विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 27 December 2020

मराठ्यांचा धाक

 


मराठ्यांचा धाक

मराठ्यांचे सर-सेनापती प्रतापराव गुजर यांनी सुरतेचे अधिकारी आणि धनाढ्य नागरिक यांना एक ताकीद पत्र पाठवले होते.
आपण इंटरनेटवर एकाशिवाय अधिक लोकांना मेल पाठवताना Cc, Bcc कॉलम मध्ये ऍड करत असतो.
*CC (carbon copy) and BCC (blind carbon copy)
तसेच *CC BCC करत हे पत्र सुरतेच्या सुभेदाराशिवाय समस्त धनाढ्य सुरतकरांसही गेले असे ह्या खालील पत्राच्या भाषेवरून निदर्शनास येते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मराठ्यांनी औरंगजेबाच्या अत्यंत प्रिय अश्या समस्त गडगंज सुरतकरांच्या आणी सुरतेच्या सुभेदाराच्या पार्श्वभागावर दिलेले फटक्यांचे वोळ अजून ओसरायचे होते.
**
मराठ्यांनी सुरतेवर पहिला छापा हा ५ जानेवारी १६६४ आणी दुसरा छापा हा २ ऑक्टोबर १६७० रोजी टाकला होता.
हे पत्र १६७२ चे आहे म्हणजे हे पत्र दुसऱ्या छाप्याच्या दोन वर्षानंतर पाठवले गेले आहे.
पत्र अत्यंत दुर्मिळ आहे. हे पत्र इसवीसन १६७२ चे आहे.
लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथात एक फारसी हस्तलिखित आहे. या ग्रंथाचे नाव आहे "खुतूते शिवाजी" म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे.
ह्या हस्तलिखिताची जून एक पत्र कलकत्याच्या एशियाटिक सोसायटीत आहे.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
ह्या संग्रहात एकूण बत्तीस पत्रे आहेत. त्यातील सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे हे एक पत्र सादर करत आहे.
सर्वांनी वाचून आनंद घ्यावा.
ताकीद पत्र सुरु:
" सुरतेचे अधिकारी, देसाई, व्यापारी, दलाल, महाजन, इंग्रज, फ्रेंच आणि डच या कंपन्यांचे लोक आणि सामान्य जनता यांनी काळजीपूर्वक जाणावे कि,
शिवाजी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सुरतेतील आयात - निर्यात होणाऱ्या मालमत्तेवर जो कर आकारला जातो, त्याचे एकंदरीत उत्त्पन्न काय होते याचा तपशील लिहिण्यात यावा.
या उत्पनाची चौथाई शिवाजी महाराजांच्या मराठा सैन्याने घ्यावी. या कामाकरिता शिवाजी महाराजांनी माझी नेमणूक केली आहे.
(चौथाई: हा एक प्रकारचा वसूल केला जाणारा कर आहे. चौथाई ही पूर्ण उत्पन्नाच्या एकचतुर्थांश भाग एवढी असे. मराठा साम्राज्यात चौथाई हि मराठी राज्याबाहेर पण राज्याच्या छायेखाली असलेल्या प्रदेशांतून वसूल केली जात असे. चौथाई दौलतीकडे म्हणजे राज्याच्या खजिन्यात जमा होत असे. )
महाराजांच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला ताकीद पत्र लिहीत आहे.
माझ्या हुकमांची अंमलबजावणी करण्यातच तुमचे हित आहे. मी माझा अधिकारी पाठवीत आहे. तो म्हणेल त्याप्रमाणे करा म्हणजे तुमचे-आमचे चांगले होईल.
नाहीतर मराठ्यांचे शूर विजयी सैन्य लवकरच सुरतेच्या भागात सहल-शिकार करण्यासाठी येऊन धडकेल.
सुरतेच्या गावातील घर अन घर धुळीला मिळविण्यात येईल. सुरतेचा अवशेषही राहणार नाहीत. या शहरातील सर्व माणसे आमच्या तावडीत सापडतील. एकाही माणसाला सुटून जाता येणार नाही.
औरंगजेब बादशहाची मदत येईल या समजुतीने तुमची डोकी फिरली असतील; तर यात तुमचा सर्वनाश आहे असे समजा.
