विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 10 December 2019

पानिपत...! मर्द मराठ्यांचा ज्वलंत इतिहास !!




मर्द मराठ्यांचा ज्वलंत इतिहास !!

पानिपत...!
१४ जानेवारी १७६१, या हिंदुस्थानवरचं संकट मराठ्यांनी आपल्या छातीवर झेललं. मराठे गिलच्यांविरुध्द एकाकी झुंझले. अभिमन्यूप्रमाणे झुंझत झुंजत देह ठेवला. उभ्या भारतातून एक हरीचा लाल मराठयांबरोबर पाय रोवून पानिपतात उभा राहिला नाही. मराठ्यांनी पाय गाडून युध्द केलं. रक्त मांसाचा चिखल झाला. मराठ्यांची अख्खी पिढी मारली गेली. महाराष्ट्रातील प्रत्येक घरातला एक जण तरी पानिपतावर कापला गेला. "दो मोती गलत, दस-बीस अश्राफात, रुपयोंकी गिनती नही|"
पण माझ्या दृष्टीने पानिपतावरती झालेला पराभव हा खरा पराभवच नाही मुळी. कारण १८व्या शतकाच्या शेवटि पर्यंत तब्बल 15वर्ष लाल किल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा "भगवा" डौलात फडकत होता हा इतिहास आहे..!
मराठ्यांनी दिल्लीची वजीरीच नव्हे तर सगळी दिल्लीच पुन्हा मांडिखाली दाबली हा खरा इतिहास आहे.
महादजी शिंद्यांनी एकेका रजपुताला सुटा करुन करुन पिदवला हा खरा इतिहास आहे, "गढ मै गढ चित्तोड गड बाकि सब गढियॉ।" म्हणून लैकिक मिळवलेला किल्ला जवळपास आठ महीने लढल्यावर आणि डोळे पांढरे व्हावेत इतका तिखट प्रतिकार झाल्यावर ’महान’ सम्राट अकबराला मिळाला होता,महादजींनी बोल - बोल म्हणता तो १८ दिवसांत जिंकला होता हा खरा इतिहास आहे.
नजिबाचा नातू "गुलाम कादिर" याने "शहा अलम" बादशहाला आंधळे केल्याबद्दल व बादशाहाच्या कुलातील स्त्रीयांना भर दरबारात नग्न केल्याची शिक्षा म्हणून महादजींनी त्याला टाचेकडून मानेकडे जिवंत सोलून ठार मारला होता व नंतर दिल्लीच्या लाहोरी दरवाज्याजवळ ३ दिवस बिन मुंडक्याचा उलटा टांगून ठेवला होता हा खरा इतिहास आहे.
पानिपताला जबाबदार असलेल्या नजीबाची कबर म्हादजींनी सुरुंग लावून उडवून दिली, हरहर महादेव च्या गर्जनात तिच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या हा खरा इतिहास आहे..
पानिपतात मराठ्यांच्या फौजांचा पराभव झाला असे म्हणणाऱ्यांची कीव येते ती एवढ्यासाठीच !
कारण खरा पराभव पानिपतावर नव्हे तर इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालाय, पुस्तकांच्या पानांवरती झालाय.
दुसर्‍या महायुध्दातील डंकर्कच्या पळपुटेपणाला कौतुकाने माना डोलावून "यशस्वी माघार" म्हणणारे मात्र पानिपतावर देह ठेवून राष्ट्र वाचवणारे पराभूत झाले असं म्हणतात तेव्हा संताप येतो.
आज अडिचशे वर्षानी त्याच्याकडे बघताना केवळ "पराभव" म्हणून न बघता "गुरुदक्षिणा" म्हणून बघा. मराठ्यांनी शिवछत्रपतींना दिलेली "गुरुदक्षिणा". राष्ट्रावरचं संकट आपल्या छातीवर घ्यायची संथा त्या महामानवाने मराठ्यांना दिली होती. त्या संथेची गुरुदक्षिणा म्हणजे " पानिपत....!!!
#पानिपत
#बचेंगे तो और भी लढेंगे

1 comment:

  1. हा लेख तुम्हाला कुठून मिळाला हे समजू शकेल का? 😊

    ReplyDelete

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...