विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 26 March 2019

बुऱ्हाणपूर वरील छापा

बुऱ्हाणपूर वरील छापा

तारीख: २८ जानेवारी १६८१
छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला होता. हा छापा का आणि कशाप्रकारे केला ते पाहू.
ही मोहीम करण्याची कारणे –
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज छत्रपती झाले. औरंगजेब व त्याचा मुलगा अकबर यांच्यात गादीचा वाद निर्माण झाला होता.रजपूत सरदारांनी अकबराला पाठिंबा दिला त्यामुळे औरंगजेब त्या युद्धात गुंतला होता.त्याचे स्वराज्याकडे जास्त लक्ष नव्हते.पण याच काळात ओरंगजेबने हिंदू तसेच मुस्लिम नसलेल्या लोकांवर जिझिया कर लावला. हा कर खूप जाचक अटींनी युक्त होता त्यामुळे हिंदू राजे व प्रजा यावर खूप नाराज होती. तसेच या जिझिया करामुळे लोकांवर खूप अन्याय करण्यात आला.
मोहिमेसाठी बुऱ्हाणपूरची निवड का?
बुऱ्हाणपूर हे मुघलांसाठी दाक्षिणेचे प्रवेशद्वार होते.तसेच आग्रा,दिल्ली, सुरत यासारखे व्यापारी केंद्रही होते. बुऱ्हाणपूर शहराच्या वेशीबाहेर नवाबपुरा, बहादूरपुरा, करणपुरा, खुर्रमपुरा, शहाजंगपुरा असे वेगवेगळे सतरा पुरे वसविले होते. त्यातील बहादूरपुरा हा सर्वात श्रीमंत वस्तीचा पुरा होता. सोने, चांदी, हिरे, मोती, दागदागिने, जड जवाहिरे, उंची वस्तू, वस्त्रे, अत्तरे आदीच्या श्रीमंत व्यापाराचे हे एक प्रमुख केंद्र होते. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी मोहिमेसाठी या गावाची निवड केली.

बुऱ्हाणपूर ची मोहीम कशी झाली ?
रायगड ते बुऱ्हाणपूर हे १०००किमी पेक्षा जास्त अंतर आहे . परंतु फक्त ४ ते ५ दिवसामध्येच छत्रपती संभाजी महाराजांनी पार केले.मोहिमेच्या अगोदर सुरत लुटणार अशी अफवा पसरवली.याचे कारण म्हणजे शत्रूचे लक्ष एका ठिकाणी वळवणे करणे आणि दुसऱ्या ठिकाणी हल्ला करणे.छत्रपती संभाजी महाराज स्वतः या मोहिमेत सहभागी होते.
३० जानेवारी १६८१ हंबीरमामांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी बुऱ्हाणपूरावर अचानक हल्ला केला.खानजहान हा बुऱ्हाणपूरचा सुभेदार होता व काकरखान अफगाण हा त्याचा सहायक अधिकारी होता.सुभेदार खानजहान हा औरंगाबाद मध्ये होता.काकरखानाकडे दोनशे माणसांनिशी बुऱ्हाणपूराच्या रक्षणाची जबाबदारी होती. समोर मराठ्यांची सेना होती वीस हजारांची. मराठ्यांनी पहिला छापा थेट बहादूरपुऱ्या वर घातला. तेथील दुकानातील लक्षावधी रुपयांचा माल मराठ्यांच्या हाती आला. छापा इतका अनपेक्षित होता की तेथून एक माणूस किंवा एक पैदेखील हलवता आली नाही. पुऱ्यात आगी लावण्यात आल्या. त्याचा धूर वरपर्यंत गेल्यावर शहरात पत्ता लागला की मराठ्यांचा हल्ला झाला आहे. ताबडतोब शहराचे दरवाजे बंद केले गेले. दुसरा पर्यायच नव्हता. २०० माणसांना 20 हजार माणसांचा सामना करणे शक्यच नव्हते. एकेक करत मराठ्यांनी सर्व सतरा पुरे लुटले व सोबत लुटलेला खजिना घेऊन चार पाच दिवसातच साल्हेरकडे निघून गेले.या मोहिमेत हिरे मोती सोने नाणे अशी १ करोड पेक्षा जास्त होनांची दौलत स्वराज्यात आणली .
बुऱ्हाणपूरचे प्रतिष्ठित नागरिक, मुल्ला, मौलवी, विद्वान यांनी बादशाहाला विनंती केली ‘काफारांचा जोर झाला. आमची अब्रू आणि संपत्ती नष्ट झाली. यापुढे शुक्रवारची नमाज बंद पडेल’ यावर बादशाहने खानजहानला चिडून पत्र लिहून पाठविले कि ‘दक्षिणच्या काफरांचा बीमोड करण्यासाठी मी स्वतः येत आहे’ औरंगजेबाने खानजहानला बुऱ्हाणपूरच्या सुभेदारीवरून हटविले व ईरजखान यास नेमले.
या पद्धतीने बुऱ्हाणपूर ची मोहीम पार पडली.औरंगजेबला चांगलीच अद्दल घडली.त्यानंतर ओरंगजेबला छत्रपती संभाजी महाराजांची ताकद समजली.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...