विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 20 January 2019

बख्तबुलंद शाह

बख्तबुलंद शाह
बख्तबुलंद शाह याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली.
इतिहास
या राजाचे मूळ नाव 'महिपत शाह' असे होते.छिंदवाड्याजवळ असलेल्या देवगड या ठिकाणचा हा मूळ गोंड राजा होता.ते गाव दुर्गम असल्याने व नागपूरक्षेत्र हे पठारी असल्याने त्याने आपली राजधानी नागपूर येथे हलविली.नागपूरच्या परिसरातील राजापूर,रायपूर,हिवरी,हरीपूर,वाठोडा,सक्करदरा,आकरी,लेंढरा,फुटाळा,गाडगा,भानखेडा व सिताबर्डी अशी या बारा गावांची नावे होती.या गावांना 'राजापूर बारसा' (राजापूरसह बारा गावे) असे संबोधिल्या जायचे.या गावांना रस्त्यांनी जोड्ण्याचे काम या राजाने केले.
या राजास भाउबंदकी भोवली.औरंगजेब याने त्यास मदत केली व या मोक्याचा फायदा उठवुन या राजास मुसलमान धर्म स्वीकारणे भाग पाडले..'बख्तबुलंद' म्हणजे नशीबवान. हे नाव त्यास औरंगजेबाने दिले.
हा राजा पराक्रमी होता. त्याने नागपूर राज्याच्या सीमा शिवनी,पवनी, कटंगी, भंडारा आदि गावांकडे विस्तारल्या.नागपूरचा किल्ला हा त्यानेच बांधलेला किल्ला आहे.
नागपूर येथे विधान भवनाजवळ या राजाचा पुतळा आहे.]

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....