विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 30 March 2023

#सिंहगड_चा_रणसंग्राम_१७०२_१७०३ #औरंगजेब_विरुद्ध_मराठे

 

सचिन लेखन :सचिनदादा पवार 





आपल्या नाकाम सरदारांपुढे हतबल होऊन गेली ३ वर्षे खुद्द औरंगजेब बादशाह सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात भटकत होता.
एक एक गड कोट हस्तगत करत (मुळात लाच देऊन) तो आता सिंहगडाच्या पायथ्याशी आला होता.
सिंहगड बद्दल मोगल इितहासकार साकी मुसतैदखान म्हणतो की “वास्तवीक पाहता तो किल्ला (सिंहगड) इतका मजबूत आहे की परमेश्वरानेच तो मीळवून द्यावा, नाही तर, िकतीही प्रयत्न करा तो सर होणे शक्यच नाही.”
औरंगजेब कितीही दृढनिश्चयी असला तरी ही सिंहगडाचा ही वारसा जवलनंत संघर्षाचा होता. सल्तनत काळात इ.स. १३३५ मध्ये मोहम्मद तुघलक विरुद्ध महादेव कोळी जमातीतील नागनायक ह्याने तब्बल ८ महिने हा गड लढवला होता.
डिसेंबर १७०२ च्या अखेरीस २७ तारखेस मोगलांनी सिंहगड ला वेढा घातला.
औरंगजेबाची छावणी गडाच्या पायथ्याशी पडली होती. मोगलांचे मोर्चे गडाच्या दिशेने सरकत होते. दरबारातील बातमी पत्रावरून असे दिसते की, शंकराजी नारायण, सचीव हा १ जानेवारीपयȊत सिंहगडवर होता. गडावरील सवर् व्यवस्था लावून देऊन त्याने सिंहगड सोडले .
मुगलांच्या बातमीपत्रात किल्लेदाराचेनाव बंधजी असे दिले आहे. तो धनाजी जाधवच्या भाऊबंधांपैकी होता, असे म्हटले आहे.
किल्ल्या भोवती मोर्चा बसवून औरंगजेबाने किल्ल्या समोरील टेकडीवर तोफा चढिवल्या. वेढ्याचे काम चालिवण्यासाठी बादशहाने निरनिराळ्या ठिकाणाहून तोफा मागीवल्या.. या तोफा वीशालगड, ब्रह्मपुरी, पेडगाव, अहमदनगर येथून आणण्यात आल्या होत्या. बादशाही छावणीत असलेले सैन्य वेध्यासाठी कमी पडत असावे असे िदसते. बादशहाने िंसहगडाभोवती, पुणे-िंसहगड मागार्वर िशवापूर आिण इतर िठकाणी ठाणी कायम ठेवली. वेध्याच्या कामासाठी त्याने इतर प्रदेशातील किल्लेदारांना आिण फौजदारांना आपापली
पथक घेऊन छावणीत रुजू होण्यासाठी हुकम पाठिवले . चाकणचा किल्लेदार अमामुल्लाखान, रायगडचा किल्लेदार िशविंसग, धारूरचा किल्लेदार उजबेगखान इत्यादी अिधकारी मुगल छावणीत येऊन दाखल झाले . वेढा चालवण्याची मुख्य जबाबदारी, बादशहाच्या तोफखान्याचा प्रमुख तरिबयतखान याच्याकडे देण्यात आली. बादशहाचा सुप्रसिद्ध सेनापती झुल्फिकारखान हाही चार फेब्रुवारीला येऊन बादशहाला िमळाला. त्याचीही नेमणूक िंसहगडासमोरील ठाण्यावर करण्यात आली.
बादशहाच्या या हालचालीला प्रतिकार करण्यासाठी मराठ्यांनी एक मोठी योजना आखली. तीचे स्वरूप जितके व्यापक तितकेच प्रभावी होते. िंसहगडकडे येणारी रसद अडिवणे, िवशालगड ब्रम्हपुरी, पेडगाव इत्यादी िठकाणांहून िंसहगडाकडे येणाऱ्या तोफा गडापयȊत न पोहोचतील असे प्रयत्न करणे. या तोफा आणणाऱ्या मोगल पथकांवर हल्ले करणे, आिण खुद्द बादशाही छावणी भोवती सतत आकर्मणे करून दहशतीचे वातावरण िनमार्ण करणे हा मराठ्यांच्या योजनेचा कवळ एक भाग होता.
