विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 2 October 2018

महादजी शिंदे

अपरिचित....

महादजी शिंदे:-

पानिपतच्या तिसर्या लढाईत दत्ताजी शिंदे,जनकोजी शिंदे यांच्या मृत्युनंतर महादजी शिंदे यांना १५ जानेवारी १७६८ या दिवशी सरदारकी मिळाली, ते उज्जैनचे जहागीरदार बनले आणि त्यांना सरंजामी नेमणूकही मिळाली.
शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ केली आणि ज्यांनी तिच्यावर कळस चढवला ते महादजी शिंदे,ज्यांच्याबद्दल कसल्याहि प्रसंगी न डगमगणारा, शूर, मुत्सद्दी, राष्ट्रहित जाणणारा, काटकसरी, कृष्णभक्त, सुदृढ, मध्यम उंचीचा, काळासांवळा, साध्या रहाणीचा, कवि, परधर्मसहिष्णु, शकुनादिकांवर भरंवसा ठेवणारा, त्यावेळच्या मानानें सुशिक्षित व राज्यकारभार उत्तम ठेवणारा होते म्हटले जाते .
महादजी शिंदेचे नाव मराठ्यांच्या इतिहासात महान सेनानी म्हणून घेतले जाते. ग्वाल्हेरच्या या सिंहात असामान्य शौर्य, मुत्सद्दीपणा, धडाडी, राजकर्ता असे अनेक गुण होते. त्यांच्या कतुर्त्वामुळे इंग्रजांकडून मानाने यांना 'द ग्रेट मराठा' असे म्हटले जात. पानिपतची लढाई, वडगावची लढाई सालबादचा तह, बारभाई कारस्थान अशा अनेक घटनांमध्ये त्यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. पानिपतच्या तिसर्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. अस्थिर अशा मराठा साम्राज्याला महादजींमुळे स्थैर्य लाभले. मुघल, इंग्रज आणि आप्तस्वकीयांच्या विरुद्ध ते आजन्म लढले
पोस्ट शेअर करा

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...