१६८९ च्या फेब्रुवारी महिन्यात संभाजी महाराज मुघलांच्या हाती लागले. छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेसाठी आलेल्या औरंगजेबाच्या हाती पहिले काही वर्ष काहीच लागले नव्हते. पण आदिलशाही आणि कुतुबशाही बुडवल्यावर मात्र त्याची हालचाल वाढली. याची खबर संभाजी महाराज व मुघल दोघांवर लक्ष ठेऊन असलेल्या इंग्रजांना लागली...
● त्याबाबत मद्रासहुन इंग्रज लंडनला लिहितात,
"संभाजीराजेंला मदत करणाऱ्या दोन्हीही शाह्यांचा नाश केल्यानंतर आता आपल्यावर येणाऱ्या संकटाला कसे तोंड द्यावे या विवंचनेत संभाजीराजे सध्या तयारीत गुंतलेले आहे. मुघलांच्या छावणीतून भगवानदास नावाचा एक ब्राम्हण इथे आला आहे. तो म्हणतोय की औरंगजेब संभाजीराजेंला जीवंत पकडण्याची भाषा करतो आहे." दोन शाह्या बुडवण्याचं मोठं यश हाती लागलेल्या औरंगजेबाचा आत्मविश्वास दुणावला असणार एवढं नक्की. दोन्ही शाह्या जिंकल्यानंतर औरंगजेबाने त्याची सगळी ताकद संभाजी महाराजांच्या शोधासाठी लावलेली असणार. मुकर्रबखानाला संभाजी महाराजांची माहिती औरंगजेबाने पेरलेल्या हेरांनी दिली असण्याची जास्त शक्यता आहे...
कारण औरंगजेब त्याचा अधिकारी असदखान याला लिहितो,
"ज्याला तू पन्हाळा घ्यायची जबाबदारी दिली आहेत त्या मुकर्रबखानाला माझे आदेश कळव की 'त्या जमीनदारला लवकर कैद कर'. तू त्याला लिही की सध्या तो घमेंडी जमीनदार एकटाच रायगडाहून खेळण्याला गेला आहे. तो त्याच्या नातेवाईकांचे वाद मिटवण्यासाठी जात आहे. तिथे त्याला पकडून मुस्लिमांवर अन्याय करणाऱ्याचा बदला घे." यावरून असे लक्षात येईल की खुद्द औरंगजेब त्याच्या हेरांमार्फत संभाजी महाराजांवर लक्ष ठेऊन होता...
―――――――――――――
#इतिहासकर्ते_मरहाट्टे #
छत्रपतीसंभाजीमहाराज
#बलिदान_मास #११मार्च_वढू_तुळापूर
#गडवाटप्रवाससह्याद्रीचा #रणमार्तंड_मरहट्टे

No comments:
Post a Comment