#_______मराठेशाहीचा_उत्कर्ष_बिंदु_______
दुसरा शककर्ता म्हणजे अर्थात छत्रपती शिवराय.
त्यानुसार शालिवाहन शक 1 (इ.स. 78) आणि राज्याभिषेक शक 1 (इ.स. 1674) ही महाराष्ट्राच्या इतिहासा तील दोन महत्त्वाची वर्षे.
महाराष्ट्राच्या इतिहासा तील महत्त्वाचे तिसरे वर्ष कोणते असा प्रश्न कोणी विचारला तर ते निःसंशयपणे इ.स. 1792 असल्याचे उत्तर द्यायला हवे.
खुद्द शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्य्राच्या दरबारात गेले होते तेव्हा त्यांना पंचहजारी सरदारांच्या रांगेत उभे करून अवमानित करण्यात आले होते.अर्थात त्याचा वचपा त्यांनी लगेच काढलाच.
आता त्याच मोगल दरबारात शिवाजी महाराजांच्या राज्याचा प्रतिनिधी श्रीमंत महाराज महादजी शिंदे बादशहाजवळील आसनावर बसून हिंदुस्थानचा कारभार पाहत होते
दिल्लीच्या दरबारात फक्त बादशहाच तख्तावर बसायचा. बाकी सर्व मानकऱ्यांना उभे राहावे लागे, हे जाणकारांना ठाऊक आहेच.
शिवछत्रपतींच्याकाळी सुरू झालेले इतिहास चक्र पूर्ण फिरून श्रीमंत महाराज महादजी शिंदे यांच्या जवळ येऊन थांबले.
इतिहासाच्या नियतीचा न्याय पूर्ण झाला. हा महाराष्ट्राच्या इतिहासा तील उत्कर्ष बिंदूच होय......

No comments:
Post a Comment