समकालीन इतिहासकारांनी व वेढ्याचे तपशील फार
दिले नाहीत. इतिहासकार भीमसेन सक्सेना हा त्यावेळी झुल्फिकारखानाच्या छावणीत होता. झुल्फिकारखान
हा मराठयांचा पाठलाग करून बादशहाच्या छावणीत आला होता. सिहगडच्या वेढ्याचे वणर्न करताना भीमसेनने मराठ्यांनी मोगल फौजांची ठीकिठकाणी कशी अडवणूक केली याचे पुढील प्रमाणे वणर्न कले
आहे :––
"बादशहा स्वतः कोंडाणा जिंकून घेण्यासाठी निघाला.
(२ डिसेंम्बर १७०२) या कामासाठी लागणाऱ्या तोफा आिण इतर सामग्री खेळण्याहून (िवशालगड) आणण्याचे काम फत्तेउल्लाखान आलमगीर शाही यास देण्यात आले रहमतपुराच्या जवळ मराठयांनी फत्तेउल्लाखान वर मोठा किठण प्रसंग आणला. बादशहाच्या आदेशा ने झुल्फिकारखानाने फत्तेउल्लाखान यास मदत कली."
इकडे सिंहगडच्या वेढ्याचे काम चालू होते.
भीमसेन सक्सेना पुढे लिहतो की
"मागे जसवन्तिंसग याने (इ.स.१६६३ मध्ये) ज्या टेकडीजवळ मोर्चे घातले होते तेथेच तरिबयतखान याने मोर्चे बांधले . जुल्फीकारखानाने किल्ल्याच्या पायथ्याशी बादशहाची गाठ
घेतली. िशवापूरच्या बाजुने नवीन मोर्चा उभे करण्याची बादशहाने जुल्फिफकारखानास आज्ञा कली.”
ही वरील हकीकत जुल्फिकारखान हा िंसहगडाहून खानदेशाकडे जाण्याच्या पूवीर्ची आहे.
साकी मुसतैदखान हा ही त्यावेळी बादशाही छावणीत हजर होता. त्याने सिंहगडासंबंधी थोडक्यात पुढील प्रमाणे लिहले आहे:
किल्ल्याच्या बुरुजासमोर एक टेकडी होती. तरिबयतखानाने त्यावर तोफा चढिविल्या. काही दिवस त्याने तोफांचा मारा केला आिण शत्रूंचे तट बुरूज आिण घरे दारे उध्वस्त केली.”
पण मोगल दरबारातील बातमीपत्रात वेढ्याचे तपशील बरेच आढळतात.
मराठ्यांनी बादशहास एवढा त्रास दिला होता की त्यास फक्त वेढ्याचे नियोजन न करता छावनीचे नियोजन ही करावे लागे. किल्ल्याच्या आसमंतातील वाटा व ठाणे वरही चौकी पहारे बसवावे लगे त्यानुसार त्याने एक जानेवारीस शीवापूरच्या ठाण्यावर मन्सूरखान, किल्ल्याच्या दरवाज्यासमोर अमानुदुल्लाखान, किल्ल्याच्या पलीकडे अिमनखान यांस नेमावे लागले.
त्याच वेळेस मराठ्यांच्या छावणी भोवती छापेमरी मुळे मोगल छावणीत धान्याची महगाई ही झाल्याची नोंद आहे .
मोगलांनी सिंहगडास वेढा दिला खरा पण मराठी पथकांमुळे त्यांना स्वतः ही छावणीत कोंडून घ्यावे लागले. वेढ्या व्यतिरिक्त मोगल छावणीभोवतीही चौक्यांचा बंदोबस्त करावा लागला.
