विनोद जाधव एक संग्राहक

Friday 13 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 57


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 57
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------2
बायजाबाईसाहेब ह्यांनी महाराज जनकोजीराव ह्यांस फार वाईट रीतीने वागविले, असा त्यांच्यावर कित्येक इतिहासकारांचा आरोप आहे. परंतु तो वास्तविक खरा नसून, त्यांत अतिशयोक्ति फार आहे. सुरेंद्रनाथ राय नामक ग्वाल्हेरच्या एका इतिहासकारांनीं, इंग्रजी ग्रंथकारांचा अनुवाद करून, बायजाबाईसाहेब व जनकोजीराव ह्यांच्या कलहासंबंधाने लिहितांना असे ह्मटले आहे की, “बाईनीं आपल्या अज्ञान मुलास कोणत्याही प्रकारचे शिक्षण न देऊन संस्थानच्या राजकारणांविषयीं त्यास सर्वथा अज्ञानांधकारांत ठेविलें. त्यांनी संस्थानचीं भावी राज्यसूत्रे चालविण्यास तो अगदी अपात्र व्हावा असा यत्न केला; व त्यास अयोग्य रीतीने प्रतिबंधांत ठेविले. त्याच्या मनाची वाढ खुटावी, स्वावलंबनाचा स्वाभाविक अंकुर त्याच्यामध्ये मुळांतच तुटला जावा, त्यास जगाचे अल्पही ज्ञान मिळू नये, त्याने नेहमीं दास्यवृत्तीमध्ये राहून राज्यकारभार हाती घेण्यास धजू नये, आणि त्याच्या मनांत आपणांविषयीं पोकळदरारा व अमर्याद भीति राहावी, असा बाईनीं वर्तनक्रम ठेविला. 1. The Bai kept her Ward devoid of all education, and in profound ignorance of state affairs. She did her best to make him utterly unfit to conduct the future Government of the country, and subjected him to galling restraints. Her policy was to dwarf the growth of his mind, to nip in the bud the native spirit of self-reliance, to keep him in utter ignorance of the world, and to fill his mind with a sort of vague and indefinite fon." for her, that in future he might not shake off her: thraldom, and take the Government in his own hands &c." -Gualdo by Rog). Page 333. (३ परंतु खरा प्रकार असा नव्हता. महाराणी बायजाबाईसाहेब ह्या स्वभावतः फार तेजस्वी व तीव्र होत्या, व त्यांना ग्वाल्हेरचा राज्यकारभार स्वतःच्या हातीं ठेवण्याची मनुष्यस्वभावानुरूप इच्छा होती, ह्या दोन्ही गोष्टी जरी मान्य केल्या, तरी जनकोजीराव ह्यांस त्यांनी अतिशय वाईट रीतीने वागविलें व कलहाचे बीजारोपण केले, असेच केवळ ह्मणुतां येत नाहीं. हा कलह उत्पन्न होण्यास ग्वाल्हेर दुरबारचे कुटिल लोक व त्यांच्या दुष्ट मसलती, आणि जनकोजीरावांची अल्प बुद्धि व उच्छंखल वृत्ति हीच कारणीभूत झाली असावीत

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...