्य नसल्यामुळे, त्यांना नामदार साहेबांनी महाराजांस खाजगी भेट दिल्याचे पाहून फार आश्चर्य वाटले. त्यांचा व महाराजांचा एकांत तीन तासपर्यंत चालला होता. तो पाहून, महाराजांना कांहीं लहर येऊन त्यांनीं गव्हरनर जनरलसाहेबांस, आपणांस गादीवर बसविल्यावांचून सोडीतं नाहीं, ह्मणून हट्ट धरून अडवून ठेविलें आहे की काय, अशी शंका घेण्यास कारण झाले. तसा कांहीं प्रकार झाला असता, तर महाराजांस तेव्हांच निरोप मिळून रणकंदनाचाच प्रसंग ठेपल्यावांचून राहाता ना. महाराणींचे सैन्य तयार होतेच व आमचेही सैन्य तयार होतेच. त्या उभयतांपैकीं। कोणाची तरी महाराजांच्या लोकांशी चकमक उडाली असती. परंतु जनकोजीराव ह्यांस, महाराणीच्या सैन्याची व आपली लढाई झाली, व तींत आपण कैद झालो, तर आपणांस गव्हरनर जनरलसाहेबांकडून कांहीं मदत होणार नाही, असे कळून चुकले होते. त्यामुळे त्यांनी अतिप्रसंग न करितां, तीन तासपर्यंत गव्हरनर जनरलसाहेबांजवळआपणांस । राज्याधिकार मिळावा ह्मणून एकसारखी कर्मकथा चालविली होती. असो. ही भेट संपल्यानंतर दुपारीं लेडी उइल्यम ह्या आमच्या लष्करातील सर्व आंग्ल स्त्रिया बरोबर घेऊन महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांस भेट देण्याकरितां गेल्या. त्यांचा महाराणीसाहेबांच्या वतीने चिमणाबाईने उत्तम प्रकारे आदरसत्कार केला. चिमणाबाईचे आदरकौशल्य आणि रीतभात६ पाहून आंग्ल स्त्रियांनी तिच्या रूपाप्रमाणे ह्याही सद्गुणांची फार तारीफ केली. चिमणाबाईने आपल्या मातुश्रींच्या वतीने, मोठ्या प्रौढपणाने आणि चित्ताकर्षक रीतीने, सर्वांचा आदरसत्कार व मानपान यथायोग्य केला. ह्या प्रसंगी बायजाबाईसाहेबांनीं लेडी उइल्यम व आंग्ल स्त्रिया ह्यांना पुष्कळ मूल्यवान् वस्तू नजर केल्या. त्या सर्वांची माहिती चिमणाबाईने आंग्ल स्त्रियांस विनम्र व गोड वाणीने सादर केली. त्यामुळे त्या स्त्रिया अत्यंत प्रसन्न झाल्या, हे सांगावयास नकोच

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 65


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 65
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------10
महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांची व नामदारसाहेबांची भेट तंबूमध्ये चिकाचा पडदा लावून झाली. त्यांस नामदारसाहेबांनी मोठ्या आदबीने सलाम केला. नंतर त्यांचे व बायजाबाईसाहेबांचे, मि० म्याक्नॉटन ह्यांच्या मध्यस्थीने, कांहीं वेळ संभाषण झालें. रीतीप्रमाणे नजरनजराणे, पानसुपारी व अत्तरगुलाब होऊन दरबार बरखास्त झाला. । | दुसरे दिवशी सकाळी मराठ्यांचे सैन्य ग्वाल्हेरीकडे परत वळलें, व ना० गव्हरनर जनरल ह्यांची स्वारी एक दिवसानंतर–ह्मणजे ता. २१ डिसेंबर रोजी कूच करिती झाली. त्यानंतर तोफखाना परत निघाला. चंबळा नदीचे ग्वाल्हेरच्या बाजूचे ओहोळ हे आग्याच्या बाजूपेक्षा अधिक बिकट असल्यामुळे त्यांतून सुरक्षितपणे तोफा नेणे जवळजवळ अशक्य होते; ह्मणून ता. २१ रोजी सर्व सैन्य पुढे पाठवून, तोफखाना स्वतंत्र रीतीने न्यावा, असा विचार ठरला. आह्मी आल्यानंतर दुसरे दिवशीं महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांनीं लेडी उइल्यम बेंटिंक ह्यांची भेट घेतली. एतद्देशीय स्त्रियांनी युरोपियन स्त्रियांची भेट घेण्याची फारशी चाल नाहीं. परंतु बायजाबाईनीं लेडी उइल्यम बेंटिंक ह्यांची मुलाखत व्हावी अशी इच्छा व्यक्त केल्यामुळे तो योग घडून आला. प्रथमतः बायजाबाईसाहेब ह्यांनी रीतीप्रमाणे त्यांना पेशवाईची भेट९४ दिली. त्या वेळी त्यांच्याबरोबर त्यांची कन्या चिमणाबाई ( ही आपासाहेब पाटणकर ह्यांस दिली होती ) व इतर सरदारांच्या स्त्रिया गेल्या होत्या. युरोपियन स्त्रियांना ह्या भेटीचे फार कौतुक वाटून त्या, लेडी उइल्यम बेंटिंक ह्यांस, राजस्त्रियांच्या स्वागताचे कामी मदत करण्याकरितां आल्या होत्या. युरोपियन स्त्रियांनी चिमणाबाईचे सौंदर्य पाहून त्यापुढे आपलें रूप कांहींच नव्हे, असे प्रांजलपणे कबूल केले. त्यांनीं, तिचे अप्रतिम लावण्य, तिचा गौरवर्ण, तिचे तेजस्वी व पाणीदार नेत्र आणि नाजूक व रेखलेले अवयव पाहून, इंग्लंडांतील प्रत्येक स्त्री तिचा हेवा करील, अशा प्रकारे तिच्या रूपाची फार फार प्रशंसा केली. ह्या वेळीं लेडी उइल्यम बेंटिंक ह्यांनी महाराणीसाहेबांस कांहीं चिनी वस्तू व अलंकार नजर केले. हे त्यांच्या भेटीच्या अगोदर तीन चार तासपर्यंत सर्वांच्या प्रदर्शनार्थ मांडून ठेविले होते. ते फार सुंदर होते असे ह्मणतात. राणीसाहेब मेण्यांत बसून आल्या, त्या वेळी त्यांच्याबरोबर साहा परिचारिका पायी चालत होत्या. मेण्यावर लाल रंगाच्या मखमलीची भरजरी बुटेदार चादर पसरलेली होती. ती फार मूल्यवान् असून तिच्यासभोंवतीं मोत्यांचे गोंडे लोंबत होते. राणीसाहेबांच्या दासी व इतर स्त्रिया ह्यांनी अतिशय उंची वस्त्रे व बहुमूल्य अलंकार परिधान केल्यामुळे त्यांच्याकडे पाहून दृष्टि दिपून जात असे.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 64


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 64
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------9
लॉर्ड वुइल्यम बेंटिंक ह्यांनी राजकारणाच्या हेतूने ह्मणा, किंवा वस्तुस्थितीचे समक्ष ज्ञान करून घेण्याकरितां ह्मणा, ग्वाल्हेर येथे स्वतः येऊन, बायजाबाईसाहेब व जनकोजीराव ह्यांची भेट घेण्याचा निश्चय केला;व त्याप्रमाणे त्यांची स्वारी आपल्या पत्नीसहवर्तमान ग्वाल्हेर येथे ता. १८ डिसेंबर इ. स. १८३२ रोजी येऊन दाखल झाली. खुद्द गव्हरनर जनरलसाहेब ह्यांची स्वारी ग्वाल्हेर येथे येणार असे समजतांच बायजाबाईसाहेब ह्यांस फार संतोष झाला, व त्यांनी त्यांच्या स्वागताची उत्तम प्रकारची तयारी केली. बायजाबाईसाहेब ह्यांची व लॉर्ड उइल्यम, बेटिक ह्यांची जी भेट झाली, तिचे सुंदर वर्णन त्या वेळी हजर असलेल्या एका युरोपियन गृहस्थाने लिहिले आहे. तेच येथे सादर केले ह्मणजे ४. .. १० ११, १,१.१.१ १.२.३ १६L) । त्या प्रसंगाचा हुबेहूब देखावा नेत्रांपुढे येऊन, बायजाबाईसाहेबांचे ऐश्वर्य व संपत्ति ह्यांचीही कल्पना करितां येईल. हे वर्णन पुढे लिहिल्याप्रमाणे आहेः| ** बियाना, डिसेंबर २० इ. स. १८३२–गव्हरनर जनरलसाहेब ग्वाल्हरच्या महाराजांस परत भेट देण्यास गेले, त्या वेळी महाराणी बायजाबाई आणि महाराज जनकोजीराव शिंदे हे नामदारसाहेबांस भेटण्याकरितां धोलपुरापर्यंत आले होते. त्या वेळी त्यांचेबरोबर सर्व प्रकारचे सैन्य मिळून ३०,००० लोक होते. ह्या सैन्याचा तळ ग्वाल्हेरच्या सरहद्दीवर चंबळा नदीचे कांठीं पडला होता. आग्र्याच्या सरहद्दीवरील प्रांत, दोन किंवा तीन मैलपर्यंत, विपुल जलाने परिप्लुत झाल्यामुळे, आह्मांस त्या पलीकडे तळ देणे भाग पडले होते. मराठ्यांच्या लष्करापासून आमचा तळ लांब असल्यामुळे, व नामदार गव्हरनर जनरल ह्यांनी दुपारी तीन वाजतां कूच केल्यामुळे, मराठ्यांच्या लष्कराचा भव्य देखावा अवलोकन करण्यास मला संधि मिळाली नाहीं. ह्या समयीं मराठ्यांचे सैन्य नामदारसाहेबांच्या सन्मानार्थ लष्करी थाटाने जितकें सज्ज होते, तितकें क्वचितच दृष्टीस पडेल. ह्या लष्कराच्या तळापासून नदीच्या काठापर्यंत जाण्याचा जो रस्ता होता, तो फारच अरुंद होता. नदीच्या तीरावरील उच्चप्रदेशावर पायदळ पलटणींचे लोक हातामध्ये तरवारी व तोड्यांच्या बंदुकी घेऊन दोन मैलपर्यंत एकसारखे उभे राहिले होते. त्यांच्याकडून नदीच्या बाजूस खाली उतरत आले आणि थोडे वळले, ह्मणजे नीलवर्ण व स्वच्छ अशा चंबळा नदीच्या तीरावर, फारच सुंदर देखावा दृष्टीस पडत असे. तेथे १५ हजार सैन्याची दुतर्फा रांग लागलेली असून त्यांच्या पिच्छाडीस घोडेस्वारांच्या तरवारी चमकत होत्या. हे सर्व लोक नामदारसाहेबांस सलामी देण्याकरितां अगदीं तत्पर झाले होते. हा देखावा
९३ फारच भव्य व अदृष्टपूर्व असा होता. रीतीप्रमाणे गव्हरनर जनरलसाहेबांच्या दुरबारचा समारंभ झाला. महाराज जनकोजीराव हे शृंगारलेल्या हत्तीवर सोन्याच्या अंबारीत बसून गव्हरनर जनरलसाहेबांस अर्ध्या रस्त्यावर सामोरे आले होते. उभयतांची मुलाखत होतांच बंदुकीची फेर झडली. नंतर परस्परांचे मुजरे होऊन नामदारसाहेब आपल्या हत्तीवरून शिंदे सरकारच्या हत्तीवर आले. नंतर उभयतांच्या स्वाच्या दरबारच्या भव्य तंबूमध्ये दाखल झाल्या. हा तंबू ह्या प्रसंगाकरितां उत्तमप्रकारे शृंगारलेला होता.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 63


