विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 August 2019

" प्रखर सूर्य मावळला "

" प्रखर सूर्य मावळला "
【 युगप्रवर्तकाचा हृदयद्रावक अंत 】
" प्रखर सूर्य मावळला " , ह्या अतिविशेष लेखामध्ये , छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणा -
- बद्दल अपरिचित माहिती आपणांस अभ्यासवयास मिळणार आहे . " प्रखर सूर्य मावळला " ह्या लेखातील माहिती हा काय अंतिम निष्कर्ष नाही , परंतु " सत्य इतिहासाकडे जाण्याची नांदी आहे " . हा हृदयद्रावक तथा शास्त्रीय माहितीसंपन्न ( सत्य पुराव्यांवर आधारित ) लेख , आपणांस अनेक प्रश्न पडतील , आपल्या सर्व प्रश्नांचे वा शंकांचे निरसन करण्याकरिता , मी राहुल रमेशजी पाटील , निर्भयपणे समर्थ आहे .
छत्रपती शिवराय आलम दुनियेतील आदर्श
व्यक्तिमत्व , जगातील सर्व देशांमध्ये छत्रपती शिवरायां -
- विषयी चर्चा होते ; कारण ४०० वर्षांचं पारतंत्र्य अवघ्या
३५ वर्षांच्या कारकिर्दीत नेस्तनाभूत केलं . आणि रयतेला
" स्वराज्य " , प्राप्त करून दिलं . छत्रपती शिवरायांच आयुष्य हे जवळपास १८३१२ दिवस आणि २ घटकांच
ह्या पृथ्वीतलावर होतं , ह्या आयुष्यात राजांनी असं महान
कार्य ( स्वराज्य निर्माण ) केलं कि , जोपर्यंत चंद्र आणि
सूर्य अस्तित्वात आहे तो पर्यंत " छत्रपती शिवाजी महाराज " , हे नाव जगातल्या प्रत्येक मनुष्याच्या मुखात तथा डोक्यात राहिल , ह्याची पूर्ण शाश्वती मला आहे . छत्रपती शिवरायांच एकंदर आयुष्य पाहिलं , तर आपणांस समजून येतं कि , राजांची प्रत्येक भूमिका हि उत्तम व्यवस्थापनावर अवलंबून होती , " शिवचरित्र नीट वाचलं वा समजून घेतलं तर आपणांस ह्याची प्रचिती येईल " . त्यामुळे राजांस , " व्यवस्थापनगुरू " संबोधले जाते . छत्रपती शिवरायांनी एकंदर सर्वच बाबतीत उत्तम व्यवस्थापन ठेवलं , फक्त राजांनी एकाचं गोष्टीचं व्यवस्था - - पन केलं नव्हतं ते म्हणजे , राजांच्या महानिर्वाणाचं .....
सध्या छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणाबाबत
सर्वांच्या मनात शंका आहेत कि , " शिवरायांचा मृत्यू हा नैसर्गिक होता ? कि शिवरायांची हत्या झाली होती ? " ,
ह्यातच सध्या ह्या हृदयद्रावक प्रसंगाचे , सोशल मीडियावर काही स्वघोषित इतिहासकार अफवांचे डोंगर च्या डोंगर पसरवत आहेत . " इतिहासामध्ये अफवांना थारा नसतो , अस्सल कागदपत्रांना महत्व असते " .
शिवरायांच्या मृत्यूबाबत सर्वांना कोडं आहेत , मी राहुल रमेशजी पाटील , शिवशंभुछत्रपतींबद्दल थोडी-
-बहुत " सत्य " माहिती जाणणारा , एक साधा मनुष्य , गेले ६ महिने अतिखोलात जाऊन , " छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणाबाबत ", सखोल माहिती पुराव्यानिशी , " प्रखर सूर्य मावळला " ह्या लेखात मांडणार आहे . हा सत्य माहितीसंपन्न लेख , दि. २१ डिसेंबर २०१८ तारखेस राहुल रमेशजी पाटील ह्यांच्या , ब्लॉगर अकाउंटवर , फेसबुक अकाउंटवर , प्रतिलिपी अकाउंटवर प्रकशित होणार आहे ( वरील सर्व अकाउंटच्या लिंक्स आपणांस दि. २० तारखेस मिळतील ) .
(●) ब्लॉगची वैशिष्टये :-
■ फेब्रुवारी १६८० मधील अपरिचित इतिहास .
■ हनुमाजयंतीची विशेष गोष्ट .
■ काळा दिवस (३ एप्रिल १६८० ) या दिवशी
छत्रपतींच दिनक्रम .
■ शंभूराजे कुठे होते ? रायगडावरील उपस्थिती ?
■ छत्रपती शिवप्रभूंचा मृत्यू हा ,नैसर्गिकरीत्या आहे का ,
कि काही घातपात , कि अजूनकाही ....
■ छत्रपतींच्या मृत्यूची वार्ता , बॉम्बे ( इंग्रज वखार )
कळता , इंग्रजाची प्रतिक्रिया .... आणि मासिरे - ए -
आलमगिरीतील महत्वपूर्ण माहिती .
■ छत्रपतींच्या अकाली निधनाचे स्वराज्यावर
झालेले परिणाम .
■ सरसेनापती हंबीररावांची ' एकनिष्ठता ' .
■ युवराज शंभुराजांची दुरदृष्टिता .
[ छत्रपतींनी आपल्या सर्वांच भाग्य उजाळलं . ]
" शिवशंभूछत्रपतींचा आशीर्वाद , एकचं ध्यास ,
सत्य इतिहास " .
【 " प्रखर सूर्य मावळला हा लेख वाचून आपल्या सर्व
शंका दूर होतील , ह्याची मला खात्री आहे " . 】
माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे हि पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा , ' एकवेळ लाइक नाही केलंत
तरी चालेल पण शेअर अवश्य करा ' , इतिहासाखातर ....
" अखंड भारताचा विजय आहे " .
~ राहुल रमेशजी पाटील ,
शंभूमाहितीगार .
ई-मेल : - rahulp1298@gmail.com ,
मोबाईल क्र. : - 7741923346 .

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...