विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 28 November 2023

सरदार आवजीराव कवडे गढी

 

सरदार आवजीराव कवडे गढी
 
 
लेख व माहिती संकलित
संतोष झिपरे
( राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक) ९०४९७६०८८८
संदर्भ :-+ सोलापूर जिल्ह्यातील इतिहास, मराठा रियासत
पेशवे दप्तर, वैद्य दप्तर







 
 
 
 🌞🌞 सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात असलेले गुरसाळे हे गाव मराठ्यांच्या इतिहासात सरदार आवजीराव कवडे व सरदार महिपतराव कवडे यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे या गावात त्यांची राहती गढी साडेतीन ते चार एकर मध्ये असावी आज घडीला गढीचे अवशेष आपल्याला त्या भागात दिसून येतात पण ते राहण्या योग्य नाहीत याशिवाय सदर गढीचे जे तळघर आहे ते जवळजवळ एक एकर मध्ये असून सदर तळघर हे स्वच्छता व साफसफाई केल्यास वापरण्यायोग्य आहे पण स्थानिक पातळीवरील शिवप्रेमी वंशज व ग्रामपंचायत याचे याकडे दुर्लक्ष झाला आहे कवडे गढीच्या तळघर हे एक भुलभुलय्याचा प्रकार असावा कारण तत्कालीन काळात निजाम आणि मराठ्यांच्या संघर्षात निजामाकडून या भागात वारंवार हल्ले करण्यात येत होते म्हणून सदर गढीचे बांधकाम हे तळघरात मजबूत स्वरूपात बांधलेला आहे कारण या तळघरात धान्य शस्त्रसाठा वगैरे ठेवण्याची सोय असावी तसेच या काळात घरातून एक रस्ता फुटून पाठीमागील बाजूस असलेल्या चंद्रभागा नदीच्या पात्राकडे जातो जो नित्य नेमाने नदी तून पाणीपुरवठा करण्यासाठी वापरला जात असावा तसेच सदर गडढीही गावाच्या शेवटच्या टोकाला एका उंच टेकडीवर बांधण्यात आली आहे आणि पाठीमागील बाजूला असलेल्या चंद्रभागा नदी शेजारून वाहत असल्याने नैसर्गिक संरक्षण या घडीला लाभला आहे जवळजवळ कधी गडीच्या वरच्या टोकापासून ते चंद्रभागा नदीचे पात्र हे शंभर उंची वाटते मीटर तरी बसत असावं असं दिसते प्रवेशद्वारे हे दगडी बांधकामातील चिरोबिंद असून ते 30 फूट उंच आहे आज शिरल्यानंतर दोन्ही बाजूला चौकांची सोय असून जस जस आपण ग ढी च्या आत मध्ये फिरायला सुरुवात करून तेव्हा अनेक ठिकाणी मातीच्या राशी आपल्याला पडलेले दिसतात पण याचा अर्थ काय एवढी माती कशी प्रश्न मनात येत तरी होत नाही की इतक्या मोठ्या प्रमाणात माती इथे कसे तर सदर गढी ही तीन ते चार एकर परिसरात आहे या गढीवर पूर्वी 12 ते 18 बुरुजा असल्याचं सांगितले जातात तसेच जुन्या मंडळी जुने जाणकार मंडळी हे आपल्या लहानपणात सदर गढीच्या तटबंदीवरून पूर्ण गढीला फेरी मारत होते सदर गढीची तटबंदी ही चार फूट रुंद ते कुठे कुठे आठ फूट होऊन जाईल यावरून गढीच्या बांधकामाची मजबुती व लढाईच्या काळात गढी अनेक दिवस झुंजत ठेवण्याची तयारी या स्थापत्यशास्त्रातून पडली आहे असे दिसून येते आज घडीला गढीवर चिल्लारीची झाड काटाळ हीच उगवली असून सदर झाडांचे मुळे जमिनीत जाऊन तेथील तळघरास नुकसान करत आहेत याकडे गावातील स्थानिक मंडळींनी लक्ष दिलं पाहिजे होगा ग्रामपंचायतीने ऐतिहासिक ठेवा जोपासण्यासाठी पुढाकार घ्यावा साठी पुढाकार घेतला पाहिजे परिसरातील तुळशीवर्धन असून काही इमारतीचे अवशेष आजही दिसतात विशेष म्हणजे माझ्या बघण्यात आजवर अनेक गाड्या आल्या पण या गढीचे तळघर हे मला नेहमीच भुरळ पाडीत राहील इतकी सुंदर रचना व स्थापत्यशास्त्र या ठिकाणी दिसून येतं या तळघरात जाण्यासाठी व निघण्यासाठी विविध पायऱ्या आणि चोरवाटा आहेत ज्या आता उघडे पडू लागले आहेत..
झाडांच्या चिल्लरच्या झाडांचे मुलांमुळे तळघराच्या बांधकामाला भेगा पडून पावसाळ्यात पाणी गळत असावं असं दिसतं विशेष म्हणजे मे महिन्याच्या 14 15 तारखेला या ठिकाणी दिल्यामुळे भर उन्हाळ्यात दुपारच्या बारा ते तीन यावेळी सदर गडी पडल्यामुळे अनेक नवनवीन गोष्टी अभ्यासणे या ठिकाणी मिळाले

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...