(४जानेवारी १७०३ चे बतमीपत्र)
खरतर मोगल छावणी म्हणजे सर्व वस्तूंची तयारी, पण आता मोगल छावणीत ती बात राहिली न्हवती. किल्ल्या वरील मराठ्यांच्या चिवट प्रतिकाराच्या उत्तरादाखल त्यांना छावणी व्यतिरिक्त इतर किल्ल्यातून तोफा मागवाव्या लागत होत्या. व त्यासाठी त्यांनी विशाळगड अहमदनगर त्याच बरोबर ब्रम्हपुरीच्या छावाणीतून ही त्याला तबबलल दोन वेळा तोफा मागवाव्या लागल्या. व त्याच बरोबर वेध्याचे कामासाठी चाळीस मण सरब व बंदुकीची दारू आिण पाचशे लोखंडी गोळे ही मागवले.
(७/१३/२०/२५ जानेवारी ची बातमी पत्रे)
एवढी जययत तयारी करून ही मोगलांच्या हाती विशेष काही लागले नाही. सिंहगड च्या वेढ्याचे किंमत औरंगजेब मोगली सेनाधिकारी व मनसबदार ह्यांच्या रणांगणातील मृत्यू स्वरूपात चुकवत होता. मोगल दरबारातील बातमी पत्राच्या नोंदी प्रमाणे " सोळा जानेवारी रोजी मुहमद जमाल हा सिहगडच्या वेध्यात गोळा लागून ठार झाला. व फेब्रुवारीच्या एक तारखेस मोगलांच्या पायडळातील एक हजर मनसबदार गौतम हजेरी हा ठाण्यावर बंदोबस्तास असताना चकमित ठार झाला.
व्ह मोगलांसाठी ह्याच्या पेक्षा शरमेची गोष्टी ह्या की त्यांचे बडे बडे अधिकारी मराठ्यांच्या कैदेत पडत होते. (उदा. दाखल म्हणजे) त्यातीलच एक म्हणजे ख्वाजाखान (तुकताजखानाचा भाऊ) हा मराठ्यांच्या कैदेत पडलयाची नोंद २९ जनेवरी १७०३ च्या बतमीपत्रात मिळते.
त्यामुळे छावणीतील इतर मोगल सरदार बिथरले होते व कोण्ही स्वतः हुन पुढे येऊन कामगिरी घेत न्हवते. म्हणून की काय बादशहास लांबून लांबून लांबून अधिकारी आणून वेढ्याच्या कामास नेमावे लागत होते.
१७ व १४ जनेवारी चौ बतमीपत्रा नुसार औरंगजेबास गुलबर्गा येथील किल्लेदारास पुण्यातील ठाण्यावर नेमावे लागले व रायगड चा किल्लेदार शिवसिंग ह्यास छा वणीत बोलुवून वेढ्याच्या कामास जुंपवे लागले.
त्यातही मराठ्यांचा जोर एवढा वाढला होता की बादशहास छावणी भोवती भिंत बांधावी लागली.
(२६ जानेवारी १७०३ चे बातमी पत्र)
मराठ्यांचा उपद्रव हा दुहेरी होता. किल्ल्यावरील मराठे कधीही रात्री अपरात्री वेढ्यातील चौक्यांवर छापा घालीत तर परिसरात पसरलेल्या मराठी तुकड्या अचानक कधीही छावणी वर धाड टाकत.
मराठयांच्या ह्या त्रासाने बादशाह ही गर्भगळीत झाला होता म्हणून की काय त्याने च्या जन्मजात संशयी स्वभावाला अनुसरून त्याच्या शयनगृहा भोवती असलेल्या बंधुकंधारी तुकडीतून २० हिंदू बरकनदाजां ऐवजी मुसलमान बरकनदाज नेमले
(मोगल छावणीतील बातमी पत्रे - ०२ फेब्रुवारी १७०३)
शेवटी ह्या सगळ्या त्रासास कंटाळून त्याने व्हरांड खानदेशात मराठ्यांच्या मागावर असलेल्या झुल्फिकार खानास परत बोलावून सिंहगड वेढ्याच्या बंदोबस्तास बोलवावे लागले. परंतु तिकडे मराठ्यांनी नर्मदा ओलांडल्याने बादशहाने पुन्हा झुल्फिकार खानाची नियुक्ती मराठ्यांच्या मागावर परत केली.
