विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 27 February 2021

हैदराबाद संस्थान (निजामशाही ) आणि मराठा साम्राज्य भाग २

 




हैदराबाद संस्थान (निजामशाही ) आणि मराठा साम्राज्य
भाग २
दिल्लीचे अल्लुद्दीन खिलजी, मुहम्मद तुघलक, गुलबर्गाआणि बिदरचे बहामनी, इ.स. १४५५ जलालखान (तेलंगाणा), मुहम्मद खिलजी, गोळ्कोंड्याचा इब्राहीम कुतुबशाह. इ.स. १६००मध्ये अकबराच्या काळात अहमदनगर मोगलांनी घेतले. जहांगीर व तदनंतर शहाजहानच्या जातीने युद्धात उतरल्यानंतर इ.स. १६३२ पर्यंत तेलंगणापर्यंत मोगलांनी वर्चस्व निर्माण केले. विजापूरच्या आदिलशहाने शहाजहानशी तडजोड करून अहमदनगर राज्याचा काही भाग स्वतःकडे मिळवला. याच काळात शहाजीराजे भोसले प्रथम अहमदनगरच्या आणि नंतर विजापूरच्या दरबारी सरदार होते.
इ.स. १६५३ मध्ये औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार झाला. औरंगजेबाने सुरुवातीचा काळ करप्रणालीचा अमल घडवण्यात घातला. इ.स. १६५८ मध्ये औरंगजेबाने आग्ऱ्यास जाऊन बादशाही मिळवली. औरंगजेबाने वैयक्तिकरीत्या प्रयत्न करून इ.स. १६८६मध्ये विजापूर व इ.स. १६८७ मध्ये गोळकोंडा मोगलांसाठी मिळवले. मराठवाडा आणि बेरार अमरावतीतील मराठ्यांची पाठशिवणी तात्पुरती थांबली. इ.स. १६२० नंतर छत्रपती शिवाजी महराजांनी मराठी राज्याची रस्थापना केली. परंतु मराठ्यांचे राज्य औरंगजेबास मिळू शकले नाही. दुष्काळांचे उल्लेख विविध काळात दिसतात, त्यात्या वेळच्या राज्यकर्त्यांकरता तो काळ सर्वसाधारणता राजकीयदृष्ट्या कठीण गेल्याचे दिसून येते. ते काळ असे :- इ.स. १३९६ ते इ.स. १४०७; इ.स. १४२१ ते इ.स. १४२२; इ.स. १४७३ ते इ.स. १४७४; इ.स. १६२९ ते इ.स. १६३०. मध्ययुगीन इतिहासाचे दुसरे वैशिष्ट्य असे की दिल्लीच्या काही बादशहांना दक्षिणेस खास करून औरंगाबाद, अहमदनगर भागांत जातीने यावे लागले. परिणामी औरंगाबाद हे हैदराबाद राज्याचे मध्ययुगीन काळातील राजकीय हालचालींचे प्रमुख केंद्र राहिले.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...