|| शिवबाचे शूरवीर ||
【 छत्रपतींच्या महावीरांच्या शौर्यगाथा 】
शिवबाचे शूरवीर , हा " जगविजेता संभाजी " , ह्या ऐतिहासिक माहिती दर्शविणाऱ्या फेसबुक पेजचा , अतिविशेष उपक्रम . ह्या उपक्रमात आपण छत्रपती
शिवरायांच्या निष्ठावंत आणि पराक्रमी , महाबली वीरांच्या इतिहासाचा अभ्यास करणार आहोत . तर ह्या उपक्रमातील दुसरे स्वराज्यनिष्ठ वीर आहेत ," शूरवीर कोंडाजी फर्जंद " , ह्या अतिविशेष लेखात कोंडाजींची
जंजिरा मोहिमेतील कामगिरीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत .
" शूरवीर कोंडाजी "
सन १६८१ , सिद्दीने त्याच्या हद्दी जवळील स्वराज्यातील गावात लुटालूट ,जाळपोळ आणि कत्तल सुरू केली . [ हे सर्व सिद्दी औरंगजेबाच्या सांगण्यावरून करत होता ] हशम प्रामाणिक रयतेवर जुलूम करत , स्त्रियांना बाटवत , तसेच स्त्रीया - पुरुषांचा , लहान पोरांचा विदेशात गुलाम म्हणून व्यापार करत असत , कित्येकांचा धर्म बद्लवीत असत त्याला पायबंद घालण्याची नितांत गरज होती . असं नाही की शंभूराजांचं ह्याकडे लक्ष नव्हतं , त्यांनी ज्यादा फौज हद्दीच्या गावागावात ठेवली , तरीही सिद्दी बंधू कुरापती काढतच होते . अशातच एक वाईट घटना घडली उंदेरीनजीकच मराठे आणि हशमांत लढाई झाली त्यात ८० मावळे कामी आले आणि थोर सरदार मायनाक भंडारी ह्यांचा मुलगा देखील धारातीर्थी पडला , पण हबशांनी त्याचं मस्तक हे धडावेगळे करून पुढे मराठ्यांना भेट म्हणोन पाठविलं , ज्यावेळी ही बातमी शंभुराजांना समजली , तेव्हा राजांचीतळपायाची आग मस्तकात गेली . त्याक्षणी राजांनी निर्धार केला की , " जंजिरा स्वराज्यात आणायचाच " .
■ जंजिरा घेण्याचे मुख्य कारण : -
जंजिरा स्वराज्यात असावा हे , थोरल्या महाराजांचं स्वप्न होतं आणि तसेच किनाऱ्यालगतच्या रयतेवर सतत होणाऱ्या अन्यायावर प्रतिबंध लागावा , हे मुख्य कारण होतं .
■ जंजिरा आणि हबसाण : -
जंजिरा , मूळ नाव " जझिरे - मेहरुब "
म्हणजेच चंद्रकोर आकाराचा जलदुर्ग .हा आधी निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता , नंतर इ.स. १६२० मध्ये सिद्दीच्या अधिपत्यात आला , हबशांचा अंमल सुरू झाला . ऍबेसिनिया ( abesiniya ) उर्फ हबसाण ह्या अफ्रिकेच्या भागातून सिद्दी लोकं आले .
हबसाण ह्या शब्दातून हबशी हा शब्द निर्माण झाला , ह्या हबशी लोकांची एक फितरत होती , हे नेहमी महासत्तेशी नमून राहत आणि स्वतःचा बचाव करत असत . ह्या हबसाणात , जिंजीरा जलदुर्ग , मुरूड , नांदगाव , मांडले , श्रीवर्धन , म्हसले , गोवले , व पंचायतन असा प्रदेश होता . तसेच त्यांचे एकूण क्षेत्रफळ हे ३२५ चौरस मैल
होते , आणि हबसाणाच्या उत्तरेस कुंडलिका नदी व रोह्याची खाडी , दक्षिणेस सावित्री नदी , पूर्वेस रायगड जिल्ह्यातील रोहा , माणगाव , व महाड तालुक्याचा भाग , व पश्चिमेस अरबी समुद्र , तसेच विशेष म्हणजे पश्चिमेस ४० मैलांच्या समुद्रकिनाऱ्याखेरीज बाणकोटच्या खाडीचा १७ मैल किनारा , व रोह्याच्या खाडीचा ४ - ५ मैलांचा किनारा सिद्दीच्या आरमारास अतिशय महत्वपुर्ण होता , याशिवाय राजपुरीचे मध्य आखात १४ मैल लांब असून बरीच रुंद असल्याने , ही जागा आरमारास खूप उपयुक्त होती .
जंजिरा हा जलदुर्ग , हबसाणाचे मुख्य ठिकाण असून तो राजपुरीच्या आखाताच्या अगदी तोंडावर आहे . जंजिऱ्याचा आकार हा अर्धवर्तुळाकार असून , सभोवतील तट फार मजबूत व उंच आहेत , तसेच १९ मुख्यबुरुज व ४ उपबुरुज , आणि दुर्गाच्या सौरक्षणसाठी ३८० ते ४०० तोफा , ५० लाकडी
तोफाआणि महत्वपुर्ण म्हणजे जंजिऱ्याची खरी ताकद ३ अजस्त्र तोफा , " कलालबांगडी , लांडा कासम , व चावरी " , त्यात विशेष म्हणजे कलालबांगडी ही जंजिऱ्यातील सर्वात मोठी , अचूक मारा करणारी , व लांब पल्ल्याची तोफ होती आणि त्यात दर्याचे सौरक्षण , पूर्ण ओहोटीचे वेळी ह्या दुर्गाचा मात्र कातळावरील पाया दिसतो , पण तेथे समुद्राची भरती ४० - ५० फोटांपर्यंत चढते . दुर्गाच्या पूर्वेस एक मोठा दरवाजा असून त्याला थेट पाण्याच्या सखल भागापर्यंत पायऱ्या बांधलेल्या होत्या ; पश्चिमेच्या बाजूस १ ओटा असून ते भरतीच्या पाण्याच्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक उंचावर आहे , या ओट्यावर जाण्याकरिता एक लहान दरवाजा आहे . हा जलदुर्ग अत्यंत बेलाख असून अत्यंत अवघड ठिकाणी बांधला गेलाय .
सन १६२० मध्ये , जंजिऱ्याची आणि राजपुरीची सुभेदारी सिद्दी हबशांकडे आली , सिद्दीच्या कारकीर्दी पुढीलप्रमाणे : -
◆ सिद्दी सुरतअब्दुल्लाखान : - सन (१२२० - १६२६) ,
◆ सिद्दी अंबर : - सन (१६२६ - १६४२) ,
◆ सिद्दी युसूफ : - सन (१६४२ - १६४८) ,
◆ सिद्दी फत्तेखान : - सन (१६४८ - १६६७) ,
◆ सिद्दी खैरत : - सन (१६६७ - १६९६) .
आणि
● सिद्दीचे सरदार : -
अब्दुल्ला दळवी , हसनजी
छर्ग , आबाजी व मस्तीखान , हसनजी व मालिकजी बिन युसूफ नाईक , मोरा तांडेल , युसूफ तांडेल , दौलतखान , भिकाजी मालदार , व महसुद महंमद .
