पुण्यश्लोक 'राजा राम'
भाग १
शिवाजी महाराजांना दोन मुले होती. थोरले संभाजी महाराज आणि धाकटे राजाराम महाराज.
१४ मे १६५७ रोजी सईबाई साहेबांच्या पोटी संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्यावर झाला.
आणि २४ फेब्रुवारी १६७० रोजी सोयराबाई साहेबांच्या पोटी राजाराम महाराजांचा जन्म राजगड किल्यावर झाला.
संभाजी महाराजांच्यामध्ये आणि धाकटे भाऊ राजाराम यांच्यात १३ वर्षांचे अंतर होते.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी 'रात्रंदिनी आम्हास युद्धाचा प्रसंग..' करीत स्वराज्यावर चालून आलेल्या मुघलांना आणी इतर शत्रुंना पराभूत केले; पण दुर्दैवाने अवघडप्रसंगी संभाजी महाराजांस कैद करून औरंगजेबाने त्यांची हत्या केली.
वयाच्या ३१ व्या वर्षी संभाजी महाराजांची हत्या झाली.
अत्यंत महत्वाचे. शब्द शद्ब वाचावा.
मराठ्यांचे स्वराज्याच आता घोर संकटात सापडले होते.
संभाजी महाराजांची हत्या करून रायगडाभोवती आता औरंगजेबरूपी अजगराचा विळखा पडला होता. दिवसेंदिवस हा विळखा अधिकच घट्ट होत होता. अश्या कठीण प्रसंगी ह्या वेळी रायगडावर सर्व राजपरिवाराने एकत्र राहणे हे स्वराज्यासाठी धोक्याचे होते.
अश्या बिकट प्रसंगी संभाजी महाराजांच्या पत्नी राजमाता येसूबाई साहेब बोलल्या कि, " मुलाचे वय लहान. (म्हणजे संभाजी राजांचा मुलगा दुसरे शिवाजी उर्फ शाहू )
राज्य तरी गेलेच. त्या अर्थी तुम्ही सर्वही पराक्रमी मनसबदार यांनी राजारामसाहेब यांस घेऊन रायगडाबाहेर पडावे. मुलास बाहेर जाऊन राहणे यास जवळ जागा रायगडाहून बाकी ऐशी दुसरी नाहीच. त्याअर्थी मुलास व आम्हास येथिल बंदोबस्त करून येथे ठेवावे.
तुम्ही सर्वांनी राजाराम साहेबांसह वर्तमान बाहेर पडून फौज जमा करून, प्रांताचा बंदोबस्त राखीला असता; सर्व मसलत, ओढ तिकडे आधी पडेल. येथे काही गिल्ला पडणार नाही.
तथापि थोडी बहुत मसलत पडली असताही हा किल्ला बेलाग, मजबूत, वर्ष सहामहीने टिकाव धरेल.
तो तुमचा सर्वांचा जमाव एखादे ठायी पोक्त झाला म्हणजे आम्हास रायगडाहून काढून न्यावे. किंवा शत्रूचे प्राबल्य विशेष, त्या अर्थी चंदी चंदावर प्रांती ( म्हणजे तंजावर येथे) दम खाऊन पुन्हा मसलत बळावून राज्य साधनही करणे पडले तरी करावे.
परंतु ये समई सर्व कुटुंब निघोन एकदाच सर्वांनी शत्रूस हस्तगत व्हावे ऐसे होईल. यास्तव राजारामसाहेब व त्यांचा कबिला ऐसे काढोन निघून जावे. सर्वांनी एके ठायी मोहास पडून राहिल्यास सारी मसलत येथेच पडून सर्वांनी सापडावे ऐसे घडेल.."
अश्या बिकट प्रसंगी येसूबाई साहेबांनी सांगितलेली हि मसलत सर्वांना मान्य झाली.
आता अत्यंत महत्वाचे:
निघण्यापूर्वी येसूबाई व संभाजीराजे पुत्र शिवाजी यांच्या समक्ष राजाराम महाराज यांनी मुत्सद्दी आणि सरदार यांच्याकडून निष्ठेची शपथ घेवविली व त्यांस सांगितले कि, " राज्याचे अधिकारी शिवाजीराजे पूर्वीचे 'तेच हे' ऐसे लक्ष ठेऊन आम्ही कारभारी, आमचे आज्ञेत राहून पूर्वीहून विशेष ज्याची जशी शक्ती त्याहून अधिक पराक्रम करून औरंगजेब शत्रू यास जिंकून राज्य रक्षावे."
