विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 July 2019

मराठ्यांनी पांदिचेरी वर आपले भगवे निशाण फडकवले

मराठ्यांनी पांदिचेरी वर आपले भगवे निशाण फडकवले...🚩
मद्रास किनाऱ्यावरील बराचसा प्रदेश हा विजापूरच्या सत्तेच्या अंमलाखाली होता. आणि त्याचा सुभेदार #सरदार शेरखान लोदी होता. त्याचे मुख्य ठिकाण वालीकोंडापुरम येथे होते. या शेरखानाने फ्रेंच कंपनीला किनारपट्टीवर एक लहानसे खेडे वखार सुरू करण्यासाठी दिले. फ्रेंच कंपनीचा हिंदुस्थानातील प्रमुख फ्रँन्काईस मार्टिन याने या संधीचा फायदा घेऊन तेथे वखार तर थाटलीच, शिवाय त्या खेड्याचे एका संपन्न नगरात रूपांतर केले. पुढे हेच नगर " पांदिचेरी " या नावाने प्रसिद्धीस आले. या नगराने मराठा-फ्रेंच संबंधात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्नाटक मोहिमेत या शेरखान लोदीचा जबरदस्त पराभव केला आणि त्याच्या ताब्यात असणारा मद्रास किनारपट्टी वरील सर्व प्रदेश काबीज केला. त्यामध्ये ही पांदिचेरीची वसाहत होती. ती शिवाजी महाराजांनी हस्तगत केली. अशा प्रकारे मराठ्यांचे पांदिचेरी वर आधिपत्य प्रस्थापित झाले.

मराठ्यांनी पांदिचेरी वर आपले भगवे निशाण फडकवले ती तारीख होती - 17 जुलै 1677.

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...