■ छत्रपती शिवाजी महाराज आणि जंजिरा : -
दि. २४ ऑक्टोबर १६५७ , ला छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची स्थापना केली . स्वराज्याच्या आरमाराची सुरुवातीला सर्वजण निंदा करत होते , मात्र थोड्या काळातच कसून तयारी करवून घेऊन दर्यात जगातील दर्यावर्दीपणात नैपुण्य मिळविलेल्या लोकांपासूनही आपले संरक्षण करण्याइतकी शक्ती छत्रपती शिवाजी - संभाजी महाराजांच्या आरामात आली होती . सर्वत्र शत्रूंमध्ये [ पोर्तुगीज , टोपीकर इंग्रज , आणि सिद्दी ] मराठ्यांची दहशत होती . रायरी प्रभावलीचा भाग ताब्यात आल्यापासून मराठ्यांचा सिद्दीशी प्रत्यक्ष संबंध आला , आणि मराठे-हबशी संघर्षास सुरुवात झाली . सभासद
म्हणतो , " घरात जैसा उंदीर , तैसा महाराजां -
- च्या राज्यास सिद्दी " , निर्विवाद हे सत्य होते .
शिवरायांनी जंजिरा जिंकण्याकरीता एकूण ८ प्रयत्न केले होते , परंतु सगळ्यावेळी अपयश आले होते . अफाट समुद्र आणि जंजिऱ्यासारखा बेलाख जलदुर्ग , हे सिद्दीच्या विजयाचे कारण होते , तसेच सिद्दी हा स्वतः हुशार , कसलेला योद्धा , तो कुणाला चुकून देतंच नसत आणि चुकलाच किंवा फितुरी केली , तर एक तर त्याचं शीर मारायचे नाहीतर पोत्यात भरून समुद्रात जलसमाधी द्यायचे , एकंदरीत जंजिरा अभेद्य होता .
■ छत्रपती संभाजी महाराज आणि जंजिरा : -
शंभूराजांनी शिवरायांचे अधुरे स्वप्न आणि रयतेच्या कल्याणाकरीता जंजिरा घ्यावयाचे ठरविले , त्यासाठी त्यांनी गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईकांसोबत , " जंजिरा बाहेरून नाहीतर आतून घ्यायचा " , अशी नीती ठरविली , त्याकरिता त्यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांचे शिष्य , शूरवीर कोंडाजी फर्जंद यांची निवड केली , कोंडाजींबद्दल माहिती खालीलप्रमाणे : -
कोंडाजी फर्जंद , महाबलशाली , आणि बुद्धिवान वीर . एकंदर आयुष्यात स्वराज्यकरिता खूप कष्ट घेतले , महाराजांनी दिलेल्या प्रत्येक मोहिमेत , पराक्रम गाजवून यश संपादन करायचे . महाराजांच्या इच्छेखातर दुर्ग पन्हाळा एका रात्रीत , मात्र ६० मावळ्यांनी- -शी सर करणारा , शूरवीर . कधीही स्वार्थ पाहिला नाही , " आयुष्यभर कोंडाजींनी एकचं
प्रामाणिकपणे कर्म केले , स्वराज्यनिष्ठा " .
शंभूराजांनी जंजिरा सर करण्यासाठी कूटनीतीचा अवलंब केला , रणनीती अशी होती कि , ' सिद्दीला त्याच्या वारूळात गाठून मारणे , हा गनिमी कावा होता . जंजिरा ह्या जलदुर्गाची मुख्य ताकद होती , म्हणजे त्याच्या तोफा , जलदुर्गावर ३८० तोफा आणि ३ अजस्त्र तोफा होत्या , म्हणून जलदुर्गावर प्रवेश करणे कठीण होते , याआधीही शिवछत्रपतींचा ८ वेळा जंजिऱ्यावर भगवा फडकविण्याच्या प्रयत्नांवर पाणी पडले होते, वास्तविक , सतराव्या शतकात , " जेथे शिवराय तेथे विजय " हे संपूर्ण हिंदुस्थानात समीकरणच ठरले होते , मात्र अपवाद ठरत होता , तो म्हणजे ' जंजिरा ' , ( कारण जंजिरा हा एक मुख्य जलदुर्ग होता , मुळात प्रत्येक जलदुर्ग हा सागरामुळे सुरक्षितच असतो , शिवाय जर आरमाराच्या सह्यायने जर जंजिरा जिंकायचा म्हटल्यास , जंजिऱ्यावरील आत्याधुनिक तोफांमुळे गलबत पाणीमोल होत , नष्ट होत .)
संभाजी महाराजांनी बरोबर हेच हेरले , आणि जंजिऱ्याची ताकद म्हणजे , तोफांना लागणारा दारुगोळा , तोच नष्ट करायचा , जंजिऱ्यावरील दारूगोळ्याचे कोठार उडवून द्यायचे , ऐकुन काय तर
जंजिऱ्याच्या छाताड्यावरच जोरदार वार करायचा आणि जंजिरा सर करायचा " , आणि शिवछत्रपतींचे अधुरे स्वप्न पूर्ण करायचे , अशी प्राथमिक रणनिती शंभूराजांनी ठरविली .
[◆] रणनिती : -
दुसऱ्यादिवशी मसलतखाण्यात छत्रपती संभाजी महाराज , गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक , आणि कोंडाजी फर्जंद ह्यांच्यात मसलत सुरू झाली [ जंजिरा मोहीम अत्यंत जोखमीची असल्याकारणाने ह्या मसलतीत इतर कोणालाही घेतले नाही ] , ह्या मसलतीत खलील रणनिती ठरली :
प्रथम कोंडाजी फर्जंद , ठरलेल्या दिवशी , दारूगोळ्याच्या कोठारात स्फोट घडवून आणतील , व जंजिऱ्यावरील ३ महाकाय तोफा , अर्थात कलालबांगडी , लांडा कासम , चावरी ह्या तोफा निकामी करतील , मग पदमदुर्गावरून मायनाक भंडारी , आरमाराच्या सह्यायने सिद्दीच्या आरामारावर हमला करतील , दारूगोळ्याच्या स्फोटामूळे , जंजिऱ्यात सगळीकडे धावपळ सुरू असेल , ह्या संधीचा फायदाघेऊन थोर सरदार लायजी पाटील , जलदुर्गाला शिड्या लावतील , पुढे शिड्यांच्या साहाय्याने सरदार दादाजी देशपांडे , मावळ्यांसह जंजिऱ्यामध्ये प्रवेश घेतील , आणि हबशांना कापून , जंजिऱ्यावर भगवा फडकवतील [ ह्या प्रत्येकचालीत एक इशारा असेल ] , आणि विशेष सर्वमावळ्यांचा पराक्रम पाहण्याकरीता दस्तुरखुद्द महामहिम छत्रपती संभाजी महाराज किनाऱ्यावर असतील . ह्या सर्वात कोंडाजींची भूमिका अतिशय महत्वाची होती , परंतु कोंडाजींनी निर्भयपणे मोहीम हाती घेतली . मसलत आटोपली , ठरल्याप्रमाणे सर्वजण प्रबळ आत्मविश्वासाने , मसलतखान्यातून बाहेर गेले .