भाग १
शिवाजी महाराजांना दोन मुले होती. थोरले संभाजी महाराज आणि धाकटे राजाराम महाराज.
१४ मे १६५७ रोजी सईबाई साहेबांच्या पोटी संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्यावर झाला.
आणि २४ फेब्रुवारी १६७० रोजी सोयराबाई साहेबांच्या पोटी राजाराम महाराजांचा जन्म राजगड किल्यावर झाला.
संभाजी महाराजांच्यामध्ये आणि धाकटे भाऊ राजाराम यांच्यात १३ वर्षांचे अंतर होते.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी 'रात्रंदिनी आम्हास युद्धाचा प्रसंग..' करीत स्वराज्यावर चालून आलेल्या मुघलांना आणी इतर शत्रुंना पराभूत केले; पण दुर्दैवाने अवघडप्रसंगी संभाजी महाराजांस कैद करून औरंगजेबाने त्यांची हत्या केली.
वयाच्या ३१ व्या वर्षी संभाजी महाराजांची हत्या झाली.
अत्यंत महत्वाचे. शब्द शद्ब वाचावा.
मराठ्यांचे स्वराज्याच आता घोर संकटात सापडले होते.
संभाजी महाराजांची हत्या करून रायगडाभोवती आता औरंगजेबरूपी अजगराचा विळखा पडला होता. दिवसेंदिवस हा विळखा अधिकच घट्ट होत होता. अश्या कठीण प्रसंगी ह्या वेळी रायगडावर सर्व राजपरिवाराने एकत्र राहणे हे स्वराज्यासाठी धोक्याचे होते.
अश्या बिकट प्रसंगी संभाजी महाराजांच्या पत्नी राजमाता येसूबाई साहेब बोलल्या कि, " मुलाचे वय लहान. (म्हणजे संभाजी राजांचा मुलगा दुसरे शिवाजी उर्फ शाहू )
राज्य तरी गेलेच. त्या अर्थी तुम्ही सर्वही पराक्रमी मनसबदार यांनी राजारामसाहेब यांस घेऊन रायगडाबाहेर पडावे. मुलास बाहेर जाऊन राहणे यास जवळ जागा रायगडाहून बाकी ऐशी दुसरी नाहीच. त्याअर्थी मुलास व आम्हास येथिल बंदोबस्त करून येथे ठेवावे.
तुम्ही सर्वांनी राजाराम साहेबांसह वर्तमान बाहेर पडून फौज जमा करून, प्रांताचा बंदोबस्त राखीला असता; सर्व मसलत, ओढ तिकडे आधी पडेल. येथे काही गिल्ला पडणार नाही.
तथापि थोडी बहुत मसलत पडली असताही हा किल्ला बेलाग, मजबूत, वर्ष सहामहीने टिकाव धरेल.
तो तुमचा सर्वांचा जमाव एखादे ठायी पोक्त झाला म्हणजे आम्हास रायगडाहून काढून न्यावे. किंवा शत्रूचे प्राबल्य विशेष, त्या अर्थी चंदी चंदावर प्रांती ( म्हणजे तंजावर येथे) दम खाऊन पुन्हा मसलत बळावून राज्य साधनही करणे पडले तरी करावे.
परंतु ये समई सर्व कुटुंब निघोन एकदाच सर्वांनी शत्रूस हस्तगत व्हावे ऐसे होईल. यास्तव राजारामसाहेब व त्यांचा कबिला ऐसे काढोन निघून जावे. सर्वांनी एके ठायी मोहास पडून राहिल्यास सारी मसलत येथेच पडून सर्वांनी सापडावे ऐसे घडेल.."
अश्या बिकट प्रसंगी येसूबाई साहेबांनी सांगितलेली हि मसलत सर्वांना मान्य झाली.
आता अत्यंत महत्वाचे:
निघण्यापूर्वी येसूबाई व संभाजीराजे पुत्र शिवाजी यांच्या समक्ष राजाराम महाराज यांनी मुत्सद्दी आणि सरदार यांच्याकडून निष्ठेची शपथ घेवविली व त्यांस सांगितले कि, " राज्याचे अधिकारी शिवाजीराजे पूर्वीचे 'तेच हे' ऐसे लक्ष ठेऊन आम्ही कारभारी, आमचे आज्ञेत राहून पूर्वीहून विशेष ज्याची जशी शक्ती त्याहून अधिक पराक्रम करून औरंगजेब शत्रू यास जिंकून राज्य रक्षावे."
No comments:
Post a Comment