आमच्या मराठा विजयी सैन्याने दोन वेळा हा सुरतेचा प्रांत आमच्या घोड्यांच्या टाचांखाली रगडून काढला आहे.
तुमचा औरंगजेब बादशाह आमचे काय करू शकला?
तुमच्या तोफांचा आणि बंदुकींचा धूर तुमच्या डोक्यात साठला असेल आणी आपला सुरतेचा किल्ला अजिंक्य आहे असे तुम्हाला वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा.
आमचे मराठा विजयी सैन्य सुरतेत लवकरच येऊन पोहचेल. पिंजारी कापूस धुनकतो त्याचप्रमाणे आमचे सैन्य तुमच्या सुरतेच्या किल्ल्याचा दगड आणि दगड धूनकून काढील आणि तुमच्याच शहराच्या तोफांनी आणि बंदुकींनी तुमचे शहर उध्वस्त करून टाकील.
'साल्हेर आणि मुल्हेर' हे किल्ले अतिशय मजबूत आहेत. मनुष्य आपल्या कल्पनेच्या दोऱ्याने देखील या किल्यांचे बुरुज हस्तगत करू शकत नाही. असे असूनही आमच्या तोंडातून शब्द बाहेर पडण्यास जो वेळ लागेल तेवढ्याच अल्पावधीत ते किल्ले आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने जिंकून घेतले. मग सुरतेच्या किल्याची काय व्यथा?
बहादूरखान आणि दिलेरखान हे तुमच्या औरंगजेब बादशहाचे सेनापती आहेत. डोंगरदऱ्यांतून फिरणाऱ्या आमच्या शूर मराठा वीरांपुढे बहादूरखान आणि दिलेरखान ह्यांची काय मातब्बरी आहे?
फजित पावून, मनगटे चावीत, निराशेने जमिनीवर आदळ-आपट करीत साल्हेर समोरून त्यांना पुण्याकडे पळून जावे लागलेच ना?
केवळ तुमच्यावर दया म्हणून; तुमचे उत्तर येईपर्यंत माझे मराठा सैन्य पाठविण्याचे मी थांबविले आहे.
परमेश्वराने तुम्हाला सद्बुद्धी दिली, तुमचा गाफीलपणा दूर झाला, आणी माझ्या उपदेशाचे शब्द तुम्ही ऐकले तर त्यात तुमचे हित राहील.
नाहीतर तुम्हावर पश्चाताप करण्याची पाळी येईल. "
पत्र समाप्त.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
मराठ्यांचा धाक कसा असतो हे ह्या पत्रातून निदर्शनास येते.
पत्रातील प्रत्येक ओळीत मराठ्यांचा जबरदस्त जबरदस्त आत्मविश्वास ठासून भरलेला आहे.
हेवाच वाटतो ह्या आत्मविश्वासाचा.
आता खालील वाक्ये हि कल्पना-चित्र डोळ्यासमोर उभे करून वाचा.
केवळ एकाच पत्रावर सुरतेच्या सुभेदाराची 'निंद हराम' झाली असेल.
हे मराठा कधीही अचानक वादळासारखे सुरतेला येऊन धडकतील आणी जे काही शिल्लक आहे तेही घेऊन जातील ह्या धाकाने सुरतेच्या सुभेदाराला 'झक' मारून दिवस-रात्र आपल्या फौजेसहित घोड्यावर बसून राहावे लागले असेल.
लढायला?
लढायला नाही.
मराठा फौज सुरतेवर चालून आली तर पळून जायला.
मुघलांची परंपरा जपायला नको का?
पळपुटे कुठले. न पळतील तर मग रट्टे खातील.
आणी सुजलेले बूड कोणास दाखविणार?
कि बघा आमचे हे बूड... मराठ्यांनी रट्टे देऊन सुजविलेले आहे.
मराठ्यांनी सुरतकरांना दिलेल्या फटक्यांचे ओळ तिकडे आग्ऱ्यास बसलेल्या औरंगजेबाच्याही बुडाखाली उमटले असतील.
तो तरी काय करील बिचारा.
बूड चोळीत बसण्याशिवाय?
सांगताही येत नाही आणी सहनही करता येत नाही.
खरं तर इथं मला 'स्मायली' टाकायचं होत..पण फेसबुकच्या झुक्याने (मार्क झुकरबर्ग) हि 'स्मायली' टाकायची व्यवस्था केलेली नाही. असो..
हसत हसत लेख समाप्त.
लेखाविषयी तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये कळवा आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना 'Invite' (आमंत्रित) करा.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...