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 63
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------8
ग्वाल्हेरचे रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांनीं ग्वाल्हेर येथील दुरबारची स्थिति व बायजाबाईसाहेबांचा राज्यकारभार ह्यासंबंधीची माहिती सरकारास वेळोवेळी कळविलीच होती. त्यांना बायजाबाईच्या राज्यव्यवस्थेत बिलकुल उणीव वाटली नाहीं, व हिंदुस्थान सरकारासही त्यामध्ये 1. "From the period up to the present there has been little at Gwalior calling for the interference or notice of the British Government in the affairs of that principality. The Baeza Baee continues her administration without requiring our support, and the young Raja, if he has any adherents in the state, has so far failed to make any impression on her power. It may be supposed that as he advances in years and appoaches his man-hood, he must, if he has the ordinary ambition, and the proper feelings of a man, desire to exercise a portion of that power which sooner or later must be his own; that those of the chiefs of the state who are likely to worship the rising sun, as well as those who would prefer the Government of a man to that of a woman, will, at no very distant period, array themselves on his side ; and that the Government of the Regent will fall before their united force. The command of treasury and the resources of the state must, for a time give a preponderance to her party, and may enable her to prolong the struggle. In such a contest it will be very possible for the British Government to stand aloof and the more we allow the parties to have a fair-field and no favor, the more shall we secure a national and efficient Government for that country, and the less will it hereafter be necessary for us to interfere in its affairs.” ९१ हात घालण्याची अवश्यकता वाटली नाहीं. मेजर स्टुअर्ट ह्यांची हैदराबादच्या रेसिडेंटाच्या जागीं इ. स. १८३० सालीं नेमणूक झाली. त्यांचे जागीं मि० क्याव्हेंडिश हे ग्वाल्हेर दरबारचे नवे रेसिडेंट होऊन आले. ह्यांचेही बायजाबाईसाहेबांविषयीं -प्रथम मन कलुषित झालेले नव्हते. त्यांना ग्वाल्हेरची राज्यव्यवस्था पसंत असून त्यांनी बाईसाहेबांचे अनेक वेळा अभिनंदन केले. परंतु पुढे, महाराज जनकोजीराव हे जसजसे मोठे होऊ लागले, तसतसे त्यांच्या पक्षास अधिक प्राबल्य । येऊन हा कलह पेट घेत चालला. ह्याच वेळीं ब्रिटिश सरकाराने !! बायजाबाईसाहेब ह्यांस स्वतःचा शिक्का बंद करून महाराजांचा शिक्का चालविण्याचा आग्रह केला, व महाराजांचे सर्व प्रतिबंध कमी करून त्यांचे व ब्रिटिश रेसिडेंटाचे दळणवळण अधिक मोकळेपणाचें केलें. त्यामुळे महाराजांच्या पक्षांतील लोकांस चांगली फूस सांपडून, त्यांनी महाराज व त्यांच्या मातुश्री ह्यांच्या तंट्याचे स्वरूप अधिक उग्र व भयानक केले. त्यामुळे नवीन रेसिडेंट मि० क्याव्हडिश ह्यांस हैं। भांडण हिंदुस्थानचे गव्हरनर जनरल लॉर्ड उइल्यम बेंटिंक ह्यांच्यापुढे मांडणे भाग पडले.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 62


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 62
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------7
कर्नल सदरलंड नामक एका माहितगार युरोपियन गृहस्थाने त्यावेळच्या ग्वाल्हेरच्या स्थितीबद्दल जो लेख लिहिला आहे, त्यांत हे भविष्य ध्वनित केले आहेः-“बायजाबाईसाहेब ह्या आमच्या साहाय्याशिवाय राज्यकारभार चालवीत आहेत, आणि आतांपर्यंत, बालराजाने संस्थानांतील आपल्या अनुयायी मंडळीसह बायजाबाईच्या राज्यकर्तृत्वावर किंवा सामर्थ्यावर कांहीं छाप बसविली आहे, असे दिसत नाहीं. तथापि जसजसा तो वयाने मोठा होत जाईल व सज्ञान होईल, त्याप्रमाणे त्यास, जर साधारण महत्त्वाकांक्षा व मनुष्याचे उचित मनोविकार असतील, तर पुढेमागे जी सर्व राजसत्ता त्याचीच होणार, तिचा कांहीं भाग हाती घेण्याची इच्छा त्यास उत्पन्न झाल्यावांचून राहणार नाही. त्याचप्रमाणे, संस्थानच्या सरदार व मुत्सद्दी लोकांपैकी काहींना नेहमीं नवीन उदयास येणाच्या सूर्याप्रमाणे नूतन राजाची आवड अधिक असते, व कांहींना स्त्रीच्या राज्यकारभारापेक्षां पुरुषाचा राज्यकारभार अधिक पसंत वाटतो,असे सर्व लोक बालराजाचा पक्ष लवकरच स्वीकारतील. आणि असे झाले ह्मणजे त्यांच्या संयुक्त बळापुढे रीजंट राणीचे राज्य बिलकूल टिकणार नाहीं. खजिन्याचे आधिपत्य व संस्थानची इतर कित्येक साधने ह्यांच्या योगाने बायजाबाईच्या पक्षाची काही दिवस सरशी होईल व त्यांस प्रतिपक्षाशीं थोडा वेळ टिकाव धरता येईल. अशा वादामध्ये ब्रिटिश सरकार में अगदी अलिप्त राहील हेच विशेष संभवनीय आहे. आह्मी कोणावरही मेहेरबानी न करितां, उभय पक्षांस जितकें ज्यास्त स्वातंत्र्य देऊं, तितकें त्या संस्थानचे हित होऊन, त्याची राज्यव्यवस्था अधिक राष्ट्रीय व अधिक कार्यसाधक होईल. व तेणेकरून आह्मांस त्या संस्थानच्या राजकारणात हात घालण्याची अवश्यकता तितकी कमी कमी वाटत९० जाईल. परंतु कर्नल सदरलंड ह्यांच्या अनुमानाप्रमाणे ब्रिटिश सरकारच्या तटस्थपणाचा परिणाम ग्वाल्हेर संस्थानास हितावह न होता, उलट अनर्थावह मात्र झाला, असे मिलप्रभृति इतिहासकारांचे मत आहे. अस्तु. |

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 61


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 61
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------6
मेजर स्टुअर्ट ह्यांची इ. स. १८३० सालीं ग्वाल्हेरीहून बदली झाली. त्या वेळी त्यांनीं ग्वाल्हेर सोडण्यापूर्वी पुनः महाराजांची भेट घेतली व त्यांची कशी काय स्थिति आहे हे विचारिलें. त्या वेळी त्यांनी स्पष्ट सांगितले की, १५ मी पूर्ण सुखी आहे. ह्या प्रसंगी मेजर स्टुअर्ट ह्यांनी महाराजांस चांगला उपदेश केला, व संस्थानचे राजकीय कामकाज चालले असतांना बाईसाहेबांजवळ हजर राहणे किती हितावह आहे, तेही सांगितले. त्या वेळीं महाराजांनीं, “माझी तबियत बरी असते, तेव्हां बाईसाहेबांजवळ मी हजर असतों.” असे उत्तर दिले. ह्या सर्व संभाषणाचा सारांश मेजर स्टुअर्ट ह्यांनी शेवटी एका वाक्यांत असा काढिला आहे कीं, ६ एकंदरींत महाराजांनीं मजवर यत्किंचितही विश्वास न दाखवितां, किंवा आपली दुःखें मला न कळवितां, माझ्या . (८ आपण होऊन केलेल्या मदतीचा स्वीकार न करून तिच्याकडे दुर्लक्ष्य केलें; व आपला उर्मटपणा व बेपरवाई स्पष्ट रीतीने व्यक्त केली. मेजर स्टुअर्ट ह्यांच्यासारख्या ग्वाल्हेर संस्थानाच्या ख-या हितचिंतक व निःपक्षपाती रेसिडेंटाने अल्पवयी महाराजांविषयी आपला जो अभिप्राय व्यक्त केला आहे, त्यावरून महाराजांचे खरे वर्तन कशा प्रकारचे होते, ह्याविषयीं नीट कल्पना करितां येते. अर्थात् अशा अज्ञान व विचारशून्य बालराजाच्या हातीं संस्थानच्या राज्यकारभाराची सुत्रे देणे ही गोष्ट, बायजाबाईसाहेबांसारख्या शहाण्या व राजकारणी बायकोस अप्रशस्त व अनर्थावह वाटावी, हे अगदीं साहजिक आहे. त्यामुळे अशा बालराजास त्यांनी स्वातंत्र्य दिले नाही, किंवा राज्याधि कार दिला नाहीं, ह्याबद्दल त्यांना दोष देणे रास्त नाहीं. परंतु खरा १,५, इतिहास व खरी वस्तुस्थिति माहीत नसल्यामुळे कांहीं इतिहासकारांचा हा गैरसमज झालेला आहे. असो. | मेजर स्टुअर्ट ह्यांनी हा सर्व प्रकार वरिष्ठ सरकारास कळविला. परंतु, बायजाबाईसाहेब ह्या राज्यकारभार चालविण्यास खंबीर असल्यामुळे व त्या वेळीं एतद्देशीय संस्थानांतील अंतर्व्यवस्थेत हात घालण्याचा वरिष्ठ सरकारचा हेतु(Policy) नसल्यामुळे, हा कलहाग्नि कांहीं कालपर्यंत तसाच धुमसत राहिला. संस्थानांतील कलहप्रिय व स्वार्थसाधु सरदारांचे व लष्करी अधिका-यांचे त्यास जोपर्यंत साहाय्यरूपी तेल मिळाले नाहीं, व वरिष्ठ सरकारच्या अनुकूलतेचा वारा त्यास लागला नाहीं, तोपर्यंत त्याच्या ज्वालांनी पेट घेतली नाही. परंतु पुढे दोन्ही गोष्टी प्राप्त होताच, त्याच्या ज्वाला प्रदीप्त होणार व त्यांत कोणाची तरी 1. Major Stewart's despatches quoted in Sutherland's Sketches. Page 101. आहुति पडणार, हे भविष्य ठरल्यासारखेच झाले.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 60

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 60
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------5

