विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 16 April 2021

शिवशाहीची परंपरा

 


शिवशाहीची परंपरा

छत्रपती राजाराम महाराजांनी हणमंतराव घोरपडे यांना दिलेल्या ४ जून १६९१ च्या पत्रात " महाराष्ट्रधर्म( म्हणजे हिंदू धर्म) पूर्ण रक्षावा " या संकल्पाचा उल्लेख आहे आणि दिल्ली काबीज करण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त झाली आहे. तेव्हा राजाराम महाराज जिंजीला अत्यंत अवघड परिस्थितीत होते आणि अशा वेळी ,वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी, ते दिल्ली घेण्याची भाषा करीत होते ! कुठून आली ही हिंमत? रामदासांच्या शब्दात सांगायचे तर महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे या शिवाजी महाराजांनी ठरवून दिलेल्या ध्येयातूनच ही हिंमत निर्माण झाली होती.
आपल्याला असे म्हणता येईल की शिवाजी महाराजांनी जे राज्य स्थापन केले होते त्याचे उद्दिष्ट बर्याच प्रमाणात साध्य झाले ते. उद्दिष्ट होते हिंदू समाजाचे रक्षण आणि त्याकरिता आवश्यक म्हणून इस्लामी राजवटींचा नाश. भूषणाचा एक स्फुट छंद प्रसिद्ध आहे. त्यात शिवाजी माहाराज झाले नसते तर काय झाले आसते ते पुढील शब्दांत सांगितले आहे: "अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी!'' मी प्रस्तावनेत यशवंतराव चव्हाणांचे उद्गगार सांगितले. त्यांची आणि भूषणाची भाषा वेगळी आहे, शब्द वेगळे आहेत, पण दोन्हींमागचा आशय एकच आहे. (पान नं.६१,६२)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुंबईतील पहिल्या पुतळ्याचे अनावरण करताना २६ जानेवारी १९६१ रोजी केलेल्या भाषणात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आसे उद्गगार काढले होते की:
"छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर भारताचे काय झाले असते ते सर्व जगाला माहिती आहे. पाकिस्तानची सीमा शोधण्याकरिता फार लांब जावे लागले नसते. कदाचित ती तुमच्यामाझ्या घरापर्यंतही येऊन पोचली असती."(पान नं,१)
संदर्भ - छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर...
लेखक - गजानन भास्कर मेहेंदळे
छत्रपती शिवाजी माहाराज झाले नसते तर...
पुस्तक वाचले खरच लेखक गजानन भास्कर मेहेंदळे सर यांनी अगदी स्पष्ट कळेल आसे शब्द मांडले आहेत पुस्तिका लहान आहे पण प्रत्येकाने नक्कीच वाचा ..
-- लव नामदेव घोरपडे ✍️
Post - @sarsenapati_santaji_ghorpade

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...