■ कोंडाजी फितूर झाला : -
सिद्दी बंधू महाचालाख , संशयी होते [ विशेषतः सिद्दी खैरत ] , त्यांचा पुढे कोंडाजींवर भरोसा करण्यासाठी , कोंडाजी फितूर झाल्याची वार्ता स्वराज्यात सगळीकडे बहिर्जींमार्फत पसरविण्यात आली . नंतर कोंडाजींनी अब्दुल्ला उर्फ अप्पा दळवी ह्याच्यामार्फतच जंजिऱ्यात जाण्याचे ठरविले ,
अब्दुल्लानेही त्याच्या तरक्कीकरीता नामी संधी
समजून खैरत ला कोंडाजीबद्दल सांगू लागला , सिद्दी खैरत हा कोंडाजींच्या पराक्रमाबद्दल एकूण होता , त्यामुळे पुढच्या काही दिवसातच कोंडाजी आपल्या कुटूंबासह व ११ सहकाऱ्यां निशी सिद्दीला जाऊन मिळाले . सिद्दी बंधूंनी कोंडाजींचे यथोचित स्वागत केले , आदराने कोंडाजी जंजिऱ्यावर चाकरी करायला लागले
, पुढे तर कोंडाजींचे काम पाहून सिद्दीने त्यांना जंजिऱ्याचा सुरक्षाप्रमुख म्हणून नेमले , पुढे कोंडाजी आणि त्याच्या मदतनिसांनी मिळून दारूगोळ्याचे कोठार शोधले , आता सर्वजण ठरलेल्या दिवसाची वाट पाहू लागले , प्रत्येकजण आपापली कामे योग्य रीतीने करत , चुकीला जागाच नव्हती ; कारण एक चूक सगळ्या मेहनतीवर समुद्राचं खार पाणी पसरविणार होती .
■ रणकंदन : -
आता मात्र दोनचं दिवस राहील होतं , सगळं अगदी ठरविल्याप्रमाणे होत होत ,अखेर ठरलेला दिवस उजाडला , त्या दिवशी सूर्य पावल्यावर बरोबर अडीच प्रहराने (१ प्रहर म्हणजे ३ तास ) दारूगोळ्याच्या कोठाराला आग लागली होती ; परंतु त्यादिवशी नियतीने
घात सिद्दी खैरतला मराठ्यांच्या काव्याची खबर लागली , तात्काळ कोंडाजींची गर्दन मारली , इतर साथीदार सापडले त्यांना जलसमाधी दिली , काहींनी तटावरून उड्या टाकल्या , सर्वांमधून कदाचित एक मावळा किनाऱ्यावर खबर देण्याकरिता आला असावा , पुढे कोंडाजींच्या शरीरास तोफेच्या तोंडी दिलं , इकडं शंभूराजे निघण्यास तयारच होते , तेवढ्यात हेरानी त्यांस घडलेला सर्व प्रकार सांगितला , राजांना खूप दुःख झालं . राजे , शहजादा अकबर तसेच कवी कलशांसह
लगोलग ५ हजाराची फौज घेऊन निघाले , त्याआधीच हेरांकडवी , सरदार दादाजी देशपांडे आणि विसाजी यांस २० हजाराच्या फौझेनिशी दंडाराजपूरीस वेढा घालावयास
सांगितले【 दादाजी व विसाजी हे महापराक्रमी वीर मुरारबाजी देशपांडे ह्यांच्या वंशातील होते 】, तसेच एक खलिता तात्काळ पोर्तुगीजांना पाठीवला आणि त्यांना स्पष्ठरित्या धमकी दिली , " माझ्या माणसांना दंडाराजपुरी
वर उतरण्यास मदत न केली , तर खालच्या चौलच्या कोटाचे सर्व बुरुज जमीनदोस्त करून टाकीन " , अतिशय जलद वेगाने आले , आणि सर्व नेतृत्व आपल्या हाती घेतले , शंभूराजे स्वतः जातीने आलेत हे पाहून सिद्दी खैरत हबकला .शंभूराजांनी आदेश दिला , " डागा तोफा जंजिऱ्यावर " . मराठ्यांनी आधुनिक अशा ५ तोफा जंजिऱ्याच्या रोखाने लावल्या , तोफांचा भडिमार सुरू झाला ,किल्लेदारासोबत मुकाबला केला , तोफेमधून दारूचे गोळे सतत फेकले जात होते , प्रत्येक तोफगोळ्याचे वजन हे पावणे ४ शेर होते , शत्रूकडूनही प्रतिहल्ला होत होता , पण कोंडाजी आणि इतर मावळ्यांच्या बलिदानामुळे मराठे अतिशय त्वेषाने लढत होते , दुर्गाच्या भिंती तोफगोळ्यांमुळे पडत होत्या ,सिद्दी खैरच आणि सिद्दी कासीम हे दोघेही एका टेकडीच्या आधारे लपून बसले होते ; परंतुत्यांच्या होड्या मात्र जंजिऱ्याभोवती गस्त घालीत होत्या , त्यामुळे जंजिऱ्यात प्रवेश करणे शक्य नव्हते , पण विजयाकरिता प्रवेश अनिवार्य होता .
राजांनी विलक्षण निर्णय घेतला , कि ज्या प्रमाणे प्रभूरामचंद्रांनी लंकेपर्यंत पोह्चण्याकरिता , समुद्रात सेतू बांधला होता , त्या प्रमाणे शंभूराजांनी जंजिऱ्याच्या समुद्रावर सेतू बांधण्याचा निर्धार केला , आणि बघता बघता सेतू बांधण्याचे काम सुरू झाले , ८०० यार्ड रुंद आणि ३० यार्ड खोल असणारा खंदक दगड , लाकडे , कापसाची गाठोडी वैगेरे टाकून आपल्या सैन्याकरीता मार्ग निर्माण केला , वास्तविक समुद्राला भरती आल्यामुळे हा शंभूराजांचा प्रयत्न असफल झाला , पण हा सेतू पाहून सिद्दी अचंबीतच झाला होता .
त्यावेळी मोगलांचा सुभेदार याकूतखान हा राजपुरीवरच होता , त्याने औरंगजेबास वरील सर्व युद्धघटनेची तपशीलवार माहिती दिली , औरंगजेब महाधूर्त होता , त्याला पूर्णतः ठाऊक होते , अगर जंजिरा मराठ्यांच्या ताब्यात गेला , तर पुढची कित्येक वर्षे सागरी सत्तेवर मराठ्यांचेच वर्चस्व राहील , म्हणुन त्याने एक जहरी डाव टाकला , त्याने हसनअलीखानास मोठी फौज देऊन कोकणात पाठविले , बहिर्जी नाईकांनी ही खबर स्वतः राजांना दिली , खान चालून येतोय हे समजताच राजांना ह्या वेढ्यातून अंग काढून घेणे भाग पडले . दि. ४ फेब्रुवारी १६८२ ला हसनअलीखानाने कल्याण -
- भिवंडीला वेढा घातल्याची बातमी राजांना मिळाली . शंभूराजांना मूळ स्वराज्याचे संरक्षण करणे गरजेचे होते , सिद्दीपेक्षा मुघलांशी मुकाबला करणे गरजेचे होते , पुढे राजांनी वेढ्याची संपुर्ण जबाबदारी ही दादाजी आणि विसाजी रघुनाथां - कडे सोपविली , त्यांच्याबरोबर मायनाक भंडारी , कावजी मोहंमद , गोविंद कान्होजी आंग्रे , गोविंदजी जाधव , उडाजी पडवळ , लायजी पाटील , आणि कवी कलश हे होते .मोहिमेच्या कामास उत्तेजन मिळावे म्हणोन , राजांनी अर्धा शेर सोनं आणि चांदीची कडी बक्षीस दिली . ३ जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत शंभूराजांनी सिद्दीला हतबल केले , पुढे फेब्रुवारी १६८२ च्या अखेरीस , संभाजी महाराज आणि शहजादा अकबर जंजिरा। मोहिमेवरून माघारी आले , राजे गंगोलीला
ट्रेकबर शहापूरला गेला .