इ. स. १८३० सालीं-ह्मणजे महाराजांच्या १५ व्या वर्षी-मेजर स्टुअर्ट ह्यांची व महाराजांची जी मुलाखत झाली, तिचे वर्णन त्यांनी आपल्या खलित्यामध्ये येणेप्रमाणे केले आहेःमहाराजांस ज्या वेळी मी विचारिलें कीं, “तुमची कशी काय हालहवाल आहे ?” त्या वेळी त्यांनी उत्तर दिले की, “मी सुखी आहे; परंतु सर्व राज्याधिकार बाईसाहेबांच्या हातीं आहे. मी त्यांस उत्तर दिलें की, “बरोबर आहे. तुमचे अद्यापि अल्पवय असल्यामुळे तुह्मीं राज्याधिकार आपल्या हाती घेण्याची इच्छा करणे प्रशस्त नाहीं. तुह्मीं कोणाच्या तरी तंत्राने वागले पाहिजे. ह्या कामी तुमच्यावर देखरेख करण्यास बाईसाहेब ह्याच फार योग्य आहेत. तुह्मांस बाईसाहेब ज्या रीतीने वागवितात, त्यांत कांहीं तुह्मांस तक्रार करण्यासारखे असेल, तर मला सांगा. मी त्याचा योग्य बंदोबस्त करीन.' परंतु महाराजांनी ह्या प्रश्नाचे उत्तर माझे बरें आहे, मला कांहीं सांगण्यासारखे नाहीं.” अशा प्रकारचे उडवाउडवीचे दिले. मग मी त्यांस विचारिलें कीं, “तुमचे जर सर्व कांहीं ठीक आहे, व तुह्मांस बाईसाहेबांच्या विरुद्ध तक्रार करण्यास जागा नाहीं, तर तुह्मी नौकरचाकरांवर प्रसंगविशेषीं तरवारी उपसता, व लग्नाच्या वेळी तर तुह्मीं त्यांच्यावर बाण सोडले, अशा प्रकारचे चमत्कारिक वर्तन का केले ? त्यामुळे लग्नप्रसंगी एक मनुष्य ठार मेला, हे तुह्मांस माहीत नाहीं काय ??? (लग्नाच्या वळीं महाराजांनी बाण सोडल्यामुळे धारच्या पवारांचा एक नौकर जखमी होऊन मृत्यु पावला.) ह्या प्रश्नास महाराजांनी अतिशय बेपरवाईने उत्तर दिले की, **भगवानाने जसे केले तसे झाले ! त्यावर मी त्यास असे सांगितले८७ कीं, “महाराज, भगवानाने तुह्मांस तुमच्या निकृष्ट स्थितींतून एवढ्या ऐश्वर्यपदावर आणून ठेविले, हे तुमच्यावर मोठे उपकार केले आहेत. ते दुसन्यास अपकार करण्याकरितां नव्हेत ! तुह्मी जर अशा रीतीने वागू लागला, तर तुमच्याविषयी सर्व लोकांचे मत फार वाईट होईल व तुह्मांस कोणी चांगले ह्मणणार नाहीं. ह्यावर त्यांनी उत्तर दिलें कीं, “मीं आतां ते सर्व सोडून दिले आहे !?? अर्थात् तशा प्रकारचे सर्व वर्तन महाराजांनीं सोडून दिले, असा महाराजांच्या शब्दाचा अर्थ माझ्या मनांत येऊन, मी त्यांस ह्मटले की, “ही फार आनंदाची गोष्ट आहे. परंतु महाराजांनी माझा हा चुकीचा समज फार वेळ राहू दिला नाहीं ! त्यांनी लगेच स्पष्ट करून सांगितले की, “तुह्मी समजला तसा माझ्या शब्दांचा अर्थ नाहीं. माझा अर्थ असा की, मीं लोकमताकडे लक्ष्य देण्याचे मुळींच सोडून दिले आहे. मला कोणाचीच जरूर नाहीं !” । | हा मेजर स्टुअर्ट ह्यांच्या खलिता वाचून महाराज जनकोजीराव ह्यांचे वर्तन कोणाही सुज्ञ मनुष्यास चांगले वाटणार नाहीं

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 59

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 59
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------4
इ. स. १८२९ च्या जानेवारी महिन्यांत हिंदुस्थानचे मुख्य सेनाधिपति लॉर्ड कोंबरमियर हे ग्वाल्हेर येथील सैन्याची पहाणी करण्याकरितां आले होते. त्या वेळी त्यांची व महाराज जनकोजीराव ह्यांची मुलाखत होऊन, महाराज जनकोजीराव ह्यांच्यासंबंधाने त्यांचा जो ग्रह झाला, तो त्यांचे एडीका ( परिचारक ) मेजर आर्चर ह्यांनी आपल्या प्रवासवृत्तांत नोंदून ठेविला आहे. त्यांत त्यांनी असे लिहिले आहे की, “राजेसाहेब हे अगदी बालवयी ह्मणजे अवघे १४ वर्षाचे(५ आहेत. त्यांचा चेहरा गोड असून फार सौम्य आहे. त्यांचा वर्ण गोरा असून ते दिसण्यांत सुरेख आहेत. परंतु ते अगदीं जड, जिज्ञासाशून्य, आणि जवळ चाललेल्या गोष्टींविषयी मन्दोत्साह असे दिसतात. तथापि, कमांडर-इन-चीफ ह्यांच्यासारख्या बड्या गृहस्थांच्या प्रथम भेटीने ते घाबरले नाहीत. त्यांनी आमच्या समक्ष विडा खाल्ला. अशा रीतीने विडा खाणे. त्यांची दरबारी मंडळी व एकंदरीत सर्व पूर्वेकडील लोक असभ्यपणा मानीत नाहींत. ह्या लेखावरून त्यांच्याविषयी चांगले मत होत नाहीं । | महाराज जनकोजीराव ह्यांचे वर्तन दिवसेंदिवस फार शिरजोर-a-.. पणाचे व जुलमाचे होऊ लागले; व त्यांच्या हातून फार अनुचित कृत्यें। घडू लागली. इ. स. १८३० मध्ये बायजाबाईसाहेबांची नात जी , जनकोजीरावांस दिली होती, ती मृत्यु पावली. तेव्हां जनकोजीराव ह्यांनी दुसरे लग्न केले. त्या लग्नामध्ये त्यांनी आपल्या अविचाराची कमाल करून सोडिली. त्यांनी जवळच्या लोकांच्या अंगावर बाण उडविले. त्यायोगाने एक मनुष्य जखमी होऊन मृत्यु पावला. त्यामुळे बायजाबाईसाहेबांस त्यांच्यावर सक्त नजर ठेवून त्यांचा वारंवार निषेध करणे भाग पडले. परंतु ती गोष्ट त्यांस न रुचून, त्यांनीं रेसिडेंट साहेबांकडे वारंवार तक्रारी नेण्यास प्रारंभ केला. त्यामुळे बाईसाहेबांचे मन त्यां | 1. “The Rajah is quite a lad, about fourteen years of age, of a very pleasing and mild expression of countenance; he is fair and good-looking; but appears dull, inapprehensive, and but little interested in what goes on around him ; he was not. however, embarrassed, though it was his first appearance before a stranger of the Commander-in-chief's rank. In common with his court, and all Orientals, who consider it no want of politeness, he chewed betel while we were present.” -Tota's 72 Upper Indig. Page 41-42, ८६ च्याविषयी अतिशय कलुषित झाले. ह्या वेळी ग्वाल्हेर दरबारचे रेसिडेंट मेजर स्टुअर्ट हे फार भले व थोर गृहस्थ होते. त्यांनी महाराजांची चांगली कानउघाडणी करून, त्यांस ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फलद्रूप झाला नाहीं.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 58


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 58
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------3
ग्वाल्हेरच्या दुस-या एका -.. इतिहासकारांनी असे लिहिले आहे की, “बिनतोडीचे वेळीं बायजाबाईनं जनकोजी शिंद्यांस दत्तक घेतलें, आणि दौलतरावाने सांगितल्याप्रमाणे / आपण जन्मभर राज्य चालवीन असा मनांत निश्चय करून, दत्तक घेतलेल्या मुलास आपल्याजवळ शिक्षणांत ठेविलें. हा मुलगा तारुण्यावस्थेत येतांच, आपल्यास वैभवास आणणारीचे विचारे न वागतां, कांहीं । कुमार्गी व आपस्वार्थी लोकांची संगत धरून, त्या बाईच्या शिक्षणांतून मुक्त होण्याची इच्छा करू लागला. त्या जनकोजी शिंद्यास अनुपकारीपणाचे मार्गास लावणारे व कांहीं नवेंजुने होऊ इच्छिणारे लोकांनी त्याचा पक्ष धरिला. इंग्रज लोकही, याच संधीस, नवा राजा गादीवर | बसला त्याचे नांवचा हरएक सरकारी कागदावर शिक्का झाल्याखेरीज तो कागद कोणत्याही प्रकारे ते दस्तऐवजांत खरा मानीनातसे झाले. तेव्हां । जनकोजी शिंद्याचे पक्षास अधिक बळकटी आली, व बायजाबाईपासून त्याला दूर करण्याचा त्यांणीं विशेष प्रयत्न मांडिला. हीच वास्तविक खरी ? गोष्ट असावी असे मानण्यास हरकत नाहीं.
जनकोजीराव ह्यांस बायजाबाईसाहेबांनी दत्तक घेऊन त्यांस आपला नातजावई केले, व ग्वाल्हेर संस्थानच्या राजपदाचे धनी केले; ही।---१४ 21-22 2017 ८/०८-०.८' गोष्ट लक्ष्यात घेतली ह्मणजे जनकोजीराव ह्यांनी आपल्या वैभवसंपन्न व राज्यव्यवहारचतुर मातुश्रीच्या आज्ञेत चालणे हे त्यांचे कर्तव्य होते असेच ह्मणावे लागते. परंतु त्यांनी ह्या कर्तव्यास पराङ्मुख होऊन लहानपणापासून मूर्ख व हलकट लोकांच्या नादी लागून कुमार्ग स्वीकारला. त्यामुळे दिवसेंदिवस बायजाबाईसाहेबांच्या मनांत त्यांचे विषयीं तिरस्कार व अप्रेमबुद्धि उत्पन्न होऊ लागली. महाराज जनकोजीराव ह्यांस दत्तक घेतल्यानंतर कित्येक दिवसपर्यंत, बायजाबाईसाहेब त्यांच्याशी प्रेमभावाने वागत असून त्यांचे लडिवाळपणाने कौतुक करीत. परंतु जेव्हां महाराजांनीं दुष्ट लोकांच्या नादी लागून, त्यांच्या शिकवणीने, स्वतंत्रपणाने वागण्याचा व शिरजोर वर्तन करण्याचा क्रम आरंभिला, त्या वेळेपासून त्यांनी त्यांस आपल्या ताब्यांत ठेवण्याचा प्रयत्न केला. ग्वाल्हेर दरबारचे माहितगार व जुने रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांच्याही कानांवर ह्या अप्रिय गोष्टी अनेक वेळां गेल्या, व त्यांनीही त्यांबद्दल वेळोवेळीं मध्यस्थी करून, उभयतांचा सलोखा करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांत त्यांस यश आलें नाहीं. महाराज जनकोजीराव ह्यांच्याबद्दल ग्वाल्हेरचे रेसिडेंट व दुसरे युरोपियन लोक ह्यांनी जे लेख लिहिले आहेत, त्यांवरून त्यांच्याविषयीं व त्यांच्या वर्तनाविषयीं अनुकूल ग्रह होत नाहीं.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 57


