विनोद जाधव एक संग्राहक

Friday 26 July 2019

मुस्तफाखान याने शहाजी राजांना किल्ले जिंजी जवळ कैद केले ती तारीख होती 25 जुलै 1648.

शहाजीराजे यांची छावणी चोहोबाजूंनी अकस्मात वेढली गेली. दिलावरखान, मसूदखान, सर्जायाकुतखान, अंबरखाना, फरहादखान, खैरातखान, बाळाजी हैबतराव, याकूतखान, आजम खान, बहलोलखान, मलिक रेहान, राघव मंबाजी, वेदजी भास्कर, सिद्धोजी पवार, मंबाजी पवार, मंबाजी भोसले मालोजी पवार, तुळोजी भोसले, बाजी घोरपडे खंडोजी अंबाजी व मानजी तीन घोरपडे बंधू व यशवंतराव वाडवे एवढ्या #सरदार लोकांनी मुस्तफाखान यांच्या आज्ञेवरून शहाजीराजांच्या छावणीला ससैन्य घेरले. खासा मुस्तफाखान सेनेचे पीछाडीचे सर्व बाजूनी संरक्षण करीत होता. आकस्मात वेढली गेली शहाजी राजांची छावणी पूर्णपणे बेसावध होती. हत्तीवर हौदे चढवलेली नव्हते. घोड्यांवर खोगीर घातली नव्हती. सैनिकांची पथके सावध नव्हती. त्यांची नायक अजून झोपेतच उठायचे होते. रात्रीच्या जागरणामुळे पहारेकऱ्यांच्या डोळ्यावर झोपेची झापड होते. अशा अवस्थेतच चारही बाजूंनी वेढले गेल्याचे कळताच शहाजीराजांची सेना गोंधळ व कोलाहलात बुडून गेली. तेवढ्यातही या आवाजाने जागे होतच शहाजीराजांना सर्व कल्पना क्षणात लक्षात आली. त्यांनी सैन्याला सज्ज होण्याचा जोराने हुकूम सोडला. हुकमानुसार सैन्य सज्ज होऊ लागले. एवढ्यात बाजी घोरपडे घोड्यावर स्वार होऊन शहाजीराजांनी छावणीच्या रोखाने दौडत आला. त्याच्या सोबत खंडोजी अंबाजी व मालोजी घोरपडे, यशवंतराव वाडवे, मालोजी पवार, तुळोजी भोसले हेही घोड्यावर स्वार होऊन आले. त्यांचे सैनिक त्यांच्या भोवताली होतेच. शहाजी राजांची छावणी काहीशी सावरली जात असतानाच हे सारे आदिलशाही #सरदार दौडत येतानखचे चित्रं पाहून शहाजीराजांचा स्वामीनिष्ठ सेवक खंडोजी पाटील हा एकटाच त्यांच्यावर तुटून पडला. त्याने बाजी घोरपडे याच्या सैन्याशी भाल्याच्या साहाय्याने झुंज मांडली. भाला तुटला तेव्हा तलवार पुढे करून तो सरसावला. आणि बाजी घोरपडे याच्या छातीवर त्यांनी तलवारीचा वार काढला. या वराने बाजी घोरपडे चक्कर आली पण लगेच सावरून त्याने गदेच्या प्रहाराने खंडोजीला ठार केले. एवढ्या वेळात शहाजीराजे व त्यांचे सैन्य लढाईसाठी कसेबसे सिद्ध झाले होते. युद्धाला सज्ज झालेले शहाजी राजे घोड्यावरून बाजी घोरपडे वर चालून गेले. त्यांच्या समवेत दसोजी गवळी, योगाजी भांडकर, संताजी गुंजावटकर, मेघाची ठाकूर, त्र्यंबकराज व दत्त राजे बंधू इत्यादी सरदारही बाजीवय चालून आले. युद्धाची धुमश्चक्री उडाली. त्र्यंबक राजे व मानाजी, दत्तराज व खंडोजी, योगाजी भांडकर, मालोजी पवार मेचाजी व आंबाजी यांची गाठ पडून खणाखणी सुरु झाली. शहाजीराजांनी बाजीस गाठले. काही काळ जोमात युद्ध चालले. पण बाजी सैनिक मोठ्या संख्येत होता. शहाजीराजांचे बळ त्याच्यापुढे कमी पडु लागले व अखेर रक्ताने माखलेले शहाजीराजे मूर्च्छित होऊन घोड्यावरून खाली कोसळले. ऐकेकाळी निजामशाही स्वतःच्या खांद्यावर तोलून मोगलांना खडे जाणाऱ्या शहाजी राजे यांची अवस्था पाहून बाळाजी हैबतराव घोड्यावरून खाली उतरले व त्यांनी स्वतः घाल फिरवून शहाजीराजांचे रक्षण केले. तेवढ्यात बाजी घोरपडे तेथे आला व त्याने स्वतच शहाजी राजांना कैद केले. शहाजीराजांच्या छावणीची दुर्दशा उडाली.
मुस्तफाखान याने शहाजी राजांना किल्ले जिंजी जवळ कैद केले ती तारीख होती 25 जुलै 1648.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...