विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 28 November 2023

२८ नोव्हेंबर १६५७ दर्यास ‘पालाण’.

 


२८ नोव्हेंबर १६५७ दर्यास ‘पालाण’...🚩
शिवकाळातील अग्रगण्य बखरीचा लेखक कृष्णाजी अनंत हिरेपारखी सभासद यांनी शिवाजी महाराजांबद्दल एक सुरेख नोंद करून ठेवली आहे...,
पानियातील डोंगर वसवुन दर्यामधे गड वसविले गड जहाजे मिळवून “दर्यास पालाण राजियानी घातले जोवर पानियातले गड असतील तोवर आपले नाव चालेल ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र” हे तत्व शिवाजी महाराजांनी चांगलेच ओळखले होते स्वराज्याचा विस्तार हा झपाट्याने होत होता महाराजानी आता जावळी काबीज केली त्या पाठोपाठ उत्तर कोकण काबीज झाल्यामुळ॓ स्वराज्याच्या सीमा आता जंजीरेकर सिदद्याला भिडल्या होत्या जंजीरयाची मोहिम आता निघणार हे निश्चित होते राजांनी ही मोहिम रघुनाथपंत बल्लाळ यांच्यावर सोपवली...
शिवशाहीचा त्रिशुळ आता कल्याण-भिवंडी कडे वळाला महाराज स्वत: जातीने कोकणात उतरले ३ ओक्टोबर १६५७ रोजी महाराज कल्याणला पोहचले कल्याण-भिवंडी एकाच दिवशी म्हणजे २४ ओक्टोबर १६५७ या दिवशी काबिज झाली त्यानंतर महाराजांनी लगेचच एका महिन्याच्या आत २८ नोव्हेंबर १६५७ या दिवशी चौल काबिज केले चौल पाठोपाठ माहूलीचा किल्ला महाराजांनी घेतला महाराज आता दक्षिण कोकणात उतरले रत्नागिरी खारे-पाटण अशी ठाणी एकामागून एक स्वराज्यात दाखल झाली महाराजांचे लक्ष होते आता घेरियावर आणि विजय नाम संवत्सरात दुर्ग ताब्यात येताच महाराजांनी त्याचे नामकरण केले विजयदुर्ग दुर्ग भांडता करून राजांनी त्यास बळकट करण्याचे काम सुरु केले आता दर्या भवानीवर मराठयांची ठाणी अस्तित्वात आली होती कल्याण भिवंडी-पनवेल ह्या प्रदेशामधे सागाची झाडे मुबलक तेव्हा या लाकडाचा उपयोग करून याची तारवे बनवण्याचा निर्णय महाराजांनी घेतला सुरवातीलाच पोर्तुगिजांबरोबर वैर धरून त्यांच्या सागरी सार्वभौमत्वाला आव्हान महाराजांना द्यायचे नव्हते, म्हणून ही तारवी आपण सिदद्याच्या विरुद्ध वापरणार आहोत हे महाराजानी आधीच जाहिर करून टाकले...
“अशी आहे मराठेशाहीच्या आरमाराची पहिली वहिली सुरवात..…”
————————————
पोर्तुगीज मराठे संबंध : श्री पांडुरंग पिसुर्लेकर...

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...