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 57
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------2
बायजाबाईसाहेब ह्यांनी महाराज जनकोजीराव ह्यांस फार वाईट रीतीने वागविले, असा त्यांच्यावर कित्येक इतिहासकारांचा आरोप आहे. परंतु तो वास्तविक खरा नसून, त्यांत अतिशयोक्ति फार आहे. सुरेंद्रनाथ राय नामक ग्वाल्हेरच्या एका इतिहासकारांनीं, इंग्रजी ग्रंथकारांचा अनुवाद करून, बायजाबाईसाहेब व जनकोजीराव ह्यांच्या कलहासंबंधाने लिहितांना असे ह्मटले आहे की, “बाईनीं आपल्या अज्ञान मुलास कोणत्याही प्रकारचे शिक्षण न देऊन संस्थानच्या राजकारणांविषयीं त्यास सर्वथा अज्ञानांधकारांत ठेविलें. त्यांनी संस्थानचीं भावी राज्यसूत्रे चालविण्यास तो अगदी अपात्र व्हावा असा यत्न केला; व त्यास अयोग्य रीतीने प्रतिबंधांत ठेविले. त्याच्या मनाची वाढ खुटावी, स्वावलंबनाचा स्वाभाविक अंकुर त्याच्यामध्ये मुळांतच तुटला जावा, त्यास जगाचे अल्पही ज्ञान मिळू नये, त्याने नेहमीं दास्यवृत्तीमध्ये राहून राज्यकारभार हाती घेण्यास धजू नये, आणि त्याच्या मनांत आपणांविषयीं पोकळदरारा व अमर्याद भीति राहावी, असा बाईनीं वर्तनक्रम ठेविला. 1. The Bai kept her Ward devoid of all education, and in profound ignorance of state affairs. She did her best to make him utterly unfit to conduct the future Government of the country, and subjected him to galling restraints. Her policy was to dwarf the growth of his mind, to nip in the bud the native spirit of self-reliance, to keep him in utter ignorance of the world, and to fill his mind with a sort of vague and indefinite fon." for her, that in future he might not shake off her: thraldom, and take the Government in his own hands &c." -Gualdo by Rog). Page 333. (३ परंतु खरा प्रकार असा नव्हता. महाराणी बायजाबाईसाहेब ह्या स्वभावतः फार तेजस्वी व तीव्र होत्या, व त्यांना ग्वाल्हेरचा राज्यकारभार स्वतःच्या हातीं ठेवण्याची मनुष्यस्वभावानुरूप इच्छा होती, ह्या दोन्ही गोष्टी जरी मान्य केल्या, तरी जनकोजीराव ह्यांस त्यांनी अतिशय वाईट रीतीने वागविलें व कलहाचे बीजारोपण केले, असेच केवळ ह्मणुतां येत नाहीं. हा कलह उत्पन्न होण्यास ग्वाल्हेर दुरबारचे कुटिल लोक व त्यांच्या दुष्ट मसलती, आणि जनकोजीरावांची अल्प बुद्धि व उच्छंखल वृत्ति हीच कारणीभूत झाली असावीत

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 56


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 56
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------1
संस्थानामध्ये कलह उत्पन्न होण्यास विशेषेकरून राजाचे दुर्गुण व कुसंगति हीं बहुधा कारण असतात. मग त्यांत कित्येक स्वार्थसाधु व कपटपटु लोकांच्या नीच कृतींची भर पडून, त्या कलहाम्रीच्या ज्वाळा अतिशय जोराने पेट घेतात; आणि लवकरच संस्थानाची राखरांगोळी करितात. महाराज जनकोजीराव व बायजाबाईसाहेब ह्यांच्यामध्ये जो विग्रह उत्पन्न झाला, त्याचे कारण महाराजांची अल्पबुद्धि व दुर्जनसंगति हींच होत. महाराजांचे दत्तविधान होऊन त्यांस इ.स.१८२७ सालीं गादीवर बसविले, त्या वेळी त्यांचे वय अवघे ११ वर्षांचे होते. अर्थात् इतक्या अल्पवयी मुलाच्या हाती अधिकार देणे अगदीं अयोग्य व शास्त्रदृष्टया देखील अग्रयोजक होते, हे कोणीही सुज्ञ मनुष्य कबूल करील. बायजाबाईसाहेब ह्यांनी महाराज अल्पवयी असल्यामुळे रीतीप्रमाणे संस्थानाचा राज्यकारभार आपण स्वतः उत्तम प्रकारे चालविला, व महाराज वयांत येईपर्यंत तो तसाच चालवावा अशी त्यांची इच्छा असणे साहजिक आहे. परंतु महाराज गादीवर बसून दोन तीन वर्षे झाली नाहीत, तोंच दरबारच्या स्वार्थसाधु मंडळीच्या चिथावणीने ह्मणा, किंवा अन्य कांहीं कारणांमुळे ह्मणा, महाराज जनकोजीराव ह्यांचे वर्तन बायजाबाईसाहेबांस असह्य व अपमानकारक वाटू लागले, व त्यांनी८२ महाराजांवर सक्त नजर ठेवण्यास सुरवात केली. अर्थात् बायजाबाईसाहेब ह्यांनी महाराजांस मन मानेल तसे वागू न दिल्यामुळे, हे प्रकरण जास्तच विकोपास गेले; व पुढे नामदार गव्हरनर जनरल लॉर्ड उइल्यम बेंटिंक ह्यांस इकडे लक्ष्य पोहोंचविणे भाग पडले.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 55


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 55
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------21
“मुंबई ग्याझेट' पत्रकारांनी इ.स. १८३३ सालीं ग्वाल्हेर येथील राज्यक्रांतीबद्दल लिहितांना असे झटले आहे की, “महा राज शिंदे ह्यांनी आपल्या पश्चात् आपल्या बायकोने आमरण राज्यकारभार • चालवावा अशी इच्छा आपल्या मृत्युसमयीं प्रदर्शित केली होती, व ती सिद्धीस नेणें ब्रिटिश सरकारास एकप्रकारे अगत्याचे होते. त्याप्रमाणे बायजाबाईनी आजपर्यंत राज्यकारभार उत्तम रीतीने चालवून, आपल्या यजमानांचा भरंवसा किती यथायोग्य होता हे सिद्ध करून दाखविले. त्यांनी आपल्या शांत व सुखकर कारकीर्दीमध्ये देशाची अंतर्मुधारणा करण्यांत व प्रजेच्या सुखाची अभिवृद्धि करण्यांत अतिशय परिश्रम घेतले....... ...ह्या महाराणी आपल्या प्रजेला सौम्य व सद्यवृत्ति वाटत. त्यांचा कल, वयाच्या मानाने व जात्या, शांतता राखण्याकडे असे, आणि कृतज्ञता व स्वहित ह्या दोन्ही दृष्टीनीं त्या इंग्रजसरकाराशीं सलोखा राखीत. ह्याप्रमाणे बायजाबाईसाहेबांच्या राज्यकारभाराविषयी त्या 9. “It was the dying wish of the Scindiah, to the fulfilment of which the British Government was in a manner pledged, that his widow should continue regent till her death; and the manner in which she has hitherto performed the duties of that office is such as must justify the confidence reposed in her by that prince. During a long and peaceful reign, she has directed her energies to the internal improvement of her country and the happiness of her subjects. ......In the Ranee Regent they had a mild and friendly princess, attached to peace alike from inclination and age, and bound to the British from gratitude and interest... बेळचे लोकमत अनुकूल असल्याचे दिसून येते, व त्यावरून ही राजस्त्री सामान्य प्रतीची नसून, राज्यकार्यकुशल व शहाणी होती असे निःसंशय सिद्ध होते. ख-या इतिहासाच्या अभावी ह्या स्त्रीच्या महंत्त्वाच्या राजकारणांचा वृत्तांत किंवा बुद्धिचातुर्याच्या गोष्टी आह्मांस येथे सादर करितां येत नाहींत. तथापि, ह्या स्त्रीने आपल्या लोकोत्तर गुणांनी आपले नांव कीर्तिमंदिरांत प्रविष्ट केले आहे ह्यांत शंका नाहीं. हिंदुस्थानच्या इतिहासांत रोझयाबेगम, चांदबिबी, ताराबाई, अहल्याबाई हीं स्त्रीरत्ने ज्याप्रमाणे चमकत आहेत, त्याचप्रमाणे बायजाबाई शिंदे | ह्यांचेही नांव अखंड चमकत राहील.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 54

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 54
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------20


ग्वाल्हेरच्या एका एतद्देशीय इतिहासकाराने, “बायजाबाई राज्यकारभारांत बहुत दक्ष व शहाणी असे, व दरबारी लोकांवर हिचा दरारा || Raoji Trimbak, the Karbhari of the Gwalior Court, died on 26th January A. D. 1833. His loss as a zealous and able minister will not, it is feared, be easily replaced.” -Astotic Joannot 1833. ७८ विशेष असे असे वर्णन केले आहे; एवढेच नव्हे, तर खुद्द ग्वाल्हेर येथील रेसिडेंट व इतर युरोपियन लोक ह्यांनीही त्यांच्या राज्यकारभाराची प्रशंसा केली आहे. ता. १ जुलई इ. स. १८३२ ह्या तारखेच्या “इंडिया ग्याझेट' पत्रामध्ये रीजंट बाई (बायजाबाईसाहेब ) ह्या संस्थानचा राज्यकारभार फार नियमितपणाने चालवीत आहेत. एवढेच नव्हे, तर कै० महाराज दौलतराव ह्यांच्या कारकीर्दीपेक्षाही तो अधिक चांगल्या रीतीने चालला आहे'असा स्तुतिपर लेख प्रसिद्ध झालेला दृष्टीस पडतो.
‘ब्रिटिश हिंदुस्थानच्या इतिहासाचे कर्ते मिल्लसाहेब ह्यांनी बायजाबाईविषयी असे मत दिले आहे की, “ती फार तेजस्वी व सत्वशील बायको असून, तिचे वर्तन सभ्य प्रकारचे होते. तिच्या अंगांत राज्यकर्तृत्व कमी होते असे नाहीं. तथापि तिच्याकडून आप्तस्वकीयांसंबंधानें अयोग्य पक्षपात क्वचित् घडून येई; आणि लोभाच्या भरात ती संस्थानाच्या कारखान्यांचे नुकसान करून खाजगी द्रव्यसंचय करण्यास उत्सुक असे. ती स्वभावाने कडक होती, तथापि क्रूर किंवा खुनशी नव्हती. तिच्या कारकीर्दीमध्ये ग्वाल्हेरचा राज्यकारभार, इतर कोणत्याही संस्थानाच्या बरोबरीने असा, चांगल्या रीतीने चालला होता. मिल्लसाहेबांनी बायजाबाईसाहेबांचे गुण व दोष दोन्ही व्यक्त केले १ रा.
फडकेकृत शिंद्यांचा इतिहास. 2. • The Regent Baee conducts the affairs of this state with great regularity, much better, I understand, than what was done in the time of the late Maharaja.” —Indicg Gazette, 1st July 1832. ३. She was a woman of high spirit, and respectable con. duct, not destitute of ability to govern, but disposed to the injudicious partiality to her own kin, and greedy in accumulating private wealth at the expense of public establishments. She was violent in temper, but not cruel or vindictive and during her administration the affairs of Gwalior were conducted with as much efficiency as those of any other native principality.” --M's Ildstor?). Page 292. ४. 5७९ आहेत. तथापि त्यांच्या तेजस्वितेविषयीं व राज्यकर्तृत्वाविषयी त्यांचा मतभेद नाहीं. स्वकीयांविषयीं पक्षपातबुद्धि किंवा द्रव्यसंग्रहाची इच्छा ह्या दोन गोष्टी बायजाबाईसारख्या स्त्रीच्या ठिकाणी असल्यास नवल नाहीं; परंतु राज्यकारभार चालविण्याचे ज्ञान असणे हीच विशेष महत्त्वाची गोष्ट होय.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 53