राजे गेले असले तरी दादाजी , इतर सरदार आणि मावळे जंजिरा सर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते . मराठे जोरदार हल्ला करत होते , पुढे सिद्दी कासम आरमार घेऊन मुंबईस गेल्याचे कळताच , दादाजींच्या सैन्याने एके दिवशी अंधाऱ्या रात्री
कोटाला शिड्या लावून आत शिरण्याचा प्रयत्न सुरू केला , शिड्या ह्या लायजी पाटलांच्या नेतृत्वात लावल्या होते , पण किल्ल्यावरील हबशांनी केलेल्या दगडांच्या वर्षावात मराठ्यांचे ५०० लोक पडल्यामुळे दादाजी सैन्य घेऊन माघारी फिरले . मायनाक भंडारीनेही प्रयत्न केला , पण यश मिळाले नाही , तरीही संघर्ष सुरूच होता .
छत्रपती संभाजी राजांनी हसनअलीखानाचा पराभव केला ; पण जंजिरा हातातून निसटला . जंजिरा जरी स्वराज्यात आला नसला तरी , सिद्दीवर छत्रपती संभाजीराजांची चांगलीच जरब बसली होती , पुढे त्याने आपलं डोकं वर काढलं नाही , सर्व मराठ्यांनी जीवाची बाजी लावली , पण जंजिरा स्वराज्यात काही आला नाही . औरंगजेबाला पुरते कळून चुकले होते की , स्वराज्य आता मजबूत हातात सुरक्षित आहे ; कारण शंभूराजांनी जवळ जवळ जंजिरा घेतलाच होता , आणि हसनअलीखानाचा जोरदार
पराभव केला होता .
ह्या सर्व युद्धप्रसंगात , दि. १९ जाने. १६८२ रोजी , मुंबईकर इंग्रज सुरतकरांना कळवितात , " जोपर्यंत सिद्दी तह करीत नाही किंवा माघारी फिरत नाही तोपर्यंत संभाजीराजांस शांतता मिळणार नाही , त्याने तसा निग्रह केला आहे . अहवालावरून असे समजते की , तो समुद्रा - वरील सर्व ख्रिस्त्यांना नष्ट करून सर्व सागरी ठाणी घेईल , त्याकरिता त्याने चांगल्या शिपायांची सर्व शक्तीनिशी तयारी केली आहे . सिद्दीने जर इकडे प्रवेश केला तर आपण आपली संरक्षणयंत्रणा वाढविली पाहिजे , आणि संभाजीच्या बाबतीत पूर्णपणे जागरूक
राहिले पाहिजे . संभाजी विनाविलंब सिद्दीच्या विरुद्ध ताकद वाढविल , आपण मात्र पुरेसे दक्ष असावे , हे
बरे " .
■ जाणता राजा : -
छत्रपती शिवाजी - संभाजी महाराज हे , जाणते राजे होते , दोघांची ताकद ही रयतेचे सुख ही होते , तर कमजोरी होती , रयतेचे दुःख . ही जंजिरा मोहीम सुरू होण्याअगोदर , छत्रपती संभाजी महाराजांच्या सांगण्यावरूनच , कोंडाजी फर्जंद स्वराज्याशी बेबनाव करून सिद्दीला मिळाले [ राजकारण होते ते ] , ह्याचा त्यावेळी असा परिणाम झाला
की , रायगडापासून पार जिंजीपर्यंत , मंत्र्यांपासून ते सामान्य रयतेपर्यंत , सर्वजण कोंडाजींना दूषणं देत होते , स्वराज्याशी गद्दारी केली वा फितूर समजत होती , हा एक प्रकारचा कलंक होता . पुढे संभाजी महाराजांनी एक आदेश दिला , " कोंडाजींचा जंजिरा मोहिमेतील
पराक्रम संपुर्ण स्वराज्याला कळावा , ह्याकरिता
गावागावात जाऊन कोंडाजींची भूमिका स्पष्ट केली " , शंभूराजे इथेच थांबले नाहीत त्यांनी कोडाजींच्या परिवारास योग्य ते साहाय्य केले , तर इतर जे मावळे शहिद झाले होते त्यांच्याही कुटुंबास मदत केली , म्हणोनच छत्रपती संभाजी महाराज हे , छत्रपती शिवरायांप्रमाणे , " जाणता राजा " होते , न आहेत , व काळाच्या अस्तापर्यंत राहतील " .
विशेष टीप : - छत्रपती संभाजी महाराजांसाठी , प्राणाची बाजी लावण्यात कोंडाजी फर्जंद हा प्रथम वीर ठरला .
अशा महान वीराला माझे अभिवादन , आणि स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूमहाराजांच्या पवित्र चरणी माझा मानाचा मुजरा ....
" जर जंजिरा अजय आहे , तर शंभूराजे अजिंक्य आहेत " .
= ■ = ●●●●●●●●●●● = ■ =
संदर्भ ग्रंथ : -
छत्रपती संभाजी महाराज ( श्री. वा. सी. बेंद्रे ) , छत्रपती शिवाजी महाराज ( श्री. वा. सी. बेंद्रे ) , शिवपुत्र संभाजी ( सौ. कमळ गोखले ) , ज्वलनज्वलज्वतेजस संभाजीराजा ( डॉ . सदाशिव शिवदे ) , रणवीर संभाजी ( श्री. मनोज पाटील ) , मराठ्यांची इतिहासाची साधने , ऐतिहासिक पत्रव्यवहार , ऐतिहासिक बखरी , इंग्लिश दस्ताऐवज , छत्रपती संभाजी महाराज एक चिकित्सा ( डॉ. जयसिंगराव पवार ) , आणि इतर ग्रंथ .
हा लेख अभ्यासुरीतीने वाचल्यानंतर ह्या लेखाला जोडून , " शंभूराजांची सिद्दीवर जरब , आणि कोकणप्रांतावरील रंणसंग्राम " हे वरील विषयास धरून असलेले लेख अवश्य वाचावे ,तसेच इतर माहितीपूर्ण , ऐतिहासिक लेख अभ्यासणाकरीता खालील लिंकला अवश्य भेट द्या : -
https://www.facebook.com/ जगविजेता-संभाजी-22124527290 12520/
" अखंड भारताचा विजय आहे " .
|| जय हिंद ||
~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमहितीगार)
ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 / 7741923346 .
