विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 2 October 2018

शिवरायांना माणसांची अचुक ओळख


शिवरायांना माणसांची अचुक ओळख
होती.
त्यांनी लहानपणी घोड्यावरून रपेट
मारताना अनेक जिवलग मित्र जमवले
होते जे स्वराज्यासाठी झटले,
कामी आले.अशा काहींची नावे
खालीलप्रमाणे :-
कान्होजी जेधे - शहाजीराजांचे
विश्वासू सरदार होते.
गोमाजी नाईक – पुर्वी नाईकांतर्फे
असणारे गोमाजींना लग्नानंतर
जिजाऊंसोबत भोसले घराण्यामधे
पाठवले होते.
बाजी पासलकर – आदिलशाहीचे मोठे
देशमुख म्हणुन मावळ प्रांतामधे
दरारा होता. पुरंदरच्या लढाईमधे
ते कामी आले.
येसाजी कंक – बालपणीचे मित्र,
किल्ले तोरणाचे किल्लेदार.
फिरंगोजी नरसाळा – किल्ले
चाकणचा किल्लेदार,
शायिस्तेखानाशी झुंज.
नेतोजी पालकर – स्वराज्याचे
सरनोबत
बाजीप्रभु देशपांडे – पावनखिंडीमधे
बलिदान
मुरारबाजी देशपांडे – किल्ले पुरंदरचे
किल्लेदार, दिलेरखानाविरुद् -ध
लढाईमधे बलिदान
चिमणाजी देशपांडे –
शिवरायांसोबत लालमहालामधे
छापा घातला
प्रतापराव गुजर – स्वराज्याचे
सरनोबत
हंबिरराव मोहिते – स्वराज्याचे
सरनोबत
तानाजी मालुसरे – शिवरायांचे
बालमित्र, किल्ले
कोंढाणा घेण्यावेळी बलिदान
बहिर्जी नाईक – बहुरुपी,
शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे
प्रमुख
हिरोजी फर्जंद – आग्र्याहुन
निसटताना शिवरायांच्या एवजी त्यांच्या गादीवर
सोंग घेऊन झोपले होते.
सोनोपंत डबीर – स्वराज्याचे प्रथम
पेशवा, प्रमुख सल्लागार
स्वराज्याचा दर्यासारंग
कान्होजी आंग्रे
(आरमारप्रमुख)
मदारी मेहतर – शिवरायांचा सेवक
बाजी जेधे – कान्होजी जेधे यांचे
पुत्र
मालोजी घोरपडे – स्वराज्याचे
सरनोबत
(छत्रपती संभाजीराजांच्या -वेळी)
संताजी घोरपडे – मालोजी घोरपडेंचे
पुत्र व स्वराज्याचे सरनोबत
(छत्रपती राजारामानंतर)
हैदर अली, धनाजी जाधव, रघुनाथ
बल्लाळ, कोंडाजी फर्जंद,
फुलाजी प्रभु देशपांडे,
व्यंकोजी दत्तो अशी अनेक माणसे
स्वराज्याच्या कामी आले.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...