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 53
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------19
रावजी त्रिंबक हे प्रामाणिक व शहाणे १. रावजी त्रिंबक ह्यांनी ही मक्त्याच्या मामलतीची चाल बंद करून वसुलाची सुधारणा केली, अशावद्दलचा उल्लेख त्यावेळच्या “Mofussil Ukhbar” नामक पत्रांत प्रसिद्ध झालेला आहे:-
  • * * * Raoji Trimbalk, the minister, has, during the last two years, endeavoured to do away with the system of farmin the land revenue; and though the immediate loss from the inefficiency or misconduct of the aumils would seem to have been considerable, yet as the system of amani management, under common superintendence, contains within itself the seeds of certain improvement to the country, we may, if it be preserved in, yet expect to see even the most distant districts assume a more flourishing aspect. It is a fine country, and under proper fiscal management, might be expected to yield a revenue of a million and a half of money.?”
मुत्सद्दी असून, त्यांनीं ग्वाल्हेरच्या राज्यकारभारांत बायजाबाईसाहेबांस उत्कृष्ट मदत केली होती. त्यांचे मृत्युवृत्त विलायतेतील एशियाटिक जर्नल' मध्ये छापले असून, त्यांत रावजी त्रिंबक ह्यांच्या मृत्यूनें ग्वाल्हेर दुरबारांतील एका कर्तव्यदक्ष आणि राजकारणपटु प्रधानाची जागा रिकामी झाली, व ती पुनः सहज रीतीने भरून येणे कठीण आहे असे ह्मटले होते. ह्यावरून रावजी त्रिंबक ह्यांची योग्यता व्यक्त होते.
रावजी त्रिंबक हे मोठे स्वधर्मनिष्ठ व दानशूर गृहस्थ होते. ह्यांनी काशी वगैरे ठिकाणीं घाट व देवालये बांधली आहेत. । | रावजी त्रिंबक मृत्यु पावल्यानंतर कांहीं दिवस, बायजाबाईनी कोणासही दिवाण न नेमिता, आपण स्वतः राज्यकारभार चालविला. परंतु पुढे त्यांनी सखो शामजी व दादा खासगीवाले ह्या उभयतांस राज्यकारभार पाहण्यास सांगितले. परंतु थोड्याच दिवसांत जनकोजी शिंदे ह्यांचा व त्यांचा उघडपणे बेबनाव होऊन, दरबारी लोकांत दुफळी झाली; व जनकोजीरावांचा पक्ष प्रबल होऊन बायजाबाईसाहेब ह्यांस ग्वाल्हेरचीं राज्यसूत्रे सोडून देणे भाग पडले. ह्या राज्यक्रांतीची हकीकत पुढील स्वतंत्र भागांत सादर केली आहे. rv बायजाबाईसाहेब ह्यांच्या राज्यकारभाराची विस्तृत माहिती उपलब्ध22.4. 2.-.-2 नसल्यामुळे आह्मांस ती सादर करितां येत नाहीं. तथापि त्यांच्या अंगीं । १.८ राज्यसूत्रे चालविण्याची चांगली शक्ति होती, हे निर्विवाद सिद्ध आहे.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 52


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 52
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------18
सर जॉन मालकम ह्यांनी७५ इ. स. १८१८ सालीं पेंढाण्यांचे पुढारी पकडून त्यांचे बंड मोडून टाकिलें होते; परंतु त्यांचा अवशेष राहिलेला भाग ग्वाल्हेर संस्थानच्या सरह- .. । दीवर लपून छपून अद्यापि हल्ले करीत असे व संस्थानच्या प्रजेस फार ८. त्रास देत असे. त्याचप्रमाणे, नीचतम व कपटपटु ठग लोक हे आपल्या अधमपणाच्या घातकी व निर्दय कृतींनीं प्रजेस अत्यंत पीडा देत : असत. ह्या सर्वांचा शोध लावून व पाठलाग करून त्यांचे पारिपत्य करणे ' . फार आवश्यक होते. त्या कामीं ब्रिटिश राज्यांतील कर्नल स्लीमन, ३ कर्नल म्याक्लौड वगैरे मोठमोठे अधिकारी, सर्व संस्थानांतील पोलिटिकल एजंटांचे साहाय्य घेऊन, एकसारखे झटत होते. बायजाबाईसाहेबांनी त्यांस उत्तम प्रकारची मदत करून, स्वतंत्र रीतीने व त्यांच्या साहाय्याने, ह्या दुष्ट लोकांचा नाश करण्याचा प्रयत्न केला. ठग लोकांस . ग्वाल्हेर संस्थानचे नौकर लोक देखील पुष्कळ अनुकूल होते; परंतु बायजाबाईसाहेबांनी आपले सरसुभे नारायणराव ह्यांस सक्त ताकीद - करून, कर्नल म्याक्लौड ह्यांस चांगली मदत देवविली; व स्वतःच्या राज्यांतील ठगांचा मागमूस काढवून त्यांस कडक शिक्षा दिल्या. | १ ठग लोकांचे बंड मोडण्याचे कामीं वायजाबाईसाहेब ह्यांनी मदत केली
अशा-- बद्दल कर्नल हवे ह्यांच्या इ.स.१८६६ सालच्या रिपोर्टीत पुढील उल्लेख सांपडतोः ८६ In 1833, when Mr, F. D. Macleod, Assistant (Cerieral Superintendent, had visited Gwalior, he reported to the Agent to the Governor-General, that during his entire stay in that territory he experienced the greatest attention, and that great willingness to co-operate with the measures of the British Government was displayed by Her Highness the Baiza Bai and by her Suba, Narayan Rao, who was the. principal organ of communication with him ; also that he had no occasion to apply for assistance which was not promptly afforded. ... ... ... ... Gwalior Durbat may be con- १ idered to have lent its co-operation in our measures from the 2 period of Mr. Macleod's visit to Gwalior, viz. 1833. The Sovereign Princes and Chiefs of Central India. Vol. I. ७६ ह्याचप्रमाणे बायजाबाईसाहेबांनीं ग्वाल्हेर संस्थानांत मक्त्याच्या मामलतीची जी चाल होती, ती बंद करण्याबद्दल प्रयत्न केला. मक्त्याच्या मामलतीच्या योगाने, अंमलदार लोक, सरकारची व आपली तुंबडी भरण्याकरितां, प्रजेकडून जुलमानें वाटेल तसे द्रव्य काढितात. त्यामुळे प्रजा अगदीं जिकीरीस येऊन त्राणरहित होते. ह्या कारणास्तव तादृश फायद्याकडे लक्ष्य न देता, प्रजेच्या हिताकडे लक्ष्य देऊन, ही चाल मोडून टाकण्याचा स्तुत्य प्रयत्न दिवाण रावजी त्रिंबक ह्यांनी सुरू केला. व त्याप्रमाणे त्यांनी दोन वर्षे अंमलवजावणी केली. त्या योगाने लवकरच ग्वाल्हेर संस्थानची प्रजा सुखी होऊन वसुलाची स्थिति सुधारेल, अशी आशा उत्पन्न झाली. परंतु दुर्दैवाने रावजी त्रिंबक हेच ता. २६ जानेवारी इ. स. १८३३ रोजी मृत्यु पावले. त्यामुळे बायजाबाईसाहेबांचा उजवा हात मोडल्यासारखे होऊन त्यांस फार दुःख झाले.

Tuesday 10 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 51


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 51
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------17
रावजी त्रिंबक ह्यांचा नामनिर्देश सर जॉन मालकम ह्यांच्या इतिहासांत आला असून, हे गृहस्थ ग्वाल्हेर दरबारांत पुढे फार प्रसिद्धीस७४ आले. ह्यांच्या मदतीने बायजाबाईसाहेबांनी राज्यांत अनेक सुधारणा - केल्या व प्रजेस फार सुख दिले. बाईसाहेबांच्या कारकीर्दीचे अस्सल कागदपत्र अद्यापि उपलब्ध झाले नसल्यामुळे त्यांच्या राज्यकारभा राची सविस्तर हकीकत देता येत नाहीं. तथापि जी त्रोटक माहिती १) मिळाली आहे, तेवढ्यावरून बायजाबाईसाहेबांच्या कारकीर्दीत ग्वाल्हेर संस्थानांत ज्या सुधारणा झाल्या, त्यांचा संक्षिप्त उल्लेख करण्यास हरकत नाहीं. | बायजाबाईसाहेबांच्या कारकीर्दीत देशामध्ये बरीच शांतता झाली. त्या वेळची देशस्थिति सांप्रतच्या देशस्थितीहून फार भिन्न होती. त्या वेळी प्रत्यक्ष रणभूमीवर अनेक पराक्रम गाजविलेलें व युद्धाकरिता आणि लुटीकरितां सदैव उत्सुक असलेले सैन्य फार होते. त्यास आपल्या ताब्यात ठेवून त्याच्याकडून प्रांताचा बंदोबस्त करविणे व परचक्रापासून आणि चोरलुटारूंपासून प्रजेचे रक्षण करणे ही दोन्हीं कामें युक्तीने करावयास पाहिजे होती. ती बाईसाहेबांनीं, जनकोजीराव ह्यांचा विरुद्ध पक्ष उत्पन्न होईपर्यंत, चांगल्या रीतीने केलीं, महाराज दौलतराव शिंदे मृत्यु पावले, त्या वेळी ब्रिटिश कांटिंजंट व किल्यांवरचे सैन्य खेरीजकरून, १४,००० पायदळ, १०,००० घोडेस्वार, आणि २५० तोफा होत्या. एवढ्या मोठ्या सैन्याचा बंदोबस्त करणे फार कठीण काम होते. बाईसाहेबांनी हे सैन्य चांगल्या स्थितीत ठेवून व त्याचे निरनिराळे कंपू करून, त्यांच्यावर स्वतंत्र अधिकारी नेमिले. कर्नल स्लीमन ह्यांनी इ. स. १८३३ मध्ये-ह्मणजे बायजाबाईसाहेबांच्या कारकीर्दीच्या अखेरीस, शिंद्यांच्या फौजचे २५ कंपू असून, त्यांपैकी ३ कर्नल आलेक्झांडर, ६ आपाजी खंडेराव, ११ कर्नल जेकब, आणि ५ कर्नल फिलोज ह्यांच्या ताब्यामध्ये होते, असे लिहिले आहे. । बाईसाहेबांनी सैन्याची व्यवस्था करून आपल्या राज्यांतील पेंढारी व ठग लोक ह्यांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 50