【 छत्रपतींच्या महावीरांच्या शौर्यगाथा 】
शिवबाचे शूरवीर , हा " जगविजेता संभाजी " , ह्या ऐतिहासिक माहिती दर्शविणाऱ्या फेसबुक पेजचा , अतिविशेष उपक्रम . ह्या उपक्रमात आपण छत्रपती
शिवरायांच्या निष्ठावंत आणि पराक्रमी , महाबली वीरांच्या इतिहासाचा अभ्यास करणार आहोत . तर ह्या उपक्रमातील दुसरे स्वराज्यनिष्ठ वीर आहेत ," शूरवीर कोंडाजी फर्जंद " , ह्या अतिविशेष लेखात कोंडाजींची
जंजिरा मोहिमेतील कामगिरीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत .
" शूरवीर कोंडाजी "
सन १६८१ , सिद्दीने त्याच्या हद्दी जवळील स्वराज्यातील गावात लुटालूट ,जाळपोळ आणि कत्तल सुरू केली . [ हे सर्व सिद्दी औरंगजेबाच्या सांगण्यावरून करत होता ] हशम प्रामाणिक रयतेवर जुलूम करत , स्त्रियांना बाटवत , तसेच स्त्रीया - पुरुषांचा , लहान पोरांचा विदेशात गुलाम म्हणून व्यापार करत असत , कित्येकांचा धर्म बद्लवीत असत त्याला पायबंद घालण्याची नितांत गरज होती . असं नाही की शंभूराजांचं ह्याकडे लक्ष नव्हतं , त्यांनी ज्यादा फौज हद्दीच्या गावागावात ठेवली , तरीही सिद्दी बंधू कुरापती काढतच होते . अशातच एक वाईट घटना घडली उंदेरीनजीकच मराठे आणि हशमांत लढाई झाली त्यात ८० मावळे कामी आले आणि थोर सरदार मायनाक भंडारी ह्यांचा मुलगा देखील धारातीर्थी पडला , पण हबशांनी त्याचं मस्तक हे धडावेगळे करून पुढे मराठ्यांना भेट म्हणोन पाठविलं , ज्यावेळी ही बातमी शंभुराजांना समजली , तेव्हा राजांचीतळपायाची आग मस्तकात गेली . त्याक्षणी राजांनी निर्धार केला की , " जंजिरा स्वराज्यात आणायचाच " .
■ जंजिरा घेण्याचे मुख्य कारण : -
जंजिरा स्वराज्यात असावा हे , थोरल्या महाराजांचं स्वप्न होतं आणि तसेच किनाऱ्यालगतच्या रयतेवर सतत होणाऱ्या अन्यायावर प्रतिबंध लागावा , हे मुख्य कारण होतं .
■ जंजिरा आणि हबसाण : -
जंजिरा , मूळ नाव " जझिरे - मेहरुब "
म्हणजेच चंद्रकोर आकाराचा जलदुर्ग .हा आधी निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता , नंतर इ.स. १६२० मध्ये सिद्दीच्या अधिपत्यात आला , हबशांचा अंमल सुरू झाला . ऍबेसिनिया ( abesiniya ) उर्फ हबसाण ह्या अफ्रिकेच्या भागातून सिद्दी लोकं आले .
हबसाण ह्या शब्दातून हबशी हा शब्द निर्माण झाला , ह्या हबशी लोकांची एक फितरत होती , हे नेहमी महासत्तेशी नमून राहत आणि स्वतःचा बचाव करत असत . ह्या हबसाणात , जिंजीरा जलदुर्ग , मुरूड , नांदगाव , मांडले , श्रीवर्धन , म्हसले , गोवले , व पंचायतन असा प्रदेश होता . तसेच त्यांचे एकूण क्षेत्रफळ हे ३२५ चौरस मैल
होते , आणि हबसाणाच्या उत्तरेस कुंडलिका नदी व रोह्याची खाडी , दक्षिणेस सावित्री नदी , पूर्वेस रायगड जिल्ह्यातील रोहा , माणगाव , व महाड तालुक्याचा भाग , व पश्चिमेस अरबी समुद्र , तसेच विशेष म्हणजे पश्चिमेस ४० मैलांच्या समुद्रकिनाऱ्याखेरीज बाणकोटच्या खाडीचा १७ मैल किनारा , व रोह्याच्या खाडीचा ४ - ५ मैलांचा किनारा सिद्दीच्या आरमारास अतिशय महत्वपुर्ण होता , याशिवाय राजपुरीचे मध्य आखात १४ मैल लांब असून बरीच रुंद असल्याने , ही जागा आरमारास खूप उपयुक्त होती .
जंजिरा हा जलदुर्ग , हबसाणाचे मुख्य ठिकाण असून तो राजपुरीच्या आखाताच्या अगदी तोंडावर आहे . जंजिऱ्याचा आकार हा अर्धवर्तुळाकार असून , सभोवतील तट फार मजबूत व उंच आहेत , तसेच १९ मुख्यबुरुज व ४ उपबुरुज , आणि दुर्गाच्या सौरक्षणसाठी ३८० ते ४०० तोफा , ५० लाकडी
तोफाआणि महत्वपुर्ण म्हणजे जंजिऱ्याची खरी ताकद ३ अजस्त्र तोफा , " कलालबांगडी , लांडा कासम , व चावरी " , त्यात विशेष म्हणजे कलालबांगडी ही जंजिऱ्यातील सर्वात मोठी , अचूक मारा करणारी , व लांब पल्ल्याची तोफ होती आणि त्यात दर्याचे सौरक्षण , पूर्ण ओहोटीचे वेळी ह्या दुर्गाचा मात्र कातळावरील पाया दिसतो , पण तेथे समुद्राची भरती ४० - ५० फोटांपर्यंत चढते . दुर्गाच्या पूर्वेस एक मोठा दरवाजा असून त्याला थेट पाण्याच्या सखल भागापर्यंत पायऱ्या बांधलेल्या होत्या ; पश्चिमेच्या बाजूस १ ओटा असून ते भरतीच्या पाण्याच्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक उंचावर आहे , या ओट्यावर जाण्याकरिता एक लहान दरवाजा आहे . हा जलदुर्ग अत्यंत बेलाख असून अत्यंत अवघड ठिकाणी बांधला गेलाय .
सन १६२० मध्ये , जंजिऱ्याची आणि राजपुरीची सुभेदारी सिद्दी हबशांकडे आली , सिद्दीच्या कारकीर्दी पुढीलप्रमाणे : -
◆ सिद्दी सुरतअब्दुल्लाखान : - सन (१२२० - १६२६) ,
◆ सिद्दी अंबर : - सन (१६२६ - १६४२) ,
◆ सिद्दी युसूफ : - सन (१६४२ - १६४८) ,
◆ सिद्दी फत्तेखान : - सन (१६४८ - १६६७) ,
◆ सिद्दी खैरत : - सन (१६६७ - १६९६) .
आणि
● सिद्दीचे सरदार : -
अब्दुल्ला दळवी , हसनजी
छर्ग , आबाजी व मस्तीखान , हसनजी व मालिकजी बिन युसूफ नाईक , मोरा तांडेल , युसूफ तांडेल , दौलतखान , भिकाजी मालदार , व महसुद महंमद .
