विनोद जाधव एक संग्राहक

Friday 9 December 2022

मलिक अंबर म्हणजे महाराष्ट्राला मिळालेला एक कुशल योद्धा भाग ३

 

मलिक अंबर म्हणजे महाराष्ट्राला मिळालेला एक कुशल योद्धा
लेखन :आशिष माळी




भाग ३
आयुष्यभराचा ससेहोलपट ची धडा घेऊन त्यांनी सैन्यात सगळ्या जातीधर्माला सोबत घेतलं, पायाला तोडा, बसायला घोडा आणि ढालभर रुपय्या ही त्याची पद्धत लोकांना भावी आणि त्यांनी मराठी माणसाचे सैन्य उभा केले,
1)गनिमीकावा शहाजी महाराजांना मलिक अंबर नेच शिकवला पण नंतर शिष्य एवढा हुशार झाला की विचारू त्यामुळे मलिक अंबर शहाजी महाराजा वर जळत होता याची परिणीती शहाजी महाराजांनी निझाम शाही सोडण्यात झाली.ते थेट परत आले ते मलिक अंबर च्या मृत्यूनंतर.जसे शिवाजी महाराजांचे नाव देशात अफझलखान मुळे प्रसिद्ध झाले तसे शहाजी महाराजांचे नाव भातवडीच्या युद्धाने देशात प्रसिद्ध झाले होते.
2)आजचे शिवाजी महाराज आपले दैवेत आहे ते पण मलिक अंबर मुळे.शहाजी महाराज (मालोजी भोसले यांचे सुपुत्र)आणि जिजाबाई(लखुजी जाधवयांची कन्या) या साठी त्यांनी मध्यस्थी केली होती.निझाम शाही वाचवायची असेल तर या दोन मराठा खानदानात सुमधुर संबंध व्हायला हवे होते हे मलिक अंबर ने ओळखले.
3)दख्खन च्या इतिहासात मराठेशाही च्या पराक्रमाने मुघलांच्या नाकात दम करण्यापूर्वी मुघलांना त्रस्त करून सोडण्याचं काम करणारा मलिक अंबर हा एक चकित करणारा योद्धा. आपण नेहमी ताराबाई ला मानतो की तिच्या नेतृत्वाखाली मराठयानी प्रथमच नर्मदा ओलांडली (नेमाजी शिंदे आणि खंडेराव दाभाडे नि नर्मदा ओलांडली) आणि उत्तरेत धुमाकूळ घातला तर ते चुकीचे आहे.मलिक अंबर च्या नेतृत्वाने निजामशाही मधील अनेक मराठयानी १६२० ला मध्य प्रदेश मध्ये उत्तरेत थैमान घातले.
मलिक अंबर & त्याचे 60000 मराठी सैन्य ने गनिमी काव्याचे सर्वाना प्रशिक्षण देऊन मांडू पर्यन्त धडक मारून मुगलांना चांगलेच धुवून काढले सर्वात आधी मराठे मलिक अंबर सोबत मालव्यात घुसले 1619-20त्यानंतर नेमाजी शिंदे ने औरंगजेबाच्या काळात नर्मदा पार केली

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...