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 50
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------16
बायजाबाईसाहेबांचे पेनशन, ... ... ... २,००,००० खंडणी संस्थान कोटा, .... ... .... .... १,०२,४३० 2) ) ,, कोटी : .... .... .... १०,६१० | 2 ) ,, जयपूर... ... ... .... १,००,००० 2), ,, रतलाम व सेलना.... ... १,१२,१४० १ ही अस्सल पत्राची नक्कल असून, ती आमचे मित्र कै. रा. रा. वामनराव लेले वकील राहणार पुणे ह्यांच्या दप्तरांतून आह्मांस उपलब्ध झाली आहे. ७३ वसूल प्रांत गढाकोटा व मलठण.... ... ७०,००० | ,, ,, ,, येवले व चोपडे .... .... ७३,५६० मिळून ६,६८,७४० रुपये व आणखी कांहीं किरकोळ बाबींचे ६,९५६ रुपये, मिळून एकंदर ६,७५,६९६ रुपये पावत असत. परंतु तेवढ्याने फौजेचा खर्च ७,०९,२२४ रुपये भरून न येतां, ३३,५२८ रुपये तूट पडू लागली. शिवाय बायजाबाईसाहेबांचे पेनशन तहाहयात असल्यामुळे त्याने कायमच्या खर्चाची व्यवस्था होणार नाहीं, अशीही तक्रार उपस्थित झाली. तेव्हां उभय पक्षीं बरीच वाटाघाट होऊन बायजाबाईसाहेबांनी ८० लक्ष रुपये सरकारास कर्जाऊ द्यावे व त्याच्या व्याजांतून ह्या फौजेचा खर्च भागवावा असे ठरले. ह्याप्रमाणे बायजाबाईसाहेबांस राज्याधिकार आपल्या ताब्यात ठेवण्यास, अप्रत्यक्ष रीतीने, सार्वभौम सरकारास, द्रव्यद्वारे खूष करणे भाग पडले. कंपनी सरकारची भानगड संपल्यानंतर बायजाबाईसाहेबांनीं ग्वाल्हेरच्या राज्यकारभारांत आपले लक्ष्य चांगल्या रीतीने घातले. त्यांची एकंदर कारकीर्द इ. स. १८२७ पासून इ. स. १८३३ पर्यंत । सरासरी साहा वर्षेच चालली; परंतु तेवढ्या अवधीमध्ये त्यांनी मोठ्या दक्षतेने व शहाणपणाने राज्यकारभार चालविला, आणि मराठ्यांच्या) । स्त्रिया राज्यकारभार चालविण्यास किती समर्थ असतात हे सर्व | जगास महशूर केले. ह्यांचे मुख्य दिवाण बापूजी रघुनाथ हे इ. स. १८२८ सालीं धारचा कारभार पाहण्याकरितां तिकडे निघून गेले. त्या वेळी त्यांनी इंदूरचे प्रख्यात मुत्सद्दी तात्या जोग ह्यांच्या शिक्षणाने राजकारणांत पूर्ण वाकबगार बनलेले गृहस्थ रावजी त्रिंबक चांदवडकर ह्यांस ग्वाल्हेरीस नेऊन, त्यांस आपल्या दिवाणगिरीचीं वस्त्र दिली

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 49


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 49
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------15
सुर्जीअंजनगांवच्या तहामध्ये इनाम गांवांची यादी बरोबर न देतां, अदमासाने कांहीं तरी नांवें दिली होती; त्या चुकीचा परिणाम आतां भोगण्याचा प्रसंग आला. बायजाबाईसाहेब ह्यांस शिंद्यांच्या घराण्याकडे फार दिवस चालत आलेले गांव सोडून देऊन दक्षिणेतील आपला संबंध नाहींसा करणे इष्ट वाटेना. तेव्हा त्यांनीं रेसिडेंटमार्फत अनेक तडजोडी करण्याचे प्रयत्न केले. परंतु, इंग्रज सरकारास राजकीयदृष्ट्या शिंद्यांचा संबंध सातपुड्याच्या पलीकडे दक्षिणेतील गांवांवर असणे बरोबर वाटत नसल्यामुळे त्यांनी ती गांवे आपल्या ताब्यात घेण्याचा आग्रह धरला. अर्थात् सार्वभौम प्रभूचा विशेष आग्रह पडल्यामुळे बायजाबाईसाहेबांस दक्षिणेतील ८९३ गांव इंग्रजांच्या ताब्यात देणे भाग पडले. त्याप्रमाणे त्यांनी आनंदराव दत्तात्रय कमाविसदार ठाणे जामगांव ह्यांस गांवे सोडण्याबद्दल सनद पाठविली. ती येणेप्रमाणेः| राजश्री आनंदराव दत्तात्रय कमाविसदार ठाणे जामगांवः-- स्नेहांकित बायजाबाई शिंदे दंडवत सु॥ तिस्सा अशरीन मयातैन व अलफ. सुर्जेअंजनगांवचे मुक्कामीं कंपनी इंग्रजबहादूर यांचा व आपला तहनामा झाला. त्यांत आठवे कलमांत, दक्षणचे रुखेशीं श्रीमंत पेशवेसाहेब ह्यांचे मुलुकांत, आपले पिढीदरपिढीपासून कितेक परगणे व तालुके व गांव सुदामत वडिलोपार्जित चालत आले, त्याप्रमाणे चालावे असा करार ठरला असतां, तहनामा करावयाचे समयीं कागद पत्राचा दाखला, वहिवाटीस तालुके व परगणे व फुटकर देहे चालत आहेत त्यांचा न पाहतां, गैरमाहितीने जबानीवरून, परगणे व तालुके व देहे लिहिले; त्यांत सुदामतपासून वहिवाट चालत आली७२ त्याप्रमाणे तालुके व देहे लिहिले गेले नाहींत. परंतु त्यांची वहिवाट आजपर्यंत आपल्याकडे चालत आली असतां, तहनाम्याखेरीज साडेएकूणनव्वद देहे सोडून देण्याविषयीं कंपनी इंग्रजबहादूर यांचे ह्मणणे पडलें. सबब * * * * * साडेएकूणनव्वद् देहें खालसा व दुमाला मिळून आहेत ते सोडून कंपनी इंग्रजबहादूर यांजकडे द्यावयाचे ठरले. त्याजवरून ही सनद तुह्मांस सादर केली असे. तरी सदर्दू साडेएकूणनव्वद देहें कंपनी इंग्रजबहादूर यांजला लिहून, अंमलदार यांचे स्वाधीन, सरदेशमुख्या व पाटीलक्या व मोकदम्या व नावघाट वगैरे वतनबाब खेरीजकरून देणे. साहेबबहादूर यांजकडील अंमलदार सदर्दू गांवीं अंमल करतील. तुह्मीं दखलगिरी न करणे. जाणीजे. छ. २४ रबिलाखर हे विनंति. (मोर्तबसुंद) ह्याप्रमाणे दक्षिणेतील गांचे इंग्रजांच्या ताब्यात देऊन एका प्रश्नाचा निकाल लागला. परंतु दुसरा ब्रिटिश सरकारच्या कांटिंजंट फौजेच्या खर्चाचा प्रश्न तसाच राहिला. महाराज दौलतराव शिंदे मृत्यु पावल्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकाराकडून जे चार लक्ष रुपये पेनशन मिळत असे, ते बंद झाले. ते त्यांनी कांटिंजंट फौजेच्या खर्चाकरितां लावून दिले होते. अर्थात् ते कमी झाल्यामुळे बायजाबाईसाहेबांच्या दोन लक्ष पेनशनाने व रजपूत संस्थानाकडील खंडणीने ती रक्कम भरून येईना.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 48


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 48
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------14
मेजर जोसेफ आलेक्झांडरः---ह्यास जोशी शिकंदर' किंवा ८८सवाई शिकंदर” असे ह्मणत. हा पूर्वी जान बत्तिसाच्या सैन्यामध्ये एक लहानसा सेनाधिकारी होता. परंतु जान बत्तीस ह्याजवर मध्यंतरीं दौलतराव शिंदे ह्यांची इतराजी झाली व त्याचे सेनाधिपत्य त्यांनी काढून घेतले, त्या वेळीं ह्यास सर्व कंपूचे आधिपत्य देण्यात आले. ते त्याजकडे पष्कळ वर्षे होते. पुढे इ. स. १८२१ साली, बुंदेलखंडांतील एका राजाचे व जोशी शिकंदर ह्याचे भांडण झाले. त्या वेळीं ब्रिटिश सरकार मध्ये पडून त्यांनी शिंदे सरकाराकडून त्यास ग्वाल्हेरीस परत बोला७० विलें; व त्यास खुद्द ग्वाल्हेर येथे ठेवविलें. ह्याच्या ताब्यात दोन जंगी कंपू आणि दोनशे घोडेस्वार असत. बायजाबाईसाहेबांनी त्याच्याकडे तेवढेच सैन्य ठेविलें. |
बायजाबाईसाहेब ह्यांनी ह्या सर्व मुत्सद्यांच्या व सरदारांच्या साहाय्याने ग्वाल्हेरचा राज्यकारभार पाहण्यास आरंभ केला. त्यांनी राज्यसूत्रे हाती घेतली नाहींत तोंच त्यांच्या पुढे दोन महत्त्वाचे राजकीय प्रश्न उपस्थित झाले. महाराज दौलतराव शिंदे हे मृत्यु पावल्यानंतर त्यांच्या पश्चात् ग्वाल्हेरची राज्यव्यवस्था पाहण्यास ब्रिटिश सरकाराने बायजाबाईसाहेब यांस पूर्ण मोकळीक दिली. परंतु त्यांनी दक्षिणेतील शिंद्यांच्या ताब्यांतील गांव जे दौलतरावांच्या हयातीपर्यंत त्यांजकडे चालविले होते, ते सोडून देण्याबद्दल बायजाबाईसाहेब ह्यांचे जवळ बोलणे लाविलें, व कांटिंजंट फौजेच्या खर्चाची तजवीज करण्याबद्दल तगादा लावला. ह्या दोन्ही प्रश्नांचा समाधानकारक निकाल करणे फार कठीण होते. ज्या वेळी इ. स. १८०३ सालीं सुर्जीअंजनगांव येथे तह झाला, त्या वेळीं असे ठरले होते की, शिंद्यांच्या घराण्याकडे पूर्वापार चालत आलेले जे इनाम गांव व बाबती व सरदेशमुखीचे हक्क आहेत, ते कायम ठेवून, बाकीचे गांव इंग्रजांच्या स्वाधीन करावेत. परंतु पुढे ह्या इनाम गांवांबद्दल वाद उपस्थित झाला. तहाच्या इंग्रजी कागदांतील कलमांत, ‘‘इनाम' ह्या शब्दाचा उल्लेख न करितां फक्त “शिंद्याकडे चालत आलेले गांव” असेच ह्मटले होते. त्यावरून शिंद्यांच्या तांब्यांतील कोणते गांव सोडावे व कोणते न सोडावे | ह्याबद्दल वाद उत्पन्न झाला. अखेर ह्या संदिग्ध प्रश्नाचा इ. स. १८२२ मध्ये असा निकाल झाला कीं, दौलतराव शिंदे जोपर्यंत हयात आहेत, तोपर्यंत त्यांच्या ताब्यात असलेले सर्व गांव त्यांजकडे चालवावे व त्यांचे पश्चात् । त्यांचे खासगत इनाम गांव खेरीजकरून, बाकी सर्व गांव खालसा करावेत. त्याप्रमाणे दौलतराव शिंदे वारल्यामुळे त्यांचे पश्चात् दक्षिणेतील गांव खालसा करण्याबद्दल हिंदुस्थान सरकारचा ता. २४ मार्च इ. स. १८२८ रोजी नवीन ठराव होऊन आला. तो ग्वाल्हेरचे रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांनी बायजाबाईसाहेब ह्यांस सादर केला.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 47