■ छत्रपती शिवाजी महाराज आणि जंजिरा : -
दि. २४ ऑक्टोबर १६५७ , ला छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची स्थापना केली . स्वराज्याच्या आरमाराची सुरुवातीला सर्वजण निंदा करत होते , मात्र थोड्या काळातच कसून तयारी करवून घेऊन दर्यात जगातील दर्यावर्दीपणात नैपुण्य मिळविलेल्या लोकांपासूनही आपले संरक्षण करण्याइतकी शक्ती छत्रपती शिवाजी - संभाजी महाराजांच्या आरामात आली होती . सर्वत्र शत्रूंमध्ये [ पोर्तुगीज , टोपीकर इंग्रज , आणि सिद्दी ] मराठ्यांची दहशत होती . रायरी प्रभावलीचा भाग ताब्यात आल्यापासून मराठ्यांचा सिद्दीशी प्रत्यक्ष संबंध आला , आणि मराठे-हबशी संघर्षास सुरुवात झाली . सभासद
म्हणतो , " घरात जैसा उंदीर , तैसा महाराजां -
- च्या राज्यास सिद्दी " , निर्विवाद हे सत्य होते .
शिवरायांनी जंजिरा जिंकण्याकरीता एकूण ८ प्रयत्न केले होते , परंतु सगळ्यावेळी अपयश आले होते . अफाट समुद्र आणि जंजिऱ्यासारखा बेलाख जलदुर्ग , हे सिद्दीच्या विजयाचे कारण होते , तसेच सिद्दी हा स्वतः हुशार , कसलेला योद्धा , तो कुणाला चुकून देतंच नसत आणि चुकलाच किंवा फितुरी केली , तर एक तर त्याचं शीर मारायचे नाहीतर पोत्यात भरून समुद्रात जलसमाधी द्यायचे , एकंदरीत जंजिरा अभेद्य होता .
■ छत्रपती संभाजी महाराज आणि जंजिरा : -
शंभूराजांनी शिवरायांचे अधुरे स्वप्न आणि रयतेच्या कल्याणाकरीता जंजिरा घ्यावयाचे ठरविले , त्यासाठी त्यांनी गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईकांसोबत , " जंजिरा बाहेरून नाहीतर आतून घ्यायचा " , अशी नीती ठरविली , त्याकरिता त्यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांचे शिष्य , शूरवीर कोंडाजी फर्जंद यांची निवड केली , कोंडाजींबद्दल माहिती खालीलप्रमाणे : -
कोंडाजी फर्जंद , महाबलशाली , आणि बुद्धिवान वीर . एकंदर आयुष्यात स्वराज्यकरिता खूप कष्ट घेतले , महाराजांनी दिलेल्या प्रत्येक मोहिमेत , पराक्रम गाजवून यश संपादन करायचे . महाराजांच्या इच्छेखातर दुर्ग पन्हाळा एका रात्रीत , मात्र ६० मावळ्यांनी- -शी सर करणारा , शूरवीर . कधीही स्वार्थ पाहिला नाही , " आयुष्यभर कोंडाजींनी एकचं
प्रामाणिकपणे कर्म केले , स्वराज्यनिष्ठा " .
शंभूराजांनी जंजिरा सर करण्यासाठी कूटनीतीचा अवलंब केला , रणनीती अशी होती कि , ' सिद्दीला त्याच्या वारूळात गाठून मारणे , हा गनिमी कावा होता . जंजिरा ह्या जलदुर्गाची मुख्य ताकद होती , म्हणजे त्याच्या तोफा , जलदुर्गावर ३८० तोफा आणि ३ अजस्त्र तोफा होत्या , म्हणून जलदुर्गावर प्रवेश करणे कठीण होते , याआधीही शिवछत्रपतींचा ८ वेळा जंजिऱ्यावर भगवा फडकविण्याच्या प्रयत्नांवर पाणी पडले होते, वास्तविक , सतराव्या शतकात , " जेथे शिवराय तेथे विजय " हे संपूर्ण हिंदुस्थानात समीकरणच ठरले होते , मात्र अपवाद ठरत होता , तो म्हणजे ' जंजिरा ' , ( कारण जंजिरा हा एक मुख्य जलदुर्ग होता , मुळात प्रत्येक जलदुर्ग हा सागरामुळे सुरक्षितच असतो , शिवाय जर आरमाराच्या सह्यायने जर जंजिरा जिंकायचा म्हटल्यास , जंजिऱ्यावरील आत्याधुनिक तोफांमुळे गलबत पाणीमोल होत , नष्ट होत .)
संभाजी महाराजांनी बरोबर हेच हेरले , आणि जंजिऱ्याची ताकद म्हणजे , तोफांना लागणारा दारुगोळा , तोच नष्ट करायचा , जंजिऱ्यावरील दारूगोळ्याचे कोठार उडवून द्यायचे , ऐकुन काय तर
जंजिऱ्याच्या छाताड्यावरच जोरदार वार करायचा आणि जंजिरा सर करायचा " , आणि शिवछत्रपतींचे अधुरे स्वप्न पूर्ण करायचे , अशी प्राथमिक रणनिती शंभूराजांनी ठरविली .
[◆] रणनिती : -
दुसऱ्यादिवशी मसलतखाण्यात छत्रपती संभाजी महाराज , गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक , आणि कोंडाजी फर्जंद ह्यांच्यात मसलत सुरू झाली [ जंजिरा मोहीम अत्यंत जोखमीची असल्याकारणाने ह्या मसलतीत इतर कोणालाही घेतले नाही ] , ह्या मसलतीत खलील रणनिती ठरली :
प्रथम कोंडाजी फर्जंद , ठरलेल्या दिवशी , दारूगोळ्याच्या कोठारात स्फोट घडवून आणतील , व जंजिऱ्यावरील ३ महाकाय तोफा , अर्थात कलालबांगडी , लांडा कासम , चावरी ह्या तोफा निकामी करतील , मग पदमदुर्गावरून मायनाक भंडारी , आरमाराच्या सह्यायने सिद्दीच्या आरामारावर हमला करतील , दारूगोळ्याच्या स्फोटामूळे , जंजिऱ्यात सगळीकडे धावपळ सुरू असेल , ह्या संधीचा फायदाघेऊन थोर सरदार लायजी पाटील , जलदुर्गाला शिड्या लावतील , पुढे शिड्यांच्या साहाय्याने सरदार दादाजी देशपांडे , मावळ्यांसह जंजिऱ्यामध्ये प्रवेश घेतील , आणि हबशांना कापून , जंजिऱ्यावर भगवा फडकवतील [ ह्या प्रत्येकचालीत एक इशारा असेल ] , आणि विशेष सर्वमावळ्यांचा पराक्रम पाहण्याकरीता दस्तुरखुद्द महामहिम छत्रपती संभाजी महाराज किनाऱ्यावर असतील . ह्या सर्वात कोंडाजींची भूमिका अतिशय महत्वाची होती , परंतु कोंडाजींनी निर्भयपणे मोहीम हाती घेतली . मसलत आटोपली , ठरल्याप्रमाणे सर्वजण प्रबळ आत्मविश्वासाने , मसलतखान्यातून बाहेर गेले .
