विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 21 February 2019

प्रतिशिवाजी नेताजी पालकर

नेताजी पालकर यांचा इतिहासामध्ये ‘प्रतिशिवाजी’ म्हणजेच दुसरा शिवाजी असा उल्लेख आहे. नेताजी स्वराज्याचे दीर्घकाळ सरसेनापती होते. आपल्या कारकिर्दी मध्ये त्यांनी अनेक लढाया गाजवल्या, नेताजींचे मुळ गाव पुणे जिल्यातील शिरूर हे होय. अफझलखान आणि राजेंच्या भेटीच्या वेळी नेताजींनी मोठा पराक्रम गाजवला होता. प्रतापगड च्या लढाईच्या वेळेस छत्रपतींनी नेताजींना खास कामगिरी सांगितली होती.

सभासद म्हणतो राजे मातोश्रींचा आशीर्वाद घेऊन प्रतापगडास निघाले. पालकर सरनोबत यास लष्कर घेऊन वर घाटावरी येणे म्हणोन सांगितले, आणि अफझलखानास जवलीस बोलवितो, सला करोन भेटतो, विश्वास लाऊन जवळ आणितो, ते समयी तुम्ही घाटमाथा येओन मार्ग धरीने, असे सांगितले. खानाचा वध झाल्यानंतर, राजे गडावरी जातांच एक भांड्याचा आवाज केला, तेच गडाखालील लोक व घाटावरील लोक व लष्कर व कोकणातून मोरोपंत व मावळे असे चौतर्फी चोहोंकडून चालोन खानाचे गोटावरती आले, मोठे घरोन्दर युद्ध जाहाले, रक्ताच्या नद्या चालल्या. रणकंदन जाले, प्रतापगडाचा या युद्धात नेताजीन्ने मोठा पराक्रम गाजवला.

पुढे मिर्झा राजेंबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले होते. पण आदिलशाही सेनापती सर्जाखान याच्यासमोर त्यांना अपयश आले. त्यामुळे विजापुर्कारांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी राजे विजापूरहून पन्हाळ्यास आले. राजेंनी रात्रीच गडावर छापा घातला. पण किल्लेदार सावध असल्याने मराठ्यांचा पराभव झाला, सुमारे १००० मावले मारले गेले.

सभासद म्हणतो, मग राजीयांनी नेताजी पालकर यास बोलावून आणिला आणि “समयास कैसा पावला नाहीस?” म्हणून शब्द लावून सरनोबती वरून दूर केले. मग नेताजी विजापुरकारांना जाऊन मिळाले. महाराज अगर्याच्या भेटिस गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.

महाराजांनी आग्र्याहून, सुटका केल्यानंतर शिवाजीराजे सुटले आता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराणे औरंगजेबाने नाताजी पालकारांच्या अटकेविषयी फर्मान दि. १५ जून १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन त्यांचे चुलते कोंडाजी यांस अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवले, आग्र्यास त्यांचा अतोनात छळ करण्यात आला त्यामुळे दि. २७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे ‘मुहम्मद कुलीखान’ असे नामकरण करण्यात आले. औरंगजेबाच्या हुकामाप्रमाणे जून १६६७ मध्ये नेताजी काबुल कंदाहारच्या मोहिमेवर रवाना झाले. लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. पुढे ९ वर्षे नाताजी काबुल कंदहार या मोहिमेवर होते.

अग्र्यातून सुटका झाल्यानंतर राजेंनी एकामागोमाग एक किल्ले घेण्याचा सपाटा लावला होता, शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते, अश्यावेळी त्यास प्रतीशिवाजीची आठवण झाली व त्याने दिलेर्खानसोबत नेताजींस महाराष्ट्याच्या मोहिमेवर पाठवले. पश्चाताप झालेले नाताजी मी १६७६ मध्ये मोगली छावणीतून
पळून रायगडावर आले. शिवाजी महाराजांनी दि. १९ जून १६७६ रोजी त्यांना पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले. नेताजी पालकर यांची समाधी तामसा येथे जी. नांदेड येथे आहे.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...