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 47
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------13
कर्नल जेकबः—हा आर्मीनिया प्रांतांतील मूळचा राहणारा इसम स्वपराक्रमानें दौलतराव शिंदे ह्यांच्या पदरीं योग्यतेस चढला. ह्याच्याकडे १३ पायदळ पलटणी, ४०० घोडेस्वार, व एकंदर ५२ तोफा होत्या. ह्या सैन्याची व्यवस्था त्याने फार चांगली ठेविली होती व त्याचा पगार वगैरे वेळच्यावेळीं तो देत असे. त्याबद्दल कर्नल जेकब ह्यांस स्वतंत्र प्रांत तोडून दिला होता. बायजाबाईसाहेबांनीं दौलतराव शिंदे ह्यांच्या । व्यवस्थेत कांहीं फेरफार न करितां, कर्नल जेकब ह्याजकडे पूर्वीप्रमाणे जायदाद व अधिकार कायम ठेविले. ६९
कर्नल जॉन बॅप्टिस्ट फिलोजः—हा शिंदे सरकारच्या दरबारामध्ये जॉन बत्तीस” ह्या नावाने प्रसिद्ध आहे. हा जातीचा फराशीस होता. ह्याने दौलतराव शिंद्यांचे कारकीर्दीत अनेक लढाया मारून फार प्राबल्य मिळविले होते. हा शूर, धाडशी व प्रसंगावधानी असल्यामुळे ह्याची शिंद्यांच्या दरबारांत बरीच छाप बसली होती. ह्यानें केरोली, चंदेरी, राघोगड, बहादुरगड, लोहपाड वगैरे ठिकाणच्या रजपूत व बुंदेले राजांवर स्वाच्या करून व त्यांना जेरीस आणून, त्यांचा प्रांत काबीज केला होता. परंतु हा इसम स्वार्थसाधु असल्यामुळे दौलतराव शिंद्यांची ह्याजवर गैरमर्जी झाली; व त्यांनी त्यास इ. स. १८१७ मध्ये ग्वाल्हेरीस आणून सक्त नजरकैदेत ठेविले होते. पुढे ह्याने, दौलतरावांचे मुख्य खजानची किंवा फडणीस गोकुळ पारख ह्यांजकडे संधान लावून, इ. स. १८२५ साली आपली सुटका करून घेतली. तेव्हापासून हा धाडशी व महत्वाकांक्षी सरदार मोकळाच होता. बायजाबाईसाहेबांनी ह्यास मोकळा ठेवून उपयोगी नाहीं असे मनांत आणून, त्यास दरबारांत हजर राहण्याची परवानगी दिली, व सैन्याच्या एका छोट्या पथकाचा अधिकार दिला. ह्या पुरुषाने पुढे ग्वाल्हेर दरबारांतील राजकारणांत चांगलाच प्रवेश केला व तेथे वर्चस्व संपादन केलेRelated image.Related image

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 46


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे

भाग 46

महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,

लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस

बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------12

दाजीबा पोतनीसः—शिंदे सरकारच्या राज्यांतील मुख्य पोतनिशीचे काम ह्या गृहस्थाकडे होते. हे दौलतराव शिंद्यांच्या कारकीर्दीत स्वामिनिष्ठ व प्रामाणिक सेवक ह्मणून प्रसिद्ध होते. बायजाबाईनींही आपल्या कारकीर्दीत तेच काम त्यांच्याकडे सोपविलें. ह्यांचे बंधु कृष्णराव ह्यांच्याकडे हा हुद्दा महादजी शिंद्यांचे वेळेपासून होता. परंतु impenetrable mask. The most startling demand or the most unexpected concession was alike received without the motion of a muscle. Malcolm said of him that he never saw a man with such a face for the game of Brag. From that time Wittal Pant was known by the name of "Old Brag" in the British camp. And years afterwards, when Malcolm met General Wellesly, then the Duke of Wellington, in Europe, and the conversation one day turned upon the characters of the great men of France, the latter, when questioned regarding Tallyrand, replied that he was a good deal like "Old Brag”—but not So clever.” -Jalcolm's Life by Ke. You. II, Page 241. ant for the said of b६८ कृष्णरावांचे पश्चात् त्यांचे चिरंजीव अमृतराव हे अज्ञान व अल्पवयी असल्यामुळे दाजीबा हेच सर्व काम पाहत असत.

आत्माराम शिवरामबाबा वांकडेः–ह्यांचे पूर्वज लक्ष्मणराव वांकडे हे पुण्याचे रहिवासी असून, महादजी शिंदे ह्यांचे बरोबर उत्तर हिंदुस्थानांत आले होते. ह्यांच्याकडे प्रथम पोतनिशीचे काम होते. पुढे कांहीं कारणामुळे ते त्या कामावरून दूर झाले. त्यांचे पश्चात् दौलतराव शिंदे ह्यांनीं तात्या पागनीस ह्यांजकडे ते काम सांगितले. ते मृत्यु पावल्यानंतर लक्ष्मणराव ह्यांचे नातू आत्मारामपंत ह्यांस ते काम सांगितले. दोन वर्षेपर्यंत ते काम त्यांनी उत्तम रीतीने बजावल्यामुळे सर्जेराव घाटगे ह्यांची त्यांजवर फार मेहेरबानी जडली, व त्यांनी त्यांस खासगी दिवाण नेमिलें. पुढे सर्जेराव इ. स. १८१० सालीं मृत्यु पावल्यानंतर कांहीं दिवस ते स्वस्थ होते. परंतु ते चतुर व दूरदर्शी मुत्सद्दी असल्यामुळे दौलतराव शिंद्यांची त्यांच्यावर पुनः कृपा जडली, व त्यांच्या दरबारामध्ये त्यांचा पगडा बसला. दौलतरावांच्या पश्चात् बायजाबाईसाहेबांनी त्यांस आपले खासगी दिवाण नेमिलें. ते बायजाबाईसाहेबांच्या दरबारांत आत्माराम पंडित ह्या नांवाने प्रसिद्धीस आले.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 45


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 45
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------11
विठ्ठलपंत तात्या
विठ्ठलपंत तात्या हे फार शहाणे व चतुर मुत्सद्दी होते. इंग्रजाकडील लष्करी मंडळींत विनोदाने ह्यांचे टोपण नांव “Old Brag” (ह्मातारा बढाई. खोर ) असे पडले होते. ह्या संबंधाने के साहेबांनी मालकमसाहेबांच्या चरित्रांत एक आख्यायिका दिली आहे. ती फार मौजेची व वाचनीय आहे. ती येणेप्रमाणे:- “He was a man far advanced in years, but of unbroken energy, and formed both by nature and habit for diplomatic address. His self-command was wonderful. He had a sour supercilious, inflexible countenance, in which no penetration could ever discern a glimpse of feeling. He wore, indeed, an ।।)

रामराव फाळकेः–हे वाईप्रांतांतील जुने मराठे सरदार ग्वाल्हेर दरबारी होते. बायजाबाईसाहेबांनी ह्यांच्या हाताखालीं ४०० शिलेदार स्वार देऊन त्यांचे आधिपत्य त्यांस सांगितले. मणीराम शेटः–शिंद्यांच्या राज्यामध्ये मुख्य फडणीस गोकुळ पारख ह्मणून एक धनाढ्य पेढीवाला होता. तो इ. स. १८२७ सालीं मृत्यु पावला. तेव्हा त्याचे काम बायजाबाईनीं जयपुरचे रहिवासी मणीराम शेट ह्यांजकडे सांगितले. हे पूर्वी अगदीं गरीब स्थितीत होते. परंतु पुढे इतके द्रव्यसंपन्न झाले कीं, शिंद्यांच्या लष्करांत त्यांची बरोबरी कोणाच्यानंही करवेना. ह्यांचे सर्व सावकारांवर व पेढीवाल्यांवर अतिशय वजन असून त्यांची सल्लामसलत घेतल्यावांचून सरकारास एक रुपयाही कोणी कर्ज देत नसे. ह्यांची पेढी ६ मणीराम आणि लखमीचंद ' ह्या नांवाने त्या वेळी प्रसिद्ध असे

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 44



मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 44
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------10
उदाजी कुटकेः–हे जातीचे धनगर असून अहमदनगर जिल्ह्यांतील कोळ पिंपळगांवचे राहणारे होत. हे दौलतराव शिंद्यांचे कारकीर्दीतील एक प्रख्यात सरदार होते. ह्यांच्याकडे * सरनोबत ' हा अधिकार असून २००० स्वारांच्या कांटिंजंट फौजेचे आधिपत्य होते. ही फौज शिंदे सरकारची होती, तथापि तिच्यावर ब्रिटिश अधिका-यांची देखरेख असे. हे नेहमीं गुणा येथील छावणीमध्ये राहत असत. बायजाबाईसाहेबांनी ह्यांच्याकडे सरनोबतीचे पद देऊन, पूर्वीप्रमाणेच कांटिंजंट फौजेचेही काम सांगितलें. ।
माधवरावपंत ब्रह्माजीः-हे शिंदे सरकारच्या तोफखान्याचे अधिपति होते. हे काम त्यांच्याकडे इ. स. १८०९ पासून होते. हे जुनेL0 ६६ व प्रामाणिक नौकर असे पाहून बाईसाहेबांनीं तेच काम त्यांस सांगितले. दौलतराव शिंदे ह्यांनी सहा पायदळ पलटणी व त्यांच्या बरोबरच्या २० तोफा ह्यांच्या ताब्यात दिल्या होत्या, व त्यांच्या खर्चाकरितां स्वतंत्र मुलूख तोडून दिला होता. हे अहमदनगर जिल्ह्यांतील साकुरमांडव्याचे कुळकर्णी होते. परंतु केवळ स्वतःच्या कर्तबगारीने उदयास चढले. बायजाबाईसाहेबांनी ह्यांचा पूर्वीचा इतमाम ह्यांच्याकडे तसाच कायम ठेविला.
लक्ष्मणराम विठ्ठलः हे मूळचे दक्षिणेतील चांभारगुंडी गांवचे रहिवासी होत. ह्यांचे वडील विठ्ठल महादेव ऊर्फ विठ्ठलपंत तात्या हे दौलतराव शिंद्यांच्या दरबारांत नामांकित मुत्सद्दी होते. ह्यांनीच इ. स. १८०३ सालीं, सर आर्थर वेलस्ली साहेबांबरोबर सुर्जीअंजनगांवचा तह ठरविला होता. ह्यांचे शहाणपण जाणून दौलतराव शिंदे ह्यांनी त्यांच्याकडे दुरबारवकिलीचे काम सोपविले होते. ह्यांचे सर आर्थर वेलस्ली, सर जॉन मालकम इत्यादि युरोपियन मुत्सद्यांवर चांगले वजन असे. त्यांचे चिरंजीव लक्ष्मणराव विठ्ठल हे होत. ह्यांस बायजाबाईसाहेबांनीं ग्वाल्हेरचे किल्लेदार नेमून, त्यांच्या सैन्याच्या खर्चाकरिता ग्वाल्हेरसभोंवतालची ५०।६० गांचे त्यांस जहागीर दिली.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 43


