विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 23 September 2023

रघूनाथ हरी नेवाळकर

 


रघूनाथ हरी नेवाळकर
नेवाळकर यांचेही मूळ महाराष्ट्राच्या रत्नागिरीचेच. पेशवा बाळाजी रावच्या वेळेस नेवाळकर घराण्यात हरि राव होते. त्याला तीन मुलं झाली. त्यापैकी रघुनाथराव सर्वात मोठा, त्याचे दोन भाऊ लक्ष्मणराव आणि शिवराव असे. रघुनाथरावला उत्तरेत झाशीमध्ये मराठी राज्याची सेवा करण्यास पाठविले होते. ते श्रीनाथ महादजी शिन्दे, महायोद्धा यांचेही विश्वस्त झाले. ई. सन १७९६ मध्ये रघुनाथरावांना तब्येतीमुळे राज्याचा सर्वाधिकार आपल्या सर्वात धाकट्या भावाकडे दिला. त्यानंतर झाशीचे राजकाज शिवराव हरि बघू लागला. इंग्रजांनी त्याला पेशवे आणि शिन्दे यांच्या प्रभावातून काढून आपले मित्र बनविले. नेवाळकर तेव्हापासून इंग्रजांच्या सांगण्यावरून झाशीचा कारभार पाहू लागले.
शिवरावला तीन मुलं झाली, मोठा मुलगा कृष्णाजी, मधला रघुनाथ (द्वितीय) आणि धाकटा गंगाधर. शिवराव हयातीत असता त्याचा मोठा मुलगा कृष्णाजी वारला. कृष्णाजीला रामचन्द्र नावाचा मुलगा होता. तो लहान होता पण कृष्णाजीच्यानंतर शिवराव ला झाशीच्या राज्यकारभारत रूची उरली नाही त्यामुळे तो बिठूरला गेला आणि तिकडेच वास्तव्य केले. सन १८२५ मध्ये बुन्देलखंडात नानापंत म्हणून फार मोठा क्रान्तिकारी झाला. त्याने ब्रिटिश अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले.
नानापंतला इंग्रज कधीच पकडू शकले नसते. जर झाशीच्या रामचन्द्रराव नेवाळकरांनी इंग्रजांची मदत केली नसती. गवर्नर जनरल विलियम बेंटिक याविषयी लिहितो, ” If the army of Jhansi had not helped us, our victory was impossible ” १८३२ मध्ये विलियम बेंटिकनी झाशीच्या रामचन्द्रराव नेवाळकरला “महाराज” पद दिले । १८३५ मध्ये रामचन्द्र नेवाळकरांना देवाज्ञा झाली, त्यावेळेस त्याचा दत्तकपुत्र कृष्णाजी (द्वितीय) ला गादीवर बसविले. पण त्याच वेळेस शिवरावच्या मधल्या मुलाने म्हणजे रघुनाथ (द्वितीय) ने विरोध केला. त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रघुनाथराव (द्वितीय)ला नेवाळकर घराण्याचे प्रमुख बनविले आणि त्याचा राज्याभिषेक करण्यात आला. काही वर्षानंतर रघुनाथ द्वितीय पण वारला. आता गादीवर कोणाला बसवायचे हा प्रश्न उभा राहिला. कृष्णाजी द्वितीयने पुन्हा आपली गादी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केला. पण तो गादीवर बसू शकला नाही कारण शिवरावच्या धाकट्या मुलाला म्हणजे गंगाधर रावला नेवाळकर घराण्याचे प्रमुख बनविले गेले आणि त्यांना गादीवर बसविण्यात आले. गंगाधररावांबरोबर मणिकर्णिका तांबेचे लग्न झाले आणि तिचे नाव लक्ष्मीबाई नेवाळकर झाले……

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...