ही घटना अतिशय त्वरेने म्हणजे झुल्फिकार खानाच्या छावणीत येण्याचा एक आठवड्यातच झाली असे ४ ते ११ फेब्रुवारची १७०३ चीमोगल बतमीपत्री सांगतात.
आता काही पर्याय शिल्लक नसल्याने बादशहास स्वतः जातीने वेढ्यात लक्ष घालावे लागले व पुन्हा सम्पूर्ण वेढ्याचे चौफेर नवी व्यवस्था करावी लागली. व त्याने १६ फेब्रुवारी १७०३ रोजी मोगलखान ह्यास छावणी पासून ते औरंगाबादे पर्यंत च्या मार्गावर संरक्षण अधिकारी नेमले गेले .
व स्वतः आता वेढ्यातील ठाण्यावर जाऊन मोर्चे तपासत असे. असेच १८ फेब्रुवारी रोजी मोर्चे तपासत असताना मराठ्यांनी वरून त्याच्या स्वारीवर तोफ गोळे उडवले होते पण केवळ देव बलवत्तर म्हणून तो बचावला. पण ह्य त्याचा जोडीला असलेली मतलंबखनाला मात्र भुंड्या डोक्याने परत गेला होता करण त्याचा मोगली शिरपेच किल्ल्यावरील मराठ्यांनी टोफगोळ्या द्वारे मातीत मिळवला होता.
तरीही ह्या नवीन व्यवस्थेचा काही एक परिणाम मराठी पथकांवर न होता त्यांनी घसदाना आणण्या साठी छावणीतून बाहेर गेलेल्या पथकांवर हल्ला केल्याची नोंद २१ फेब्रुवारी १७०३ च्या बतमीपत्रात मिळते.व ह्यावरून मराठ्यांचे किल्ले घेण्यास निघालेले मोघलच उलट छावणी रुपी कारागृहात मरठूनद्वारे बंदिस्त झाल्याचे लक्षात येते. कारण सनरक्षणा शिवाय एकटे दुखते कोणी बाहेर गेला की तोहह मराठ्यांच्या तावडीत सापडला म्हणूनच समजा. आता मात्र बादशहा स्वतःच वेढा पुढे सरकत नसल्याने सरदारणवर राग राग करू लागला.
परंतु मार्च महिन्यात कडक उन्हाळा पसारला होता. छावणीतील काही हत्तीही ह्या उन्हाळ्यातील गर्मीने मरण पावल्याची नोंद 13 मार्च च्या बतमीपत्रात आहे.
उन्हाचा त्रासाने आता किल्ल्यावर ही पाण्याची विलक्षण तनचाई झाली होती. त्यातच रोगराई पसरून सिंहगडाच्या किल्लेदाराच्या १२ मार्च रोजी मृत्यू झाल्याने चित्र पालटू लागले होते.
किल्लेदाराच्या मृत्यू नन्तर आठवद्यायचं मोगलांचे मोर्चे २१ मार्च रोजी कल्याण दरवाजात पर्यंत सरकले होते.
त्यास उत्तर म्हणून किल्ल्यातील दीड हजार मराठयांनी २५ मार्च रोजी उजबेकखांनाच्या ठाण्यावर सडकून हल्ला केला. व तेथे कापाकापी करून परत किल्ल्यात गेले.
मराठ्यांच्या ह्या कृत्याने चिडून जाऊन मोगल्लानी ही धाडसी निर्णय घेतला व ३ एप्रिल रोजी एक तुकडी ने दोर लावून रात्री च्या अंधारात वर जाण्याचा प्रयत्न केला खरा पण तो फसला. मराठ्यांनी तुकडीतील बऱ्याच हशमांना कापून काढले. पण जे वाचले ते मात्र बदशहचून शाब्बाष्कीस पत्र ठरले व बादशाहने त्यांना सोन्याची कडी बक्षीस दिली .
पुढे ४ एप्रिल ला तर सेनापती धनाजी जाधव चा पुत्र शम्भूसिंह जाधवने म्हलर्जी व खंडोजी च्या सोबतीने ४ हजार घोडदळ सकट इराडत खानाच्या ठाण्यावर हल्ला केला. हे ठाणे बादशाही छावणीच्या रक्षणाच्या हेतूने छावणी पासून केवळ ४ कोस दूर होते.
