विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 28 July 2020

स्वराज्यसंकल्पक महाबली शहाजी महाराज.


स्वराज्यसंकल्पक महाबली शहाजी महाराज.
शहाजी महाराज यांची साऱ्या भारताला ओळख झाली,ती भातवडीच्या युद्धात गाजवलेल्या पराक्रमामुळे.केवळ भारतच नव्हे,तर अगदी परदेशामधूनही,म्हणजे पोर्तुगालवरूनही शहाजी महाराजांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी पत्रव्यवहार झाला आहे.निझाम मूर्तझाला मांडीवर घेऊन शहाजी महाराजांनी एकछत्री अंमल प्रस्थापित केला.तत्कालीन मुघल आणि आदिलशाही राज्यात शहाजी महाराज यांविषयी आणि त्यांच्या पराक्रमाविषयी कमालीचा आदर होता.
तसे पाहता,शहाजी महाराज हे कोण राजे नव्हते.पण त्यांची राहणी,त्यांची दिनचर्या ही पूर्णपणे स्वतंत्र राजासारखी होती. ‘राधामाधवविलासचंपू’ मधली शहाजी महाराजांची वर्णने वाचल्यास,एखाद्या स्वतंत्र राजासारखे त्यांचे सारे कामकाज चाले,हे लक्षात येईल. शहाजी महाराजांनी सर्वात जास्त प्रदेश जिंकला तो दख्खनेत,आदिलशाही कार्यकाळात.आणि या लढाई स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज हे विधान सार्थ करायला पुरेशा आहेत..!!
इ.स.1637 ला झक्केरी येथे भद्रप्पा नाईक याचा पुत्र वीरभद्र यासोबत शहाजी महाराजांचे युद्ध झाले.यामधे शहाजी महाराजांनी वीरभद्रचा पराभव केला.त्याकडून अर्धे राज्य आणि 18 लाख होण खंडणी वसुल केली.पण त्याचे राज्य खालसा केले नाही ना त्याला मृत्युदंड दिला. इ.स.1639 मधे बंगळूरवर आक्रमण करुन कैम्पागौडाला महाराजांनी परास्त केले आणि बंगळूरला महाराज स्थायिक झाले.तसेच,श्रीरंगपट्टनम येथील वोडियार घराण्यातील राजाला परास्त करुन मोठी खंडणी घेतली,पण राज्य खालसा केले नाही.बसवपट्टन येथेही मोठा विजय मिळवला. शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयात महाराजांना जिंकन्यास अवघड गेलेला एक किला म्हणजे वेल्लोरचा किल्ला..पण शहाजी महाराजांनी युद्ध करुन हा किल्ला जिंकला होता.
चिक्कनायकहल्ली,बेलूर,टुमकुर,कांदल,बाळापुर याही प्रदेशात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.पण हा सर्व भूभाग जिंकताना महाराजांनी कोणतेही राज्य आदिलशाही मधे विलीन केले नाही.उलट सर्वांना महाराजांनी आपले मांडलिक बनवले होते.यदाकदाचित दक्षिणेत उठाव करायचाच झाला,तर या सर्व राजांची मदत आपसूक महाराजांना मिळाली असती.हा फार मोठ्या राजकारणाचा भाग होता. शहाजी महाराज यांना बंगळूरचा प्रदेश फार आवडे आणि त्याच भागात शहाजी महाराज आणि थोरले संभाजी महाराज यांनी स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरुप देण्याचे ठरवले होते.ही सारी त्याचीच तयारी होती.एवढेच नव्हे,तर अफझलखानाने जेव्हा शिवरायांवर आक्रमण केले होते,तेव्हा स्वताः शहाजी महाराज विजापुर वर फौज घेऊन आक्रमण करण्यास सज्ज होते.काहीतरी गैरमेळ झाला आणि हे राजकारण तडिस गेले नाही.यावेळेस शहाजी महाराज यांच्यासोबत असलेली 17,000 फ़ौजेचे बळ आले कुठून? महाराजांनी बराच प्रदेश जिंकला,पण कुणालाही शिक्षा न देता आपले मांडलीकत्व मान्य करायला लावले,हेच यामागचे कारण..!!
शहाजी महाराज पराक्रमी होते,शूर होते,उत्तम प्रशासक होते.एका स्वतंत्र हिन्दू राजाप्रमाने त्यांची राहणी होती.आदिलशाही दरबातरातही त्यांना उच्च दर्जा होता आणि त्यांच्या पराक्रमाचा दरारा फार होता.स्वराज्याचे रोपटे लावन्याचे काम केले ते शहाजी महाराजांनीच..आणि स्वराज्य ही संकल्पना शिवरायांच्या मनात रुजवणारे होते ते शहाजी महाराज आणि जिजाऊ मासाहेब..!!
घरात एवढी पराक्रमी माता-पिता असताना शिवरायांना बाहेरून स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली असेल,हे मलातरी शक्य वाटत नाही..!!
स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांना मानाचा मुजरा.. #महाराजसाहेब
केतन पुरी #आम्हीच_ते_वेडे

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...