#छत्रपति_शिवाजी_महाराज_यांची_शेवटची_लढाई
----------------------
छत्रपती संभाजी राजे पूर्वनियोजित योजनेनुसार मोगलांच्या दिलेर खानाच्या मौजेतून माघार घेऊन विजापूरला आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सेनापती हंबीरराव यांना संभाजी राज्यांना पन्हाळगडी घेऊन जाण्याचे आदेश दिले. शिवाजी महाराज ह्या वेळी जलनापुरात मोगलांवर चालून गेले.जालण्याची प्रचंड लूट झाली. ही बातमी मोगल सरदार रणमस्तखान ह्यास समजताच तो महाराजांच्या मागावर निघाला. लूट जास्त असल्यामुळे राजांच्या फौजेची गती संथ होती. मोगली फौजेने स्वराज्य सेनेवर आक्रमक केलं.शिवाजी महाराज, सेनापती हंबीरराव, धनाजी जाधव आघाडीवर होते , पण मोगलांचा जोर पाहता हंबीरराव ह्यांनी महाराजांना मागे घेऊन काही फौजेसह पट्टा गड जवळ करण्यास सांगितले आणि स्वतः मोगली आक्रमण थोपवू लागले. शिवाजी महाराज ह्यांनी पट्टा गडावर धावती विश्रांती घेतली म्हणून त्या गडास 'विश्रामगड' हे नाव ठेवलं. ह्यानंतर महाराज संभाजी राजांना पन्हाळगडी भेटण्यास गेले. दोघांमध्ये गुप्त चर्चा झाली आणि महाराज रायगडी निघाले. म्हणजे दक्षिण दिग्विजयाची सांगता होता होता "जालण्याची लूट" करताना झालेली लढाई ही महाराजांची शेवटची लढाई.
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Subscribe to:
Post Comments (Atom)
! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!
! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...

-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
महत्वकांक्षी महाराणी बाकाबाई ( डोंगरक्वीन ) श्रीमंत महाराणी बाकाबाई भोसले (१७७४-१८५८) या दुसरे राजे रघुजी भोसले यांच्या चौथ्या आणि आवडत्या...
No comments:
Post a Comment