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 43
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------9
लालाभाऊः—हे दौलतराव शिंद्यांचे प्रसिद्ध सरदार गोपाळराव भाऊ ह्यांचे चिरंजीव होत. शिंदे सरकारांकडून ह्यांस एक लाख रुपयांची जहागीर होती. ह्यांचे वय २५ वर्षांचे असून त्यांच्याकडे६५ दक्षिणेतील सातारा जिल्ह्यापैकीं वांकडी व अहमदनगरपैकी बेलापुर अशी दोन गांवें इनाम होतीं. ह्यांच्याकडे बायजाबाईसाहेबांच्या दरबारांतील सरदारीचे काम होते.
फकीरजी गाढवेः-हे सातारा जिल्ह्यांतील वाई गांवचे रहिवासी असून जातीचे धनगर होते. हे प्रथमतः महादजी शिंद्यांचे हाताखाली १०० स्वारांचे शिलेदार होते. ह्यांनी इ. स. १७९८ सालीं महादजी शिंद्यांच्या बायकांचे व दौलतरावांचे वैमनस्य होऊन जो दंगा झाला, त्या वेळीं सर्जेराव घाटग्यांस मदत केली; व पुढेही वेळोवेळी अनेक साहसाचीं। कृत्ये करण्यांत त्यांस साहाय्य केले. त्यामुळे दौलतरावांची त्यांजवर मेहेरबानी जडून, त्यांस सैन्याच्या एका तुकडीचे स्वतंत्र आधिपत्य मिळाले होते. ह्यांनी सर्जेरावांच्या बरोबर जरी कांहीं निर्दयपणाची कृत्ये केली होती, तथापि पुढे गोपाळरावभाऊबरोबर उत्तर हिंदुस्थानांत त्यांनी शौर्याची चांगली कामेही अनेक केली. त्यामुळे ह्यांच्या शूरपणाची शिंद्यांच्या दरबारांत प्रसिद्धी होती. बायजाबाईनीं फकीरजी गाढवे हे आपल्या यजमानाच्या वेळचे जुने सरदार आहेत असे पाहून, त्यांच्याकडे खासपागेपैकी २०० स्वारांचे आधिपत्य सांगितले.

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 42


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 42
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------8
यशवंतरावभाऊ जिवबा दादा बक्षी
हे जावद प्रांताचे व मेवाडांतील इतर जिल्ह्यांचे सुभेदार होते. ह्या प्रांतांचा सर्व वसूल पूर्वी त्यांच्याकडे सोपविला असून, त्यांत त्यांनी आपल्या हाताखालील सैन्याचा खर्च भागवावा, असा ठराव ( होता. यशवंतरावभाऊ हे दौलतराव शिंद्यांचे प्रख्यात सेनापति जिवबा दादा बक्षी ह्यांचे चिरंजीव होत. ह्यांचे बंधु नारायणराव ह्यांस सजरीव घाटग्यांनी इ. स. १८०० मध्ये तोफेच्या तोंडी देऊन निर्दयपणाने मारिलें होते. यशवंतरावभाऊ हे शिंद्यांच्या दरबारांतील पुढारी सरदारांपैकी एक असून दौलतरावांच्या कारकीर्दीत ह्यांची फार भरभराट असे. ह्यांनी पेंढारी लोकांस इ. स. १८१७-१८ मध्ये साहाय्य केल्यामुळे व त्यांचे रक्षण केल्यामुळे ह्यांची व बंगालच्या सैन्याचे अधिकारी मेजर जनरल ब्रौन ह्यांची लढाई होऊन ह्यांच्या सैन्याचा फार नाश झाला होता. पुढे इंग्रज सरकारचा व दौलतरावांचा तह होऊन मेवाड प्रांत ग्वाल्हेर संस्थानांतून गेल्यानंतर यशवंतरावभाऊ हे ग्वाल्हेरीस येऊन राहिले. ह्यांची स्वतःची जहागीर ४०,००० हजारांची असून ती बायजाबाईसाहेबांनी त्यांच्याकडे चालविली. ह्यांस शिंदे सरकारच्या दरबारांत फार मान असून हे त्या वेळच्या मुत्सद्दी मंडळींतील एक अग्रणी होते.

Sunday 8 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 40



मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 40
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------6
बापूजी रघुनाथः
हे जातीचे चांद्रसेनीय कायस्थ प्रभु होते. ह्यांचे उपनांव दिघे. हे बडोद्याचे प्रख्यात मुत्सद्दी विठ्ठलराव देवाजी ह्यांच्या वशिल्याने गायकवाड सरकारच्या पागेचे अधिपति झाले. गायकवाड सरकारचे व धारच्या पवारांचे नाते होते. गोविंदराव गायकवाड ह्यांची कन्या धारचे रणशूर व पराक्रमी राजे यशवंतराव पवार, जे पानिपतच्या तुमुल रणकंदनांत इ. स. १७६१ सालीं पतन पावले, त्यांच्या पुत्रास-ह्मणजे खंडेराव पवारांस दिली होती. त्यांचे पुत्र आनंदराव पवार ह्यांस गोविंदराव गायकवाडाच्या पत्नी गहिनाबाईसाहेब ह्यांची सख्खी भाची मैनाबाई ही दिली होती. आनंदराव पवार इ. स. १८०७ सालीं मृत्यु पावले. त्यांस औरसपुत्र नसून त्यांच्या पत्नी मैनाबाई ह्या गरोदर होत्या. त्या अबला आहेत असे पाहून, धारच्या पवारांचा मुरारराव नामक एक दासीपुत्र, स्वतः सर्व राज्यकारभार बळकावून, त्यांना फार त्रास देऊ लागला; व संस्थानांत दंगेधोपे करू लागला. त्यामुळे धार येथे झोटिंगबादशाही होऊन, शिंदे होळकर वगैरे प्रबल सरदारांस आपला फायदा करून घेण्यास चांगली संधि मिळाली. त्या वेळी६२ धारसंस्थानास मदत करण्याकरितां बडोद्याच्या राणी गहिनाबाईसाहेब ह्यांनी सखाराम चिमणाजी नामक एका शूर सरदाराबरोबर कांहीं सैन्य देऊन तिकडे पाठविले. त्यांनी तिकडे जाऊन बराच बंदोबस्त केला; परंतु त्यांस तेथील प्रमत्त लोकांचे पारिपत्य करण्याकरिता आणखी एका शूर सरदाराची अवश्यकता भासू लागली. ह्मणून त्यांनी बडोद्याहून वापूजी रघुनाथ ह्यांस बोलावून नेलें; व त्यांस सेनापतीचा अधिकार दिला. पुढे कांही दिवसांनी सखाराम चिमणाची मृत्यु पावले. तेव्हां धारची दिवाणगिरी बापूजी रघुनाथ ह्यांजकडे आली. त्यांनी मोठ्या शहाणपणाने व शौर्याने शत्रूचा पराभव करून धारच्या राज्यांत शांतता स्थापन केली. ह्यांच्या कारकीर्दीत इ. स. १८१७ सालीं माळव्यामध्ये राज्यक्रांति घडून आली, व सर जॉन मालकम हे माळव्याच्या बंदोबस्ताकरितां आले. त्यांजबरोबर ह्यांनी ता० १० जानेवारी १८१९ रोजी मित्रत्वाचा तह करून धार संस्थानाचे रक्षण केले. ह्यांचे कारकीर्दीत धार संस्थानांत अनेक सुधारणा होऊन प्रजा सुखी झाली. ह्यांनी मैनाबाईचे चिरंजीव रामचंद्रराव पवार ह्यांचा, दौलतराव शिंदे ह्यांची नात अन्नपूर्णाबाई हिजबरोबर, मोठ्या थाटानें विवाहसमारंभ करून, ग्वाल्हेर व धार ह्या दोन्ही संस्थानांचा प्रेमसंबंध दृढतर केला. ह्यांचे शहाणपण व राजकारणकौशल्य पाहून दौलतराव शिंदे ह्यांची त्यांच्यावर फार प्रसन्न मर्जी झाली, व त्यांनी इ. स. १८२६ साली त्यांना ग्वाल्हेर येथे नेऊन दिवाणगिरीची वखें अर्पण केली. पुढे दौलतराव शिंदे लवकरच वारले. तथापि, वायजाबाईसाहेबांनी ह्या प्रख्यात मुत्सद्याची कर्तृत्वशक्ति व धूर्तता लक्ष्यांत घेऊन, त्यांस आपल्या कारकीर्दीत मुख्य प्रधानकीचीं वस्त्र दिली. बापूजी रघुनाथ ह्यांच्यासारख्या कीर्तिशाली मुत्सद्याचे योग्य सद्गुण { ध्यानीं घेऊन, बायजाबाईसाहेबांनी त्यांस आपल्या दरबारांतील प्रधानपद सादर केले, हीच गोष्ट त्यांच्या शहाणपणाची दर्शक आहे. उत्तम६३ मंत्र्याची निवड करणे हा महत्त्वाचा गुण होय. तो बापूजी रघुनाथ | ह्यांच्या नेमणुकीवरून, बायजाबाईसाहेबांच्या अंगीं चांगल्या रीतीनें वास | करीत होता, असे दिसून येते. |

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 41


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 41
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,

लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------7

यशवंतराव दाभाडेः—

हे तळेगांवच्या रणशूर सेनापति दाभाडे ह्यांच्या घराण्यांतील पुरुष होत. पेशव्यांनी लष्करी सत्ता आपल्या हाती घेतल्यामुळे हे घराणे पुढे नामशेष झाले होते. परंतु दौलतराव शिंद्यांनी यशवंतरावांस आश्रय देऊन आपल्या दरबारचे सरदार केले होते. शिंद्यांच्या मुलुखांत त्यांस ७०,००० हजारांची जहागीर होती. शिवाय दक्षिणेत, खासगी जहागीर व तळेगांव व इंदुरी ही दोन इनाम गांवें मिळून एकंदर ३१,१५० रुपयांचे उत्पन्न होते. ह्यांचे चिरंजीव मन्याबा ऊर्फ बाबुराव ह्यांस दौलतराव शिंद्यांनी आपली वडील मुलगी चिमणा| १ वापूजी रघुनाथ ह्यांची प्रशंसा मध्यहिंदुस्थानचे पोलिटिकल एजंट सर जॉन मालकम, वेलस्ली व मार्टिन ह्यांनी फार फार केली आहे. सर जॉन मालकम ह्यांनीं मध्यहिंदुस्थानच्या इतिहासामध्ये वापू रघुनाथासंबंधानें जो उल्लेख केला आहे तो वाचण्यासारखा आहे:- "The administration of Dhar is conducted by Bapoo Raghunath, who acting in complete confidence of meriting and receiving the support of the British Government is incessant in his labours to restore this principality to prosperity.”
  • That principality being under a minor prince, the adopted son of Maina Bai, the widow of the late Raja, has afforded us the same advantages, in carrying into execution economical reforms of the state of Holkar, nor is the minister Bap00 Raghunath inferior to Tantia Jogh in zeal or in a just appreciation of the generous policy of the British Government, which has restored the ruined fortunes of the Dhar family, and given them once more a rank and place among the princes of India
६४ बाई ही दिली होती. हिच्या पोटीं त्यांस एकंदर तीन कन्या झाल्या. त्यांपैकी एक धारचे राजे आनंदराव पवार ह्यांस आणि दुसरी महाराज जनकोजीराव शिंदे ह्यांस दिली होती. त्यामुळे बाबुराव दाभाडे बायजाबाईसाहेबांचे जावई होते. त्यांनी त्यांस दरमहा २५०० रुपयांची तैनात करून देऊन आपल्या दरबारांतील सरदारी सांगितली. |

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...