व माघारी जाता जाता आखरपूर इथून छावणी कडे येणारी रसद ही १० एप्रिल ला लुटली.
परंतु कडक उन्हाळा, भीषण पाणी टंचाई व जेवघेनी रोगराई मुळे किल्ल्यावरील मराठ्यांचा धीर सुटत चालला होता. व विनाकारण हकनाक जीव गमावण्या पेक्षा सध्या माघार बरी ह्या विचारा पर्यंत येऊन मराठयांनी मोगलांशी बोलनी सुरु केली.
११ एप्रिल ला मराठ्यांकडून बाळाजी विषवनाथ व मोगलांकडून तोफखाण्याचा प्रमुख तरबीयतखंन व त्याचा भाऊ कमियाबखान ह्यांच्या नेतृत्वात चर्चा सुरू होऊन १३ एप्रिल रोजी मोगलांनी ५० हजार रुपये च्या बदल्यात सिंहगड किल्ला ताब्यात घेतला .
तरीही जाताजाता पायउतार होताना काही कारणास्तव १५ एप्रिल रोजी मराठे व मुघल ह्यांच्यात छावणी समोरच पुन्हा चकमक झाली.
शेवटी ह्या सर्वांची इतिश्री होऊन व नवीन ताब्यात आलेल्या किल्ल्याचे बक्षीदाबक्ष असे नामकरण करून २४ एप्रिल रोजी बादशाह सिंहगड च्या असमनतातून पुढील पावसाळ्या साठी पुण्याकडे रवाना झाला.
सिंहगड बद्दल मोगल इितहासकार साकी मुसतैदखान याने फार त्रोटक उल्लेख कला आहे.
भीमसेन सक्सेना हाही त्याकाळी िंसहगडाच्या जवळपासच होता. तो अिधक मोकळेपणाने लिहतो. तो म्हणतो: “तरिबयतखानाने किल्ल्यातील लोकांशी बोलणे लावले आिण त्यांना भरभक्कम रक्कम चारून किल्ला ताब्यात घेतला.
िंसहगडावरील पाण्याची टंचाई, रोगराई, आिण अन्न धान्याचे दुिर्भक्ष इत्यादी कारणांनी मराठ्यांनी किल्ला सोडून द्यावयाचे ठरिवले असे िदसते, तरी किल्ला इतक्या लवकर का सोडला, पावसाळा येईपयȊत तरी लढवायचा होता असा ठपका महाराणी ताराबाईंनी किल्ल्यातील शिबंदीवर ठेवला.
आपल्या पत्रात ताराबाई म्हणतात–-“सिंहगडास औरंगजेब बिलगला होता. त्यास नितजा पावावया निमित्त स्वामीने तुम्हास किल्ला मजकुरी ठेिवले होते. उतावळी करून हिम्मत सोडून, तहरह करून किल्लायावरून उतरून राजगडास आलेस म्हणोन हे वतर्मान धोंडोजी चव्हाण दिम्मत लबे यांनी हुजूर विदत कले . त्यास स्वामीने तुमचे मदतीस लोक पाठवले . ऐवज दास पाठिवण्यास काही न्यून कले नसता
उतािवळी करून हिम्मत सोडून ही गोष्ट केली, हे काही बरे कले नाही, पजर्न्य पडेपयȊत किल्ला भांडवावयाचा होता, ती गोष्ट न केली.”
अशा प्रकारे तब्बल १०८ दिवस व हिंदुस्थान च्या बादशहास सिंहगड साठी स्वतः झगडावे लागले. व शेवटी इतर गडां प्रमाणे हा गड ही लाच देऊनच ताब्यात घ्यावा लागला.
यावेळी जरी मराठयांना िंसहगड सोडावा लागला तरी मराठ्यांनी तो १७०५ मध्ये िंजकन घेतला. मोगलांनी शाहूराजांना पुढे करून इ.स.१७०६ मध्ये परत घेतला. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १७०७ मध्ये मराठयांनी तो कायमचा परत मिळिवला.
संदर्भ
मासिरी - इ - आलमगिरी
मोगल दरबाराचे बातमी पत्रे खंड 3

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...