विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 November 2025

‘अखंड भारत’ या संकल्पनेचे स्वप्न दाखवले ते म्हणजे “छत्रपती शिवाजी महाराज”....

 शिवकाळात गुलामीने त्रस्त झालेल्या समाजाला


‘अखंड भारत’ या संकल्पनेचे स्वप्न दाखवले ते म्हणजे “छत्रपती शिवाजी महाराज”....

🙏🚩
शिवरायांचा जन्म हा केवळ १७ व्या शतकातील जुलमी सत्तेची मुळं उखडून टाकण्यासाठी नव्हता तर, अखंड भारत भूमीच्या संस्काराच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या रक्षणाच्या दृष्टीनेही महत्वाचा होता. ही भूमी आपलीच आहे आणि इथे आपलेच राज्य पाहिजे ही संकल्पना १८०० वर्षे कुठेतरी अंधारात गेली होती. ती पुन्हा उजेडात आणली ती छत्रपती शिवरायांनी. अशा या परिस्थितीत "शिवराय" जन्माला येतात आणि या समाजाला कुठच्या कुठे घेऊन जातात. आधुनिकता काय आहे हे या समाजाला शिकवतात. अक्षरशः जिवंत मृतांमध्ये एक जीव ओतला हो या महाराजाने. जवळ-जवळ १८०० वर्षानंतर पुन्हा या भयभीत आणि गुलामीने त्रस्त झालेल्या समाजाला ‘अखंड भारत’ या संकल्पनेचे स्वप्न दाखवले. गोरगरीब आणि शेतकरी वर्गाला हाताला धरून या महाराजाने एक स्वतंत्र राज्य स्थापन केले. परकियांची सावली आपल्या प्रखर तेजस्वी पराक्रमाने नेस्तनाबूत करून टाकली..
“बादशाहाची बाहुलं बनलेले हे पराक्रमी मराठे आता आपल्या राजाच्या पायाची पावलं बनली आणि हि पावलं जिथं पडली तिथली जमिन स्वतंत्र झाली”...!
● परकीय आक्रमण थांबवण्यासाठी अखंड भारत हाच एकमात्र पर्याय आहे, याची जाणीव शिवरायांनी या समाजाला करून दिली. आणि हिच जाणीव पुन्हा जिवंत करायची गरज आहे, म्हणुन इथे मला रियासतकारांनी शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे मांडलेले शब्दचरित्र आठवते, ते म्हणतात :
“ज्या पुरुषास कधी कोणतेही दुर्व्यसन शिवले नाही, ज्याने परस्त्रीस मातेसमान मानले, ज्याने स्वधर्माप्रमाणे परधर्मास आदर दाखवला, ज्याने युद्धा मध्ये पाडाव केलेल्या शत्रूच्या लोकांस त्यांच्या जखमा बऱ्या करून स्वगृही पोहचवले, ज्याने फौज, किल्ले, आरमार इत्यादी योजनांनी स्वदेश रक्षणाची योग्य तजवीज करून ठेवली, ज्याने सर्वात आधी स्वत: संकटात उडी मारून आपल्या लोकांना स्वदेशाची सेवा करण्यास शिकवले, ज्याने अनेक जीवावरच्या प्रसंगी केवळ बुद्धिसामर्थ्याने स्वतःचा बचाव केला, ज्याने औरंगजेबा सारख्या प्रतापी बादशाहाचे भगीरथ प्रयत्न सतत ३० वर्षे पावेतो यत्किंचित चालु दिले नाहीत. इतकेच नव्हे, तर तीन राज्यांच्या अखिल भारतखंडात अपूर्व असे स्वतंत्र राज्य स्थापन करुन, त्याची किर्ती पृथ्वीवर अजरामर करुन ठेवली; त्या प्रतापी व पुण्यशील पुरुषाची योग्यता पूर्णपणे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे...
...कोणास कधी जागीरी अगर जमीनी तोडून न देणारा, न्यायाचे कामांत कोणाची भीडमुर्बत न धरणारा, दुष्टांचा काळ पण गरीबांचा कनवाळू, एकंदर रयतेस पोटच्या मुलांप्रमाने वागवणारा, सदैव सावध व उद्योगी, नेहमी मातेच्या वचनात राहून अहर्निश राष्ट्राची चिंता वाहणारा, स्वदेश, स्वभाषा व स्वधर्म या विविध संपत्तीचे संगोपन करणारा, पापभीरु परंतु रणशुर, असा हां आधुनिक काळाचा अद्वितीय राज्य संस्थापक “छत्रपती शिवाजी महाराज” प्राचीन पुण्यश्लोकांचे पंगतीत बसण्यास सर्वथैव प्राप्त आहे...”
शिवरायांच्या जीवनाकडे किंवा त्यांच्या चरित्राचा विचार केला तर आज आपण त्यांच्याकडे विशेष आदराने पाहतो. विशेषतः महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येकाला ते आपलेसे वाटतात. आज जवळजवळ महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये शिवरायांची प्रतिमा आढळते. असं काय त्यांच्यामध्ये वेगळं होतं की, शिवराय आजही मनामनामध्ये घर करून राहिले आहेत. त्यांचे साधेपण, त्यांची रयतेबद्दल असणारी प्रेमभावना, रयतेला पुढे ठेऊन घेतलेले निर्णय, शेतकऱ्यांबद्दल असणारे विशेष प्रेम आणि आदर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे शिवराय हे आपल्यातलेच आहेत असेच वाटते. स्वतः राजा आहे म्हणून स्वतःला त्यांनी कधीच एका उंचीवर नेऊन ठेवले नाही जेणेकरून रयत त्यांच्यापासून दूर जाईल. भावनिक असणे ही वेगळी गोष्ट आहे, परंतु समाजामध्ये किंवा स्वतःच्या कुटूंबामध्ये वावरत असताना नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी भावना नक्कीच महत्वाची असते ज्याला आपण इंग्रजीमध्ये Emotional Attachment असे म्हणतो..
छत्रपती शिवरायांनी रयतेबरोबर जी भावनिकता जपली ती ना त्यांच्या आधी कोणाला जमली ना नंतर कोणाला जमली. त्याच बरोबर कुटूंबामध्ये सुद्धा त्यांची अशीच वागणूक दिसून येते. शिवरायांनी एकोजीराजांना लिहिलेली पत्रे जर पहिली तर त्यामध्ये प्रेम, काळजी, शिकवण या सर्व गोष्टी दिसतात. एका पत्रामध्ये शिवराय त्यांना म्हणतात की, “गृहकलह वाढवू नये, वाढलियाने पहिले युगी कौरव पांडव बहुत बहुत कष्टी जाले”..
एकोप्याने आणि प्रेमाने रहा अशीच त्यांची नेहमी धारणा होती. रयतेबद्दल महाराज किती आदर भावनेने विचार करतात याचे उदाहरण जर द्यायचे झाले तर त्यांचे एक पत्र उपलब्ध आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही' म्हणजे, प्रजेला कोणताही त्रास होता कामा नये. आणखी अशी असंख्य पत्रं आहेत ज्यामध्ये महाराज नेहमी रयतेचा प्रथम विचार करताना दिसतात. जो माणूस तुमच्या बरोबर आपुलकीने आणि प्रेमाने वागतो तोच माणूस तुम्हाला आपलासा वाटतो. हेच शिवरायांच्या बाबतीत आहे. आणि त्यामुळे शिवराय वेगळे ठरतात आणि आजही ते आपलेसे वाटतात..

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...