विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 29 July 2020

!! वीर बाजी प्रभू देशपांडे !!

!! वीर बाजी प्रभू देशपांडे !!

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजी प्रभू हे सुरुवातीला शिवाजी महाराजांविरुद्ध कारवाया करणाऱ्या हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु कालांतराने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.

बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने घोडखिंड लढविली. पन्हाळगडाला शत्रूंने वेढा घातलेला असताना शिवाजी महाराजांची त्यातून सुटका करणे व महाराजांना विशालगडावर पोहोचवणे हे स्वराज्याचे मोठे कार्य बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देऊन पार पडले .
२१ तास चालून थकलेले शरीर व हाताशी केवळ ३०० मावळे अशा परिस्थितीतही बाजीप्रभूंनी सिद्धीच्या हजारोंच्या सैन्याला घोडखिंडीत मोठ्या हिमतीने रोखले . सलग ६ ते ७ तास खिंडीत बाजी प्रभू व त्यांच्या मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली . शत्रू सैन्याला खिंड ओलांडून दिली नाही .

शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले.

मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींप्रभू देशपांडे सारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले.

#Ganimikava #BajiPrabhuDeshpande #JaiBhavani #JaiShivaji

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...