■ कोंडाजी फितूर झाला : -
सिद्दी बंधू महाचालाख , संशयी होते [ विशेषतः सिद्दी खैरत ] , त्यांचा पुढे कोंडाजींवर भरोसा करण्यासाठी , कोंडाजी फितूर झाल्याची वार्ता स्वराज्यात सगळीकडे बहिर्जींमार्फत पसरविण्यात आली . नंतर कोंडाजींनी अब्दुल्ला उर्फ अप्पा दळवी ह्याच्यामार्फतच जंजिऱ्यात जाण्याचे ठरविले ,
अब्दुल्लानेही त्याच्या तरक्कीकरीता नामी संधी
समजून खैरत ला कोंडाजीबद्दल सांगू लागला , सिद्दी खैरत हा कोंडाजींच्या पराक्रमाबद्दल एकूण होता , त्यामुळे पुढच्या काही दिवसातच कोंडाजी आपल्या कुटूंबासह व ११ सहकाऱ्यां निशी सिद्दीला जाऊन मिळाले . सिद्दी बंधूंनी कोंडाजींचे यथोचित स्वागत केले , आदराने कोंडाजी जंजिऱ्यावर चाकरी करायला लागले
, पुढे तर कोंडाजींचे काम पाहून सिद्दीने त्यांना जंजिऱ्याचा सुरक्षाप्रमुख म्हणून नेमले , पुढे कोंडाजी आणि त्याच्या मदतनिसांनी मिळून दारूगोळ्याचे कोठार शोधले , आता सर्वजण ठरलेल्या दिवसाची वाट पाहू लागले , प्रत्येकजण आपापली कामे योग्य रीतीने करत , चुकीला जागाच नव्हती ; कारण एक चूक सगळ्या मेहनतीवर समुद्राचं खार पाणी पसरविणार होती .
■ रणकंदन : -
आता मात्र दोनचं दिवस राहील होतं , सगळं अगदी ठरविल्याप्रमाणे होत होत ,अखेर ठरलेला दिवस उजाडला , त्या दिवशी सूर्य पावल्यावर बरोबर अडीच प्रहराने (१ प्रहर म्हणजे ३ तास ) दारूगोळ्याच्या कोठाराला आग लागली होती ; परंतु त्यादिवशी नियतीने
घात सिद्दी खैरतला मराठ्यांच्या काव्याची खबर लागली , तात्काळ कोंडाजींची गर्दन मारली , इतर साथीदार सापडले त्यांना जलसमाधी दिली , काहींनी तटावरून उड्या टाकल्या , सर्वांमधून कदाचित एक मावळा किनाऱ्यावर खबर देण्याकरिता आला असावा , पुढे कोंडाजींच्या शरीरास तोफेच्या तोंडी दिलं , इकडं शंभूराजे निघण्यास तयारच होते , तेवढ्यात हेरानी त्यांस घडलेला सर्व प्रकार सांगितला , राजांना खूप दुःख झालं . राजे , शहजादा अकबर तसेच कवी कलशांसह
लगोलग ५ हजाराची फौज घेऊन निघाले , त्याआधीच हेरांकडवी , सरदार दादाजी देशपांडे आणि विसाजी यांस २० हजाराच्या फौझेनिशी दंडाराजपूरीस वेढा घालावयास
सांगितले【 दादाजी व विसाजी हे महापराक्रमी वीर मुरारबाजी देशपांडे ह्यांच्या वंशातील होते 】, तसेच एक खलिता तात्काळ पोर्तुगीजांना पाठीवला आणि त्यांना स्पष्ठरित्या धमकी दिली , " माझ्या माणसांना दंडाराजपुरी
वर उतरण्यास मदत न केली , तर खालच्या चौलच्या कोटाचे सर्व बुरुज जमीनदोस्त करून टाकीन " , अतिशय जलद वेगाने आले , आणि सर्व नेतृत्व आपल्या हाती घेतले , शंभूराजे स्वतः जातीने आलेत हे पाहून सिद्दी खैरत हबकला .शंभूराजांनी आदेश दिला , " डागा तोफा जंजिऱ्यावर " . मराठ्यांनी आधुनिक अशा ५ तोफा जंजिऱ्याच्या रोखाने लावल्या , तोफांचा भडिमार सुरू झाला ,किल्लेदारासोबत मुकाबला केला , तोफेमधून दारूचे गोळे सतत फेकले जात होते , प्रत्येक तोफगोळ्याचे वजन हे पावणे ४ शेर होते , शत्रूकडूनही प्रतिहल्ला होत होता , पण कोंडाजी आणि इतर मावळ्यांच्या बलिदानामुळे मराठे अतिशय त्वेषाने लढत होते , दुर्गाच्या भिंती तोफगोळ्यांमुळे पडत होत्या ,सिद्दी खैरच आणि सिद्दी कासीम हे दोघेही एका टेकडीच्या आधारे लपून बसले होते ; परंतुत्यांच्या होड्या मात्र जंजिऱ्याभोवती गस्त घालीत होत्या , त्यामुळे जंजिऱ्यात प्रवेश करणे शक्य नव्हते , पण विजयाकरिता प्रवेश अनिवार्य होता .
राजांनी विलक्षण निर्णय घेतला , कि ज्या प्रमाणे प्रभूरामचंद्रांनी लंकेपर्यंत पोह्चण्याकरिता , समुद्रात सेतू बांधला होता , त्या प्रमाणे शंभूराजांनी जंजिऱ्याच्या समुद्रावर सेतू बांधण्याचा निर्धार केला , आणि बघता बघता सेतू बांधण्याचे काम सुरू झाले , ८०० यार्ड रुंद आणि ३० यार्ड खोल असणारा खंदक दगड , लाकडे , कापसाची गाठोडी वैगेरे टाकून आपल्या सैन्याकरीता मार्ग निर्माण केला , वास्तविक समुद्राला भरती आल्यामुळे हा शंभूराजांचा प्रयत्न असफल झाला , पण हा सेतू पाहून सिद्दी अचंबीतच झाला होता .
त्यावेळी मोगलांचा सुभेदार याकूतखान हा राजपुरीवरच होता , त्याने औरंगजेबास वरील सर्व युद्धघटनेची तपशीलवार माहिती दिली , औरंगजेब महाधूर्त होता , त्याला पूर्णतः ठाऊक होते , अगर जंजिरा मराठ्यांच्या ताब्यात गेला , तर पुढची कित्येक वर्षे सागरी सत्तेवर मराठ्यांचेच वर्चस्व राहील , म्हणुन त्याने एक जहरी डाव टाकला , त्याने हसनअलीखानास मोठी फौज देऊन कोकणात पाठविले , बहिर्जी नाईकांनी ही खबर स्वतः राजांना दिली , खान चालून येतोय हे समजताच राजांना ह्या वेढ्यातून अंग काढून घेणे भाग पडले . दि. ४ फेब्रुवारी १६८२ ला हसनअलीखानाने कल्याण -
- भिवंडीला वेढा घातल्याची बातमी राजांना मिळाली . शंभूराजांना मूळ स्वराज्याचे संरक्षण करणे गरजेचे होते , सिद्दीपेक्षा मुघलांशी मुकाबला करणे गरजेचे होते , पुढे राजांनी वेढ्याची संपुर्ण जबाबदारी ही दादाजी आणि विसाजी रघुनाथां - कडे सोपविली , त्यांच्याबरोबर मायनाक भंडारी , कावजी मोहंमद , गोविंद कान्होजी आंग्रे , गोविंदजी जाधव , उडाजी पडवळ , लायजी पाटील , आणि कवी कलश हे होते .मोहिमेच्या कामास उत्तेजन मिळावे म्हणोन , राजांनी अर्धा शेर सोनं आणि चांदीची कडी बक्षीस दिली . ३ जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत शंभूराजांनी सिद्दीला हतबल केले , पुढे फेब्रुवारी १६८२ च्या अखेरीस , संभाजी महाराज आणि शहजादा अकबर जंजिरा। मोहिमेवरून माघारी आले , राजे गंगोलीला
ट्रेकबर शहापूरला गेला .
