विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 31 July 2021

अंमलबजावणी.... कशाला म्हणतात माहिती आहे का ?

 

आवर्जून वाचा व शेअर करा हि विनंती _/'\_

अंमलबजावणी....
कशाला म्हणतात माहिती आहे का ?
""बलात्कार""
या विषयाला अनुसरण एक सत्य आणि जगजाहिर असे उदाहरण देतो....
शिवरायांच्या शिवशाहीत कधी कुनावर अन्याय, अत्याचार, बलात्कार होत नव्हते ना कधी आत्महत्या !
अपवाद फक्त रांझाच्या पाटलाचा ! पण त्यावर त्वरित कारवाई जाहली !
असाच एक प्रसंग रांझाच्या पाटलाचा
रांझा हे एक महाराष्ट्रातील गाव आहे
याच गावातील पाटलाने पाटीलकीचा आव आणुन एका स्त्री वर अत्याचार केला...
तीच्या घरातील सर्व लोक कामासाठी शेतात गेले होते,
ती बिचारी घरात एकटीच होती आणि हाच मौका साधुन
भर दिवसा एका कोवळ्या देहावर अवघ्या १६ वर्षाच्या मुलीवर या हरामखोराने बलात्कार केला, तिची खुप विचित्र अब्रू लूटली !
तो पाटील अन् त्यावेळी पाटीलकी म्हणजे पाटलाच्या गांडीत कीडा ! ( माफ करा थोडं स्पष्टच बोलतोय )
पाटलाचे आख्खं गाव ऐकत होते,
तो म्हणेल तीच पूर्व दिशा !
त्याने काय चुकीचे पाऊल उचलले तरी त्याला जाब विचारणारे कुनी नव्हते !
आणि आपल्या मुलीसोबत झालेल्या अन्यायाची दाद मागायला त्या पिडीत मुलीचे माय बाप छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले...
कारण, त्यांना माहिती होतं
""उभ्या हिंदुस्थानात न्याय मिळेल असे एकमेव न्यायालय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हेच आहे !""
छत्रपती शिवरायांना ही वार्ता समजली....
तसाच कडाडला सह्याद्रिचा सिंह....
भर थंडीच्या दिवसांत आभाळात वीज कडाडली !!!
सिंहाने डरकाळी फोडावी आणि कोल्ह्याचा निम्मा जीव जावा असा तो क्षण !!!
जमीन थरारली....
भयान वादळ...
लाटा उसळल्या.....
संतापला...वैतागला...चवताळला सिंह !
माझ्या मराठी मुल्खात आज पर्यंत कोन्या स्त्री वर अन्याय कधी झालाच नव्हता !
माझ्या महाराष्ट्राला लाजवणारी ही थरारक घटना होती !
""पर स्त्री माते समान""
हेच तत्व आणि हेच धोरण संपूर्ण आयुष्यभर आचरणात आणणारे राजं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !
क्षणांत छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना सख्त आदेश दिला...
बोलवुन आणा त्या पाटलाला !
गेले सैनिक निरोप दिला पाटलाला तु गुन्हा केला आहेस त्यामुळे तुला छत्रपती शिवाजी राजांनी बोलवलय !
पाटील गुर्मीचा !
पाटील म्हणला कोन शिवाजी मी ओळखत न्हाय !
पाटील जायलाच तयार न्हाय !
पाटलाच्या अंगात मस्तीच लय हाय !
सैनिक माघारी आले राजांकडे पाटील येत नाही म्हणुन सांगु लागले !
शिवरायांनी सैनिकांना पुन्हा पाठवले ;
पुन्हा तोच प्रकार....
पाटील म्हणतोय,
शिवाजी राजा आज राजा असेल माझी पाटीलकी पिढ्यान् पिढ्या चालत आलीय मी कुनाला भीत न्हाय !
पाटलाच्या गांडीत मस्तीच लय !!
छत्रपती शिवरायांनी शेवटचा आदेश केला की
त्याला सांगा तु पाटील एका गावचा आहेस परंतु हा सारा मुल्ख आमच्या ताब्यात येतो आणि इथल्या जनतेचा मी राजा आहे !
आणि हे सांगुन सुद्धा जर पाटील ऐकत नसेल तर त्याला डुकर बांधतात तसे दोन्ही हात, पाय, पाठ, मान दोरीने बांधुन आणा !
आपल्या सैनिकांनी लगेच जाऊन त्या बलात्कारी पाटललाला डुक्कर दोरीने बांधतात तसा बांधुन राजांसमोर पेश केला !
राजं म्हटले तु गुन्हा केलायस....
पाटील म्हणतय न्हाय !!
राजं पुन्हा म्हटले कबूल कर तू गुन्हा केलायस...
पाटील त्याचीच लाल करत म्हणतय मी गुन्हा केलाच न्हाय !!
राजांनी सैनिकांना आदेश दिला हा काय गुन्हा मान्य करत नाहीं याचा थेट चिरच्छेद करा, हात पाय कलम करा, याच्या देहाचे बारीक बारीक तुकडे करुन कोल्ह्या कुत्र्यांना खायला घाला !
धनुष्यातुन तीर सुटावा आणि तो परत कधीच माघारी न यावा असा तो आदेश... सख्त आदेश !
पाटलाला आता कळले की राजांचा शब्द वाया जात नाहीं अन् आपली यातुन सुटका नाही !
पाटलाने गुन्हा मान्य केला परंतु वेळ निघुन गेलेली छत्रपतींच्या आदेशानुसार त्या पाटलाचे केव्हाच तुकडे तुकडे झाले होते !
तो आपल्याच धर्मातला म्हनुन त्याला सोडून देयचा असली नालायक वृत्तीच नव्हती त्या काळात !
बलात्कारी, अत्याच्यारी गुन्हेगार मग तो कोणत्याही धर्माचा असो शिक्षा ही होणारच या निश्चयात्मक तत्वाचे राजं होतं म्हणुन स्वराज्यात कधी असले प्रकार घडले नाहीत हा अवघ्या जगाने आणि जगातल्या प्रत्येक न्यायालयाने आदर्श घ्यावा असा राजा आहे !
""मनासारखा राजा अन् राजासारखं मन""
त्या माताा-पित्यांना... त्या पिडीत निष्पाप मुलीला... त्या भगिनीला ""न्याय"" मिळाला !
""न्याय असा की गेलेली अब्रू पुन्हा प्राप्त होईल इतका कडक शब्द !""
जगाच्या इतिहासातील पहिलाच काळ शिवशाही आणि या शिवशाहीतील पहिलीच घटना की जीथे त्वरित अंमलबजावणी होत होती !
ते पोलिस येतील, मग पंचनामा होईल, केस कधी व्हायची की पैसा दिल्यावर केस तिथेच मिटायची आणि शिक्षा कधी होणार तो पर्यंत ती पिडीत व्यक्ति म्हातारी झालेली असते असली घानेरडी भानगडच नव्हती शिवकाळात !
On The Spot Decision !
क्षणांत निर्णय अन् त्वरित कृती !
याला म्हणतात अंमलबजावणी ;
कायदा यालाच म्हणावे !
जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा ""राजाशिवछत्रपती"" ज्यांच्या काळात कधीच अन्याय, अत्याचार, बलात्कार नि आत्महत्या अशा घटना घडल्या नाहीत !
उगाचच म्हणत नाहीत
॥ हिंदूनृसिंह प्रभो शिवाजी राजा ॥
शिवचरित्राचा आदर्श घेयचा तर हाच आदर्श घ्या !
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...