राजे गेले असले तरी दादाजी , इतर सरदार आणि मावळे जंजिरा सर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते . मराठे जोरदार हल्ला करत होते , पुढे सिद्दी कासम आरमार घेऊन मुंबईस गेल्याचे कळताच , दादाजींच्या सैन्याने एके दिवशी अंधाऱ्या रात्री
कोटाला शिड्या लावून आत शिरण्याचा प्रयत्न सुरू केला , शिड्या ह्या लायजी पाटलांच्या नेतृत्वात लावल्या होते , पण किल्ल्यावरील हबशांनी केलेल्या दगडांच्या वर्षावात मराठ्यांचे ५०० लोक पडल्यामुळे दादाजी सैन्य घेऊन माघारी फिरले . मायनाक भंडारीनेही प्रयत्न केला , पण यश मिळाले नाही , तरीही संघर्ष सुरूच होता .
छत्रपती संभाजी राजांनी हसनअलीखानाचा पराभव केला ; पण जंजिरा हातातून निसटला . जंजिरा जरी स्वराज्यात आला नसला तरी , सिद्दीवर छत्रपती संभाजीराजांची चांगलीच जरब बसली होती , पुढे त्याने आपलं डोकं वर काढलं नाही , सर्व मराठ्यांनी जीवाची बाजी लावली , पण जंजिरा स्वराज्यात काही आला नाही . औरंगजेबाला पुरते कळून चुकले होते की , स्वराज्य आता मजबूत हातात सुरक्षित आहे ; कारण शंभूराजांनी जवळ जवळ जंजिरा घेतलाच होता , आणि हसनअलीखानाचा जोरदार
पराभव केला होता .
ह्या सर्व युद्धप्रसंगात , दि. १९ जाने. १६८२ रोजी , मुंबईकर इंग्रज सुरतकरांना कळवितात , " जोपर्यंत सिद्दी तह करीत नाही किंवा माघारी फिरत नाही तोपर्यंत संभाजीराजांस शांतता मिळणार नाही , त्याने तसा निग्रह केला आहे . अहवालावरून असे समजते की , तो समुद्रा - वरील सर्व ख्रिस्त्यांना नष्ट करून सर्व सागरी ठाणी घेईल , त्याकरिता त्याने चांगल्या शिपायांची सर्व शक्तीनिशी तयारी केली आहे . सिद्दीने जर इकडे प्रवेश केला तर आपण आपली संरक्षणयंत्रणा वाढविली पाहिजे , आणि संभाजीच्या बाबतीत पूर्णपणे जागरूक
राहिले पाहिजे . संभाजी विनाविलंब सिद्दीच्या विरुद्ध ताकद वाढविल , आपण मात्र पुरेसे दक्ष असावे , हे
बरे " .
■ जाणता राजा : -
छत्रपती शिवाजी - संभाजी महाराज हे , जाणते राजे होते , दोघांची ताकद ही रयतेचे सुख ही होते , तर कमजोरी होती , रयतेचे दुःख . ही जंजिरा मोहीम सुरू होण्याअगोदर , छत्रपती संभाजी महाराजांच्या सांगण्यावरूनच , कोंडाजी फर्जंद स्वराज्याशी बेबनाव करून सिद्दीला मिळाले [ राजकारण होते ते ] , ह्याचा त्यावेळी असा परिणाम झाला
की , रायगडापासून पार जिंजीपर्यंत , मंत्र्यांपासून ते सामान्य रयतेपर्यंत , सर्वजण कोंडाजींना दूषणं देत होते , स्वराज्याशी गद्दारी केली वा फितूर समजत होती , हा एक प्रकारचा कलंक होता . पुढे संभाजी महाराजांनी एक आदेश दिला , " कोंडाजींचा जंजिरा मोहिमेतील
पराक्रम संपुर्ण स्वराज्याला कळावा , ह्याकरिता
गावागावात जाऊन कोंडाजींची भूमिका स्पष्ट केली " , शंभूराजे इथेच थांबले नाहीत त्यांनी कोडाजींच्या परिवारास योग्य ते साहाय्य केले , तर इतर जे मावळे शहिद झाले होते त्यांच्याही कुटुंबास मदत केली , म्हणोनच छत्रपती संभाजी महाराज हे , छत्रपती शिवरायांप्रमाणे , " जाणता राजा " होते , न आहेत , व काळाच्या अस्तापर्यंत राहतील " .
विशेष टीप : - छत्रपती संभाजी महाराजांसाठी , प्राणाची बाजी लावण्यात कोंडाजी फर्जंद हा प्रथम वीर ठरला .
अशा महान वीराला माझे अभिवादन , आणि स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूमहाराजांच्या पवित्र चरणी माझा मानाचा मुजरा ....
" जर जंजिरा अजय आहे , तर शंभूराजे अजिंक्य आहेत " .
= ■ = ●●●●●●●●●●● = ■ =
संदर्भ ग्रंथ : -
छत्रपती संभाजी महाराज ( श्री. वा. सी. बेंद्रे ) , छत्रपती शिवाजी महाराज ( श्री. वा. सी. बेंद्रे ) , शिवपुत्र संभाजी ( सौ. कमळ गोखले ) , ज्वलनज्वलज्वतेजस संभाजीराजा ( डॉ . सदाशिव शिवदे ) , रणवीर संभाजी ( श्री. मनोज पाटील ) , मराठ्यांची इतिहासाची साधने , ऐतिहासिक पत्रव्यवहार , ऐतिहासिक बखरी , इंग्लिश दस्ताऐवज , छत्रपती संभाजी महाराज एक चिकित्सा ( डॉ. जयसिंगराव पवार ) , आणि इतर ग्रंथ .
हा लेख अभ्यासुरीतीने वाचल्यानंतर ह्या लेखाला जोडून , " शंभूराजांची सिद्दीवर जरब , आणि कोकणप्रांतावरील रंणसंग्राम " हे वरील विषयास धरून असलेले लेख अवश्य वाचावे ,तसेच इतर माहितीपूर्ण , ऐतिहासिक लेख अभ्यासणाकरीता खालील लिंकला अवश्य भेट द्या : -
https://www.facebook.com/
" अखंड भारताचा विजय आहे " .
|| जय हिंद ||
~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमहितीगार)
ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 / 7741923346 .
No comments:
Post a Comment